मानसिक संतुलन बिघडलेल्या त्या बेघर, अनाथ, मनोरुग्ण महिलेला मानवसेवा प्रकल्पाचा आधार...
अहमदनगर - मार्च ०३, २०२०
बायपास रस्त्यालगत, काटेरी झुडपात एक बेघर, अनाथ, मनोरुग्ण महिला असल्याची माहिती अरणगाव येथील ग्रामस्थ श्री सोन्याबापु मुदळ यांनी मानवसेवा प्रकल्पाला दिली. काही क्षणातच मानवसेवेचे स्वयंसेवक तेथे पोहचले. शरीराची दुर्गंधी, प्रचंड अस्वच्छता, कपड्यांचे भान नाही, केसांत माती व उवा, निराशेच्या डोहात बुडालेल्या २७ वर्षीय बेघर, अनाथ, मनोरुग्ण महिलेला बुधवार दि.०३/०३/२०२१ रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *मानवसेवा* प्रकल्पात आधार दिला. प्रकल्पात या महिलेची संपुर्ण स्वच्छता करुन, चांगले कपडे घातले, जेवण दिले. काहीवेळातच मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार सुरु केले. प्रकल्पात सध्या ४५ लाभार्थी उपचार घेत आहेत. संस्थेचे स्वयंसेवक अनिता मदणे, राहुल साबळे, अशोक मदणे, कोमल कांबळे, नितीन बर्डे, प्रसाद माळी, सोमनाथ बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे हे स्वयंसेवक या बेघर मनोरुग्ण महिलेच्या पुनर्वसनाकरीता परिश्रम घेत आहेत.
*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*मानवसेवा प्रकल्प*
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*
☎ (०२४१) २४२९९४२
📱 ९०११७७२२३३, ९११२०४९१९१, ९११२०५९१९१,
वाचा -
मिलिंद एकबोटे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल -..
No comments:
Post a Comment