'मानवसेवा' प्रकल्पातील मायेमुळे उघडले घराचे दार
निराधार मातेचे उपचारानंतर कुटुंबात पुनर्वसन
अहमदनगर :
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आपल्या सोबत असणारा, प्रत्येक सुखं दु:खात आपल्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, जीवन प्रवासातला आपला साथीदार, असा मध्येच काटेरी वाटेत सोडून, संसाराचा डाव मोडून टाकून नव्या संसारात गेला. मुला-बाळाची ताटातुट झाली. त्यातच माहेरी आईचे निधन झाले. मनावर याचा प्रचंड ताण येवून मोठा घाव पडला अन् जगण्याची वाट पुसट झाली होती. हिमंत हरली अन् मानसिक आजार घेवून जगणे वाट्याला आले. डिसेंबर २०१९ या महिण्यात गावची यात्रा, या यात्रेत फिरतांना एका पिकअप वाल्याने सप्तशृंगी गडावर घेवून जाण्याचे अमिष दाखवले, आणि मधेच मध्यरात्री शोषण करून रस्त्यावरच सोडले. पुन्हा जीवन मरणाचा प्रवास सुरु झाला. मध्यरात्री काळ्याकुट्ट अंधारात महिला रस्त्यावर पाहून ट्रक थांबला. ट्रक मध्ये बसताच पुन्हा ट्रकच्या क्लीनरने हळू हळू अंगाला स्पर्श करायला सुरुवात केली आणि पहाटेपर्यंत चालक व क्लीनर यांनी शोषण करुन अ.नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये सोडले. जीवन जगण्याच्या तर आशा संपल्याच होत्या. घराचे दार बंद झाले. आता मात्र कोणतेच भान राहिले नव्हते. सहा महिने रात्र अन् दिवस पाय मात्र चालतच राहिले. चालता-चालता अहमदनगर आले. चालणारे हे निराधार मातेचे पाय दि. २८ जून २०२० रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे कॉं. रमेश गांगुर्डे सर यांनी थांबवले आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पात या निराधार पीडित मातेला दाखल केले. प्रत्येक बेघर दु:खी नसून सुखी व्हावा. या भावनेने निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या मानवसेवा प्रकल्पाने या मातेची संपुर्ण काळजी घेत मायेचा आधार दिला. मानवसेवा प्रकल्पात या मातेवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने व स्वयंसेवकांच्या मदतीने काळजी घेवून उपचार व समुपदेशन केले. मानसिक आजारातून मुक्त झालेल्या मातेने संपुर्ण माहिती देताच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी दि. २४/११/२०२० रोजी धुळे जिल्ह्यातील चिमठाणे या गावात जावून तब्बल एक वर्षांनी या मातेच्या घराचे दार उघडले व कायमस्वरुपी पुनर्वसन केले. आपल्या बहिणीला पाहून पीडीत माता गहिवरून गेली. संस्थेचे दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, सिराज शेख यांनी या मातेला दोन महीन्याचे अन्नधान्य देवून तेथेच रोजगार मिळून दिला. कुटुंबात पोहचताच मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा जगण्याची वाट मोकळी झाल्याची प्रतिक्रीया या मातेने दिली. या मातेच्या पुनर्वसनासाठी मा. प्रा. अविनाश मुंडके सर यांनी आर्थिक सहयोग दिला. या मातेचे घर शोधण्यासाठी मालपुर ता. शिंदखेडा जि. धुळे येथील दिक्षा फाउंडेशनचे मा. श्री शशिकांत पाटोळे, रविंद्र पोटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे आधारवड मा. श्री संजय शिंगवी, मा. श्री शशिकांत चंगेडे, मा. प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, मा. डॉ. अविनाश मोरे, मा. सौ.शारदाताई हौशिंग, मा.अतिक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या मातेच्या पुनर्वसनासाठी राहुल साबळे, प्रसाद माळी, अशोक मदणे, सुशांत गायकवाड स्वप्नील मधे, सोमनाथ बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*
👏👏👏🌹🇳🇪🌹👏👏👏
*मानवसेवा प्रकल्प*
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*
☎ (०२४१) २४२९९४२
📱 ९०१७७२२३३
वाचा -
निराधार मानसिक विकलांग मातेला "मानवसेवा" प्रकल्पात मायेचा आधार....
No comments:
Post a Comment