Showing posts with label धर्म. Show all posts
Showing posts with label धर्म. Show all posts

शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये

 

शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये

      शासन दुर्गम अतिदुर्गम भागातील लोकांना हक्काचा शेती निगडित व्यवसाय मिळावा यासाठी शेळीपालन. कुक्कुटपालन. मत्स्यपालन. वराह पालन. ससे पालन. शेततळे. असे विविध शेतीसी निगडित व्यवसाय करून तरुणांना व आपल्या लोकांना लागलेला बेरोजगारी शाप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 

             शासन विविध शेती निगडित व्यवसाय सुरू करत आहे पण त्यात मोठा साप सोडला जातो तो म्हणजे. जात वर्गवारी. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. इतर मागासवर्गीय जमाती. अशी वर्गवारी करून. काय त्या योजनांचा फायदा म्हणजे आमचे पूर्वज फक्त पोटभर अन्न मिळावा यासाठी आज हे गाव उद्या ते गाव फीरत होते मग त्यांच्याकडे आपण कोणत्या जातीचे आहोत कोणत्या प्रवर्गातील आहोत हे काय माहित त्यामुळे शासनाने पळवाट काढली आणि जातीचा दाखला पाहिजे असेलतर १९६७ चा पूरावा गरजेचा आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वज अडाणी अशिक्षित त्यांना काय माहित जात व जात वर्गवारी. कसला जातीचा दाखला. कसला असतो तो कागद. माहिती नाही. त्यामुळे आज आपल्या तरुण पिढीला शासनाकडून जारी करण्यात आलेल्या विकास योजनाचा लाभ होत नाही म्हणजे

              २०१४/२०१५ रोजी शासनाने आदिवासी विकास महामंडळ यांचेकडून आदिवासी समाज सबल व्हावा यासाठी. आदिवासी शेळी पालन योजना केंद्राकडून ५ लाखांचा निधी उपलब्ध करून जारी करण्यात आली होती. त्यामध्ये. १० शेळ्या व एक बोकड बचत गटांना प्राधान्य देण्यात आले होते मला सांगा आदिवासी लोकांना महिलांना काय माहित बचत गट कशाला म्हणतात. आदिवासी जात प्रमाणपत्र काय असत. कशाला जात कोण शेळी पालन योजना मागायला या योजना व यातून मिळणारा लाभ फक्त आणि फक्त मंत्री पुढारी आमदार खासदार व त्यांचे बगलबच्चे घेतात त्यांना अट नाही का. म्हणजे ज्याच्या हातात काठी म्हैस त्याची असा प्रकार आहे. जात किंवा जातीच्या दाखल्याची अट न घालता सर्व योजना ओपन करा ज्याच्यात बॅंक अर्थसहाय्य घेवून त्याचा परतावा करण्याची धमक असेल त्याला योजनाचा लाभ घ्यावा. नाहीतर मी अस बघितले आहे की ह्या सर्व योजना पंचायत समिती यांचेकडून राबविल्या जातात. म्हणजे एकाद अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून एक दिवसांचा शेळी पालन प्रकल्प तयार केला जातो. एक दिवसासाठी शेळया एक दिवसांचे शेड. आणि एकवेळ लाभ मिळाला की शेड आणि शेळया गायब अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा मोठा आर्थिक लाभ दिला जातो. # तेरि भी चुप मेरी भी चूप # असा प्रकार वरचेवर पहायला मिळतो म्हणजे याला कारणीभूत आहेत ते म्हणजे पशुसंवर्धन विभाग व त्यांचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

        २०१७/२०१८ मराठवाडा पॅकेज धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद. यवतमाळ. गोंदिया. व सातारा. आणि दुसर्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यात. सर्वसामान्य. गोरगरीब व मागास दुर्गम अतिदुर्गम जिल्ह्यासाठी. शासनाकडून २० शेळया आणि २ बोकड असा गट वाटप करणे हा निर्णय विचाराधीन होता. आज शासनाने व मंत्रीमंडळ बैठकीत ९ जुलै २०२१ रोजी ही शेळी पालन योजना राबविण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत 

               योजनेनुसार १००/ टक्के निधी हिस्सा हा लाभार्थी व्यक्तिने वित्तीय संस्थेकडून उभा करायचा आहे. यासाठी सर्वसाधारण रक्कम २ लाख ३१ हजार ४०० रुपये असा आहे 

* २० शेळया प्रति शेळी ६००० 

१ लाख २० हजार

* २ बोकड प्रति बोकड ८०००

१६०००

* शेळीसाठी शेड ४५० चौ फुट. प्रति २१२ रू चौ फुट रूपये 

९५ हजार ४०० रूपये 

* एकूण रक्कम २. ३१ .४०० असी अनामत रक्कम शासनाने ठरवून दिले आहे 

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी पंचायत समिती पाटण या कार्यालयाला भेट दिली आणि संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळी पशुसंवर्धन अधिकारी यांनी अशी माहिती दिली की अजून ही योजना आमच्याकडं आलेली नाही. त्यापेक्षा वाईट म्हणजे तालुक्याला फक्त आणि फक्त ७ गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यात अपंग व्यक्तींना ३/ टक्के आरक्षण इतर मागासवर्गीय जमाती. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती यांना सुध्दा आरक्षण ठेवण्यात आले आहे मग राहिलं काय बाकिच्या लोकांच्या साठी. म्हणजे शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये खरच आहे 

              आपल्या खरच प्रगती करायची असेल तर जात वर्गवारी रद्द करणयाची गरज आहे ज्या दिवशी जात वर्गवारी नष्ट होईल तेंव्हा राजकीय पक्षाचे भांडवल संपेल. जनता गोरगरीब लोक यांच्यासाठी ऐपतीप्रमाणे विकास महामंडळ यांची दरवाजे उघडा ज्याच्यात धमक असेल तोच स्वताच्या हिमतीवर अनुदान घेईल आणि परतफेड सुध्दा करेल मग कशी शेळी अडाकतया बघू जात वर्गवारी मध्ये

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

धर्म - आपण कोणत्या जातीचे आहोत

 


         आपण कोणत्या जातीचे आहोत हे विचारलें आज प्रामुख्याने जाते पण कोणीही आपणांस तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे विचारत नाही आणि कोठेही जात प्रमाणपत्रासारखी. धर्माचे प्रमाणपत्र नाही हा सर्वात मोठा तेढ आहे. 

                  कार्य करणेच धर्म आहे. मानवतेपेक्षा कोणताच धर्म नाही. पण तरीही जेव्हा आपण आपल्या चारही बाजूंना अनेक प्रकारचें धर्म पाहतो. तेव्हा आपल्यालाही जाणीव होते की. मानवतेबरोबरच आता कुठल्या ना कुठल्या धर्माचे नाते जुळले आहे. यासाठी धर्माबाबत आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्त्येक माणूस जेव्हा धर्म बंधनात अडकलेला आहे तेव्हा त्यांना लोकांना धरमज्ञान देणे गरजेचे आहे. या ज्ञानाचया मदतीने आपण मानवतेचा धर्म सोबत घेऊन आपले जीवन सुधारु शकतो

        दान अध्ययन. आणि कर्म यांनी आपला दिवस सार्थक करावा. दान आणि ज्ञान दोन्हीही गोष्टी माणसासाठी जास्त महत्वाच्या आहेत हे दोन्ही केलें तर माणस चे मन लागेल त्याला आनंदी समाधानी राहता येईल. त्याचा वेळ व्यर्थ जाणार नाही. माणसाला धर्म. अर्थ. काम. मोक्ष या चार मधील कुठल्याही एकाच्या प्राप्तीसाठी जर प्रयत्न केला नाही आणि अशा प्रकारचें कार्य केले नाही. ज्यामुळे असे फळ मिळावे तर मानव जन्म व्यर्थ आहे. त्या माणसांचे या पृथ्वीवर येणे व्यर्थ आहे. असा पुरुष स्वतः स्वःतावर व या पृथ्वीवर ओझे ठरतो. जीवनाचा उपयोग वेळेच्या बाहेर चांगल्या कामांत लावून करता येईल चांगलें कार्यच जीवन महान करते. हे आपणास विसरून चालणार नाही. कि जीवन अस्थायी आहे. यासाठीच या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कर्म करण्यात घालवावा. यासाठी या जन्माच्या प्रत्त्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. मृत्यू आला तर मग काहीच राहणार नाही. न हे शरिर. न कल्पना. न अशा. प्रत्त्येक वस्तू मृत्यू सोबत संपून जातील

        सर्वात मोठी देवता आग आहे. देवता प्राण्यांच्या ह्रदयात निवास करतात. साधारण बुध्दी असणार्या साठी. या दगडाच्या मूर्ती देवीदेवता असतात. ते या मूर्ती मध्ये देवांचे दर्शन घेतात. परंतु हे कधीही विसरू नये की चांगला व्यवहार करणयारे व तीव्र बुध्दीच्या ज्ञानी लोकांसाठी या पृथ्वीवर धरतीच्या कणाकणात ईश्वर आहे यांच्यासाठी जगाच्या प्रत्त्येक ठिकाणांवर ईश्वरच ईश्वर आहे हे आपणांस धर्म सांगतो

             सत्य सर्वात मोठी गोष्ट आहे. सत्य जर सोडले तर बाकी सर्व मिथथा आहे. हे सत्य आहे की सूर्य व्याप्त आहे. हेही सत्य आहे की वायू सत्य सांगतो याचप्रमाणे या जगातील सर्व वस्तू फक्त सत्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच प्राणयाने नेहमीच सत्याचे पालन करावे. फक्त याच एका आधारावर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपणास विजय मिळतो. पुरुष सुरवातीपासूनच चंचल आहे. या जगात काही स्थायी नाही. लक्ष्मी चंचल आहे ती एका जागेवर थांबत एका जवळ राहत नाही ती रमणी आहे. पण ज्यांनी तीचा आदर केला त्याच्याजवळ लक्ष्मी कायम वास्तव्यास राहते हेही आपणस धर्म शिकवतो. आणि याचप्रकारे या जगातील प्रत्येक वस्तू आपला दिनक्रम करत असते. धन. नाते. गोते. सर्व चंचल आहे. यातील काहीही नेहमी कुणाची सोबत करित नाही. जोपर्यंत पैसा आणि संपत्ती आपणाजवळ आहे तोवरच सर्व आपल्या सोबत आहे. हे सुद्धा आपणांस धर्म शिकवतो

            फक्त धर्मच श्रेष्ठ आहे. तो अटळ सत्य आहे. आणि ते म्हणजे ज्ञानभंडार. ज्ञानच स्थायी आहे. ते कधीच प्राण्यांची सोबत सोडत नाही. माणसाची श्रवन शक्ति सर्वात महान असतें. ते ऐकून ज्ञान मिळते. ते ऐकून मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे प्राणी प्रत्त्येक चांगली वस्तु फक्त ऐकून ग्रहन करतो. तो चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी ऐकतो. परंतु वाईटापासून दूर राहून त्यांने त्याने फक्त चांगल्या व ज्ञानाचया गोष्टी ऐकावयात. हे आपणास धर्म सांगतो. नियती सर्वात बलवान आहे. प्राणयासोबत जे काही होणार आहे होणार असेल त्यानुसार बुध्दी. व तसंच प्राण्यांचा व्यवहार होऊन जातो. नियतीचा प्रभाव त्यांच्या पूर्ण शरिरावर पडतो जे होणार आहे ते अटळ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. व्हायचे ते होतेच. मृत्युला जगात सर्वात मोठी शक्ती माणले जाते. आणि अटळ सुध्दा माणले जाते. कारण मृत्यू या जगात सर्वांना गरिब श्रीमंत लहान मोठा सर्वांना खाऊन टाकतो. संसार नष्ट झाल्यानंतर राज्य शिल्लक राहते मृत्यू कधी झोपत नाही. कायम जागृत असतो. यासाठी मृत्युला विसरून चालणार नाही. मृत्युला ध्यानात ठेवून नेहमीच. चांगली कामे. चांगला व्यवहार करावेत. जीवनाचे खरे लक्ष वाईट करणे नाही. चांगलें करणे आवश्यक आहे. आपण जे काम करतो जसे करतो तसे फळ मिळतें. यामुळे मानव या संसाराच्या मायाजाल मध्ये बांधला आहे. आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा हे सगळे इथेच राहून जाते. इथले काहीही प्राणयासोबत जात नाही. त्यांच्याबरोबर जाते ते म्हणजे त्याने आपल्या पूर्ण आयुष्य भर केलेलें चांगलें वाईट कर्म हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो

              संसारात फक्त कर्मच मुख्य आहे. करमाचेच फळ माणसाला मिळते. ही तर गोष्ट स्पष्ट आहे. माणसाला फक्त धर्माचे च. फळ मिळतें. तर मग प्राण्यांसाठी हे अत्यावश्यक आहे की नेहमी चांगलें काम करावे. इंद्रियांवर संयम आणि जीवांवर दया केल्याने बुध्दीची शुध्दी होते. कर्म प्राण्याला लहान किंवा मोठे करते. यासाठी नेहमी चांगलें कर्म करा. वाईटापासून दूर रहा. घृणा. क्रोध. लोभ माया. मोह. यांचा त्याग करा. ज्याप्रमाणे फुलात सुगंध. तिळात तेल. लाकडात आग. दुधात तूप. उसात साखर. या सर्व वस्तूंचा आपण बाहेरून त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही. आपण या सर्व गुणांचा फक्त आपण विचार करू शकतो. देव आत्मयात आहे. आपण आत्मा शरिरापासून वेगळ करू शकत नाही. माणसाच्या शरिरात आत्मा आहे हे आपण ओळखू शकत नाही. माणसाच्या विचारांवर आपण ओळखू शकतो. म्हणूनच प्राणयापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. देव कुठे आहेत ? दगडात आहे का ? उंच उंच मंदिरात आहेत का ? देव फक्त आपल्या भावनेत आहेत. भावना श्रध्दा निर्माण करते. आपली जसी भावना आहे तसे देवांचे रूप. मग त्याची मूर्ती कशीही असो. हे सर्व आपणांस धर्म शिकवतो

                ज्या लोकांनी काम. क्रोध. लोभ. माया. अहंकार. यांवर विजय मिळविला ते महान झाले. प्रत्त्येक ठिकाणी प्रत्त्येक क्षेत्रात त्यांना विजय मिळाला. जग नेहमी अंचल राहत नाही. तर मग माणसं हा विचार का करतात? ते इथं नेहमीच राहणार आहेत पण मृत्यू तर एक दिवस येणार आहे. त्याला कधीच विसरू नका. यासाठी कधीच वाईट लोकांसोबत राहू नका. शक्य असेल तर पुण्य मार्गाने कार्य करा. यासाठी फक्त ज्ञानी आणि सज्जन लोकांसोबत रहा. या मार्गाने आपण आपल्या जीवनात सुख समाधान आनंद प्राप्त करु शकतो. सर्व प्राणी मात्रावर दया करा. निस्वार्थ पणाने कार्य करा. खोटे बोलू नका. महिला मुल कुमारी कन्या यांचा अपमान करू नका. हेच काय यापेक्षा अनेक कार्य आपण भगवी कफनी कपडे न घालता. माळ धारण न करता. चंदन लेप न लावता. लोकांना ज्ञान देतो तोच नेहमीचं साधू असतो. घाण कपडे घालणारे. घाण दात ठेवणारे. कायम प्रमाणापेक्षा जास्त जेवणारे. घाणेरडे शब्द बोलणारे. सुर्योदय सुर्यास्त होताना झोपणारे. यांना स्वता लक्ष्मी जरी धनवान बनविण्याचे ठरविले तरी हे गरिब आळशी राहतात. ते नेहमीच निर्धन राहतात. ज्ञान व शास्त्र अगणित आहे. विद्येची कुठली मर्यादा नाही. परंतु हे जीवन मर्यादित आहे. यात बर्याच अडचणी आहेत. म्हणूनच प्रत्त्येक प्राणयाने ज्ञान आत घ्यायला हवे. ज्ञानी लोक चांगली गोष्ट मनांत पचवितात. तेच महान होतात. त्यांचे जीवन महान होते. असे पुष्कळ लोक आहेत जे मोठें मोठं धर्मग्रंथ वाचूनही त्यांना ज्ञान प्राप्त होतं नाही. चांगलें जेवन जेवल्यानंतर चव कळत नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचूनही काही उपयोग नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचण्यापेक्षा त्यातील ज्ञान ग्रहन केलें तरच लाभ मिळतो हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो शिकवितो

            चांगलें कर्म करणारे लोक त्यांनी काम. क्रोध. लोभ. माया. मोह. यापासून दूर रहाणे गरजेचे आहे आसे लोक मुक्ति प्राप्त करतात त्यांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. फक्त भजन कीर्तन. पूजा विधी. नमाज. पडून मुक्ति मिळत नाही कर्म तर केलेच पाहिजे. कर्म यथार्थ आहे. धर्म आदर्श आहे. ज्ञान हा प्रश्न कुंज आहे. जो जीवनाच्या अंतापर्यंत रस्ता अलौकिक करित राहतो

              महाभारत. रामायण. कुराण. बायबल. असे विविध धर्म ग्रंथ आहेत पण त्या धर्मग्रंथात देण्यात आलेली शिकवन समान एकसारखी आहे. कोठेही रक्त सांडून शांती मिळणार नाही. म्हणूनच. आपण देवाला नवस करतो त्यात आपण माझी अमुक इच्छा पूर्ण होऊ दे मी तुला कोंबडा कोंबडी बकरे. कापतो असे म्हणतो पण आजपर्यंत कोणाच्या ऐकण्यात सुध्दा नाही की कोणी असं नवस केल की मी देवाला वाघ सिंह यांचा बळी देतो. का सांगा कारण गरिब दिनदूबळे यांचाच बळी दिला जातो 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पोशाख. गणवेश.

 


         पोशाख. गणवेश. 


आपल्याला आपल्या विविध धर्म जाती आपले समाजांचे प्रतिनिधित्व आपला पोशाख. करत असतो.  म्हणजे. मुस्लिम लोक डोक्यावर गोल टोपी वापरतात.तयामुळे ते मुस्लिम आहेत. कपड्यांच्या रचनेवरून आपणांस कळते   हिंदू लोक फेटा टोपी घालतात. कपाळावर नाम असतो . धोतर. पायजमा.  काही लोक भगवी वस्त्रे परिधान करतात त्यामुळे आपल्याला  विशिष्ट अशा धर्माचे ज्ञान होतें. शिख ईसाई ज्यु. असे विविध जातींच्या लोकांचा एक विशिष्ट असा पोशाख असतो. विविध कला सादर करणारे कलाकार एक विशिष्ट असा पोशाख परिधान करतात. जसे. डोंबारी खेळ करणारे. पिंगळे.  बहुरूपी. कडक लक्ष्मी वाले  वासुदेव.  गोंधळी   पोवाडे गायक. नाटककार. तमाशगीर. पथनाट्य सादर करणारे. विविध सामाजिक उपक्रम योजना यांच्यासाठी प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध करणारे कलाकार, असे विविध कलाकार एक विशिष्ट पोशाख परिधान करतात त्यामुळे आपणांस समजते की हा एक विशिष्ट जातीचा कलाकार आहे 

              आपण आणि आपली मुले शाळेत जातात तिथे सुध्दा. एक विशिष्ट गणवेश परिधान करण्यासाठी सांगितले जाते. विविध शालेय संस्था. जिल्हा परिषद शाळा.  काॅलेज महाविद्यालय विद्यालय. यांच्यात शिक्षण घेणारा विद्यार्थी ओळखणे आपणांस गणवेशा मुळे जड जात नाही्‌‌     याचा अर्थ असा होतो की आपणांस आपली ओळख आपला पोशाखच करून देतो.  

         शासनाने. ६/ डिसेंबर २०२०मधये शासकीय निमशासकीय कार्यालये कंत्राट बेसवरचे कामगार अधिकारी व कर्मचारी यांना. कुणी कोणता पोशाख परिधान करावा. शासकीय आॅफिस मध्ये. कोणता पोशाख असावा. त्यावर चप्पल बूट सॅंडल. आवाज न येणारे असावे. जीन पँट टि शर्ट भडक रंग असणारा पोशाख परिधान करण्यावर बंधन घातले आहे.    महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी साडी. सलवार कमीज कुडता.  दुपट्टा वापरणे बंधनकारक केले आहे.  महिला साठी सुध्दा काही बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.   यांवर. लक्ष. ठेवण्याचा देखरेख करण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आला आहे. पण आज उलट झाल आहे.  आठवड्यातून एकवेळ खादी पोशाख परिधान केला जातो का. ?  शिपाई अधिकारी दिसतो आणि अधिकारी शिपाई.  जीन पँट टि शर्ट वापरणे हे आज शासकीय निमशासकीय कार्यालयात फॅशन झाली आहे.  अस बर्याच ठिकाणी बघायला मिळते.  शासकीय अधिकारी कर्मचारी कोण आहे. शिपाई कोण आहे.  कंत्राट बेसवरचे कोण आहे.  त्यांच्यासाठी कोणता पोशाख आहे. त्यांनी परिधान केलेला पोशाख स्वच्छ निटनेटका. आहे कां. ?  त्यांनी परिधान केलेला पोशाख त्यांच्या पदाला शोभणारा आहे का ? यांची चौकशी होते कां ? कोण चौकशी करते. ? 

      आज सर्वात. आपल्या पदाच्या दरजाप्रमाणे. पोलिस बांधव.   सफाई कामगार.  आशा वर्कर्स.  नगरपरिषद यांचेकडून काम करणारे विविध कामगार. ड्रायव्हर.एस टी कर्मचारी. अशा विविध शासकीय निमशासकीय कंत्राटी कामगार आपल्या पदाच्या दरजाप्रमाणे पोशाख परिधान करताना दिसतात 

            शासकीय निमशासकीय कार्यालयात. आपल्या पदाच्या दरजाप्रमाणे पोशाख परिधान केला जात नाही असे शासनाच्या ध्यानात आल्यावर शासनाने १६ मार्च २०२१ रोजी शासन निर्णयानुसार. परिपत्रक काढून सर्वांना. पोशाख परिधान करण्यासाठी काही नियम अटी घालून दिल्या आहेत. 

            ३/२/२००८ चया नागरि सनद नुसार कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात. अधिकारी व कर्मचारी यांच्या पोशाख परिधान करण्याच्या बाबतीत चौकशी करण्याचा अधिकार आहे नागरिकांनी आॅफिस मध्ये गेल्यावर शासकीय अधिकारी व यांचा पोशाख. बघा त्यांनी त्यांच्या पदाच्या दरजाप्रमाणे पोशाख परिधान केला आहे का ? हे बघा नसेल तर वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार करा 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या