Showing posts with label भूक. Show all posts
Showing posts with label भूक. Show all posts

भूक भूक भूक -Humger Hunger


            आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे भूक वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढती बेकारी हाताला काम नाही त्यामुळे वाढती गुन्हेगारी जागोजागी तयार होणा-या गुन्हेगारी टोळ्या विविध दारु तंबाखू मटका जुगार अशी विविध व्यसनाच्या आहारी गेलेली तरूण पिढी यामुळे आपले व आपल्या देशांचे भविष्य धोक्यात आले आहे

       लोकसंख्या कमी होती तेंव्हा आपली अन्न धान्य गरज कमी होती पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली आणि अन्न धान्य पुरवठा कमी पडण्यास सुरुवात झाली आपल्या देशाने यावेळी बाहेरच्या देशातून अन्न धान्य आयात करण्यास सुरुवात केली त्यातून आपली अन्न धान्य गरज भागत नाही असे ध्यानात आले त्यावेळी शासनाने नवीन कृषी धोरण तयार केले त्यात आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण वापर नवीन बी बियाणे. कमी खर्चातून जास्त उत्पन्न देणारे धोरण आखण्यात आले आपणास लागणारे अन्न धान्य आपल्या देशात आपल्या गावात आपल्याला पुरेसं होईल एवढे तयार होण्यास सुरुवात झाली 

       सर्वांना दोन वेळेला पोटभर जेवायला मिळावे आणि सर्वांचे व्यवस्थित पोषण व्हावे ही आपली अगदी किमान गरज आहे पावसाची अनियमितता. आधुनिक तंत्रज्ञान अभाव यामुळे स्वातंत्र्यानंतर ब-याच काळापर्यंत आपल्याला अन्न धान्य तुटवडयाला तोंड द्यावे लागले परदेशातून अन्न धान्य आयात करून आपली अन्न धान्य तुट भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला पुढे सिंचन व्यवस्था सुधारली सरकारने मोहीम काढून शेतीची आधुनिक तंत्रे प्रचारात आणली सुधारीत जाती बी बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर या सर्वांचा परिणाम आपण धान्य उत्पादनात आपण १९७० मध्ये पातळी बरिच उंचावली या बदलाला. "हरित क्रांती "असे म्हणले हरित क्रांती मुळे उत्पादन वाढले देश अन्न धान्य या बाबतीत स्वावलंबी बनला. मात्र खाद्यतेल निर्माण करण्याच्या बाबतीत अजूनही पूर्ण स्वावलंबन शक्य झाले नाही

धान्य उत्पादन कमी होते तेव्हा सर्वांना धान्याचे वाटप व्हावे म्हणून. "रेशनिंग " म्हणजे सरकार मार्फत अन्न धान्य पुरवठा नियंत्रित करण्याचे धोरण अंमलात आले होते. सर्वांना हक्काचे अन्न धान्य मिळण्यासाठी रेशन दुकान नेमण्यात आली आज. आपण बघतो. सर्वात मोठा घोटाळा म्हणजे रेशन घोटाळा. रेशन दुकानात येणारा अन्न धान्य वितरण करण्यासाठी असणारा माल निकृष्ट दर्जाचा असतो. नियमानुसार. दारिद्रय रेषेखालील. प्राधान्य लाभार्थी कुटुंब. ब. गट अशी वर्गवारी फक्त एक फाॅरमलिटी म्हणून केली जाते. ज्यांना गरज आहे त्यांना. अन्न धान्य योजनेतून बाहेर काढले जाते. ज्यांना गरज नाही त्यांना डबल डबल धान्य वितरण केलें जाते. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात रेशन दुकानदार अन्न धान्य वेळेवर व नियमानुसार देत नाही. पाच व्यक्तिला धान्य मिळत असेल तर तीन लोकांचे धान्य वितरण केले जाते विचारलें असता आपली नावे दिसत नाहीत. आधार लिंक नाही. अशी विविध उत्तरे दिली जातात. सर्वांना पुरेसे अन्न धान्य मिळावे असा उद्देश होता तसेच ते रास्त भावात मिळावे हाही त्यामागचा उद्देश होता. धान्याचा पुरवठा मुबलक असून सुद्धा आपली गरज भागत नाही. ते सर्वांना परवडेल अशा दरात मिळायला हवे. म्हणजे. रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि सर्वांना. २/३ किलो प्रमाणे अन्न धान्य विकत द्या त्यामुळे. समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब उच्च कुटुंब मध्यमवर्गीय कुटुब असा भेद नष्ट होईल त्यासाठी सरकारने नियंत्रित भावात अन्न धान्य पुरवठा करावा. मात्र त्याच वेळी बाजारात. रेशन दुकानदार यांचेकडून काळाबाजार. जास्त दराने अन्न धान्य विक्री करणे अशा वेळी बाजारात जास्त भावाने अन्न धान्य उपलब्ध असतेच त्यामुळे रेशन दुकानदार यांचेकडून मिळणाऱ्या अन्न धान्य दर्जाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे मी जर गरिब आहे तर मला रेशनला मिळेल ते धान्यच खावे लागणार आणि लागते. त्याहून उच्च प्रतीचा गहू तांदूळ हा मात्र जास्त भावाने मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला. गोरगरीबाला सकस धान्य कसे येणार. हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे धान्याचे उत्पादन वाढून किंवा रेशन ची दुकानें टाकून सगळा प्रश्न सुटत नाही. पोषक मुबलकपणे धान्य रास्त भावाने मिळण्याचा प्रश्न शिल्लक राहतोो

           या फरकामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील माणसांचे आहार वेगवेगळे असतात. आपल्या देशात कुपोषण समस्या मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुले. कामांचे वय नसणारी. फक्त जेवणासाठी हाॅटेल. धाबे. चायनिज गाडे. वडापाव. अशा विविध ठिकाणी. स्वच्छता करताना आपण बघतो कचरयात ठाकलेले अन्न हुडकून खाणारी मुल. माणस आपण बघतो. एखाद्या मोठ्या लग्न वाढदिवस मुंजी. सणवार. यात मोठ्या प्रमाणात अन्न ‌ ताटातून कचरयात ठाकलेले आपण बघतो आपल्या घरांत सुध्दा आपण शिळे अन्न खात नाही टाकून देतो. याचा अर्थ असा होतो की एकाबाजूला. अन्न अन्न करणारे लोक आणि एकीकडे अन्न टाकणारे लोक. 

           कष्टकरी व कामगार. यांना झुनका भाकर. केंद्राचा आधार मिळतो काही जण. हाॅटेलमधये जावून आपली अन्न याची गरज भागवितात. श्रीमंत आणि गरीब यांच्या आहारात पोषक तत्वे. विविधता. या सर्वच बाबतीत खूप अंतर असते. पोषक आहाराच्या अभावामुळे हा प्रश्न धान्य उत्पादन पुरता मर्यादित नाही. वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य यांचे मुळे तो जास्त गुंतागुंतीचा बनतो. म्हणूनच शाळकरी मुलांना न्याहारी किंवा एक वेळेचे जेवण स्वस्त किंवा मोफत देण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या राज्यात केलें जातात. रेशनिंग. भावनियंत्रण. आणि सकस अननचा. ठराविकच गटाना विद्यार्थी. आजारी माणसे. पुरवठा अशा विविध पातळ्यांवर आपल्याला अन्न प्रश्नाला सामोरे जावे लागते.

महाराष्ट्र ने भारतातील सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूकीचे पुढाकार घेतला आहे महाराष्ट्रात चार वर्षांत १/ १७/ ४९३ बालके कुपोषणाचे बळी पडले आहेत (वरषास ३०/०००) जागतिक कुपोषणाचा आकडा चडता दिसत आहे त्याचप्रमाणे देशात राज्याचा भूक बळीचा आकडा जागतिक स्तरावर चढती कमान आहे महाराष्ट्रात माता कुपोषणाने बळी पडण्याचे प्रमाण सरासरी (२८००/ते २९००) चया दरम्यान आहे त्यात ४८० ते ५०० माता केवळ अति कुपोषणाने मरण होताना दिसत आहे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना एकात्मिक बालविकास योजना मध्यान्ह भोजन यांचा खर्च जी डी पी चया ०'०८/टक्के एवढाच आहे हा गंभीर प्रश्न वैधानिक पातळीवर गंभीरपणे घेतला जात नाही   

धान्य आहे गरजू पर्यंत सर्वे चया व अन्य कारणांमुळे पोहचत नाही 


राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मंत्री मंडळाने मंजूर देण्यात आली कुपोषण अशक्त बालकांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट या अभियानात ठेवण्यात आले 

   १० कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे

१ ‌कुपोषण रोखण्यासाठी विविध योजना योगदानाचा ढाचा तयार करणे 

२ जलदगतीने सहयोग यंत्रणा उभारणे 

३ आयसीटीवर आधारित देखरेख यंत्रणा उभारणे

४ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य व केंद्र शासित प्रदेशाना बळ देणे 

५ माहिती तंत्रज्ञान आधारित उपकरणे वापरणे अंगणवाडी कर्मचारी बळ देणे अंगणवाडी कर्मचारी यांचेकडून रजिस्टर चां वापर थांबवणे अंगणवाडी केंद्रातील बालकांची उंची मोजमापाला सुरुवात करणे 

  केंद्र सरकार आपल्या साठी हे सर्व करत आहे पण अवलंब केला जात नाही चालढकल केली जाते .


 जागतिक अन्न कार्यक्रम

स्वरुप. WFP हि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपासमार नष्ट करण्यासाठी कार्यरत असणारी संयुक्त संघाची एक महत्त्वाची संघटना आहे अन्न उत्पादन वाढविण्यासाठी भर देते 

२ ‌‌ स्थापना. १९६१    

2. मुख्यालय. रोम. 

3. अध्यक्ष. David Beasley

4 सदस्य. 83. साहाय्य प्रारपत देश

5. ध्येय. उपासमारी विरोधात लढा देणे

6. नारा zero hunger 2030. मध्ये जे sdgs गाठायचे आहेत त्यातील ध्येय 2. उपासमारी दूर करण्याचे आहे 

9. उपासमारी दूर करणे अन्न सुरक्षा पुरविणे पोषण स्तर उंचावण्यासाठी. WFP कार्यरत आहे

10. यासाठी WFP विविध राष्ट्रीय तांत्रिक साहाय्य करते व क्षमता वाढविण्यासाठी मदत करते 

11. राष्ट्रांना अन्न पुरवठा साखळी नियमनासाठी मदत करते 

12. संकटकाळी अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य WFP करते

      आत्ता कोरोणा सारखी महामारी चालू आहे राज्यात टाळेबंदी जारी केल्यामुळे हातावरचे पोट असणारे कामगार व सर्व सामान्य जनता. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. वडापाव विकणारे व्यापारी वाहनं चालक मालक आणि घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या किराणा दुकान. रिक्षावाले. टाळेबंदी असताना कोणालाही वर्गवारी नाही कोरोणा सारख्या महामारी संकटाला गरिब श्रीमंत ओळखत नाही भूक सर्वांना सारखीच आहे मग अंत्योदय दिनदयाळ योजना ( दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ) यांनाच शासनाने कोरोणा काळात एप्रिल आणि मे महिन्याचे रेशन अन्न धान्य मोफत देण्याचा निर्णय कसा घेतला 

    ‌.

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage..

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या