वाट पाहत आहे?

 

# वाट पाहत आहे #

सुरक्षित अंतर ठेवा. पुढे धोकादायक वळण आहे. पुढे शाळा आहे. पुढे गाव आहे. वेग आवरा जीवन सावरा. गाडी वेगाचे संतुलन ठेवा. जीवन अनमोल आहे. आपल्यासाठी पालथ्या घड्यावर पाणी अस आहे

                   युगात पहिल्यांदा चाकांचा शोध लागला आणि मानवाच्या जीवनाला गती मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्टीची सुरुवात चाकापासून झाली.     

गतकाळात लोकसंख्या कमी होती. त्यावेळी होणारें विविध जीवनावश्यक वस्तूंचे दळणवळण. हे बैलगाडी या माध्यमातून होत होते. शेती सामान आणने नेणे. शेतातील भाजीपाला व इतर वस्तू आवक जावक करण्यासाठी बैलगाडी उपयोगात आणली जात होती. लग्नाला सुध्दा गाडीतून व्हराड नेले जात होते.आगोदर आठ दिवस निघावे लागत होते. आणि जरा आपले जीवन सुधारले. आणि सायकलीचा शोध लागला. आणि थोडी जीवनाला गती आली. लोकांना इतरत्र जाणे येणे सोयीस्कर झाले. आणि थोड्या प्रमाणात अपघात होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत होत राॅकेलवर चालणारी. जावा. एझडी. बुलेट अशा कमी बजेटच्या गाड्या तयार होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत सर्वात बुद्धिमान समजला जाणारा माणूस याने चारचाकी गाड्यांच्या शोध लावला. त्यावेळी चारचाक. इंजिन एवढ अँडव्हान्स नव्हतं त्यावेळी ताण ब्रेक होते. अशी सर्व रचना होती. गाड्या मुबलक मिळवणारे राॅकेल यांवर चालत होत्या. 

                 जुन्या काळी सिनेमांत प्रामुख्याने घोड स्वारी व तयाशी निगडित सिनेमे आपण पाहिले आहेत. त्यानंतर दोनचाकी गाड्या दिसायला लागल्या. आणि सिनेमाची गोडी वाढली. आणि आत्ता चारचाकी. अलिशान गाड्या दिसायला सुरुवात झाली. 

                    माणसाच्या रक्त वाहिन्या असतांत त्याप्रमाणे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा. विकास हा आपल्या दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो म्हणजे त्या विकासासाठी गरजेचा मुद्दा असणारा म्हणजे रस्ता. पहिल्या काळात डांबरी सिमेंट रस्ते नव्हते. मजबूत पुल नव्हती. लहान लहान पुलं होती. आज विकासाचा भकास झाला आहे. रस्ते डांबरीकरण. सिमेंटचे रस्ते. गावांसाठी जोडणारे दळणवळण सोपे करणारे रस्ते तयार झाले. रस्ते तयार करण्यासाठी आडवी येणारी झाडे. घर. डोंगर. एवढंच काय गावच्या गावं स्थलांतरित करण्यात आली आणि त्यांना मोडका तोडका आर्थिक मुहावजा देण्यात आला आपला विकास साधण्याचा फसवा प्रयत्न केला. आज जागोजागी तयार होणारे रस्ते. पुलं. बंधारे. धरणे. कालवे. बोगदे. अशी विविध आपला विकास साधणारे उपायोजना करण्यासाठी नेमले जाणारे विकास कार्यक्रम आज आपण निवडून दिलेले नेत पुढारी आमदार खासदार मंत्री यांचे बगलबच्चे आपल्या सत्तेचा गैर वापर करून लाखची कोटींची टेंडर घेतात का तर तो त्या जिल्ह्यातील आमदारांचा मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून आणि एकवेळ अशी येते आपण पेपर वृतमानपत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो कि उद्घाटन दिवशी पुलं पडल. बंधारा. धरण. वाहून गेल. किती वाईट आहे यात आपल्या मिळकतीची एक तरी रुपया आहे. विचार करा इंग्रजांच्या काळात तयार केलेले पुल. बंधारे. धरणे कालवे. हे आजसुद्धा ४०० वर्षे त्यांच्या कामांची पोचपावती देत आहेत आज कोणत्याही पेपरमध्ये वृतमानपत्रात इंग्रज काळातील एखादे पुल बंधारा धरणं. कालवा वाहून गेला असं एकल नाही कारणं आजसुद्धा यांनी बाधलेली वास्तू सुरंग लावून पाडावी लागते त्यावेळी सापेक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त काम होत होत. उगाचंच जुनी माणसं म्हणायची नाहीत इंग्रज काळात काठीला सोन बांधून फिरा म्हणजे त्यावेळी जनजीवन किती सुरक्षित होत. आज सर्वजण पैश्याच्या माग लागलं आहेत. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार अशे एकही प्रकरणं इंग्रज काळात नव्हते कारण जसा गुन्हा आहे तशीच सजा होती. आज एखाद्या आरोपीला वरिल कोणत्याही गुन्ह्याची सजा झाली तर त्याला पोलिस कोठडीत वहिआयपी वागणूक दिली जाते आणि चार सहा महिन्यांत तो आरोपी अजून असेच गुन्हे करण्यासाठी निर्दोष सुटतो. ही आपली ढिसाळ झालेली प्रशासन व्यवस्था. इंग्रज काळात चोरी केली तर हात तोडा. वाईट नजरेने बघितल तर डोळ काढा. अशा विविध सजा होत्या म्हणजे इंग्रज काळात आपण गुलाम नव्हतो तर आच आपण आपल्याच लोकाची गुलामी करत आहोत 

                  आज काळ बदलला आणि माणसाला मशिनची गती आली. सर्वत्र चकाचक रस्ते. दळणवळण जवळ झाले. मालाची आवक जावक झपाट्याने होऊ लागली आणि वेळेची सर्वात मोठी बचत झाली आपणांस हवे असणारे आपल्याला वेळेत मिळण्यास सुरुवात झाली. उलटपक्षी विचार केला असता सायकलीने भंगार दुकानांत जागा घेतली. जुन्या गाड्या शोरूममध्ये शोपिस म्हणून बसल्या. आज चार गियर. पाच गियर. अशा. जागयावरुन १८० सपिड घेणा-या नवीन नवीन गाडया. २०.००० पासून ४/५ लाखांपर्यंत दोन चाकी गाड्यांच्या किंमती आहेत. त्याचबरोबर चारचाकी गाड्या. १ लाखापासून ४/५ कोटी त्यापेक्षा ही महागड्या गाडया आज सर्वत्र नाही पण दिसतर आहेत वाहन आपली किंमत आपले वजन दाखविण्याचे साधन आहे. गाडी आपली आहे त्याचे सपिड सुध्दा आपल्या हातात आहे हे आपण विसरतो 

          आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मयत लोकांचे प्रमाण भयान झाले आहे. ज्यावेळी एकादा अपघात होतो त्यावेळी कोणी मदत करण्यासाठी. येत नाही कारणं पोलिस स्टेशनला जाण्याचा त्रास. जाब जबाब याचा ससेमारा. यामुळे शासनाने अपघातग्रस्त लोकांना मदत करणार्या व्यक्तिला पोलिस स्टेशनला सुध्दा चौकशी साठी बोलवू नये असा आदेश दिला आहे. अपघातात आई वडील भाऊ बहीण सगेसोयरे. यांचा मृत्यू झाला तर तो काळ किती वाईट असेल कारण कोणी आई गमावली. कुणी मित्र गमावला. कुणी वडील गमावले. कुणी बहिण भाऊ गमावले. असा प्रसंग सुध्दा आला आहे की सर्व कुटुंब जागीच ठार झाले आहे. कोण कोणासाठी रडत असेल. विचार करा. रस्त्यावरून शाळेला जाणारी मुलं मुली घोळखा करून चालतात त्यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर चालणारे वयोवृद्ध. पुरुष महिला. तरुण. लहान मुल. अशा अनेक व्यक्तिं रस्त्यावरून चालत असतात सुरक्षेच्या दृष्टीने जे काय पाहिजे ते शासन नामफलक लावून वाहन चालक यांना सावध करत असते. पण आज काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या बापाने बॅंकेकडून व्याजाने पैसे काढून घेवून दिलेली गाडी मुल अति वेगाने चालवत असतात. डबरा नाही. सपिड ब्रेकर नाही. अशी गाडी चालवत असतात. वेळ चांगली असेलतर ठिक आहे नाहीतर अपघात झाला तर स्वता मरणार आणि सोबत चार दोन घेवून जाणार काय वाटत असेल त्या आई वडील यांना आपण कधी विचार करतच नाही. 

              अपघात झाल्यावर घटनास्थळी बघणारे. अपघातग्रस्त लोकांच्या वस्तू पैसे वेळ पडल्यास गाड्यांचे पार्ट काढून घेतात. म्हणजे अपघातांत मरत असणारे लोक याकडे कोणी लक्ष सुध्दा देत नाही.  

              शासनाने विविध वाहतूक नियम अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत पण आपण त्या पाळतो का ? केवळ आपण आपल्या हलगर्जीपणा आज बरेच अपघात होत आहेत. अपघातात मयत झालेल्या व्यक्तिच्या घरच्या लोकांना आर्थिक सहाय्य देण्यापेक्षा. ज्याचा कडून अपघात झाला आहे अशा गुन्हेगार लोकांनी त्या अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईक यांना मरेपर्यंत पोसणयाचा आदेश द्यावा. अन्यथा वयानुसार आर्थिक लाभ देण्यात यावा. कारणं अपघातात हात पाय मोडणे. तोंडावर विविध खुना पडणे चेहरा विद्रूप होणे. काहीजण मूके बहीरे होणे. मनोरुग्ण. शारीरिक अपंग. विकलांग. अशा विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे काम होत नाही. घरच्या लोकांवर ओझ होत आणि अशा प्रस्थितीत अपघातग्रस्त लोक आत्महत्या सारखें मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपवितात

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इसलामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा राज्य

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या