गलिच्छ वस्ती आणि झोपडपट्टया एक शाप
अपुऱ्या जागेत झालेली लोकांची दाटी त्या जागेचा खालावलेला दर्जा अनारोग्य कारक परिसर किंवा सवचछेतेचया सोई सुविधा सवलतीचा अभाव आणि त्यामुळे तेथील रहिवाशांच्या किंवा एकंदर समाजाच्या आरोग्याला सुरक्षिततेला व नीतिमततेला पोहोचणारा धोका इत्यादी लक्षणांनी युक्त असलेली एखादी इमारत इमारतींचा समूह किंवा प्रदेश यांना गलिच्छ वस्ती ज्या परिसरातील घरे राहण्यास निकृष्ट अपुरी. आरोग्यास घातक संरक्षण. नैतिकता आणि तेथील निवासी लोकांच्या दृष्टीने हानिकारक असतात त्या परिसराला झोपडपट्टी. अवैधरित्या गोंधळाने बळकावलेलया अविकसित दुर्लक्षित दाट लोकसंख्या असलेल्या मोडकळीस आलेल्या दुर्लक्षित वस्तीला गलिच्छ वस्ती स्वरूप प्राप्त झाले आहे घरे जुनी आणि मोडकळीस आलेली असतात अपुऱ्या जागेत कशीबशी राहतं असतात शयनगृहे व स्नान गृहे. यांची महिला साठी वेगळी व्यवस्था नसते वेगवेगळ्या आकाराची व उंचीची ओबडधोबड घरे अव्यवस्थित एकामेकाला लागून असतात घराभोवती मोकळी जागा नसते घरामध्ये रस्ता असला तरी तो कच्चा असतो आणि ओबडधोबड असतो हवा आणि उजेड यांना घरात मोकळीक असते कारणं घरांवर छप्पर त्या सारखेच असते स्वतंत्र संडास सोय नाही सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटर याचे नावच नाही वीज आणि पाणी पुरवठा पुरेसा किंवा अजिबात नसतो स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक शासनाचे कोणतेही लक्ष नसते त्यामुळे भोवतालचा परिसर दुर्गंधी पसरलेली व कचरया चे ढीग व पाण्याने भरलेली गटारे गलिच्छ वस्ती मध्ये मोडकळीस आलेल्या घरांचा जसा समावेश होतो तसेच बांबू पत्रे ताडपत्री डिजिटल. इत्यादी पासून बांधलेल्या झोपड्या त्यात येतात
गलिच्छ वस्ती आणि झोपडपट्टी तयार होण्याची कारणे भारतात निकृष्ट दर्जाच्या चाळी झोपडपट्ट्या तसेच भटक्या लोकांच्या तात्पुरत्या वस्त्या या गलिच्छ वस्ती म्हणून ओळखली जाते गलिच्छ वस्ती या सार्वत्रिक आहेत व विकसित आणि अविकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशात त्या दिसून येतात म्हणून गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी निर्मुलन हा नागरि शासनाचा सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच नागरि समाजशास्त्ज्ञाचा एक कायमचा प्रश्न निर्माण झाला आहे
(१) औधोगिक कारणांमुळे ग्रामीण भागातील लोकाचा लोंढा शहराकडे येताना आपणं पाहतो प्रामुख्याने हे लोक मोलमजुरी करतात असे लोक झोपडपट्टीत राहतात
(२) ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या वाढीमुळे हे लोक शहराकडे धाव घेतात कारणं खेड्यात एवढ्या लोकांना व्यवसाय उपलब्ध होत नाही
(३) या लोकांना नागरि रचनेचे मोठे आकर्षण असते त्यामुळे त्यांची लहानशा जागेत राहण्याची तयारी असते
(४) दुष्काळ व महापूर यावेळी मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करतात
(५) महाराष्ट्र येथे काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता तेव्हा बरेच लोक रोजगार मिळवण्यासाठी पुणे. मुंबई सारख्या शहरात दाखल झाले होते रेल्वेस्थानक. वर वास्तव्य करतात किंवा जवळपासच्या झोपडयात राहतात यामुळे दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे
(६) महानगरांमध्ये घरांचा मोठा प्रश्न टंचाई गरीब लोक अशा झोपडपट्टीत राहणे पसंत करतात गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी यांचें निर्मुलन या विषयाचा अभ्यास सतत चालू आहे निर्मुलनाचे प्रयोगही ठिकठिकाणी करण्यात आले परंतु गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी पूर्णपणे कोणत्याच देशातून नष्ट झाली नाहीhttps://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d
(७) दारिद्र्य स्पर्धात्मक अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि शासन व समाज यांची या समस्येबद्दल अपेक्षा हि गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी तयार होण्यामागची कारणें आहेत
(८) समाजातील प्रचलित अर्थव्यवस्थेत व सांस्कृतिक जीवनात समरस अथवा स्वीकृत न झालेले तसेच आर्थिक सांस्कृतिक दृष्ट्या अगदी हीन पातळीवर असलेलें लोकच गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी वस्तीत राहणे पत्करावे लागते किंवा तेथे राहणे सोईचे किंवा क्रमप्रापत ठरते असे म्हणले जाते
(९) घराची रचना त्यांच्या वाढत्या किमती आणि स्वच्छता सोई सवलती अभाव यामुळे गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी निर्माण होतात
(१०) एखाद्या वस्तीत राहणा-या लोकांच्या स्वच्छतेच्या कल्पना आणि सवयी यामुळे ती वस्ती कालांतराने गलिच्छ बनत जाते गलिच्छ वस्तीत नागरी समाजरुपी शरिरातील रोग समजावा की नगरवाढीतील एक अपरिहार्य टप्पा समजावा याबद्दल शासत्रज्ञामधये दुमत आहे
(११) नागरीकरणाच्या सततच्या प्रकिरये मध्ये शहरातील विविध भागांतील औधोगिक उत्पादने करमणूक किरकोळ व ठोक व्यापार सावकारी पतपेढी. वाहतूक व संदेश वहन. तसेच कौटुंबिक वसतिसथाने या व उद्दिषटानुसार विभागणी होत जाते वाढत्या लोकसंख्येनुसार व शहराच्या परिस्थिती जबाबदारी नुसार विविध प्रकारच्या कार्यारत स्वतंत्र यंत्रणा आणि जागा व्यापक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे ठरते योजनांबद्द रीतीने या वाढिस वाव करुन दिल्यास वाढ होण्याचे थांबत तर नाहिच उलट एखाद्या कार्याचे क्षेत्र वाढत जाऊन ते शेजारच्या दुसर्या कार्याच्या क्षेत्रावर अतिक्रमण करते व त्या कार्य क्षेत्राला दुसरीकडे हुसकावून लावते असे अनेक शहरांच्या वाढीच्या अभ्यासाने सिध्द झाले आहे गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी याचे मूळ हे याप्रमाणे एखादे क्षेत्र पूर्वीच्या कार्यास अपात्र किंवा अवास्तव ठरून दुसर्याच्या कार्याचे अतिक्रमण त्यावर होत राहणयामधये आणि त्यामुळे जमीनीच्या किमतीत चढ उतार होण्यामध्ये आहे असे म्हणले जाते सर्व शहरांमध्ये सामान्यपणे या प्रकिरयेस अनुसरून गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी निर्माण झाल्याचे दिसून येते
(१२) शहरातील मध्यवर्ती आर्थिक व्यवहारांची व व्यापारी उलाढालींची व्याप्ती वाढत जाऊन त्यांचे भोवतालच्या निवासस्थानावर क्षेत्रावर अतिक्रमण होते त्यामुळे तेथील जमीनीच्या किमती वाढू लागतात आणि घरभाडे वाढते शिवाय व्यावसायिक व्यवहारांच्या वाढत्या गजबजाटामुळे कौटुंबिक जीवनाला ती वसतीच अयोग्य ठरते म्हणून तेथील कुटुंबे उपनगराकडे किंवा शहराच्या सीमेवरील वस्तीकडे धाव घेतात त्या ठिकाणी राहत्या घरांची दुर्दशा होते घर केंव्हातरी खाली करावे लागणार म्हणून त्यांच्या दुरूस्ती कडे दुर्लक्ष केले जाते अशा परिस्थितीत कमी उत्पन्न असणारी कुटुंबे अनेक अडचणी सोसून येथे राहणे पसंत करतात पत्करतात
(१३) व्यवसायासाठी लांबून येणाऱ्या व्यक्तीच्या साठी सुख सोयी उपलब्ध करुन देणारया संस्था खाणावळी. निवासस्थान वेशयागमन याही असली घरे पसंत करतात सहाजिकच तेथे अनेक प्रकारचा गलिच्छ पणा वाढतो
(१४) एखाद्या विशिष्ट कार्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या काही काळ रिकाम्या झालेल्या जागेवर बाहेरून कामाच्या शोधात आलेल्या आणि खालच्या दर्जाचे काम करत असलेल्या लोकांची वस्ती असते ही बहुधा झोपडपट्टी असते त्या जागेच्या किमती भरमसाठ असतात त्यामुळे कायमस्वरूपी घरे बांधणे परवडत नाही
(१५) शहरविसतार प्रकिरयेत लोहमार्ग इतर संदेशवहन मार्ग आणि उत्पादक व दुरुस्ती कामांचे कारखाने हे महत्वाचे घटक समजलें जातात या कारखान्याच्या नोकरवरगापैकी जो खालचा वर्ग असेल तो बहुधा दैनंदिन कामाच्या जागेजवळ घर करणे पसंत करतो म्हणूनच शहराबाहेर लोहमार्ग व इतर मार्गाच्या पट्ट्याला लागून तसेच कारखान्याजवळ झोपडपट्टी किंवा निकृष्ट दर्जाचे घरे दिसून येतात लोकांचे दारिद्र्य घाणेरड्या सवयी आणि इतर सुविधा अभाव यामुळे अशा गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी इतर सुविधांचा अभाव यामुळे अशा वस्त्या गलिच्छ बनतात
गलिच्छ वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन शासनाच्या योजना
निवारा हि मानवांची मूलभूत गरज आहे काळाच्या ओघात गृहनिर्माण हे केवळ निवारा पुरविण्यास मर्यादित नसून रोजगार संधी व स्थानिक विकास निर्मिती करण्यातील एक मुख्य घटक आहे घरांची कमतरता दूर करणे हि दारिद्र्य निर्मूलन मधील एक महत्वाची बाब आहे घरांच्या वाढत्या मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाने गृहनिर्माण धोरण सक्रिय केले आहे गरजूंना परवडणारी घरे पुरविण्यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा. आणि शहर व औधौगिक विकास महामंडळ मर्यादित. ( सिडको ) यांचीही स्थापना केली झोपडपट्टी पुनर्वसन योजना व शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांची अंमलबजावणी केल्यामुळे नागरी भागातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती प्राप्त झाली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणादवारे ( एम एम आर डी ए ) मुंबई नागरी परिवहन प्रकलप ( एम युटी पी ) व मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकलप ( एम यू आय पी ) राबविले जात असून त्या अंतर्गत बृहन्मुंबई ( मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ) प्रकलप बाधीत कुटुंबाना घरे बांधून दिली जातात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व ग्रामीण क्षेत्रातील दुर्बल घटकांसाठी दर्जेदार घरे पुरविण्याचा दृष्टीने राज्यशासन इंदिरा आवास घरकुल योजना. व. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना या योजना यशस्वीपणे अंमलबजावणी करीत आहे
या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि २३ जुलै २००७ रोजी गृहनिर्माण धोरण घोषित केले आहे या धोरणातील उद्दिष्टे. नागरी व ग्रामीण केंद्राच्या शाश्वत विकासाला प्रोहतसना देणे रोजगार संधी उपलब्ध करून देणे. झोपडपट्टी मुक्त शहरे करण्याच्या दृष्टीने झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन वैशिष्ट्य पूर्ण रीतीने करणे अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी वित्तपुरवठा करणे तसेच बांधकाम व घराची दुरुस्ती देखभाल सुलभ होण्यासाठी सार्वजनिक व खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणे प्रगत आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या बाबींना प्रोत्साहन देणे पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत हि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढील प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत मुंबई शहर व उपनगर भागात उपकर भरणारया व न भरणाऱ्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीं पुनर्बाधणी साठी त्यांचे मालक खासगी विकासक सहकारी गृहनिर्माण संस्था आणि महानगरपालिका तसेच म्हाडा कडून पुनर्विकास योजना राबविण्यात येतात पुनर्विकासासाठी घेण्यात आलेल्या इमारतीमधील भाडेकरूंना कीमान २२५ ते ३०० सवेअर फूट इतकी जागा मोफत देणे शहरातील गरीब गरजू लोकांना भाडेतत्वावर तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी एम एम आर डी ए यांच्या माध्यमातून महानगर क्षेत्रात पाच लाख घरे बांधणे सदनिकांची खरेदी ही सदनिकेच्या चटयी क्षेत्राच्या आधारावर व्हावी याकरिता महाराष्ट्र मालकी सदनिका मालकी हक्क कायदा १९६३ मध्ये सुधारणा करणे
सर्वात महत्वाची बातमी बांधकाम कामगार यांचेसाठी बांधकाम कामगार अट्टल विश्व कर्मा घरकुल आवास योजना बांधकाम कामगार यांचेसाठी चालू करण्यात आली आहे पण शासन निर्णय जारी करून सुध्दा आज पर्यंत कोणत्याही बांधकाम कामगाराला कोणत्याही गावात तालुक्यांत जिल्ह्यात घर मिळालेले नाही केवढा मोठा घोटाळा आहे बघा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
संपर्क साधावा
वाचा -
लेखकांना जपले पाहिजे - नजीर शेख ...
कामगार आणि हडताल A . Munde ...
No comments:
Post a Comment