औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची जादू औरंगाबाद सोडून आता बिहारमध्येही.- Imtiyaz Jalil

 एम आय एम का जादु अब बिहार मे 



हैदराबाद मध्ये असदुद्दीन ओवेसी व अकबरुद्दीन ओवेसी या दोघा भावांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या भाषणाने व कर्तुत्वाने मुस्लिम दलित समाजाचे मन जिंकले व हैदराबाद येथे आपले वर्चस्व व अस्तित्व निर्माण केले.परंतु खऱ्या अर्थाने त्यांना गरज होती अशा सक्षम नेत्याची जो त्यांना त्यांचा डावा हात म्हणून संपूर्ण देशामध्ये एम .आय .एम पक्षाचे प्रतिनिधी उभे करून एमआयएमचे अस्तित्व व संघटन मजबूत करून देईल आणि हे काम शक्य झाले महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातून मध्य विधानसभा मधून निवडून आलेले एकमेव एम.आय.एम चे आमदार इम्तियाज जलील यांच्या रूपाने त्यांच्या या प्रथम विजयामुळे यांचे अस्तित्व पूर्ण महाराष्ट्रात व देशात चमकू लागले व स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा हे आपल्या कार्यातून निर्माण करत होते. त्यानंतर यांनी खरी कमाल केली ती शिवसेना पक्षाचा सर्वात महत्त्वाचा आणि मजबूत बालेकिल्ला असलेला औरंगाबाद जिल्हा भेदुन काढला .येथे एम .आय .एम चा खासदार निवडून येणे हे जवळजवळ अशक्य विचारा पलीकडे होते परंतु इम्तियाज जलील यांच्या अथक प्रयत्नाने तसेच मजबूत संघटन निर्मिती व अमर्याद विश्वासामुळे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला भेदणे केवळ आणि केवळ हे इम्तियाज जलील विश्वासामुळे व प्रयत्नामुळे शक्य झाले व त्यांचा ऐतिहासिक विजय हा संपूर्ण देशात लोकप्रिय ठरला परंतु एम. आय. एम पक्ष हा बीजेपी ची B टीम आहे असे आरोप हे नेहमीच एम .आय. एम वर होत असतात ही खूप मोठी शोकांतिका आहे कारण एम. आय. एम हा मुस्लिमांचा व दलितांच्या आवाज असलेला पक्ष आहे संपूर्ण देशात बीजेपी ने थैमान घातले असताना एम .आय. एम या पक्षाला बीजेपी सोबत दोन हात करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते परंतु बीजेपी सोबतच काँग्रेसलाही स्वतःला सेक्युलर म्हणून घेणार्‍या पक्षांना देखील मात देण्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागत आहे बिहारच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते व एम.आय.एम चे  7 जागा सगळ्या पक्षांच्या डोळ्यात टोचत होते परंतु त्या जलील यांनी जणू काही खूणगाठ बांधली होती की, औरंगाबाद पाठोपाठ आता बिहार पण आपल्याला जिंकायची आहे परंतु सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असणारी बीजेपी सोबतच काँग्रेस व इतर सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांशी देखील तेवढीच काट्याची टक्कर द्यायची होती परंतु इम्तियाज जलील यांच्या दृढनिश्चय आणि राजनीतिक परिपक्वतेमुळे असदुद्दीन ओवैसी सोबतच बिहार राज्यांमध्ये देखील इम्तियाज जलील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन बिहारचा पिछडा वर्ग व अल्पसंख्यांक यांचा कोपरा न कोपरा पिंजून काढला व त्यांचे केवळ मन च जिंकले नाहीतर बिहार निवडणुकीत देखील खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची जादू कायम ठेवत घवघवीत यश एम .आय. एम पक्ष व त्यांच्या आमदारांना मिळवून दिले.

त्यात जलील हे केवळ एम .आय. एम पक्षाचे मजबूत नेते नसून अल्पसंख्यांक मुस्लिम समाज तसेच दलितांचे परिपक्व व मजबूत व्यक्तिमत्व असणारे नेते म्हणून त्यांना लाभले आहेत .संपूर्ण देशाच्या अल्पसंख्यांक मुस्लिम समाज तसेच दलित समाज यांना अकबरुद्दीन ओवेसी ,असदुद्दीन ओवैसी यांच्या पाठोपाठ खासदार इम्तियाज जलील यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे निश्चितच खासदार इम्तियाज जलील यांचे नेतृत्व जर आज अल्पसंख्यांक मुस्लिम समाज व दलित समाज यांनी सर्वानुमते स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

वाचा -

चिराग पासवान का क्या था गेम प्लान ?

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज-

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या