Showing posts with label मुस्लिम. Show all posts
Showing posts with label मुस्लिम. Show all posts

जागो मुस्लिम जागो?

 


जागो मुस्लिम जागो

                  मुस्लिम समाज म्हणलं की पवित्र कुराण प्रमाणे आपले सर्व काम आपली दिनचर्या करणारा समाज. दान धर्म भुकेलेल्या ची भुक जाणणारा तान्हलेलया. व्यक्ती ला पाणी पाजा. स्वता भुके राहून दुस-याला पोटभर अन्न द्या. दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणारे. खोटे बोलू नका. कोणाचाही हकक हिसकावून घेऊ नका. असा प्रामाणिक पणे आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारा स्वाभिमानी समाज म्हणजे मुस्लिम समाज होय. पण मुस्लिम समाजात मुल्ला मौलवी यांना एक वेगळ स्थान आहे. समाजातील निती मूल्य. समाजाची चालि रिती. विवाह व मृत्यूपश्चात कार्य. यांचे मार्गदर्शन करणा-या चे काम मुल्ला मौलवी करतात. मुस्लिम समाज नुसार ज्याप्रमाणे दिनचर्या कशी असावी अल्लाह सबसे बडा हैं. हे जसे शिकवले जाते जमातीच्या निमित्ताने अनेकवेळा मुस्लिम लोक एकत्र येतात. मुस्लिम धर्माची निती मूल्य शिकविली जातात त्याप्रमाणे शासनाने मुस्लिम समाजासाठी काय केले आहे. काय केले पाहिजे. मुस्लिम समाजातील तरूण पिढीला शासकीय योजना आहेत का. त्या कोणत्या मार्गाने सापेक्ष पणे मिळवण्यासाठी प्रयत्न कोणते केले पाहिजेत धर्माची शिकवण देत असताना हे सुद्धा शिकविणे त्यावर बैठका मिठिंग चर्चा सत्र. मेळावे या माध्यमातून तरूण पिढीला सांगणे गरजेचे आहे आणि हे सर्व फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मातील मुल्ला मौलवी करु शकतात हे खरं आहे

            शासनाने परवा अल्पसंख्याक समाजाचा एक सर्वे जाहीर केला आहे त्याप्रमाणे मुस्लिम शीख बौद्ध पारशी जैन अशा समाजांचा अल्पसंख्याक म्हणून समावेश करण्यात आला आहे आपण बघतो वाचतो. प्रत्येक जातींची एक कॅटेगरी करण्यात आली आहे त्यानुसार अल्पसंख्याक. अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी प्रत्येक जातींची असणारी ग्राह्य आकडेवारी अंदाज करून आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार सामाजिक. आर्थिक विकास. वैयक्तिक विकास. असं आरक्षण दिले आहे. प्रत्येक समाजातील व्यक्ती तरुण यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी आर्थिक विकास महामंडळ देण्यात आले आहे क्रांतिसिंह नाना पाटील आर्थिक विकास महामंडळ. महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक सहाय्य मंडळ. महिला आर्थिक विकास महामंडळ. अपंग कल्याण व आर्थिक विकास महामंडळ. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास महामंडळ. विविध महिला बचत गट योजना. अंत्योदय दिनदयाळ योजना. शैक्षणिक विकास महामंडळ. उधोग उर्जा महामंडळ. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. घरकुल योजना अशी विविध मंडळे विविध समाजासाठी नेमण्यात आले आहेत. आणि या शासकीय कर्जाचे वाटप करण्याचे अधिकार राष्ट्रीय कृत बॅंकांना देण्यात आले आहेत त्यानूसार प्रत्येक समाजातील लोक आपल्या ऐपतीप्रमाणे मॅनेजर चेअरमन बॅंक कर्मचारी यांना मंडळांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी विविध माध्यमातून लाच देत आहेत कारणं लाच दिल्याशिवाय बॅक प्रकरण मंजूर करण्यात येत नाही 

      मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी अनेक मुस्लिम समाजसेवक यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले सुरवातीला मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला भरिव व भरघोस आर्थिक मदत शासन देत होत. व्यवसायिक कर्ज. थेट कर्ज योजना. लघु उद्योग कर्ज योजना. शैक्षणिक कर्ज योजना. अशी विविध आर्थिक सहाय्य प्रकरणं मुस्लिम समाजाला दिली जात होती. पण हळूहळू मुस्लिम समाजाच्या स्वाभिमानी पणाचा परिणाम मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर झाला कारण कोणीही मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून कमी व्याजदराने कर्ज काढून कोणताही उद्योग करण्याची संधी असताना सुध्दा मंडळाकडे येतं नव्हतं कारणं वडिलोपार्जित व्यवसाय करणं हेच आपलं कर्तव्य मुस्लिम तरुण पिढीनी मांणले म्हणजे. गॅरेज व्यवसाय. चिकन मटण दुकान. भंगार व्यवसाय. वाहन खरेदी विक्री व्यवहार. फळे फुले भाजीपाला विक्री. जमीन खरेदी विक्री व्यवहार. शेती औजारे. धारवाले. बांधकाम व्यवसाय. बेकरी व्यवसाय. असे एक ना अनेक व्यवसाय करण्याकडे मुस्लिम तरूणांचा कल वाढला. त्यामुळे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ याचा निधी पडून राहू लागला.तर काही मुस्लिम तरुणांनी काढलेली कर्जाचा परतावा केलाच नाही त्यामुळे वसुली झाली नाही त्यामुळे त्यावेळचे सरकार यांनी मंडळाकडे पडून असणारा निधी परत घेतला आणि तो आजतागायत त्या निधीचा पुरवठा केलाच नाही. आणि आमच्या मुस्लिम समाजाने कधीही त्या आर्थिक विकास महामंडळ निधीची चौकशी मागणी सुध्दा केली नाही. समाजातील काही मुस्लिम हितचिंतक यांनी मंत्रालयात पत्र व्यवहार केला वेळोवेळी आंदोलने मोर्चे निदर्शने केली पण त्याला कोणताही लोकाचा प्रतिसाद मिळाला नाही. कारण एखाद्या मुलला मौलवी यांच्या सांगण्यावरून तीन दिवस. चाळीस दिवस. चार महिने. न कोणताही विचार करता जमातींत जाणारे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडे निधीसाठी आंदोलन मोर्चा निदर्शने करण्यासाठी याच लोकांना तासभर वेळ नाही काय वाईट प्रकार आहे बघा. म्हणजे आंदोलन करणारेच या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून मिळणारा लाभ एकालाच न होता सर्व समाजाला होणार आहे म्हणजे. तुम लढो हम कपडे संभालते है. हे थांबल पाहिजे म्हणजे आपल्यातील फुटिरता संपली पाहिजे 

          भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा त्यांच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली सवताची विभिन्न भाषा. लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा अधिकार असेल राज्याच्या खर्चाने चाललेल्या किंवा राज्याच्या पैशातून साहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ. धर्म. वंश. जात. भाषा. या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून अल्पसंख्याक विभागाकडून मिळणारा आर्थिक लाभ नाकारता येत नाही. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे कार्य प्रशासन करण्याचा अधिकार. धर्म किंवा भाष या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व समाजांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा प्रशासनाला अधिकार असेल असे नमूद करण्यात आले आहे. 

      (१ क ) खंड (१) मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक समाजाने स्थापन केलेल्या व प्रशासिलेलया शैक्षणिक संस्थेच्या कोणत्याही संपत्तीचे सक्तीने संपादन करण्याचा उपबंध करणारा कोणताही कायदा करताना. राज्य हे अशा संपत्तीच्या संपादनाबधदल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरविलेल्या रकमेमुळे त्या खंडातील हमी दिलेला अधिकार निरबधित किंवा निराकृत होणार नाही अशा प्रकारचीं रक्कम असेल अशी खात्री लायक तजवीज करील शैक्षणिक संस्थांना साहाय देताना राज्य एकादी शैक्षणिक संस्था ही धर्म भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या समाजाच्या व्यवस्थापनासाठी आहे या कारणावरून तिला प्रतिकूल असा भेदभाव करता येणार नाही 

              भारताला वसाहतीचा दर्जा नको संपूर्ण स्वराज्य व्हावे हे १९३० मध्ये ठरले भारतात लोकशाही असावी याबद्दल दुमत नव्हते आणि नाही राज्याचे स्वरुप. लोकशाही गणराज्य. राहील असे सरनामयात सांगण्यात आले आहे भारतीय लोक इंग्लंडच्या राणीला अगदी प्रतिकात्मक अर्थाने सुध्दा निष्ठा वाहणारं नाहीत. आपल्या राज्याचा गावाचा तालुका जिल्हा याचा प्रमुख हा लोक निर्वाचित असावा. त्यातून एक महत्वाचे म्हणजे त्यातून हे स्पष्ट झाले की आपल्या देशात लोक सार्वभौम आहेत. आणि राजकीय सत्तेचा उगम येथूनच होतो. राजे व संस्थानिक यांना स्थान असेलच तर ते मर्यादित असेल. यामुळे प्रांतिक सिद्धांताला या आम्ही भारतीय या शब्दाला सुरूंग लावला आहे. आज या गोष्टीला फारसे महत्त्व नसले तरी १९४७ ते १९५० या संक्रमणाच्या काळात ती अतिशय महत्त्वाची बाब होती आणि आहे

            समतेचा हक्क. शोषणाविरुद्ध हक्क. धार्मिक स्वातंत्र्य हक्क. शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क. सवैधानिक उपाययोजना हक्क. पूर्वी या संविधानात मालमत्तेच्या हक्काच्या समावेश करण्यात आलेला आहे परंतु ४४ वया घटना दुरुस्ती नुसार तो वगळण्यात आला आणि संविधानात ३०० ( अ) या नविन अनुच्छेद नुसार त्याला केवळ हक्काचे स्वरूप देण्यात आले आहे अलिकडे तर निवडणूक प्रचारासाठी तथाकथित साधू. साध्वी. आचार्य. मुल्ला मौलवी पाद्री. ह्याचा सहभाग वाढला आहे मतदान कोणाला करावे यासाठी त्यांनी पत्रकबाजी सुरू केली आहे. मतदानाच्या तारखा. दिवस. आणि वेळीसुद्धा ज्योतिष शास्त्रानुसार ठरविले जाते म्हणजे धर्माचा वापर कसा केला जातो ते बघा.  

     आपण अल्पसंख्याक आहोत आपल्याला रोजगार व शिक्षणाची संधी नाही. विकासाची संधी नाही. त्यामुळे जीवन जगायचे असेल तर आपले अस्तित्व हे सनातनी धर्माच्या जोखडाखाली जगता येईल अशी स्वातंत्र्यानंतर सामान्य मुस्लिमांची ठाम समजूत करून देण्यात आली आहे. मुस्लिम सनातनी नेतृत्व ब-यापैकी यशस्वी ठरले आहे आणि यामुळे मुस्लिम समाज हा देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही बहुसंख्य मुस्लिम अजूनही दारिद्र्य व अज्ञानीच राहीले आहेत. मुस्लिम धर्म वाधयानी आपल्या बांधवांच्या आर्थिक. शैक्षणिक. सांस्कृतिक विकासासाठी कधीचं हातभार लावला नाही. मुस्लिम समाज कसा मागास राहील याची काळजी मुल्ला मौलवी व त्यांच्याशी राजकीय सौदेबाजी करणारे राजकीय पक्ष घेत असतात

          मुस्लिम समाजाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ येथे मुस्लिम धर्माचे नेते पुढारी आहेत तरी सुद्धा मंडळ प्रगती करत नाही याचे कारण अस असेल की. तो मुस्लिम आमदार खासदार मंत्री नेते. परराज्यातील आहेत का ? त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रात एकही मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून व्यवसायिक कर्ज दिले जात नाही. शैक्षणिक कर्ज काढावयाचे असल्यास आपली प्रापटी माॅरगेज करून द्यावी लागत आहे तेही शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाख आणि कर्ज मंजूर होण्याचा कालावधी सहा ते नऊ महिने लागतात. म्हणजे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ याची आॅफिस प्रत्येक जिल्हा. (३६) जिल्ह्यात आहे पण त्यात कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा ठेकेदार पध्दतीने भरले आहेत. म्हणजे ३६ जिल्ह्यात २०/२५. ठेकेदार पध्दतीने काम करणारे कर्मचारी आहेत म्हणजे एका बाजूने मंडळाला निधी नाही आणि कर्मचारी सुध्दा नाहीत

           म्हणून मी म्हणतो जागो मुस्लिम जागो 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

  बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मुस्लिम वारस नियम - मुस्लिम Law part १

  


मुस्लिम वारस नियम
               मुस्लिम Law part १

मुस्लिम कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो जगभरातील धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्याचे मूळ पुढील चार तत्वावर आधारित आहे. (१) कुराण (२) सुनना. (३) इजमा (४) कियास. याशिवाय इतिहासन, इतिलाह, रुढी परंपरा कायदे हि दुय्यम दर्जाची स्त्रोत आहे 


      ‌. मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम समाजात प्रामुख्याने दोन शाखा आहेत. त्यासुद्धा मुस्लिम बांधवांनी आप आपल्या सोयीनुसार केल्या आहेत. (१) शिया. (२) सुन्नी. 


                     मुस्लिम समाजात लग्न निकाह, घटस्फोट तलाक., मेहर मंजे लग्नाआधी नवरदेवाने नवर्या मुलीला देण्याची रक्कम बक्षीस पत्र, हिबा मृत्यू पत्र. वसियतनामा, वारसा हक्क, पालनपोषण हक्क, अज्ञान पालकत्व, वफत आदी सर्व बाबी मुस्लिम कायधयांनवये पार पाडल्या जातात. 


      ‌. ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांसाठी काही कायदे केले गेले त्यातील शरियत ॲक्ट १९३७ ‌हा महत्वाचा कायदा आहे 


            शरियत ॲक्ट हा. ७ आक्टेबर १९३७ रोजी अमलात आला याचा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असे म्हणले जाते. या कायद्यातील कलम २ अन्वये. रुढी परंपरा विरुद्ध असली तरी शेत जमीन सोडून इतर अन्य बाबी जसे वारसा हक्क. सत्रिची विशेष संपत्तीी, निकाह. तलाक. उदरनिर्वाह. मेहर. पालकत्व. बक्षीस. न्यास मालमत्ता. वफत या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये ठरविले जातात. त्यासाठी अटि म्हणजे (१) व्यक्ति मुसलमान असावी. (२) भारतीय करार कायद्यातील कलम ११ अन्वये व्यक्ती करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेशात लागू पडतो त्या प्रदेशातील रहिवासी असावी. 


                हिंदू उत्तराधिकार. अधिनियम १९५६ चे तरतुदी मुस्लिम धर्मियांना लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम व्यक्तिगत. पर्सनल लॉ. कायद्यातील तरतुदी प्रमाणे ठरविले जाते. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफि सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथाचे वारस कायदे वेगवेगळे नियम आहेत 


                मुस्लिम वारसा हक्क कायदा. (१) पवित्र कुराण. (२) सुन्नी प्रेषिताला मानणारे (३) इझमा एका ठराविक मुद्द्यावर निर्णय घेताना समाजातील सुशिक्षित लोकाचा विचार घेणारे (४) किया देवाने जे चांगले आणि योग्य ठरवून दिले आहे त्याच सामाजिक आर्थिक मानसिक सुधारणा करणारे. 


          मुस्लिम व्यक्तिगत कायद्याप्रमाणे वारसा विषयक सर्वसाधारण नियम करण्यात आले आहेत. 


         . अमान्य संकल्पना. इंग्रजी कायद्यात असलेला #. स्थावर मालमत्ता संपत्ती # व जंगम मालमत्ता संपत्ती. असा भेद मुस्लिम कायद्यात केला जात नाही हिंदू कायद्यामध्ये असलेला. #. वडिलोपार्जित संपत्ती # आणि स्व संपादित संपत्ती असा भेद मुस्लिम कायद्यात नसतो. मुस्लिम कायद्यात संयुक्त किंवा एकत्र कुटुंब ही संकल्पना नसते. मुस्लिम व्यक्तिची सर्व मालमत्ता त्यांच्या एकट्याच्या मालकिची असते. व तो मृत झाल्यावर तिच्या वारसदार यांचेकडे हिशयाप्रमाणे प्रक्रांत होते. मुस्लिम कायद्याला#. जन्मसिद्ध अधिकार. # मान्य नाही मुसलमान व्यक्तिचा वारसधिकार पूरवसवामीचया मृत्यू नंतरचं होतो. पूर्व स्वामी जीवंत असताना केवळ जन्मामुळे कोणालाही वडिलोपार्जित संपत्तीत काहीही हितसंबंध निर्माण होऊ शकत नाही. तसेच कोणी हस्तांतर केले तर ते बेकायदेशीर ठरते. मुस्लिम कायद्याला प्रतिनिधित्व मान्य नाही. मात्र याबाबतीत शिया आणि सुन्नी यांच्या नियमात फरक आहे. वारस मृत्यू वेळी ठरतात.  


             वारसाधिकार. मुस्लिम कायद्यानुसार महिलांना वारसा अधिकार नसतो. मात्र नात्यांच्या दृष्टीने एकाच स्तरावरील महिला व पुरुषाला. महिलेपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो. अनौरस संततीला वडिलांचा हिस्सा मिळत नाही. पण आईचा मिळतो. मनुष्य वध करणार्या व्यक्तिला वारसाधिकार मिळत नाही


            हनाफी ( सुन्नी ) वारसा नियम. नुसार. मुस्लिम कायद्यानुसार वारसदाराचे सात वर्ग करण्यात आले आहे त्यापैकी तीन वर्ग प्रमुख असून चार दुय्यम वर्ग आहेत 


            वारसाचे सात वर्ग. हनाफी नियमानुसार वारसाचे सात वर्ग आहेत तिन प्रमुख वर्ग. (१) हिस्सेदार. (२) अवशिषटग्राही. (३) दुरचे नातेवाईक या तीन वर्गामध्ये. गोत्रज. असोत किंवा भिन्न गोत्रज. असे मृतांचे सर्व रक्त संबंधी नातेवाईक त्यांच्या निवाय नवरा बायको ही विवाहाने नातेवाईक झालेली वयकतिही येते. वरिल तीन वर्गात कोणी वारस नसल्यास अपवाद म्हणून दुय्यम वारसदार उत्तराधिकारी होतात


चार. दुय्यम वर्ग. (४) संविदा निर्मित उत्तराधिकारी (५) अभिसवीकृत. नातेवाईक. (६) एकमेव उततरदानग्राही. ( ७) वरील ४ ते ६ यांच्या अभावी सरकार.


          तीन प्रमुख वर्ग या वर्गामध्ये मृतांचे काही निकटचे नातेवाईक येतात. त्यांना पवित्र कुराण विनिर्दिष्ट हिस्सा देण्यात आला आहे. म्हणून त्यांना प्रमुख वारसदार म्हणतात नवरा बायको हे विवाहसंबधाने नातेवाईक धरून हिससेदारांचा संखया बारा आहे 


      माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये


समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी


बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर


रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा


रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा


मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा


माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा


संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे


९८९०८२५८५९

मुस्लिम मागे वळून बघा

 


मुस्लिम मागे वळून बघा

            हिंदू जातीयवाद प्रमाणे मुस्लिम जातीयवादाचे ब्रिटिश काळात भक्कम मूळ धरले. ब्रिटिश राजवट भारतात आली आणि मोगली राज्याचे औपचारिक रित्या विसर्जन झाले. त्यामुळे अनेक मुसलमान लोकांनी मुस्लिम संस्थानात स्थलांतर केले. ब्रिटिश हे खिशचन धर्माचे होते. पण त्यांचे राज्य हे पोपचे नव्हते. त्यांचे स्वरूप आधुनिक सुधारणावादाचे होते. हे नवे रूप पाहून अनेक हिंदू नेत्यांनी ह्या राज्याचे स्वागत केले. तसे काही मुस्लिम नेत्यांनीही केलें. सर सय्यद अहमद खान हे त्यावेळचे मुस्लिम पुढारी त्यापैकी एक होतें. ब्रिटिश काळाच्या प्रारंभी हिंदू- मुस्लिमांच्या सुप्त स्वरुपात थोड्याफार प्रमाणात अस्मिता जागृत होतयाच. ब्रिटिश राजवटीत हिंदू जसे दुय्यम झाले. तसे मुस्लिम ही झाले. ह्या आगोदर उत्तर भारतात मुस्लिम ही राज्यकर्ते यांची जमात होती. अनेक हिंदू लोक नवाबाच्या दरबारात मोठ्या हुद्यावर होते. वजीर. सेनापती. अशा महत्वपूर्ण पदांवर हिंदू लोक पोहोचले होते.पण त्यांचे स्थान दुय्यम होते. त्या राज्यात मुस्लिमांना झुकते माप होते व ते तत्कालीन हिंदू समाजाने मान्य केल्यासारखे होते. ह्या राज्यात आपण दुय्यम आहोत ही भावना हिंदू समाजात होती. परंतु त्यात मुस्लिम समाजाबाबत कटुता नव्हती. ब्रिटिश राजवटीत प्रारंभी हिंदूंना शिक्षण प्रसारामुळे विकासाची संधी मिळत गेली तया तुलनेत मुस्लिम समाज गतानुगीक असल्यामुळे शिक्षण नोकरयात मागें पडत गेला. त्यामुळे मुस्लिमांना आपण ब्रिटिश राजवटीत दुय्यम आहोत ह्याची जाणीव होऊ लागली. उत्तर भारतात उर्दू ही राज्यकारभाराची भाषा होती. ब्रिटिश राजवटीत हिंदूंनी हिंदीचा आग्रह धरल्याने पुन्हा त्यांना आपण व दुय्यमतेची जाणीव झाली. तसेच गोहत्या बंदी साठी हिंदू समाजाने चळवळी केल्या. त्यांचा परिणाम असा झाला की ब्रिटिश राजवटीच्या काळात हिंदू-मुसलिमात तणाव निर्माण झाला

      १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर त्यात हिंदू बरोबर मुस्लिम नेत्यांचा ही सहभाग होता. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्य विषयक मते व्यक्त करु लागताच ब्रिटिशांनी"फोडा आणि झोडा" तत्वांचा अवलंब करून मतलबी प्रचार केला. त्यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षेची भावना निर्माण केली. त्यामुळे मुस्लिम समाजात दुय्यम तेचे वातावरण वाढत गेले. स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य असणारे व त्यामुळे आपण अल्पसंख्याक ठरुन दुय्यम ठरु आपल्याला कधीच अधिकार मिळणार नाही.आपणाला गुलामाचे जीवन जगावे लागणार. अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. भारतीय राष्ट्र हे हिंदू मुस्लिम ह्या दोन जमातींचे मिळून बनले आहे. ह्या दोन जमाती म्हणजे उप राष्ट्रे आहेत. अशी भूमिका ब्रिटिशांची होती. दोन राष्ट्र वादाचा सिद्धांत हा मुळी ब्रिटशाचया कुटील मेंदूमधील उपज होती. त्यांनी काही मुस्लिम पुढारी यांचें मत वळविणयात त्यांना यश आले इस्लाम संस्कृती स्वतंत्र संस्कृती आहे. अशी भावना वाढीला लावली ही भूमिका ब्रिटिशांना राजकीय दृष्ट्या सोईची होती. अर्थात हि धारणा केवळ ब्रिटिशांची होती. असे नाही तर काही काॅग्रेस पुढारी याची होती. एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारतात जी नवी व्यवस्था स्थापन होईल आणि त्यात मुस्लिमांना स्वतंत्र जमात अस्तित्वात प्राप्त करून देण्याची तयारी दर्शवून काही काॅग्रेस नेत्यांनी मुस्लिम राज निष्ठे पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी हे आपल्या राजकीय भाषयात नेहमी हिंदू प्रतीके व प्रतिमांचा वापर करित गांधी हे धार्मिक न

असूनही धर्म निरपेक्ष कट्टर पुरस्कर्ते होते. तरीही त्यांची धार्मिक भाषा हि हिंदू मुस्लिम अस्मिताना छेद देणारी ठरली सन १९२० नंतर मुस्लिम लीगचे राजकीय अस्तित्व खरया अर्थाने जाणवू लागले जमातवाद व ब्रिटिशांचा छुपा आधार घेऊनच लीग वाढली व तिने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला

           स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान ही दोन स्वतंत्र बनली. भारत हे लोकशाही धर्मनिरपेक्ष व्यवस्था असलेलें राज्य म्हणून उदयाला आले. तर पाकिस्तान हे मुस्लिम धार्मिक राष्ट्र म्हणून उदयास आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बरेच मुस्लिम लोक पाकिस्तानात न जाता येथेच राहिले. पाकिस्तानात गेलेले बहुतेक मुस्लिम उत्तर भारतातील होते. दक्षिणेकडून फारसे स्थलांतर झाले नाही. भारतात वास्तव्य करून राहिलेला मुस्लिम समाज हिंदू पेक्षा संख्येने खूपच कमी होता. त्यांच्यावर व इतर अल्पसंख्याक यामध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना रुजावी भारतीय समाजात बहुसंख्यांकामधये भय राहू नये म्हणून भारतीय घटनाकारांनी अल्पसंख्याकांसाठी काही विशेष सवलती दिल्या. ह्या सवलती बाबत हिंदूत्व वाद्यांची विशेष तक्रार आहे. मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे. व त्यांचे राजकीय नेतृत्व करु पाहणारे नेते हया समाजाला धर्माच्या व्यतिरिक्त इतर दुसरें कोणतेही विचार दिलेले नाहीत. मुस्लिम लोकांचे एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी जांतयाद मुस्लिम नेते व त्यांच्याशी सौदेबाजी करणारे राजकीय पक्ष ह्यांनी संघटितपणे मुस्लिम समाजाला बहुसंख्य लोकांचे भय दाखवून त्यांना मानसिक भयाच्या दोरखंडाने जखडून टाकले आहे. आपण अल्पसंख्याक आहोत. आपल्याला रोजगार. शिक्षण. संधी नाही. विकासाची संधीच नाही. त्यामुळे जीवन जगायचे असेल तर आपले अस्तित्व हे सनातनी धर्माचे जोखडाखाली जगता येईल. अशी स्वातंत्र्यानंतर सामान्य मुस्लिमांची ठाम समजूत करून देण्यात आलेली आहे. हि समजूत करुन देण्यात मुस्लिम सनातनी नेतृत्व बर्याच प्रमाणावर यशस्वी ठरले आहे. परिणामी हिंदूंच्या खालोखाल मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम समाज हा देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही. असा प्रचार करण्यास हिंदूत्व वादी लोक मोकळे झाले. बहुसंख्य मुस्लिम अजूनही दारिद्र्य अडाणी अशिक्षित. मागास राहिले आहेत. मुस्लिम धरमवाधयाना आपल्या बांधवांच्या. आर्थिक. शैक्षणिक. सांस्कृतिक. विकासासाठी कधीचं हातभार लावला नाही. आजही बहुसंख्य समाज हा सामाजिक. सांस्कृतिक. आर्थिक. व प्रगतशिल. विकासापासून कोसो दूर आहे. वंचित आहे. सामाजिक मागासलेपणा मुळे. हा समाज धर्म कोषातून बाहेर येऊ शकला नाही. म्हणजे मुस्लिम समाज अधिकच मागास राहिला ह्याची काळजी सनातनी. मुल्ला. मौलवी व त्यांच्याशी राजकीय सौदेबाजी करणारे राजकीय पक्ष घेत असतात. ते. अज्ञानी. व दारिद्र्य राहणयातच सनातनी पुढारयाचे नेतृत्व टिकवून राहणे शक्य आहे. समाजात नवीन विचार पुढे येवू लागला की. जात्यांध मुस्लिम नेत्यांनी आपल्या बांधवांना. "इस्लाम खतरेमे है " असे आव्हान करुन धर्मांध बनिवले आहे. समस्त मुस्लिम समाजा पुढे हे प्रश्न प्रतिष्ठेचे करून जात्यांध नेतृत्वाने मुस्लिम समाजाला पुन्हा मध्ययुगीन कालखंडात नेले आहे. आर्थिक. सामाजिक. विकासात वंचित झालेला मुस्लिम समाज हा मानसिक भयापोटी. जात्यांध नेतृत्वाच्या मागें धावत आहे. धर्म. दुरभिमानापोटी. हा समाज. मुल्ला मौलवीचया. सूचना पाळत राहतो. मग त्याचे प्रत्यंतर हे कधी भारत पाकिस्तान क्रिकेट. हाॅकी. इत्यादी क्रिडा. सामान्यांत. पाक संघाच्या विजयात सहभागी होण्यासाठी फटाके उडविण्यात होते. हे फटाके वाजताच जात्यांध हिंदू नेतृत्वाकडे त्वरित दखल घेतली जाते. व त्यांच्यावर पाक धार्जिणे असल्याचा आरोप केला जातो. हिंदू मुस्लिम परस्परांना समजून घेण्याऐवजी आपली अस्मिता. आपला धर्म. आपली संस्कृती. ह्यांच्या बाबत सनातनी संकल्पना डोक्यात घेऊन जात्यांध व धर्म पिसाट. नेतृत्वाच्या मागें धावत राहतात. धर्मनिरपेक्षतेविषयी. मुस्लिम समाजाच्या मनात मानसिक भयाची छाया उमटलेली दिसतें. धर्मनिरपेक्षता हे सुद्धा त्यांना हिंदू जमात वाद. प्रमाणेच थोतांड वाटतें धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म व सनातन मूल्ये बुबविणे असून त्याद्वारे आपली धार्मिक ओळख संपुष्टात येईल. अशी त्यांची समजूत करून देण्यात आलेली आहे. मुस्लिमांचा धर्मनिरपेक्षतेला होणारा निर्थक विरोध लक्षात घेऊन हिंदू जमातवादी त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याचं मार्गाने बहुसंख्याकाना धर्माच्या नावाखाली संघटन करणे चालू केले आहे 

          एकीकडे हिंदू जमातवाधाचे राजकारण व दुसरीकडे मुस्लिम जमातवाधाचे राजकारण ह्या कोंडीत आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांची गळचेपी होते आहे. समाजातील लोकांना बाहेरील समाजाकडून भिती नाही आपल्याला आपल्या समाजातील लोकांच्या कडून जातीयवाद हिंसाचार यांचे जास्त भय आहे आपण एक आहोत नेक आहोत असा विचार आपण करा आणि आपल्या मुलांना याच मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करा. 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या