महापुराची मदत मिळाली कां ?

 


महापुराची मदत मिळाली कां ?

                २०२१ ला जुलै महिन्यात सोळा सतरा तारखेला. सांगली कोल्हापूर सोलापूर सांगली रत्नागिरी अशा जिल्ह्यात अवेळी अवकाळी झालेल्या पावसाने हाहाकार उडविला होता. पुरबाधित नदीच्या कडेला असलेल्या गावांना. सावरण्याचा वेळ सुद्धा मिळाला नाही. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांचें संसार उघड्यावर आले घरातील संसार उपयोगी साहित्य. महत्वाची कागदपत्रे. जमीन खरेदी दस्त. आधार कार्ड. रेशनकार्ड. मतदान कार्ड. गॅस कार्ड. कपडे. अन्न धान्य. अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंची पूर्णपणे वाट लागली होती. 

            सांगली जिल्ह्यातील पुरपटटयातील २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील ११ अंशतः आणि एकूण ९४ गावे पुरबाधित झाली होती. सहा जिल्ह्यातील पाण्याची क्षमता आणि अवेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे झालेली विक्रमी वाढ. कोयना. ४८ ५९ ‌‌. धोम ६.४६ ‌‌. कनहेर ४.७३ . दुधगंगा. ११.३४ . राधानगरी. ३.३६ . तुळशी. १.१ ८७ . कासारी. १.६९ ‌. पाटगाव २.३१ . धोम. बलकवाडी. १.९९ . उरमोडी. ५.६५ . तारळी ३ ७७ . अलमट्टी. ९४.३७. असे सर्व धरणानी रूद्र रूप धरले होते. सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यात लहान मोठे बरेच बंधारे पाण्याखाली गेले. पुरामुळे सर्व जिल्ह्यांतील जनावरें. पक्षी. असे हजारो मुकी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यातील काही वाचली आणि काही मृत्युमुखी पडली. हजारों एककर जमीन व त्यावरील हाता तोंडाला आलेली पिके वाहून गेली काही पाण्याखाली राहून कुजून गेली तर काही शेती पुराच्या पाण्याने वाहून गेली हजारो एकर शेती पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली . 

              मदत करण्यासाठी आलेले पथके. रत्नागिरी मध्ये सहा. रायगड मध्ये एक. सांगली जिल्ह्यासाठी दोन . सातारा जिल्हा तीन. मुंबई दोन. सिंधुदुर्ग दोन . पुण्यात दोन . अशी एनडीए आरएफ २५ पथके तैनात करण्यात आली होती महापूर चे गांभीर्य ध्यानात घेऊन नौदलाची पाच पथके. लष्कराचे एक पथक . सीमा सुरक्षा दलाची दोन . हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर. कोल्हापूर व रत्नागिरी मध्ये तैनात करण्यात आली होती अशी पुरबाधित ठिकाणी तैनात करण्यात आले होते. अशी सर्व परस्थितीत जनतेला गोरगरीब माणसाला पुराच्या काळात मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी. तहसिलदार. सेवाभावी संस्था. सामाजिक संस्था. यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविले आहे.  

                नेते पुढारी आमदार खासदार मंत्री विरोधी पक्ष नेते. यांनी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे केला काहीजणांनी हेलिकॉप्टर मधून केला तर काहीजणांनी चौकात उभे राहून. पण कोणीही. पाण्यात बुडलेली शेती. पाण्यात बुडलेली घरे. हे पहाण्यासाठी पाण्यात चिखलात कोणी गेलेच नाही. बांधावर गेले तिथे सुद्धा त्यांच्या डोक्यावर छत्री धरुन एक पीये होता. म्हणजे पुरबाधित क्षेत्राचा सर्वे हा फक्त दिखावा होता का ? आले आणि सर्व पुरपरसथिती आम्ही पाहीली आहे. लवकरात लवकर पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे. घर पडझड पंचनामे. गोठे पडझड पंचनामे. घरात घुसलेले पाणी व गाळ यांचा उंचीनुसार पंचनामा. मयत जनावरें पंचनामा. वाहून गेलेली जनावरे पंचनामा. शेती खचून वाहून जाणे पंचनामे. संसार उपयोगी साहित्य पंचनामे. दुकानदार व लहान उद्योग धंदा करणारे यांचे पुरामुळे नुकसान त्यांचे पंचनामे. तात्काळ मदत १०.००० देणे. मयत पुराच्या पाण्यामुळे यांचें पंचनामे. कोंबड्या कुत्री. मांजर मयत पंचनामे. पुरबाधित लोकांसाठी शेजारी असलेल्या गावांनी अशा लोकांची रहाण्याची. जेवनाची सोय कपडे. पांघरूण यासाठी सतरंजी. अशा वस्तूंची सोय करण्यात आली होती. पुरबाधित लोकांसाठी शासनाने रायगड. रत्नागिरी सांगली. सातारा. सोलापूर कोल्हापूर. अशा सहा जिल्ह्यांसाठी प्रति कुटुंब प्रति व्यक्ती १० किलो गहू. आणि १० किलो तांदूळ. आणि पाच लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा कोणीतरी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे करायला आले होते त्यांनी दिला होता. कोणाला मिळाले नाही कोणाला मिळाले.खरोखरच पुरात नुकसान झाले त्यांचा सर्वे झाला कां ? त्यांना पुराची शासन जाहीर मदत मिळाली कां ? ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील. मंडल अधिकारी. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. यांनी आपले कर्तव्य विना पक्षपाती पणाने पार पाडले कां ? अजून सुद्धा पुरात पडलेल्या घरांची नुकसान भरपाई मिळाली कां ? दुकानदार लहान लहान उद्योग छोटे छोटे व्यावसायिक यांना पुराची नुकसान भरपाई मिळाली कां ? असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत 

              नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी पुरबाधित क्षेत्रांचे राजकारण केले आहे कारण पुरबाधित क्षेत्र बघायचे आणि सेल्फी काढायची आम्ही किती मदत करतो आहे. आम्ही पाण्यात चिखलात जाऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. नौकानयन यांचा पुराचे पाणी पाहण्यासाठी आनंद घेतला. म्हणजे गोरगरिब जनतेवर सर्वसामान्य माणसांवर आलेल्या वाईट वेळेच हसय केलय का ? 

       . आमच इस्लामपूर पुरबाधित लोकांना अन्न धान्य. राहण्याचा निवारा. पांघरूण यासाठी कपडे. वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून. जनावरांना चारा पाणी त्याचा निवारा त्यांची वैद्यकीय सेवा सुविधा. पुरबाधित भाग स्वच्छ करण्यासाठी विविध संस्था सामाजिक संघटना पुढे इस्लामपूर मधूनच आल्या. अशा विविध माध्यमातून पुरग्रसत भागातील लोकांना मदत उभी केली इस्लामपूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा निशिकांत भोसले पाटील दादा युथ तर्फे पुरबाधित लोकांनी ज्या देवळात. हाॅटेल. शाळा. काॅलेज. विविध मंगलकार्य. अशा ठिकाणी आश्रा घेतलेल्या लोकांच्या साठी रोज ५०० लोकांना औषध. चहापाणी. नाष्टा. पिण्याचे पाणी. पुरपरसथिती पूरवत. होईपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. कोणताही पक्ष असो नेता कोणताही असो मदतीचा ध्यास रक्तातच असावा लागतो हे सर्व इस्लामपूर करांच्या कडून शिका.  

               पुरबाधित लोकांचे नुकसान झाले त्यासाठी ज्या ज्या प्रमाणात शासनाने पंचनामे करून मदत देण्याचा आदेश दिला होता त्याप्रमाणे आपल्या आपल्या गावात सर्वे झाला आहे का? आजच त्याचा पाठलाग करा. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी यांनी पैसे घेऊन काही पंचनामे बोगस केले आहेत का. गाव आपल गावातील सर्व परस्थितीत तुम्हालाच माहीत असणार आहे कोण मोठा आहे कोण गरिब आहे. कोणाला मदत हवी होती मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली का नाही ? तुम्हालाच याचा सर्वे करण्याची गरज आहे कारणं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी या सर्व अधिकार व कर्मचारी यांना सापेक्ष ध स्वच्छ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनाम्यात बोगसपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची आजच संबधीत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा. 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सावधान खेळ नजरबंदीचा?

 

सावधान खेळ नजरबंदीचा ?

                    १९९२ साली सरकारने मुक्त आर्थिक धोरणाचा सविकार केल्यानंतर किरकोळ विक्री क्षेत्रात काही मोठ मोठे उद्योगपती व धनिकांनी प्रवेश केला. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठमोठी चकाचक दुकानें ( हायपरमार्केट ) सुरू करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला परंतु सर्वसामान्य ग्राहक एवढ्या मोठ्या चकाचक दुकानांमध्ये जायला बिचकत होते त्यामुळे अनेक मोठमोठे माॅल नुकसानीत जाऊन बंद पडले तरीही या क्षेत्रात नवनवीन गुंतवणूकदार ( धनिक ) आपलेच नशीब आजमावून पहात होते सर्वसाधारण वीसेक वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतात त्या वेळी अनेक शाखा असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये त्यांनी एम आर पी रूलमधये पळवाटांचा गैर फायदा घेऊन एफ जीसी. क्षेत्रातील काही उत्पादकांकडून त्यांच्या उत्पादनाचे मोठे मोठे पॅक स्पेशल किमती टाकून बनवून घेतले व स्थानिक वृतमानपत्रामधये एम आर पी वर डिस्काउंटचया मोठ मोठ्या जाहिराती दिल्या ही युक्ती इतकी यशस्वी झाली की ग्राहकांच्या प्रचंड गर्दी मुळे त्या चार दिवसांत अनेक ठिकाणी सदर माॅलचया आजूबाजूच्या परिसरातील वहातूक यंत्रणा कोलमडून पडली. अशाप्रकारे या धनिकांच्या ग्राहकांना लुबाडणयाचया या नविन गोरखधंदा शोध लागला ही फसवणूक अंत्यंत चाणाक्षपणे कोणताही कायदा न मोडता केली जात असून त्याचे विस्तृत विवेचन पुढे करण आहे 

            इंडियन मेटरोलाॅजी अॅकट हा कायदा येण्यापूर्वी कोणत्याही उत्पादनावर विक्री किंमत छापलेली नसायची यांमुळे एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी दराने विक्री केली जात असे. यामध्ये ग्राहक यांची मोठी आर्थिक लुट केली जात होती. त्यामुळे ग्राहकांच्या हीताचे रक्षण करून त्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने १९७६ साली देशात एम आर पी रूल लागू करण्यात आला व १९९० साली या कायद्यात काही किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. या कायद्यानुसार उत्पादकांचा त्यांच्या उत्पादनावर विक्री अधिकतम किंमत छापणे बंधनकारक करण्यात आले. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणारे दुकानदार विक्री करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जबरी दंड व शिक्षा तरतूद करण्यात आली आहे. वरवर पाहता ग्राहकांच्या हिताचे रक्षण करून त्यांची फसवणूक टाळण्यासाठी ही तरतूद अतिशय छान आहे. असेच सर्वसाधारण चित्र आपणासमोर निर्माण होते. परंतु या कायद्यातील मुख्य उणीव अशी आहे की उत्पादकांची त्यांच्या उत्पादकांवर किरकोळ विक्री किंमत किती छापावी याबाबत सरकारने कोणतेही नियम व मार्गदर्शक तत्वे बनविलेली नाहीत. छापील किमतीपेक्षा एक पैसाही जास्त घेणे हा गुन्हा आहे. परंतु उत्पादन मूलयापेक्षा अनेक पटींने भरमसाठ किमती छापणे यात कोणताही गुन्हा नाही. तसेच एकाच उत्पादनाच्या वजनात अथवा संख्येत थोडासा फेरफार करून कोणताही ताळमेळ नसलेली मनानुसार ती किंमत छापण्यात कोणताही गुन्हा नाही. थोडक्यात उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर वाटेल ती किंमत टाकण्याची मुभा किंमत टाकण्याची कायदेशीर मुभा आहे यांचाच गैर फायदा घेऊन दैनंदिन वापरातील वस्तूंच्या मोठ्या पॅकवर अधी भरमसाठ किंमती छापल्या जातात. त्यांनंतर सदर उत्पादने आॅनलाइन कंपन्या व मोठ मोठे हायपर मार्केट द्वारे जाहिराती करून ग्राहकांना डिस्काउंट चे आकर्षण. दाखवून खरेदी करण्यासाठी उद्युक्त केले जाते. तसेच अनावश्यक खरेदी करण्यासाठी पण उकसावले जाते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या व्यापारी लोकांनी ग्राहकांची फसवणूक केली व त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी नवनवीन पद्धती शोधून काढल्या खतपाणी घातले. किंमती वाढल्या. त्याच लबाड व्यापारी यांच्या दुकानांत अक्षरशः रांगा लावून ग्राहक खरेदी करत आहेत 

फसवणूक होण्याची आणि करण्याची पद्धत 

* एकादी वस्तू दहा रुपयांत शंभर ग्रॅम असेल तर एका किलो साठी शंभर रुपये किंवा त्याहून कमी किंमत असायला पाहिजे परंतु एम आर पी कायद्यात अशी तरतूद नसल्याचा गैरफायदा घेऊन एफ एम जीसी क्षेत्रात छोटे पॅक स्वस्त व मोठे पॅक महाग विकून ग्राहकांना अनाकलनीय पध्दतीने लुटले जाते

* आॅगसट २०२० नुसार १०० ग्रॅम रेड लेबल चहाच्या पॅकची किंमत ३५ रुपये आहे. या हिशोबाने याच चहाच्या एका किलोच्या एका पॅकची किंमत ३५० रूपये असायला हवी परंतु सदर पॅकची किंमत ४७० रू म्हणजे १२० रूपयांनी महाग आहे याचप्रमाणे सोसायटी. वाघबकरी. व अन्य कंपन्यांच्या चहाच्या मोठ्या पॅकचया किंमतीत खूप तफावत आहे

* नेसकॅफे साडे सात ग्रॅमचया पाकीटाची किंमत दहा रुपये आहे. सात पाकिटे खरेदी केली तर सत्तर रुपयात साडे बावन्न ग्रॅम काॅफी मिळेल परंतु पन्नास ग्रॅमचया पाकिटाची किंमत एकशे चाळीस रू म्हणजे दुपटीहून जास्त आहे

* विविध कोलगेट कंपन्या व टुथप्रेश ५० ग्रॅमची किंमत २० रूपये आहे परंतु १५० ग्रॅमची किंमत ९५ रूपये आहे म्हणजे दिडपट जास्त आहे जवळपास सर्व अन्य टूथपेस्ट चया. बाबतीतही अशीच खूप तफावत आहे

* दहा रूपये पाॅनडस पाऊडर चे वजन २५ ग्रॅम आहे या हिशोबाने १०० ग्रॅमचया डब्याची किंमत ४० रूपये असायची हवी होती परंतु त्याची किंमत ९० रूपये म्हणजे ५० रुपये जास्त आहे

* सनसिलक शांपूची ६ एम एल ची पुडी एक रूपया आहे या हिशोबाने १८० एम एल चया बाटलिची किंमत ३० रुपये असायला हवी परंतु तिची किंमत ९५ रूपये आहे

           अशाप्रकारे जवळपास सर्वच कंपन्यांची चहा. काॅफी. टूथपेस्ट. साबन. डिटर्जंट. काॅसमेटिक शॅम्पू. इत्यादी दैनंदिन जीवनातील अनेक उत्पादनाच्या मोठ्या पॅकचया किमती छोट्या पॅकचया तुलनेत खूप जास्त छापलेल्या असून सदर सर्व उत्पादने आॅनलाइन पोर्टल व हायपर मार्केट मधून ग्राहकांना डिस्काउंट चे आकर्षण दाखवून विकली जात आहे. विशेष म्हणजे हायपर मार्केट आॅनलाइन पोर्टल वर या उत्पादनाचे छोटे पॅक उपलब्ध नसतात. सर्व वस्तू छोट्या मोठ्या पॅक मध्ये वस्तूला गुणवत्ता नाही हे आम्ही स्वता पडताळून पाहीले आहे. तसेच कायद्यानुसार एकाच ब्रनडचे कोणतेही उत्पादन वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये वेगवेगळ्या दर्जाचे विकले जाऊ शकत नाही. व तसे करणे कायद्याने गुन्हा आहे. ही फक्त आणि फक्त ग्राहकांची फसवणूक आणि आर्थिक लुट असून सर्वसामान्य ग्राहकांना ही गणिते लक्षात येत नाही व पगार झाल्यावर दैनंदिन जीवनात लागणार्या वस्तूंचे मोठे पॅकिंग खरेदी करण्याकडे कल असतो. याचा गैरफायदा घेऊन हा गैरप्रकार सुरू आहे. बाजारात १२५ ग्रॅम वजन असणारा एका सुप्रसिद्ध कंपनीचा ब्रॅण्ड बाथ सोप हायपर मार्केट मध्ये ११० ग्रॅम वजनाचा आहे व दोन्हींची किंमत एकच आहे हा सुक्षम फरक आपल्याला ध्यानात येत नाही याशिवाय ग्राहकांची फसवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्पादकांकडून ग्राहकांच्या सहजासहजी लक्षात येणार नाही असा निकृष्ट दर्जाचा. कमी वजनाचा माल बनवून घेतला. जातो. आणि रिजेकट झालेला माल विक्रीकरणारे विकत घेतात आणि तोच माल फेरश आहे म्हणून विकला जातो. स्वस्तात विकला जातो. नियर एक्सपायरी माल विकणे. एम आर पी वर सवताचे लेबल लावणे अश्या फसवणूकीचया असंख्य तरहा आहेत परंतु तो विषय वेगळा आहे भरमसाठ किंमती छापणयामुळे सेवा क्षेत्रात ग्राहकांना कसे फसवतात याचे फक्त एकच फंडा आहे 

            इलेक्ट्रॉनिक. हार्डवेअर. पेंटस. सॅनिटरी वेअर. पलमबिंग वस्तू. वर देखील मनमानी किंमती छापलेल्या असतांत जेव्हा कोणी आपल्या जागेचे फर्निचर. नुतनीकरण किंवा दुरुस्ती काम हाती घेतो तेव्हा काही सुतार प्लंबर इलेक्ट्रॉनिक व इंटिरिअर किंवा सामग्री त्यांच्या ओळखीच्या दुकानदारांकडून आणण्याचा सल्ला देतात आणि आग्रह धरतात कारणं त्यात त्यांचे कमिशन असते. आणि समजा मालकाने दुसर्या दुकानातून आणले तर त्या मालात खोट काढतात. म्हणजे कारागीर यांच्या ओळखीचे दुकानदार मनमानी छापलेली किंमत कमिशन सह ग्राहकांच्या गळ्यात मारतात. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वस्तू. कपडे. पॅकेजड. फूडस. मोबाईल लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. सौंदर्य प्रसाधने. साफसफाईची सामग्री. पादत्राणे. इ. जवळपास सर्वच नितयोपयोगी उत्पादनावर मनमानी एम आर पी छापून ग्राहकांची फसवणूक केली जाते अशा प्रकारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यात हा एम आर पी कायदा संपूर्ण अपयशी ठरला आहे. याउलट या कायद्यातील पळवाटांचा गैरवापर करून ग्राहकांना अक्षरशः लूटले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे अप्रत्यक्षपणे दरमहा किमान एक हजार विनाकारण अधिक खर्च होत असून देशात पंचवीस ते तीस कोटी कुटुंबे आहेत. त्यानुसार ही रक्कम वर्षाकाठी किमान अडिच ते तीन लाख कोटी रुपये होते. त्या हिशोबाने आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरचा सर्वसामान्य जनतेची लुटमार करणारा हा सर्वात मोठा घोटाळा दरवर्षी होत आहे. खेदाची बाब ही आहे की यातील अधिकांश पैसा उत्पादक मोठ मोठे उद्योगपती व हायपर मार्केट मालकाच्या खिशात जात आहे. उलटपक्षी सर्वसामान्य जनतेचा कश्याप्रकारे विनाकारण व अप्रत्यक्ष रित्या जास्त खर्च होत असल्याने गरिब व मध्यमवर्गीय आणखीनच गरिब होत चाललेला असून समाजातील आर्थिक असमानता प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. वाळूत कमिशन. खडी मध्ये कमिशन. लाकूड यामध्ये कमिशन. असे विविध वस्तू मध्ये दुकानदार काम करणार्या लोकांना आर्थिक कमिशन देतात. आणि ग्राहकांना लुटतात. 

          औषधांत होणारी ग्राहकांची लूट. काही औषधांवर काही पटिने किंमती छापून सदर कंपन्या त्यांची औषधें रुग्णांस लिहून देण्याचा आग्रह करतात आणि औषध कंपन्या या डॉ लोकांना काही आर्थिक आमिष देतात. काही डॉ या आमिषाला बळी पडून अनावश्यक औषधे लिहून देऊन रुग्णांना लुटतात खड्ड्यात घालतात. तर काही डॉ यांचें मेडिकल वालयासोबत सगणमत करून त्याच मेडिकल मधून औषध खरेदी करण्याचा आग्रह धरतात. आणि अशी औषधे लिहून देतात की ती औषधे त्यांनी चिठ्ठी दिलेल्या मेडिकल मध्येचं उपलब्ध असतात दुसरीकडं नाही. नाहीतर ज्या डॉ लोकांनी औषध लिहून दिले आहे ते त्यांच्याच मेडिकल मध्ये उपलब्ध असते आणि त्या औषधांची किंमत दुप्पट लावलेली असते. भरमसाठ किंमती छापल्यामुळे व सरकारचे नियंत्रण नसल्याने. वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवसाढवळ्या लुटरे जात आहे दुर्दैवाने एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणाला अपघात किंवा गंभीर आजार झाला तर औषध उपचारासाठी त्याची सर्व पुंजी. बचत. दागदागिने व सर्व मालमत्ता जाऊन तो अन्नाला महाग होणो तर काहीजण‌ भिकेला लागतात. जर औषधांवर व्यवस्थित किंमती व दवाखान्यात कोणत्या उपचारासाठी किती खर्च येईल असे लिहणे गरजेचे आहे दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात बरेच काही लिहिण्यासारखे आहे म्हणजे डॉ मनमानी फी. अनाठायी औषधांचा खर्च. अशी होणारी लूट थांबली पाहिजे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा पुस्तकात नको अमलात आणा त्यासाठी आपल्या सर्वांची मदत सुधबुधद गरजेची आहे 

            व्यापारी छोटे छोटे पारंपारिक व्यापाराची मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्याची क्षमता नाही. आणि हे सर्व जण असंघटित आहेत उत्पादकांना प्रत्येक छोट्या छोट्या दुकानात माल वितरित करणे खर्चाचे असते. म्हणून या छोट्या छोट्या व्यापारी यांना कमी नफा देतात. त्यामुळे हा छोटा व्यापारी हायपर मार्केट किंवा आॅनलाइन एवढा डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक डिस्काउंट चया आशेने हायपर मार्केट किंवा आॅनलाइन पध्दतीने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आज बाजारात गर्दी कमी आणि हायपर मार्केट किंवा आॅनलाइन वर ग्राहकांची जास्त गर्दी दिसत आहे. यामुळे छोटे छोटे पारंपारिक व्यापारी व व्यवसाय बुडत चालला आहे. त्यामुळे छोट्या व्यापार्यांना दररोज खर्च भागविणे सुध्दा जड झाले आहे. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणार्या लोकांची दुकानें बंद पडली आहेत. तर कुठेना कुठे तरी धनिक मोठे व्यापारी यांची नवनवीन भव्य दिव्य हायपर मार्केट किंवा आॅनलाइन दुकानें सुरू होताना दिसत आहेत. जर अशा प्रकारे सर्व चालू राहिले तर निश्चितच हळूहळू सर्व छोटी छोटी दुकाने छोटे छोटे व्यापारी मरून जातील आणि निश्चितपणे रिटेल क्षेत्रातील काही व्यवसायात काही ठराविक धनिकांची मक्तेदारी निर्माण होईल तसेच उत्पादक एकच उत्पादन विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दराने वितरित करित असल्याने छोट्या व्यापारी यांची कोणतीही चूक नसताना. ग्राहकांचा अशा दुकानदार यांच्यावरील विश्वास संपत चालला आहे. यामुळे यांना व्यवसाय करणे अवघड झालेले असून प्रामाणिक पणे काही कामधंदा करून आपला उदरनिर्वाह चरितार्थ चालविण्याचा व स्वाभिमानी जगण्याचा त्यांच्या हक्क नाकारला जात आहे. हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्क यांवर अतिक्रमण असून सारासार अन्याय केला आहे 

              आपल्या देशात अंदाजे सहा ते सात कोटी किरकोळ व्यापारी असून त्यांच्यावर लाखो वितरक व वाहतूकदार अवलंबून आहेत. त्या छोट्या छोट्या व्यापारी लोकाच्या कडे. किमान १० लाख कर्मचारी असण्याचा व वाहतूकदार असतील असा अंदाज आहे. यातील बहुतांश लोकांचे शिक्षण जास्त झाले नसून अन्य कोणतेही कौशल्य या वर्गाकडे नाही. या किरकोळ क्षेत्रांवर सदर व्यापारी त्यांचे कर्मचारी आणि या सर्वांचे कुटुंबीय असे ३० ते ४९ कोटी लोक एकामेवर अवलंबून आहेत परंतु मोठ मोठ्या धनिक व उद्योगपतींनी रिटेल क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे आज या सर्व छोट्या छोट्या व्यापारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी कुटुंबीय यांचें भवितव्य धोक्यात आले आहे छोटे व्यापारी यांची मनासारखी कमाई होत नसल्याने असा वर्ग कामगारांना पुरेसा पगार देऊ शकत नाही तो स्वतःलाही खर्च करताना फार विचार करून खर्च करत आहे. नवीन गुंतवणूक करणे. अशक्यच आहे. त्यामुळे छोट्या व्यापारी लोकाच्या मालाचा उठाव कमी होत चालला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होत आहे अॅटोमोबाईल क्षेत्र. रिअल इस्टेट क्षेत्रावर पण झालेला दिसतो. आपली अर्थव्यवस्था एका दुष्टचक्रात अडकलेली आहे. देशातील तीव्र मंदी आणि बेरोजगारी हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचे कारण आहे आपल्या देशातील उत्पादन होणारा माल म्हणजे कांदा बटाटा तूर मूग उडीद हरभरा हे त्या वर्षातील पूर्ण पिक खरेदी करण्याची क्षमता असणारे धनिक उधोगपती. आपल्या देशात आहेत. परंतु कोणीही असे करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची लुटमार करु नये यासाठी सरकारने शेतीमालासाठी # साठा नियंत्रण कायदा # लागू केला त्याप्रमाणे जर ३० ते ४० कोटी जनतेच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होऊन जर ते देशोधडीला लागणार असतील तर सरकारने या विषयात लक्ष देणे गरजेचे आहे हे जर असेच चालू राहिले तर प्रचंड अर्थिक ताकदीच्या जोरावर हे धनिक सर्व प्रतिस्पर्ध्यांना संपवून एक एक क्षेत्र गिळांकृत करतील व भविष्यात आपल्या भावी पिढ्यांना या धनिकाकडेच ते देतील त्याच पगारात नोकरी करणे व ग्राहक म्हणून ते देतील त्याच वस्तू व ते देतील त्या दरात घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही 

ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी जी एस टी व एम आर पी कायदा अंमलात आला कोणत्याही उत्पादनाचे मोठे पॅक व लहान पॅक यांचें वजन आणि किमतीमध्ये सुयोग्य प्रमाणात गुणोत्तर असावे. म्हणजे लहान पॅकचया किंमतीत व तुलनेत मोठा पॅक महाग नसावा. सर्व उत्पादनावर त्यांची एम आर पी व वजन मोठ्या अक्षरात छापणे बंधनकारक असावे जेणेकरून ग्राहक तुलनात्मक अभ्यास करू शकेल. प्रत्येक उत्पादनावर सदर उत्पादनाचे मूल्य प्रकाशित करणे बंधनकारक आहे. किंमती नियंत्रण मंडळ प्राईस कंट्रोल बोर्ड स्थापन केले जावे प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात यावे. कोणतीही आॅफर उदा सेल. डिस्काउंट. एकावर एक फ्री. एक्स्ट्रा फिरी. अशा विविध ग्राहकांना फसविणारया योजना बाजारात येण्यापूर्वी पी सी बी द्वारे त्याची सत्यता चाचणी पडताळणे बंधनकारक आहे. जी एस टी छापील किंमतीवर उतपादकाकडूनच वसूल केला गेला तरच मनमानी किंमती छापणे याल आळा बसेल. जी एस टी नंबर धारण केलेल्या सर्व रजिस्टर व्यापारी यांना उत्पादकांकडून एकाच दराने मिळावा. म्हणजे उत्पादनाचा दर्जा वजन यामध्ये उत्पादक बदल करणार नाही व ग्राहकांची फसवणूक होणार नाही

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न

 

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न 


पुणे, प्रतिनिधी : 

लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

         दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.  

        या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, अभिनेत्री संगीता चवरे, अभिनेता अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, साहाय्यक दिग्दर्शक अरबाज शेख अभिनेत्री आरती पाटील, अभिनेता कुतुबुद्दीन गड्डेकर, अभिनेता नागेश स्वामी, अभिनेता आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, अभिनेत्री प्राजक्ता ठिगळे, अभिनेत्री शैला पाटील अभिनेत्री शोभा देशपांडे, अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता सलमान शेख, अभिनेता सतीश कुंभार आदी उपस्थित होते.

         धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर 5 निर्माता मिथलेश अगरवाल केतन जाधव आणि सय्यद शेख यांच्याकडे आहे.

वाट पाहत आहे?

 

# वाट पाहत आहे #

सुरक्षित अंतर ठेवा. पुढे धोकादायक वळण आहे. पुढे शाळा आहे. पुढे गाव आहे. वेग आवरा जीवन सावरा. गाडी वेगाचे संतुलन ठेवा. जीवन अनमोल आहे. आपल्यासाठी पालथ्या घड्यावर पाणी अस आहे

                   युगात पहिल्यांदा चाकांचा शोध लागला आणि मानवाच्या जीवनाला गती मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्टीची सुरुवात चाकापासून झाली.     

गतकाळात लोकसंख्या कमी होती. त्यावेळी होणारें विविध जीवनावश्यक वस्तूंचे दळणवळण. हे बैलगाडी या माध्यमातून होत होते. शेती सामान आणने नेणे. शेतातील भाजीपाला व इतर वस्तू आवक जावक करण्यासाठी बैलगाडी उपयोगात आणली जात होती. लग्नाला सुध्दा गाडीतून व्हराड नेले जात होते.आगोदर आठ दिवस निघावे लागत होते. आणि जरा आपले जीवन सुधारले. आणि सायकलीचा शोध लागला. आणि थोडी जीवनाला गती आली. लोकांना इतरत्र जाणे येणे सोयीस्कर झाले. आणि थोड्या प्रमाणात अपघात होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत होत राॅकेलवर चालणारी. जावा. एझडी. बुलेट अशा कमी बजेटच्या गाड्या तयार होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत सर्वात बुद्धिमान समजला जाणारा माणूस याने चारचाकी गाड्यांच्या शोध लावला. त्यावेळी चारचाक. इंजिन एवढ अँडव्हान्स नव्हतं त्यावेळी ताण ब्रेक होते. अशी सर्व रचना होती. गाड्या मुबलक मिळवणारे राॅकेल यांवर चालत होत्या. 

                 जुन्या काळी सिनेमांत प्रामुख्याने घोड स्वारी व तयाशी निगडित सिनेमे आपण पाहिले आहेत. त्यानंतर दोनचाकी गाड्या दिसायला लागल्या. आणि सिनेमाची गोडी वाढली. आणि आत्ता चारचाकी. अलिशान गाड्या दिसायला सुरुवात झाली. 

                    माणसाच्या रक्त वाहिन्या असतांत त्याप्रमाणे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा. विकास हा आपल्या दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो म्हणजे त्या विकासासाठी गरजेचा मुद्दा असणारा म्हणजे रस्ता. पहिल्या काळात डांबरी सिमेंट रस्ते नव्हते. मजबूत पुल नव्हती. लहान लहान पुलं होती. आज विकासाचा भकास झाला आहे. रस्ते डांबरीकरण. सिमेंटचे रस्ते. गावांसाठी जोडणारे दळणवळण सोपे करणारे रस्ते तयार झाले. रस्ते तयार करण्यासाठी आडवी येणारी झाडे. घर. डोंगर. एवढंच काय गावच्या गावं स्थलांतरित करण्यात आली आणि त्यांना मोडका तोडका आर्थिक मुहावजा देण्यात आला आपला विकास साधण्याचा फसवा प्रयत्न केला. आज जागोजागी तयार होणारे रस्ते. पुलं. बंधारे. धरणे. कालवे. बोगदे. अशी विविध आपला विकास साधणारे उपायोजना करण्यासाठी नेमले जाणारे विकास कार्यक्रम आज आपण निवडून दिलेले नेत पुढारी आमदार खासदार मंत्री यांचे बगलबच्चे आपल्या सत्तेचा गैर वापर करून लाखची कोटींची टेंडर घेतात का तर तो त्या जिल्ह्यातील आमदारांचा मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून आणि एकवेळ अशी येते आपण पेपर वृतमानपत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो कि उद्घाटन दिवशी पुलं पडल. बंधारा. धरण. वाहून गेल. किती वाईट आहे यात आपल्या मिळकतीची एक तरी रुपया आहे. विचार करा इंग्रजांच्या काळात तयार केलेले पुल. बंधारे. धरणे कालवे. हे आजसुद्धा ४०० वर्षे त्यांच्या कामांची पोचपावती देत आहेत आज कोणत्याही पेपरमध्ये वृतमानपत्रात इंग्रज काळातील एखादे पुल बंधारा धरणं. कालवा वाहून गेला असं एकल नाही कारणं आजसुद्धा यांनी बाधलेली वास्तू सुरंग लावून पाडावी लागते त्यावेळी सापेक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त काम होत होत. उगाचंच जुनी माणसं म्हणायची नाहीत इंग्रज काळात काठीला सोन बांधून फिरा म्हणजे त्यावेळी जनजीवन किती सुरक्षित होत. आज सर्वजण पैश्याच्या माग लागलं आहेत. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार अशे एकही प्रकरणं इंग्रज काळात नव्हते कारण जसा गुन्हा आहे तशीच सजा होती. आज एखाद्या आरोपीला वरिल कोणत्याही गुन्ह्याची सजा झाली तर त्याला पोलिस कोठडीत वहिआयपी वागणूक दिली जाते आणि चार सहा महिन्यांत तो आरोपी अजून असेच गुन्हे करण्यासाठी निर्दोष सुटतो. ही आपली ढिसाळ झालेली प्रशासन व्यवस्था. इंग्रज काळात चोरी केली तर हात तोडा. वाईट नजरेने बघितल तर डोळ काढा. अशा विविध सजा होत्या म्हणजे इंग्रज काळात आपण गुलाम नव्हतो तर आच आपण आपल्याच लोकाची गुलामी करत आहोत 

                  आज काळ बदलला आणि माणसाला मशिनची गती आली. सर्वत्र चकाचक रस्ते. दळणवळण जवळ झाले. मालाची आवक जावक झपाट्याने होऊ लागली आणि वेळेची सर्वात मोठी बचत झाली आपणांस हवे असणारे आपल्याला वेळेत मिळण्यास सुरुवात झाली. उलटपक्षी विचार केला असता सायकलीने भंगार दुकानांत जागा घेतली. जुन्या गाड्या शोरूममध्ये शोपिस म्हणून बसल्या. आज चार गियर. पाच गियर. अशा. जागयावरुन १८० सपिड घेणा-या नवीन नवीन गाडया. २०.००० पासून ४/५ लाखांपर्यंत दोन चाकी गाड्यांच्या किंमती आहेत. त्याचबरोबर चारचाकी गाड्या. १ लाखापासून ४/५ कोटी त्यापेक्षा ही महागड्या गाडया आज सर्वत्र नाही पण दिसतर आहेत वाहन आपली किंमत आपले वजन दाखविण्याचे साधन आहे. गाडी आपली आहे त्याचे सपिड सुध्दा आपल्या हातात आहे हे आपण विसरतो 

          आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मयत लोकांचे प्रमाण भयान झाले आहे. ज्यावेळी एकादा अपघात होतो त्यावेळी कोणी मदत करण्यासाठी. येत नाही कारणं पोलिस स्टेशनला जाण्याचा त्रास. जाब जबाब याचा ससेमारा. यामुळे शासनाने अपघातग्रस्त लोकांना मदत करणार्या व्यक्तिला पोलिस स्टेशनला सुध्दा चौकशी साठी बोलवू नये असा आदेश दिला आहे. अपघातात आई वडील भाऊ बहीण सगेसोयरे. यांचा मृत्यू झाला तर तो काळ किती वाईट असेल कारण कोणी आई गमावली. कुणी मित्र गमावला. कुणी वडील गमावले. कुणी बहिण भाऊ गमावले. असा प्रसंग सुध्दा आला आहे की सर्व कुटुंब जागीच ठार झाले आहे. कोण कोणासाठी रडत असेल. विचार करा. रस्त्यावरून शाळेला जाणारी मुलं मुली घोळखा करून चालतात त्यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर चालणारे वयोवृद्ध. पुरुष महिला. तरुण. लहान मुल. अशा अनेक व्यक्तिं रस्त्यावरून चालत असतात सुरक्षेच्या दृष्टीने जे काय पाहिजे ते शासन नामफलक लावून वाहन चालक यांना सावध करत असते. पण आज काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या बापाने बॅंकेकडून व्याजाने पैसे काढून घेवून दिलेली गाडी मुल अति वेगाने चालवत असतात. डबरा नाही. सपिड ब्रेकर नाही. अशी गाडी चालवत असतात. वेळ चांगली असेलतर ठिक आहे नाहीतर अपघात झाला तर स्वता मरणार आणि सोबत चार दोन घेवून जाणार काय वाटत असेल त्या आई वडील यांना आपण कधी विचार करतच नाही. 

              अपघात झाल्यावर घटनास्थळी बघणारे. अपघातग्रस्त लोकांच्या वस्तू पैसे वेळ पडल्यास गाड्यांचे पार्ट काढून घेतात. म्हणजे अपघातांत मरत असणारे लोक याकडे कोणी लक्ष सुध्दा देत नाही.  

              शासनाने विविध वाहतूक नियम अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत पण आपण त्या पाळतो का ? केवळ आपण आपल्या हलगर्जीपणा आज बरेच अपघात होत आहेत. अपघातात मयत झालेल्या व्यक्तिच्या घरच्या लोकांना आर्थिक सहाय्य देण्यापेक्षा. ज्याचा कडून अपघात झाला आहे अशा गुन्हेगार लोकांनी त्या अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईक यांना मरेपर्यंत पोसणयाचा आदेश द्यावा. अन्यथा वयानुसार आर्थिक लाभ देण्यात यावा. कारणं अपघातात हात पाय मोडणे. तोंडावर विविध खुना पडणे चेहरा विद्रूप होणे. काहीजण मूके बहीरे होणे. मनोरुग्ण. शारीरिक अपंग. विकलांग. अशा विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे काम होत नाही. घरच्या लोकांवर ओझ होत आणि अशा प्रस्थितीत अपघातग्रस्त लोक आत्महत्या सारखें मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपवितात

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इसलामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा राज्य

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जगण्यासाठी संघर्ष

 

जगण्यासाठी संघर्ष 

                 जी वस्तू आपल्याजवळ नाही पण ती आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी आहे अशी वस्तू शोधने किंवा पदरांत पाडून घेण्यासाठी  आपणास करावे लागणारे अटोकाट प्रयत्न म्हणजे # वणवण #     आपणास बरेच काही ज्ञान देतो हा शब्द आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे पूर्ण झाली असताना सुध्दा बर्याच गोष्टी साठी आपणास गोरगरीब जनतेला महिला. मुल यांना अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे. प्रत्येक जीवनावश्यक गोष्टी साठी वस्तू साठी वणवण करावी लागते 

                    गरिबी सर्वात मोठा शाप आहे आपल्याला आणि ही वेळ आपल्यावर आणणारे आपलेच नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे आहेत कारणं नोकर भरती नाही.  नवीन नवीन विदेशी कंपन्या यामध्ये परराज्यातून येणारे कामगार.  आर्थिक विकास महामंडळ बोगस कामकाज.  गरज आहे त्याला एक रूपया मदत नाही. आणि नेते यांचे बगलबच्चे यांना विना अट कर्ज यामुळे भयानक प्रमाणात निर्माण होणारी बेरोजगारी. यातून व्यसनी तरूण त्यातूनच खून मारामाऱ्या अपहरण बलात्कार खंडणी. बेकायदा व्यवसाय. यांना उत येते आणि निर्माण होणारी पिढी गुन्हेगार पैदा होतात त्यामुळे त्यांच्या पालकांना आई वडील नातेवाईक यांना पोटासाठी आपले गाव सोडून दुसर्याच्या गावात वणवण करत फिरावे लागते. 

                  ज्या ठिकाणी चारा नाही. पिण्यास पाणी नाही.  निवारा नाही.  जगण्याचे साधन नाही.  ज्या झाडांना फळे फुले लागत नाहीत अशा ठिकाणी पक्षी सुध्दा राहत नाहीत. अशी जागा पक्षी लवकरात लवकर सोडतात म्हणजे पोटासाठी वणवण पक्षांना सुध्दा करावी लागते 

                रोजगार.  व्यवसाय. शिक्षण. विवाह. जन्मानंतर. कुटुंबासह.   व इतर कारणांनी आपल्या भारतातील जनतेला गोरगरीब लोकांची एकूण पोटासाठी स्थलांतर करणार्या लोकांची अंदाजे संख्या ४.१७ लाख आहे. यापैकी ग्रामीण भागातून २२४.५ लाख आणि नागरी भागातून १९२.६५ लाख असे एक अंदाजे समिकरण करण्यात आले आहे यापेक्षा स्थलांतरित लोकांचा आकडा जास्त असणार आहे यामध्ये एकूण पोटासाठी वणवण करण्यात पुरुष संख्या १६७.६५ लाख एवढी आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष संख्या ६८.२२ लाख एवढी आहे. आणि महिलांची संख्या २४९.५२ लाख एवढी आहे. नागरि भागातून स्थलांतर करणारे पुरुष संख्या ९९.४२ लाख आहे यामध्ये महिलांची संख्या ९३.२३ लाख एवढी आहे. महाराष्ट्रात टक्केवारी नुसार पोटासाठी वणवण करण्याची अनेक कारणें आहेत त्यामध्ये प्रामुख्याने  विवाहामुळे होणारे स्थलांतर. सर्वात जास्त आहे यांची टक्केवारी ३५.६४ आहे.  या खालोखाल कुटुंबासह पोटासाठी स्थलांतर करणारेही टक्केवारी १७.२३   # रोजगार १६.५५ # इतर कारणांमुळे होणारे स्थलांतर. १६.४२ # जन्मानंतर स्थलांतर १२.२५ # शिक्षणासाठी स्थलांतर १.४५ # व्यवसायामुळे स्थलांतर नगण्य आहे कारणं व्यवसाय हा आपण जिथे राहतो तिथे केला जातो पण तो स्थायी असेल का ? यांवर बरेच अवलंबून आहे. 

*. रोजगारामुळे होणारे स्थलांतर. २००१ आकडेवारी नुसार महाराष्ट्रात रोजगारामुळे  ६९.०५ लाख एवढे आहे. यापैकी पुरुष संख्या ६२.३२ लाख आहे. महिलांची संख्या बरीच कमी आहे फक्त ६.७३ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुष संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष संख्या ५५ लाखांनी जास्त आहे. रोजगारासाठी पुरुष एकटेच बाहेर पडतात. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे १७.९० लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १४.१३ लाख आणि महिलांची संख्या जेमतेम ३.७७ लाख आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष यांची संख्या सुमारे १० लाख जास्त आहे   शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष एकूण. ५१.१५ लाख आहे.  लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले आहे.  यापैकी पुरुष संख्या  ४८.२० लाख आहे महिलांची संख्या फक्त २.९६ लाख आहे. 

* व्यवसायामुळे होणारी वणवण महाराष्ट्रात व्यवसायामुळे १.९३ लाख लोकांनी स्थलांतर केले यापैकी पुरुषांची संख्या १.६७ लाख आहे. तर महिलांची संख्या फक्त २५.००० हजार आहे.  रोजगाराप्रमाणेच व्यवसायासाठी प्रामुख्याने पुरुष आपले पूर्वीचे ठिकाण सोडतात आणि यामध्ये महिलांची संख्या पुरुषांची संख्या १.४२ लाख आहे.   व्यवसायासाठी ग्रामीण भागातून व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात ३८.००० हजार लोकांनी पोटासाठी वणवण केली. यापैकी पुरुषांची संख्या २६.००० तर महिलांची संख्या १२.००० आहे  शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २.९३ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १.४१ लाख आहे तर महिलांची संख्या फक्त १३.००० हजार आहे 

* शिक्षणामुळे वणवण. महाराष्ट्रात शिक्षणामुळे स्थलांतर करणारे यांची संख्या ६.०४ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या ४.४१ लाख आहे. आणि मुलींची संख्या फक्त १.६३ लाख आहे शिक्षणासाठी स्थलांतर करणार्या मुलांपेक्षा मुलींची संख्या सुमारे २.९ लाख आहे. याचप्रमाणे मुलींचाही शिक्षणासाठी स्थलांतराचा कल जास्त असत नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शिक्षणामुळे स्थलांतर केलेल्यांची एकूण संख्या २.१२ लाख आहे. असून मुलींची संख्या १.४८ लाख आहे. तर मुलांची संख्या ६४.००० हजार आहे.  मुलींपेक्षा मुलांची संख्या २.३ पट आहे    महाराष्ट्रात शहरि भागातून शिक्षणासाठी स्थलांतर करणार्यांची एकूण संख्या ३.९२ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या २.९३ लाख आहे आणि मुलींची संख्या फक्त ९०.००० हजार आहे. मुलींपेक्षा मुलांची संख्या तीनपट जास्त आहे म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून मुलींचे शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाण जास्त आहे 

* विवाहामुळे स्थलांतर महाराष्ट्रात विवाहामुळे होणारे स्थलांतर १४८.६८ लाख एवढे विक्रमी आहे. त्याची टक्केवारी ३५.६४ लाख आहे यापैकी सथलातरिताची  संख्या १४७.५४ लाख तर पुरुष संख्या फक्त १.१४ लाख आहे व ती नगण्य आहे. महिलांचे विवाहामुळे होणारे स्थलांतर महाराष्ट्रात व जिल्हा व जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात आहे.  याचप्रमाणे आंतरजातीय स्तरावर विवाहामुळे स्थलांतर होऊन महाराष्ट्रात स्थलांतर होणार या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा १४६.४० लाख जास्त आहे   महाराष्ट्रात ग्रामीण भागातून होणारें स्थलांतर एकूण संख्या १०६.९१ लाख आहे. यापैकी महिलांची संख्या १०६.११ तर पुरुष संख्या  नगण्य म्हणजे फक्त ८०.००० नगण्य आहे   महाराष्ट्रात शहरि भागातून विवाहामुळे होणार या स्थलांतराची एकूण संख्या ४१.७७ लाख आहे.  यापैकी महिलांची संख्या ४१.४३ लाख तर पुरुषांची संख्या फक्त ३४.००० आहे.  महाराष्ट्रात विवाहामुळे स्थलांतर होणार या महिलांची संख्या शहरी भागातून सुमारे ६५ लाख जास्त आहे 

* जन्मानंतर होणारें स्थलांतर महाराष्ट्रात जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या ५१.०९ लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या ३१ लाख आहे.  आणि महिलांची संख्या २० लाख आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून जन्मानंतर स्थलांतर होणार या लोकांची एकूण संख्या ३१. लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १९.३५ लाख आहे. तर महिलांची संख्या ११.७० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या नगण्य ७.५० लाखाने जास्त आहे   महाराष्ट्रात शहरि भागातून जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या २०.०४ लाख आहे. त्यातील पुरुष संख्या ११.७४ लाख आहे तर महिलांची संख्या ८.३० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ३.५० लाखाने जास्त आहे

* कुटुंबासह पोटासाठी वणवण करणारे लोक यांची एकूण संख्या ७१.८८ लाख आहे या गटाचा विवाहामुळे होणारें स्थलांतर यात खालोखाल दुसरा क्रमांक आहे. यापैकी पुरुषांची संख्या २९.७४ लाख आहे.  महिला संख्या ४२.१४ लाख आहे. पुरुषांची संख्या महिलांपेक्षा १२.४० लाख कमी आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे यांची एकूण संख्या २६.०३ लाख आहे पुरुष संख्या ११.०८ लाख आहे. महिलांची संख्या १४.९६ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ३.८८ लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४५.८५ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १८.६६ लाख आहे तर महिलांची संख्या २७.१८ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सुमारे ८.५ लाखांनी जास्त आहे. महिलांची संख्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून सुमारे १२ लाखांनी जास्त आहे. 

* इतर कारणानें होणारी वणवण महाराष्ट्रात इतर कारणानें होणारे स्थलांतर संख्या ६८.४८ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३७.२६ लाख आहे तर महिलाची संख्या ३१.२६ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ६ लाखांनी जास्त आहे.  महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४०.११ लाख आहे.  पुरुषांची संख्या २१ . १३ लाख आहे.  महिलांची संख्या. १८.९८ आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.१५ लाख जास्त आहे.  शहरि भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २८.३७ लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १६.१३ लाख आहे.  आणि महिलांची संख्या १२.२४ लाख आहे.  महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.८९ लाख आहे 

          आज बांधकाम क्षेत्रातील कामगार.  विटभटटी कामगार. स्टोन क्रशर कामगार.  यामध्ये आपली पोटाची खळगी भरण्यासाठी येणारे पर प्रांतिय लोक यांच्याबरोबर येणार्या महिला यांना मानाची वागणूक नाही त्यांचेकडे पहाण्याचा दृष्टीकोन. वाईट असतो. आणि सर्वात मोठ विषय आहे तो म्हणजे यांची मुल शाळा नाही शिक्षण नाही यामुळे अडाणी राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने ज्या ठिकाणी अशी कुटुंब आहेत त्यांची सुरक्षा मुलांचे शिक्षण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे अशा कामगारांना मनांत भिती न बाळगता काम करता येईल. कामाचा मोबदला बरोबर मिळेल  कोणीही यांच्या कामांचा मोबदला बुडविणार नाही. यामुळे अशा परगावाहून परराज्यातून आलेल्या कामगारांना सामाजिक मानसिक आर्थिक शैक्षणिक बळ देण्यासाठी आपला मोठा वाटा असणार आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अस्मिता

 

अस्मिता. 

            आपला आणि आपल्या गावांची. परिवार. कुटुंब. मित्र. व आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राहणारे नागरिक यांचें शैक्षणिक आर्थिक सामाजिक मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी सकारात्मक करण्यात येणारे कार्य म्हणजे अस्मिता. आपला अभिमान स्वाभिमान. आपली जातीबद्दल. धर्माबद्दल निष्ठा ही आपली अस्मिता आहे.  

                 आज आपल्या अस्मितेला आघात पोहचविण्याचे प्रयत्न चारी बाजूंनी होत आहेत. आज प्रत्येक माणसाच्या डोक्यात राजकारणी यांच्याबद्दल राग आहे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये होणार या समाजासाठी. जातीसाठी. व्यक्तिसाठी. तरुण पिढी. महिला. यांच्याबद्दल आज आपण आपल्या आई बहीण सुरक्षित नाही. याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपण आपल बहुमताने निवडून दिलेले उमेदवार. कारणीभूत आहोत. निवडणूक येई पर्यंत पाया पडणारे एक वेळ येते त्यावेळी गावाच्या एखाद्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी तोंडावर बोट ठेवून गप्प बसतात त्यावेळी आपणांस कळतं की आपलं बहुमोल मत पाण्यात गेल आणि चोर आपल्या उरावर नाचायला लागलें आत्ता आपल्याला लाज वाटते की. वाटीभर मटन. 500/1000 रूपये घेवून आपली अस्मिता विकताना आपणास काहीच वाटलं नाही मग आत्ता का बोंबलताय.  

              गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आदर नाही जगण्याचे साधन नाही खाण्याला पिण्याला काही नाही विद्या प्राप्त करण्याचे साधन नाही अशा ठिकाणी राहून काही उपयोगी नाही. अशा ठिकाणी राहिलें तर कुणीही मनुष्य प्रगती करु शकत नाही आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याच्या हक्क नाही. राजकारणी सत्ताधारी यांच्या निर्णयाचा विरोध करण्याचा अधिकार नाही. मग गावातील विकास असो. गावातील वंचित घटकांवर होते होणारा अन्याय असो. गावातील स्वागत कमानी. नामफलक. गावच्या नावांचा हजारों वर्षांच्या इतिहास मोडून एकादा घेतला जाणारा निर्णय यांवर होणारी सत्ताधारी राजकीय आंदोलने आपल्या मनात नसताना सुद्धा केवळ राजकीय दहशतवाद. गुंडगिरी. दबाव. यामुळे नाईलाजा सत्व जनता सहभागी होते. यावेळी आपणांस बोलण्याचा. विरोधात आवाज उठविण्याचा. अधिकार नाही त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मतदानाला घेतलेले पैसे आणि वाटीभर मटन. हे जबाबदार आहे. कमानीवर नेते पुढारी यांची नांवे. गल्ली उपनगर येथे सुध्दा नेते पुढारी आमदार खासदार मंत्री सत्ताधारी यांचीच नावे. शहराला असणारा हजारों वर्षांचा इतिहास. देवी देवतांची गावासी असणारे नाते. त्या त्या शहरांत असणारे क्रांतिकारक समाजसेवक. आंदोलन कर्ते. स्वातंत्र्य सैनिक. अशी नाव असणारी गावे सर्व समाजाची. जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्या गावाच्या. गल्लीचे उपनगर यातील नाव या़ची कधीचं अडचण वाटतं नाही ही अडचण. नाव सुध्दा आपणांस नाही निवडणूक आली की सत्ताधारी लोक आपल्या सत्तेच्या जोरावर गावातील पुतळे. मंदिर. समाजसेवक याचा वारसा. गावांची अस्मिता पुसण्याचे महापाप करतात. असे स्थान सोडून जाणे. त्या राजकारणी यांचा बहिष्कार करणे योग्य आहे. जिथे श्रीमंत लोक. वेदपाठी ब्राम्हण. चांगला दयाळू राजा म्हणजे. सरपंच उपसरपंच नगरसेवक. हा राजकारणी असेल फक्त राजकारण पाहत असेल अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही. गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये. नोकरी नाही. व्यवसाय नाही. सुरक्षितता नाही. स्वातंत्र्य नाही. बोलण्याचा अधिकार नाही. आपल मत उघडपणे व्यक्त करु शकत नाही. राहण्यास योग्य जागा नाही. वैद्यकीय सेवा नाही. अशा ठिकाणी राहून कोणाचाही कसलाही विकास होणार नाही म्हणून पक्षा प्रमाणे आपणास मुक्त चारा पाणी निवारा असेल मुक्तसंचार करण्याचे स्वातंत्र्य असेल अशा ठिकाणी पक्षी सुध्दा राहणे पसंत करतात म्हणजे देवाने सर्वात बुद्धिमान मानव तयार केला पण तो आज परिस्थितीचा व राजकीय लोकांचा गुलाम झाला. त्यांच्या विचाराला सुरूंग लागला. अशा ठिकाणी गावात राहणे व्यर्थ आहे. आपल्या गावातील प्रशासन राजकारण नगरसेवक सरपंच उपसरपंच अशा विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत जनता मित्र म्हणून तिथे जीवे मारण्याची भिती नाही. गुंडगिरी नाही. दहशतवाद नाही. लाज. चातुर्य त्याग अशा सवयी आवश्यक असतील यांच्यासोबत मैत्री करणे फायदेशीर राहणार आहे मग तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जाती जमाती आहे यापेक्षा समाज धर्म यांसाठी त्याची कर्तव्य काय आहेत. त्यांचे कामकाज काय आहे. हे आपण कधीच बघत नाही आपण सत्तेवर कोण आहे. आत्ता निवडणूक कोण येणार. असा विचार करणारे गाव तालुका जिल्हा राज्य देश हे गुलामांचा अड्डा होणार आहे. कारण आज आपणं यांच्या म्हणण्यानुसार ऐकलं वागलो तर उद्या रस्त्यावर फिरायला सुध्दा परवानगी घ्यावी लागेल. आपल कुटुंब कुटुंबातील महिला मुली मुल. सुरक्षित राहणार नाहीत. नोकरी नाही व्यवसाय नाही शिक्षण नाही यामुळे सर्वसामान्य. गोरगरीब घरातील मुल पोलिस कोठडीत दिसणारं त्यावेळी एकाही नेत्यांच्या मुलांवर आंदोलन मोर्चा यांचा गुन्हा नसणार आहे कारणं यावेळी त्यांनी मटन दारु पाजून पोसलेली गोरगरीब घरातील मुल तुरूंगात सजा काटताना दिसतील किती वाईट वेळ असेल त्या आई वडील यांच्यावर याला कारणीभूत आहोत आपणच कारण अन्याय करणार्या पेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. म्हणून आजच विरोधात भांडा नाहितर उद्या आपण असणार पण आपली पिढी धोक्यात असणार आहे म्हणूनच अन्यायाचा विरोध करा. 

      आपण आजच आपल्या कार्याला सुरुवात करा मग ते काम लहान किंवा मोठे नाही अन्याय करणारा कोणत्या पक्षाच्या आहे. सत्ताधारी आहे विरोधी आहे. त्यांच्या विरोधात आपण केलेल्या कष्टात कुठेही कमी यायला नको. त्याचा विरोध पूर्ण ताकदीनिशी करायला हवा. विजय कोणाचा झाला. यापेक्षा माझ्याबरोबर किती आहेत त्यांपेक्षा माझ्या माग कोण आहे याकडे लक्ष दिले तर विजय निश्चित होणार. खूप सज्जन होऊन जगता येत नाही. सरळ माणसाला कुणीही दाबतो. त्यांच्या सजजनतेला लोक वेडेपण म्हणतात. त्याची सहनशीलता. सामंजश याला लोक वेडेपण म्हणतात. म्हणून आपणं जंगलात गेलो की सरळ बघूनच झाड तोडतो. वाकडी झाड याकडे आपणं बघत सुध्दा नाही. म्हणून माणसाने एवढ सरळ राहू नये कि कुणीतरी आपला जीव. मालमत्ता. अस्मिता. कुणीतरी लुटून जाईल हंस हा पक्षी तिथेच राहतो जिथे त्यांना पाणी मिळत सरोवर आटले तर ते जागा बदलतात जस आज आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी राजकीय सामाजिक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री जागा बदलतात पण प्राण्याने हंसासारखे होऊ नये की फक्त स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी वारंवार पक्ष विचार बदलू नये. शक्तिशाली शत्रू पेक्षा कमजोर मित्र अधिक घातक असतो. कारणं राजकारणी लोकांप्रमाणे कमजोर मित्र विश्वास घात करू शकतो. कारणं शत्रूपासून आपण सावध असतो पण आपण निवडून दिलेले आपल्या सोबत असणारे यांवर आपण पूर्ण विश्वास करून असतो. कारणं राजकारणी लोकात असाल तर तुमचा व समाजांचा घात निश्चित मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. वाफ सावली यामुळे यांवर हिरवळ असते पण ताकद उममेद नसते. यांसाठी सर्वसामान्य माणसाने आपल्या मन आपला गुरु समजून काम व कार्य करावे त्याला कधीही निराशा मिळणारं नाही. मनात विचार उघड करू नका दडवायला शिका. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

तुझं आहे तुझं पाशी. पण तु जाग चुकलाशी

 

तुझं आहे तुझं पाशी. पण तु जाग चुकलाशी 

          भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे. धर्म. संस्कृती. जाती भाषा. इत्यादी घटकांवर आधारलेले आहे. अनेक राजकीय दबाव गट निर्माण झालेले आहेत. यातील काही दबावगटाचे रुपांतर कालांतराने राजकीय पक्षांत झालेले आहे. द्रविड मुननेत्र. कळघम. अकाली दल. मुस्लिम लीग. महासभा यांचा विचार या संदर्भात आपण याचा अनुभव घेतला आहे. 

              भारतातील खिरचन.  धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण. २.६/टक्के आहे. या संख्येच्या या मर्यादेमुळे बहुतांशी खिरचन धर्मिय आपले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करतात तरि देखील ते तुलनेने अधिक सुसंघटित आहेत. १९७९ मध्ये. श्री ओ पी त्यागी या जनता संसद सदस्याने एक विधेयक मांडले. धर्मांतर बंदी घालण्यात आली. 

                 भारतात मुस्लिम प्रमाण  ११.२१/ टक्के अंदाजे सांगितलं जातं. लोकसंख्येचे हे प्रमाण राजकारण दृष्टीने दुर्लक्ष करण्याजोगे नाही. भारताची फाळणी झाल्यानंतर या मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.  दारिद्र्य. अडाणी. स्थायी व्यवसाय नाही.  राहण्याचा स्थायी निवारा नाही.  आणि मुस्लिम धर्मगुरू. मुल्ला मौलवी यांचा. मुस्लिम एक गठ्ठा मतदानासाठी. असणारा मुस्लिम बांधवांच्या वर असणारा प्रभाव. यामुळे अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेचे रुपांतर आक्रमक झाले पण स्थायी  समाजांचे हित. विकास. सांगणारा कोणताही पक्ष नेता पुढारी आमदार खासदार किंवा समाजाची सुध्दा एकी झाली नाही याचा सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे राजकारणी लोकांना. यांतच मुस्लिम काही संघटना दबावासारखे कार्य करीत आहेत. जमात ए इस्लामी ( हिंद ) ही संघटना १९४८ मध्ये स्थापन झाली. भारतभर या संघटनेच्या ४३६ हून अधिक शाखा आहेत. या संघटनेने अनेक शैक्षणिक. विकास योजना. मंडळ निर्मिती करण्यासाठी उठाव. व इतर प्रकारच्या संस्था चालविल्या आहेत मजलिस ए मुस्लिम संघटनांचा एक महासंघ आहे. त्याची स्थापना डॉ स ईद. महमूद यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये झाली. या महासंघातर्फे इंडियन युनियन मुस्लिम लीग जमाईत उल उलमे हिंद. जमात इ इस्लाम तमीर इ मिललत.  इततेहाद उल मुसलयीन.  आदी संघटनांचा समावेश आहे. जातीय दंगलीमुळे मुस्लिमांची होणारी हाणी टाळण्याचा प्रमुख हेतूने हा महासंघ स्थापन करण्यात आला. यातील काही संघटना आत्ता राजकारणी यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत त्यामुळे समाजात फुट पाडणे इतर सत्ताधारी यांना सहज शक्य झाले आहे. 

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान घटना लिहिताना सर्वांना समान आरक्षण द्यावे काय असा मुद्दा मांडला होता त्यावेळी असणारे विविध पक्षाचे नेते यांनी नकार दिला. आज आपण हिंदु आरक्षण मुद्दा असो. तो सुद्धा गरजेचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले.  डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज.  छत्रपती शिवाजी महाराज. यांनी आपल्या भारतीय जातीव्यवस्थक समाजांचे ब्राह्मणविरोधी ब्राम्हणेतर असे धृवीकरण केले. यातून त्यांची नावे. वर्गीकरण केले शेटजी _ भटजी _ लाटजी यांच्याविरोधात शूद्रा अतिशूद्र यांची समाजातील वंचित घटकांची आघाडी उभारली. शेटजी _ भटजी _ लाटजी. या शत्रू आघाडिचे नेतृत्व ब्राम्हण करीत असल्याने ते मुख्य शत्रू सिध्द झाले. सर्व समाजातील समाजसेवक यांनी उभारलेल्या शूद्र अतिशूद्र आघाडीत फूट पाडण्याची तेव्हा पासूनच चालू आहे समाज एकत्र नाही आला पाहिजे एकी नाही.  एक विचार नाही. एक मत नाही. हे नेहमी तंत्र ब्राम्हणांनी वापरले शूद्रादि अतिशूद्र आघाडीतून त्यांनी काही जातीचे नसलेले क्षत्रियत्व जागे केले. त्यांना राज्याच्या स्टेट स्तरावर राज्यसत्ता देऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या आघाडीत फूट पाडली.  ब्राम्हणी छावणीत अशाप्रकारे वेगवेगळ्या राज्यात राजपूत.  मराठा. जाट. ठाकूर. वगैरे.  अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय जमाती सारख्या जाती आपल्या छावणीत पुन्हा क्षत्रिय म्हणून सामिल करून घेतल्या हे ब्राम्हणी धृवीकरण प्रतिक्रांतीसाठी  सज्ज होत असताना बाबासाहेब आंबेडकर प्रवेश जातयंतक लोकशाही क्रांतीच्या अब्राहणी छावणीत होतो.  त्यांनी ब्राम्हणी छावणीच्या प्रतिक्रांतीकारक धोरणाला शह देण्यासाठी पुन्हा वर्गीकरण केले.  #*. राज्यघटनेतील. ३४०/३४१/ व ३४२  #* ‌ या कलमाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की. ओबीसी.  एस सी.  एस टी.  हे व्यवहारिक वर्गीकरण आहे. त्याला क्रांतीचा व्यवहार बनविण्यासाठी त्यांनी नवे धोरण सांगितले.  # ब्राम्हण. + क्षत्रिय + बनिया. # विरूद्ध ओबीसी + एस सी + एस टी हे व्यवहारीक वर्गीकरण आहे. लोकशाही नवे समिकरण त्यांनी मांडले मंडल आयोगाच्या अल्पशा अंमलबजावणी जी काही थोडीफार जागृती निर्माण झाली त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जातयंक क्रांतीचे सूत्र यशस्वी होत आहे. 

          डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने राज्यघटनेत ओबीसी+ एस सी + एस टी साठी ३४०/३४१/३४२ ही तीन कलमे आलीत मात्र घटना अमलात येतांच एक वर्षाच्या आतच ही तिन्ही आरक्षणाची कलम रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला व तो अंमलात आणण्याची तयारी सरकारने लगेच केली आणि राजकारणी तेढामुळे एका निकालाने फटक्यात आपले आरक्षण रद्द झाले हे कोणीच आपणांस सांगितले नाही आपण संविधान वाचले नाही.  

        आज सर्वात अडचणीत असणारा वंचित घटक आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. निरक्षरता शैक्षणिक अभाव यामुळे आमचा समाज मागास आहे. विविध समाजासाठी असणारी विविध विकास महामंडळ  मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यामध्ये कर्मचारी आभाव. निधी अभाव म्हणजे कायम दुष्काळ. त्यामुळे आमच्या समाजातील मुल मुली अठरा विश्व दारिद्र्य यामुळे आर्थिक चणचण यामुळे शिक्षण नाही त्यामुळे नोकरी नाही. मग काय आमचा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणी वर चालणारा. सध्याची परिस्थिती ध्यानात घेता सवताची चूल बंद करून दुसर्याची चूल चालती करणारा.  दान धर्म भुकेलेल्या व्यक्तिची भूक जाणणारा.  मुस्लिम समाज आज आर्थिक सामाजिक स्तरावर मागास आहे.  आर्थिक मागास असल्यामुळे शिक्षण नाही त्यामुळे आज सर्वसाधारण विचार केला तर कोठेही. तहसिलदार. प्रांत गवर्नर. गटविकास अधिकारी. जिल्हाधिकारी. क्लास वन अधिकारी. पोलिस निरीक्षक. पोलिस पी आय.  कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात आमचें गोल टोपी घालून अधिकारी मी तर बघितला नाही.  मुस्लिम आत्मसन्मान आहे त्यामुळे कोणापुढे हात पसरणार नाही. मग काय. चिकन दुकान.  भंगार व्यवसाय.  गाडी व्यवहार.  वडापाव गाडी.  गंवडी कामगार. बाधकाम व्यवसाय. असा विविध व्यवसाय करून आज मुस्लिम समाज आपली व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करत आहे. कशामुळे आपणांस सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजाला ५/ टक्के आरक्षण जाहीर केले तदकालिन सरकारने अंमलबजावणी केली नाही सत्ताधारी व विरोधी पक्षाने संसदेत मोकळा दंगा केला राजकीय भांडवल केल मुस्लिम आरक्षणाचे 

              मुस्लिम अशा अन्य   वंचित मागास  अल्पसंख्याक जाती आज आपल्या अवतीभवती आहेत.  पण यातील कोणत्याही जातींचा व्यक्ती कोणत्याही समाजांचा व्यक्ती आपणांस काम करून घेणे. त्यांना आपल्या इशारयावर नाचविणे एवढेंच राजकीय पक्ष यांनी केले आहे. बघा. नगरसेवक. नगराध्यक्ष. सरपंच उपसरपंच सदस्य. आमदार खासदार मंत्री पुढारी मुस्लिम चालतं नाही. अल्पसंख्याक नेता आहे तो तरी भारतीय आहे का? ‌ त्याला काय सुतक मुस्लिम समाज मेला काय आणि जगला काय ? हा मुद्दा लांबचा आहे आज आपल्या गावात तालुका जिल्हा राजकारणी यांनी समाजात फूट पाडली आणि  हिंदू मुस्लिम दंगली जातीय दंगली घडविल्या. तरी सुध्दा आपणं यांच्याच नावानं उद उद करतो म्हणजे आपणांस लाज नाही. 

             आमच आम्हाला द्या तुमच नको आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे त्यासाठी  शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.  आपल्या हक्कासाठी एकत्र या झेंडा पक्ष कोण आहे यापेक्षा त्यांची मागणी आपल्या हिताची आहे का ? मतदानापुरते येणारे आरक्षण देतो पण आम्ही आत्ता सत्तेवर नाही सत्ता द्या आरक्षण देतो महणारे. तुम्हाला गुलामच करून ठेवणारं आत्ता नाही तर कधीच नाही. 

                समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बुद्धिचा व्यापार

 


बुध्दिचा व्यापार. 

               आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये. बुद्धिवादी लोक आपणांस पाहावयास मिळतात. काही जण वैधानिक.  तंत्रज्ञान.  शैक्षणिक.  सामाजिक.  आर्थिक तज्ञ.  वैचारिक मंथन.   लोकशाही अभ्यासक.  कायदे पंडित.  मानस उपचार तज्ञ.   मानोस उपचार तज्ञ.खेळाडू.     असे विविध क्षेत्रात अभ्यासक लोक आपल्या  देशांची शान वाढवितात.  पण आज उलट झाल आहे. आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील. उच्च शिक्षण घेऊन. बाहेर पडणारे बुद्धिजीवी वर्ग. आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास. राज्य देश यांची. चारि बाजूने उन्नती विकास करण्यासाठी आपली बुध्दी वापरत नाहीत.  आपल्याला उच्च आर्थिक किंमतीवर आपले व आपल्या देशांचे नाव उच्च स्तरावर जाईल यासाठी. आपली बुध्दी चिकाटी आपल्यातच वापरली पाहिजे. या विचारांकडे पाट फिरविली आहे आणि कोण आपल्या बुध्दिचे उच्च दाम लाविल तिकडेच असे. बुद्धिवंत जातात आणि आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश यांचे आपण नागरिक आहोत. देशासाठी काहीतरी करणे. आपलं परम कर्तव्य आहे हे आपण विसरतो आणि. फक्त दे पैशासाठी आपली बुध्दी विकतात. मग यांना भारतीय नागरिक म्हणायचे का ? विचार करा. आपल्या देशात सर्व वस्तू तयार करणार्या कंपन्या आहेत.  तशी आर्थिक स्थिती आपल्या देशाची आहे आपणच आपल्या बुध्दीचा वापर करून. आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल पाहिजे 

              बुध्दिवंताचे स्थलांतर ही एक भयानक आणि जटिल समस्या आहे. यामुळे बुद्धिवंताचे आगमन निर्गम यामुळे देशात जिल्ह्यात तालुक्यात गावात चांगलें वाईट परिणाम होतात. स्थलांतर करणारे तरुण व बुद्धिवंत भरणा आज जास्त आहे.   

* बुद्धिवहन. निर्गमन क्षेत्रात बुधदिवंताचे स्थलांतर मुळे जी उणीव निर्माण होते ती आपणास सर्वांना विचार करायला लावते. यालाच बुद्धिवहन असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही

* बुध्दी अतिरिक्ता. देशातील लोकसंख्येत आवश्यकते पेक्षा जास्त तंत्रज्ञान व उच्च विद्या विभूषित. लोक असतांत व स्थानिक अर्थ व्यवस्थेतही बुद्धिवान लोकसंख्या केव्हाही उपलब्ध होते त्या स्थितीला बुध्दी अतिरकता. अस म्हणता येईल जपान संयुक्त संस्थाने. जर्मनी या देशांत बुध्दी अतिरिकता मोठ्या प्रमाणात आहे

* बुध्दी आदान प्रदान दोन राष्ट्रांत बुद्धिवान लोकांची स्थलांतर प्रक्रिये द्वारे आदला बदल होत असल्यास त्याला बुध्दी आदान प्रदान असं म्हणता येईल. यामुळे राष्ट्राचा आर्थिक.  सामाजिक. सांस्कृतिक व शैक्षणिक. विकासाला चालना मिळते या प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशांना पारसपारिक. प्रबोधनचा व वैधानिक संक्रमणाचा लाभ मिळतो 

* बुध्दी निर्यात.  व्यवसायिक दृष्टीकोन एका देशातील बुद्धिवान लोकांना दुसर्या लोकांना देशात नियमित पाठविलें जाते. कुशल श्रमिक किंवा तंत्रज्ञान. नियमित आर्थिक करारावर पुरवठा करणे म्हणजे बुध्दी निर्यात होय. अविकासित. व काही प्रमाणात विकसनशील राष्ट्रे अशी बुध्दी निर्यात करून परकिय चलन मिळते. 

         बुधदिवंता चे स्थलांतराचे भिषण परिणाम होतात. बुधदिवंताचे स्थलांतर निर्गमन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतात गरिब व विकसनशील अविकासित देशांना मोठा फटका बसलेला आपणांस दिसतो.  गरिब व अविकासित देश उच्च शिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो.  तंत्रज्ञान. शास्त्रज्ञ.  अभियंते. वैद्यकीय व्यवसायिक यांच्या शिक्षणावर देशांची गरज म्हणून मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परंतु पदवी मिळालेनंतर हे तंत्रज्ञ व इतर उच्चविद्याविभूषित लोक मोठ्या पगाराच्या व चांगल्या सेवा सुविधांच्या अभिलाषेने श्रीमंत विकसित देशाकडे धाव घेतात आणि आपला देश विसरून जातात  व्यक्तिगत पातळीवर त्यांचा निर्णय योग्यही आहे परंतु  ज्या समाजाने/ शासनाने त्यांच्या शिक्षणावर प्रचंड पैसा खर्च केलेला असतो तो सर्व पाण्यात जातो आणि पदरि पडती ती निराशा. समाजाची शासनाची. बुध्दीवंत यांचेकडून राष्ट्राची उन्नती सेवा घडावी ही अपेक्षा असते परंतु कित्येक तंत्रज्ञ व बुद्धिवंत स्वताच्या स्वार्थापोटी विकसित देशांत आपली बुध्दी विकतात आणि मोठा आर्थिक लाभ मिळतात.  भारता सारख्या विकसनशील देशातून विकसित देशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. या स्थलांतरामुळे जी बुध्दिची उणीव निर्माण होते तिला बुध्दी वहन असं म्हणलं जातं. बुध्दी वहना मुळे. विकसनशील व अविकासित देशांचा आर्थिक विकासाचा वेग मंदावतो.  

आगमन क्षेत्रातील परिणाम. श्रीमंत विकसित देशात तरुण प्रतिभा संपन्न लोकांची भर पडते. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंताचा चांगलाच लाभ होतो. इंग्लंड व अमेरिका. वैद्यकीय क्षेत्रात भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांचा भरणा जास्त असतो. विकसित देशांना तंत्रज्ञ बुद्धिवंत सहज उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक विकास ची. गती अधिक वेगवान जगात बुद्धिवहन समस्या आपल्याला दुसर्या महायुध्दाच्या वेळी प्रकर्षाने जाणवू लागली आहे 

* स्थलांतराचे परिणाम.  स्थलांतराचे परिणाम निर्गमन क्षेत्रात तसेच आगमन क्षेत्रातही दिसून येतात स्थलांतरामुळे स्थलांतरित व्यक्ती नवीन पर्यावरणात व संस्कृतीत वावरते यातूनच पुढे सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन सांस्कृतिक विकास होतो.  निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्रात अधिक चांगलें परिणाम दिसून येतात कारण आगमन क्षेत्रात कार्यक्षम व बुद्धिवंत लोकांची भर पडते.   बुध्दीवंत स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रातील तसेच निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येच्या. आकारावर रचनेवर परिणाम होतो.  लोकसंख्या व प्रदेशातील साधनसंपत्ती पुनसथानांकन.  किंवा संतुलन होण्यास मदत होते.  स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येत घटते तर. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या वाढते.  लोकसंख्येच्या आकारावर म्हणजे एकूण लोकसंख्या व तिची घनता. तिची वाढ बदलते. तसेच जनन. मृतयुता. वयोरचना.  लिंगरचना. व साक्षरता. यात संख्यात्मक बदल होताना आपणास दिसतात.  निर्गमन क्षेत्रात बालके.  महिला. व वृद्धांचे प्रमाण वाढते.  निर्गमन क्षेत्रात बुध्दी वहन.  समस्या निर्माण होते. याउलट आगमन क्षेत्रात बुद्धिवंताची व कार्यक्षम लोकसंख्येची भर पडते.  आर्थिक विकासाला. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या पोषक असते. 

* आर्थिक परिणाम. आगमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्यास त्या प्रदेशातील मानव साधनसंपत्ती गुणोत्तर बदलते साधनसंपत्ती यावरील ताण वाढतो.  आर्थिक विकास व नियोजन यांवर वाईट घातक परिणाम होतो.  मुळातच नयुन लोकसंख्या असलेल्या प्रदेशात स्थलांतर घडून आल्यास ते आर्थिक विकासाला पोषक ठरते साधनसंपत्ती विकास होतो.  मात्र अनियोजित व अनिर्बंध स्थलांतर घडून आल्यास प्राथमिक गरजांची पूर्तता नीट होत नाही. नागरि जीवनाच्या अनेक समस्या उद्भवतात.  आगमन क्षेत्रात लोकसंख्या वाढल्याने नियोजनाचा आराखडा बदलावा लागतो.  आरोग्य.  शिक्षण.  पाणी.  वीज.  वाहतूक.  व संदेशवहन. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.  याचा नियोजन आराखडा व उचित अवलंब झाला नाही तर विशेषत नागरि केंद्रात सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्न घातक होतो.  शहरांची निकोप वाढ होत नाही. गलिच्छ वस्त्या.  प्रदुषण. सार्वजनिक आरोग्य. यांसारखे ज्वलंत प्रश्न निर्माण होतात.  निर्गमन क्षेत्रात कार्यक्षम लोकसंख्या घटते.  परावलंबीतांचे प्रमाण वाढते.  आर्थिक उत्पन्न घटते.  

* सामाजिक परिणाम. स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील सामाजिक भिननतेवर परिणाम होतो.  जाती रचना. समाजपधदती.  विवाहप्रणाली. शिक्षण. चालीरीती या सामाजिक अंगामध्ये विविधता निर्माण होतो. सामाजिक व्हायला वेळ लागतो.  आगमन क्षेत्रात अल्पसंख्यांकांचे प्रमाण वाढून प्रसंगी सामाजिक ताणतणाव निर्माण होतात.  सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.  आगमन क्षेत्रात काही अनुकूल बदलही दिसून येतो.  आगमन क्षेत्रात आचार विचार. आदान प्रदान होते.  नवीन जीवनपद्धती संस्कृती निर्माण होते.  स्थलांतरित लोक नवीन पर्यावरणाशी व संस्कृतीशी मिळते जुळते घेतात तशी त्यांना सवय लागते.  ते अधिक सहनशीलता बनतात.  आगमन क्षेत्रात बुद्धवंताची भर पडल्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळतो. आर्थिक विकास होतो. आंतरजातीय विवाह.  विचारमंथन.  समायोजन. उच्च शिक्षण.  यामुळे समाजाला बुद्धिवंत लोकांचा फायदा होतो.    निर्गमन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढल्याने त्या परिस्थितीत जन्य.  आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनू लागतात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने त्या स्वावलंबी होऊ लागतात.  व्यवसायात संस्था पतसंस्था. पतपेढी.  संघटना.  विक्री संस्था.  लघु उद्योग.   शिक्षण यामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.  मात्र निर्गमन क्षेत्रातील साधनसंपत्ती पुरेपूर विकास होत नाही.  

      अंतर्गत स्थलांतरामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते.  विभिन्न चालिरिती. रुढी परंपरा.  नीतिमूल्ये.  धार्मिक विचार प्रणाली.  सण.  उत्सव.  यांची पारंपारिक ओळख संस्कृती संवर्धन यास वाव मिळतो.   काही वेळेस संस्कृती नीट न झाल्याने अल्पसंख्याक. बहुसंख्यांक. गटबाजी.  भाषावाद.  प्रांतवाद. जातीय संवर्धन.  जातीय संप्रदाय.  निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते.  सांस्कृतिक अवमूल्यन वाढू लागते ज्ञ भारतात व जगातील काही राष्ट्रात. अंतर्गत स्थलांतरामुळे. जातीयवाद. भाषावाद. प्रांतवाद. सांस्कृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

                 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या