शोषण - शारीरिक मानसिक आर्थिक. वैद्यकीय

 

शोषण शोषण

                  आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शोषण. शारीरिक मानसिक आर्थिक. वैद्यकीय रेशन. शैक्षणिक. हक्क व अधिकार. समता भ्रष्टाचार. गुंडगिरी. दहशतवाद. कामगारांचे शोषण. नक्षलवादी. संस्कृती. बालकामगार वापर. कायदा. अशा एक ना अनेक विभागातून आपले रोजच शोषण होत असते आपण आपल्याला काय पडलंय असं म्हणून आपण त्याकडे लक्ष सुध्दा देत नाही ही आपली मानसिकता आहे. 

          वैद्यकीय क्षेत्रात आज ## रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा ## आपण बघतो वाचतो पण कधी आपण गांभीर्याने विचार केला का नाही. आज दवाखान्यात. रुग्ण सेवेच्या नावाखाली लाखोंची बिल. आपणांस न परवडणारी उपचार पद्धती आज कोणत्याही दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली जात नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येईल असे कुठेही उल्लेख केलेला नाही. आपल्याला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही. पेशंट बरा होत नसेल तर दवाखाना बदलण्याचा अधिकार नाही. रुग्णांवर कोणते उपचार सुरू आहेत हे आपणांस सांगितले जात नाही. आपल्या जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने आहेत आपणांस माहीतच नाही. त्या सर्व योजना कोणत्या दवाखान्यात आहेत हे सुद्धा आपणांस माहीत नाही. त्या योजनेचे मार्गदर्शन करणारे मदतीनीस दवाखान्यात नाहीत. महात्मा फुले जन आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला होतच नाही. मोठ्या लोकांचे उपचार मात्र या योजनेतून होतात. ज्या दवाखान्यात उपचार केला आहे त्याच दवाखान्यात असणारे मेडिकल मध्येचं औषध घेण बंधनकारक नाही. तेच औषध दुसर्या गावात कोणत्याही मेडिकल मध्ये मिळाले पाहिजे. आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर डॉ नर्स रोजच्या रोज येतात का ? प्राथमिक आरोग्य केंद्रात. डिलिव्हरी. ताप थंडी. हाडांचे डॉ. दात. कान. नाक. घसा. यांचें डॉ वेगवेगळे आहेत का ? आणि ते वेळेवर हजर असतात का ? सापाची कुत्र्याची लस उपलब्ध आहे का ? गावात गोवर लसीकरण धनुर्वात लसीकरण. अशा विविध माध्यमातून गोरगरीब जनतेचे शोषण केले जाते आणि करत आहेत

              शारीरिक शोषण सर्वात मोठी समस्या आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या आहेत. शासनाने महिलांना ५०/ टक्के आरक्षण दिले त्यामध्ये महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगलीच मदत झाली. प्रत्येक कामाच्या ठिकाणी मग ते बांधकाम क्षेत्र असो. विटट भट्टी. स्टोन क्रशर. शेतात मजुरी करणार्या महिला. विविध बॅंक आॅफिस विविध कंपन्या. यामध्ये काम करणार्या महिला अशा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मिळणारी वागणूक अगदी हिन वागणूक दिली जाते. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. शाळेत जाणाऱ्या मुली मुल यांच सुध्दा शारीरिक शोषणाच्या घटना आपण वृतमानपत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो आणि आरे आरे म्हणतो आणि विसरून जातो. म्हणजे. ## परस्त्री मातेसमान ## आज महिला सुरक्षित नाही. बाहेर तर नाहीच घरातच महिला सुरक्षित नाही. विचार बदला. एकादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असेल तर त्याच्या विरोधात उभे रहा नाहीतर आज लोकांच्या मदतीसाठी पुढे आलों नाही तर उद्या आपलय आई बहीण रस्त्यावर फिरायला भितील. कारणं मानवरुपी गिधाडे टपून बसलेले आहेत यांचं शोषण करायला. बालकामगार हा सर्वात निच प्रवृत्तीचा आलेख आहे कारण आज धाबे. विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानें. बांधकाम क्षेत्र. विटट भट्टी. बुट पाॅलिस. हमाली. अशा विविध ठिकाणी अशा कोवळ्या वयातील मुलांना काहीतरी आर्थिक लाभ देऊन वापर करून घेतला जातो. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण नाही. त्यामुळे गरिबी यामुळे अशी मुल कामास जुंपली जातात. त्या गावातील ग्रामपंचायत शहरातील नगरपालिका महानगरपालिका यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी बालकामगार यांचा वापर केला जातो तेथील संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तरतूद करणे गरजेचे आहे त्यामुळे बालकांचे शारीरिक व मानसिक शोषण होणार नाही पाटी हातात द्या डोक्यावर नको 

            शैक्षणिक शोषण हा सर्वात मोठा शाप आहे पूर्वी काळापासून राजे यांची मुल वेगळ्या पाठशाळेत उच्च शिक्षण घेत आणि गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगळे पाठशाळा. असा फरक तेव्हापासूनच आहे. आज सुध्दा काही सुधारणा नाही. म्हणजे आज सुध्दा ऐपतीप्रमाणे शिक्षण घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना. आर्ट काॅमरस. हेच करायच कारणं सायन्स मध्ये भाग घेवून इंजिनिअर डॉक्टर वकील आय एस अधिकारी होण्यासाठी पैसा नाही त्यामुळे त्याने पोलिस. सैनिक मध्येच हेलपाटे मारायचे. भरती नाही नोकरी नाही त्यामुळे छोकरी नाही. अशी परिस्थिती आज सर्वसामान्य मुलांची झाली आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात सुध्दा आज आपल्या मुला मुलींचे. शैक्षणिक शोषण केले जाते. विविध शालेय फी की जी मुलांनी कोरोना काळात शाळा बंद असताना वापरल्या नाहीत त्यांचे सुध्दा पैसे फी चया नावाखाली भरमसाठ भरुन घेऊन पालकांचे आर्थिक शोषण केले. उच्च न्यायालयाने आदेश दिला आत्ता शाळाची फी भरु न शकणार्या विद्यार्थ्यांना फी साठी शिक्षणापासून वंचित करू नका. शालेय फी मधील १५/टक्के फी माफ करा अन्यथा. पूर्ण माफी द्या पण कोणत्याही शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयाचा निर्णय आदेश माणला नाही त्यावर देखरेख नाही आदेश काढण्यापेक्षा त्यावर लक्ष कोण ठेवणारं म्हणजे शासन सुध्दा फसवणूक आपले शोषण करत आहे

      रेशन अधिनियम कायदा २०१३ हा कायदा गोरगरीब जनतेला स्वस्त व रास्त भावात गोरगरीब जनतेला अन्न धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली. गतकाळात आपल्या देशात कृत्रिम शेती पध्दती. आधुनिक शेती औजारे. खते बी बियाणे. पाणी सिंचन. या विविध उपाययोजनांचा आभाव होता. आपल्याला बाहेरच्या देशातून अन्न धान्य मागवावे लागतं होते त्यामुळे आपल्या देशात अन्न धान्य उत्पादन कमी होत होते. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात आधुनिक शेती पध्दती अंमलात आली. आणि मुबलक आणि आपल्या जनतेला पुरेसे अन्न धान्य उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शासनाने हरित क्रांती. योजना अंमलात आणली. अन्न धान्य निवडक व स्वच्छ देणे बंधनकारक आहे. पण आज रेशन दुकानदार नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. दुकान उघडे नाही. युनिट मधून एक दोन व्यक्तिचे अन्न धान्य कमी करणे. असे गोरगरीब जनतेचे शोषण केले जाते. रेशनकार्ड नविन काढणे त्यासाठी अधिकारी व कर्मचारी आणि दलाल एजंट यांचा सुळसुळाट हे सुद्धा आर्थिक शोषण करतांना आपण बघतो. विविध रेशनकार्ड संबंधित प्रकरणे आज सुध्दा तहसिलदार कार्यालय मध्ये हजारों धुळखात पडले आहेत. हे सुध्दा शोषणच आहे

            प्रत्येक गावात शहरात आठवडा बाजार भरतो. परगावाहून आलेले व्यापारी यांना बाजारात विक्री करण्यास बसण्यासाठी जागा मिळविणे साठी. संबंधित बाजार कर गोळा करणारे यांना. वाहतूक व्यवस्था करणारे कर्मचारी यांना. जादा पैसे द्यावे लागतात. गांवगुंडाचा त्रास. दुकानदारांची दादागिरी. तसेच बंदच्या काळात बाजारात फळे फुले भाजीपाला विक्री करणारे व अन्य दुकानदार यांच्या मालाची नासाधूस करणारी लोकं. 

हि सर्व एक प्रकारचीं शोषण व्यवस्था आहे याकडे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी डोळे झाक करत आहेत. म्हणजे या होणार या शोषण व्यवस्थेमध्ये हे सुद्धा सामिल आहेत 

           महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात पण आज या योजनांचा बाजार झाला आहे. जागोजागी तयार होणारी. संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय. सामाजिक. संघटनांची दुकानें यांच्या करवी नेमले जाणारे एजंट दलाल हे बांधकाम कामगार नोंदणी नावाखाली कामगारांची व. कामगारांना मिळणारे विविध योजनांचे लाभ. संघटना यांची दादागिरी. कामगाराबरोबर बॅंकेत जाणे. पैसे काढून घेणे. लाभातील ५०/टक्के रक्कम काढून घेण्याच्या घटना आपण ऐकतो. हा सर्व प्रकार सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा करून एकंदरीत बांधकाम कामगाराला आर्थिक शोषण केले जात आहे. विचारणार कोणाकडे करणारं. संघटना राजकीय. त्यामुळे राजकीय दबाव. नावांचा दबाव. अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी यामुळे बांधकाम कामगार यांचें आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे 

              शासन. विविध योजना सुरू करत आहे पण त्यात अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जमाती भटक्या विमुक्त जाती असे विविध जातींचे गट आपण वाचतो.शासकीय योजना मिळविण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे खरोखरच अनुसूचित जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती यामधील गुणवंत विद्यार्थ्यी यांना कोणताही लाभ मिळत नाही आणि घेता येत नाही. मागासवर्गीय सूतगिरणी. दिनदयाळ सूतगिरणी. अनुसूचित जाती सुतगिरण. मजूर सोसायट्या. मला एक सांगा एकतरी अनुसूचित. मागासवर्गीय. दिनदयाळ. मजूर या कोणत्याही विभागांत सदस्य म्हणून तरी आहे का ? म्हणजे फक्त मोठ्यांचे खिसे भरण्यासाठी. हि वर्गवारी केली आहे का. ? कारण प्रत्येक समाजाचा आमदार खासदार मंत्री पुढारी आहे पण तो समाजासाठी योजना आणतो त्यात. व्यवसायिक कर्ज. शैक्षणिक सवलत. नोकरी आरक्षण. पण त्यात आज तुम्ही कोणत्या जातींचे आहात हे सिद्ध करण्याची अट घातली जाते. आणि ज्यांचे पूर्वज पूर्वी पोटासाठी भटकत असतील. काही जण मागासवर्गीय असतील. काही दलित असतील तर त्यावेळी त्यांना जात वर्गवारी कशाला म्हणतात काय माहित. ? कसल जात प्रमाणपत्र असत काय माहित? कागद कसला असतो कश्यासाठी वापरतो काय माहित ? म्हणजे आज जैन पारशी शिख ज्यु मुस्लिम या पाच जाती अल्पसंख्याक म्हणून घोषित केल्या आहेत त्यांचा नेता परराज्यातील त्याला काय सुतक महाराष्टातील जनता मेली काय आणि जगली काय ? यांचा मतदारसंघ सुरक्षित व अल्पसंख्याक योजनांचा वापर फक्त आपल्या मतदारसंघात करायचा ? म्हणजे चारी बाजूंनी शोषण आपलच आहे हे लक्षात ठेवा

      जातीयवाद राजकीय मुद्दा आहे राजकारण आज आणि उद्या होणार आहे ते फक्त जातीवरच होणारं कारणं ज्या दिवशी जातं वर्गवारी संपेल त्या दिवशी राजकारण संपेल म्हणजे आपसांत जाती जाती मध्ये भांडणे लावणे. मंदिर मुद्दा. जातपंचायत. आंतरजातीय विवाह. पुतळा विटंबना.जातीचा दाखला असे विविध कारणें जातीयवाद घडविण्यास कारणीभूत आहेत. आणि हे सर्व करणारे गोरगरीब कोण नाही नेते पुढारी आमदार खासदार यांनी नेमलेले गुंड बाजारबुणगे लोक असतात पण मरतात आणि एकामेकाना मारतात ते सर्वसामान्य लोक म्हणजे दर पाच वर्षांनी आपले अनमोल मत देऊन निवडलेले लोक आपले मानसिक शोषण करतात बिकट प्रश्न आहे. आपण एखादे काम घेऊन आपल्या जिल्ह्यात असणार्या नेते पुढारी आमदार खासदार यांचेकडे जातो एक वेळ मान खाली घालून मत मागणारा आपण त्यांचेकडे जातो त्यावेळी तुम्ही पाया पडला तरी खाली बघत नाही नको उठा अस सुध्दा म्हणत नाही. ही तुमची लायकी आहे. विकास झाला भकास कोण जबाबदार.? ‌ निधी गायब कोण जबाबदार. ? वाढते शहरीकरण वाढते विविध कर कोण जबाबदार ? आपणच कारणीभूत आहोत मग काय आपण ज्यांना बसायला जागा दिली आणि त्यांनी पाय पसरले शोषण होणार आणि होतच राहणार 

          वेळोवेळी शासनाकडून जारी करण्यात आलेले शासन निर्णय कागदावरच आहेत. कारणं विविध योजना. विविध शासन निर्णय. अपंग व्यक्तींना विविध योजना वयोवृद्ध व्यक्ती अर्थसहाय्य महिलांसाठी योजना.सटॅम घोटाळा. जमीन घोटाळा. विविध आर्थिक विकास महामंडळ घोटाळा. यातून सुध्दा शोषण होतच आहे

          माहिती अधिकार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज यांचें तपासणी पडताळणी करणे यांचा सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे त्यानुसार आपण एखाद्या कार्यालयात सापेक्ष माहिती मागण्यासाठी माहिती अधिकार दाखल करु शकता. संबंधित माहिती त्या विभागाच्या जन माहिती अधिकारी यांनी ३० दिवसांत देणें गरजेचे आहे. माहीती उपलब्ध नाही माहिती न देणेचे कारण कळविणे. माहिती काय मागितली आहे तीच माहिती देणे बंधनकारक आहे. सुनावणी लागणे सुनावणी तारिख देवून संबंधित अधिकारी व कर्मचारी जाणुनबुजून सुनावणीला हजर न राहणे माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन व कर्तव्यात कसूर. दप्तर दिरंगाई कायदा अंतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई होते. माहिती न देणेचे बहाणे. त्रयसतपक्ष ही पळवाट आहे. असे काही जण माहिती अधिकारी आहेत की त्यांना संबंधित विभागाकडे २०२०/ रोजी केलेल्या निवेदन अर्ज. यांचा तपशील अहवाल विचारा माहिती काय पण तुम्ही दाखल केलेल निवेदन तक्रार अर्ज नोंदलेलाच नाही असे तुमच्या ध्यानात येईल असे होते कायदेशीर शोषण बघा विचार करा 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अन्न भेसळ प्रतिबंध नियंत्रण जनजागृती

 

भेसळ प्रतिबंध नियंत्रण जनजागृती

              माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा असतांत. मानवाला हे सर्व जिथे मिळेल तिथे त्याचे एक विशवच निर्माण होते. आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत चालले कुपोषण उपासमारी. हा आपल्याला लागेला सर्वात मोठा शाप आहे. लोकांना सकस आहार. स्वच्छ पाणी वाढती लोकसंख्या वाढती बेरोजगारी. गरिबी यामुळे वाढते अशिक्षित. यामुळे आणि शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामचुकार पणा मुळे. सापेक्ष सर्वे न झाल्यामुळे. # श्रीमंत तुपाशी आणि गरिब उपाशी # असा सर्रास प्रकार आपणांस दिसतो. आणि या अधिकारी व कर्मचारी यांच्या मुळे गोरगरीब जनतेला जीवनावश्यक सेवा सुविधा यांना पारखे व्हावे लागते 

        अन्न भेसळ हा आपणास माहीत असलेला दिवसाढवळ्या चालणारा प्रकार आहे. रेशन मधून येणारे अन्न धान्य काय दर्जाचे असतें शासन म्हणतंय सर्वांना निवडक आणि स्वच्छ अन्न धान्य मिळाले पाहिजे मग आज रेशनला येणारे अन्न धान्य किडलेले कुजके. किडे मुंग्या भुंगे पाऊडर मिश्रीत. खडे. भुसा खाण्यास अयोग्य भेसळयुक्त अन्न धान्य वितरण कसे केले जाते कारणं रेशनला येणारे अन्न धान्य गोरगरीब पोटाची खळगी भरण्यासाठी खातात. हे रेशन अन्न धान्य कोणताही अधिकारी खात नाही. आपण मूर्ख आहोत म्हणे आपण लोकशाही राज्यात आहोत म्हणून आमच्या युनियनने अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचेकडे शासकीय गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार मागितला होता. त्यांनी तो नाकारला आणि त्यासाठी सखोल असे कारणं दिले नाही. म्हणजे आपण आपल्या कल्याणासाठी निवडणून दिलेले मंत्री. हेच वरूनच रेशन अन्न धान्य मध्ये भेसळ करत नसतील काय ? प्रश्न आहे तो मोठा ? पण जनतेतील लोकशाही संपली आणि हुकूमशाही आली तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे पण विचारणा करण्याचा नाही म्हणजे भेसळ वरूनच होत आहे आणि शिल्लक राहिले ते गाव तालुका जिल्हा राज्य देश. यामधील शासकीय चोरांनी खाल्लं 

        जागोजागी शेतकरी यांच्याकडून दुध खरेदी करून त्याच दुधापासून केमिकल करून विविध पदार्थ जसे. दही ताक. लोणी व तूप दुध पाऊडर पणीर खवा. आम्रखंड श्रीखंड बासुंदी असे जीवनावश्यक घटक काढून घेवून शिल्लक राहणारे सकस विरहित दुध विविध नांवाने बाजारात विक्रीसाठी आणलें जाते त्यात सकस असे काहीच बाकी नसते लोकांच्या जिभेला चव आणण्यासाठी विविध केमिकलचा लोकांच्या शरिराला घातक असणारे असे विविध केमिकल पदार्थ वापरले जातात आणि बाजारांत तोंडाला येईल. पॅकिंग वर बेमाफी किंमत छापून विकले जातात यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी कोणताही. अन्न व औषध प्रशासन विभाग कधी गेला आहे कां ? त्याचा रिपोर्ट जगजाहीर केला आहे का ? नाही कारण तो किंवा सर्वच चालणारे दुधसंघ हे कोणत्यातरी नेत्यांचे असतांत पण लोकांच्या जीवनाचे काय ? दुध पिशवी. व अन्य दुग्धजन्य पदार्थ यांच्यावरील पॅकिंग तारीख आपण कधी चेक केली आहे का ? 

          आपल्याला खाण्यास भुरळ पाडणारे बेकरी पदार्थ. स्विटमारट. व विविध थंड पेये. ज्युस बार. असे एक नाही अनेक खाद्यपदार्थ तयार करणारी व विक्री करणारी दुकानें आज बाजारात चालत आहेत. बेकरी पदार्थ पाव बटर. केक. अशी विविध उत्पादने की जी आपण रोजच्या जीवनात आहारात वापरतो पण आपण कधी सखोल चौकशी विचार केलाच नाही. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल त्याचा दर्जा काय आहे. वापरला जाणार मैदा कसल्या गहू पासून बनविला आहे. वापरले जाणारे तेल कसल होत ? बेकरी उत्पादन करणार्या कंपनीत काम करणारे कामगार यांची सवयी बिडि सिगारेट मावा गुटखा असे विविध नशेचे पदार्थ सेवन करणारे विविध आजाराने ग्रस्त असतात. ते थुंकने. किंवा अन्य काही करत असतील का? कारण आपण बघायलाच नाही ? विचार करायलाच नको. ? पायाने पिट तुडवने. म्हणजे किती भेसळ आहे. कोणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी पडताळणी केल्याचे जगजाहीर केल का ? तपासणी पडताळणी केली का ते आधी बघा ? विविध शहरांतील चौका चौकात संध्याकाळी घरची सर्वजण एकत्र बसून. ज्युस आईस्क्रीम विविध क्रिमरोल जे आगोदरच पॅक करून ठेवलेले असतात. विविध पेये जी फळांपासून व दुधापासून व विविध केमिकल मानवाच्या जीवाला बाधक असणारे विविध कलर ज्युस साठी लागणारे साहित्य फळें मार्केटमधून. लागलेली. नासकी कुजकी. खाण्यास योग्य नसलेली अशी फळें वापरली जातात. दुधात ५० टक्के चया वर पाणी वापरले जाते. विविध केमिकल जी मानसाच्या जीभेला चव निर्माण करतात अशी घातक केमिकल जी मानवाला तात्पुरते समाधान आणि एकादा रोग जडून जातो. आज अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी जागोजागी गैरप्रकार रोखण्यासाठी धाडी टाकणे गरजेचे आहे. 

                सर्वात मोठी भेसळ होती ती म्हणजे. वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी. रगडा पॅटीस. बिर्याणी हाऊस. हाॅटेल. धाबे. नाष्टा सेंटर. चहा कॉफी. असे विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे हात गाडे. यावर. यात प्रामुख्याने वापरला जाणार कच्चा माल. म्हणजे. खराब कांदा बटाटा. बेसन ऐवजी मका पिट. खराब मिरची कोथिंबीर. आणि सर्वात मोठी भेसळ म्हणजे ज्या तेलात हे खाद्यपदार्थ तळले जातात ते तेल पंधरा पंधरा दिवस बदलले जात नाही. त्यातच हे सर्व खाद्यपदार्थ तळले जातात त्यामुळे लोकांना विष बाधा होण्याचा धोका जास्त आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यांवर काम करणारे कामगार यांचे आरोग्य हा सर्वात मोठा जटील प्रश्न आहे कारण. अन्न व औषध प्रशासन ज्यावेळी खाद्यपदार्थ विक्री करण्याचे परवाने देते तेव्हा. स्वच्छता. स्वच्छ पाणी. खाद्यपदार्थ झाकून ठेवून विकणे जाळी आवरण करणे कामगार डोकयाला कॅप. हातमोजे. बुट. उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करणे. भेसळ विरहीत अन्न विकणे. असे एक नाही अनेक अटी व शर्ती अधिन ठेवून खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी परवाने देते आज खरोखरच अस होत का ? ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी सुध्दा खाद्यपदार्थ विक्री करणारे व खाद्यपदार्थ दर्जा तपासणी पडताळणी करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या गरज आहे कोणीही करत नाही ? कोणालाही आपल्या व जनतेच्या जीवांची फिकीर नाही ? आत्ता आपणच पुढे येण्याची गरज आहे

            आली दिवाळी सोन्याच्या पाऊलानी. आनंद खुशहाली. समाधान. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश यामधून दिला जातो. लक्ष्मी पूजन. दिवाळी पाडवा. भाऊबीज. बलीप्रतिपदा. तुळशी बारस लग्न. अस नियोजन असत दिवाळीचं साबन उठन सुवासिक तेल. नविन कपडे सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक मित्र यांच्या गाठीभेटी आणि मग सर्वांचे तोंड गोड करण्याची आपली परंपरा. पहिल्या काळात लोकांच्या जवळ वेळ होता स्वता आपल्या समोर खरेदी माल करून दिवाळीसाठी लागणारे विविध पदार्थ घरच्या घरी तयार केले जात होते. आज वेळ नाही मग काय जागोजागी दिवाळी फराळासाठी लागणारे. लाडू चकल्या करंज्या चिवडा शेव काफनया. अनारसे. बुंदी लाडू. रवा लाडू. असे विविध खाद्यपदार्थ विक्री करणार्या चे सटाॅल. आगोदरच तयार असतात मग काय केव्हा करायचं म्हणून आपण केव्हा तयार केलंय. ? कोणत्या तेलात केलंय. ? विविध कोणते कलर घातले आहेत ? चटणी पुड त्यात कोणता कलर आहे ? साखरेत सॅकरिन किती पटित आहे. ? रवा मैदा कोणत्या दर्जाचा आहे ? दिवाळी फराळ तयार करताना त्यावर किती धुळ बसली. किती घातक माश्या किटक बसले ? दिवाळी तयार करणारे कामगार यांचे आरोग्य कसे होते ? त्याने स्वच्छता पाळली असेल का ? स्वच्छ पाणी वापरले असेल का ? असे विविध प्रश्न आहेत की त्यांचा आपण कधी विचारच केला नाही कारण आम्हाला तेवढा वेळ नाही म्हणजे जाणूनबुजून आम्ही भेसळयुक्त खाद्यपदार्थ घरी आणतो आणि सोबत विविध पोटाचे विकार. घसा विकार. असे विविध विकार पैसे देऊन विकत घरला आणतो. जनता जरी खुळी आहे पण आपल्या शासनाने अन्न व औषध प्रशासन विभाग प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग नेमला आहे पण तो अशा सणासुदीच्या काळात आपल्या पदांचा अधिकारांचा जनहितासाठी वापर करतो का ? आपल्या पदाचा अधिकारांचा किराणा दुकानदार यांना आपल्या फायद्यासाठी दम दिला जातो काय ? ऐवढ एवढ द्या असा प्रकार आहे कां ? 

            दिवाळी सण साजरा करताना काही सावधानता बाळगा. फटाके लहान मुलांच्या हातात देऊ नका. घराजवळ आजारी वयोवृद्ध व्यक्ती असतील तर फटाके फोडू नका. कसलीही इजा होईल असा प्रकार करू नका. कारणं दिवाळी सण साजरा करताना कोरोना महामारी संकटांचे भय मनांत ठेव. गेल्या वर्षी आपल्याला दिवाळी साजरी करण्याचा योग नव्हता कारणं कोरोना महाभयंकर संकट आपल्यावर होतें. आज दिवाळी साजरी करताना आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश एवढेच काय आपल्या घराजवळ कोरोना काळात. आई वडील गमावलेली कोणी मुल आहेत का. ? पती गमावलेली कोणी अभागी महिला आहे का ? भाऊ बहिण गमावलेली कोणी व्यक्ति आहे का ? आपली पत्नी कोरोना काळात गमावलेली कोणी व्यक्ति आहे का ? आपल्या सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक मित्र गमावलेली कोणी लोक आहेत कां ? त्यांच्या सुध्दा दुःखात सहभागी व्हा. त्याचं सुध्दा तोंड गोड करा कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना धीर द्या. फटाके फोडणे म्हणूजे आनंद व्यक्त करणे तसा आत्ता काळ नाही एकामेकाला मदत करा. माझ्या घरात दिवाळी आहे शेजार यांच्या. घरात दिवाळी आहे का ? त्यांच्यात चूल पेटली आहे का ? सर्वांच्या सुखात दुःखात सहभागी होणे यासाठी भारतीय संस्कृतीत सण ही संकल्पना आहे 

            भेसळ पासून वाचा. कोणताही खाद्यपदार्थ पारखून घ्या 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

भडका भडका

 

भडका भडका 

          भारतीय जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब आपण रोजच आपल्या चेहर्यावर बघतो. संविधान सभेने संविधान तयार करताना राज्यशासनासाठी एक यंत्र निर्माण करण्याचे एवढेच ध्येय ठेवले नव्हते. ते शासन कोणत्या ध्येयासाठी व साधण्यासाठी मानवी हक्क व अधिकार. संरक्षण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. व त्या शासनाचा मूलभूत पाया कशयावर आधारलेला आहे. भारतीय जनतेला काही महत्वाचे हकक अधिकार देण्यासाठी व ते अमलात आणण्यासाठी वचनबद्ध राहण्यासाठी हे संविधान संमत केले आहे. संविधानाने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण केले आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही ही या गणराजयाची मूलभूत तत्वे आहेत. व या गणराज्यातील सर्व नागरिकांना सामाजिक. आर्थिक. व राजनैतिक. शैक्षणिक. धार्मिक. न्याय विचार अभिव्यक्ती. विश्वास श्रद्धा उपासना. यांचें स्वातंत्र्य व दर्जा आणि संधी समानता निश्चित प्राप्त करून देणे हे गणराजयाचे परम कर्तव्य आहे. एक दिव्य असे ध्येय राष्ट्रात पुढे ठेवले आहे. वरील प्रमाणे शब्दाला एक अनन्य साधारण महत्व आहे. मानवी जीवन समृद्ध करून मानवाला सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती स्वच्छतेने करता यावे यासाठी जी समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था आवश्यक असेल ती निर्माण करण्याची मानवाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनावर आहे. असे मानले तर वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर व एकात्मता देणारी बंधुता प्रवरधीत करण्याची जबाबदारी शासनावर आहे. याचा अर्थ असा की शासनाने विषमता दूर करून विचार उपासना या क्षेत्रातील व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगता येईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे नागरिकांना विविध स्वातंत्र्य. मूलभूत हक्क व अधिकार राष्ट्राची एकता एकात्मता. राखली जाणे लोकशाही राज्यात महत्वाची घटना असेल 

              आपला देश हा सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे. समाजवादी म्हणजे आर्थिक नयायावरील आधारित समाजव्यवस्था राज्याच्या पुढाकाराने अस्तित्वात येणे आधिक साधनसंपत्ती वाटपात राज्याची प्रमुख भूमिका असणे. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही एका धर्मास पाठिंबा न देणारे कोणा एका समाजाला पाठिंबा न देणारे राज्य सर्वांना अभिप्रेत आहे आपल्या देशात सार्वभौम आहे. देशाचा राजयप्रमुख त्यांच्याकडून निवडला जावा राज्य लोकांच्या प्रतिनिधी चालवावे. स्वातंत्र्य समता बंधुता समता न्याय महागाई. भ्रष्टाचार बेरोजगारी. कुपोषण. बालकामगार वापर. अधिकारी व कर्मचारी मनमानी. असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. 

                पेट्रोल डिझेल गॅस विज बिल. हा सर्वात मोठा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेपुढे आ वासून उभा आहे. आज रोजच्या रोज पेट्रोल डिझेल यांचें दर वाढत आहेत. याचा फटका आपल्याला सुध्दा बसत आहे. पण आपण अगदी शुल्क असणारी बाब कधी नोटीस केली आहे का. परवा पुरग्रसत भागाचा दौरा. तसेच २०१४/२०१९. चे पूर. अवेळी अवकाळी झालेला पाऊस त्यात झालेले नुकसान पाहणी दौरा. विविध उद्घाटन सोहळे. विविध शासकीय निमशासकीय कार्यालये यांना भेटी. अशावेळी आपले विविध मंत्री आमदार खासदार पुढारी. यांचें वेळोवेळी समाजहिताच्या नावाखाली होणारे दौरे व त्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या ताफ्यात असणारे गाड्यांचे थवे. यांना प्रवासाला देण्यात येणारे तेल कोण देत ? खासदार मंत्री पुढारी नेते आमदार. सभेला आले उतरून सभा होईपर्यंत बाहेर असणारी यांची गाडी चालूच असतें त्यावेळी येणारा पेट्रोल डिझेल याचा खर्च कोण उचलत. ? एवढेच काय यांच दौरा काळात राहणे जेवन. व बाकिचा होणारा खर्च कोण करत ? म्हणजे तेल वाचवा देश वाचवा. ? हे फक्त सर्वसामान्य माणसावरच आहे का ? नियम अटी ह्या आपल्यासाठीच आहेत का ? आज वाढते तेलाचे दर याच कारण सरकार विविध योजना आखून आपत्ती काळात जनतेला मदत करतय त्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून ? नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य. बांधकाम कामगार कोरोना काळात सानुग्रह अनुदान. रिक्षा चालक. फळें विक्री करणारे यांना कोरोना काळात सानुग्रह अनुदान. हे शासन कोणत्या पैशातून देत काय माहित आहे का? 

                    आज पेट्रोल डिझेल दरवाढ भरमसाठ आहे पण एका बाजूला विचार केला तर मग गाड्यांची खरेदी थांबली पाहिजे होती. पण आज उलट झाल आहे की विविध शोरूममध्ये गाड्या खरेदी साठी अजून वेटींग लागत आहे म्हणजे सरकारला कळल आहे की अजून जरी पेट्रोल डिझेल दर वाढले तरी जनतेला चालतय. जनतेने एक विचार निर्धार करण्याची आज गरज आहे गाड्या चालवणे बंद करा मग तेलच नाही खपल तर दर वाढीचा विषय येतो कुठ ? आणि बारिक विचार करा आज आपल्या भागात तालुक्यात जिल्ह्यात. जागोजागी असणारे पेट्रोल डिझेल पंप कुणाचे आहेत ? ‌नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचेच आहेत म्हणजे सर्व जनतेचा पैसा कोणत्याही मार्गाने यांच्याच तिजोरीत जातो ? ‌वेळोवेळी पेट्रोल डिझेल दरवाढ बद्दल # तु कर मारलयागत मी करतो रडलयागत # आत्ता होणारी आंदोलने अशी आहेत फक्त जनतेला वाटव आमचा नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांना आपली किती काळजी आहे हे फक्त दाखविण्यासाठी आंदोलने केली जातात. जर तुम्हाला खरच जनतेची काळजी आहे तर कराकी तुमचेच पेट्रोल डिझेल विक्री करणारे पंप बघा जमतंय का ? 

                सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे डिझेल मालवाहतूक करणारे वाहने. प्रवाशी वाहतूक. करणारी वाहने. आज पेट्रोल बरोबर डिझेल दरवाढ भरमसाठ झाली आहे त्यामुळे आगोदरच टाळेबंदी काळात सर्वच बंद असल्याने व बॅंक. फायनान्स कंपन्या. व्याजाने पैसे काढून. ज्यांनी वाहन घेतली. आणि आत्ता कुठंतरी सगळ सुरू झाल पण वाहनाच भाड काही वाढल नाही पण तेलाचे दर डबल झाले त्यामुळे वाहन विकावी तर बॅंकेचे पैसे भरायचे कुठून ? वाहन विकाव तर कुटुंब अन्न पाण्यासाठी रस्त्यावर येणार ? या सर्व प्रकाराला कारणीभूत आहे तो म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढ

                 गॅस घरगुती गॅस कनेक्शन सर्वांना देणे यांच्यामागे असणारे शासन धोरण म्हणजे जळणासाठी तोडली जाणारी झाड तोड थांबवावी. चूल व औधोगिक क्षेत्रातील कारखाने यांच्या धुराडयातून बाहेर पडणारा धूर यामुळे वातावरण प्रदूषित होणे थांबवावे. चूल वापरामुळे विविध आजार रोखणे. अशा विविध लोकांच्या हितासाठी घरगुती गॅस कनेक्शन संकल्पना अमलात आणली. त्यातच व्यवसायिक वापरासाठी सुध्दा गॅस कनेक्शन सिलेंडर आहे. १९९०/१९९३ पर्यंत गॅस सिलिंडर दर ३५० होता. तोच आज ९०० रूपये वर गेला आहे म्हणजे आज सर्वसामान्य जनतेसाठी संजिवनी असणारा घरगुती गॅस आज भरमसाठ दर वाढ झाल्याने आज खेड्यातील महिलांनी गॅस सिलिंडर बाजूला ठेवून पुन्हा चूल सुरू केली आहे म्हणजे दरवाढी मुळे जनता पहिल्या जागेवरच आली 

          जीवनावश्यक वस्तू गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका चणा डाळ गोडतेल. यांच्या दरांत सुध्दा भरमसाठ वाढ झाली आहे 

     म्हणजे चारी बाजूंनी महागाई भडका उडाला आहे आणि त्यात जनता भाजून निघत आहे लवकरच जनतेने निर्णय घेण्याची गरज आहे

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय


 

परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपला प्रवास सुखकर आणि सवलतीच्या दरात होण्यासाठी महाराष्ट्र राज्य यांचेकडून एस टी हक्काची प्रवासी वाहतूक करणारी ठरली आहे. विद्यार्थी. महिला. स्वातंत्र्य सैनिक. अपंग. रोज प्रवास करणारे. नोकरी. माल वाहतूक. वयोवृद लोकांसाठी निवृत्ती लोकांना. अशा विविध माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली अविरत सेवा करत आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटामुळे जागोजागी टाळेबंदी जारी केल्यामुळे सर्वच प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती त्यावेळी एस टी महामंडळाला मोठा फटाका बसला आहे तरीही आत्ता जनजीवन सुरळीत झाले आणि पुन्हा एकदा. लालपरी रस्त्यावर धावू लागली 

                अपंगांना प्रवासात मदत करतात राखीव सिट ठेवली जाते. स्वातंत्र्य सैनिक यांना सुध्दा आरक्षण दिले जाते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये परगावाहून शिकण्यासाठी येणारे गरिब घरातील विद्यार्थी यांना पास सोय आहे. त्यामुळे सर्वात मोठी मदत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करत आहे

     सर्वात मोठी मदत आहे ती म्हणजे वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांना स्मार्टकार्ड प्राप्त करून देण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांना वयानुसार काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे यांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी

(१) राप/ वाह/ सवलत / ३४७८ दि ५/७/२०१९

(२) राप/ वाह/ सवलत/ ६८९९

दि २६/१२/२०१९

(३) राप/ वाह/ सवलत / १६५२

दि १९/३/२०२०

(४) राप/ वाह/ सवलत / १७४४

दि १९/३/२०२०

(५) राप/ वाह/ सवलत/ २०८५

दि १३)८/२०२० असे विविध निर्णय जारी केले आहेत त्यानुसार उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती १/२/३ विभाग नियंत्रक राप मुंबई. / पालघर/ रायगड पेण/ रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/ठाणे/नाशिक/ धुळे /जळगाव /अहमदनगर/पुणे/ कोल्हापूर/सांगली/ सातारा सोलापूर/ औरंगाबाद/ बीड / जालना/ लातूर/नांदेड/उस्मानाबाद/ परभणी/ नागपूर/भंडारा/ चंद्रपूर/ वर्धा/गडचिरोली/ अकोला/ अमरावती/यवतमाळ/बुलढाणा/ इ विभागातील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांचेसाठी स्मार्टकार्ड काढण्याची मुदत राप महामंडळाद्वारे जेष्ठ नागरिक तसेच सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे या कारलयाचया पत्रानुसार वरील संदरभिय पत्र क्र ०५ अन्वये जेष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी मुदत ३०/११/२०२० पर्यंत देण्यात आली होती 

              कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली होती त्यामुळे सर्वच जनजीवन विस्कळित झाले होते संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दि कमी करण्याबाबत विविध उपाययोजना अंमलात येत आहेत कोरोना विषाणू महामारी पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड काढणे शक्य नसल्याने सदर योजनेअंतर्गत दि ३१/३/२०२१ पर्यंत व त्यापेक्षा अधिक वेळ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत

           (१) जेष्ठ नागरिक यांस स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी दि ३१/३/२०२१ व त्यापेक्षा जास्त मुदतवाढ देण्यात येत आहे 

(२) दि १/४/२०२१ पासून रा प प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे

(३) दि ३१/३/२०२१ पर्यंत जेष्ठ नागरिक यांना प्रवासाकरीता सध्याची प्रचलित असलेली ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात यावे ज्या जेष्ठ नागरिक यांना स्मार्टकार्ड काढण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यांना स्मार्टकार्ड साठी अडविले जाऊ नये यासाठी

            विभाग नियंत्रक यांनी विभागीय वाहतूक अधिकारी/विभागीय लेखाधिकारी/ आगार व्यवस्थापक/ व्यवस्थापनाची प्रस्तुत मुदतवाढीची माहिती सर्व पर्यवेक्षक कर्मचारी व चालक / वाहक यांनी जेष्ठ नागरिक यांच्या योजना स्मार्टकार्ड बद्दल प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध सुचना फलक. / रोकड व तिकट विभाग/स्थानक कार्यालय/ प्रवासी सुचना फलक इ ठीकाणी वाचनीय व दर्शनीय स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी आदेश दिला आहे त्याचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे. यासाठी प्रत्येक गावात एस टी डेपो असेल तेथे समिती नेमण्यात यावी

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आमचं गाव आमचा विकास



आमचं गाव आमचा विकास


सन २०२०/२०२१/ते २०२४/२०२५ ग्रामपंचायत विकास आराखडा

            आमचं गाव आमचा विकास. उपक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना नुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मागील तीन वर्षात लोकसहभागीय नियोजन प्रकिया राबवून तयार केलेलें वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन व अंमलबजावणी मधील अनुभव याबाबत केंद्र शासनाने सूचीत केलेल्या बाबी राज्यातील मागील तीन वर्षांत आमच गाव आमचा विकास. उपक्रमांतर्गत संदर्भ क्र १ ते ४ मधील शासन निर्णय/पत्रकाद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि खालील पूरक मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन सन २०२०/२०१२ ते २०२४/२०२५ या कालावधीचा पंचवार्षिक ग्रामपंचायत विभाग आराखडा व सन २०२०/२०२१ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा अंतिम करणेबाबत कार्यवाही करावयाची आहे

        सन २०१६/२०१७ ते २०१९/२०२० या चार वर्षांचा ग्रामपंचायत विभाग आराखडा तयार करताना ग्रामपंचायतीला मिळणार या निधीच्या दुप्पट रक्कम विचारात घेण्यात आली आहे त्यामुळे या आराखड्यापैकी २०१९/२०२० या वर्षात हाती घेतलेली कामे वगळता काही प्रमाणात कामे शिल्लक असण्याची शक्यता आहे ही शिल्लक कामे आणि गावाच्या आणखी गरजा आवश्यकता गावकरयाचे पुढील नियोजन विचारात घेऊन ग्रामसभेमारफत प्राधान्यक्रम निश्चित करावयाचा आहे गावातील विविध घटकांशी विचार विनिमय करून त्यांच्या सर्व गरजा मागण्या विचारांत घेऊन सुचविण्यात आलेली कामे / उपक्रम यांचा प्राधान्यक्रम ग्रामसभेमध्ये ठरवून घेवून ग्रामपंचायतीला पुढील पाच वर्षांत येणाऱ्या निधी विचारात घेऊन निधीच्या दुप्पट रक्कमेचा सन २०२०/२०२१/ ते २०२४/२०२५ या कालावधीचा पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे त्याचप्रमाणे सन २०२०/२०२१ वर्षी ग्रामपंचायतीला अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या/प्राप्त होणा-या निधीच्या दिडपट रकमेच्या वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे

            या बाबत शासन पत्र जा क्र जी पी डी पी २०१५ /प्र क्र ३८/ पं रा ६ दि ८ जून २०१६ अन्वये स्पष्टिकरण करण्यात आल्या प्रमाणे ग्रामपंचायतीला उपलब्ध असलेल्या सोत्रातून प्राप्त होणा-या निधीमध्ये वाढ ( दुप्पट किंवा दीडपट ) न करता तरतुदी नुसार आराखडा तयार करण्यात यावा फक्त १४ वया वित्त आयोगातर्फे उपलब्ध होणा-या निधीच्या दुप्पट निधी पंचवार्षिक आराखडयासाठी व दिडपट निधी निधी वार्षिक आराखडा तयार करताना विचारांत घ्यावा त्याचप्रमाणे १४ वया वित्त आयोगानुसार अपेक्षित निधी मधून हाती घेतलेल्या व अपूर्ण असलेल्या कामासाठी आवश्यक तरतूद वजा करून उर्वरित निधीच्या दुप्पट किंवा दिडपट निधी अनुक्रमे पंचवार्षिक व वार्षिक आराखडे तयार करताना विचारांत घ्यावा यासाठी. आमच गाव आमचा विकास. उपक्रमांतर्गत संदर्भ १/४ मधील शासन निर्णय पत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि खालील पुरक माहिती व सूचना विचारात घेणे बंधनकारक आहे राज्य शासनाच्या विविध विभागांचा सहभाग विविध विभागामार्फत ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणारया केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनेचे अभिसरण करून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे ग्रामपंचायत विकास आराखड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचा समावेश करावयाचा असल्याने त्यानुसारच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार करावयाचा आहे

      महाराष्ट्र शासन २८ मे २०१९

शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक जी डी पी २०१५ / प्र क्र ३८ / पं रा ६ दि ४ नोव्हेंबर २०१५

शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक जी डी पी २०१७/प्र क्र ५१ / पं रा ६ दि ०२ फेब्रुवारी २०१८

शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक जी पी डी पी २०१८/ प्र क्र ५१/ पं रा ६ दि ६ सप्टेंबर २०१८ 

     नुसार तरतूद करण्यात आली आहे

(१) ग्रामसभा नियोजन

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करावयाची आहे आणि विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रकिया सुरळीत यशस्वी पारदर्शक पणे नियोजित पध्दतीने पार पाडण्यासाठी पंचायत समिती मतदार संघ हा नियोजन घटक म्हणून निश्चित करण्यात आला आहे मुख्य अधिकारी व कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात एक विस्तार अधिकारी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावयाची आहे विस्तार अधिकारी/प्रभारी अधिकारी यांची नियुक्ती ग्रामसभा संपर्क अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या सभेमध्ये गावातील महिला युवती युवक आर्थिक व सामाजिक कमकुवत घटक यांना समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गावातील गणासाठी एका मुख्य सेविकेची ( ‌ए बा वि से ) नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे या ग्रामसभेमधये ग्राम पंचायतीने आत्तापर्यंत हाती घेण्यात आलेली कामे व उपक्रम त्यावर झालेला खर्च शिल्लक निधी पुढील पाच वर्षांत वर्ष निहाय मिळणारे उत्पन्न व इतर सविस्तर माहिती ग्राम सभेत देणे बंधनकारक आहे गावाच्या अडचणी. त्यावरील उपाययोजना सह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे केंद्र शासनाच्या दि १३ आक्टेबर २०१८ चया पत्रानुसार सूचित केल्याप्रमाणे ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत शासनाच्या विविध विभागाकडून हाती घेतलेल्या व घेण्यात येणारया योजनांची माहिती त्या त्या विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून द्यावयाची आहे ७३ वया घटना दुरुस्ती अनुषंगाने पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरित २९ विषयांची अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या / केंद्र व राज्य शासनाच्या योजना संबंधित विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे शासनाच्या विविध योजना ग्राम स्तरावर राबवित असलेल्या व संदर्भ क्र ४ चया शासन निर्णयानुसार नमूद केल्याप्रमाणे राज्य व जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या अधिकारी व / कर्मचा-यांनी सदर ग्रामसभेत रहावयाचे असून संबंधितांना तशा लेखी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्याव्यात यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद संबंधित विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिका-यांच्या बेठका घेवून आवश्यक तो समन्वय साधावा

      या सर्व राज्य व जिल्हा परिषद विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून खालील प्रमाणे नमूद व लेखी सूचना द्याव्यात

        (१) ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या विभागामार्फत चालू वर्षी हाती घेतलेल्या योजना व कार्यक्रम उपक्रम. माहिती अंतर्गत मंजूरी असलेल्या भौतिक व आर्थिक बाबी सह योजना उपक्रम याची सधसथिती समावेश

      (२) विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना व उपक्रम

       (३) ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणारया योजनांची स्थिती उपलब्ध निधी त्यामधील अडचणी / त्रुटी 

         (४) योजनांच्या अंमलबजावणीसाठी लोकांचा सहभाग

         (५) योजना व उपक्रम यशस्वी अंमलबजावणी व पारदर्शकता लोकसहभाग ग्रामसतरावरिल प्रसिध्दी योजना अपेक्षित ध्येय ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेला भौतिक व आर्थिक सहभाग

        गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील ग्रामपंचायत सभा बैठका नियोजन करताना तालुकास्तरीय विस्तार अधिकारी / कर्मचारी संपर्क.पंचायत समिती मतदार संघ. ग्रामपंचायतीने लावलें माहिती फलक ग्रामसभा प्रसिध्दी ग्रामपंचायत राबविलेल्या योजना उपक्रमांची माहिती ग्रामपंचायत विकास आराखडा उपलब्ध होणारा निधी ग्रामसभेसाठी उपलब्ध निधी अधिकार व कर्मचारी उपस्थित आढावा पाठपुरावा सभेची जागा व व्यवस्था इ बाबींचा समावेश असतो

 ग्रामसभेत या घटकांचा समावेश

(१) महिला सभा मागासवर्गीय वंचित घटकाची सभा व बालसभा 

(२) ग्रामपंचायत विकास आराखडा

(३) महत्वकांक्षी जिल्हे

(४) मिशन अंत्योदय

(५) पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत विकास आराखडा

(६) लोकसहभागातून विना निधी / कमी खर्चाची विकास कामे / उपक्रम

(७) प्रशासकीय व तांत्रिक मान्यता

(८) क्षमता बांधणी व प्रशिक्षण

(९) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण/ कार्यशाळा

(१०) गट स्तरीय प्रशिक्षण / कार्यशाळा

(११) गण स्तरीय कार्यशाळा

(१२) ग्रामपंचायत विकास आराखडा वेळापत्रक

(१३) माहिती. शिक्षण. व संवाद

(१४) केंद्र व राज्य शासनाच्या वेबसाईटवर आराखडे अपलोड करणे

(१५) पारदर्शकता. उत्तरदायित्व व संनियंत्रण

(१६) ग्रामपंचायत विकास आराखडा २०२०/२०२१

      शासन निर्णय दि ४/ नोव्हेंबर २०१५ मधील मुद्दा क्र ७/५/१ अन्वये प्रत्त्येक ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक लेखापरीक्षण समिती स्थापन ग्रामसभेमारफत करावयाची आहे समितीने ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या कामाचे सामाजिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल दर तीन महिन्यांनी ग्रामपंचायत व ग्रामसभेकडे सादर करावयाचा आहे या समितीची स्थापना करून ती कार्यान्वित करावी या समितीचा बोर्ड/ फलक ग्रामपंचायत इमारतींवर लावावा व त्याचा नियमित आढावा गट विकास अधिकारी यांनी घ्यावा

         शासन निर्णय दि ४ नोव्हेंबर २०१५ मधील मुद्दा ७/५/२ अन्वये प्रत्त्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्य गट स्थापन करून ग्रामपंचायत विकास आराखड्यामधील कामांची गुणवत्ता व प्रगती पाहणी करून अंमलबजावणी बाबत अहवाल ग्रामपंचायत व ग्रामसभेकडे सादर करावा कार्य गटांचा बोर्ड ग्रामपंचायत इमारतींवर लावावा

      शासन निर्णय दि ४ नोव्हेंबर २०१५ दि २ फेब्रुवारी २०१८ आणि दि ६ सप्टेंबर २०१८ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि वर नमूद केलेल्या सर्व बाबी विचारात घेऊन सर्व ग्रामपंचायतींचा सन २०२०/२०२१ ते २०२४/२०२५ या कालावधीत पंचवार्षिक ग्रामविकास आराखडा व सन २०२०/२०२१ या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा सोबत परिशिष्ट १ मध्ये विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण होईल यांची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे

        वरील प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये घालणारे सर्व कामकाज त्याचा लेखाजोखा आत्ता घेण्यासाठी ग्रामस्थांना सुध्दा आत्ता ग्रामसभेत उपस्थित राहता येणार आहे निधी किती आला कुठे किती खर्च झाला तो खरच कामासाठी खर्च झाला का ? याचा लेखाजोखा आत्ता आपणास घेता येणार ग्रामपंचायत मध्ये चालणार्या सर्व कामांचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे विविध दाखले आत्ता लवकरात लवकर मिळणार 

पण बांधकाम कामगार यांना कामगार नोंदणी लागणारे प्रमाणपत्र आत्ता नव्हे तर २०१७ शासन निर्णयानुसार ग्रामसेवक यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तरि कोणी ग्रामसेवक बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा राज्य

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

सफा मल्टीस्पेशालिटी क्लिनीक & हिजामा सेंटरचा नूतन वास्तूचा शुभारंभ

 


प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
- आ.संग्राम जगताप


 अहमदनगर- गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आजाराच्या सुरुवातीलाच त्यावर उपचार झाल्यास मोठा आजार बळावत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळाजी घेणे गरजेचे आहे. सफा मल्टीस्पेशालिटी क्निनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याचे बहुमुल्य काम होत होते, आता नूतन सेंटरच्या माध्यमातून आणखी आधुनिक सुविधा मिळणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

  मुकुंदनगर येथील सफा मल्टीस्पेशालिटी क्लिनीक अॅण्ड हिजामा सेंटरचा नूतन वास्तूच्या शुभारंभप्रसंगी आ.संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नज्जू पैलवान,अफजल असिर शेख, ए.आय.एम.आय.एम.चे जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, डॉ. अनिल कुर्हाडे, डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. एम. के. शेख, डॉ. पोपट कर्डिले, डॉ.अशफाक पटेल, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, डॉ. सागर वाघ, डॉ. प्रणाली राठोड, सय्यद शाहनिजाम नन्हेमियाँ, नगरसेवक खान समद वहाब, खान मिनाज जाफर, मिर आसिफ सुलतान, आबिद खान, शेख फय्याज, शेख रिजवाना फारुख, हाजी शेख, नादीर खान, संचालक डॉ. नौशिन रिजवान अहमद शेख आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी डॉ. नौशिन रिजवान अहमद शेख म्हणाले, अहमदनगर वैद्यकीय क्षेत्रातील 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन आम्ही एक पुढचे पाऊल या मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या माध्यमातून टाकत आहोत.विशेष करुन महिला रुग्णांचे आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे,तसेच या मोठया लोक वस्तीत प्रसुती पुर्व उपचार व प्रसुती साठी अल्पदरात उपचाराने बरे व्हावेत यासाठी आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत. त्याच बरोबरच सेंटरच्यावतीने वेळोवेळी विविध मोफत शिबीरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे गरजू रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जातील, असे सांगितले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर शेख यांनी केले. तर आभार स


गाजर

 

गाजर 

                  अतिशय पोषक असत गाजर. दिसायला गोंडस खायला गोड असे गाजर आहे सर्व लोक खाण्यात वापरतात हे म्हणजे एखाद्याला खुश आपलसं करण्याचे सामर्थ्य गुलाम आपल्या मनाप्रमाणे वागण्यास लावण्यासाठी  दाखविण्यात येणारी एक मनमोहक वस्तू म्हणजे गाजर

                 शासकिय क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येतो त्यांना न्याय मिळत नाही तर त्यांना भुलभुलयाचे गाजर दाखवतात हे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे आपण बघतो. काहीजण उपोषण रस्ता रोको आंदोलन बंद आंदोलन मोर्चा असे मार्ग निवडतात  तर काहीजण उपाशी तापाशी ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता आपल्याला न्याय मिळण्यासाठी कित्येक दिवसांपासून उपोषण करताना मी पाहिले आहेत  त्यावेळी फक्त फाॅरमेलीटी म्हणून काही अधिकारी व कर्मचारी उपोषण करतयाला भेट देतात आणि उपोषण करतयाची मागणी सोडून दुसरेच गाजर दाखवतात आणि फक्त वेळ दाबून नेतात. यालाच गाजर दाखविणे असं म्हणलं जातं

              बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने महिला. मुल. स्वता बांधकाम कामगार यांना शैक्षणिक. सामाजिक. आर्थिक. संरक्षण. विमा यांचा प्रामुख्याने समावेश असतो बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर दाखला देणे अनिवार्य आहे तोही 98 दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. पण. योजना चांगल्या आहेत त्या राबविण्याची जबाबदारी सहायक कामगार आयुक्त व अधिकारी व कर्मचारी यांची आहे. आज या बांधकाम कामगार यांच्या हक्काच्या योजना काही बोगस कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन सामाजिक संघटना. यांच्यामुळे बोगस नोंदणी जादा पैसे घेऊन कामगार भवन मधील काही भ्रष्ट अधिकारी व यांना हाताला धरून जिल्ह्यात एजंट दलाल कामगार शुभचिंतक यांचं भल मोठ पेव फुटले आहे काही संघटना सेवाभावी संस्था युनियन हे आपली दुकाने जोरात चालावी यासाठी काही नेत्यांच्या काखेत घुसले आहेत. त्यांच्या नावाखाली कामगारांना तुला हे मिळवून देतो ते मिळवून देतो अशी आशेची गाजरे दाखवून आर्थिक. मानसिक लुट करतांना दिसत आहेत.  याचा अर्थ असा होतो की ज्याला काही काम नाही त्याने बांधकाम कामगार जो अडाणी गरजू व्यसनी पोटासाठी मिळेल ते काम करणारा आहे त्याला लुटायचे व आम्ही निवडणुकी पुरतेच तुम्हाला हे देतो ज्यांना कामगाराकडे बघायला सुध्दा वेळ नाही असा सुध्दा कामगार हितचिंतक शुभचिंतक असल्याचा आव आणतो. गावातील लोक शहरातील लोक कामगार मेळावे शिबीर आयोजित करण्यास सुरुवात करतात. म्हणजे मी अस ऐकलय की बांधकाम कामगार यांना घरबांधणी साठी पैसे मिळवून देतो म्हणून कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये कामगारांकडून घेतल्याची माहिती आमच्याकडे आली आहे पण बोलणार कोण कारणं त्यांच्यामागे मोठा नेता आहे म्हणजे बांधकाम कामगार यांना कसे गाजर दाखवून लुटलं जातंय बघा शासनाने खरोखरच बांधकाम कामगार शोधायचं असतील तर एक वर्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद ठेवा बघा या कामगार हितचिंतक शुभचिंतक संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य जे आज चारचाकी गाडी मधून हातात सोन सोबत बाॅडीगारड घेवून फिरत आहे त्यांना भांगलायला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही  आणि यांना कोण शासकीय अधिकारी व कर्मचारी मदत करतात त्यांची सी बी आय तर्फे चौकशी करा आणि मग बघा कोण किती पाण्यात आहे 

    .            रेशन सर्वात मोठा जटिल प्रश्न आज सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांचें पुढं आ वासून उभा आहे. गोरगरीबांना पोटभर अन्न मिळावे. कुपोषण सारखा सर्वात मोठा कलंक पुसला जावा यासाठी शासनाने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केले आणि सर्वसामान्य माणसाला हक्काचे अन्न स्वस्त दरात आणि रास्त भावात मिळावे यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली  लोकांना अन्न धान्य मिळण्यासाठी 2005 ला जनतेचा आर्थिक दुर्बल सबल या तत्वावर जनगणना करण्यात आली. त्यानुसार. अंत्योदय. बी पी एल. केशरी शिधापत्रिका. अशी वर्गवारी करण्यात आली पण यात खरोखरच लाभ झाला तो म्हणजे ज्याला गरज नाही.  सवताचे घर आहे. नोकरी आहे. गाडी आहे. व शेती आहे. म्हणजे जे आर्थिक सबल आहेत त्यांनाच लाभ झाला. म्हणजे गोरगरिबांना शासनाने नाही तर आपण निवडून दिले त्यांनीच गाजर दाखवल. यातून जी काही कसर बाकी राहिली ती रेशन दुकानदार यांनी बरोबर केली म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या नावावर येणारे अन्न धान्य.  दुकान बंद. थम उठत नाही. नाव दिसत नाही. युनिटचे आधार लिंक नाही. तुमच अन्न धान्य आल नाही.  पावती दिली जात नाही.  वागणूक बरोबर नाही.  अशी एक नाही अनेक कारणांने गोरगरीब जनतेचा हक्क मारला जातो आहे. शासन मोफत अन्न धान्य वाटप करायला सांगत आहे पण दुकानदार व भ्रष्ट गोदाम इन्चार्ज.  पुरवठा अधिकारी. यांच्या मनमानी कारभार पध्दतीमुळे जनता भरडली जात आहे  आज पुरवठा विभागात. नविन रेशनकार्ड काढणे.  नाव कमी करणे.  नाव वाढविणे.  अन्न सुरक्षा योजनेत सहभागी अर्ज.  असे एक नाही अनेक अर्ज धुळखात पडले आहेत त्या अर्ज दाखल करणार या लोकांना. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.  बघतो करतो. साहेब रजेवर आहेत.  कागदपत्रे कमी आहेत. अशी गाजर दाखविल्याप्रमाणे उत्तरे दिली जात आहेत. 

                वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा. वाचायला बर वाटत. पण खरोखरच या उलट होताना दिसत आहे.  वैद्यकीय खर्च करण्यास आर्थिक दुर्बल असणारी काही कुटुंब उपचारा विना मयत होताना आपण बघतो. कारण दोन वेळचे जेवण कसंबसं मिळत काहीजण अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करत आहेत. शासनाने या विषयाचा गांभीर्याने विचार करून  आपल्या 36 जिल्ह्यात लोकसंख्या नुसार  धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने स्थापन करण्यात आले त्यात सर्व उपचार मोफत करण्याचा शासन आदेश असूनही दवाखाने. विविध टेस्ट.  मेडिकल बिल. या मार्गाने पेशंटला लुटलं जात आहे.  त्यातून सर्वात वेगळ म्हणजे जेवढ्या  आरोग्यदायी योजना आहेत त्या विमा कंपन्या चालवतात आणि त्यांना परवानगी देत आपल शासन म्हणजे एका बाजूने आरोग्यदायी योजना सुरू करायच्या आणि त्या योजना फुकट गोरगरीब जनतेला मिळू नये यासाठी विमा कंपन्या यांच्याच. धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने यांचेच. म्हणजे सर्व पैसा घरातच. यांचाच अर्थ असा होतो की जनतेच्या हातात गाजरच शेवटी. दवाखान्यात कोणती योजना आहे  योजनेसाठी कोण मार्गदर्शक आहे.  दवाखान्यात मेडिकल आहे का ?  दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली आहे का  ? उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार आहे का ? याचाच अर्थ जनतेच्या हातात शेवटी गाजारच आहे

                आर्थिक विकास महामंडळ सर्व जाती जमाती धर्माचे लोक यामधील शिक्षित तरूण यांना आपल्या हक्काचा रोजगार ‌रोजीरोटी मिळावी. सबलीकरण.  महिलांना सबलीकरण योजना. अपंग विकास महामंडळ.  वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांना अनुदान. अशा विविध माध्यमातून शासन विविध महामंडळ स्थापन करत आहे त्यामाध्यमातून. लघु उद्योग. उद्योगपती होण्यासाठी. २५/ हजार ते १ कोटी रुपयांची तरतूद करत आहे पण या सर्व योजना वृतमापत्रात. डिजिटल. बोर्ड.  निवडणूक भांडवल. यापुरतया मर्यादित आहेत खरोखरच गरज असणारे तरूण यांना शिक्षण उधोगासाठी. आजपर्यंत कोणालाही विकास महामंडळ यांचा लाभ झालेला नाही.  कारण योजना आहे पण त्यात घालण्यात आलेला मोठा साप आहे तो म्हणजे. आय टी रिटर्न.  जी स टी.  अनुसूचित जमाती जमाती व इतर मागासवर्गीय भटके विमुक्त. जाती. यांना जात प्रमाणपत्र व त्यात ६० वर्षांचा जातींचा पुरावा नाही त्यामुळे वंचित गरिब तरूण या विकास योजनांपासून वंचित आहेत. म्हणजे योजना सुरू करायची आणि त्यात अशी काही अट घालायची की ती पूर्ण होणार नाही. त्यातच राष्ट्रीय कृत बॅका यांनाच विकास महामंडळ यांचा कर्ज पुरवठा करण्याचा अधिकार आहे. पण आज बॅंका व त्यातील बॅक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी विविध असा आर्थिक लाभ द्यावा लागतो मगच काम होते अन्यथा नेते पुढारी यांची शिफारस पाहिजे. मग मला सांगा योजना सुरू करण्याच्या वेळी ही अट का नमूद केली जात नाही. म्हणजे एका बाजूने कर्ज योजना सुरू करायची आणि ती गोरगरीब जनतेला न मिळता नेते पुढारी यांचें बगलबच्चे त्यांनाच मिळाली पाहिजे अशी तरतूद केली जाते म्हणजे तुमच्या आमच्या हातात काय आहे गाजर

                आज समाजसेवक. समाजात चांगला विचार. चांगले आचार. विचारवंत. शासनाबरोर जनतेच्या हक्कासाठी लढणारी लोक यांच जीवन आज धोक्यात आले आहे कारणं सत्य आणि खर बोलणारा कोणालाही पचत आणि रुचत नाही कारण सत्य नेहमी कटू असत. खोट बोलून गाजर दाखवून लुटणारे एसी रुम मध्ये आहेत.  चारचाकी गाडी.  अमाप संपत्ती गोळा करून.  उजळ माथ्याने फिरत आहेत.  त्यांच्याकडे पैसा आहे. राजकीय पक्षाची ताकद आहे.  खर बोलणारा नेहमी कायद्याप्रमाणे बोलतो पण त्यांचे विचार. मत.  शासकीय अधिकारी व कर्मचारी समाजातील काही विध्वंसक वृत्तीचे लोक खुडून काढण्यात मग्न आहेत.   खोट आज तुपाशी आहे आणि खर उपाशी आहे. म्हणजे खर बोलणारे लोक यांच्याच हातात गाजार आहे मग काय असे विचारवंत संपणार काय ? ‌

    . आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणसकीची कमी झाली. रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरुंद झाली. घर मोठी कुटुंब छोटी विचार आचार छोटे झाले सुखसोयी पुष्कळ पण समाधान आणि वेळ कमी पदव्या स्वस्त झाल्या पण शहानपणा अभाव. माहीतीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले तज्ञ वाढले आणि सोबत समस्या वाढल्या औषध भरपूर पण आरोग्य अभाव. मालकी माझ तुझ भाषा वाढली संस्कार मूल्यांची कमी झाली आपण बोलतो जास्त प्रेम कमी झाले आणि तिरस्कार वाढला. राहणीमान उंचावले पण जगणं दारिद्र्य झाल. जगन अवघड झालं मरण स्वस्त झाल आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर गेलो पण आपल्या शेजारी असलेल्या लोकांना भेटने दुर्मिळ झाले बाहेरचं जिंकत चाललो आहोत पण आतल्या आत हारणयाचे काय ? हवा पाणी शुद्ध नाही शुध्द करण्याचा आटापिटा पण गुदमरून मेलो त्याचे काय ? 

         .   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शोध शोषितांचा



 शोध शोषितांचा 

      गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये बरेच असे शोषित समाजाचे लोक आहेत आपण म्हणतो की आपण प्रगतशील आहोत पण आज सुध्दा काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यापर्यंत कोणतीही विकासाची योजना. जीवनावश्यक सुख सोयी पोहचल्या नाहीत. यासाठी आज शिराळा तालुक्यातील. सोनवडे या गावात. शोध शोषितांच्या ही अनोखी मोहीम हाती घेत. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे शिराळा तालुका अध्यक्ष. बाबर व शिराळा तालुका महिला अध्यक्ष हसिना आर मुल्ला. कार्याध्यक्ष अनिता धस. शिराळा तालुका उपाध्यक्ष संगिता बाबर. व गावातील महिला यांच्या उपस्थितीत शोध शोषिताचा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला 

        संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी मोहीमेचे उद्दिष्ट मांडताना. बांधकाम कामगार. रुग्ण हक्क. रेशन अधिनियम. विविध आर्थिक विकास महामंडळ. माहिती अधिकार. या विषयाची कार्यशाळा व माहीती समजावून सांगितली. काही बांधकाम कामगार ग्रामीण भागात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून राबविण्यात येणारया विविध कल्याणकारी योजना यांची अजून ग्रामीण भागात प्रसार व प्रचार झाला नाही. ज्या ठिकाणी झाला आहे तेथे बोगस बेमाफी फी भरून घेवून नोंदणी केली जात आहे. यांत काही इंजिनिअर संघटना यांचे लागेबांधे आहेत. असे दिसतें. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी इंजिनिअर दाखल्याची कामगारांना अडचण येत असेल तर. गावातील २०१७ / २०१८/२०१९/ २०२१ चे शासन निर्णयानुसार बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले गावातील ग्रामसेवक पंचायत समिती. गटविकास अधिकारी. वनविभाग. जलसंधारण विभाग विद्युत पारेषण विभाग. पाणीपुरवठा विभाग. स्वच्छता विभाग. नगरपालिका महानगरपालिका वार्ड आॅफिसर. अशा विविध विभागांतील उप बांधकाम अभियंता यांना मंडळाने नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे यापैकी कोण नोंदणी दाखले देण्यासाठी नकार देत असेल तर आमच्याशी संपर्क साधा असे मत मांडले

        माणूस आहे म्हणजे आजार असणारच. # रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा. # असे म्हणायला वाचायला बर वाटत पण खरोखरच ही वैद्यकीय सेवा त्याप्रमाणे काम करते का ? सांगली जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय आयुक्त यांचे अधिपत्याखाली विविध वैद्यकीय योजना नुसार उपचार करतात त्यात समाजातील आर्थिक दुर्बल घटक की ज्यांना उपचारांचा खर्च झेपत नाही अशी कुटुंब त्यांना एकही रूपया खर्च न करता उपचार मिळावा यासाठी अशा दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. अश्या विविध योजना रेशन कार्ड वर्गवारी रद्द करून राबविण्यात येतात पण आज सर्वात मोठे दुःख आहे ते म्हणजे समाजातील काही शोषित लोक आहेत की त्यांना दवाखानेच माहिती नाहीत कोणत्या उपचारांचा खर्च किती हे माहीत नाही. रुग्ण हक्काची सनद कोणती ती माहिती नाही. रुग्णाचे हक्क व अधिकार माहीत नाही.औषधाचे दर किती हे माहीत नाही. कारण अशा लोकांना खर कोण सांगत नाही. प्रत्येक गावात एक उप आरोग्य केंद्र आहे पण त्यात डॉ नर्स नाही कोणतेही औषध नाही. साप कुत्र्याची लस उपलब्ध नाही. अॅमबुलनस गाडी नाही. ते उप आरोग्य केंद्र कोणाच्या जागेत बांधले माहीत नाही. त्यांची माहिती करण्यासाठी जनसंबोधन जनप्रबोधन करण्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे

              ६०/६५/ वर्षांनंतर विविध पेन्शन योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. संजय गांधी निराधार अनुदान योजना. श्रावणबाळ पेन्शन योजना. महिला बचत गटांना विविध आर्थिक सहाय्य. बचत गटांना प्रत्येकी रेशन दुकानदेणे नागरि पुरवठा सनदेमधये नोद आहे. घरकुल योजना. स्वच्छता हंगणदारी मुक्त गाव. रस्ते गटर. अशा विविध सेवा सुविधा पासून आजही काही लोक. वंचित आणि शोषित आहेत. यांच शोषन कळत नकळत शासकीय अधिकारी व कर्मचारी करत असतात त्यासाठी जनसंबोधन. जनप्रबोधन. जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे

                रेशन सर्वात मोठा घोटाळा काहीजणांना शासन निर्णयानुसार रेशनकार्ड युनिट प्रमाणे अन्न धान्य वितरण केले जात नाही. रेशनला येणारे अन्न धान्य निवडक व स्वच्छ देणे बंधनकारक असताना आज काही ठिकाणी कुजके. किडे मुंग्या भुंगा. झालेले गहूं तांदूळ चणा. चणाडाळ. वाटप केले जाते. रेशन दुकानदार. रेशनकार्ड धारकांना. नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. तुमच अन्न धान्य आल नाही. मला मिळाल नाही जे मिळाले ते कमी मिळाले. अशी कोणताही अर्थ नसणारी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. रेशनकार्ड वर बारकोड नंबर रेशन दुकानदार व पुरवठा विभाग लिहित नाहीत. आणि गोरगरीब जनतेचा हक्काचा घास हिसकावून घेतला जातो. नाव वाढविणे. नाव कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे. दुबार रेशनकार्ड काढणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. अन्न सुरक्षा योजनेचं सहभागी. असे हजारों अर्ज प्रत्येक जिल्ह्यात पुरवठा विभागात कचरयाचया टोपलीत पडले आहेत कोणताही निर्णय झाला नाही कारणं उत्तर आहे इषटांक शिल्लक नाही त्यासाठी २००५ नुसार आर्थिक सबल आणि आर्थिक दुर्बल लोकांचा सर्वे करण्याची गरज आहे.पण आज १६ वर्षे झाली रेशनकार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे झाला नाही कारणं आहे निवडणूक भांडवल. यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी शोध शोषितांचा ही मोहीम हाती घेतली आहे

              माहिती अधिकार कायदा २००५ सर्वसामान्य जनतेला मिळालेला वरदान म्हणजे कायदा माहिती अधिकाराचा. यामुळे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज याची विचारणा तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणाला आला आहे पण आज काही ठिकाणी माहिती अधिकार कायदा म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहिती नाही. माहीती अधिकार कोठे. कशासाठी. त्यांची कलम. त्यांची वापरण्याचे नियम. माहिती अधिकार उत्तर किती दिवसात आले पाहिजे. नाही आलेतर काय करायचे. अपिल म्हणजे काय. सुनावणी म्हणजे काय. खंडपीठ कोठे आहे खंडपीठाला सुनावणी कधी लागते. माहिती अधिकार कार्यकर्ते यांना कायदा संरक्षण आहे का. अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोषितापुढे पडली होती. त्यांचे निरसन करून माहिती अधिकार कायद्याचे महत्व वापरायची पद्धत समजावून सांगितली. म्हणजे एखादे गाव त्यातील लोक प्रगत देशात शोषित आहेत हे लाजिरवाणे आहे म्हणूनच आज शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे हेच आमचें धेय आहे 

      अपंग एक समाजातील वंचित घटक आहे अपंग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले त्यात अपंगांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती. लग्न व्यवसाय. रोजगार. घरकुल आरक्षण. नोकरी आरक्षण. २०० चौरस फूट जागा मोफत. ५/टक्के ग्रामविकास. शहरविकास यासाठी येणारा विकास निधी यातून ५/ टक्के रक्कम अपंग कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. प्रवास सवलत. वैद्यकीय सेवा सवलत. अशा विविध योजना. अपंग विकासासाठी शासनाने राबविल्या आहेत. त्यातच अपंग २१ प्रकार चे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यातच अस्थिव्यंग. मनोरुग्ण. विकलांग. असे २१ प्रकार आहेत. अपंगांसाठी. युडी कार्ड. अशा विविध अपंग लोकांसाठी असणार्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. आणि अजून सुद्धा काही शोषितांचे पुनर्वसन शिल्लक असेल तर त्यांना मदत सहकार्य करण्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे असे मत मांडले

              हसिना आर मुल्ला महिला अध्यक्ष शिराळा तालुका यांनी आभार व सर्वांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला सर्वोतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संगिता बाबर महिला उपाध्यक्ष शिराळा तालुका. यांनी सर्वांचे आभार व सत्कार केला. मी पूर्ण प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करीन राजकारण नाही फक्त समाजसेवा म्हणून लोकांचे संबोधन प्रबोधन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात घेऊन येईन असे आश्र्वासन दिलें आणि सर्वांनी मिळून शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबवू असे मत मांडले

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या