आणीबाणीची तरतूद

 

*# आणीबाणीची तरतूद *#

               आणीबाणी संबधी उपबंध अनुच्छेद ३५६/३५७ नुसार

* ३५६ ‌जर एखाद्या राज्याचे शासन या या संविधानाच्या उपबंधास अनुसरून चालविणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि आहे याबाबत त्या राज्याच्या राज्यपालांकडून. शासन विहित अहवाल मिळालयावरून अन्यथा राष्ट्रपती यांची खात्री झाली तर

* त्या राज्य शासनाची सर्व किंवा त्यापैकी कोणतीही कार्ये राज्यपाल. अथवा राज्यातील राज्य विधानमंडळाकडून. अन्य कोणताही निकाय किंवा प्राधिकरण यांच्या ठायी निहित असलेल्या अथवा त्याला वापरता येणयासारखा सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही शक्ति सवताकडे घेता येतील 

     *. त्या राज्याच्या विधानमंडळाचया शक्ति संस्थेकडून किंवा तिच्या प्राधिकारानवये. वापरण्यात येतील असे घोषित करता येईल 

   *. त्या राज्यातील कोणताही निकाय किंवा प्राधिकरण यांच्याशी संबंधित असलेल्या या संविधानाच्या कोणत्याही उपबंधाचे. प्रवर्तन संपूर्णपणे किंवा अंशतः निलंबित करणारे उपबंध धरून उद्घोषणेची उद्दिष्टे अमलात आणण्याकरिता राष्ट्रपतीला जरूर किंवा इष्ट वाटतील असे आनुषंगिक व परिणामी उपबंध करता येतील

            परंतु उच्च न्यायालयाच्या ठायी निहित असलेल्या किंवा त्याला वापरता येण्यासारखा शकतिपैकी कोणतीही शक्ति स्वताकडे घेण्यास अथवा उच्च न्यायालयाशी संबंधित असलेल्या या संविधानातील कोणत्याही उपबंधाचे प्रवर्तन संपूर्णपणे किंवा अंशतः निलंबित करण्यास या खंडातील कोणत्याही गोष्टींमुळे राष्ट्रपती प्राधिकृत होणार नाही. 

     * अशी कोणतीही उद्घोषणा नंतरच्या उद्घोषणे द्वारे प्रतयाहात करता येईल किंवा बदलता येईल. 

       * या अनुच्छेदाखाली प्रत्येक उद्घोषणा संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल आणि ती उद्घोषणा पूर्वीच्या उद्घोषणेस प्रतयहात करणारी उद्घोषणा असल्यास तेवढी बाब खेरीज करून एरव्ही. दोन महिने. संपताच ती उद्घोषणा जारी असण्याचे बंद होईल मात्र तो कालावधी. संपण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात ठरावा द्वारे तिला मान्यता देण्यात आली असेल तर अशी कोणतीही उद्घोषणा ( पूर्वीच्या उद्घोषणा प्रतयाहात करणारी उद्घोषणा ) लोकसभा जेव्हा विसर्जित झालेली आहे अशा काळात प्रस्तुत केली गेली किंवा या खंडात निर्दिष्ट केलेल्या दोन महिन्यांच्या काळात लोकसभेचे विसर्जन झाले तर आणि जर तो कालावधी संपण्यापूर्वी राज्यसभेने उदघोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला असेल पण लोकसभेने अशा उद्घोषणा बाबत कोणताही ठराव पारित केला नसेल तर लोकसभा तिच्या पुनर्गठन नंतर प्रथम ज्या दिनांकास भरेल त्या दिनांकापासून तीस दिवस संपताच ती उद्घोषणेस जारी असण्याचे बंद होईल मात्र उक्त तीस दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही त्या उदघोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला असेल तर

      * याप्रमाणे मान्यता दिलेली उद्घोषणा ती प्रतयाहात झाली नाही तर ( उद्घोषणा प्रस्तुत करण्यात आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या ) कालावधी संपताच जारी असण्याचे बंद होईल

          परंतु अशा एखाद्या उदघोषणा अंमल चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून पारित होईल. तर व तेव्हा तेंव्हा ती उद्घोषणा ती प्रतयाहात झाली नाही. या खंडातील एरव्ही ज्या दिनांकापासून आणखी सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत ती अंमलात असणा-या चे चालू राहिल पण अशी कोणतीही उद्घोषणा काही झाले तरी तीन वर्षांहून अधिक काळ अंमलात राहणार नाही. 

              सहा महिन्यांच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले आणि उक्त कालावधीत राज्यसभेने अशा उद्घोषणाचा अमंल चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर ती लोकसभा तिच्या पुनर्गठनेनंतर प्रथम ज्या दिनांकास भरेल त्या दिनांकापासून तीस दिवस संपताच ती उद्घोषणा जारी असण्याचे बंद होईल मात्र उक्त तीस दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही त्या उद्घोषणा अमंल चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव पारित केला असेल तर  

           ११ मे १९८७ रोजी खंड (१) अन्वये पंजाब राज्याच्या बाबतीत केलेल्या उद्घोषणाचया या संबंधात या खंडाच्या पहिल्या परंतुकामधील " तीन वर्षांहून या निरदेशाचा अर्थ " चार वर्षांहून असा निर्देश म्हणून लावण्यात येईल 

     * (५) खंड (४) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी खंड (३) खाली मान्यता दिलेल्या उद्घोषणा अमंल अशी उद्घोषणा प्रस्तुत केल्याच्या दिनांकापासून एक वर्ष उलटून गेल्यानंतरचया कोणत्याही कालावधी मध्ये चालू ठेवण्याबाबतचा ठराव पारित करावयाचा असल्यास 

      * संपूर्ण भारतामध्ये किंवा प्रकरणपरतवे. संपूर्ण राज्यामध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही भागांमध्ये आणीबाणीची उद्घोषणा जारी आहे 

   * राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यामधील अडचणींमुळे खंड (३) खाली मान्यता दिलेल्या उद्घोषणा अमंल आशा ठरावामधये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत चालू ठेवणे आवश्यक निवडणूक आयोगाने प्रमाणित केले आहे. असे झाल्याशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहाला असा ठराव पारित करता येणार नाही 

          ११ मे १९८७ रोजी खंड (१) अन्वये पंजाब राज्याच्या बाबतीत केलेल्या उदघोषणेला लागू होणार नाही 

        * ३५७ (१) अनुच्छेद ३५६ चे खंड (१) खाली प्रस्तुत केलेल्या उद्घोषणा द्वारे. राज्याच्या विधिमंडळाच्या शक्ति संस्थेकडून किंवा तिच्या प्राधिकरणानवये. वापरण्यात येतील असे घोषित आले असेल

           * संसदेने राज्य विधिमंडळाची कायदे करण्याची शक्ति राष्ट्रपतीला प्रदान करणे आणि अश्या प्रकारे प्रदान केलेली शक्ति ज्या शर्ती घालणे राष्ट्रपतीला आयोगय वाटेल. अशा शरतीचया अधीनतेने. त्याने त्यासंबंधात विनिर्दिष्ट करावयाच्या अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडे प्रतयायोजित करण्यास त्याला प्राधिकृत करणे 

         * संसदेने किंवा राष्ट्रपतीने किंवा उपखंड किंवा उपखंड (क ) खाली अशी कायदे करण्याची शक्ति ज्याच्या ठायी निहित केली आहे. अशा प्राधिकरणाने संघराज्याला अथवा त्यांच्या अधिकारांना किंवा प्राधिकरणाला शक्ति प्रदान करणारे व त्यांना कर्तव्य नेमून देणारे अथवा शक्ति प्रदान करण्यास व कर्तव्य नेमून देण्यास प्राधिकृत करणारे कायदे करणे 

  * निकडीची प्रस्थिती युद्ध

 आक्रमण, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी या व यांसारख्या इतर आपत्तींमुळे राष्ट्राचे दैनंदिन जीवन निरनिराळ्या प्रकारे विस्कळीत होते. ज्या प्रमाणात हे जीवन विस्कळईत होत असेल, त्या प्रमाणात निकडीची परिस्थिती निर्माण होते. निकडीच्या परिस्थितीचे कारण व अवस्था यांवर तिचे गांभीर्य व तीव्रता अवलंबून असतात. लढाई, आक्रमण, अंतर्गत बंडाळी यांमुळे निर्माण होणारी आणीबाणी, इतर कारणांमुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीपेक्षा अधिक गंभीर व तीव्र असते. त्यातही लढाई, आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी चालू असतानाची आणीबाणीची अवस्था तत्पूर्वीच्या किंवा नंतरच्या अवस्थेपेक्षा केव्हाही अधिक कठीण असते.आणीबाणीची अवस्था व तीव्रता जशी कमीजास्त असेल, त्याप्रमाणे त्या परिस्थितीस तोंड देण्याकरिता सौम्य किंवा कडक उपाययोजना करावयास पाहिजे. अनावश्यक कडक उपाय योजण्यात आले, तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांस व परिणामत: लोकशाहीस धोका निर्माण होण्याची भीती असते; तसेच अयोग्य सौम्य उपाय योजण्यात आले, तर गंभीर परिस्थितीस यशस्वी रीत्या तोंड देता येत नाही. म्हणून परिस्थित्यनुरूप उपाययोजना करण्याची तरतूद लोकशाही जीवनाच्या दृष्टीने आवश्यक असते.बहुतेक देशांमध्ये विधिमंडळाला आणीबाणीच्या काळात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कार्यकारी सत्तेला विशेष अधिकार देण्यात आले आहेत, त्या ठिकाणी विधिमंडळाचे नियंत्रण कार्यकारी सत्तेच्या व्यवहारावर राहावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उदा., इंग्‍लंडमध्ये १९२० च्या कायद्याने राजाला आणीबाणी उद्‌घोषित करण्याचा अधिकार आहे; पण ती उद्‌घोषणा पार्लमेंट बोलावून मंजूर करावयास पाहिजे.

भारतीय संविधानाने कार्यकारी सत्तेलाच हे अधिकार दिले आहेत, पण त्यावर संसदेचे आवश्यक तितके नियंत्रण नाही. जर विधिमंडळाचे कार्यकारी सत्तेवर प्रभावी नियंत्रण राहिले नाही, तर महत्त्वाकांक्षी व्यक्तीकडून हुकूमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. जर्मनीमध्ये वायमार-संविधानाचा फायदा घेऊनच हिटलरने हुकूमशाही निर्माण केली. म्हणून लोकशाहीनिष्ठ लोक कार्यकारी सत्तेला असे अनियंत्रित अधिकार देण्याच्या विरुद्ध आहेत.आणीबाणीच्या काळात राष्ट्राच्या साधनसामग्रीवर ताण पडतो. परिस्थितीशी मुकाबला करण्याकरिता सर्व राष्ट्रालाच तयार करावे लागते. सर्व लक्ष परिस्थितीशी सामना देण्यावर केंद्रित झाल्यामुळे सामाजिक व आर्थिक प्रगती मंदावते. व्यक्ति-स्वातंत्र्यावर व घटक राज्याच्या स्वायत्ततेवर बंधन पडते. कोठे तर न्यायालयाचे अधिकार सीमित होतात व संघराज्याला एकावयवी राज्यसदृश स्वरूप प्राप्त होते. राष्ट्राच्या अस्तित्वाचाच प्रश्न असल्यामुळे ही सर्व बंधने नागरिकांनी स्वखुषीने मान्य करणे, हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण आणीबाणीच्या नावाखाली मूलभूत अधिकारावर शासनाने अयोग्य व अनावश्यक काळपर्यंत बंधन घालू नये, हेही तितकेच खरे आहे.तितकीच आवश्यकता पडली, तर प्रचलित कायद्याला बाजूला सारून राष्ट्राचे रक्षण करणे, हे शासनाचे सर्वमान्य कर्तव्य आहे. पण प्रश्न असा पडतो, की आणीबाणीच्या काळात असे अधिकार देणाऱ्या तरतुदींचा समावेश संविधानात करण्याची आवश्यकता आहे काय?

भारतीय संविधनात अशा तरतुदी आहेत. पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांच्या संविधानांत अशा तरतुदी नसूनही ते महायुद्धासारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीविरुद्ध उपाययोजना यशस्वी रीत्या करू शकले.निरनिराळ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल, की भारतीय संविधानाने आणीबाणीच्या काळासाठी जेवढे विस्तृत व विशाल अधिकार कार्यकारी सत्तेला दिलेले आहेत,तेवढे कोणत्याही संघीय संविधानाने कार्यकारी सत्तेला दिलेले नाहीत. कार्यकारी सत्तेचे अधिकार वाढविण्याकरिता जर्मन न्यायाधिशांच्या ‘आवश्यकतेच्या सिद्धांता’चा आधार घेतला जाऊ शकतो.आणीबाणीच्या तरतुदी भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद ३५२ ते ३५४, ३५८ ते ३५९), घटक राज्यासंबंधी आणीबाणी (अनुच्छेद ३५५ ते ३५७ व ३६५) व आर्थिक आणीबाणी (अनुच्छेद ३६१) अशा तीन प्रकारच्या आणीबाणी भारतीय संविधानाने कल्पिलेल्या आहेत. इतर राष्ट्रांच्या संविधानांत अशी आर्थिक आणीबाणी घोषित करण्याची तरतूद नाही किंवा असे प्रकारही कल्पिलेले नाहीत.आणीबाणी उद्‌घोषित करण्याचा अधिकार भारतीय संविधानाप्रमाणे राष्ट्रपतीला आहे. इतरत्र हा अधिकार सर्वसाधारणपणे संसदेला आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रप्रमुखाला आणीबाणीची उद्‌घोषणा करण्याचा अधिकार दिला आहे, त्या ठिकाणी संसदेच्या संमतीची आवश्यकता असते. अमेरिकेत बंदीप्रत्यक्षीकरणाच्या न्यायलेखावर बंदी घालण्याचा अधिकार काँग्रेसलाच देण्यात आला आहे.

फ्रान्समध्ये १८७८ च्या कायद्याप्रमाणे आणीबाणीची उद्‌घोषणा विधिमंडळ करू शकते. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल, तर अध्यक्षाला मंत्रिमंडळाच्या अनुमतीने अशी उद्‌घोषणा करता येते; पण त्याने विधिमंडाळाची बैठक दोन दिवसांच्या आत बोलाविली पाहिजे. जर विधिमंडळ बरखास्त झाले असेल, तर अध्यक्षाला आणीबाणी उद्‌घोषित करण्याचा अधिकार नाही. लॅटिन अमेरिकेमध्येही उद्‌घोषणा करण्याचा अधिकार विधिमंडळांनाच आहे. ऑस्ट्रेलियातही कार्यकारी सत्ता विधिमंडळाच्या पाठिंब्याशिवाय किंवा मर्जीविरुद्ध काही करू शकत नाही.भारतीय राष्ट्रपतीचा आणीबाणीच्या उद्‌घोषणेचा अधिकार हा संपूर्णपणे स्वेच्छाधीन आहे. त्याची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही. ही परिस्थिती इतरत्र नाही.आणीबाणीच्या उद्‌घोषणामुळे घटक राज्यांचे कायदे करण्याचे अधिकार भारतीय संविधानाप्रमाणे स्थगित होतात; इतकेच नव्हे, तर राज्यांच्या कार्यकारी सत्तेवर संपूर्ण नियंत्रण येते. अशा प्रकारचे नियंत्रण अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा इतर संघीय संविधानांत नाही.भारतीय संविधानानुसार मूलभूत अधिकार स्थगित करण्याचे अधिकार किंवा त्यांसंबंधी न्यायालयाकडे दाद मागण्याची तरतूद स्थगित करण्याचा अधिकारही राष्ट्रपतीला आणीबाणीच्या काळात देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या संविधानात बंदीप्रत्यक्षीकरणाव्यतिरिक्त इतर मूलभूत अधिकार स्थगित करण्याची तरतूद नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकारही तेथे स्थगित होऊ शकत नाही.आक्रमणाला किंवा कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याकरिता शासनाला अधिक अधिकार देण्याची गरज स्पष्ट आहे. पण त्याचबरोबर दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग न होऊ देण्याच्या दृष्टीनेही खबरदारी घेणे आवश्यक आहे. नाही तर लोकशाहीला व कायद्याच्या राज्यालाच त्यायोगे धोका पोहोचेल.या दृष्टीने न्यायाधिशांच्या आंतरराष्ट्रीय आयोगाने आणीबाणीसंबंधी ठरविलेली पुढील तत्त्वे उद्‌बोधक आहेत : (१) राष्ट्राच्या हिताकरिता आवश्यकता निर्माण झाल्यासच आणीबाणी उद्‌घोषित करण्यात यावी. (२) हा आणीबाणीचा काळ आवश्यकतेपेक्षा अधिक वाढविण्यात येऊ नये. (३) मूलभूत अधिकारांवर व इतर स्वातंत्र्यावर आवश्यक तेवढेच बंधन असावे. (४) आणीबाणीचा संदर्भात केलेले कायदे व दिलेले आदेश यांच्या चौकशीचा अधिकार सर्वसाधारण न्यायालयांना असावा.

   * राष्ट्रपतीने लोकसभा सत्रसीन नसेल तेव्हा राज्याचा एकत्रित निधीतून खर्च केला जाण्यास संस्थेकडून संसदेकडून अशा खर्चास मंजुरी मिळतोवर प्राधिकार देणे हे विधी मान्य आहे

      * संसदेने किंवा राष्ट्रपतीने किंवा खंड (१) चे पोटकलम (क) मध्ये निर्देशित अन्य प्राधिकरणाने राज्य विधिमंडळाच्या शक्तिचा वापर करून केलेला कायदा व तो करण्यासाठी संसद. राष्ट्रपती किंवा असे किंवा असे अन्य प्राधिकरण अनुच्छेद ३५६ खालील उद्घोषणा प्रस्तुत झाली नसती तर एरव्ही सक्षम झाले नसते असा कोणताही कायदा हा ती उद्घोषणा जारी असण्याचे बंद झाल्यानंतर. एखादे सक्षम विधिमंडळ किंवा अन्य प्राधिकरण यांच्याकडून तो बदलण्यात अथवा निरसित किंवा विशोधित करण्यात येईपर्यंत अमलात असण्याचे चालू राहील अशी तरतूद आहे

           राजकारणी लोक आपला उद्देश साध्य करण्यासाठी फेर निवडणूक लावणे. यासाठी राष्ट्रपती यांच्यावर व राज्यपाल यांच्यावर उच्च न्यायालयावर राजकीय दबाव आणून आपला पक्ष धोक्यात आहे आपण निवडून येणार नाही अशावेळी जनतेवर खर्चाचा डोंगर फेर निवडणूक लावणे हाच आणि एवढाच उद्देश असतो. आणीबाणी ही गोरगरीब जनतेला. सर्वसामान्य माणसाला त्रास देणं राष्ट्रीय आणीबाणी. राज्य आणीबाणी. व आर्थिक आणीबाणी अशी तरतूद करून त्रास देणे हाच उद्देश राजकारणी लोकांचा असतो आत्तातरी आपण ओळखण्याची गरज आहे 

         * संविधान सातवे विशोधन अधिनियम १९५६ कलम २९ अनुसूचि

        * संविधान बेचाळीस विशोधन अधिनियम १९७६ कलम ५० द्वारे

       * संविधान चववेचाळीस विशोधन अधिनियम १९७८ कलम ३८ द्वारे

       * संविधान चौसष्ट विशोधन अधिनियम १९९० कलम २ खंड द्वारे

        *. संविधान सदुषट विशोधन अधिनियम १९९० चे उपकलम २ अन्वये

       * संविधान अडतिस विशोधन अधिनियम १९७५ कलम १९७५ कलम ७ द्वारे

       संविधान बेचाळीस विशोधन १९७६कलम ५१ द्वारे 

३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून अमलात आहे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शिक्षणाच्या धनावर बसलेले साप

 

शिक्षणाच्या धनावर बसलेले साप 

              प्रसार हे आपल्यापुढे आज मोठे आवाहन आहे. शिक्षणाने प्रगती साधता येते. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत बनतो. आपल्या भोवतीच्या जगात जास्त आत्मविश्वासाने वावरू शकतो. औपाचारिक शालेय शिक्षण आणि मग तांत्रिक किंवा पदवी शिक्षण यांची सर्वांसाठीच आवश्यकता आहे. पण आपल्या देशात निरक्षर लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय अर्धवट शाळा शिकून शिक्षण थांबलेली खूप मुलं मुली आहेत. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित असा पहिला प्रश्न म्हणजे सर्वांना साक्षर कसे करता येईल. ? ‌तयासाठी. गावोगाव शाळा काढण्याचे प्रयत्न केले जातात गरिब मुलांना सवलती आणि सुविधा पुरविल्या जातात. तसेच सरकारी शाळांमध्ये मोफत हक्काचे शिक्षण सोय असते. पौढ साक्षर मोहिमेच्या द्वारे पौढानाही साक्षर करण्याचे प्रयत्न केले जातात. तरीही आज आपला समाज एकतृतियांश समाजातील मुल मुली निरक्षरच आहेत म्हणजे शिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे दुसरा प्रश्न म्हणजे शाळेत येणारा मुलगा मुलगी शेवटपर्यंत शाळेत शिक्षण घेण्यासाठी राहीला पाहिजे. आठरा विश्व दारिद्र्य यामुळे दोन चार वर्ष शिक्षण घेऊन मधोनच शाळा सोडणारे विद्यार्थी संख्या जास्त असते. गरिबी असल्यामुळे घरांचा खर्च पालनपोषण कमी पडते यामुळे या मुलांना लहानसहान कामांना लावलें जाते. त्यामुळे अशा मुलांची शाळा सुटते. यामुळे पहिल्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी चौथी पर्यंत टिकत नाही. यामुळे आपली शिक्षण व्यवस्था गाळणी किंवा फिनेलसारखी आहे. असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. प्राथमिक शाळेपेक्षा माध्यमिक शाळेत मुलांची संख्या वारंवार कमी होत आहे. यामुळे पुढील शिक्षण घेणा-या मुलांची संख्या त्याहून कमी असते. या परस्थिती मुळे शिक्षणाच्या पुरेसा परिणाम दिसून येत नाही. उच्च शिक्षण किंवा वैद्यकीय. अभियांत्रिकी शिक्षण. घेणारे मुलांची संख्या मर्यादितच राहते. 

        २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले आणि बघताबघता गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली. जगण्यासाठी कमविणारा व्यक्ती जीवाच्या भीतीने घरातच अडकून पडला त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. शासनाने मुलांचे आरोग्य टिकविण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये सर्व बंद करण्याचे आदेश दिले. आणि सर्व शिक्षण संस्था बंद झाल्या. मुलांचे शिक्षणाचे नुकसान होण्यास सुरुवात झाली. शासनाने व शिक्षण संस्थांनी मुलांना शिक्षण घेण्यासाठी आॅनलाइन शिक्षण पध्दती अमलात आणली. यासाठी नेट. अॅनडराईड मोबाईल गरजेचे आहेत. शहरांत ही अडचण आली नाही पण ग्रामीण भागात नेट नाही त्यामुळे बर्याच मुलांचे शिक्षणाचे नुकसान झाले. घरची परिस्थिती बेताची हालाखीची असल्यामुळे कामी पालकांना आपल्या मुलांना महागडे मोबाईल घेता आले नाही त्यामुळे मुलांचे शिक्षण नुकसान झाले ते वेगळं आणि काही मुलांनी आत्महत्या सुध्दा केल्या असे बरेच प्रसंग आपण वृतमानपत्र. दुरदशन. दुरध्वनी. यावर पाहीलया वाचल्या आरे वाईट झाले यापेक्षा वेगळी आपली प्रतिक्रिया नव्हती 

              काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च विद्यालये यांनी शासनाने व पुणे युनिव्हर्सिटी यांच्या कडून आदेश जारी करण्यात आला होता की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयातील कोरोना काळात जारी टाळेबंदी काळात सर्व शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये सर्व बंद होती त्यावेळी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी. ज्यांनी आपल्या शिक्षण घेण्याच्या ठिकाणी प्रवेश घेण्यापेक्षा. २०२०/२१ गुणदर्शन. जिमखाना.ग्रंथालय क्रिडा. वैद्यकीय मदत. हाॅसटेल. मेस. असा कोणताही लाभ घेतलेला नाही त्याची कोणतीही भरमसाठ मनमानी पद्धतीने फी भरून घेऊ नका असा आदेश दिला होता ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेकडे २०२०/२१ ची थकीत असणारी प्रलंबित शुल्काची रक्कम भरण्यासाठी हप्त्याची सवलत देण्यात यावी प्रयोगशाळा व ग्रंथालय यामध्ये ५०/टक्के सवलत देण्यात यावी. २०१९/२०२०. उन्हाळी सत्र मार्च २०२० चया आक्टेबर अथवा नोव्हेंबर मध्ये आयोजित परीक्षांमध्ये कैरी फारववरड पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आले होते अशा मुलांच्या अभ्यासक्रमाच्या २०/ टक्के परिक्षा शुल्क महाविद्यालय. अधिविभाग. विद्यापीठ. यांनी फी परत करावयाची आहे खेडेगावात शाळया जिल्हा परिषद शाळा रिकाम्या असताना शहरांमध्ये मात्र शाळा प्रवेश हीच एक समस्या आहे शहरांमध्ये काही प्रसिद्ध पावलेल्या. नावाजलेल्या शाळा असतात. तेथे प्रवेश मिळविण्याची सर्वांची धडपड असते. आज सुध्दा टाळेबंदी जारी होण्याचे संकेत आहेत तरीसुद्धा पालकांच्या कडून. प्रति विद्यार्थी. काॅलेज फी ७० हजार. आणि हाॅसटेल १५ हजार. जेवण महिन्याला ३५०० रूपये प्रमाणे पैसे भरुन घेतले जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुल शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये मध्ये राहतात ते फक्त दोन ते तीन महिने म्हणजे समजा एका शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये मध्ये अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिकत असतील तर एका विद्यार्थ्यांकडून १ लाख रूपये प्रमाणे सर्व शिक्षण फी वसूल केली जाते तर तीन हजार विद्यार्थी यांचें पैसै झाले किती. म्हणजे कोणीतरी म्हणलं आहे शिक्षण क्षेत्र सर्वात मोठें दोन नंबर आहे कोणताही टॅक्स नाही. कोणताही आयकर नाही. उलट शासन अनुदान देत आहे. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यात असणारी शिक्षण संस्था ह्या राजकारणी लोकांच्या आहेत. आणि शिक्षण विद्येची देवता यांच्याच घरांत विना चुंबळीच पाणी भरत आहे हे खरे आहे. 

            सोलापूर जिल्ह्यात अशी सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये केवळ उच्च शिक्षण देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येक विषयांचा आॅनलाइन तास घेतला जातो त्याला सुद्धा प्रति विषय १५ हजार फी आकारली जात आहे. म्हणजे. यशदा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पुणे यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जारी केला होता की आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी यांना पैसै द्यावे लागणार म्हणजे एका बाजूने मोबाईल कंपन्या यांनी वाढलेले रिचार्ज चे दर आणि एका बाजूला शिक्षण संस्था ऑनलाईन मार्गाने लुटत आहे म्हणजे शिक्षण घेणे आज अवघड झाले आहे सोलापूर सारख्या ग्रामीण दुर्गम भागात शिक्षणाच्या नावाखाली होणारी लूट शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये यांच्याकडून पालकांना होणारा आर्थिक मानसिक त्रास. पालकांना दिली जाणारी हीन वागणूक मग तुमचा मुलगा मुलगी घेवून जावा आमच्याकडून कोणतीही फी ची रक्कम आम्ही परत देवू शकत नाही. आमच्या शिक्षकांचे पगार कशा पद्धतीने द्यायचे. मग आपणापुढे मोठा प्रश्न आहे तो म्हणजे दरवर्षी कोट्यवधी रुपये गोळा करतात हे शिक्षण संस्था वाले काय कोण कोणत्या राजकारणी लोकांना लाच देत काय ? शासनाला विहित रक्कम दिली जाते का ? यांना कोण विचारत आहे का ? सोलापूर जिल्हाधिकारी झोपलेत का ? सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आणि कोठे आहेत कुणाला माहीत आहे का ? या लुटीला आळा कोण आणि केव्हा घालणार ? म्हणजे पुढील पिढी शिक्षणा शिवाय अडाणी अशिक्षित राहणार कां ? 

          शिक्षणात सुध्दा सरकार वर्गवारी करत आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे शिक्षण घ्या म्हणजे कामगारांचा मुलगा कामगारांचं. वकिल डॉ इंजिनिअर याची मुल वरच्या स्तरावर राहणार का ? गरिबांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी दर्जेदार खाजगी शाळा अशीच जणू विभागणी झालेली आहे. त्यामुळे सर्वांना समान हक्काचे शिक्षण संधी कशी मिळवून द्यायची हाही एक प्रश्न आहे. सरकारी शाळेच्या तुलनेने शैक्षणिक सोयी. विविध संधी. क्रिंडागणे. वैगरे बाबतीत खाजगी शाळा सरस असल्याने येथे शिकणारया मुलांचा फायद्याचं होतो. पण सरकारला संख्यात्मक दृष्टीने शिक्षणाची सुविधा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देणयावरच सर्व खर्च करावा लागतो. 

               सर्वांना शिक्षण मिळावे. हे आपले उद्दिष्ट आहे. पण शिक्षण कसे मिळावं. किती मिळावे. कोणाला उच्च शिक्षण मिळावे. वैगरे मुद्दे वादग्रस्त आहेत. म्हणूनच प्रौढ शिक्षणावर पैसे खर्च करावेत की प्राथमिक शाळांवर की उच्च शिक्षणावर असा प्रश्न उद्भवतो. शिकू इच्छिणारे वाढती संख्या आणि अपुरया सुविधा यामुळे तणाव निर्माण होतात. शिक्षणा बद्दलचा मुख्य प्रश्न आहे तो सरकारी शिक्षण आणि खाजगी शिक्षण यांच्या प्रमाणाचा. पूर्वप्राथमिक शिक्षण खाजगीच असते. पण सरकारी शाळांना सरकार अनुदान देते व त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. त्यांच्या म्हणजे शासन सरकार बरोबर खाजगी शाळाही असतात. त्याच संस्था बहुतेक वेळा इंग्रजी उच्च शिक्षण देणारया असतांत. भरमसाठ फी घेऊन तेथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे पैसे वाले. राजकारणी. सावरकर. अशा उच्चवर्णीय लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होते. यामुळे उच्च शिक्षण हे खाजगी असू नये असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. अभियांत्रिकी व व्यवसायिक. डॉ. वकिल. इंजिनिअर. यांसारखे शिक्षण देणारया संस्था सरकारी निमसरकारी संस्थांमध्ये मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि दिला जातो कारण तेवढी फी भरण्याची आपली तयारी नसते. त्यामुळे आत्ता उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाचा विचार प्रबळ होऊ लागला आहे. त्यातून गुणवत्ता. फी वाढ. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये यांची फी चया नावाखाली भरमसाठ वसुली. असे प्रश्न निर्माण होतात. पण जास्तीत जास्त मुलांना हे आकर्षक अभ्यासक्रम पूर्ण करता यावे म्हणून अशा खाजगीकरणाचा उपाय सुचवला आहे.

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वडिलोपार्जित

 

#* वडिलोपार्जित #*

               माणूस समाजप्रिय प्राणी आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र समाज पध्दती ही आपली वैशिष्ट्य आहे. सण सुध. मंगलकार्य. दुःखाचे प्रसंग. लग्न विधी व इतर सर्व होणारें विधी समाजाच्या धर्माच्या नियमानुसार करणे हे आपले कर्तव्य माणतो. आपल्याला आपल्या वडिलांकडून घर जमीन. नोकरी स्थावर मालमत्ता. व अन्य आर्थिक मालमत्ता मिळते त्या संपत्तीला वडिलोपार्जित संपत्ती म्हणलं जातं 

                    कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून आपले वडिल सर्व पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत असतात. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या आशा आकांक्षा यांचा आपल्या दैनंदिन गरजा. आपले राहणीमान यांचा गळाघोटावा लागतो आणि आपल्या मुलांना चांगलें जीवन मिळावं यासाठी आपले वडील कायम प्रयत्नशील असतात समजा आपले वडील कोणतेही सार्थ अवैध काम करत असतील तर आपल्या मुलांनी तेच काम करावे असे कोणालाही वाटत नाही 

            गतकाळात आपल्या पालकांची परस्थिती बिकट होती. समाजात विविध व्यवसाय बलुतेदार पध्दतीने केले जात होते. म्हणजे गावातील लोहार. सुतार. मोची. कुंभार. मुस्लिम अशा विविध अल्पसंख्याक जातींना आपले वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागत होते. आज आपल्या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात शिक्षणाचा प्रसार झाला आजची पिढी शिक्षण घेवून साक्षर झाली आणि आपले वडिलोपार्जित व्यवसाय करण्याची त्यांना खंत वाटू लागली. आणि वडिलोपार्जित व्यवसाय लुप्त झाले.  

        आपल्या भारतात पहिल्यांदाच राजकारण ग्रामपंचायत माध्यमातून अंमलात आले आणि आपल्या संविधानाने मतदानाचा अधिकार प्रदान केला त्यानुसार आपला व आपले हित जपणारा आपला हक्काचा माणूस निवडण्याचा अधिकार देण्यात आला आणि त्यातूनच आपल्यात इंग्रज काळातील पाटील कुलकर्णी यांना इंग्रजांनी शेतसारा व विविध कर वसूल करण्यासाठी नेमले होते म्हणजे पाटील हे नाव नसुन ती एक पदवी होती हे आपल्या ध्यानात आले. आणि एकवेळ आपल्या क्रांतिकारक. स्वातंत्र्य सैनिक. आंदोलन. मोर्चे. उठाव चळवळ या माध्यमातून बरेच संघर्ष केला आणि एक वेळ इंग्रज आपला देश सोडून गेले. पण त्यांनी दिलेल्या पदवयाचे भांडवल करून पाटील. कुलकर्णी. यांनी आपला पवित्रा सोडला नाही. आणि आपल्या देशात गावात तालुका जिल्हा यामध्ये होणारी निवडणूक यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. कारणं यांना जनतेवर राज्य करणे. जनतेला भुरळ पाडणे. बोलण्याचे कौशल्य. पैसा. माणूस बळ. जमिनींचे हस्तांतरण. अशा माध्यमातून राज्य करण्याचा धागा सापडला होता. आणि मग

              राजकारण सुरू झाले. यामध्ये अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांना कधीच संधी मिळाली नाही आणि यांनी मिळून दिली नाही कारणं जनता फक्त मतदानाची बॅंक म्हणून यांनी वापर केला. समाजात फूट पाडणे. जातीयवाद घडविणे. गरिब असेलतर आणखी गरिब कसा होईल तिकडे प्रामुख्याने लक्ष दिले. आणि अशा विविध माध्यमातून यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि तेथूनच वडिलोपार्जित या विषयाला सुरुवात झाली. वडील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सदस्य नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्यातलेच होण्यास सुरुवात झाली. आणि यांचा जयजयकार करणारे. प्रचार करणारे कार्यक्रमात खुर्च्या उचलणारे. पोस्टर डिजिटल लावण्यास आपली मुल. कारणं काय मटन आणि दारु यांमुळेच आपणं कधी पुढ गेलो नाही. आणि आज जो सुरवातीला राजकारण मध्ये गेला त्यांनंतर त्याचा मुलगा. मुलगी सून. सासू. पावणे. यांनाच निवडणूक लढण्याची संधी दिली जाते म्हणजे फक्त नाव बदलला आणि राजकारणी तोच आहे. जनतेला त्रास तोच. जनतेची लूट तीच. दहशतवाद. गुंडगिरी. अपहरण खुन. बलात्कार यांचे वाढते प्रमाण याचे कारण आहे ते म्हणजे वडिलोपार्जित पध्दतीने आलेली राजकारणातील चोर

              शुध्द बीजा पोटी फळें रसाळ गोमटी. अशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे. पण राजकारणात असणारे सर्वजण काही चोर नसतात त्यातील काहीजण समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे काही भारतीय नागरिक आहेत त्यांनी समाजाचे भल करण्यासाठी आपले पूर्ण जीवनाची होळी केली आहे. पण राजकारणात फक्त पैसा सत्ता संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने येणारे. यांना जनता मेली काय आणि जगली काय काहीच फरक पडत नाही. हजारों एककर जमीन. जागोजागी साखर कारखाने. बॅंक पतसंस्था. पेट्रोल पंप. शैक्षणिक संस्था अशा नोटा छापण्याचे उधोग निर्माण केले जातात मग काय त्यांची मुल याच पाऊलावर चालतात कारणं हे सर्व वडिलोपार्जित त्यांना मिळालेल असतं. 

   ‌. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग यातील कोणी राजकारणात दिसतं नाही आणि आलातर त्याला आपणं आपला संबंधित आहे म्हणून निवडून देत नाही. कारणं राजकारणी लोकांना या खालच्या जातीतील कोणी राजकारणात चालत नाही. आणि आपणांस पाटील कुलकर्णी यांच्या शिवाय आपल चालण नाही मला कळत नाही कशासाठी पाटील कुलकर्णी पाहिजे काय तुमच्या उरावर नाचायला पाहिजे. आजच निर्णय करा आपल्या समाजांचा प्रतिनिधी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद नेता पुढारी आमदार खासदार मंत्री का नको ? म्हणजे ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्याचीच मुल पुन्हा राजकारणात येणार आणि तुमच्यावर राज्य करतात. हे सर्व होत आपल्या मनांत आपण निवडून दिलेल्या लोकांबद्दल आदर नसून भीती असते. बोलण्याचे. विचारण्याचे धाडस नाही. आपल कोणतंही काम होत नाही त्याचा पाठपुरावा होतं नाही. आपल काम एकच आहे ते म्हणजे सर्व गप्प गुमान सहन करणे हेच आपले काम आहे

      आज वडिलोपार्जित चालत आलेले राजकारण संपविणे गरजेचे आहे. सर्व गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक सर्व जाती जमाती यांनी आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये राजकारण प्रशासन शासन यांच्या कीललया आपल्या हातात घ्या जस मतदान करताय तस मत मांडायला शिका. आपल्या हक्क व अधिकार यासाठी मैदानात येवून भांडायला शिका. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

खुळयात काढताय का ?

 

खुळयात काढताय का ?

                          बांधकाम कामगार म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक मळलेली कपडे घालणारा. हाता खोर पाट्या दुसऱ्या हातात काय असेल ते शिळपाक जेवनाचा डबा आणि चौकात आपल्या अड्ड्यावर सकाळी केविलवाण्या नजरेने आज कोणी मला कामाला बोलविण्यास येईल का ? कारण आज सर्वत्र उभी असणारी सिमेंटची जंगले आणि त्यात व्यक्तिला श्वास सुध्दा घेवत नाही अशा ठिकाणी आमचे बांधकामाशी संबंधित २२ प्रकारचें म्हणजे गंवडी. सेंटरिंग कामगार. फरशी वाले. खुदाई कामगार प्लंबर इलेक्ट्रॉनिक मजूरी करणारे असे विविध कामगारांचा समावेश बांधकाम कामगार म्हणून करण्यात येतो 

             ‌. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार सेवा शर्ती अधिनियम १९६६ चा २७ चे कलम ६२ व कलम ४० द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार सेवा शर्ती नियम २००७ तयार केले असून दिनांक १ मे २०११ रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळांची स्थापना केलेली आहे इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर अधिनियम १९९६ चे कलम ३(१) नुसार व केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने केलेल्या दिनांक २६ सप्टेंबर १९९६ चे अधिसूचनेनुसार जमीनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १/ टक्के उपकर वसूल केला जातो आणि तो वसूल करण्याचा अधिकार ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी यांना आहे

              सदरील उपकर वसुलीसाठी बांधकामास परवानगी देणारे स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय कार्यालये व शासकीय उपक्रम यांच्या अधिका-यांना अधिकार देण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र शासन. उद्योग. उर्जा व कामगार विभाग यांच्या दिनांक १६ एप्रिल २००८ रोजीचया अधिसूचने अन्वये या विभागातील अधिकाऱ्यांची उपकर वसूली अधिकारी निर्धारण अधिकारी व अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे उपकर निर्धारण अधिकारी याने उपक्रमाचे निर्धारण व उपकर वसुली अधिकार्यांने उपकर वसूल करून मंडळाकडे ३० दिवसांच्या आत विहित प्रपत्रासह भरणा करणे आवश्यक आहे. कोणत्याही दिवशी १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कामावर ठेवणार्या आशा सर्व आस्थापना की ज्यात केंद्र व राज्य शासनाच्या संस्था. स्वायत्त संस्था. सिंचन. रेल्वे. विमान. प्राधिकरण. म्हाडा. सिडको. एम आय डी सी. सर्व नगरपालिका. महानगरपालिका. टेलिफोन. विद्युत पारेषण. पूर नियंत्रण. बोगदे पूल. इमारत. रस्ते मार्ग. नेवीगेशन काम. तेल व वायु जोडणी टाकणे. वायरलेस. रेडिओ. टेलिव्हिजन टाॅवरस इ. बांधकामे करणार्या सर्व असतानाचा समावेश यात करण्यात आला आहे 

            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार याना सामाजिक. मानसिक. आरोग्य. शैक्षणिक. अशा विविध १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात या योजना दिवसभर उन्हात आपलं रक्त आठवणारा. पोटासाठी राबणारा. आपल्या व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारा दिवसभर कामाचा ताण कमी करण्यासाठी थोडा फार प्रमाणात व्यसनी असणारा बांधकाम कामगार यांना व यांच्या पत्नी मुल यांना व्यवस्थित जगता यावं यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून आर्थिक. शैक्षणिक आरोग्य विवाहासाठी मदत अशी विविध प्रकारची मदत कल्याणकारी मंडळ करत असते या कल्याणकारी योजना मिळविण्यासाठी बांधकाम कामगार वय १८/६० निर्धारीत करण्यात आले आहे यासाठी इंजिनिअर यांचा बांधकाम कामगार आहे व कामाचा अनुभव आहे असे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. बांधकाम कामगार नोंदणी शासनाच्या नियमानुसार २५ रूपये आणि वार्षिक ६० रूपये अशी एकंदरीत ८५ रुपये नोंदणी फी आकारली जाते 

                बांधकाम खरोखरच असणारा यालाच बांधकाम कामगार योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन विविध पर्याय राबवित आहे त्यानुसार मंडळ स्थापन झाले त्यावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सहहयक कामगार आयुक्त भवन येथे स्वता बांधकाम कामगार यांना जाऊन नोदणी करावी लागत असे मग जिल्ह्याला तालुके जास्त असल्यास कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नव्हते मग कामगारांचे नेते. पुढकार घेणारे एजंट यांना उदान आल आणि गठ्ठा पध्दतीने नोंदणी सुरू झाली पण यामुळे खरोखरच बांधकाम कामगार असणारा मागचं राहिला आणि कामगार अधिकारी आणि बांधकाम कामगार समोर म्हणजे एक खिडकी योजना बांधकाम कामगार नोंदणी साठी अमलात आणली पण नोंदणीत काही सुधारणा झाली नाही. बांधकाम कामगार जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्कामाला येण्यास सुरुवात झाली. शहराच्या गावाच्या लोकसंख्येचा विचार केला तर ४० टक्के बांधकाम कामगार नोंदणी होण्यास सुरुवात झाली मग रोज एवढी बांधकाम कामगार नोंदणी होत असेल तर एवढे बांधकाम कामगार आले कुठून ? ही बाब कल्याणकारी मंडळाच्या ध्यानात आले आणि मंडळाने. अट्टल विश्वकर्मा विशेष कामगार नोंदणी अभियान सुरू केले यामध्ये कामांवर जाऊन बांधकाम कामगार यांची काम करणाना नोंदणी करण्याचे आदेश दिले पण यात सुध्दा नोंदणी अधिकारी व कर्मचारी आणि संघटना एजंट दलाल याची दादागिरी वाढली अधिकारी यांना जेवन पार्ट्या सुरू झाल्या आणि खरोखरच कामगार असणारी लोक माग राहिली. आणि कूठतरी एकत्र बसून बोगस कामगार नोंदणी करण्यात आली म्हणजे शासनाची गाडी. तेल शासनाच. शासनाचा पगार. नोंदणी भत्ते शासनाचे. हे सर्व लाखों रुपये पाण्यात गेले. असा सर्व प्रकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या ध्यानात येऊ लागला वेळोवेळी बोगस कामगार नोंदणी रोखण्यासाठी बरेच प्रयत्न शासनाने केले पण सहायक आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी व संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट दलाल कामगार हितचिंतक यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा वापरला जात होता त्यातच कामगार संघटना मध्ये झालेला महिलांचा समावेश यामुळे सर्वच नियोजन विसकटल आहे कारणं महिलांना ५०/ टक्के आरक्षण पोलिस संरक्षण मग काय मनाला येईल ते करा असा प्रकार उघडकीस आला काहीजणांनी महिलांच्या नावांवर बांधकाम कामगार संघटना काढल्या आणि मग खरोखरच कामगार असणारे बांधकाम कामगार यांच्या हक्काच्या निधी हडप करणयास सुरुवात झाली 

                अखेर शासनाने एक आगळीवेगळी शक्कल लढवली आणि बांधकाम कामगार नोंदणी साठी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी करण्याची पध्दती अंमलात आणली. यामुळे बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांचा रजिस्ट्रेशन नंबर अनिवार्य करण्यात आला. नोंदणीकृत असणारा इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हाच बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक असलेलें नोंदणी प्रमाणपत्र देवू शकतो असा नियम घालण्यात आला. पण आतील बातमी आहे की आजही सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये आॅफलाईन नोंदणी पैसे घेऊन करण्यात येत आहे. पण या आॅनलाइन नोंदणी पद्धतीमुळे नेटकॅफे बांधकाम कामगार नोंदणी करणारे एजंट यांनी १०००/१२०० रूपये नोंदणी दर काढला आहे बोगस कामगार नोंदणीला ऊत आला आहे. रजिस्ट्रेशन पध्दतीमुळे खरोखरच कामगार असणारे यांना कोणीही इंजिनिअर दाखला देत नाही. इंजिनिअर लोकांनी संघटना सेवाभावी संस्था युनियन यांच्याशी लग्न लावलें आहे त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगार नोंदणी दाखल्यांच्या दर निश्चित झाला आहे. काही इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी बांधकाम कामगार नोंदणी दाखले देणे आपला धंदाच मांडला आहे. 

          बोगस कामगार नोंदणी ५०/टक्के कमी झाली ही बाब खरी असली तरी खरोखरच बांधकाम कामगार आहेत त्यांनी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी केली आहे त्यांना दोन/ तीन महिने कामगार नोंदणी साठी मॅसेज सुध्दा येत नाही. कामगारांना सहहयक कामगार आयुक्त भवन कडून कोणताही एसएमएस येत नाही. बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने केला असेल तर तो निकाली काढण्यासाठी काही विहित कालावधीत आहे का ? ज्यावेळी आपण आपला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज आॅनलाइन करतो त्यावेळी आपणांस सदर नेटकॅफे मधून एक अर्ज येतो त्यावर सदर उल्लेख केला जातो की आपला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज योग्यरीत्या यशस्वीरीत्या स्वीकारला गेला आहे आपली पोच पावती नंबर अमुक अमुक आहे असा मॅसेज येतो पण ती नोंदणी ग्राह्य धरली जात नाही. म्हणजे आमचा बांधकाम कामगार नोंदणी अर्ज नेमका जातो कुठे ? मग आमचा नोंदणी अर्ज स्विकारला गेला आहे म्हणजे आमची नोदणी झाली असे समजलें जावे का ? नसेल तर मंडळाचे ज्या कंपनीला बांधकाम कामगार यांचें नोंदणी अर्ज तपासणी टेंडर दिले आहे ते काय दोन/ तीन महिने मॅसेज येत नाही म्हणजे झोपा काढतात कां ? इतरांचे अर्ज आज भरले की लगेच दुसरया दिवशीच नोंदणी अर्ज मंजूर म्हणून मॅसेज येतो ते किती पैसे घेतात हे करण्यासाठी आणि कोणाकडून ? मग आज सांगली जिल्ह्यात जवळपास ८००० कामगार नोंदणी अर्ज पेंडीग कसे याच उत्तर सहहयक कामगार आयुक्त यांचेकडे आहे का ?मग वैयक्तिक बांधकाम कामगार नोंदणी करणारे यांना आलेले पोच पावती नंबर हे बांधकाम कामगार नोंदणी ग्राह्य धरली तर बिघडलं कुठे याच उत्तर सर्वच जिल्ह्यातील कामगारांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातील सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये चौकशी करू नका कारणं यांना प्रेमाची भाषा समजत नाही आंदोलन करा अशा अधिकारी व कर्मचारी यांना कोंडून घाला. वेळ पडल्यास अशा आॅफिस चे दारात बसा कारणं सर्वांनी मिळून गोरगरीब बांधकाम कामगार यांना खुळयात काढलंय. 

            ज्या बांधकाम कामगारांना आपल बांधकाम कामगार नोंदणी अर्जाची पोच पावती आली आहे त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी केलेला लाभाचा अर्ज सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये ग्राह्य धरण्यात यावा. आणि बांधकाम कामगार यांची संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट कामगार हितचिंतक यांच्याकडून राजकीय आश्रयाखाली होणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे. इंजिनिअर. ठेकेदार कंत्राटदार यांनी आजपर्यंत किती बांधकाम कामगार नोंदणी दाखले दिले त्यांची चौकशी करण्यात यावी. त्यांना किती नोंदणी दाखले देणे बंधनकारक आहे याचा उलघडा सहहयक कामगार आयुक्त यांनी करावा ? बांधकाम कामगार यांना कामगार मंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे दिवाळी बोनस पुढच्या दिवाळीला वाटप केले जाणार काय याची माहिती वृतमानपत्रातून करण्यात यावी. कारणं बांधकाम कामगार यांच्यापेक्षा संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट कामगार हितचिंतक यांना त्याची जास्त गरज आहे. 

              कामगार सुरक्षा संच घेताना ज्या बांधकाम कामगार यांचे मेडिकल केल जातं त्यांचे आरोग्य रिपोर्ट बांधकाम कामगार यांना मिळाले कां ? त्या मेडिकल चेक अप करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक कामगार किती अनुदान निर्धारित केले आहे ? रक्त लघवी तपासणी सोय सुरक्षा संच केंद्रावर उपलब्ध नाही. रक्त दोन वेळा म्हणजे जेवना आगोदर आणि जेवणानंतर अस तपासले जाते त्यासाठी सुरक्षा संच केंद्रावर कामगारांसाठी नाष्टा याची सोय आहे का ? सुरक्षा संच केंद्रावर असणारे विविध झेरॉक्स प्रती मागे ५/१० रूपये आकारले जातात त्यांचे कारणं काय ? हे सर्व कर्मचारी कोणाकडून नियुक्ती करण्यात आले आहेत यांची माहिती जगजाहीर करा ? 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वधू-वर सूचक केंद्र एक सापळा

 

वधू-वर सूचक केंद्र एक सापळा 

  सात जन्माच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्याप्रमाणे प्रत्येक धर्मात लग्न हा एक धार्मिक व सामाजिक मान्यतेनुसार आपल्या व आपल्या जोडीदार पाहणे एकामेकाला पसंत करणे आणि मग लग्न करून आपणांस एकत्र राहणे. कुटुंबाला वारस देणे हे शक्य आहे  
          गतकाळात आई वडील मुलगी पसंत करत होते आणि मुल मुलगी आई वडील व वडिलधाऱ्या लोकाचा माण ठेवून गप्प गुमान लग्नाला तयार होत. आज प्रस्थिती बदलली आणि पूर्वीच्या काळात मुलीला चूल आणि मूल एवढ्या पुरते मर्यादित राहावे लागत असे. महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू महाराज. व फातिमा शेख. सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणावर भर दिला आणि चूल आणि मूल पर्यंत मर्यादित असणारी आपली मुलगी बहिण यांना शिक्षणाचा अधिकार प्रदान केला. आणि मुलगी शिक्षण घेण्यास सुरुवात झाली आणि सरकारने विविध शैक्षणिक योजना कोर्स सुरू केले. मुलींना महिलांना 50/टक्के आरक्षण अशी तरतूद केली त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींना नोकरी व विविध ठिकाणी योग्य ते आरक्षण ठेवण्यात आले त्यामुळे महिला मुली सबल झाल्या मोबाईल फोन ट्विटर फेसबुक ई-मेल यामुळे गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये घडणाऱ्या सर्व घटनेची माहिती मुलींना मिळाली आणि मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आज सर्वसामान्य अंदाज केला असता 27ते 28 वर्ष शिक्षण आणि नोकरी पाहण्यात जातात त्यामुळे लग्नाचं वय निघून जाते. 
आणि त्यातून लग्न जमलं तर मुलीची मुलांच्या बद्दल शासकीय नोकरी पाहिजे. घरात आई वडील नको. फक्त आपण दोघेच बंगला गाडी नोकरी घरात नोकर अशी मानसिकता तयार आज झाली आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती संपली आहे. आई वडील भाऊ बहीण यांचीही भेट होणे आज शक्य नाही कारणं मुलीच्या अपेक्षा वाढल्या मुलगी पाहणे ही एक आपल्या धर्मात परंपरा आहे पूर्वी स्वयंवर माध्यमातून मुलगी आपल्या जीवनसाथीची निवड करत होती पण आज स्वयंवर करायला मुल कुठ तशी आहेत व्यसनी. तंबाखू गांजा अफू चरस दारु अशी व्यसनी लागून आजची पिढी बरबाद झाली आहे मुलगी पाहावयास गेल की मुलीला विविध प्रश्न विचारले जातात. स्वयंपाक येतो का ? साफ सफाई करता येते का ? गाण येत कां ? देवपूजा येते का ? आणि त्या मुलीला व्यवस्थित चालता बोलता येत कां ? आजतर नवीन प्रथा आहे मुला मुलींची एच आय व्हि टेस्ट करण्याचा फंडा आहे. * अशी सर्व विचारणा केली जाते पण हेच प्रश्न कोणी मुलाला विचारत नाही * आजकाल बदलला आणि मुलांना असे प्रश्न विचारण्याचा अधिकार मुलींना आहे घरात कोण कोण आहे *. घर आहे का * नोकरी आहे का* पगार किती आहे त्यात दोघांचं भागेल का * मुलांची आवड आहे का * बाहेर फिरायला खायल घेवून जाणे जमलं का * असे प्रश्न आज मुली सुद्धा विचारत आहेत लग्नाच्या वयात आलेल्या मुलांचे अवघड झाले व्यसनी मुलांना आज मुली मिळत आहेत कारण त्यांच्यामागे असणारी संपत्ती बघून. पण खरोखरच कष्ट करणारे चहा गाडी. वडापाव शेतकरी गॅरेज एम आय डी सी. अशा विविध ठिकाणी काम करणारी बिगर व्यसनी मुल प्रामाणिक पणे आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारी मुल यांना मुलगी देताना मुलीचे आई-वडील दहा वेळा विचार करतात काय वाईट आहे बघा. काही मुली सुद्धा चुकीच्या मार्गाने जातात बाहेरील जातींतील मुलांसोबत पळून जाणे. जाताना घरातील पैसा दागिने घेवून जाणे. आई वडील यांच्यापासून मुलाला दूर करणे. घरात सदैव भांडत असणे. सासरच्या लोकांवर घरेलु हिंसाचार शारीरिक व मानसिक त्रास देणे असे खोटे गुन्हे दाखल करणे असे सासरच्या गरिब लोकांना त्रास दिला जातो म्हणजे मराठी भाषेत एक म्हण आहे *एका हाताने टाळी वाजत नाही * कोणालाही नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही 
                    ;आज वरिल प्रस्थिती ध्यानात घेता मुलांचे वय नोकरी यांची वाट पाहणे. भरती नाही. सरकारने भरतीसाठी वाढवलेली वयाची मर्यादा यांमुळे लग्नाची वय मुलांची मुलींची निघून गेली सर्वात मोठे संकट आज मुला मुलींच्या आई वडील यांच्यासमोर आहे कारण बिगर नोकरी कोण मुलगी देत नाही. नोकरी याची वाट बघावी तर वय निघून जात आहे अशी पालकांच्या मनाला घोर लागला आहे आज सर्व पालक यामुळे गळतील लागलें आहेत आणि त्यातून लग्न ठरलं तर मागणी वरदक्षणा म्हणून आर्थिक मागणी. कपडे लतते सोन दागिने. येणे जाणे. जेवन कस असाव. येणारे पाहुणे यांचा आदर सत्कार कसा असावा. 
 ‌. आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सर्वत्र ठिकाणी एक वेगळा व्यवसाय सुरू झाला आहे तो म्हणजे * वधू-वर सूचक केंद्र * जागोजागी विविध समाजांचे अथवा सर्व समाजातील मुला मुलींच्या जीवनसाथी निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ अशी जाहिरात केली जाते जीवनसाथी. * सप्तपदी * रेशीमगाठी * भाग्यवान * स्वप्नातील राजकुमार * सखी सहेली * अशा विविध नावांनी रोज एक वधू-वर सूचक केंद्र सुरू होत आहे त्याबरोबरच त्यांचे दरपत्रक ठरलेले आहे त्यानुसार. लग्न जमविण्यासाठी 10.000 पासून 1 लाख रूपये अशी उकळणी केली जाते. मुलगी पाहण्यासाठी जाण्यासाठी लागणारा खर्च जेवन खाण हे सर्व खर्च संबंधित व्यक्तिने करावा लागेल. लग्न ठरल्यावर पेहरावा घयावा लागेल. आगोदर पन्नास टक्के फी द्यावी लागेल. अश्या विविध अटी शर्ती नुसार हा सर्व बाजार भरत असतो 
                आपणं रोज वृतमानपत्रात वाचतो. दुरध्वनी. दुरदरशन. यामध्ये वाचतो पाहतो की आज अमुक गावांत वधू-वर सूचक केंद्र यांच्याकडे अशा काही विविध काम नसणार या. बेरोजगार. सुंदर मुली असतात त्यातील काही मुली लग्नासाठी गडबड ज्या मुलांचे आई-वडील करत असतील त्यांना बोगस मुली. बोगस घर. बोगस नोकरी 
बोगस मुलींचे आई वडील. असे सर्व नियोजन करून. मुलांना फसविलयाचे षडयंत्र रचले जाते. त्यात प्रामुख्याने वधू-वर सूचक हे सर्वात घातक व्हायरस याचे कारण आहे. आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये काम करणारे असे वधू-वर सूचक केंद्र कोणत्याही ठिकाणी नोंदित नाहीत. पोलिस स्टेशनला तक्रार करू शकत नाही. वधू-वर सूचक केंद्र चालक यांचें त्यात क्षेत्रातील गुंड गुन्हेगार. राजकारणी लोक यांच्याशी घनिष्ठ संबंध असतात. त्यामुळे यांच्याविरोधात कोणीही जात नाही. रासरोस पणे आर्थिक लुट करण्याचा आणि कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याच्या मार्ग म्हणजे वधू-वर सूचक केंद्र होय. आपणं म्हणतो सात जन्माची गाठ स्वर्गातच बांधली जाते मग आज आपला जीवनसाथी निवडण्यासाठी पैसै का मोजावे लागत आहेत. आपणच अशा विविध अवैध धंद्याला वाव देत असतो आपण देतो म्हणून ते घेतात. आजच आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये असणारे आपल्यासमोर चालणारे वधू-वर सूचक केंद्र याची माहिती नजिकच्या पोलिस स्टेशनला द्या आणि त्यांची सत्यता पडताळून पहा. 
हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या 
  ;संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.
2.देव विवाह : एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला 'देव विवाह' असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.
3.आर्श विवाह : कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला 'अर्श विवाह' असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे
4.प्रजापत्य विवाह : कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला 'प्रजापत्य विवाह' असे म्हणतात.
5.गंधर्व विवाह : या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला 'गंधर्व विवाह' असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.
6. असुर विवाह : कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला 'असुर विवाह' असे म्हणतात
7.राक्षस विवाह : कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला 'राक्षस विवाह' असे म्हणतात.
8.पैशाच विवाह : गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला 'पैशाच विवाह' असे म्हणतात.
या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती
          आज लग्न किंवा वधू-वर सूचक केंद्र यांना सहकार्य करणारे ब्राम्हण सुध्दा आहेत लग्नात आपल्या धर्मानुसार कुंडली काढणे व ती जुळविणे. गण गोत्र. वंशावळ. असे सर्व मुद्दे महत्वाचे माणले गेले आहेत त्यानुसार या सर्वांची माहिती ब्राम्हण लोकांना वेध पाठक. कुंडली शात्र गृहतारे. यांचे ज्ञान ब्राम्हण लोकाना असते असे समजलें जाते. एखाद्याची कुंडली जुळत नसेल तर ठराविक आर्थिक लाभ ब्राम्हण लोकांना दिला की कुंडली जुळते. कालसर्प योग. मंगलदोष. शनि प्रकोप. आपोआप कमी केला जातो किंवा करण्यासाठी पैसे घेऊन ही कमी करण्याची ताकद ब्राम्हण लोकात असते. लग्न लावण्यासाठी ठराविक फी. आकारली जाते. अशा लग्न विधी पार पाडणारे यांची सुध्दा संघटना आहे का ?  
          जगाचा नियम आहे की कोणासाठी कोणीतरी जगात आहे मी आजच्या सर्व तरुण मुलांना आणि तरूण मुलींना कळवळीची विनंती आहे की आपला जीवनसाथी निवडताना तो शारीरिक दृष्ट्या सदृढ असवा. घर आई वडील भाऊ बहीण असे एकत्र कुटुंबात राहणारा असावा. तो कोणतेही व्यसन करणारा नसावा. कमवून खाणारा प्रामाणिक पणे आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारा असावा. बोलन स्वभाव मायाळू असावा. मुली मुलांच्या आई वडील यांनी आपल्या आर्थिक अशा माग ठेवा. विधवा लग्नाला आत्ता शासनाने सुध्दा परवानगी दिली आहे. सोडचिठ्ठी होणारी तरूण मुलं मुली यांना सुध्दा पुनर्विवाह करण्यास परवानगी आहे. व अनेक कारणांमुळे ज्यांचे वैवाहिक जीवन विस्कळीत झाले आहे. त्यांच्यासाठी सुध्दा लग्न करणयाचा नियम आहे. पण अशी काही प्रकरणे वधू-वर सूचक केंद्र यांचें उकळ पांढरे करणारी असतात कारण यांच लग्न जमतं नाही कोण मुलगी देत नाही. कोणाला मुलगा मिळत नाही यामुळे अशी सर्व तरूण मुलं मुली व त्यांचे पालक वधू-वर सूचक केंद्र यांना मागील तेवढी फी देण्यास तयार असतात.अशामुळे भ्रष्ट कारभार जोरात चालतो 
                  ज्या खानदानात मुलगी सुंदर असेल पण त्या मुलींचे चालचलन ठिक नसेल तर ती मुलगी केल्यास आपला अपमानास्पद वागणूक मिळेल. त्यापेक्षा झोपडपट्टीत राहणाऱी मुलगी रंग चेहरेपट्टी याने थोडी कुरुप असेल आणि तिचे राहणीमान चालचलन व्यवस्थित असेल चालणे बोलणें स्वभाव प्रेमळ असेलतर अशी मुलगी केल्यासा आपल्या खानदानाचे नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जाणकार लोकांच्या मतानुसार कमळ हे चिखलातच जन्म घेत असते 
   . आजच विचार करा आणि निर्णय घ्या 
            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
x

इदाते समिती

 

इदाते समिती

                  आपल्याला सर्वात मोठा असलेला शाप म्हणजे जात वर्गवारी. त्यानुसार अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती अशी वर्गवारी करण्यात आली आहे आणि या वर्गवारी वर आजचे आणि उद्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यात  नोकरी आरक्षण * शिक्षण आरक्षण.* आर्थिक आरक्षण * सामाजिक सुरक्षा * अशा विविध मुद्यांवर जनतेला भावनिक करून राजकीय लोक आजपर्यंत राजकारण करत आले आहेत. 
           विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग राज्यातील शासन मान्यता खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांतील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विमुक्त जाती.  भटक्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा करण्याची बाब  *31 मार्च 2016 व दिनांक 16. डिसेंबर 2017 व 1 जानेवारी 2018 रोजी पर्यंत विचाराधीन होती त्यानुसार सुधारित उत्पन्न मर्यादा सन 2017/2018 या शैक्षणिक वर्षात प्रथम/द्वितीय/तृतीय /व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे त्यानुसार शैक्षणिक 2017/2018/ या शैक्षणिक वर्षापासून रूपये 6 लाख वरून रूपये 8 लाख करण्यास शासनाने मंजुरी दिली 
     ‌.          देशातील भटक्या विमुक्त जाती यांना त्यांचे संविधान प्रमाणे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी 9 जानेवारी 2015 रोजी शासनाने एक समिती गठीत केली त्याचे नाव होते भिकुजी इदाते आयोगाने 8 जानेवारी 2018 रोजी आपला भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा स्वतंत्र अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला. 
* भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना घटनात्मक संरक्षण देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग नेमण्यात यावा व त्याची नोंदणी राज्यव्यापी नोंदणी करून अनुसूचित जाती जमाती प्रमाणे त्यांना शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक धार्मिक हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी वेगळं आयुक्तालय असावे
* महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात या भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या मुलांसाठी वेगळे वसतिगृह असावित
* धोरण आखणीत या वर्गाची विशेष दखल. कायदेशीर. आर्थिक विकास. या माध्यमातून घेतली जावी 
* भटके विमुक्त शब्दांची व्याख्या योग्य निकषांवर करण्यात यावी
* एकाच जातींची वेगवेगळ्या नावांनी राज्य निहाय नोंद झलेली आहे. तर राष्ट्रीय पातळीवर जातींची एकाच नांवाने नोंद झालेली आहे
* व्यक्ती. प्राणी पक्षी  यांचीही जनगणना झाली पाहिजे
* जनगणना करून शिक्षण नोकर्या राजकारण क्षेत्रात भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना योग्य न्याय मिळावा
*भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना सरकारी सवलतीचा लाभ देणे व त्यांची नोंद होणे यासाठी सन 2003 मध्ये बाळकृष्ण रेणके समिती स्थापन करण्यात आली परंतु समितीच्या अहवालामध्ये त्रुटी आढळल्याचे कारणं देऊन विद्यमान केंद्रीय सरकारने इदाते समितीची स्थापना केली होती
* भारतात सध्या 2017 सर्वे नुसार 571 विमुक्त/ 1062भटके /अरधभटके अशा एकूण 1658 जाती जमाती आहेत
       सर्वांना समान हक्क व अधिकार न्याय स्वातंत्र्य पाहिजे असेल तर जातींचा अडसर दूर करण्याची गरज आहे कारणं जात ही आज आपल्या मुलाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे  15/टक्के एस सी व साडेसात टक्के सत्ताधारी जात वर्गाच्या नियंत्रणात असते विकासाच्या नावाखाली ही सत्ताधारी ही आर्थिक विकास महामंडळ मधील रक्कम ते आपल्या मर्जीने कोणाचाही विचार न घेता सत्तेच्या जोरावर खर्च करतात
                समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859 
बांधकाम कामगारांसाठी ज्या बांधकाम कामगारांनी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी केली आहे पण त्यांना संबंधित कामगार आयुक्त मधून कोणताही मॅसेज किंवा कामगार नोंदणी अर्ज संबंधित 
* तुमचा कामगार नोंदणी अर्ज नाकारण्यात आला आहे किंवा
* तुमचा कामगार नोंदणी अर्ज स्विकारण्यात किंवा मंजूर झाला आहे
     असा कोणताही मॅसेज दोन/तीन महिने आलेला नाही अशा बांधकाम कामगार यांनी आमच्याशी संपर्क साधा
          कामगार आयुक्त यांचे म्हणने नुसार बांधकाम कामगार नोंदणी मॅसेज केव्हा आला पाहिजे असे कोणतेही दिवस विहित करण्यात आलेले नाहीत    म्हणजे शासकीय निमशासकीय कार्यालयात विवीध दाखले नोंदणी प्रमाणपत्र किंवा इतर कोणताही शासकीय कागद नोंदवून अथवा त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी एक कालावधी निश्चित करण्यात आला आहे पण तो नियम सहहयक कामगार आयुक्त यांना बंधनकारक नाही

मनाचा रोग मनाचा रोग

 

मनाचा रोग मनाचा रोग 

                      लहानपणापासून आपल्या कळत नकळत आपण राजकीय अनुभवांना सामोरे जावे लागते कधी एकट्याने तर कधी गटाच्या समूहाच्या स्वरुपात. या अनुभवातून आपल्या देशातील राजकीय व्यवहार कसा चालतो. याबद्दल आपली काही मते बनवतात. राजकारण हा एक सामूहिक व्यवहार आहे हे आपल्या मनावर ठसते. थोडक्यात राजकीय सामाजिकीकरण यामुळे नागरिक बनतो म्हणजे आपल्या राजकीय समाजांचे एक घटक बनतो. नागरिक म्हणून आपल्या अधिकारांची आणि जबाबदारी यांची आपल्याला जाण येते 

           आपण पहिल्यामाणे आपल्या देशात विविध घटकामारफत आपण राजकारणाला सामोरे जातो. निवडणूका. चळवळी. शिक्षण. आणि संपर्क माध्यमे या सरवामारफत आपल्या राजकीय कृतीला चालना मिळते. एक खाजगी व्यक्ती म्हणून असलेलें आपले अस्तित्व थोड्याफार प्रमाणात बदलून एक कार्यकर्ता. एक प्रेशक आणि मुख्य म्हणजे एक मतदार म्हणूनच राजकीय सामाजिक अस्तित्व तयार होते. आपल्या सर्व राजकीय अनुभवामधून आपली मतदानाची कृती घडते. आपल्या देशातील राजकारणाच्या संदर्भात तिला सर्वाधिक महत्व असते. एकीकडे राजकीय कृतीच्या विविध शक्यता आपल्याला जाणवत असतांनाच राज्य संस्थेच्या ताकदिचे स्वरुपही आपल्याला उलगडत जाते. सुरक्षा दले. पोलिस. शासकीय निमशासकीय कार्यालये. अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे केवढे प्रचंड सामर्थ्य शासनाला प्राप्त होते. हे आपण दुरूनच पाहून किंवा अनुभवाने शिकतो. शासनाच्या अनुभव सन्मान आणि गौरवाच्या रुपाने आपण घेतो. एक व्यक्तिमत्त्व म्हणून राजकीय कृती करण्याच्या आपल्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती होणे आणि त्या कृतीं करण्यामधील अडचणी आणि जोखिम यांचें भान होणे असे आपल्या राजकीय सामाजिकीकरणाचे स्वरूप असते या सामाजिकीकरणा मधून आपण नागरिक बनतो याचा अर्थ आपल्या राज्य व्यवस्थेतेचया चौकटीत आपण आपले नागरिकत्व अडकवून घेतो. जसजसा आपणं पौढ वयांत राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो तसतसा आपल्या नागरिकत्वाचा अर्थ आपल्याला अजून कळला नाही

              निवडणूका वयाची अट १८ वर्ष निवडणूकीत वापरली जाणारी तत्वे म्हणजे. पैशाचा वापर. जेवन दारू. गुंडगिरी. बोगस मतदान. उमेदवारांना उचलून नेणे डांबून ठेवणे. मारामाऱ्या. खून. संघटना सहभाग. उपोषण आंदोलने. सभा मेळावे. शिक्षण. प्रसार माध्यमे. जातीयवाद. कुटील खेळ. मला सत्ता मिळावी म्हणून पडेल ते करणारे. केंदिकरण. स्वायत्तता. जमातवाद आणि राष्ट्रीय ऐक्य. लोकप्रतिनिधी विरोधी सरकारी नोकर. अधिकारशाही. प्रदेशवाद. अशी विविध माध्यमे वापरून जनतेला मूर्ख बनवून आपला सत्तेचा हेतू साध्य केला जातो

             सत्ता पैसा मनुष्य बळ हे गोळा झाल्यावर जागोजागी साखर कारखाने. एम आय डी सी. शिक्षण संस्था. बॅंक पतसंस्था सोसायट्या. पतपेढी. अशा विविध संस्था चालू करून गावातील जास्त मतदान असणारे घर. गावांत पत वजन असणारे व्यक्ती. यांना हाताला धरून मुलांना विविध ठिकाणी काम दिले जाते ते तुमच्यावर दया आली म्हणून नव्हे तर फक्त मतदानासाठी. कारणं ज्या ज्या वेळी मतदान लागेल त्यावेळी अशा विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव आणला जातो आमचा उमेदवार तुमच्या गावात निवडून आला पाहिजे मग तो दगड असला तरी नाहीतर नोकरी वरून काढण्यात येईल मग काय एका नोकरदार व्यक्तिच्या मागें कमीतकमी पाच ते सहा मतदान असत हातात असणार्या नोकरिची काळ्जी असते त्यामुळे मनांत नसताना सुद्धा केवळ राजकीय दबापोटी यांची गुलामी करावी लागते. रात्री अपरात्री घराकडे येवून दम देणे. घराची जप्ती काढण्याची धमकी. आरक्षणात जागा घर घालविणयाची धमकी. दारात रस्ता गटर करणारं नाही. घरफाळा पाणीपट्टी डबल आकारली जाईल. आणि सर्वात वाईट दिवस कोणाचे असतील तर. महिला अध्यक्ष. विद्यार्थी संघटना अधक्ष. रिक्षा माल वाहतूक चालक मालक संघटना अध्यक्ष. विविध गणेशोत्सव मंडळ. नवरात्र उत्सव मंडळ विविध युवाशक्ती प्रतिष्ठान. अशा ठिकाणी नेमले जाणारे आणि पदाच्या हव्यासापोटी राजकीय लोकांच्या ताटा खालचे मांजर होणारे यांच्यावर ईकडचा नाही आणि तिकडचा नाही पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोठेही काम होत नाही कारणं आडवा येतो तो म्हणजे पक्ष बाजूला जाता येईना विरोध करता येत नाही विरोधात बोलता येत नाही असे वाईट दिवस कार्यकर्त्यांवर येणार हे शंभर टक्के

              आपल्या सर्वांना आजच एक महत्वाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे आपण आपल्या समाजातून जमातीमधून आपला घरचा उमेदवार उभा करणे गरजेचे आहे म्हणजे उमेदवार आपला मतदार आपला आणि आपली व्यथा प्रश्न मांडण्यासाठी हक्काचा माणूस मिळेल पण आपण जात जातींची दुश्मन असा प्रकार करतोच परकयाला उचलू लागतो आणि आपल्याला खाली आणतो 

         मुस्लिम समाजाला हक्काचा असा कोणताच पक्ष नाही मुस्लिम मतदान एक गठ्ठा आहे त्यासाठी सुरवातीला काॅग्रेस सरकारने मुस्लिमांची फसवणूक केली ती म्हणजे मुस्लिम मतदान मिळविण्यासाठी हातांचा पंजा हे पक्षाचे चिन्ह ठेवले कारणं मुस्लिम समाजात हातांचा पंजा पुज्य मानला जातो. यातील राहिलेली कसर मुस्लिम मुल्ला मौलवी यांनी धर्माचा प्रसार करतांना ठराविक पक्षाचा प्रचार आपल्या कामातूनच केला आणि समाजात फूट पाडली मुस्लिम जात एकच पण त्यात सुध्दा सिया आणि सुन्नी अशा जमाती तयार केल्या आणि समाजातील एकीला सुरुंग लावला. तो आजपर्यंत सावरला नाही. आजसुद्धा एखाद्या मुस्लिम बांधवांना म्हणलं की आपल्या मुस्लिम समाजांचे हक्क अधिकार सर्व स्वातंत्र्य शैक्षणिक. आरक्षण वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक असे विविध आपले हक्क व अधिकार आपणांस मिळवून देण्यासाठी आपला हक्काचा मुस्लिम पक्ष पाहिजे आणि आहे जर एखाद्या मुस्लिम बांधवांना आपण म्हणलं अशा पक्षाचे ध्येय धोरणे उद्दिष्ट यांचा प्रसार करण्यासाठी पदाधिकारी होणार कां ? तर उत्तर येते की मी अमुक पक्षाचा पदाधिकारी आहे ते काय म्हणतील गावात मुस्लिम संख्या घर कमी आहेत. आमच्या गावात तालुका मध्ये राजकीय वर्चस्व असणारा नेता आमहाला कोठेतरी अडकवील. आम्ही विरोध करू शकत नाही. शेवटी आम्हास हेच मदत करतील. अशी न पटणारी फसवी उत्तरे दिली जातात. की त्या उत्तरांचा कोणताही अर्थ नाही म्हणजे आपल्याला गुलामी करण्याची सवय रक्तातच आहे का ? आपले वर्चस्व आपण प्रस्थापित करण्याची धमक नाही. 

            आजचं माझं मत अस आहे आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील सर्व अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांनी आप आपल्या जातीतील उमेदवार उभा करा आणि निवडून आणा मग बघा सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती. जिल्हा परिषद. व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. सर्व नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या ठिकाणी आपला माणूस घालवा आणि देशाच्या सर्व सुत्रांच्या चाव्या हातात घ्या. आणि मग सर्व व्यवस्था तुमच्या हातात घ्या त्याशिवाय बदल होणार नाही आणि यामुळे होणारा बदल इतिहास घडवेल कारणं आपल तेवढ मतदान आहे की आपणं सरकार स्थापन करु शकतो 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

व्हे प्रोटीन चा साठा जप्त - अन्न व औषध प्रशासन ची धडाकेबाज कारवाही - Whey Protein

 


दिनांक २३/१२/२०२1 रोजी अन्न व औषध प्रशासन, दक्षता व गुप्तवार्ता विभागास प्राप्त माहितीनुसार मेसर्स सिग्मा लाइफसायन्स, बंगलो भूखंड क्रमांक-२०४-२४४, आरएससी-४१, गोराई 2, प्रगती शाळेसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-400092 या पेढीची online तपासणी केली असता तेथे Health Supplements चे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चा उत्पादित करून ठेवलेला साठा आढळून आला. सदर ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चे अन्न नमुने घेवून Health Supplement 100% Whey Protein (Ammolabz) ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 76 जार (कंटेनर), ५,७५,३२०/- रुपये चा साठा तर Dietary Supplement Progenix Mass Addict ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित १०० जार (कंटेनर), १,४५,०००/- रुपये चा साठा हा काही घटकांचे प्रमाण हे RDA पेक्षा जास्त असल्याने Food Safety and Standards (Health Supplements, Nutraceuticals, Food for Special Dietary Use, Food for Special Medical Purpose, Functional Food and Novel Food) Regulations, 2016 चे उल्लंघन होत असल्यामुळे तसेच कमीदर्जा चा असल्याच्या संशयावरून व जन आरोग्य हितार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही घेण्यात येईल. सदरची कारवाई श्री. समाधान पवार, सह आयुक्त (दक्षता व गुप्तवार्ता), अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, श्री.श.रा.केकरे, सह आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व श्री.रा.दि.पवार, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ १ यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ज्ञा. सु. महाले, अन्न सुरक्षा अधिकारी, दक्षता व गुप्तवार्ता (मुख्यालय), श्री. एम. आर. महंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी, दक्षता व गुप्तवार्ता (बृहमुंबई), श्री. एन. एस. विशे, अन्न सुरक्षा अधिकारी, दक्षता व गुप्तवार्ता (बृहमुंबई), श्री. ता. ग. लोखंडे, अन्न सुरक्षा अधिकारी, बृहन्मुंबई व श्री. जी. एम. गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, बृहन्मुंबई यांनी केली आहे.
x

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या