पुनर्वसन अधिनियम १९९९

 


पुनर्वसन अधिनियम १९९९

                            शासनाने विहित नमुन्यातील एकादी भव्य मोठी जागा आरक्षित केलेली असते. आपत्कालीन परिस्थितीत एखादे गाव धोकादायक म्हणजे पुरबाधित गाव. भुकंपामुळे हाणी झालेली गावे. धरणे. मोठे बंधारे. पुल. अशी विकासाची कामे करण्यासाठी शासन ठराविक क्षेत्र आरक्षित करते आणि त्यांच्या बदल्यात त्या ठिकाणी रहिवासी असणारे लोक यांना पर्यायी जमीन व थोडया माती मोल दराने पैसे देऊन ती जागा ताब्यात घेते आणि अशा प्रकल्पग्रस्त लोकांना बिनकामाची बिगर उपजाऊ शेती दिली जाते अशा दिल्या जाणाऱ्या जमीनीला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त जमीन अस म्हणलं जातं 

     पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग _२ पर्यायी जमीनीचे वाटप केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर जमीनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग - मध्ये करण्याबाबत शासनाने काही अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रा प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाकरिता ज्या व्यक्तिची जमीन संपादित करण्यात आली आहे अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिस पर्यायी जमीनीचेवाटप कलम १६(१) ( एक) नुसार पुर्वीच्या धारण केलेल्या जमीनीच्या भोगवटा विषयक सथितीसह करण्यात येते व कलम १६(१) ( एक ) मधील तरतुदीनुसार पोटकलम १(अ ) आणि (ब) अन्वये जमीनीची वाटप ग्राही व्यक्ति ही भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असेल तर ती दहा वर्षांनंतर विहित अधिमूलय भरून ती जमीन भोगवटदार वर्ग -१ मध्ये बदलून घेणयास हक्कदार आहे. अशी तरतूद आहे. तथापि अशा जमीनीचे भोगवटदार वर्ग_-१ मध्ये रूपांतर करताना विहित अधिमूलय किती असावे हे निश्चित करणे व भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारया प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप केलेल्या भोगवटदार वर्ग -२ जमीनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी कालमर्यादा विहित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी जमीन पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना वाटप केलेल्या पर्यायी जमीनी भोगवटदार वर्ग -२ चे रूपांतर भोगवटदार वर्ग -१ मध्ये करून सदर जमीनीवरील हस्तांतरण व्यवहारातील सर्व निर्बंध उठवून आशा पर्यायी जमीनी निर्बंध मुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप करण्यात आलेल्या पर्यायी जमीनीवरील निर्बंध उठवून त्याचे भोगवटदार वर्ग -२ मधून भोगवटदार वर्ग - १ मध्ये रूपांतर करण्यासाठी दिनांक ४ जून २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

            महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार भोगवटदार वर्ग -२ पर्यायी जमीनीचे रूपांतर भोगवटदार वर्ग -१ मध्ये करतांना विहित अधिमूलय रक्कम आकारून सदर पर्यायी जमीनीवरील हस्तांतरणासंबधी निर्बंध उठविण्यासाठी विहित कालावधीत व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे व त्यानुसार संबंधित अधिकारी यांच्याकडून खालील प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत 

* महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १४ अन्वये ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांची भोगवटदार वर्ग -१ जमीन संपादित करण्यात आली असून त्यास वाटप झालेल्या पर्यायी जमिन ही भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असेल तर तिचे भोगवटदार वर्ग -१ मध्ये तात्काळ रुपांतर करण्याचे आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत व सदर आदेशानुसार सात _ बारा उतारयात आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासंबंधी पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज अगर रक्कम / शुल्क/ अधि मूल्य भरण्याची आवश्यकता नाही तशी मागणी संबंधित विभागीय अधिकारी करीत असेल तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात यावी

* महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार कलम १६(१) ( एक ) नुसार जमीनीची वाटप ग्राही व्यक्ति ही भोगवटदार वर्ग-२ मध्ये मोडणारी असेल तर ती दहा वर्षांनंतर विहित अधिमूलय भरून ती जमीन भोगवटदार वर्ग -२ मध्ये बदलून घेणयास हक्कदार आहे अशी तरतूद आहे तथापि त्यानुसार कालमर्यादा कार्यवाही करण्यात येतं नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे तरी कलम १६(१) ( अ) नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप करण्यात आलेल्या पर्यायी जमीनीवरील निर्बंध उठवून त्याचे भोगवटदार वर्ग -२ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतरण करतांना त्या तारखेस अस्तित्वात असलेल्या सिध्द शीघ्र गणकामधये नमूद किमतीच्या दहा टक्के एवढी विहित अधिमूलय रक्कम संबंधित प्रकल्पबाधित व्यक्तिस भरण्याबाबत कळवून त्याने सदर रक्कम भरलयाबाबत चलनाची सादर केल्यावर सदर जमीनीचा भोगवटा रुपांतरीत करण्याची कार्यवाही करावी कलम १६(१) ( एक) नुसार पर्यायी जमीनीची वाटपग्राही व्यक्ति भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असल्यास पर्यायी जमीनीचेवाटप कलम १६ मध्ये नमूद अटीची पूर्तता केल्यानंतर करण्यात आले आहे. अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमीनी वाटप झाल्याचा दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व प्रकरणांचा १५ दिवसांत आढावा उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) यांनी आढावा घेऊन कलम १६(१) (एक) मध्ये तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरण्यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना तात्काळ नोटीस पाठवावी अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिने कलम १६(१) (एक ) मध्ये नमूद तरतुदी नुसार विहित अधिमूलय भरून त्याबाबत चलनाची प्रत सादर केल्यानंतर सदर पर्यायी जमीनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये तात्काळ रूपांतर करण्याबाबत आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत सदर आदेशानुसार सात/बारा /उतारा यामध्ये आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासाठी संबंधित पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही 

* महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील १६(१) ( एक) नुसार पर्यायी जमीनीच्या वाटपग्राही व्यक्तिने संपादित जमीनीचा मोबदला प्राप्त झाल्यावर त्यामधून नजराणा कपात करून दिला असुनही अशा प्रकल्पबाधित व्यक्तिस भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमिन वाटप करण्यात आली असल्यास तिचे रुपांतरण भोगवटदार वर्ग -२ मध्ये तात्काळ रुपांतर करण्याबाबत आदेश संबंधित संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत आवश्यकतेनुसार सदर अधिकार प्रतयपिरत करू शकतील. सदर आदेशानुसार सात/ बारा उतारा यामध्ये आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची अगर रक्कम/ शुल्क / अधिमूलय. भरण्याची आवश्यकता राहणार नाही

* महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १६(१) ( एक ) नुसार पर्यायी जमिनींची वाटप ग्राही व्यक्ति भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असल्यास पर्यायी जमीनीचे वाटप कलम १६ मध्ये नमूद अटीची पूर्तता केल्यानंतर करण्यात आले आहे. अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमिन वाटप झाल्याच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा सर्व प्रकरणांचा प्रत्येक वर्षाच्या मार्च. आॅगसट. व डिसेंबर महिन्याअखेर उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) यांनी आढावा घेऊन कलम १६(१) ( एक) मध्ये नमूद तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरण्यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना नोटीस पाठवावी. अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधित पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिने कलम १६(१) ( एक ) मध्ये नमूद तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरून त्याबाबत चलनाची प्रत सादर केल्यास सदर पर्यायी जमीनीचे भोगवटदार वर्ग -१ मध्ये तात्काळ रूपांतर करण्याबाबतचे आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत आवश्यकतेनुसार तहसिलदार सदर अधिकार नायब तहसीलदार यांना प्रत्यार्पण करू शकतील. सदर आदेशानुसार सात/ बारा उतारवयात आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी व तदनंतर पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप केलेल्या अशा पर्यायी जमीनीच्या हस्तांतरण व्यवहारावरिल सर्व निर्बंध उठविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करून त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही

* शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीत कार्यवाही करून तदनंतर एक महिन्याच्या कालावधीत त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्याची दक्षता सर्व जिल्हाधिकारी यांनी घ्यावी सदर निर्देशानुसार कार्यवाही करण्यास दिरंगाई/ हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचारी/ अधिकारी यांच्यावर यथाशक्ती शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याची दक्षता जिल्हाधिकारी/ विभागीय आयुक्त यांनी घ्यावी असा सक्त आदेश शासनाने दिला आहे

      महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९मधील तरतुदीनुसार पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणार या गावठाणाचे नविन वसाहतीत पुनर्वसन करण्यात येते. पुनर्वसीत गावठाणात स्थलांतरित होताना प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणी येतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याचा कालावधी मोठा असल्यामुळे नागरी सुविधांच्या हस्तांतरणात येणार्या अडचणी लक्षात घेऊन पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्ती बाबत निश्चित धोरण ठरविणयाची आवश्यकता आहे. जेणेकरून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारया नागरी सुविधा या दर्जेदार असतील तसेच त्यांची योग्य ती देखभाल होईल व प्रकल्पग्रस्तांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर होतील त्यानुसार सन १९७६ नंतरच्या पाटबंधारे प्रकल्पबाधित पुनर्वसित गावांना देण्यात आलेल्या नागरी सुविधा तसेच यापुढे प्रकल्पबाधित पुनर्वसित गावांना येणार्या नागरी सुविधा धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत

* पर्यायी गावठाणाची जागा निश्चित करताना या गावठाणासाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत हा प्राधान्याचा निकष असावा पर्यायी गावठाणासाठी निवडलेला पिण्याचा पाण्याचा पुरेसा असल्याबाबत प्रमाणपत्र प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांनी गावठाणाची जागा निश्चित करण्यापूर्वी द्यावे 

* गावठाणातील प्रत्येक फलाट मध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे 

* रस्ते गटारे बाग स्मशानभूमी समाजमंदिर. इत्यादी सोय करून देण्यात यावी

* दिवे बत्ती सोय स्वच्छ पाणी याची सोय करून देण्यात यावी

* सर्व पुनर्वसन लोकांची वस्ती सुरक्षित असण्याची हमी व जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी

* पुनर्वसन लोकांमधील भांडणं तंटे. निवारण करण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यात यावी

* पुनर्वसन क्षेत्रातील काही लोक आपल्या व अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून जागा भुखंड हडपण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

* पुनर्वसन क्षेत्रातील काही लोकांचे जमीन कागदोपत्री काही कारणास्तव अपुरी असतील तर ती पूर्ण करण्यासाठी संबंधित ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी तहसिलदार नायब तहसीलदार यांनी योग्य ती मदत करावी

* शासन निर्णय क्रमांक आर पी ए २०१५/ प्र क्र २१४/र -१ दिनांक २३/०९/२०१५

* शासन निर्णय क्रमांक पुनर्व _ २०१५/ प्र क्र २५/ र_ ८ दिनांक १९/११/२०१५ 

*२६/ जून २०१८ / १९७६ असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत

      ‌ समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

* इंजिनिअर चौकशी झालीच पाहिजे यासाठी उठाव करायचा आहे तरी सर्वांनी यामध्ये सामिल व्हा आणि खरोखरच कामगार आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा

तुकडजोड तुकडेबंदी अधिनियम १९४७ काय आहे?



 तुकडजोड तुकडेबंदी अधिनियम १९४७ काय आहे ?

          जमीनीचे तुकडे पडल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातो आणि शेती विकासाला खिळ बसते शेती विकासाला प्रोत्साहन देणे तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे. शेतीची उत्पादकता वाढविणे हा प्रमुख उद्देश ठेऊन तुकडेजोड तुकडेबंदी कायदा अंमलात आला आहे जमीनीचे तुकडे पाडून त्याचे बिगरशेती करून कोणताही जमीन व्यवहार शासनाला न कळविता. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी नाही. असे रोजच व्यवहार महसूल विभागात होत होते. त्यातुन होणारी शासनाची फसवणूक स्टॅम्प ड्युटी कमी भरणे. जमीनीची किंमत कमी दाखविणे. असे सर्व प्रकार करून शासनाला सुध्दा फसविले जाते. असे सर्व प्रकार शासनाच्या व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या ध्यानात आले त्यामुळे तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम कायदा अंमलात आणला आहे. आर्थिक दृष्ट्या परवाडणार नाही असे शेतीचे अनेक तुकडे होण्यास प्रतिबंध करणे. आणि राज्यभरातील तुकड्यांचे एकत्रिकरण करणे हा सदर कायदयामागील हेतू आहे 

           तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम मूळ नाव # मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ # असे होते. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ अन्वये हे बदलून# महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७# असे करण्यात आले आहे

            तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम २ (४) अन्वये तुकडा म्हणजे सदर अधिनियम अन्वये ठरविलेल्या समुचित प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्ताराचा भूखंड. जमीनीचा # तुकडा # म्हणजे किती क्षेत्र आहे आवश्यक ती चौकशी करून शासनाने ठरवायचे होते. त्याप्रमाणे भिन्न भिन्न क्षेत्रासाठी किती क्षेत्राची जमीन तुकडा मानायची हे जाहीर करण्यात आले. त्यासाठी शासनाने. जिरायत. बागायत. आणि वरकस अशा वर्गीकरणाना मान्यता दिली 

* शासनाने ठरविलेले क्षेत्र खालील प्रमाणे

# जिरायत जमीन. १० ते ०४ एकर

# भात जमीन ०१ गुंठा ते ०१ एकर

# बागायत जमीन. ०५ गुंठे ते ०१ एकर

# वरकस जमीन ०२ एकर ते ०५ एकर. तथापि प्रत्येक वर्गीकरणाचया जमीनीसाठी निरनिराळ्या क्षेत्रातून भिन्न भिन्न क्षेत्रफळ निश्चित केले आहे. कोकणातील ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ०२ एकर वरकस जमीन २० गुंठे खरिप भातजमीन आणि ०५ बागायत जमीन या खाली क्षेत्र असलेली जमीन हा # तुकडा # आहे 

           तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ५(३) अन्वये राज्य शासनाने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्यापासून सदर अधिनियमाच्या तरतूदी लागू होतील या कलमानुसार काढलेले अध्यादेश मागील तारखेपासून लागू करता येणार नाही. तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम अंमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तुकड्यांचे हस्तांतरण वारसाने होऊ शकते परंतु विभागणी द्वारे जमीनीचे तुकडे करता येणार नाहीत. कुळ कायद्यानुसार कुळास जमीन विकताना तुकड्यांचे हस्तांतरण करण्यास बाधा येत नाही आणि अशा तुकड्यांचे कुळाच्या वारसा मध्ये हस्तांतरण होऊ शकते याशिवाय लगतच्या खातेदाराच्या लाभात तुकड्यांचे हस्तांतरण होऊ शकते तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ७ अन्वये हा अधिनियम अंमलात आल्यानंतर कोणत्याही तुकड्यांचे हस्तांतरण किंवा तुकडा असे पोटहिससे करणे बेकायदेशीर ठरेल. तथापि अशा तुकडयाशी संलग्न असलेल्या जमीन धारकास तुकड्यांचे हस्तांतरण करणे विधी ग्राह्य आहे 

              तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ८ अन्वये कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभागणी तुकडा निर्माण होईल अशा पध्दतीने करता येणार नाही तथापि निरहेतुक हस्तांतरणाला या कलमांच्या तरतूद मुळे बाधा येणार नाही म्हणजेच भूसंपादन कायद्यानुसार संपादित केलेल्या जमनीना या कलमाची तरतूद लागू होणार नाही 

     राज्य शासनाच्या दिनांक ३१ जुलै १९५४ चया परिपत्रकानुसार तुकड्यांची खरेदी झाली असेल त्याची नोंद ७/१२ इतर हक्कात नोंदविण्यात सूचना दिल्या आहेत

          तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ८ अ अ अन्वये कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण हूकूमनामा किंवा उत्तराधिकार यामुळे मिळणारा हिस्सा तुकडा निर्माण होणार नाही अशा रितीनेच केला पाहिजे. न्यायालयाने किंवा जिल्हाधिकारी ( तहसिलदार ) यांच्या मार्फत जमिनींचे हस्तांतरण किंवा वाटप केल्यामुळे जर तुकडा निर्माण होत असेल तर त्या तुकड्यांच्या हिशशयाबधदल पैशाच्या स्वरूपात भरपाई देण्याची तरतूद आहे. सदर भरपाईची रक्कम भूमी संपादन अधिनियमाच्या तरतूदी अन्वये ठरविण्यात यावी 

       * पुढील प्रयोजनासाठी तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या तरतूदी लागू होणार नाहीत 

* मुले किंवा प्रौढ व्यक्तिसाठी धर्मशाळा. खेळाचे मैदान. शाळा. महाविद्यालय. ग्रामीण चित्रपट गृह. सार्वजनिक दवाखाने यांच्यासाठी

* मासे मांस फळे फुले भाजीपाला बाजाराचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन

* राज्य परिवहन डेपोसाठी आवश्यक असलेली जमीन

* कृषी विद्यापीठासाठी आवश्यक असलेली जमीन

* सार्वजनिक रस्ते. शौचालय स्मशानभूमी. दफनभूमी. गायरान. छावनीसाठी आवश्यक असलेली जमीन

* सहकारी गृहनिर्माण संस्था घरांचे करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन. तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ९ अन्वये या अधिनियमाच्या तरतुदींचा भंग करून केलेलें कोणतेही हस्तांतरण किंवा विभाजन हे अवैध असून रद्द होण्यास पात्र ठरते. संबंधित जिल्हाधिकारी रूपये २५० पेक्षा अधिक नाही इतका दंड करू शकतात आणि याप्रमाणे अनाधिकृतपणे जमिनीचा भोगवटा करणार्या व्यक्तिला त्या जमिनीतून तडकाफडकी काढून टाकले जाऊ शकते 

        शासन परिपत्रक क्रमांक सी ओ एम १०७३/४१४६६-५ दिनांक २४ एप्रिल १९७३ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणा भाग -४- ब दिनांक ०३ जानेवारी २०१८ अन्वये तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ९()३ मध्ये सुधारणा करून असे तुकड्यांचे हस्तांतरण वार्षिक दरपत्रकातील ( रेडीरेकंनर ) बाजार मूल्यांच्या २५ टक्के इतकी रक्कम वसूल करुन नियमानुल करण्याची तरतूद करण्यात आली आहे सदर शेती विषयक तुकड्यांना लागू करता येईल

      तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ३१ अन्वये तुकड्यांची खरेदी किंवा हस्तांतरण न्यायालयाच्या हूकूमनामयाचया अंमलबजावणी साठी विक्री. देणगी अदल बदल. किंवा भाडे पट्टा यासाठी परवानगी देण्यास जिल्हाधिकारी सक्षम आहेत. यांचाच अर्थ जरी दिवाणी न्यायालयाच्या हूकूमनामयाची अंमलबजावणी करताना जर तुकडेबंदी तुकडेजोड अधिनियमाच्या तरतुदींचा भंग होत आहे असे निदर्शनास आल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे

          महाराष्ट्रा शासन राजपत्र असाधारण भाग ४ दिनांक ०१ जानेवारी २०१६ अन्वये मुंबई धारण अधिनियम २०१५ पारित करून कलम ८- ब जादा दाखल करण्यात आले आहे त्यानुसार महानगर पालिका किंवा नगरपरिषद सीमा मध्ये स्थित असलेल्या जमिनीस किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चया तरतूदी लागू असलेल्या जमिनीस तसेच विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नविन नगर विकास प्राधिकरण यांच्या अधिकारेतेमधये स्थित असलेल्या जमिनीस आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम १९६६ चया अधिकारेतेमधये स्थित असलेल्या जमिनीस तसेच कटकक्षेत्र आणि राज्य शासनाने कृषीतर किंवा औधोगिक विकासासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्र तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमान्वये कलम ७.८.८ अ अ यांच्या तरतुदी लागू होणार नाहीत

        एखाद्या दिवाणी न्यायालयाने तडजोड हूकूमनामा देऊन विभाजनाचा आदेश पारीत केला असेल आणि असे विभाजन तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदींच्या विरुद्ध असेल तर कलम ३१ अन्वये जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आसेल 

        महाराष्ट्रात शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक २००३/ ३२३३/ प्र क्र ७८८/ म दिनांक ०६/०१/२००३ अन्वये ग्रामीण भागात रस्ते. विहीर. विद्युत पंप बसविणे यासाठी शेतजमीनीचया छोट्या तुकड्यांची खरेदी करण्यास बाधा येत नाही तथापि अशी खरेदी विक्री करण्याआधी संबंधित जिल्हाधिकारी यांची कलम ३१( ब ) अन्वये पूरवसंमती घेणे आवश्यक राहील तसेच संबंधित खरेदी विक्री दसतामधमे सदर जमीनीचा वापर कोणत्या कारणासाठी करणार आहे याचा उल्लेख स्पष्ट करणे बंधनकारक आहे 

       शासन परिपत्रक क्रमांक एस १४/११८९३४- ल -१ दिनांक २७ जानेवारी १९७६ अन्वये शासनाने सर्व जिल्हाधिकारी यांना विनंती करून उपरोक्त अधिनियमाच्या कलम ९ चे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करण्याबाबत निर्देश दिले होते. तथापि असे अधिकार जिल्हाधिकारी यांनी प्रदान केल्याची खात्री करूनच वापरावेत. प्रदान केलेलें अधिकार वापरून कोणताही आदेश पारित करताना ज्या आदेशा अन्वये असे अधिकार प्रदान केले गेले आहेत त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक पारित करीत असलेल्या आदेशावर नमुद करावा 

          तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ३१ चया तरतूदी वयकतिरिकत. असलेल्या बाबींबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणा भाग ४ दिनांक ०७ सप्टेंबर २०१७ ( अधिनियम क्रमांक ५८ ) अन्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम २०१७ पारित करून कलम ९ पोट कलम (३) नंतर पुढील प्रमाणे जादा स्पष्टिकरण देणार आहे 

          दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्यांनंतर किंवा त्यांनंतर दिनांक ०७ सप्टेंबर २०१७ पूर्वी तुकड्यांची विक्री करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे व्यक्तिने अर्ज केला असेल किंवा उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींच्या विरुद्ध केलेलें कोणतेही हस्तांतरण किंवा विभागणी नियमाकूल करण्यासाठी बाबत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज प्राप्त झाला असेल आणि सदर जमीन प्रचलित प्रारुप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी. वाणिज्य. औद्योगिक. सार्वजनिक. किंवा निम सार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषिक वापरासाठी नियत वाटप झालेली खातेदाराने किंवा लगतच्या कायदेशीर पोट हिस्सा धारकाने किंवा लगतच्या भोगवटदाराने सदर सरकार जमा केलेली जमीन घेण्यास नकार दिला तर या सरकार जमा केलेल्या जमीनीच्या लिलाव करण्यात येईल आणि लिलावातून प्राप्त रक्कम ज्या खातेदारांची जमीन सरकार जमा करण्यात आली होती त्याला आणि शासन यांच्यात ३;१ याप्रमाणे वाटून घेण्यात येईल. 

         शासन परिपत्रक क्रमांक रा भू अ २०१६/ प्र क्र ३४७/ ल दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये दिनांक ०७/सप्टेंबर २०१७ ( अधिनियम क्रमांक ५८) अन्वये नियमानुकुल करताना आकारण्यात येणारी रक्कम पुढील प्रमाणे लेखाशिरषारत जमा करण्यात यावी 

      मा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक. महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र नोंदणी सुधारणा नियम २००५ पारित केला आहे जो १जुलै २००६ पासून अंमलात आहे. महाराष्ट्रा नोंदणी सुधारणा अधिनियम २००५ याद्वारे महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ नियम ४४ नोंदणीसाठी दस्त ऐवज स्वीकारण्यापूर्वी वीविक्षित अशा आवश्यक गोष्टींची फेरतपासणी करणे. पोटनियम १ मध्ये खंड ( ह ) नंतर खंड ( इ ) दाखल करण्यात आला आहे

        दस्तावेज उदेशीत असणा-या व्यवहाराबाबत केंद्र शासन अथवा राज्य शासन यांच्या एखाद्या कायद्यानुसार निर्बंध असेल तर त्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे सक्षम अधिकारी यांच्याकडील परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र सत्य प्रत त्या दस्तावेज बरोबर जोडली आहे व त्या परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र नमूद कोणत्याही प्रमाणभूत अटि व शर्ती विसंगत रितीने तो दस्त ऐवज लिहलेला नाही 

      एखाद्या वयवहाराबाबत केंद्र शासन अथवा राज्य शासन यांच्या एखाद्या कायद्यानुसार निर्बंध असेल तर त्या कायद्यातील तरतुदीनुसार सक्षम अधिकारी यांच्याकडील परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्राची सत्य प्रत त्या दस्तावेज सोबत जोडली आहे किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकाचीही आहे हे लक्षात घ्यावे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महापुराची मदत मिळाली कां ?

 


महापुराची मदत मिळाली कां ?

                २०२१ ला जुलै महिन्यात सोळा सतरा तारखेला. सांगली कोल्हापूर सोलापूर सांगली रत्नागिरी अशा जिल्ह्यात अवेळी अवकाळी झालेल्या पावसाने हाहाकार उडविला होता. पुरबाधित नदीच्या कडेला असलेल्या गावांना. सावरण्याचा वेळ सुद्धा मिळाला नाही. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांचें संसार उघड्यावर आले घरातील संसार उपयोगी साहित्य. महत्वाची कागदपत्रे. जमीन खरेदी दस्त. आधार कार्ड. रेशनकार्ड. मतदान कार्ड. गॅस कार्ड. कपडे. अन्न धान्य. अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंची पूर्णपणे वाट लागली होती. 

            सांगली जिल्ह्यातील पुरपटटयातील २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील ११ अंशतः आणि एकूण ९४ गावे पुरबाधित झाली होती. सहा जिल्ह्यातील पाण्याची क्षमता आणि अवेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे झालेली विक्रमी वाढ. कोयना. ४८ ५९ ‌‌. धोम ६.४६ ‌‌. कनहेर ४.७३ . दुधगंगा. ११.३४ . राधानगरी. ३.३६ . तुळशी. १.१ ८७ . कासारी. १.६९ ‌. पाटगाव २.३१ . धोम. बलकवाडी. १.९९ . उरमोडी. ५.६५ . तारळी ३ ७७ . अलमट्टी. ९४.३७. असे सर्व धरणानी रूद्र रूप धरले होते. सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यात लहान मोठे बरेच बंधारे पाण्याखाली गेले. पुरामुळे सर्व जिल्ह्यांतील जनावरें. पक्षी. असे हजारो मुकी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यातील काही वाचली आणि काही मृत्युमुखी पडली. हजारों एककर जमीन व त्यावरील हाता तोंडाला आलेली पिके वाहून गेली काही पाण्याखाली राहून कुजून गेली तर काही शेती पुराच्या पाण्याने वाहून गेली हजारो एकर शेती पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली . 

              मदत करण्यासाठी आलेले पथके. रत्नागिरी मध्ये सहा. रायगड मध्ये एक. सांगली जिल्ह्यासाठी दोन . सातारा जिल्हा तीन. मुंबई दोन. सिंधुदुर्ग दोन . पुण्यात दोन . अशी एनडीए आरएफ २५ पथके तैनात करण्यात आली होती महापूर चे गांभीर्य ध्यानात घेऊन नौदलाची पाच पथके. लष्कराचे एक पथक . सीमा सुरक्षा दलाची दोन . हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर. कोल्हापूर व रत्नागिरी मध्ये तैनात करण्यात आली होती अशी पुरबाधित ठिकाणी तैनात करण्यात आले होते. अशी सर्व परस्थितीत जनतेला गोरगरीब माणसाला पुराच्या काळात मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी. तहसिलदार. सेवाभावी संस्था. सामाजिक संस्था. यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविले आहे.  

                नेते पुढारी आमदार खासदार मंत्री विरोधी पक्ष नेते. यांनी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे केला काहीजणांनी हेलिकॉप्टर मधून केला तर काहीजणांनी चौकात उभे राहून. पण कोणीही. पाण्यात बुडलेली शेती. पाण्यात बुडलेली घरे. हे पहाण्यासाठी पाण्यात चिखलात कोणी गेलेच नाही. बांधावर गेले तिथे सुद्धा त्यांच्या डोक्यावर छत्री धरुन एक पीये होता. म्हणजे पुरबाधित क्षेत्राचा सर्वे हा फक्त दिखावा होता का ? आले आणि सर्व पुरपरसथिती आम्ही पाहीली आहे. लवकरात लवकर पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे. घर पडझड पंचनामे. गोठे पडझड पंचनामे. घरात घुसलेले पाणी व गाळ यांचा उंचीनुसार पंचनामा. मयत जनावरें पंचनामा. वाहून गेलेली जनावरे पंचनामा. शेती खचून वाहून जाणे पंचनामे. संसार उपयोगी साहित्य पंचनामे. दुकानदार व लहान उद्योग धंदा करणारे यांचे पुरामुळे नुकसान त्यांचे पंचनामे. तात्काळ मदत १०.००० देणे. मयत पुराच्या पाण्यामुळे यांचें पंचनामे. कोंबड्या कुत्री. मांजर मयत पंचनामे. पुरबाधित लोकांसाठी शेजारी असलेल्या गावांनी अशा लोकांची रहाण्याची. जेवनाची सोय कपडे. पांघरूण यासाठी सतरंजी. अशा वस्तूंची सोय करण्यात आली होती. पुरबाधित लोकांसाठी शासनाने रायगड. रत्नागिरी सांगली. सातारा. सोलापूर कोल्हापूर. अशा सहा जिल्ह्यांसाठी प्रति कुटुंब प्रति व्यक्ती १० किलो गहू. आणि १० किलो तांदूळ. आणि पाच लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा कोणीतरी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे करायला आले होते त्यांनी दिला होता. कोणाला मिळाले नाही कोणाला मिळाले.खरोखरच पुरात नुकसान झाले त्यांचा सर्वे झाला कां ? त्यांना पुराची शासन जाहीर मदत मिळाली कां ? ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील. मंडल अधिकारी. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. यांनी आपले कर्तव्य विना पक्षपाती पणाने पार पाडले कां ? अजून सुद्धा पुरात पडलेल्या घरांची नुकसान भरपाई मिळाली कां ? दुकानदार लहान लहान उद्योग छोटे छोटे व्यावसायिक यांना पुराची नुकसान भरपाई मिळाली कां ? असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत 

              नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी पुरबाधित क्षेत्रांचे राजकारण केले आहे कारण पुरबाधित क्षेत्र बघायचे आणि सेल्फी काढायची आम्ही किती मदत करतो आहे. आम्ही पाण्यात चिखलात जाऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. नौकानयन यांचा पुराचे पाणी पाहण्यासाठी आनंद घेतला. म्हणजे गोरगरिब जनतेवर सर्वसामान्य माणसांवर आलेल्या वाईट वेळेच हसय केलय का ? 

       . आमच इस्लामपूर पुरबाधित लोकांना अन्न धान्य. राहण्याचा निवारा. पांघरूण यासाठी कपडे. वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून. जनावरांना चारा पाणी त्याचा निवारा त्यांची वैद्यकीय सेवा सुविधा. पुरबाधित भाग स्वच्छ करण्यासाठी विविध संस्था सामाजिक संघटना पुढे इस्लामपूर मधूनच आल्या. अशा विविध माध्यमातून पुरग्रसत भागातील लोकांना मदत उभी केली इस्लामपूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा निशिकांत भोसले पाटील दादा युथ तर्फे पुरबाधित लोकांनी ज्या देवळात. हाॅटेल. शाळा. काॅलेज. विविध मंगलकार्य. अशा ठिकाणी आश्रा घेतलेल्या लोकांच्या साठी रोज ५०० लोकांना औषध. चहापाणी. नाष्टा. पिण्याचे पाणी. पुरपरसथिती पूरवत. होईपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. कोणताही पक्ष असो नेता कोणताही असो मदतीचा ध्यास रक्तातच असावा लागतो हे सर्व इस्लामपूर करांच्या कडून शिका.  

               पुरबाधित लोकांचे नुकसान झाले त्यासाठी ज्या ज्या प्रमाणात शासनाने पंचनामे करून मदत देण्याचा आदेश दिला होता त्याप्रमाणे आपल्या आपल्या गावात सर्वे झाला आहे का? आजच त्याचा पाठलाग करा. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी यांनी पैसे घेऊन काही पंचनामे बोगस केले आहेत का. गाव आपल गावातील सर्व परस्थितीत तुम्हालाच माहीत असणार आहे कोण मोठा आहे कोण गरिब आहे. कोणाला मदत हवी होती मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली का नाही ? तुम्हालाच याचा सर्वे करण्याची गरज आहे कारणं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी या सर्व अधिकार व कर्मचारी यांना सापेक्ष ध स्वच्छ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनाम्यात बोगसपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची आजच संबधीत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा. 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सावधान खेळ नजरबंदीचा?

 

सावधान खेळ नजरबंदीचा ?

                    १९९२ साली सरकारने मुक्त आर्थिक धोरणाचा सविकार केल्यानंतर किरकोळ विक्री क्षेत्रात काही मोठ मोठे उद्योगपती व धनिकांनी प्रवेश केला. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठमोठी चकाचक दुकानें ( हायपरमार्केट ) सुरू करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला परंतु सर्वसामान्य ग्राहक एवढ्या मोठ्या चकाचक दुकानांमध्ये जायला बिचकत होते त्यामुळे अनेक मोठमोठे माॅल नुकसानीत जाऊन बंद पडले तरीही या क्षेत्रात नवनवीन गुंतवणूकदार ( धनिक ) आपलेच नशीब आजमावून पहात होते सर्वसाधारण वीसेक वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतात त्या वेळी अनेक शाखा असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये त्यांनी एम आर पी रूलमधये पळवाटांचा गैर फायदा घेऊन एफ जीसी. क्षेत्रातील काही उत्पादकांकडून त्यांच्या उत्पादनाचे मोठे मोठे पॅक स्पेशल किमती टाकून बनवून घेतले व स्थानिक वृतमानपत्रामधये एम आर पी वर डिस्काउंटचया मोठ मोठ्या जाहिराती दिल्या ही युक्ती इतकी यशस्वी झाली की ग्राहकांच्या प्रचंड गर्दी मुळे त्या चार दिवसांत अनेक ठिकाणी सदर माॅलचया आजूबाजूच्या परिसरातील वहातूक यंत्रणा कोलमडून पडली. अशाप्रकारे या धनिकांच्या ग्राहकांना लुबाडणयाचया या नविन गोरखधंदा शोध लागला ही फसवणूक अंत्यंत चाणाक्षपणे कोणताही कायदा न मोडता केली जात असून त्याचे विस्तृत विवेचन पुढे करण आहे 

            इंडियन मेटरोलाॅजी अॅकट हा कायदा येण्यापूर्वी कोणत्याही उत्पादनावर विक्री किंमत छापलेली नसायची यांमुळे एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी दराने विक्री केली जात असे. यामध्ये ग्राहक यांची मोठी आर्थिक लुट केली जात होती. त्यामुळे ग्राहकांच्या हीताचे रक्षण करून त्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने १९७६ साली देशात एम आर पी रूल लागू करण्यात आला व १९९० साली या कायद्यात काही किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. या कायद्यानुसार उत्पादकांचा त्यांच्या उत्पादनावर विक्री अधिकतम किंमत छापणे बंधनकारक करण्यात आले. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणारे दुकानदार विक्री करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जबरी दंड व शिक्षा तरतूद करण्यात आली आहे. वरवर पाहता ग्राहकांच्या हिताचे रक्षण करून त्यांची फसवणूक टाळण्यासाठी ही तरतूद अतिशय छान आहे. असेच सर्वसाधारण चित्र आपणासमोर निर्माण होते. परंतु या कायद्यातील मुख्य उणीव अशी आहे की उत्पादकांची त्यांच्या उत्पादकांवर किरकोळ विक्री किंमत किती छापावी याबाबत सरकारने कोणतेही नियम व मार्गदर्शक तत्वे बनविलेली नाहीत. छापील किमतीपेक्षा एक पैसाही जास्त घेणे हा गुन्हा आहे. परंतु उत्पादन मूलयापेक्षा अनेक पटींने भरमसाठ किमती छापणे यात कोणताही गुन्हा नाही. तसेच एकाच उत्पादनाच्या वजनात अथवा संख्येत थोडासा फेरफार करून कोणताही ताळमेळ नसलेली मनानुसार ती किंमत छापण्यात कोणताही गुन्हा नाही. थोडक्यात उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर वाटेल ती किंमत टाकण्याची मुभा किंमत टाकण्याची कायदेशीर मुभा आहे यांचाच गैर फायदा घेऊन दैनंदिन वापरातील वस्तूंच्या मोठ्या पॅकवर अधी भरमसाठ किंमती छापल्या जातात. त्यांनंतर सदर उत्पादने आॅनलाइन कंपन्या व मोठ मोठे हायपर मार्केट द्वारे जाहिराती करून ग्राहकांना डिस्काउंट चे आकर्षण. दाखवून खरेदी करण्यासाठी उद्युक्त केले जाते. तसेच अनावश्यक खरेदी करण्यासाठी पण उकसावले जाते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या व्यापारी लोकांनी ग्राहकांची फसवणूक केली व त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी नवनवीन पद्धती शोधून काढल्या खतपाणी घातले. किंमती वाढल्या. त्याच लबाड व्यापारी यांच्या दुकानांत अक्षरशः रांगा लावून ग्राहक खरेदी करत आहेत 

फसवणूक होण्याची आणि करण्याची पद्धत 

* एकादी वस्तू दहा रुपयांत शंभर ग्रॅम असेल तर एका किलो साठी शंभर रुपये किंवा त्याहून कमी किंमत असायला पाहिजे परंतु एम आर पी कायद्यात अशी तरतूद नसल्याचा गैरफायदा घेऊन एफ एम जीसी क्षेत्रात छोटे पॅक स्वस्त व मोठे पॅक महाग विकून ग्राहकांना अनाकलनीय पध्दतीने लुटले जाते

* आॅगसट २०२० नुसार १०० ग्रॅम रेड लेबल चहाच्या पॅकची किंमत ३५ रुपये आहे. या हिशोबाने याच चहाच्या एका किलोच्या एका पॅकची किंमत ३५० रूपये असायला हवी परंतु सदर पॅकची किंमत ४७० रू म्हणजे १२० रूपयांनी महाग आहे याचप्रमाणे सोसायटी. वाघबकरी. व अन्य कंपन्यांच्या चहाच्या मोठ्या पॅकचया किंमतीत खूप तफावत आहे

* नेसकॅफे साडे सात ग्रॅमचया पाकीटाची किंमत दहा रुपये आहे. सात पाकिटे खरेदी केली तर सत्तर रुपयात साडे बावन्न ग्रॅम काॅफी मिळेल परंतु पन्नास ग्रॅमचया पाकिटाची किंमत एकशे चाळीस रू म्हणजे दुपटीहून जास्त आहे

* विविध कोलगेट कंपन्या व टुथप्रेश ५० ग्रॅमची किंमत २० रूपये आहे परंतु १५० ग्रॅमची किंमत ९५ रूपये आहे म्हणजे दिडपट जास्त आहे जवळपास सर्व अन्य टूथपेस्ट चया. बाबतीतही अशीच खूप तफावत आहे

* दहा रूपये पाॅनडस पाऊडर चे वजन २५ ग्रॅम आहे या हिशोबाने १०० ग्रॅमचया डब्याची किंमत ४० रूपये असायची हवी होती परंतु त्याची किंमत ९० रूपये म्हणजे ५० रुपये जास्त आहे

* सनसिलक शांपूची ६ एम एल ची पुडी एक रूपया आहे या हिशोबाने १८० एम एल चया बाटलिची किंमत ३० रुपये असायला हवी परंतु तिची किंमत ९५ रूपये आहे

           अशाप्रकारे जवळपास सर्वच कंपन्यांची चहा. काॅफी. टूथपेस्ट. साबन. डिटर्जंट. काॅसमेटिक शॅम्पू. इत्यादी दैनंदिन जीवनातील अनेक उत्पादनाच्या मोठ्या पॅकचया किमती छोट्या पॅकचया तुलनेत खूप जास्त छापलेल्या असून सदर सर्व उत्पादने आॅनलाइन पोर्टल व हायपर मार्केट मधून ग्राहकांना डिस्काउंट चे आकर्षण दाखवून विकली जात आहे. विशेष म्हणजे हायपर मार्केट आॅनलाइन पोर्टल वर या उत्पादनाचे छोटे पॅक उपलब्ध नसतात. सर्व वस्तू छोट्या मोठ्या पॅक मध्ये वस्तूला गुणवत्ता नाही हे आम्ही स्वता पडताळून पाहीले आहे. तसेच कायद्यानुसार एकाच ब्रनडचे कोणतेही उत्पादन वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये वेगवेगळ्या दर्जाचे विकले जाऊ शकत नाही. व तसे करणे कायद्याने गुन्हा आहे. ही फक्त आणि फक्त ग्राहकांची फसवणूक आणि आर्थिक लुट असून सर्वसामान्य ग्राहकांना ही गणिते लक्षात येत नाही व पगार झाल्यावर दैनंदिन जीवनात लागणार्या वस्तूंचे मोठे पॅकिंग खरेदी करण्याकडे कल असतो. याचा गैरफायदा घेऊन हा गैरप्रकार सुरू आहे. बाजारात १२५ ग्रॅम वजन असणारा एका सुप्रसिद्ध कंपनीचा ब्रॅण्ड बाथ सोप हायपर मार्केट मध्ये ११० ग्रॅम वजनाचा आहे व दोन्हींची किंमत एकच आहे हा सुक्षम फरक आपल्याला ध्यानात येत नाही याशिवाय ग्राहकांची फसवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्पादकांकडून ग्राहकांच्या सहजासहजी लक्षात येणार नाही असा निकृष्ट दर्जाचा. कमी वजनाचा माल बनवून घेतला. जातो. आणि रिजेकट झालेला माल विक्रीकरणारे विकत घेतात आणि तोच माल फेरश आहे म्हणून विकला जातो. स्वस्तात विकला जातो. नियर एक्सपायरी माल विकणे. एम आर पी वर सवताचे लेबल लावणे अश्या फसवणूकीचया असंख्य तरहा आहेत परंतु तो विषय वेगळा आहे भरमसाठ किंमती छापणयामुळे सेवा क्षेत्रात ग्राहकांना कसे फसवतात याचे फक्त एकच फंडा आहे 

            इलेक्ट्रॉनिक. हार्डवेअर. पेंटस. सॅनिटरी वेअर. पलमबिंग वस्तू. वर देखील मनमानी किंमती छापलेल्या असतांत जेव्हा कोणी आपल्या जागेचे फर्निचर. नुतनीकरण किंवा दुरुस्ती काम हाती घेतो तेव्हा काही सुतार प्लंबर इलेक्ट्रॉनिक व इंटिरिअर किंवा सामग्री त्यांच्या ओळखीच्या दुकानदारांकडून आणण्याचा सल्ला देतात आणि आग्रह धरतात कारणं त्यात त्यांचे कमिशन असते. आणि समजा मालकाने दुसर्या दुकानातून आणले तर त्या मालात खोट काढतात. म्हणजे कारागीर यांच्या ओळखीचे दुकानदार मनमानी छापलेली किंमत कमिशन सह ग्राहकांच्या गळ्यात मारतात. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वस्तू. कपडे. पॅकेजड. फूडस. मोबाईल लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. सौंदर्य प्रसाधने. साफसफाईची सामग्री. पादत्राणे. इ. जवळपास सर्वच नितयोपयोगी उत्पादनावर मनमानी एम आर पी छापून ग्राहकांची फसवणूक केली जाते अशा प्रकारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यात हा एम आर पी कायदा संपूर्ण अपयशी ठरला आहे. याउलट या कायद्यातील पळवाटांचा गैरवापर करून ग्राहकांना अक्षरशः लूटले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे अप्रत्यक्षपणे दरमहा किमान एक हजार विनाकारण अधिक खर्च होत असून देशात पंचवीस ते तीस कोटी कुटुंबे आहेत. त्यानुसार ही रक्कम वर्षाकाठी किमान अडिच ते तीन लाख कोटी रुपये होते. त्या हिशोबाने आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरचा सर्वसामान्य जनतेची लुटमार करणारा हा सर्वात मोठा घोटाळा दरवर्षी होत आहे. खेदाची बाब ही आहे की यातील अधिकांश पैसा उत्पादक मोठ मोठे उद्योगपती व हायपर मार्केट मालकाच्या खिशात जात आहे. उलटपक्षी सर्वसामान्य जनतेचा कश्याप्रकारे विनाकारण व अप्रत्यक्ष रित्या जास्त खर्च होत असल्याने गरिब व मध्यमवर्गीय आणखीनच गरिब होत चाललेला असून समाजातील आर्थिक असमानता प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. वाळूत कमिशन. खडी मध्ये कमिशन. लाकूड यामध्ये कमिशन. असे विविध वस्तू मध्ये दुकानदार काम करणार्या लोकांना आर्थिक कमिशन देतात. आणि ग्राहकांना लुटतात. 

          औषधांत होणारी ग्राहकांची लूट. काही औषधांवर काही पटिने किंमती छापून सदर कंपन्या त्यांची औषधें रुग्णांस लिहून देण्याचा आग्रह करतात आणि औषध कंपन्या या डॉ लोकांना काही आर्थिक आमिष देतात. काही डॉ या आमिषाला बळी पडून अनावश्यक औषधे लिहून देऊन रुग्णांना लुटतात खड्ड्यात घालतात. तर काही डॉ यांचें मेडिकल वालयासोबत सगणमत करून त्याच मेडिकल मधून औषध खरेदी करण्याचा आग्रह धरतात. आणि अशी औषधे लिहून देतात की ती औषधे त्यांनी चिठ्ठी दिलेल्या मेडिकल मध्येचं उपलब्ध असतात दुसरीकडं नाही. नाहीतर ज्या डॉ लोकांनी औषध लिहून दिले आहे ते त्यांच्याच मेडिकल मध्ये उपलब्ध असते आणि त्या औषधांची किंमत दुप्पट लावलेली असते. भरमसाठ किंमती छापल्यामुळे व सरकारचे नियंत्रण नसल्याने. वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवसाढवळ्या लुटरे जात आहे दुर्दैवाने एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणाला अपघात किंवा गंभीर आजार झाला तर औषध उपचारासाठी त्याची सर्व पुंजी. बचत. दागदागिने व सर्व मालमत्ता जाऊन तो अन्नाला महाग होणो तर काहीजण‌ भिकेला लागतात. जर औषधांवर व्यवस्थित किंमती व दवाखान्यात कोणत्या उपचारासाठी किती खर्च येईल असे लिहणे गरजेचे आहे दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात बरेच काही लिहिण्यासारखे आहे म्हणजे डॉ मनमानी फी. अनाठायी औषधांचा खर्च. अशी होणारी लूट थांबली पाहिजे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा पुस्तकात नको अमलात आणा त्यासाठी आपल्या सर्वांची मदत सुधबुधद गरजेची आहे 

            व्यापारी छोटे छोटे पारंपारिक व्यापाराची मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्याची क्षमता नाही. आणि हे सर्व जण असंघटित आहेत उत्पादकांना प्रत्येक छोट्या छोट्या दुकानात माल वितरित करणे खर्चाचे असते. म्हणून या छोट्या छोट्या व्यापारी यांना कमी नफा देतात. त्यामुळे हा छोटा व्यापारी हायपर मार्केट किंवा आॅनलाइन एवढा डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक डिस्काउंट चया आशेने हायपर मार्केट किंवा आॅनलाइन पध्दतीने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आज बाजारात गर्दी कमी आणि हायपर मार्केट किंवा आॅनलाइन वर ग्राहकांची जास्त गर्दी दिसत आहे. यामुळे छोटे छोटे पारंपारिक व्यापारी व व्यवसाय बुडत चालला आहे. त्यामुळे छोट्या व्यापार्यांना दररोज खर्च भागविणे सुध्दा जड झाले आहे. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणार्या लोकांची दुकानें बंद पडली आहेत. तर कुठेना कुठे तरी धनिक मोठे व्यापारी यांची नवनवीन भव्य दिव्य हायपर मार्केट किंवा आॅनलाइन दुकानें सुरू होताना दिसत आहेत. जर अशा प्रकारे सर्व चालू राहिले तर निश्चितच हळूहळू सर्व छोटी छोटी दुकाने छोटे छोटे व्यापारी मरून जातील आणि निश्चितपणे रिटेल क्षेत्रातील काही व्यवसायात काही ठराविक धनिकांची मक्तेदारी निर्माण होईल तसेच उत्पादक एकच उत्पादन विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दराने वितरित करित असल्याने छोट्या व्यापारी यांची कोणतीही चूक नसताना. ग्राहकांचा अशा दुकानदार यांच्यावरील विश्वास संपत चालला आहे. यामुळे यांना व्यवसाय करणे अवघड झालेले असून प्रामाणिक पणे काही कामधंदा करून आपला उदरनिर्वाह चरितार्थ चालविण्याचा व स्वाभिमानी जगण्याचा त्यांच्या हक्क नाकारला जात आहे. हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्क यांवर अतिक्रमण असून सारासार अन्याय केला आहे 

              आपल्या देशात अंदाजे सहा ते सात कोटी किरकोळ व्यापारी असून त्यांच्यावर लाखो वितरक व वाहतूकदार अवलंबून आहेत. त्या छोट्या छोट्या व्यापारी लोकाच्या कडे. किमान १० लाख कर्मचारी असण्याचा व वाहतूकदार असतील असा अंदाज आहे. यातील बहुतांश लोकांचे शिक्षण जास्त झाले नसून अन्य कोणतेही कौशल्य या वर्गाकडे नाही. या किरकोळ क्षेत्रांवर सदर व्यापारी त्यांचे कर्मचारी आणि या सर्वांचे कुटुंबीय असे ३० ते ४९ कोटी लोक एकामेवर अवलंबून आहेत परंतु मोठ मोठ्या धनिक व उद्योगपतींनी रिटेल क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे आज या सर्व छोट्या छोट्या व्यापारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी कुटुंबीय यांचें भवितव्य धोक्यात आले आहे छोटे व्यापारी यांची मनासारखी कमाई होत नसल्याने असा वर्ग कामगारांना पुरेसा पगार देऊ शकत नाही तो स्वतःलाही खर्च करताना फार विचार करून खर्च करत आहे. नवीन गुंतवणूक करणे. अशक्यच आहे. त्यामुळे छोट्या व्यापारी लोकाच्या मालाचा उठाव कमी होत चालला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होत आहे अॅटोमोबाईल क्षेत्र. रिअल इस्टेट क्षेत्रावर पण झालेला दिसतो. आपली अर्थव्यवस्था एका दुष्टचक्रात अडकलेली आहे. देशातील तीव्र मंदी आणि बेरोजगारी हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचे कारण आहे आपल्या देशातील उत्पादन होणारा माल म्हणजे कांदा बटाटा तूर मूग उडीद हरभरा हे त्या वर्षातील पूर्ण पिक खरेदी करण्याची क्षमता असणारे धनिक उधोगपती. आपल्या देशात आहेत. परंतु कोणीही असे करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची लुटमार करु नये यासाठी सरकारने शेतीमालासाठी # साठा नियंत्रण कायदा # लागू केला त्याप्रमाणे जर ३० ते ४० कोटी जनतेच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होऊन जर ते देशोधडीला लागणार असतील तर सरकारने या विषयात लक्ष देणे गरजेचे आहे हे जर असेच चालू राहिले तर प्रचंड अर्थिक ताकदीच्या जोरावर हे धनिक सर्व प्रतिस्पर्ध्यांना संपवून एक एक क्षेत्र गिळांकृत करतील व भविष्यात आपल्या भावी पिढ्यांना या धनिकाकडेच ते देतील त्याच पगारात नोकरी करणे व ग्राहक म्हणून ते देतील त्याच वस्तू व ते देतील त्या दरात घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही 

ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी जी एस टी व एम आर पी कायदा अंमलात आला कोणत्याही उत्पादनाचे मोठे पॅक व लहान पॅक यांचें वजन आणि किमतीमध्ये सुयोग्य प्रमाणात गुणोत्तर असावे. म्हणजे लहान पॅकचया किंमतीत व तुलनेत मोठा पॅक महाग नसावा. सर्व उत्पादनावर त्यांची एम आर पी व वजन मोठ्या अक्षरात छापणे बंधनकारक असावे जेणेकरून ग्राहक तुलनात्मक अभ्यास करू शकेल. प्रत्येक उत्पादनावर सदर उत्पादनाचे मूल्य प्रकाशित करणे बंधनकारक आहे. किंमती नियंत्रण मंडळ प्राईस कंट्रोल बोर्ड स्थापन केले जावे प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात यावे. कोणतीही आॅफर उदा सेल. डिस्काउंट. एकावर एक फ्री. एक्स्ट्रा फिरी. अशा विविध ग्राहकांना फसविणारया योजना बाजारात येण्यापूर्वी पी सी बी द्वारे त्याची सत्यता चाचणी पडताळणे बंधनकारक आहे. जी एस टी छापील किंमतीवर उतपादकाकडूनच वसूल केला गेला तरच मनमानी किंमती छापणे याल आळा बसेल. जी एस टी नंबर धारण केलेल्या सर्व रजिस्टर व्यापारी यांना उत्पादकांकडून एकाच दराने मिळावा. म्हणजे उत्पादनाचा दर्जा वजन यामध्ये उत्पादक बदल करणार नाही व ग्राहकांची फसवणूक होणार नाही

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न

 

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न 


पुणे, प्रतिनिधी : 

लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

         दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.  

        या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, अभिनेत्री संगीता चवरे, अभिनेता अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, साहाय्यक दिग्दर्शक अरबाज शेख अभिनेत्री आरती पाटील, अभिनेता कुतुबुद्दीन गड्डेकर, अभिनेता नागेश स्वामी, अभिनेता आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, अभिनेत्री प्राजक्ता ठिगळे, अभिनेत्री शैला पाटील अभिनेत्री शोभा देशपांडे, अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता सलमान शेख, अभिनेता सतीश कुंभार आदी उपस्थित होते.

         धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर 5 निर्माता मिथलेश अगरवाल केतन जाधव आणि सय्यद शेख यांच्याकडे आहे.

वाट पाहत आहे?

 

# वाट पाहत आहे #

सुरक्षित अंतर ठेवा. पुढे धोकादायक वळण आहे. पुढे शाळा आहे. पुढे गाव आहे. वेग आवरा जीवन सावरा. गाडी वेगाचे संतुलन ठेवा. जीवन अनमोल आहे. आपल्यासाठी पालथ्या घड्यावर पाणी अस आहे

                   युगात पहिल्यांदा चाकांचा शोध लागला आणि मानवाच्या जीवनाला गती मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्टीची सुरुवात चाकापासून झाली.     

गतकाळात लोकसंख्या कमी होती. त्यावेळी होणारें विविध जीवनावश्यक वस्तूंचे दळणवळण. हे बैलगाडी या माध्यमातून होत होते. शेती सामान आणने नेणे. शेतातील भाजीपाला व इतर वस्तू आवक जावक करण्यासाठी बैलगाडी उपयोगात आणली जात होती. लग्नाला सुध्दा गाडीतून व्हराड नेले जात होते.आगोदर आठ दिवस निघावे लागत होते. आणि जरा आपले जीवन सुधारले. आणि सायकलीचा शोध लागला. आणि थोडी जीवनाला गती आली. लोकांना इतरत्र जाणे येणे सोयीस्कर झाले. आणि थोड्या प्रमाणात अपघात होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत होत राॅकेलवर चालणारी. जावा. एझडी. बुलेट अशा कमी बजेटच्या गाड्या तयार होण्यास सुरुवात झाली. असा बदल होत सर्वात बुद्धिमान समजला जाणारा माणूस याने चारचाकी गाड्यांच्या शोध लावला. त्यावेळी चारचाक. इंजिन एवढ अँडव्हान्स नव्हतं त्यावेळी ताण ब्रेक होते. अशी सर्व रचना होती. गाड्या मुबलक मिळवणारे राॅकेल यांवर चालत होत्या. 

                 जुन्या काळी सिनेमांत प्रामुख्याने घोड स्वारी व तयाशी निगडित सिनेमे आपण पाहिले आहेत. त्यानंतर दोनचाकी गाड्या दिसायला लागल्या. आणि सिनेमाची गोडी वाढली. आणि आत्ता चारचाकी. अलिशान गाड्या दिसायला सुरुवात झाली. 

                    माणसाच्या रक्त वाहिन्या असतांत त्याप्रमाणे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा. विकास हा आपल्या दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो म्हणजे त्या विकासासाठी गरजेचा मुद्दा असणारा म्हणजे रस्ता. पहिल्या काळात डांबरी सिमेंट रस्ते नव्हते. मजबूत पुल नव्हती. लहान लहान पुलं होती. आज विकासाचा भकास झाला आहे. रस्ते डांबरीकरण. सिमेंटचे रस्ते. गावांसाठी जोडणारे दळणवळण सोपे करणारे रस्ते तयार झाले. रस्ते तयार करण्यासाठी आडवी येणारी झाडे. घर. डोंगर. एवढंच काय गावच्या गावं स्थलांतरित करण्यात आली आणि त्यांना मोडका तोडका आर्थिक मुहावजा देण्यात आला आपला विकास साधण्याचा फसवा प्रयत्न केला. आज जागोजागी तयार होणारे रस्ते. पुलं. बंधारे. धरणे. कालवे. बोगदे. अशी विविध आपला विकास साधणारे उपायोजना करण्यासाठी नेमले जाणारे विकास कार्यक्रम आज आपण निवडून दिलेले नेत पुढारी आमदार खासदार मंत्री यांचे बगलबच्चे आपल्या सत्तेचा गैर वापर करून लाखची कोटींची टेंडर घेतात का तर तो त्या जिल्ह्यातील आमदारांचा मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून आणि एकवेळ अशी येते आपण पेपर वृतमानपत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो कि उद्घाटन दिवशी पुलं पडल. बंधारा. धरण. वाहून गेल. किती वाईट आहे यात आपल्या मिळकतीची एक तरी रुपया आहे. विचार करा इंग्रजांच्या काळात तयार केलेले पुल. बंधारे. धरणे कालवे. हे आजसुद्धा ४०० वर्षे त्यांच्या कामांची पोचपावती देत आहेत आज कोणत्याही पेपरमध्ये वृतमानपत्रात इंग्रज काळातील एखादे पुल बंधारा धरणं. कालवा वाहून गेला असं एकल नाही कारणं आजसुद्धा यांनी बाधलेली वास्तू सुरंग लावून पाडावी लागते त्यावेळी सापेक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त काम होत होत. उगाचंच जुनी माणसं म्हणायची नाहीत इंग्रज काळात काठीला सोन बांधून फिरा म्हणजे त्यावेळी जनजीवन किती सुरक्षित होत. आज सर्वजण पैश्याच्या माग लागलं आहेत. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार अशे एकही प्रकरणं इंग्रज काळात नव्हते कारण जसा गुन्हा आहे तशीच सजा होती. आज एखाद्या आरोपीला वरिल कोणत्याही गुन्ह्याची सजा झाली तर त्याला पोलिस कोठडीत वहिआयपी वागणूक दिली जाते आणि चार सहा महिन्यांत तो आरोपी अजून असेच गुन्हे करण्यासाठी निर्दोष सुटतो. ही आपली ढिसाळ झालेली प्रशासन व्यवस्था. इंग्रज काळात चोरी केली तर हात तोडा. वाईट नजरेने बघितल तर डोळ काढा. अशा विविध सजा होत्या म्हणजे इंग्रज काळात आपण गुलाम नव्हतो तर आच आपण आपल्याच लोकाची गुलामी करत आहोत 

                  आज काळ बदलला आणि माणसाला मशिनची गती आली. सर्वत्र चकाचक रस्ते. दळणवळण जवळ झाले. मालाची आवक जावक झपाट्याने होऊ लागली आणि वेळेची सर्वात मोठी बचत झाली आपणांस हवे असणारे आपल्याला वेळेत मिळण्यास सुरुवात झाली. उलटपक्षी विचार केला असता सायकलीने भंगार दुकानांत जागा घेतली. जुन्या गाड्या शोरूममध्ये शोपिस म्हणून बसल्या. आज चार गियर. पाच गियर. अशा. जागयावरुन १८० सपिड घेणा-या नवीन नवीन गाडया. २०.००० पासून ४/५ लाखांपर्यंत दोन चाकी गाड्यांच्या किंमती आहेत. त्याचबरोबर चारचाकी गाड्या. १ लाखापासून ४/५ कोटी त्यापेक्षा ही महागड्या गाडया आज सर्वत्र नाही पण दिसतर आहेत वाहन आपली किंमत आपले वजन दाखविण्याचे साधन आहे. गाडी आपली आहे त्याचे सपिड सुध्दा आपल्या हातात आहे हे आपण विसरतो 

          आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मयत लोकांचे प्रमाण भयान झाले आहे. ज्यावेळी एकादा अपघात होतो त्यावेळी कोणी मदत करण्यासाठी. येत नाही कारणं पोलिस स्टेशनला जाण्याचा त्रास. जाब जबाब याचा ससेमारा. यामुळे शासनाने अपघातग्रस्त लोकांना मदत करणार्या व्यक्तिला पोलिस स्टेशनला सुध्दा चौकशी साठी बोलवू नये असा आदेश दिला आहे. अपघातात आई वडील भाऊ बहीण सगेसोयरे. यांचा मृत्यू झाला तर तो काळ किती वाईट असेल कारण कोणी आई गमावली. कुणी मित्र गमावला. कुणी वडील गमावले. कुणी बहिण भाऊ गमावले. असा प्रसंग सुध्दा आला आहे की सर्व कुटुंब जागीच ठार झाले आहे. कोण कोणासाठी रडत असेल. विचार करा. रस्त्यावरून शाळेला जाणारी मुलं मुली घोळखा करून चालतात त्यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर चालणारे वयोवृद्ध. पुरुष महिला. तरुण. लहान मुल. अशा अनेक व्यक्तिं रस्त्यावरून चालत असतात सुरक्षेच्या दृष्टीने जे काय पाहिजे ते शासन नामफलक लावून वाहन चालक यांना सावध करत असते. पण आज काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या बापाने बॅंकेकडून व्याजाने पैसे काढून घेवून दिलेली गाडी मुल अति वेगाने चालवत असतात. डबरा नाही. सपिड ब्रेकर नाही. अशी गाडी चालवत असतात. वेळ चांगली असेलतर ठिक आहे नाहीतर अपघात झाला तर स्वता मरणार आणि सोबत चार दोन घेवून जाणार काय वाटत असेल त्या आई वडील यांना आपण कधी विचार करतच नाही. 

              अपघात झाल्यावर घटनास्थळी बघणारे. अपघातग्रस्त लोकांच्या वस्तू पैसे वेळ पडल्यास गाड्यांचे पार्ट काढून घेतात. म्हणजे अपघातांत मरत असणारे लोक याकडे कोणी लक्ष सुध्दा देत नाही.  

              शासनाने विविध वाहतूक नियम अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत पण आपण त्या पाळतो का ? केवळ आपण आपल्या हलगर्जीपणा आज बरेच अपघात होत आहेत. अपघातात मयत झालेल्या व्यक्तिच्या घरच्या लोकांना आर्थिक सहाय्य देण्यापेक्षा. ज्याचा कडून अपघात झाला आहे अशा गुन्हेगार लोकांनी त्या अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईक यांना मरेपर्यंत पोसणयाचा आदेश द्यावा. अन्यथा वयानुसार आर्थिक लाभ देण्यात यावा. कारणं अपघातात हात पाय मोडणे. तोंडावर विविध खुना पडणे चेहरा विद्रूप होणे. काहीजण मूके बहीरे होणे. मनोरुग्ण. शारीरिक अपंग. विकलांग. अशा विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे काम होत नाही. घरच्या लोकांवर ओझ होत आणि अशा प्रस्थितीत अपघातग्रस्त लोक आत्महत्या सारखें मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपवितात

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इसलामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा राज्य

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जगण्यासाठी संघर्ष

 

जगण्यासाठी संघर्ष 

                 जी वस्तू आपल्याजवळ नाही पण ती आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी आहे अशी वस्तू शोधने किंवा पदरांत पाडून घेण्यासाठी  आपणास करावे लागणारे अटोकाट प्रयत्न म्हणजे # वणवण #     आपणास बरेच काही ज्ञान देतो हा शब्द आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे पूर्ण झाली असताना सुध्दा बर्याच गोष्टी साठी आपणास गोरगरीब जनतेला महिला. मुल यांना अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे. प्रत्येक जीवनावश्यक गोष्टी साठी वस्तू साठी वणवण करावी लागते 

                    गरिबी सर्वात मोठा शाप आहे आपल्याला आणि ही वेळ आपल्यावर आणणारे आपलेच नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे आहेत कारणं नोकर भरती नाही.  नवीन नवीन विदेशी कंपन्या यामध्ये परराज्यातून येणारे कामगार.  आर्थिक विकास महामंडळ बोगस कामकाज.  गरज आहे त्याला एक रूपया मदत नाही. आणि नेते यांचे बगलबच्चे यांना विना अट कर्ज यामुळे भयानक प्रमाणात निर्माण होणारी बेरोजगारी. यातून व्यसनी तरूण त्यातूनच खून मारामाऱ्या अपहरण बलात्कार खंडणी. बेकायदा व्यवसाय. यांना उत येते आणि निर्माण होणारी पिढी गुन्हेगार पैदा होतात त्यामुळे त्यांच्या पालकांना आई वडील नातेवाईक यांना पोटासाठी आपले गाव सोडून दुसर्याच्या गावात वणवण करत फिरावे लागते. 

                  ज्या ठिकाणी चारा नाही. पिण्यास पाणी नाही.  निवारा नाही.  जगण्याचे साधन नाही.  ज्या झाडांना फळे फुले लागत नाहीत अशा ठिकाणी पक्षी सुध्दा राहत नाहीत. अशी जागा पक्षी लवकरात लवकर सोडतात म्हणजे पोटासाठी वणवण पक्षांना सुध्दा करावी लागते 

                रोजगार.  व्यवसाय. शिक्षण. विवाह. जन्मानंतर. कुटुंबासह.   व इतर कारणांनी आपल्या भारतातील जनतेला गोरगरीब लोकांची एकूण पोटासाठी स्थलांतर करणार्या लोकांची अंदाजे संख्या ४.१७ लाख आहे. यापैकी ग्रामीण भागातून २२४.५ लाख आणि नागरी भागातून १९२.६५ लाख असे एक अंदाजे समिकरण करण्यात आले आहे यापेक्षा स्थलांतरित लोकांचा आकडा जास्त असणार आहे यामध्ये एकूण पोटासाठी वणवण करण्यात पुरुष संख्या १६७.६५ लाख एवढी आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष संख्या ६८.२२ लाख एवढी आहे. आणि महिलांची संख्या २४९.५२ लाख एवढी आहे. नागरि भागातून स्थलांतर करणारे पुरुष संख्या ९९.४२ लाख आहे यामध्ये महिलांची संख्या ९३.२३ लाख एवढी आहे. महाराष्ट्रात टक्केवारी नुसार पोटासाठी वणवण करण्याची अनेक कारणें आहेत त्यामध्ये प्रामुख्याने  विवाहामुळे होणारे स्थलांतर. सर्वात जास्त आहे यांची टक्केवारी ३५.६४ आहे.  या खालोखाल कुटुंबासह पोटासाठी स्थलांतर करणारेही टक्केवारी १७.२३   # रोजगार १६.५५ # इतर कारणांमुळे होणारे स्थलांतर. १६.४२ # जन्मानंतर स्थलांतर १२.२५ # शिक्षणासाठी स्थलांतर १.४५ # व्यवसायामुळे स्थलांतर नगण्य आहे कारणं व्यवसाय हा आपण जिथे राहतो तिथे केला जातो पण तो स्थायी असेल का ? यांवर बरेच अवलंबून आहे. 

*. रोजगारामुळे होणारे स्थलांतर. २००१ आकडेवारी नुसार महाराष्ट्रात रोजगारामुळे  ६९.०५ लाख एवढे आहे. यापैकी पुरुष संख्या ६२.३२ लाख आहे. महिलांची संख्या बरीच कमी आहे फक्त ६.७३ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुष संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष संख्या ५५ लाखांनी जास्त आहे. रोजगारासाठी पुरुष एकटेच बाहेर पडतात. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे १७.९० लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १४.१३ लाख आणि महिलांची संख्या जेमतेम ३.७७ लाख आहे. ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष यांची संख्या सुमारे १० लाख जास्त आहे   शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे पुरुष एकूण. ५१.१५ लाख आहे.  लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले आहे.  यापैकी पुरुष संख्या  ४८.२० लाख आहे महिलांची संख्या फक्त २.९६ लाख आहे. 

* व्यवसायामुळे होणारी वणवण महाराष्ट्रात व्यवसायामुळे १.९३ लाख लोकांनी स्थलांतर केले यापैकी पुरुषांची संख्या १.६७ लाख आहे. तर महिलांची संख्या फक्त २५.००० हजार आहे.  रोजगाराप्रमाणेच व्यवसायासाठी प्रामुख्याने पुरुष आपले पूर्वीचे ठिकाण सोडतात आणि यामध्ये महिलांची संख्या पुरुषांची संख्या १.४२ लाख आहे.   व्यवसायासाठी ग्रामीण भागातून व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात ३८.००० हजार लोकांनी पोटासाठी वणवण केली. यापैकी पुरुषांची संख्या २६.००० तर महिलांची संख्या १२.००० आहे  शहरी भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २.९३ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १.४१ लाख आहे तर महिलांची संख्या फक्त १३.००० हजार आहे 

* शिक्षणामुळे वणवण. महाराष्ट्रात शिक्षणामुळे स्थलांतर करणारे यांची संख्या ६.०४ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या ४.४१ लाख आहे. आणि मुलींची संख्या फक्त १.६३ लाख आहे शिक्षणासाठी स्थलांतर करणार्या मुलांपेक्षा मुलींची संख्या सुमारे २.९ लाख आहे. याचप्रमाणे मुलींचाही शिक्षणासाठी स्थलांतराचा कल जास्त असत नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शिक्षणामुळे स्थलांतर केलेल्यांची एकूण संख्या २.१२ लाख आहे. असून मुलींची संख्या १.४८ लाख आहे. तर मुलांची संख्या ६४.००० हजार आहे.  मुलींपेक्षा मुलांची संख्या २.३ पट आहे    महाराष्ट्रात शहरि भागातून शिक्षणासाठी स्थलांतर करणार्यांची एकूण संख्या ३.९२ लाख आहे. यापैकी मुलांची संख्या २.९३ लाख आहे आणि मुलींची संख्या फक्त ९०.००० हजार आहे. मुलींपेक्षा मुलांची संख्या तीनपट जास्त आहे म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून मुलींचे शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाण जास्त आहे 

* विवाहामुळे स्थलांतर महाराष्ट्रात विवाहामुळे होणारे स्थलांतर १४८.६८ लाख एवढे विक्रमी आहे. त्याची टक्केवारी ३५.६४ लाख आहे यापैकी सथलातरिताची  संख्या १४७.५४ लाख तर पुरुष संख्या फक्त १.१४ लाख आहे व ती नगण्य आहे. महिलांचे विवाहामुळे होणारे स्थलांतर महाराष्ट्रात व जिल्हा व जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात आहे.  याचप्रमाणे आंतरजातीय स्तरावर विवाहामुळे स्थलांतर होऊन महाराष्ट्रात स्थलांतर होणार या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा १४६.४० लाख जास्त आहे   महाराष्ट्रात ग्रामीण भागातून होणारें स्थलांतर एकूण संख्या १०६.९१ लाख आहे. यापैकी महिलांची संख्या १०६.११ तर पुरुष संख्या  नगण्य म्हणजे फक्त ८०.००० नगण्य आहे   महाराष्ट्रात शहरि भागातून विवाहामुळे होणार या स्थलांतराची एकूण संख्या ४१.७७ लाख आहे.  यापैकी महिलांची संख्या ४१.४३ लाख तर पुरुषांची संख्या फक्त ३४.००० आहे.  महाराष्ट्रात विवाहामुळे स्थलांतर होणार या महिलांची संख्या शहरी भागातून सुमारे ६५ लाख जास्त आहे 

* जन्मानंतर होणारें स्थलांतर महाराष्ट्रात जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या ५१.०९ लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या ३१ लाख आहे.  आणि महिलांची संख्या २० लाख आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून जन्मानंतर स्थलांतर होणार या लोकांची एकूण संख्या ३१. लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १९.३५ लाख आहे. तर महिलांची संख्या ११.७० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या नगण्य ७.५० लाखाने जास्त आहे   महाराष्ट्रात शहरि भागातून जन्मानंतर होणारें स्थलांतर एकूण संख्या २०.०४ लाख आहे. त्यातील पुरुष संख्या ११.७४ लाख आहे तर महिलांची संख्या ८.३० लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ३.५० लाखाने जास्त आहे

* कुटुंबासह पोटासाठी वणवण करणारे लोक यांची एकूण संख्या ७१.८८ लाख आहे या गटाचा विवाहामुळे होणारें स्थलांतर यात खालोखाल दुसरा क्रमांक आहे. यापैकी पुरुषांची संख्या २९.७४ लाख आहे.  महिला संख्या ४२.१४ लाख आहे. पुरुषांची संख्या महिलांपेक्षा १२.४० लाख कमी आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे यांची एकूण संख्या २६.०३ लाख आहे पुरुष संख्या ११.०८ लाख आहे. महिलांची संख्या १४.९६ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ३.८८ लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४५.८५ लाख आहे. यापैकी पुरुषांची संख्या १८.६६ लाख आहे तर महिलांची संख्या २७.१८ लाख आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सुमारे ८.५ लाखांनी जास्त आहे. महिलांची संख्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून सुमारे १२ लाखांनी जास्त आहे. 

* इतर कारणानें होणारी वणवण महाराष्ट्रात इतर कारणानें होणारे स्थलांतर संख्या ६८.४८ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३७.२६ लाख आहे तर महिलाची संख्या ३१.२६ लाख आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ६ लाखांनी जास्त आहे.  महाराष्ट्रात ग्रामीण भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या ४०.११ लाख आहे.  पुरुषांची संख्या २१ . १३ लाख आहे.  महिलांची संख्या. १८.९८ आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.१५ लाख जास्त आहे.  शहरि भागातून पोटासाठी वणवण करणारे एकूण संख्या २८.३७ लाख आहे.  यापैकी पुरुषांची संख्या १६.१३ लाख आहे.  आणि महिलांची संख्या १२.२४ लाख आहे.  महिलांपेक्षा पुरुषांची संख्या ३.८९ लाख आहे 

          आज बांधकाम क्षेत्रातील कामगार.  विटभटटी कामगार. स्टोन क्रशर कामगार.  यामध्ये आपली पोटाची खळगी भरण्यासाठी येणारे पर प्रांतिय लोक यांच्याबरोबर येणार्या महिला यांना मानाची वागणूक नाही त्यांचेकडे पहाण्याचा दृष्टीकोन. वाईट असतो. आणि सर्वात मोठ विषय आहे तो म्हणजे यांची मुल शाळा नाही शिक्षण नाही यामुळे अडाणी राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने ज्या ठिकाणी अशी कुटुंब आहेत त्यांची सुरक्षा मुलांचे शिक्षण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे अशा कामगारांना मनांत भिती न बाळगता काम करता येईल. कामाचा मोबदला बरोबर मिळेल  कोणीही यांच्या कामांचा मोबदला बुडविणार नाही. यामुळे अशा परगावाहून परराज्यातून आलेल्या कामगारांना सामाजिक मानसिक आर्थिक शैक्षणिक बळ देण्यासाठी आपला मोठा वाटा असणार आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या