जगण्यासाठी संघर्ष
जी वस्तू आपल्याजवळ नाही पण ती आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी आहे अशी वस्तू शोधने किंवा पदरांत पाडून घेण्यासाठी आपणास करावे लागणारे अटोकाट प्रयत्न म्हणजे # वणवण # आपणास बरेच काही ज्ञान देतो हा शब्द आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे पूर्ण झाली असताना सुध्दा बर्याच गोष्टी साठी आपणास गोरगरीब जनतेला महिला. मुल यांना अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे. प्रत्येक जीवनावश्यक गोष्टी साठी वस्तू साठी वणवण करावी लागते
गरिबी सर्वात मोठा शाप आहे आपल्याला आणि ही वेळ आपल्यावर आणणारे आपलेच नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे आहेत कारणं नोकर भरती नाही. नवीन नवीन विदेशी कंपन्या यामध्ये परराज्यातून येणारे कामगार. आर्थिक विकास महामंडळ बोगस कामकाज. गरज आहे त्याला एक रूपया मदत नाही. आणि नेते यांचे बगलबच्चे यांना विना अट कर्ज यामुळे भयानक प्रमाणात निर्माण होणारी बेरोजगारी. यातून व्यसनी तरूण त्यातूनच खून मारामाऱ्या अपहरण बलात्कार खंडणी. बेकायदा व्यवसाय. यांना उत येते आणि निर्माण होणारी पिढी गुन्हेगार पैदा होतात त्यामुळे त्यांच्या पालकांना आई वडील नातेवाईक यांना पोटासाठी आपले गाव सोडून दुसर्याच्या गावात वणवण करत फिरावे लागते.
ज्या ठिकाणी चारा नाही. पिण्यास पाणी नाही. निवारा नाही. जगण्याचे साधन नाही. ज्या झाडांना फळे फुले लागत नाहीत अशा ठिकाणी पक्षी सुध्दा राहत नाहीत. अशी जागा पक्षी लवकरात लवकर सोडतात म्हणजे पोटासाठी वणवण पक्षांना सुध्दा करावी लागते
रोजगार. व्यवसाय. शिक्षण. विवाह. जन्मानंतर. कुटुंबासह. व इतर कारणांनी आपल्या भारतातील जनतेला गोरगरीब लोकांची एकूण पोटासाठी स्थलांतर करणार्या लोकांची अंदाजे संख्या ४.१७ लाख आहे. यापैकी ग्रामीण भागातून २२४.५ लाख आणि नागरी भागातून १९२.६५ लाख असे एक अंदाजे समिकरण करण्यात आले आहे यापेक्षा स्थलांतरित लोकांचा आकडा जास्त असणार आहे यामध्ये एकूण पोटासाठी वणवण करण्यात पुरुष संख्या १६७.६५ लाख एवढी आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष संख्या ६८.२२ लाख एवढी आहे. आणि महिलांची संख्या २४९.५२ लाख एवढी आहे. नागरि भागातून स्थलांतर करणारे पुरुष संख्या ९९.४२ लाख आहे यामध्ये महिलांची संख्या ९३.२३ लाख एवढी आहे. महाराष्ट्रात टक्केवारी नुसार पोटासाठी वणवण करण्याची अनेक कारणें आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विवाहामुळे होणारे स्थलांतर. सर्वात जास्त आहे यांची टक्केवारी ३५.६४ आहे. या खालोखाल कुटुंबासह पोटासाठी स्थलांतर करणारेही टक्केवारी १७.२३ # रोजगार १६.५५ # इतर कारणांमुळे होणारे स्थलांतर. १६.४२ # जन्मानंतर स्थलांतर १२.२५ # शिक्षणासाठी स्थलांतर १.४५ # व्यवसायामुळे स्थलांतर नगण्य आहे कारणं व्यवसाय हा आपण जिथे राहतो तिथे केला जातो पण तो स्थायी असेल का ? यांवर बरेच अवलंबून आहे.
*. रोजगारामुळे होणारे स्थलांतर. २००१ आकडेवारी नुसार महाराष्ट्रात रोजगारामुळे ६९.०५ लाख एवढे आहे. यापैकी पुरुष संख्या ६२.३२ लाख आहे. महिलांची संख्या बरीच कमी आहे फक्त ६.७३ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुष संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष संख्या ५५ लाखांनी जास्त आहे. रोजगारासाठी पुरुष एकटेच बाहेर पडतात. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे १७.९० लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १४.१३ लाख आणि महिलांची संख्या जेमतेम ३.७७ लाख आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष यांची संख्या सुमारे १० लाख जास्त आहे शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष एकूण. ५१.१५ लाख आहे. लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले आहे. यापैकी पुरुष संख्या ४८.२० लाख आहे महिलांची संख्या फक्त २.९६ लाख आहे.
* व्यवसायामुळे होणारी वणवण महाराष्ट्रात व्यवसायामुळे १.९३ लाख लोकांनी स्थलांतर केले यापैकी पुरुषांची संख्या १.६७ लाख आहे. तर महिलांची संख्या फक्त २५.००० हजार आहे. रोजगाराप्रमाणेच व्यवसायासाठी प्रामुख्याने पुरुष आपले पूर्वीचे ठिकाण सोडतात आणि यामध्ये महिलांची संख्या पुरुषांची संख्या १.४२ लाख आहे. व्यवसायासाठी ग्रामीण भागातून व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात ३८.००० हजार लोकांनी पोटासाठी वणवण केली. यापैकी पुरुषांची संख्या २६.००० तर महिलांची संख्या १२.००० आहे शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २.९३ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १.४१ लाख आहे तर महिलांची संख्या फक्त १३.००० हजार आहे
* शिक्षणामुळे वणवण. महाराष्ट्रात शिक्षणामुळे स्थलांतर करणारे यांची संख्या ६.०४ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या ४.४१ लाख आहे. आणि मुलींची संख्या फक्त १.६३ लाख आहे शिक्षणासाठी स्थलांतर करणार्या मुलांपेक्षा मुलींची संख्या सुमारे २.९ लाख आहे. याचप्रमाणे मुलींचाही शिक्षणासाठी स्थलांतराचा कल जास्त असत नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शिक्षणामुळे स्थलांतर केलेल्यांची एकूण संख्या २.१२ लाख आहे. असून मुलींची संख्या १.४८ लाख आहे. तर मुलांची संख्या ६४.००० हजार आहे. मुलींपेक्षा मुलांची संख्या २.३ पट आहे महाराष्ट्रात शहरि भागातून शिक्षणासाठी स्थलांतर करणार्यांची एकूण संख्या ३.९२ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या २.९३ लाख आहे आणि मुलींची संख्या फक्त ९०.००० हजार आहे. मुलींपेक्षा मुलांची संख्या तीनपट जास्त आहे म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून मुलींचे शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाण जास्त आहे
* विवाहामुळे स्थलांतर महाराष्ट्रात विवाहामुळे होणारे स्थलांतर १४८.६८ लाख एवढे विक्रमी आहे. त्याची टक्केवारी ३५.६४ लाख आहे यापैकी सथलातरिताची संख्या १४७.५४ लाख तर पुरुष संख्या फक्त १.१४ लाख आहे व ती नगण्य आहे. महिलांचे विवाहामुळे होणारे स्थलांतर महाराष्ट्रात व जिल्हा व जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात आहे. याचप्रमाणे आंतरजातीय स्तरावर विवाहामुळे स्थलांतर होऊन महाराष्ट्रात स्थलांतर होणार या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा १४६.४० लाख जास्त आहे महाराष्ट्रात ग्रामीण भागातून होणारें स्थलांतर एकूण संख्या १०६.९१ लाख आहे. यापैकी महिलांची संख्या १०६.११ तर पुरुष संख्या नगण्य म्हणजे फक्त ८०.००० नगण्य आहे महाराष्ट्रात शहरि भागातून विवाहामुळे होणार या स्थलांतराची एकूण संख्या ४१.७७ लाख आहे. यापैकी महिलांची संख्या ४१.४३ लाख तर पुरुषांची संख्या फक्त ३४.००० आहे. महाराष्ट्रात विवाहामुळे स्थलांतर होणार या महिलांची संख्या शहरी भागातून सुमारे ६५ लाख जास्त आहे
* जन्मानंतर होणारें स्थलांतर महाराष्ट्रात जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या ५१.०९ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या ३१ लाख आहे. आणि महिलांची संख्या २० लाख आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून जन्मानंतर स्थलांतर होणार या लोकांची एकूण संख्या ३१. लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १९.३५ लाख आहे. तर महिलांची संख्या ११.७० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या नगण्य ७.५० लाखाने जास्त आहे महाराष्ट्रात शहरि भागातून जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या २०.०४ लाख आहे. त्यातील पुरुष संख्या ११.७४ लाख आहे तर महिलांची संख्या ८.३० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ३.५० लाखाने जास्त आहे
* कुटुंबासह पोटासाठी वणवण करणारे लोक यांची एकूण संख्या ७१.८८ लाख आहे या गटाचा विवाहामुळे होणारें स्थलांतर यात खालोखाल दुसरा क्रमांक आहे. यापैकी पुरुषांची संख्या २९.७४ लाख आहे. महिला संख्या ४२.१४ लाख आहे. पुरुषांची संख्या महिलांपेक्षा १२.४० लाख कमी आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे यांची एकूण संख्या २६.०३ लाख आहे पुरुष संख्या ११.०८ लाख आहे. महिलांची संख्या १४.९६ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ३.८८ लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४५.८५ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १८.६६ लाख आहे तर महिलांची संख्या २७.१८ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सुमारे ८.५ लाखांनी जास्त आहे. महिलांची संख्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून सुमारे १२ लाखांनी जास्त आहे.
* इतर कारणानें होणारी वणवण महाराष्ट्रात इतर कारणानें होणारे स्थलांतर संख्या ६८.४८ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३७.२६ लाख आहे तर महिलाची संख्या ३१.२६ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ६ लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४०.११ लाख आहे. पुरुषांची संख्या २१ . १३ लाख आहे. महिलांची संख्या. १८.९८ आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.१५ लाख जास्त आहे. शहरि भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २८.३७ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १६.१३ लाख आहे. आणि महिलांची संख्या १२.२४ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.८९ लाख आहे
आज बांधकाम क्षेत्रातील कामगार. विटभटटी कामगार. स्टोन क्रशर कामगार. यामध्ये आपली पोटाची खळगी भरण्यासाठी येणारे पर प्रांतिय लोक यांच्याबरोबर येणार्या महिला यांना मानाची वागणूक नाही त्यांचेकडे पहाण्याचा दृष्टीकोन. वाईट असतो. आणि सर्वात मोठ विषय आहे तो म्हणजे यांची मुल शाळा नाही शिक्षण नाही यामुळे अडाणी राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने ज्या ठिकाणी अशी कुटुंब आहेत त्यांची सुरक्षा मुलांचे शिक्षण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे अशा कामगारांना मनांत भिती न बाळगता काम करता येईल. कामाचा मोबदला बरोबर मिळेल कोणीही यांच्या कामांचा मोबदला बुडविणार नाही. यामुळे अशा परगावाहून परराज्यातून आलेल्या कामगारांना सामाजिक मानसिक आर्थिक शैक्षणिक बळ देण्यासाठी आपला मोठा वाटा असणार आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९