मागण्या मान्य नाही केल्यातर जेलभारो - महिला आघाडी
अहमदनगर- आज दिनांक ३१.१०.२०२० रोजी अहमदनगर या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी महिला युवा आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सरकारने महिला बचत गटांच्या संदर्भात जर भूमिका नाही घेतली तर आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं जाणार आहे तर याची सरकारने दक्षता घेणे खूप गरजेचे आहे जर सरकारने याची दक्षता घेतले नाही तर येत्या काळामध्ये या संपूर्ण राज्यभर बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने आंदोलने केली जाणार आहे अशी माहिती महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली व अहमदनगर या ठिकाणी प्रशासनाकडून संविधानिक अधिकार असतानासुद्धा आंदोलन करू दिले नाही त्याचं कारण काय समजायचे कारण आज वेगवेगळ्या गावांमध्ये बचत गटाच्या त्रासाला कंटाळून महिला आत्महत्या करत आहेत व सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे जर सरकारने कर्ज माफ केलं नाही तर येत्या काळामध्ये महिला रस्ता रोको जेलभरो असे विविध प्रकारचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या संयोजक ममता शेलार व कविता मांडे यांनी दिली.
https://janmatanchaprahar.blogspot.com/2020/10/indian-constitution.html
No comments:
Post a Comment