तुझं आहे तुझं पाशी. पण तु जाग चुकलाशी
भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे. धर्म. संस्कृती. जाती भाषा. इत्यादी घटकांवर आधारलेले आहे. अनेक राजकीय दबाव गट निर्माण झालेले आहेत. यातील काही दबावगटाचे रुपांतर कालांतराने राजकीय पक्षांत झालेले आहे. द्रविड मुननेत्र. कळघम. अकाली दल. मुस्लिम लीग. महासभा यांचा विचार या संदर्भात आपण याचा अनुभव घेतला आहे.
भारतातील खिरचन. धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण. २.६/टक्के आहे. या संख्येच्या या मर्यादेमुळे बहुतांशी खिरचन धर्मिय आपले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करतात तरि देखील ते तुलनेने अधिक सुसंघटित आहेत. १९७९ मध्ये. श्री ओ पी त्यागी या जनता संसद सदस्याने एक विधेयक मांडले. धर्मांतर बंदी घालण्यात आली.
भारतात मुस्लिम प्रमाण ११.२१/ टक्के अंदाजे सांगितलं जातं. लोकसंख्येचे हे प्रमाण राजकारण दृष्टीने दुर्लक्ष करण्याजोगे नाही. भारताची फाळणी झाल्यानंतर या मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. दारिद्र्य. अडाणी. स्थायी व्यवसाय नाही. राहण्याचा स्थायी निवारा नाही. आणि मुस्लिम धर्मगुरू. मुल्ला मौलवी यांचा. मुस्लिम एक गठ्ठा मतदानासाठी. असणारा मुस्लिम बांधवांच्या वर असणारा प्रभाव. यामुळे अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेचे रुपांतर आक्रमक झाले पण स्थायी समाजांचे हित. विकास. सांगणारा कोणताही पक्ष नेता पुढारी आमदार खासदार किंवा समाजाची सुध्दा एकी झाली नाही याचा सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे राजकारणी लोकांना. यांतच मुस्लिम काही संघटना दबावासारखे कार्य करीत आहेत. जमात ए इस्लामी ( हिंद ) ही संघटना १९४८ मध्ये स्थापन झाली. भारतभर या संघटनेच्या ४३६ हून अधिक शाखा आहेत. या संघटनेने अनेक शैक्षणिक. विकास योजना. मंडळ निर्मिती करण्यासाठी उठाव. व इतर प्रकारच्या संस्था चालविल्या आहेत मजलिस ए मुस्लिम संघटनांचा एक महासंघ आहे. त्याची स्थापना डॉ स ईद. महमूद यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये झाली. या महासंघातर्फे इंडियन युनियन मुस्लिम लीग जमाईत उल उलमे हिंद. जमात इ इस्लाम तमीर इ मिललत. इततेहाद उल मुसलयीन. आदी संघटनांचा समावेश आहे. जातीय दंगलीमुळे मुस्लिमांची होणारी हाणी टाळण्याचा प्रमुख हेतूने हा महासंघ स्थापन करण्यात आला. यातील काही संघटना आत्ता राजकारणी यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत त्यामुळे समाजात फुट पाडणे इतर सत्ताधारी यांना सहज शक्य झाले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान घटना लिहिताना सर्वांना समान आरक्षण द्यावे काय असा मुद्दा मांडला होता त्यावेळी असणारे विविध पक्षाचे नेते यांनी नकार दिला. आज आपण हिंदु आरक्षण मुद्दा असो. तो सुद्धा गरजेचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले. डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. यांनी आपल्या भारतीय जातीव्यवस्थक समाजांचे ब्राह्मणविरोधी ब्राम्हणेतर असे धृवीकरण केले. यातून त्यांची नावे. वर्गीकरण केले शेटजी _ भटजी _ लाटजी यांच्याविरोधात शूद्रा अतिशूद्र यांची समाजातील वंचित घटकांची आघाडी उभारली. शेटजी _ भटजी _ लाटजी. या शत्रू आघाडिचे नेतृत्व ब्राम्हण करीत असल्याने ते मुख्य शत्रू सिध्द झाले. सर्व समाजातील समाजसेवक यांनी उभारलेल्या शूद्र अतिशूद्र आघाडीत फूट पाडण्याची तेव्हा पासूनच चालू आहे समाज एकत्र नाही आला पाहिजे एकी नाही. एक विचार नाही. एक मत नाही. हे नेहमी तंत्र ब्राम्हणांनी वापरले शूद्रादि अतिशूद्र आघाडीतून त्यांनी काही जातीचे नसलेले क्षत्रियत्व जागे केले. त्यांना राज्याच्या स्टेट स्तरावर राज्यसत्ता देऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या आघाडीत फूट पाडली. ब्राम्हणी छावणीत अशाप्रकारे वेगवेगळ्या राज्यात राजपूत. मराठा. जाट. ठाकूर. वगैरे. अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय जमाती सारख्या जाती आपल्या छावणीत पुन्हा क्षत्रिय म्हणून सामिल करून घेतल्या हे ब्राम्हणी धृवीकरण प्रतिक्रांतीसाठी सज्ज होत असताना बाबासाहेब आंबेडकर प्रवेश जातयंतक लोकशाही क्रांतीच्या अब्राहणी छावणीत होतो. त्यांनी ब्राम्हणी छावणीच्या प्रतिक्रांतीकारक धोरणाला शह देण्यासाठी पुन्हा वर्गीकरण केले. #*. राज्यघटनेतील. ३४०/३४१/ व ३४२ #* या कलमाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की. ओबीसी. एस सी. एस टी. हे व्यवहारिक वर्गीकरण आहे. त्याला क्रांतीचा व्यवहार बनविण्यासाठी त्यांनी नवे धोरण सांगितले. # ब्राम्हण. + क्षत्रिय + बनिया. # विरूद्ध ओबीसी + एस सी + एस टी हे व्यवहारीक वर्गीकरण आहे. लोकशाही नवे समिकरण त्यांनी मांडले मंडल आयोगाच्या अल्पशा अंमलबजावणी जी काही थोडीफार जागृती निर्माण झाली त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जातयंक क्रांतीचे सूत्र यशस्वी होत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने राज्यघटनेत ओबीसी+ एस सी + एस टी साठी ३४०/३४१/३४२ ही तीन कलमे आलीत मात्र घटना अमलात येतांच एक वर्षाच्या आतच ही तिन्ही आरक्षणाची कलम रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला व तो अंमलात आणण्याची तयारी सरकारने लगेच केली आणि राजकारणी तेढामुळे एका निकालाने फटक्यात आपले आरक्षण रद्द झाले हे कोणीच आपणांस सांगितले नाही आपण संविधान वाचले नाही.
आज सर्वात अडचणीत असणारा वंचित घटक आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. निरक्षरता शैक्षणिक अभाव यामुळे आमचा समाज मागास आहे. विविध समाजासाठी असणारी विविध विकास महामंडळ मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यामध्ये कर्मचारी आभाव. निधी अभाव म्हणजे कायम दुष्काळ. त्यामुळे आमच्या समाजातील मुल मुली अठरा विश्व दारिद्र्य यामुळे आर्थिक चणचण यामुळे शिक्षण नाही त्यामुळे नोकरी नाही. मग काय आमचा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणी वर चालणारा. सध्याची परिस्थिती ध्यानात घेता सवताची चूल बंद करून दुसर्याची चूल चालती करणारा. दान धर्म भुकेलेल्या व्यक्तिची भूक जाणणारा. मुस्लिम समाज आज आर्थिक सामाजिक स्तरावर मागास आहे. आर्थिक मागास असल्यामुळे शिक्षण नाही त्यामुळे आज सर्वसाधारण विचार केला तर कोठेही. तहसिलदार. प्रांत गवर्नर. गटविकास अधिकारी. जिल्हाधिकारी. क्लास वन अधिकारी. पोलिस निरीक्षक. पोलिस पी आय. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात आमचें गोल टोपी घालून अधिकारी मी तर बघितला नाही. मुस्लिम आत्मसन्मान आहे त्यामुळे कोणापुढे हात पसरणार नाही. मग काय. चिकन दुकान. भंगार व्यवसाय. गाडी व्यवहार. वडापाव गाडी. गंवडी कामगार. बाधकाम व्यवसाय. असा विविध व्यवसाय करून आज मुस्लिम समाज आपली व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करत आहे. कशामुळे आपणांस सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजाला ५/ टक्के आरक्षण जाहीर केले तदकालिन सरकारने अंमलबजावणी केली नाही सत्ताधारी व विरोधी पक्षाने संसदेत मोकळा दंगा केला राजकीय भांडवल केल मुस्लिम आरक्षणाचे
मुस्लिम अशा अन्य वंचित मागास अल्पसंख्याक जाती आज आपल्या अवतीभवती आहेत. पण यातील कोणत्याही जातींचा व्यक्ती कोणत्याही समाजांचा व्यक्ती आपणांस काम करून घेणे. त्यांना आपल्या इशारयावर नाचविणे एवढेंच राजकीय पक्ष यांनी केले आहे. बघा. नगरसेवक. नगराध्यक्ष. सरपंच उपसरपंच सदस्य. आमदार खासदार मंत्री पुढारी मुस्लिम चालतं नाही. अल्पसंख्याक नेता आहे तो तरी भारतीय आहे का? त्याला काय सुतक मुस्लिम समाज मेला काय आणि जगला काय ? हा मुद्दा लांबचा आहे आज आपल्या गावात तालुका जिल्हा राजकारणी यांनी समाजात फूट पाडली आणि हिंदू मुस्लिम दंगली जातीय दंगली घडविल्या. तरी सुध्दा आपणं यांच्याच नावानं उद उद करतो म्हणजे आपणांस लाज नाही.
आमच आम्हाला द्या तुमच नको आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे त्यासाठी शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. आपल्या हक्कासाठी एकत्र या झेंडा पक्ष कोण आहे यापेक्षा त्यांची मागणी आपल्या हिताची आहे का ? मतदानापुरते येणारे आरक्षण देतो पण आम्ही आत्ता सत्तेवर नाही सत्ता द्या आरक्षण देतो महणारे. तुम्हाला गुलामच करून ठेवणारं आत्ता नाही तर कधीच नाही.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९