Showing posts with label वडील. Show all posts
Showing posts with label वडील. Show all posts

वडिलोपार्जित

 

#* वडिलोपार्जित #*

               माणूस समाजप्रिय प्राणी आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र समाज पध्दती ही आपली वैशिष्ट्य आहे. सण सुध. मंगलकार्य. दुःखाचे प्रसंग. लग्न विधी व इतर सर्व होणारें विधी समाजाच्या धर्माच्या नियमानुसार करणे हे आपले कर्तव्य माणतो. आपल्याला आपल्या वडिलांकडून घर जमीन. नोकरी स्थावर मालमत्ता. व अन्य आर्थिक मालमत्ता मिळते त्या संपत्तीला वडिलोपार्जित संपत्ती म्हणलं जातं 

                    कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून आपले वडिल सर्व पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत असतात. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या आशा आकांक्षा यांचा आपल्या दैनंदिन गरजा. आपले राहणीमान यांचा गळाघोटावा लागतो आणि आपल्या मुलांना चांगलें जीवन मिळावं यासाठी आपले वडील कायम प्रयत्नशील असतात समजा आपले वडील कोणतेही सार्थ अवैध काम करत असतील तर आपल्या मुलांनी तेच काम करावे असे कोणालाही वाटत नाही 

            गतकाळात आपल्या पालकांची परस्थिती बिकट होती. समाजात विविध व्यवसाय बलुतेदार पध्दतीने केले जात होते. म्हणजे गावातील लोहार. सुतार. मोची. कुंभार. मुस्लिम अशा विविध अल्पसंख्याक जातींना आपले वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागत होते. आज आपल्या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात शिक्षणाचा प्रसार झाला आजची पिढी शिक्षण घेवून साक्षर झाली आणि आपले वडिलोपार्जित व्यवसाय करण्याची त्यांना खंत वाटू लागली. आणि वडिलोपार्जित व्यवसाय लुप्त झाले.  

        आपल्या भारतात पहिल्यांदाच राजकारण ग्रामपंचायत माध्यमातून अंमलात आले आणि आपल्या संविधानाने मतदानाचा अधिकार प्रदान केला त्यानुसार आपला व आपले हित जपणारा आपला हक्काचा माणूस निवडण्याचा अधिकार देण्यात आला आणि त्यातूनच आपल्यात इंग्रज काळातील पाटील कुलकर्णी यांना इंग्रजांनी शेतसारा व विविध कर वसूल करण्यासाठी नेमले होते म्हणजे पाटील हे नाव नसुन ती एक पदवी होती हे आपल्या ध्यानात आले. आणि एकवेळ आपल्या क्रांतिकारक. स्वातंत्र्य सैनिक. आंदोलन. मोर्चे. उठाव चळवळ या माध्यमातून बरेच संघर्ष केला आणि एक वेळ इंग्रज आपला देश सोडून गेले. पण त्यांनी दिलेल्या पदवयाचे भांडवल करून पाटील. कुलकर्णी. यांनी आपला पवित्रा सोडला नाही. आणि आपल्या देशात गावात तालुका जिल्हा यामध्ये होणारी निवडणूक यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. कारणं यांना जनतेवर राज्य करणे. जनतेला भुरळ पाडणे. बोलण्याचे कौशल्य. पैसा. माणूस बळ. जमिनींचे हस्तांतरण. अशा माध्यमातून राज्य करण्याचा धागा सापडला होता. आणि मग

              राजकारण सुरू झाले. यामध्ये अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांना कधीच संधी मिळाली नाही आणि यांनी मिळून दिली नाही कारणं जनता फक्त मतदानाची बॅंक म्हणून यांनी वापर केला. समाजात फूट पाडणे. जातीयवाद घडविणे. गरिब असेलतर आणखी गरिब कसा होईल तिकडे प्रामुख्याने लक्ष दिले. आणि अशा विविध माध्यमातून यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि तेथूनच वडिलोपार्जित या विषयाला सुरुवात झाली. वडील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सदस्य नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्यातलेच होण्यास सुरुवात झाली. आणि यांचा जयजयकार करणारे. प्रचार करणारे कार्यक्रमात खुर्च्या उचलणारे. पोस्टर डिजिटल लावण्यास आपली मुल. कारणं काय मटन आणि दारु यांमुळेच आपणं कधी पुढ गेलो नाही. आणि आज जो सुरवातीला राजकारण मध्ये गेला त्यांनंतर त्याचा मुलगा. मुलगी सून. सासू. पावणे. यांनाच निवडणूक लढण्याची संधी दिली जाते म्हणजे फक्त नाव बदलला आणि राजकारणी तोच आहे. जनतेला त्रास तोच. जनतेची लूट तीच. दहशतवाद. गुंडगिरी. अपहरण खुन. बलात्कार यांचे वाढते प्रमाण याचे कारण आहे ते म्हणजे वडिलोपार्जित पध्दतीने आलेली राजकारणातील चोर

              शुध्द बीजा पोटी फळें रसाळ गोमटी. अशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे. पण राजकारणात असणारे सर्वजण काही चोर नसतात त्यातील काहीजण समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे काही भारतीय नागरिक आहेत त्यांनी समाजाचे भल करण्यासाठी आपले पूर्ण जीवनाची होळी केली आहे. पण राजकारणात फक्त पैसा सत्ता संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने येणारे. यांना जनता मेली काय आणि जगली काय काहीच फरक पडत नाही. हजारों एककर जमीन. जागोजागी साखर कारखाने. बॅंक पतसंस्था. पेट्रोल पंप. शैक्षणिक संस्था अशा नोटा छापण्याचे उधोग निर्माण केले जातात मग काय त्यांची मुल याच पाऊलावर चालतात कारणं हे सर्व वडिलोपार्जित त्यांना मिळालेल असतं. 

   ‌. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग यातील कोणी राजकारणात दिसतं नाही आणि आलातर त्याला आपणं आपला संबंधित आहे म्हणून निवडून देत नाही. कारणं राजकारणी लोकांना या खालच्या जातीतील कोणी राजकारणात चालत नाही. आणि आपणांस पाटील कुलकर्णी यांच्या शिवाय आपल चालण नाही मला कळत नाही कशासाठी पाटील कुलकर्णी पाहिजे काय तुमच्या उरावर नाचायला पाहिजे. आजच निर्णय करा आपल्या समाजांचा प्रतिनिधी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद नेता पुढारी आमदार खासदार मंत्री का नको ? म्हणजे ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्याचीच मुल पुन्हा राजकारणात येणार आणि तुमच्यावर राज्य करतात. हे सर्व होत आपल्या मनांत आपण निवडून दिलेल्या लोकांबद्दल आदर नसून भीती असते. बोलण्याचे. विचारण्याचे धाडस नाही. आपल कोणतंही काम होत नाही त्याचा पाठपुरावा होतं नाही. आपल काम एकच आहे ते म्हणजे सर्व गप्प गुमान सहन करणे हेच आपले काम आहे

      आज वडिलोपार्जित चालत आलेले राजकारण संपविणे गरजेचे आहे. सर्व गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक सर्व जाती जमाती यांनी आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये राजकारण प्रशासन शासन यांच्या कीललया आपल्या हातात घ्या जस मतदान करताय तस मत मांडायला शिका. आपल्या हक्क व अधिकार यासाठी मैदानात येवून भांडायला शिका. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या