जागतिक महिला दिन - WORLD WOMEN'S DAY

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 जगत जननी सलाम



    ‌                   धर्ती आणि स्त्री 

धरती सर्व विश्वाचा भार आपल्या हातांवर घेणारी धरती पुराण काळात उल्लेख आहे धरती आणि स्त्री यांना बरेच काही सहन व सहनशीलता सहनशक्ती करण्याची ताकद देवाने दिलेली आहे धरती वर उभयचर जलचर खेचर माणूस असे विविध जीव वावरत असतात निसर्ग झाडें झुडपे. धबधबे. हीरवळ. आणि याच धरतीमधून आपणास खाण्यास सकस अशी विविध पिके घेतली जातात हा सर्व सकारात्मक विचार झाला आत्ता नकारात्मक विचार असा आहे धर्तीवर माणसाचे वास्तव्य वाढले झाडें झुडपे यांची अमानुष कत्तल केली गेली गगणला स्पर्श करणार्या सिमेंटची जंगले तयार झाली त्यासाठी जमिनींची बेमाफी खुदाई करण्यात आली बांधकाम करण्यासाठी लागणारे पाणी मिळवण्यासाठी जमीनीत २००/३००/ फुटांपर्यंत बोअरवेल घेतली जाते जागोजागी अशी बोअरवेल घेवून जमीनीची अक्षरशः चाळण केली गेली विहीर नाले तलावे धरणे नदिपात्राची दुर्दशा याला कारणीभूत माणव आहे पण सहज आणि निमुटपणे हे सर्व सहन करणारी धरती याच जमीनीवर बंबारी झाली अनु बाॅमब चाचणी येथेच कितेक युद्ध याच धर्तीवर झाली रात्रंदिवस चालणारी वाहने याच धर्तीवर आपणास खेळ खेळण्यासाठी मैदाने. याचाच अर्थ धरती शिवाय पर्याय नाही कधी कोपली नाही आणि जर कधीं कोप आणि धर्तीवर चाललेला अन्याय सहन झाला नाही तर डोळ्यांचे पापणी लवेल एवढा जरी राग आला तर गावच्या गावं मोठी शहरे यांचें काय होते ते आपणं पाहिले आहे भुकंप नावाने सुध्दा आपला थरकाप उडतो कोयना धरण. किल्लारी. सुनामी. हे आपण नुकत एकूण आहे भोगले नाही किती सहन करायच या धरतीन म्हणून धर्ती आणि स्त्री यात सहन करण्याची शक्ती आहे ती कोणात फारशी नाही 

             स्त्री. प्रेमाचा. मायेचा आपुलकीचा. मराठी संस्कृती चा अभिमान असा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही शासनाने. मुलगी झाली हो. मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली मुलगी आगमनाचे स्वागत करा पण असे घडते काय मुलगी संख्या घरात जास्त असल्यास येणाऱ्या मुलीच नाव ठरलेलं असतं. नकुशी. म्हणजे नको असणारी. वाढवताना सुध्दा मुला पेक्षा मुलगीला वागणूक वेगळीच असते सगळ्यात दुजा भाव मग ते खाणं पिणं कपडे काम. शिक्षण. राहण्यावर बंधन. फिरण्यावर बंधनं वागणूक हीणतेची मिळते मुलांना मात्र कोणतेही बंधन नाही त्यांनी कसेही वागले तरी चालेल पण बंधन फक्त मुलीवर हळूहळू मुलीचं वय वाढत असतें लगेचच आई वडील यांना मुलीच्या वयाच्या विचार न करता लग्नाची घाई होते

           गत काळात बालविवाह करण्याची प्रथा होती लहान वयात लग्न झाल्यास सासरचे रितीरिवाज. माणसात मिसळणे. संसाराची गोडी लागावी परस्थिती. वय वाढले तर लग्नात हुंडा देण्याच्या भितीपोटी अशा विविध कारणे लावून बालविवाह करण्याकडे लोकांचा कल होता नंतर समाजातील समाजसेवक यांनी हि व ब्रिटिश सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार केला आणि बालविवाह प्रथा बंद झाली आज लग्न करताना हुंडा देणे ही नवीन प्रथा रूजू झालीं मुलगा नोकरी असेल तर. जमीन जुमला. जास्त असेलतर आई वडील यांना एकुलता एक असेल तर आणि जर तो सरकारी नोकरीत असेल तर अशा विविध बेसवर हुंडा लग्न मोठ्या कार्यालय उच्च प्रतीचे शोभेल असे जेवण पाहुणचार. मागण्याचा व देणेचा व्यवहार जसे नवरदेव विकणे आहे अशा पध्दतीने पार पडतो मुलीच्या आई वडील यांची परस्थिती हुंडा देण्याची नसेल तर फक्त मुलीच्या सुखासाठी जमीन जनावरे सोने व अन्य सामान विकणारे आई वडील मी पाहिले आहेत काय त्यांनी मुलगीला जन्म देवून पाप केले आहे काय विचार करायला लावणारा विषय आहे समाजात काही समाजसेवक आणि महिला क्रांती झाली आणि १९६१ साली हुंडाप्रतिबंधक कायदा तयार झाला वरिल प्रमाणे सर्व मागण्या मान्य करून अखेर लग्न सोहळा पार पडतो मुलगी सासरी येते आणि सासरची मंडळी लालची नसल्यास जीवनाचे सोन जगात अशी काही घरे मी पाहिली आहेत की जिथे सुन लेक म्हणून वागवली जाते सासरची मंडळी लालची असल्यास पहिल्या दिवसापासून घालून पाडून बोलणे सासु सासरे नंदन यांच्याकडून जाचाला सुरवात होते बायकांची मोठी ताकद असते ती म्हणजे नवरयाची सात नवरा त्यांच्या आई वडील बहिण यांचे ऐकणारा असेलतर लग्न करून आलेल्या मुलीन कोणाकडे पाहायचं जाच सुरू होतो जेवन न देणे माराहाण करणे. शारीरिक वेदना देणे मानसिक त्रास. भाजने. कोंडून घालणे. आणि जर या सर्वांचे नाहि जमत असे दिसल्यास अंगावर राॅकेल टाकून जाळण्यासारखे प्रकार होताना दिसतात आणि याच कारण असते ते म्हणजे माहेरून. पैसा. गाडी. जागावाटपाबाबत. सोने दागिने. अशा विविध मागण्यासाठी सासरी मुलीचा छळ केला जातो पण एकंदरीत विचार केला तर मोठ्या हौसेने मुलींचे लग्न करून देणारया आई वडील यांचा काय दोष सासरच्या छळाचा मुलगी आपल्या आई वडील यांना त्रास होईल म्हणून वाच्यता सुध्दा करतं नाही आणि निमूटपणे सहन करते एक वेळ अशी येते कि त्या मुलीला तीचा जीव गमावावा लागतो अजून थोडा समाज सुधारला आणि मुलगी शिकवा तरच देश व घर शिकेल याचा खरा अर्थ समाजाला कळला आणि समाजात उठाव साक्षरता यामुळे कौटुंबिक हिंसाचार यापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने हिंसाचार प्रतिबंधक २००५ हा प्रभावी कायदा तयार केला 

     वरील प्रमाणे बालवधू किंवा प्रौढ वधू यांचे सासरी जीवन व्यवस्थित चाललें तर मुलींवर मातृत्व येते कमी वयात लग्न झालेल्या मुली बाळंतपणात दगावणयाचे प्रणाण जास्त असते त्यातून काही सुखरुप झालेल्या मुलींनी मुलीला जन्म दिला तर जाचात डबल वाढ होते मुलगा किंवा मुलगी होण्यास मुलीलाच कारणीभूत ठरविले जाते आणि घरात होणारे सर्व बिघडलेल्या कामांचा अपशकुनी म्हणून त्या मुलींवर अक्षेप घेतला जातो नाहक त्रास देणे एवढाच उद्देश असतो यात मुल मोठी होतात शाळेत जाणे त्यांचे आवरणे घरातील वाढा उष्टी काढा धुन रानातील काम शेणघाण यातच त्या माऊलींचे आयुष्य झगडत असते दुःख सांगणार कोणाला मुलगा मोठा झाला लग्न झाले आणि तो बायकोचा हात धरून शहराकडे राहावयास गेला घरात म्हातारी आणि म्हातारा दोघच वय झालेलं दवाखाना औषध यासाठी पैसा नाही जे काय होते ते मुलाला शिकविण्यासाठी खर्च केले आपल्या उतरत्या वयात आई वडील यांची देखभाल करील या विश्वासाने आत्ता या दोघांचं काय एक म्हनं आहे बाप मरावा पण आई जगावी आपली आई भिक मागून स्वता उपाशी राहून मुलाला जेवूं घालेल आई नावात सर्व विश्वाचे रहस्य दडलेले आहे देवाने सुध्दा जन्म जिच्या पोटी घेतला ती एक स्त्री आहे एवढे महत्व स्त्री जन्माला आले आपला विचार बदलण्याची गरज आहे

          आज काय परस्थिती आहे मुली शिकल्या साक्षर झाल्या पुरुषांबरोबर प्रत्त्येक कामात खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली आहे वैमानिक. नौदल सैनिक पोलिस. असे कोणते काम नाही कि ते महिला करू शकत नाहीत सर्व बौद्धिक खेळ. मैदानी खेळ. यात सुध्दा प्रविण आहेत महिलांसाठी छेडछाड विरोधी कायदा. घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा. बलात्काराविषयी कायदे. असे विविध कायदे महिलांना संरक्षण देण्यासाठी राबविले जातात पण आज खरोखरच महिला सुरक्षित आहे का ? रोज एकतरी बातमी वाचण्यात येथेच शाळेत मुली सुरक्षीत नाहीत. रस्त्यावर छेडछाड होण्याचा धोका आहे. बाजारात गेलेली मुलगी घराकडे मागे येई पर्यंत आई दरवाजाकडे बघत असते कारण आज महिला सुरक्षित नाही कायदा कागदावर नको अमलात आणा  

                 ज्या देशात महिला सुरक्षीत नाही तो देश सुरक्षित असू शकतो का

                आज महिला दिन. ८ मार्च. आपण कोणाचा सन्मान करतो जे कायम आपल्या नजरेसमोर आहेत पण अशा माझ्या काही आई बहीण आहेत कि ज्या बांधकाम कामगार. वीटभट्टी कामगार. धुनी भांडी काम करणारे. सफाई कामगार. अशा आपण विचार ही करु शकणार नाही अशा ठिकाणी काम करतात त्यांच्या जीवावर लाखों रुपये मिळवणारे मजल्यावर मजले बांधणारे यांनी कधी या अशा महिलांचा कामाच्या ठिकाणी सन्मान केला आहे का ? नाही आपणास लाज वाटते एका कामगारांचा सन्मान करण्याची 

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

आपल्या सहकार्याची गरज आहे

वाचा - 

लेखकांना जपले पाहिजे - नजीर शेख ...

न्याय विकणारी साखळी साखळी - A.Munde...

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...

बालविवाह बालविवाह - A.MUNDE ...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या