बाजार कराची पावती



 बाजार कराची पावती

                 दैनंदिन गरजांसाठी लोकांना एकत्र सर्व वस्तू सुविधा मिळाव्यात यासाठी बाजार ही संकल्पना अमलात आणली. लोक गावा गावात प्रत्येक गावात बाजार भरतो. व शहरात सकाळचे भाजी मार्केट. संध्याकाळी मार्केट. असे रोज दोनवेळा बाजार भरतो. बाजारात. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. विविध किराणा मालाचे दुकान. चप्पल विक्री करणारे. खाद्यपदार्थ विक्री करणारे. कपडे विक्री करणारे. गावातून शहराकडे आपला शेतमाल विक्री साठी घेऊन येणारे शेतकरी. कडधान्य विक्री करणारे. कटलरी विक्री करणारे. अंडी मटण मासे चिकन विक्री करणारे दुकानें. नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीतील मोबाईल शाॅप दुकान गाळेधारक. विविध नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांचेकडून भाड्याने देतात येणारे कार्यालये. नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांचा विविध कर वसुली पावती. घरपट्टी पाणीपट्टी. अशा विविध कर वसुली साठी नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांचेकडून त्यांनी बाजारासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या विकासासाठी व बाजारांत शासकीय जागेवर बसून व्यवसाय करण्यासाठी एक विशिष्ट कर आकारला जातो. तो रोजच्या रोज वसुली केला जातो. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित बाजारकरी लोकांना सदर पावती देणे बंधनकारक आहे. त्या पावतीवर तारीख वसुली अधिकारी यांची सही असणे गरजेचे आहे. तसं नसेल तर ती पावती ग्राह्य धरली जात नाही.



                आज प्रस्थिती बदलली आहे. बाजारात पावती देणारे नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांचे अधिकारी व कर्मचारी आज बाजारात माझा तुझा असा भेदभाव करून बाजार पावती देत आहेत. हेच कुणाल कुठ बसवायचं हे ठरवतात. पावती फाडायला जाताना सोबत मागतकरया सारखी पिशवी असते. जो यांना भाजीपाला फळें व अन्य वस्तू देतो त्याची बाजार जागा पिढी जात राहते. आणि यांची कोणतीही बाजार कर पावती केली जात नाही. तर काहीजणांना फक्त पैसै घेतले जातात आणि पावती दिली जात नाही. मग या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. पावतीवर तारीख नाही. पावतीवर वसुली करणारे यांची सहि नाही. 

      बाजारात आज बाजार कराची पावती देणारे यांची दादागिरी वाढली आहे. आठवड्यातून एक दिवस आपल्या शेतातील भाजीपाला विक्री करण्यासाठी बाजारांत आला तर त्याला जागाच मिळत नाही कारण पावती फाडणारे यांनी आपल्या जवळच्या लोकांना मोक्याची जागा देऊन टाकली आहे   

आर्थिक खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात असे ठिकाण. ‘खरेदी’ व ‘विक्री’ या संज्ञा अर्थशास्त्रीय परिभाषेत व्यापक अर्थाने वापरल्या जातात त्यांत भाडेखरेदीच्या तसेच उधारीच्या व वायदेबाजारातील व्यवहारांचाही अंतर्भाव होतो. अर्थशास्त्रात श्रमिकांची बाजारपेठ, चलन-बाजारपेठ, नवनिर्मित वस्तूंची बाजारपेठ, त्याचप्रमाणे जुन्यापुराण्या मोटारींची बाजारपेठ ह्या संज्ञा प्रचलित आहेत. या अर्थाने बाजारपेठेसाठी विवक्षित स्थळाची आवश्यकता नसते. या बाजारपेठेतील ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष संपर्कात येतीलच असेही नाही किंबहुना पुष्कळदा विक्रेता वा ग्राहक कोणीही विक्रेय वस्तू प्रत्यक्षात पाहिलेलीही नसते, तरीही त्यांच्यात त्या वस्तूचा व्यापार होतो.

बाजारपेठेत ग्राहक व विक्रेते यांची संख्या किती आहे, त्यांना बाजारासंबंधीची कितपत माहिती आहे, संभाव्य विक्रेत्यांना बाजारपेठेत प्रवेश कितपत सुकर आहे, विक्रेय वस्तूचा एकजिनसीपणा किती आहे यांवरून बाजारपेठांचे काही प्रकार संभवतात. यात एका टोकाला असणाऱ्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारप्रकारात ग्राहक व विक्रेत्यांची संख्या इतकी विपुल असते की, त्यांपैकी कोणालाही आपल्या कृतीने बाजारातील किंमतीवर प्रभाव पाडता येत नाही. अशा बाजारपेठेत मूल्य हे पूर्वनिर्धारित असते आणि बाजाराच्या प्रत्येक घटकाने किती परिमाणात खरेदी किंवा विक्री करावयाची, एवढेच ठरवावयाचे असते. बाजारातील निर्धारित किंमतीचे व उत्पादनाच्या खर्चाचे पूर्ण ज्ञान ग्राहक व विक्रेते यांना असेल बाजारपेठेत वस्तू विक्रीस आणण्यावर वा बाजारातून त्याच उद्देशाने त्या बाहेर नेण्यावर कोणतेही निर्बंध नसतील व विक्रेय वस्तू ह्या पूर्णपणे एकजिनसी असतील, ह्या गोष्टी परिपूर्ण बाजारपेठेत गृहीत धरलेल्या असतात किंबहुना वरील बाबी परिपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक अटी असल्याचे मानले जाते.

परिपूर्ण स्पर्धेची आसन्नरीतीने आढळणारी उदाहरणे म्हणजे गहू, लोकर, तांबे इ. प्राथमिक उत्पादनाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा होत. ह्या बाजारपेठांत पूर्ण स्पर्धेच्या पुढील सर्व अटी प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर पूर्ण झाल्याचे आढळते : विक्रेय वस्तू एकजिनसी असतात व्यक्तिश: कोणाही एका ग्राहकाला अथवा विक्रेत्याला किंमतीवर प्रभाव पाडता येत नाही सर्व ग्राहकांना व विक्रेत्यांना बाजारातील किंमतींची पूर्ण माहिती असते कोणत्याही विक्रेत्याने अथवा विक्रेत्यांच्या एका गटाने बाजारपेठेतील निर्धारित किंमतीपेक्षा कमी किंमतीला माल विकण्याची तयारी दाखविली, तर मूल्यांतरपणन करणारे (बदला व्यवहार करणारे) त्या किंमतीला माल खरेदी करून तो ग्राहकांना निर्धारित किंमतीला विकतात, परिणामी बाजारपेठेत पुन्हा पूर्वनिर्धारित मूल्य प्रस्थापित होते.

पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध टोकाला केवळ एकच विक्रेता असलेली मक्तेदारी बाजारपेठ असते. या बाजारपेठेत इतर विक्रेत्यांचा प्रवेश होणे शक्य नसते. आपल्या विक्रीचे परिमाण हे आपण आकारणार असलेल्या किंमतीवर अवलंबून राहील, हे मक्तेदाराने गृहीतच धरलेले असते. अर्थातच त्याला कमी किंमतीला अधिक परिमाणे विकता येतात, त्यामुळे मक्तेदार, ज्या किंमतीला त्याचा नफा महत्तम होईल अशी किंमत ठरवतो. प्रत्यक्षात कोणतीही मक्तेदारी ही परिपूर्ण असू शकत नाही, तथापि एकस्व अधिकारामुळे पूर्ण मक्तेदारीसदृश अवस्था तात्पुरती निर्माण होऊ शकते.

प्रत्यक्ष व्यवहारात मात्र उपरोल्लेखित दोन्ही बाजार-अवस्थाचां समिश्र प्रकार, म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा आढळते. या अवस्थेत प्रत्येक उत्पादनसंस्थेच्या विक्रेय वस्तू मूलत: भिन्न नसल्या, तरी बाह्य भेदांमुळे त्यांचे वेगळेपण ग्राहकाला प्रतीत होत असते. हा बाह्य भेद वस्तूचा रंग. वेष्टन, व्यापारचिन्ह, व्यापार-नाम यांसारख्या गोष्टींतून ग्राहकाला कळत असतो. यालाच ‘वस्तुभेद’ असे म्हणतात. अशा प्रकारे वस्तुभेद असलेल्या बाजारपेठेत एका बाजूने उत्पादकाची मक्तेदारी निर्माण होते, तर दुसऱ्या बाजूने अनेक उतपादनसंस्था अभिन्न वस्तूंचे उत्पादन करीत असल्याने त्यांच्यातही स्पर्धा असते. अपूर्ण स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्पादकांमधील स्पर्धा मूल्याच्या अंगाने होत नसून, अधिक प्रभावी जाहिरात आणि अधिक चांगली विक्रीनंतरची सेवा यांद्वारेच त्यांना आपापली विक्री वाढवावी लागते. नवीन उत्पादनसंस्थांचा बाजारपेठेत प्रवेश होण्याची शक्यता नेहमीच असल्याने, उत्पादनसंस्थांना एका मर्यादेपलीकडे किंमती वाढविणे शक्य होत नाही. अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंची बाजारपेठ वरील स्वरूपाची असते. उत्पादनसंस्थेला ख्याती प्राप्त झालेली असल्याने आपल्या ग्राहकांची संख्या कमी होणार नाही, याचे अवधान राखून तिला किंमत वाढविता येते.

वरील अल्पाधिकारी बाजारपेठेत असणाऱ्या स्पर्धेमुळे किंमतीत आरंभी मोठे चढउतार घडून येतात, परंतु कालांतराने किंमती स्थिरावतात. अग्रेसर उत्पादनसंस्थेने ठरविलेली किंमत इतरांकडून स्वीकारली जाते. अशा प्रकारे किंमतीबाबत नेतृत्व करणारी उत्पादनसंस्था ही बहुधा उद्योगातील सर्वांत मोठी संस्था असते. अल्पाधिकारी बाजारपेठेतील उत्पादनसंस्थांना आपसांतील स्पर्धा टाळावयाची झाल्यास, त्या परस्पर-संगनमताने व्यवहार करतात, अथवा आपल्या व्यवहारक्षेत्रात इतरांचा प्रवेश होऊ नये म्हणून निर्बंधात्मक कृती करतात. अशा उत्पादनसंस्था मूल्य-निर्धारण, घाऊक प्रमाणावर खरेदी करणारांना द्यावयाचा बट्टा, अथवा बाजाराची आपसांत करून घ्यावयाची वाटणी यांबाबत काही एक व्यवस्था परस्पर-सहकार्याने वर्षानुवर्षे करू शकतात. वरील व्यवस्था प्रत्यक्षात येण्यासाठी –विशेषत: बाजारपेठ आपसांत वाटून घेण्यासाठी संभाव्य उत्पादनसंस्थांना बाजारपेठेत बाहेरच ठेवणे गरजेचे असते. अशा रीतीने अल्पाधिकारी बाजारपेठेत मक्तेदारी बाजारपेठेत रूपांतर करण्याचा उत्पादनसंस्थांचा प्रयत्न असतो.

परस्परावलंबित्वामुळे बाजारपेठेचे स्वरूप अल्पाधिकारी बनते. पोलाद, रसायने व मोटारी यांच्या बाजारपेठा सामान्यपणे अल्पाधिकारी स्वरूपाच्या असतात. बहुराष्ट्रीय निगम अल्पाधिकारी बाजारपेठा निर्माण करतात. मक्तेदारी व अल्पाधिकारी यांच्या जोडीलाच एकमेव ग्राहक असलेली व म्हणून ग्राहकाची मक्तेदारी असलेली एकक्रयण बाजारपेठ (बायर्स मार्केट) ज्यात थोडे ग्राहक असून त्यांपैकी प्रत्येकावर इतरांच्या कृतींचा परिणाम घडतो अशी अल्पक्रयण बाजारपेठ काही थोडे विक्रेते व थोडे ग्राहक असलेली उभयपक्षीय अल्पाधिकारी बाजारपेठ एकमेव ग्राहक व एकमेव विक्रेता असलेली उभयपक्षीय मक्तेदारीची बाजारपेठ हे बाजारपेठांचे अन्य उपप्रकारही संभवतात.

वरील एकक्रयण व अल्पक्रयण तसेच उभयपक्षीय अल्पाधिकारी व उभयपक्षीय मक्तेदारी ह्या बाजारपेठांच्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात, कारण त्यांमध्ये सौदाशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने होणारे वर्तन प्रकर्षाने आढळते संप वा टाळेबंदीच्या धमक्या, राखीव क्षमता बाळगणे, व्यवहारात गुप्तता ठेवणे यांसारखे प्रकार विपुलतेने आढळतात. श्रमिक बाजारपेठेत वेतनाचे दर व कामाच्या अटी कामगार संघटना आणि मालक संघटना यांच्या प्रकारांत मूल्य हे केवळ विक्रेय वस्तूचे गुण किंवा परिमाण या गोष्टींमुळे अथवा बाजारपेठेतील मागणीपुरवठयाच्या शक्तीनुसार ठरत नाही वाटाघाटी करण्यातील कौशल्य व त्यांत आलेले अपयश पचविण्याची शक्ती यांचाही परिणाम मूल्यावर होत असतो.

बाजारपेठांचे उपरोक्त विवेचन स्थितीशील दृष्टिकोनातून झालेले असून, गतिशील दृष्टिकोनातून बाजारपेठेचा विचार करावयाचा झाल्यास कालतत्त्वाच्या आधाराने अल्पकालीन बाजारपेठ आणि दीर्घकालीन बाजारपेठ, असे त्यांचे वर्गीकरण करणे क्रमप्राप्त ठरते. जो काळ उत्पादनसंस्थेने घेतलेले निर्णय फलदायी ठरण्यासाठी अपुरा असतो, त्याला अल्पकाळ आणि ज्या कालावधीत उत्पादनाच्या साधनांचेही परिवर्तन घडवून पुरवठा बदलण्याची शक्यता असते, त्याला दीर्घकाळ म्हटले जाते. अल्पकालीन बाजारपेठ ही दीर्घकालीन बाजारपेठेहून भिन्न असू शकते, उदा., उत्पादन संस्थांना बाजारपेठेत प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य दिले, तरी नवीन उत्पादनसंस्थांनी बाजारपेठेत प्रवेश करण्याला काही अवधी आवश्यक असल्याने, त्यादरम्यान बाजारपेठ अल्पाधिकारी राहते परंतु दीर्घकालीन काही अधिक उत्पादनसंस्थांचा प्रवेश घडून आल्यावर त्याच बाजारपेठेचे स्पर्धायुक्त बाजारपेठेत रूपांतर होते.

बाजारपेठांचे वरील सर्व विवेचन हे बाजारयंत्रणेचे प्राबल्य असलेल्या भांडवलदारी अर्थरचनेला लागू पडते, तथापि ज्यात उत्पादन साधनांच्या खाजगी स्वामित्त्वाचे प्राय: उच्चाटन झालेले असते व ती केंद्रीय पद्धतीने नियोजित असते, अशा समाजवादी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बाजारपेठेची वरील संकल्पना गैरलागू मानण्यात येते

नियंत्रित बाजारपेठा : भांडवलदारी उत्पादन पद्धतीत उत्पादन हे प्रामुख्याने विक्रीसाठी केले जाते. अंतिम ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी व पाहिजे त्या स्वरूपात वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठे व्यापारी, लहान व्यापारी, दलाल ह्यांची बाजारपेठेत एक साखळी तयार झालेली असते. बाजारभावानुसार उत्पादकाचे उत्पन्न ठरत असल्याने, त्या अनुषंगाने उत्पादनाची लक्ष्ये व योजना ठरविल्या जातात. अशा बाजारपेठेत विक्रेता व ग्राहक ह्यांच्या सौदाशक्तीला महत्त्व येते बाजारात ठरणारी अंतिम किंमत व्यवहारसापेक्षत: दुर्बल स्थिती असणाऱ्या घटकाच्या दृष्टीने उचित नसल्याने त्या घटकाचे नुकसान होते. अशी परिस्थिती मुख्यत: शेतमालाच्या बाजारपेठेत विशेषत्वाने आढळते. उत्पादक शेतकऱ्यांतील संघटनेचा अभाव, अज्ञान, परंपरेने चालत आलेले दारिद्र्य व परिणामी मिळेल त्या किंमतीला माल विकण्याची निकड यांमुळे त्यांची सौदाशक्ती कमी असते. भारतात शेती व उद्योगक्षेत्रांदरम्यान असणाऱ्या सापेक्ष व्यापारशर्ती शेतीला प्रतिकूल, तर उद्योगक्षेत्राला अनुकूल असल्याने १९७९-८॰ मध्ये शेतीक्षेत्राचे सु. १,६॰॰ कोटी. रु. चे नुकसान झाल्याचे अनुमान करण्यात येते. त्यामानाने खरेदीदार हे संघटित व संपन्न असल्याने त्यांच्या स्पर्धेत शेतकऱ्याचा टिकाव लागत नाही. बाजारपेठेत माल विकावयास आणणाऱ्या उत्पादकाच्या मालापोटी खर्चवेच व निरनिराळे अयोग्य आकार वजा करून त्याला फारच कमी किंमत दिली जाते. बाजारपेठेतील या अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्याच्या हेतूने ‘नियंत्रित बाजारपेठां’ची निर्मिती करण्यात आली बाजारपेठेतील उत्पादक या घटकाचा नैसर्गिक दुबळेपणा घालवून सर्व घटकांना त्यांचे व्यवहार समान पातळीवर व खुल्या वातावरणात करता यावेत, हा नियंत्रित बाजारपेठा स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश होय.

बाजाराचे नियंत्रण नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा ह्यांच्या प्रचलित अधिनियमांन्वये व्यवस्था करून अथवा त्यासाठी स्वतंत्र अधिनियम व त्याच्या अंमलबजावणीची स्वतंत्र यंत्रणा उभारून, अशा मुख्यत: दोन प्रकारांनी करता येते. पहिल्या प्रकाराने नियंत्रणाचे उद्दिष्ट सफल होत नाही, कारण नगरपालिका व जिल्हा परिषदा यांचे सत्तास्वरूप हे बाजारातील सर्व घटकांना सारखेच पोषक ठरणारे नसते. शिवाय नियंत्रित बाजारपेठ हे उत्पन्नाचे साधन समजून बाजरपेठेच्या जागेची निवड सर्वांच्या सोयीऐवजी त्या संस्थेच्याच अधिकारक्षेत्रातील जागेची निवड करण्याची प्रवृत्ती असते. यासाठी बाजारपेठा नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकारने स्वतंत्र अधिनियमाद्वारे वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची शिफारस शाही आयोगाने केली होती (१९२८). त्याचप्रमाणे भारतात १९६७ च्या प्रारंभी आसाम, प. बंगाल व केरळ या राज्यांखेरीज सर्व राज्यांत ‘शेतमाल बाजारविधी’नुसार १,७॰७ बाजारपेठा नियंत्रणाखाली आलेल्या होत्या व नियंत्रित बाजारपेठांचे अधिनियम अस्तित्वात आले.

नियंत्रित बाजारपेठेच्या अधिनियमानुसार काढल्या जाणाऱ्या राजपत्रात विवक्षित वस्तू, नियंत्रित बाजारपेठेची कक्षा, बाजाराचे आवार व खुद्द बाजारव्यवहार जेथे होतील ते स्थळ, यांच्याबद्दल निर्देश असतो. अधिनियमाने ठरविलेल्या कक्षेत येणारी सर्व उत्पादन केंद्रे व व्यापारी केंद्रे यांना हा अधिनियम लागू होतो त्या कक्षेत ह्या वस्तूंकरिता वेगळा बाजार होऊ दिला जात नाही. खरेदी-विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार जेथे पार पडतात, त्याला बाजार आवार (मार्केट यार्ड) म्हणतात. बाजार आवारावर कृषि-उत्पन्न बाजारसिमितीचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. बाजारक्षेत्रातील यच्चयावत शेती उत्पन्नाला हा अधिनियम लागू होत नसून त्यांतल्या त्यात अधिक महत्त्वाच्या व अधिक उलाढाल असलेल्या शेतमालालाच तो लागू करतात. यामुळे बाजारसमितीचे नियंत्रण परिणामकारक होउन मूळ हेतू बऱ्याच अंशी साध्य होतो. संबंधित वस्तूंच्या नियंत्रित बाजारपेठेचे फायदे सर्व घटकांना मिळू लागताच इतर वस्तूंचे व्यवहारही योग्य होत जातात आणि त्यांचे नियंत्रण करणे सुलभ होते. नियंत्रण क्षेत्रातील सर्वांत मोठे विक्रीकेंद्र नियंत्रित बाजारपेठेसाठी निवडले जाते तशी गरज भासल्यास अतिरिक्त केंद्र उपबाजारपेठ म्हणून निवडले जाते.

बाजार नियंत्रण समितीवर उत्पादक, व्यापारी, सहकारी संस्था व शासन-नियुक्त सभासद असतात. त्यांची संख्या साधारणपणे १२ ते १५ असून त्यांतील सु. ५॰ टक्के प्रतिनिधी उत्पादकांचे व उर्वरित व्यापारी, सहकारी संस्था व शासनाचे असतात. बाजार समितीचा अध्यक्ष प्रतिनिधींद्वारे निवडला जातो.

बाजारसमितीचे कामकाज चालविण्यासाठी योग्य नियमावली तयार करणे, बाजारातील व्यवहार पद्धती व आकारले जाणारे निरनिराळे दर ह्यांची निश्चिती करणे, बाजार व्यवहार करणारे अडत्ये, दलाल, व्यापारी, मापाडी (माल मोजणारे), हमाल इत्यादींच्या अधिकारपत्रांचे शुल्क ठरविणे, बाजारात येणारा माल साठविण्यासाठी सुरक्षित गुदामे, आरामगृहे, पिण्याचे पाणी आदी सोयी पुरविणे बाजारभाव, मालाचा साठी, आवक, उत्पादन वगैरेसंबंधी विश्वसनीय माहिती गोळा करून रेडिओ, पत्रके वगैरेंच्या माध्यमांतून प्रसारित करण्याची व्यवस्था करणे, मालाची विक्री खुल्या पद्धतीने होईल हे पाहणे, योग्य वजने-मापांचाच वापर करण्याची सक्ती करणे आणि खरेदीदार व विक्रेते यांच्यातील तंटे सोडविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, ही बाजार समितीची मुख्य कर्तव्ये असतात.

वरील कर्तव्ये पार पाडण्यासाठी बाजार समितीला काही अधिकार दिलेले असतात. त्यांमुळे बाजार समितीला बाजारपेठेत येणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्या वर्तनावर देखरेख ठेवता येते व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना दंड अथवा व्यवहार थांबविण्याची सक्ती करता येते. दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सचिव व इतर कर्मचारीवर्ग नेमलेला असतो. बाजार समितीचा खर्च चालविण्यासाठी बाजारातील व्यवहारांवर अल्प उपकर (सेस) आकारला जातो. बाजार समिती ही जरी बाजारातील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था असली, तरी कायद्यान्वये सरकारचे समितीवर व तदनुषंगाने बाजारावर नियंत्रण असते.

नियंत्रित बाजारपेठेची वैशिष्ठये : खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर घेतले जाणारे अनावश्यक आकार कमी करून व बेकायदा आकार घेण्यावर निर्बंध घालून योग्य आकाराची निश्चिती केली जाते बाजारातील सर्व व्यवहारांवर नियंत्रण असते खरेदीवर, व्यापारी, दलाल, मापाडी, हमाल वगैरे घटकांना ओळखपत्रे दिलेली असल्याने उचित व्यवहाराची खात्री असते योग्य वजने-मापे वापरली जातात फक्त खुला लिलाव व खुला व्यवहार या पद्धतीनेच खरेदी-विक्री होते मालाची प्रतवारी, वजन इत्यादींबाबात उद्भवणारे तंटे सोडविण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारलेली असते विश्वसनीय व अद्ययावत बाजारभावांची माहिती मिळण्याची सोय असते बाजारपेठ व बाजार समिती यांवर सरकारची देखरेख असते.

नियंत्रित बाजारामुळे केवळ उत्पादकाचाच फायदा होतो असे नाही, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचाही फायदा होतो : (१) उत्पादकाला त्याच्या मालाची अधिक किंमत मिळून उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळते. (२) उत्पन्न वाढल्यामुळे शेतीत अधिक भांडवलाची गुंतवणूक करणे शक्य होते. (३) शेतकऱ्याचे उत्पन्न वाढल्याने त्याची क्रयशक्ती वाढून इतर उपभोग्य मालाची मागणी वाढते. (४) शेतकी व्यवसायात सुधारणा घडवून आणून उत्पादनवाढीस चालना मिळते.

नियंत्रित बाजारपेठा ह्या कृषकवर्गाच्या तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांच्या कार्यवाहीस अनेक अडचणी निर्माण होतात. व्यापारीवर्गाचा विरोध, नियंत्रणातून पळवाटा काढण्याची व्यापाऱ्यांची वृत्ती, वाहतूक साधने व सुविधा यांचा अभाव, माल विकण्याची निकड या प्रमुख अडचणी आहेत.

नियंत्रित बाजारपेठा ह्या कृषकवर्गाच्या तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांच्या कार्यवाहीत अनेक अडचणी निर्माण होतात. व्यापारीवर्गाचा विरोध, नियंत्रणातून पळवाटा काढण्याची व्यापाऱ्याची वृत्ती, वाहतूक साधने व सुविधा यांचा अभाव, माल विकण्याची निकड या प्रमुख अडचणी आहेत.

नियंत्रित बाजारपेठेची पद्धती प्रथम हैदराबाद संस्थानात १८८६ मध्ये अस्तित्वात आली. परंतु पहिला नियंत्रित बाजारपेठांचा अधिनियम १८९७ मध्ये वऱ्हाड प्रांतात झाला. भारतीय मध्यवर्ती कापूस संस्थेने शिफारस केल्यानुसार १९२७ साली मुंबई इलाख्यात ‘कापूस बाजार अधिनियम’ अस्तित्वात आला. त्या कायद्याप्रमाणे कापसाची सर्वांत पहिली नियंत्रित बाजारपेठ १९३॰ साली धुळे येथे स्थापन करण्यात आली. १९३८ साली केंद्र सरकारद्वारे एक आदर्श अधिनियम तयार करण्यात आला. त्यातील तरतुदींनुसार निरनिराळ्या राज्यांनी आपले अधिनियम तयार केले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नियंत्रित बाजारपेठांचा विकास काहीसा मागे पडला असला, तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक पंचवार्षिक योजनेत नियंत्रित बाजारपेठांच्या विकासावर भर दिल्याचे आढळते. शेतकी हा विषय राज्य शासनांच्या अखत्यारीत असल्याने नियंत्रित बाजारपेठांबाबत समान सुसूत्र धोरण निर्माण होऊ शकले नाही. नियोजनाच्या सुरुवातीच्या वर्षी नियंत्रित बाजारपेठा केवळ २॰॰ होत्या जानेवारी १९७७ पर्यंत त्यांची संख्या ३,६३॰इतकी झाली, यावरून त्यांची संख्यात्मक प्रगती लक्षात येते.

सहाव्या पंचवार्षिक योजनेत शेतकऱ्याच्या मालाला वाजवी किंमत मिळवून देणे, ग्राहक व विक्रेते यांच्यातील मूल्यविस्तार कमी करणे, व्यापारी व अडत्ये यांच्याकडून आकारले जाणारे दर कमी करणे, या अनुरोधाने नियंत्रित बाजारपेठांचा विकास व्हावयाचा आहे. पंजाब व हरयाणा राज्यांत नियंत्रित बाजारपेठा यशस्वी ठरल्या असून बाजार समित्यांच्या वाढीव उत्पन्नांतून खेड्यांच्या विकास कार्यक्रमांना चालना मिळालेली आहे. सहाव्या योजनेत नियंत्रित बाजारपेठेत प्रतवारीची व्यवस्था, सहकारी विपणन व बँकिंगची सांगड घालण्यात यावयाची आहे. गुरे, मासे व फळे व भाजीपाला ह्यांच्या बाजारपेठा नियंत्रित व्हावयाच्या आहेत. मुख्य व्यापारी पिकांनाही नियंत्रित बाजारपेठांच्या कक्षेत आणण्याची योजना आहे.

             आज आपणांस सर्वत्र प्रत्येक ठिकाणी पावती दिली जाते. आपण कधी पावती बघत नाही त्यावरील तारीख सही बघत नाही. काय लिहिलं आहे हे पाहत नाही. आणि न बघता खिशात घालतो म्हणजे आपणच भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहोत. 

         समजा एखाद्यावेळी त्या त्या गावातील ग्रामसेवक. मुख्याधिकारी. आयुक्त यांनी आठवडा बाजारांवर अचानक धाड घातली आणि अशावेळी पावतीवर तारीख नाही. सही नाही किंवा पावती दिलेलीच नाही. अशा विविध समस्येसाठी संबंधित बाजारातील लोकांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्या त्या विभागात बाजारच्या कराच्या पावत्या देणारे अधिकारी व कर्मचारी यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आयजीचे जीवांवर बाइजी उदार

 

आयजीचे जीवांवर बाइजी उदार 

             गतकाळातील लोकांना भविष्यात काय होणार कस होणार म्हणजे एक जण राबतो आणि त्याचा लाभ दुसराच घेतो. यालाच आयजीचे जीवांवर बाइजी असं म्हणलं जातं होतं. यावेळी सुध्दा लोक शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे स्वार्थी होतेच. सर्वांनाच पैसा जमीन सत्ता याची लालसा होती पण कोणीही कोणाचा हक्क मारत नव्हता. थोडी का होईना माणूसकी प्रेम आपुलकी जीवंत होती त्यामुळे लोकांच्यात विविध समाज यांच्यात एकी होती आज सगळा प्रकार उलटा झाला आहे 

                काळ झपाट्याने बदलला आणि त्याबरोबर लोकांची राजकारणी लोकांची सत्ता आणि पैसा संपत्ती मिळविण्याची इच्छा इतकी बुलंद झाली की. समाजातील नामांकित व्यक्ती एकामेकाला व समाजातील गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला मातीत घालून आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या मागे लागले. 

    . शासनाने विविध समाजासाठी. गोरगरीब वंचित घटकांसाठी विविध शासकीय निमशासकीय आर्थिक. विकास महामंडळ यांच्या माध्यमातून समाज व लोक सक्षम करण्यासाठी योजना राबविण्यात आल्या. त्यासाठी विविध शासकीय कागदोपत्री अटि शर्ती घातल्या आणि त्या न पूर्ण होण्यासारखं या. होत्या त्यामुळे लोक ग्रामीण व शहरी दुर्गम भागातील. लोक या योजनांपासून कोसो दूर राहीले कारणं सर्वात मोठें भांडवल होत ते म्हणजे जात वर्गवारी. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती अशी वर्गवारी करण्यात आली आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी 1967 चा तुम्ही कोणत्या जातींचे आहात याचा पुरावा मागितला मग मला सांगा त्यावेळी शाळा होती का ? आमचें पूर्वज पोटासाठी हे गाव ते गाव फीरत होते कागद कसला असतो त्याचा उपयोग काय असतो हे त्यांना कळलंच नाही त्यामुळे त्यांनी कशावरही आपली जात लिहून ठेवली नाही. त्यामुळे आज गोरगरीब घरात मुल हुशार आहेत पण सोबत वशिला नाही पैसा नाही त्यामुळे गरिब गरिबच राहीला आणि सत्ता असणारे पैसा आणि वशिला यामुळे नापास मुल सुध्दा कसलीही लायकी नसणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी झाले क्लास वन अधिकारी पोलिस तहसिलदार तलाठी मंडलधिकारी ग्रामसेवक व. इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार अन्य ठिकाणी आपल्यावर राज्य करण्यासाठी हजर झाले कशामुळे शासनाने विविध कल्याणकारी योजना शिष्यवृत्ती. वसतिगृह. प्रबोधनी वर्ग. मोफत पोलिस प्रशिक्षण वर्ग. मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण वर्ग. आणि सर्वात मोठा साप आहे तो जातवरगवारी. मोफत हक्काचे शिक्षण हे फक्त राजकारणी आणि सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांनीच लाटले म्हणजे आयजीचे जीवांवर बाइजी असा प्रकार झाला. 

        पूर्वी विविध समाजातील काही समाज प्रामाणिक पणे आपली कामे व एकनिष्ठ राहिले म्हणून पूर्वीचे राजे महाराजे यांनी आपल्या राज्यातील. कांहीं एककर जमीन. प्रामाणिक पणे आपले कर्तव्य करणारे समाज यांना दान केल्या त्यात प्रामुख्याने. महारकी. मुलाणकी. देवस्थान जमीन. गायरान इनाम. अशा हजारों एककर जमीन या विविध प्रामाणिक समाजाला दिल्या. त्या जमीनीवर शेती करून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करावे यासाठी ह्या जमीनी देण्यात आल्या होत्या. पण वाईट प्रकार झाला तो म्हणजे आपल्यात रुढ झालेली पक्ष पद्धती. सरकार सत्ताधारी आणि विरोधी पक्ष. असे झाले. आणि जे लोक सत्तेत होतें त्यांनी या वंचित समाजाला तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. जीवन समृद्ध होईल. प्रत्येकाला पक्के घर देतो. येथे सुरू होणारे कारखाने व सर्व संस्था यामध्ये सभासदत्व देतो आणि आपली भोळी भाबडी जनता फसली अशी विविध फसवी आश्वासने देऊन ही हजारों एककर हक्काची जमीन हडप केली आणि. आज आपणांस जे साखर कारखाने. विविध दिनदयाळ सुतगिरणी. मागासवर्गीय सुतगिरणी. अनुसूचित जाती जमाती सुतगिरण. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या. मजूर सोसायट्या. विविध आर्थिक विकास महामंडळ. बॅंक संस्था पतसंस्था. शैक्षणिक संस्था. अशे विविध प्रकल्प या समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून स्थापन केले. पण आपण कधीच गांभीर्याने विचार केला नाही वरील सर्व सेवा सुविधा देणारया योजनांत एकाही गोरगरीब नाही. गोरगरीब माणसांचे नाव आहे ते फक्त संचालक सभासद. यामध्ये फक्त बोर्डावर जेव्हा यांना अनुदान मिळवायचे आहे तेव्हा त्या गरिबाला एक दिवसांचा संचालक चेअरमन केला जातो आणि इतर वेळी तोच व्यक्ती त्या संस्थेत झाडलोट करण्याचे काम करत असतो बघा. जागा आपली. संस्था आपल्या नावावर. माणूस बळ आपल. आपण कामगार आणि कोणतेही कष्ट न करणारे मालक. कोट्यावधी रुपये अनुदान लाटून अरबो रूपयांची संपत्ती यांनी गोळा केली आहे. म्हणजे आयजीचे जीवांवर बाइजी असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. 

            आज शासनाने समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजना अंमलात आणल्या त्यामध्ये. जिल्हा परिषद शाळा. हुतात्मा स्मारक. समाजमंदिर. घरकुल. रेशन योजना. अशा एक नाही अनेक योजना राबविल्या जातात. पण आज अस ध्यानात आले आहे की. जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या त्यामध्ये लोक अवैध धंदे करायला लागले. प्रत्येक गावात एक हुतात्मा स्मारक उभे आहे आपल्या देशासाठी बलिदान देणारे सैनिक यांना मानवंदना देण्यासाठी शासन लाखो रुपये अनुदान खर्च करून बांधत असते. आज अशे कित्येक हुतात्मा स्मारक बंद पडले आहेत त्यांची पडझड झाली आहे. एवढंच काय त्यात गावातील लोकांनी पाऊसाळयात गुर ढोर बांधायला चालू केले. दारू पिण्यासाठी अड्डे तयार झाले किती वाईट आहे बघा. समाजमंदिर समाजाच्या मागणीनुसार प्रत्येक समाजासाठी लहान लहान कार्यक्रम करता यावे यासाठी शासनाने समाजमंदिर ही संकल्पना अमलात आणली आणि व्यवस्थित राबविली. आणि लाखो रुपये खर्च करून समाजमंदिर बांधली पण आज यांचा वापर थांबला आणि लोक आपले सर्व मंगल कार्यक्रम बाहेर कार्यालयात करायला लागले आणि सर्व समाजाची समाजमंदिरे मोकळी पडली त्यात कुत्री उंदर घुसी जनावरे बसायला सुरुवात झाली एवढंच काय त्यातील काही समाजमंदिर भाड्याने सुध्दा दिली आहेत. आत्ता सर्वात महत्वाची योजना सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी घरकुल योजना. यात सुध्दा मोठा घोटाळा. शिपाई क्लार्क अधिकारी व कर्मचारी ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर याचे पैसे मिळवून भागलयावर बाकी राहीले त्यात घरकुल बांधकाम होणार म्हणजे त्यांचा दर्जा निकृष्ट असणारच त्यात वाटप हा माझ हा तुझा या तत्वावर ज्याला घर आहे नोकरी आहे जमीन शेती आहे. मिळविणारे कुटुंब आहे यांनाच या घरकुल योजनेअंतर्गत घर आहे.आणि. त्या लोकांनी ही घरकुल विकली आहेत. भाड्याने दिली आहेत. जो व्यक्ती आपले कुटुंब घेऊन झोपडपट्टीत राहतोय. गुडघाभर पाणी चिखल. स्वच्छतेचा अभाव असणार्या ठिकाणी राहतो. नोकरी नाही शेत जमीन नाही. सवताचे घर नाही. त्याला घरकुल मिळत नाही सर्वांना हक्काचे निवडक व स्वच्छ धान्य मिळावे गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळावे. यासाठी २००५ रोजी. आर्थिक सदन आणि दुर्बल असा सर्वे करण्यात आला होता त्यानुसार ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ३९ हजार आणि शहरी भागात ४९ हजार असा निकष काढून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे करण्यात आला होता. पण आज उलट झाल म्हणजे ज्याला गरज नाही त्याला दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळाले त्यांना रेशनचा अन्न धान्य मिळाले हे अन्न धान्य हे सदन लोक सवता न खाता आपल्या जनावरांना घालतात. काय उपयोग आहे का याचा. आणि जो खरोखरच दुर्बल आहे त्याला दारिद्र्य रेषेखालील दाखला आहे पण रेशन कार्ड नाही. रेशन अन्न धान्य तर मिळतच नाही. आणि या सर्व प्रकाराला जबाबदार आहे ते म्हणजे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि सर्वे करणारे अधिकारी व कर्मचारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली. लाईट बिल सर्वात मोठें खाजगीकरण. यामुळे आज नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे त्यांचे कारखाने पाणी पुरवठा योजना. जसे ताकारी म्हैसाळ योजना. वाकुरडे पाणी पुरवठा योजना. अशा विविध योजना आहेत की त्यांची लाखों रुपये लाईट बिल नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी गिळाकृंत केले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणजे पैसा शेतकरी लोकांचा पण यांनी लाईट बिल भरलच नाही त्याची लाईट बंद करायला एक तरी विधुत महावितरण कंपनीचा अधिकारी व कर्मचारी गेला कां. आणि आपलं एक लाईट बिल थकित असल्यास आपली लाईट बंद केली जाते. लाखों रुपये पाणीपट्टी थकबाकी असतें. नळ जोडणी सुध्दा बेकायदेशीर असते कोण नळ कनेक्शन बंद करायला जात कां आपलं लगेच बंद करतात. घरपट्टी यांना नसतेच जागोजागी जनतेच्या भल्यासाठी फिरणारे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या वाहनांचा एक दिवसांचा खर्च लाखो रुपये असतो. आणि हे सर्व चोर आपली पक्षाची भूमिका प्रचार प्रसार प्रसिध्दी करण्यासाठी आपल्याच पैशांतून फिरतात. आणि सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला दिवसभर उन्हात काम करून एक लिटर सुध्दा तेल गाडीत टाकून कामांवर जाण्यास पैसे नाहीत म्हणून म्हणतो की आयजीचे जीवांवर बाइजी उदार किती दिवस सहन कराव लागणार माहीत नाही 

          बांधकाम कामगार नोंदणी आज सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारणं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून खरोखरच बांधकाम कामगार असणारे यांचेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक विमा संरक्षण अशा विविध योजना आहेत पण आज उलट झाल आहे की जिल्ह्यात निर्माण झालेली संघटना सेवाभावी संस्था युनियन महिला कामगार संघटना अशी दुकाने एजंट दलाल तयार झाले आहेत त्यामुळे आज बोगस कामगार नोंदणीला उत आला आहे यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हेच जबाबदार आहेत. यांच्यामुळे खरोखरच बांधकाम कामगार कल्याणकारी योजना बोगस कामगार आज हडप करत आहेत. १०००/२००० रुपये घेऊन इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार दाखला मिळतो. कामगारांच्या आर्थिक लाभातील मोठा आर्थिक हिस्सा काढून घेतला जातो. म्हणजे आज खरोखरच इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आणि संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट दलाल हेच आज आयजीचे जीवांवर बाइजी उदार असे चित्र दिसत आहे कामांवर सुध्दा इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे बांधकाम कामगार यांना आर्थिक दृष्ट्या लुटत आहेत 

           वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा हा शब्द आत्ता कालबाह्य झाला आहे वैद्यकीय सेवा ही फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे म्हणजे मोठ मोठी हाॅसपिटल दवाखाने विविध लॅब. एक्सरे. मेडिकल. असे विविध वैद्यकीय क्षेत्रातील उपयोगी पडणारी सेवा साधनें. निर्मिती करणारे सेवा सुविधा आणि मोठमोठ्या दवाखान्यात उपचाराच्या नावाखाली बेमाफी बील वसुली करण्यासाठी दवाखाने सुध्दा नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचेच आहेत म्हणजे जनतेचा एकही पैसा शिल्लक राहीला नाही पाहिजे अस करेक्ट नियोजन यांनी लावले आहे. दवाखाना यांचाच मेडिकल डॉ नर्स यांचेच मग सर्व काही आपल्याच घरात असा प्रकार आहे म्हणजे आयजीचे जीवांवर बाइजी उदार हे खरोखरच खरं आहे

            शैक्षणिक हे सर्वात मोठे दोन नंबर आहे कारणं शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे त्याला शासन लाखों रुपये अनुदान देऊन शैक्षणिक संस्था निर्मिती करत आहे दोन नंबर आहे म्हणजे याला टॅक्स नाही कसलीही चौकशी नाही किती फी आकारली जाते किती आकारली पाहिजे हे बंधन नाही त्यामुळे आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देशभरात सर्व नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्ये बगलबच्चे यांनी शिक्षण संस्था काढल्या आहेत गोरगरीब समाजाची. सर्वसामान्य माणसाला ते जमलं नाही हुशार आहे पण वशिला नाही सत्ता नाही पैसा नाही. त्यामुळे आज आपण मागच राहीलो. आणि समाजातील आपणच आपल्या मताने निवडणून दिलेले लोक पदराचा एकही रुपयां न लावता लाखो नाही करोडो रुपये मिळवायला लागलें जागा फुकटची आहे. म्हणजे मी म्हणतो ते खरं आहे आयजीचे जीवांवर बाइजी उदार 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपले सरकार सेवा केंद्र ग्राहकांची आर्थिक लूट

 

आपले सरकार सेवा केंद्र
ग्राहकांची आर्थिक लूट

                केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायती व शहरी राज संस्थांच्या कारभारामधये इ- पंचायत व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे. नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेलें सेवा सुविधा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे. तसेच इतर व्यवसायिक सेवा जास्तीत जास्त प्रकारच्या बॅंकिंग सेवा सर्वgrc व brc सेवा ग्रामीण जनतेला शहरी जनतेला एकाच ठिकाणी एकाच केंद्रावर मिळाव्या व शासन दराप्रमाणे मिळावे या हेतूने राज्यातील ग्रामपंचायत शहरांत जागोजागी शासन निर्णयानुसार महा ई सेवा केंद्रे.  व आपले सरकार पोर्टलची स्थापना करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे आणि होता यापूर्वी ई-पंचायत. नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार ( डिजिटल इंडिया मधील एक मिशन मोड विकास कार्यक्रम) हा प्रकल्प राज्यात संग्राम ( संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने सन २०१२ ते २०१५ या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात आला.  या प्रकल्पासाठी महाआॅनलाईन ( महाराष्ट्र शासन व टाटा कन्सल्टन्सी याचीसहभगीदारी कंपनी ) ही संकल्पना अमलात व अंमलबजावणी यंत्रणा होती. आता सदर प्रकल्पाचा टप्पा राज्य शासनाचे ग्रामविकास विभाग माहीती तंत्रज्ञान सचनालय वcsc spv. केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रम यांच्या संयुक्त माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्याचे आहे

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती. नगरपालिका आणि महानगरपालिका अधिनियम १९६१ चे कलम २६१ नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ते कलम १५३(अ) व (ब) नुसार राज्यशासनास पंचायत राज संस्थांना विकास योजनांसाठी मार्गदर्शन करण्याच्या अधिकारानुसार राज्यातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका आपले सरकार सेवा केंद्राची अंमलबजावणी सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत 

             पंचायती राज्य संस्थांचा कारभार संगणीकृत होऊन ई पंचायत. प्रकल्पाअंतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे शक्य होईल तसेच ग्रामपंचायती द्वारे व आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणारीgrc सेवा नागरिकांना आता आपले सरकार सेवा केंद्रामार्फत उपलब्ध होतील. शासनाच्या इतर विभागामार्फत देण्यात येणार्या सेवा तसेच ग्रामीण नागरिकांना आवश्यक असलेल्या इतर आर्थिक सेवा. व्यवसायिक सेवा तसेच ग्रामीण नागरिकांना आवश्यक असलेल्या इतर व्यवसायिक सेवा शासन सेवा व्यतिरिक्त उदा.  रेल्वे आरक्षण. बस आरक्षण. डिटीएच रिचार्ज.  बॅंकिंग सेवा.  आर्थिक समावेशन.  ईकाॅमरस.  पॅनकार्ड. आधारकार्ड.  विमा हप्ते.  पासपु.  लाईट बिल. पोस्ट विभागाच्या सेवा.  बांधकाम कामगार नोंदणी.   सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात लागणारे दाखले. या केंद्रावर उपलब्ध असतील व त्यामाध्यमातून सदर केंद्र भविष्यात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. 

      सांगली जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्रावर शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याबाबत वेळोवेळी नागरिका मधून तक्रारी प्राप्त होत आहेत त्यास अनुसरून सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी महाराष्ट्र शासन माहीती तंत्रज्ञान विभागाकडील शासन निर्णय दि. १९/०१/२०१८ मधील परिच्छेद क्र ५ नुसार सर्व आपले सरकार केंद्रावर केंद्र चालकांनी खालील प्रमाणे कर्तव्य व आपले काम जबाबदारयाचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे यासाठी काही नियम सेवा शर्ती अटि घालून दिल्या आहेत

#. आपले सरकार सेवा केंद्र चालकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या

* शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे

* सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी केंद्रावर शासना निणयातील परिशिष्ट- ड.  प्रमाणे "आपले सरकार सेवा केंद्र" अस फलक लावणे बंधनकारक आहे

* शासनाने ठरवून दिलेले सेवांचे दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात लावणे तसेच ठरवून दिलेल्या शुलका पेक्षा जादा शुल्क न घेणे

* सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणे देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे

* विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेल्या वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे

* शासनाद्वारे निश्चित केलेल्या कार्यपद्धती नुसार पुरविणे व शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे

      तरी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सुचना देण्यात येते की उपरोक्त नियमांचे पालन केंद्र चालकादवारे न केल्याचे आढळून आल्यास सदर आपले सरकार सेवा केंद्र चालका विरूद्ध कारवाई करण्यात येईलच. असे शासन निर्णय सांगतो आणि आपणं सुध्दा आज सतर्क होण्याची गरज आहे

     # महाराष्ट्र शासन #

आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा सेतू व ई- प्रशासन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली

आपल्याला दैनंदिन जीवनात शासकीय निमशासकीय कार्यालयातील मुलांना. शेतकरी नोकरदार. कामगार. अशा विविध गटातील लोकांना विविध दाखले लागतातच. आणि त्यासाठी आपणांस वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी आपले सरकार सेवा केंद्र शासनाने सुरू केले आहे त्यासाठी कोणत्या दाखल्यासाठी किती पैसे घेणे आवश्यक आहे. व तो दाखला किती दिवसांत संबंधित व्यक्तिला देणे यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. पण आज सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात. आपले सरकार सेवा केंद्र. महा ई सेवा केंद्र अशा ठिकाणी शासनाच्या निर्णयाला महा ई सेवा केंद्र चालकांनी केराची टोपली दाखवली आहे म्हणजे शासनाची सुध्दा यांना भिती नाही

प्रमाणपत्र/ दाखले/ आकारावयाची फी/कालावधी

* उत्पन्नाचा दाखला

फी.   ३३ रूपये ६९ पैसे

कालावधी. १५ दिवस

* जातीचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र

फी.  ५७ रूपये २० पैसे

कालावधी.  ४५ दिवस

* नाॅन क्रिमी लेअर व प्रमाणपत्र

फी ५७ रूपये २० पैसे

कालावधी.  २१ दिवस

* नाॅन क्रिमी लेअर नुतनीकरण

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. २१ दिवस

* ३०/टक्के महिला आरक्षण प्रमाणात

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* तात्पुरता रहिवास/ रहिवासी प्रमाणपत्र

फी.  ३३ रुपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

फी. ३३ रुपये ६० पैसे

कालावधी. १५ दिवस

* पत प्रमाणात

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. २१ दिवस

* जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

*सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* प्रतिज्ञापत्र साक्षांकित ( अॅफिडिवहिट)

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी तात्काळ

* दगड खाणपटटा परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ३० दिवस

* गौण खनिज परवाना ( माती)

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ३० दिवस

* इतर गौणखणिज परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ३० दिवस

* स्टोन क्रशर परवाना

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ७ दिवस

* वारसा प्रमाणपत्र

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ७ दिवस

* वंशावळी चे प्रतिज्ञापत्र

फी  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. तात्काळ

* अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. १५ दिवस

* ७/१२ उतारा प्रमाणपत्र

फी. २३ रुपये ६० पैसे

कालावधी तात्काळ

* ८ अ उतारा प्रमाणपत्र

फी २३ रूपये ६० पैसे

कालावधी. तात्काळ

           वरील सर्व नियम त्यात आर्थिक नियम.  विहित नमुन्यातील अर्ज निकालात काढण्यासाठी वेळ कालावधी ठरवून दिला आहे. पण आज कोठेही हा शासन आदेश पाळला जात नाही. आपणास कळावे यासाठी वृतमापत्रात दुरदरशन वर पाहतो वाचतो आणि सर्व समाजातील समाजसेवक आपल्यास कळावे यासाठी वेळोवेळी जाहीर करत असतात पण आपणं त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आर्थिक लुटीला फसतो. 

               आज आपले सरकार सेवा केंद्र येथे सर्वसामान्य जनतेचे काम होत नाही आणि होत ते वेळेत नाही यासाठी लोकांना नेटकॅफे यांचा रस्ता धरावा लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर.  जातींचा दाखला. १००० रूपये. बांधकाम कामगार नोंदणी. ५००/६०० रूपये. अशा विविध दाखल्यांचे दर मनमानी पद्धतीने लावलें जातात. आधारकार्ड नोंदणी ही पूर्णपणे मोफत करा असा शासन निर्णय आहे तरी सुद्धा नावांत बदल २०० रूपये.  जन्मतारीख अपूर्ण २००   फोटोत बदल २०० रूपये असे आर्थिक निकष वापरले जातात ही तर लुटच आहे. 

          ई- श्रम कार्ड केंद्र शासनाची आर्थिक दुर्बल लोकांसाठी असणारी योजना आहे त्यानुसार राज्यात कामगार संख्या किती आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने ही शेतकरी  भूमिहीन शेतमजूर बांधकाम कामगार. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. घरकाम करणाऱ्या महिला अशा विविध घटकांतील लोकांचा सर्वे करून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून राबविण्यात येणारया योजनांचा लाभ देण्याचा सुध्दा शासनाचा विचार आहे यासाठी विकासाच्या प्रवाहात हे गोरगरीब लोक यावी यासाठी आपल्या गावातील. महा. इ सेवा केंद्र यांना एक ठराविक कोठा ठरवून दिला त्यासाठी ई- श्रम कार्ड काढण्यासाठी कॅम्प लावणे व ती सर्व ई-श्रम कार्ड मोफत काढायचे आहे त्यासाठी कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत असा शासनाचे सक्त आदेश आहेत तरी सुद्धा आज १००/२०० रूपये घेवून कामगार व आर्थिक गरिब लोकांना महा ई सेवा केंद्र वाले व आपले सरकार सेवा केंद्र वाले दोनहिकडून लुटत आहेत

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

ग्रामसभा आणि जनता दरबार

 

ग्रामसभा आणि जनता दरबार

              ‌‌        आपल्या समाजात आपल्या अवतीभवती अनेक मानसिक विकृती असणारे लोक आपणास पहावयास मिळतात. तर सदन आणि दुर्बल अशा वर्गवारी असणारे लोक सुद्धा गरिबीत न्याय मिळत नाही म्हणून अन्याय सहन करत असतात. काही ग्रामीण भागातील लोकांनाच नाही तर शहरी भागातील लोकांना आपले मूलभूत हक्क व अधिकार काय आहेत त्यांचा वापर कोठे आणि कसा करावा हे माहीत सुध्दा नसते. 

       माणसाला संविधान मध्ये. मूलभूत हक्क व अधिकार यामध्ये. सामाजिक हक्क.  शैक्षणिक हक्क.  वैयक्तिक हक्क व अधिकार. वैद्यकीय सेवा सुविधा मिळण्याचा हक्क.  आर्थिक विकास याचा हक्क.  उद्योग व्यवसाय करण्याचा हक्क.  फिरण्याचा हक्क.  मत मांडणे बोलण्याचा अधिकार.  न्याय मागण्याचा अधिकार.  राजकीय स्वातंत्र्य.  असे विविध हक्क व अधिकार संविधानात सर्वसामान्य माणसाला देण्यात आले आहेत. 

           ग्रामपंचायत ही संकल्पना अमलात आली आणि सर्व ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी आवश्यक असणारे सर्व शासकीय निमशासकीय योजनांची माहिती लोकाना होण्यास सुरुवात झाली. आणि त्या सर्व विकासासाचया योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सभासद सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी तहसिलदार यांना नेमण्यात आले. सरपंच उपसरपंच गावांसाठी विकास निधी आणण्यासाठी आपणच आपल्या मधून निवडणूक या माध्यमातून मत प्रणाली राबवून निवडले जातात कशासाठी आपल्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य लोक. व गावाच्या विकासासाठी यांना निवडून दिले. लोकांना आपले मत. हक्क व अधिकार समजावें आपल्या गावातील विकासाची स्थिती समजावी. आपल्या गावांसाठी शासन कोणत्या वर्षात किती निधी दिला जातो तो कोणत्या विकास कामांसाठी कसा व किती खर्च केला जातो हे जाणून घेण्याचा सर्वांना हक्क व अधिकार आहे.  यासाठी शासनाने ग्रामसभा ही संकल्पना अमलात आणली. ग्रामसभा नियमानुसार गावातील सर्व लोकांना नागरिकांना  ग्रामपंचायती कडून निमंत्रण पत्रिका देऊन गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. आणि ग्रामसभा घेतल्यावर आपल्या गावातील कोणती विकास कामे केली. त्यासाठी किती निधी शासनाने दिला. किती खर्ची पडला आणि शिल्लक किती. ग्रामपंचायतीला करांच्या माध्यमातून मिळणारा वार्षिक मिळकत.  त्यातून खर्ची पडलेली रक्कम याचा लेखाजोखा ठेवणे व ठेवला आहे का? गावात नवीन नोदि किती झाल्या.  घरकुल वाटप किती झाले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत किती निधी उपलब्ध झाला त्याप्रमाणे खर्च व विकास झाला आहे. जन्म मृत्यू नोंद. ग्रामसेवक यांनी गावातील गोळा होणारी कराची रककम यांचे रजिस्टर ठेवलें आहे का? असे सर्व विषय गावातील लोकांना वाचणं करून    हे सर्व गावचावडी वाचण करून दाखविणे यासाठी ग्रामसभा आयोजित करणे गरजेचे आहे. त्या ग्रामसभेमधये सर्वांना शंका वाटेल तिथे विचारण्याचा अधिकार आहे. त्यावेळी कोणीही त्यांना अटकाव करू शकत नाही. ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात झाली पाहिजे. परवाची ग्रामसभा आॅनलाइन झाली कोणाला कळली कोणाला नाही. मग आज जागोजागी होणारें जनता दरबार खुलेआम कसे घेतले जातात. त्यावेळी राजकीय ताकद वापरली जाते आणि पोलिस बंदोबस्त घेऊन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे आज जनता दरबार घेत आहेत हे कोणत्या नियमांत बसतं 

            शहरात निवडणून येणारे नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे निवडणूक काळात सर्व अवैध मार्ग अवलंबले जातात त्यानुसार. संघटीत गुन्हेगारी असुरक्षितता. महिलांवरील अत्याचार वाढते प्रमाण.  यांसारख्या समस्यांमुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा बनतो त्याशिवाय आंदोलने मोर्चे. दंगेधोपे यांच्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येते.  शांतता आणि सुव्यवस्था टिकविणे ही पहिली शासनाची प्रशासनाची जबाबदारी आहे. पण आज सर्वत्र राजकीय दबाव असल्यामुळे सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नाला विविध राजकीय परिमाण प्राप्त होत आहे या प्रश्नातून उद्भवणारा पहिला मुद्दा म्हणजे गुन्हेगारीचे क्षेत्र आणि राजकारण यांचा परस्परसंबंध मोठ्या शहरांमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या कोणत्या तरि पुढार्यांचया छत्रछायेखाली गेल्या आहेत. आणि गुन्हेगार असणारे अशा नेत्यांना पाठिंबा देताना. आढळतात. साहजिक त्यांना राजकीय संरक्षण मिळते गुन्हेगारांच्या जगातील व्यक्ती आणि राजकीय पुढारी अनेक वेळा एकत्र वावरताना दिसतात.  त्यामुळे संघटीत गुन्हेगारीचा बीमोड कसा होणार आणि आपल्याला जनता दरबार या माध्यमातून न्याय कसा मिळेल.  म्हणजे राजकारण आणि गुन्हेगारी यांची फारकत कशी करायची हाच महत्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. मग आपल्याला न्याय मिळेल कां नाही हे नंतर बघू.  राजकारणाचे बदलते स्वरूप राजकारणातील समस्या भांडवलदार आणि गुन्हेगार यांचा परस्परसंबंध असे मुद्दे पुढे येतात. 

            राजकारणी आणि गुन्हेगारी यातून उद्भवणारा एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पोलिस दलांचे स्वातंत्र्य आपल्याकडे नेहमी पोलिस यांचेवर त्या त्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचा दबाव असतो.  नोकरी शासनाची पण काम करण्याची वेळ येते ती म्हणजे राजकारणी लोकांची.  राजकारणी यांना विरोध केला तर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या.  बढत्या.  गुन्हा नोदवा अथवा नोदवू नका. एकादा तपास मोहीम रोखण्यासाठी आलेले दडपण. अशाच गोष्टींना प्राधान्य मिळते.  

        देशाच्या विविध भागात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना आपणांस विचार करायला लावतात. पण आपणं कधी अभ्यास केला आहे का महिला अत्याचार प्रकरणातील बरींच प्रकरणे ही नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे सुद्धा सामिल असतांत अन्यथा यांचें बगलबच्चे सामिल असतांत.  पण मूळ प्रकरणांची उकल करण्यापेक्षा तो प्रसंग प्रश्न राजकीय चौकटीत सामावून त्याचे राजकारण केले जाते.  आपण एखाद्या जनता दरबार मध्ये आपल्या नेत्याला मागणी करा. बेरोजगारी कधी संपणार.   महिला पोलिस भरती होणार कां.   व्यवसाय मार्गदर्शन केंद्र प्रत्येक तालुक्यात होणार कां.  आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी येणार कां.  महिलांवरील अत्याचाराचे किती खटले चालू आहेत किती वर्ष चालू आहेत निकालात निघणार कां.  राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे का.  त्याचप्रमाणे शासनात ३० टक्के महिला प्रतिनिधी तरतूद करण्यात आली आहे का.   अत्याचार विरोधी कायदे.  हुंडाबंधक कायदा.  महिल दक्षता समिती.  नारी समता मंच.  महिला संघटना. ह्या सर्व माध्यमातून महिलांच्या प्रश्नांची आपल्या अवतीभवती आढळणारी सार्वजनिक रुपे आहेत त्यासाठी आपला नेता पुढारी आमदार खासदार मंत्री जनता दरबारात काय उत्तर देतो.

          नागरिकांना न्याय मिळणे सुलभ व्हावे म्हणून आपणं तालुका स्तरावरून न्याय यंत्रणा उभी केली आहे  तसेच आपल्या घटनात्मक अधिकार संरक्षणासाठी उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची तरतूद केली आहे न्यायालय दिरंगाई.  खटले पडून राहणे.  कामकाज वर्षानुवर्षे रेंगाळत पडणे.  त्यातून अधिक न्यायालये निर्माण करणे. न्यायाधिश जागांवर वेगाणे नेमणूक करणे.  यासारखे प्रश्न उभे राहतात त्याचबरोबर लोकन्यायालयाचे प्रयोग हे सुद्धा जनता दरबार याच प्रश्नाचे राजकीय रुप आहे   अशा न्याय व्यवस्थे विषयी आपल्याला जेव्हा असुरक्षित वाटत त्यावेळी आपणं आपल्या नेत्यांकडे आपले रडगाणे घेऊन जातो.  न्यायव्यवस्थेशी संबंधित असा दुसरा राजकीय प्रश्न न्यायसंस्थेतील गैरप्रकाराचा आहे वकिलांकडून होणारे गैरप्रकार.  आर्थिक लुट.  न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचार आणि खुद्द न्यायाधीशांचे गैरवर्तन यासारखे प्रश्न सध्या गाजत असलेलें आपल्याला दिसतात. कधीकधी या प्रशनाला गुप्ततेचे स्वरूप दिले जाते. अशा या न्याय व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या पाया पडावे लागते म्हणजे न्याय व्यवस्था सक्षम होणे गरजेचे आहे त्याशिवाय लोकांना राजकीय आश्रय योग्य असे वाटणे बंद होणार नाही.  

            न्यायव्यवस्थेचा आणखी एक राजकीय आविष्कार म्हणजे न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न यात न्यायाधिशांच्या नेमणुका बदल्या. बढत्या.  वेतनमान. अशा विविध प्रश्नांचा निर्णय घेण्याचा अधिकार राजकारणी लोकांनाच आहे. म्हणजे शासन हे फक्त नावालाच आहे त्याचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा राजकीय आहे म्हणजे सत्ता यांची. सरकार यांच. आर्थिक विकास महामंडळ यांची. सर्व सामाजिक संस्था संघटना यांच्याच. शिक्षण संस्था यांच्याच. ग्रामपंचायत पासून पंतप्रधान पर्यंत सर्व नियोजन यांचेच आहे म्हणजे जनता दरबार हे माझे समर्थक किती आहेत हे पाहण्याचे एक माध्यम आहे. तुमचे प्रश्न महत्वाचे नाहीत तर आमची लोकांना किती आवड आहे हे महत्वाचे.  आज एक सर्वात महत्वाची बाब आपणं नोद केलेली नाही ती म्हणजे ज्या जिल्ह्यातील लोकानी मतदान करुन आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला पण तो आज एका दुसर्याच जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्याला तिथ कोण ओळखत का नाही कुणास ठाऊक.  

            ग्रामपंचायत करापासून. विकास कामापरयणत. विविध दाखले. विविध नोदि. असे सर्व दाखल अर्ज वर्षानुवर्षे धुळ्यात पडले आहेत त्यासाठी आपणांस जनता दरबार मध्ये विचारणा करण्याचा अधिकार आहे का. त्यासाठी संबंधित पालकमंत्री शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी आदेश देणार काय.    तहसिलदार कार्यालय पुरवठा विभाग.  महसूल विभाग.  पेन्शन विभाग.  पुनर्वसन विभाग. आपत्तीच्या काळात पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारी.  शेतकरी पेन्शन योजना.  बोगस कारभार. आर्थिक लुट.  बोगस कामगार नोंदणी.  स्टॅम्प घोटाळा.  दस्त. सातबारा. फेरफार यासाठी घालावें लागणारे हेलपाटे.  ग्रामसेवक व इतर सर्व अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे.  पिक नुकसान पंचनामे.  शैक्षणिक फी बेमाफी वसुली. ग्रामीण भागातील रस्त्याचे कमीत कमी दोन तीन वर्ष धुळखात पडलेले अर्ज.  तलाठी मंडलधिकारी तहसिलदार. याचा मनमानी कारभार.  असे एक नाही अनेक प्रश्न आहेत त्यासाठी विचारणा करता येणार कां जनता दरबार मध्ये.  का नेते पुढारी आमदार खासदार मंत्री सरपंच उपसरपंच यांच्याच कार्यकर्ते यांनी सर्व जनता दरबार फुल्ल असणार आहे. त्यातच ज्या नेत्याने हा जनता दरबार घेतला आहे तो गृहखाते गृहमंत्री असेल तर मग बोलायचच नाही कारणं पोलिस प्रशासन त्यांच्या हातातच मग जर एकादा विरोधक असो वा गोरगरीब लोक सर्वसामान्य यांना बोलण्याचा अधिकार नाही कारणं नेत्याने खुणवले तरी पोलिस त्याला उचलणार

        जनता दरबार घेणारयानो जनतेच्या मनातून तुमची दहशत घालवा कमी करा लोकांचे प्रश्न निकालात काढा फक्त आणि फक्त राजकीय हेतूने जनता दरबार घेऊ नका

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गौडबंगाल # गौडबंगाल

 

गौडबंगाल # गौडबंगाल 

           बोगस कामगार म्हणजे कोण ? हा प्रश्न आज सर्वांच्या पुढे आहे. बोगस कामगार म्हणजे जया व्यक्तिचा बांधकाम या कामाशी कोणताही संबंध नाही असे विविध कामगार. बांधकाम म्हणजे काय ? वाळू कशाला म्हणतात ? खडी म्हणजे काय ? विट कशापासून तयार होतें ? सिमेंट वापर करतांना मटेरियल प्रमाण काय असतं ? जो व्यक्ती सरकारी आॅफिस मध्ये काम करतो. ज्याला शेती भरमसाठ आहे असा. जो आयकर भरतो. ज्याचा बॅंक बॅलन्स आवक जावक जास्त आहे असा व्यक्ती. बांधकाम क्षेत्र सोडून इतर घरकाम करणाऱ्या महिला. असे सर्वजण बोगस कामगार म्हणून गणले जातात. 

                  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या मिळविण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणारा व्यक्तिच नोंदणी करू शकतो त्यासाठी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे त्यासाठी इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे बांधकाम व्यावसायिक यांना अधिकार दिला आहे पण आज खरोखरच कामगार नोंदणी पासून वंचित आहे आणि इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे १०००/२००० रूपये घेऊन बोगस कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले देत आहेत म्हणजे सर्वात मोठा बोगस कामगार नोंदणी साठी त्यांनीच हातभार लावला आहे आणि बराच पैसा मिळविला आहे. आज डिप्लोमा इंजिनिअर कोर्स. असे रोज हजारो इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. यांना कोण काम देत नाही त्यामुळे दाखले देऊन आपल्या खर्चाचे जुगाड लावणारे बोगस इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आज आपल्या आसपास फीरत आहेत. 

          आपणच हुशार होण्याची गरज आहे. आजपर्यंत ज्या ज्या इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले दिले आहेत त्यांची माहीती जगजाहीर करा. अशा इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांची चौकशी लावा. व बोगस कामगार व इंजिनिअर यांचा सर्वे करा. आणि संबंधित व्यक्तिंना दंडात्मक शिक्षा व कारवाई करण्यात यावी. आत्ता बांधकाम कामगार यांच्यासाठी चालू असणारे सुरक्षा संच वाटप कोणकोणते बांधकाम कामगार याचा वापर करतात. याचाही सर्वे झाला पाहिजे. जे बांधकाम कामगार कामावर असताना सुरक्षा संच वापरत नाहीत त्यांनी शासनाला कल्याणकारी मंडळाला चुकीची माहिती देऊन मंडळांची फसवणूक केली या अंतर्गत त्यांच्यावर व त्यांना बांधकाम कामगार म्हणून दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. बांधकाम कामगार यांच्यासाठी वाटप करण्यात येणारे आर्थिक लाभ. ज्या ज्या बोगस बांधकाम कामगार यांनी लाभ घेतला आहे. त्याचाही सर्वे करून त्यांच्यावर व त्यांना बांधकाम कामगार म्हणून दाखले देणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जेवढा निधी बोगस कामगार नोंदणी दाखलयामुळे वाया गेला आहे तेवढा आर्थिक दंड करण्यात यावा. आणि शिक्षा शिवाय त्यांचे बांधकाम कामगार म्हणून असणारे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे. 

      गोरेपान लोक. टाचतल रगात दिसणा-या महिला सुरक्षा संच वाटप केंद्रावर सुरक्षा संच घेणयास येत आहेत. कुणी या लोकांना बांधकाम कामगार सिध्द केले. कोणत्या अंगाने हे बांधकाम कामगार दिसतात ते सांगा. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा. यामुळे खरोखरच बांधकाम कामगार असणारे यांना काहीच फरक पडणार नाही. याचा सर्वात मोठा तोटा होणार आहे तो म्हणजे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आणि एजंट यांचा होणार आहे. कारणं आज घाम गाळून आपले पोट भरणारा कामगार उद्या सुध्दा काम करेल पण जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद झाले तर यांच्या जीवावर लाखोंची कमाई करणारे यांच काय ? दुसरं काम येत नाही घाम गाळायची तयारी नाही. भांगलायला येत नाही. मग यांनी काय करायचं. म्हणून शासनाला विनंती आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एक वर्ष बंद करा आणि मग बघा जागोजागी थाटलेली बांधकाम कामगार नोंदणी कार्यालये. यांना कुलप लागणार हे निश्चित. कामगार नेते हितचिंतक गायब होणार. हेच सत्य आहे  

कामगार वर्ग (किंवा कामगार वर्ग ) हा सामाजिक शास्त्रांमध्ये आणि सामान्य संभाषणात निम्न-स्तरीय नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे (कार्यक्षमता, शिक्षण आणि कमी उत्पन्नानुसार मोजले जाते) आणि बर्‍याचदा हा अर्थ देखील विस्तृत होतो. बेरोजगारी किंवा सरासरी उत्पन्न कमी असलेले लोक. कामगार वर्ग हा प्रामुख्याने औद्योगिक अर्थव्यवस्था असलेल्या आणि औद्योगिक नसलेल्या अर्थव्यवस्था असलेल्या शहरी भागात आढळतो .

सामाजिक वर्गाचे वर्णन करण्यासाठी विविध संज्ञा वापरल्या जातात, परंतु कामगार वर्ग परिभाषित केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. जेव्हा ते गैर-शैक्षणिक स्वरूपात वापरले जाते, तेव्हा ते सहसा समाजाच्या एका भागाला संदर्भित करते जे शारीरिक श्रमावर अवलंबून असते, विशेषत: ज्यांना तासाभराचे वेतन दिले जाते. शैक्षणिक प्रवचनात त्याचा वापर वादग्रस्त ठरला आहे, विशेषत: औद्योगिकीकरणानंतरच्या समाजात मानवी श्रम कमी झाल्यानंतर. काही शिक्षणतज्ञ कामगार वर्गाच्या संकल्पनेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

आर्थिक संसाधने, शिक्षण आणि सांस्कृतिक हितसंबंधांमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत हा शब्द सामान्यतः उच्च वर्ग आणि मध्यमवर्गीय हितसंबंधांशी विरोधाभास आहे . कामगार वर्ग आणि मध्यमवर्ग यांच्यातील सीमारेषा अधिक स्पष्ट होते जेथे लोकसंख्या प्रामुख्याने जगण्यापेक्षा जीवनशैलीवर जास्त पैसा खर्च करते (उदाहरणार्थ फॅशन विरुद्ध फक्त पोषण आणि गृहनिर्माण) या भेदभावाच्या पद्धतीवर अवलंबून राहिल्याने अनेकदा ओळखल्या जाणार्‍या अनेकांना वगळले जाईल. कामगार वर्ग म्हणून.

त्याचा वापर वैकल्पिकरित्या अपमानास्पद असू शकतो किंवा जे स्वत: ला कामगार वर्ग म्हणून ओळखतात त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना व्यक्त करू शकते

कामगार वर्गाचा इतिहास दोन विरोधाभासी प्रक्रियांद्वारे परिभाषित केला जातो, कामगारांच्या निर्मितीसाठी पारंपारिक समुदायांचा आर्थिक विकास आणि चांगले जीवनमान निर्माण करण्यासाठी औद्योगिकीकरणातून उपलब्ध उत्पादनाचा अफाट अधिशेष. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कामगारांनी औद्योगिक समाजात त्यांची स्वतःची संस्कृती आणि परिस्थिती निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक आणि राजकीय कृती केली आहे. यापैकी बरेच प्रतिसाद यावर भर देतात की कामगार-वर्गातील व्यक्ती कामाव्यतिरिक्त इतर प्रक्रियांद्वारे परिभाषित केल्या जातात. कामगार वर्गाचा इतिहास सामान्यतः इंग्लिश कॉमन्सच्या धोरणांनी आणि हॉलंड आणि इंग्लंडमधील कारखान्यांमध्ये पगारी औद्योगिक कामगारांच्या पिढीने सुरू झाला असे मानले जाते.

असा कामगार वर्ग सरंजामशाही युरोपात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हता. त्याऐवजी, बहुतेक लोक कामगार वर्ग, विविध व्यवसाय, व्यापार आणि व्यवसायांनी बनलेल्या गटाचा भाग होते. वकील, कारागीर आणि शेतकरी हे सर्व एकाच सामाजिक घटकाचे भाग मानले जात होते आणि लोकांचा एक तिसरा गट होता जो अभिजात किंवा चर्च अधिकारी नव्हता. युरोपबाहेरील पूर्व-भांडवलशाही समाजातही अशीच पदानुक्रमे अस्तित्वात होती. या कामगार वर्गांची सामाजिक स्थिती ही नैसर्गिक कायद्याने आणि सामान्य धार्मिक श्रद्धेने ठरलेली होती. या सामाजिक स्थितीला शेतकरी वर्गाने, विशेषतः जर्मन शेतकरी युद्धाच्या वेळी आव्हान दिले होते.

18 व्या शतकाच्या शेवटी प्रबोधनाच्या प्रभावाखाली युरोपीय समाज बदलाच्या स्थितीत होता आणि हा बदल देवाने बनवलेल्या अपरिवर्तित समाजव्यवस्थेशी जुळवून घेता आला नाही. या सोसायटीच्या सदस्यांनी अशा विचारधारांना जन्म दिला ज्याने कामगार वर्गाला (जसे की, जास्त प्रमाणात मद्यपान, आळशीपणा आणि पैसे वाचवण्यास असमर्थता) भेडसावणाऱ्या अनेक समस्यांसाठी त्यांच्या नैतिकता आणि नैतिकतेला दोष दिला. द मेकिंग ऑफ द इंग्लिश वर्किंग क्लासमध्ये , ईपी थॉम्पसनने असा युक्तिवाद केला की इंग्रजी कामगार वर्ग स्वतःच्या अधिकारात अस्तित्वात आहे आणि आधुनिक, राजकीयदृष्ट्या आत्म-जागरूक कामगार वर्गात पोस्टमॉडर्न कामगार वर्गाच्या परिवर्तनाचे वर्णन केले आहे.

व्लादिमीर लेनिन यांनी विकसित देशांमधील कामगार वर्गाच्या निम्न स्तरावरील जीवनमानात आणखी सुधारणा करण्यासाठी साम्राज्यवादाची क्षमता पाहिली आणि युनायटेड किंग्डममध्ये 20 व्या शतकाच्या सुरुवातीस सुरुवात झाली आहे असा युक्तिवाद केला. बॉक्सिंग आणि सायकलिंगसारख्या स्वस्त खेळांमध्ये प्रवेश, कॉफी, चॉकलेट आणि नंतर जंक फूडसह खाद्य संस्कृतीचा विस्तार आणि विशेषत: मोटार वाहने आणि घराची मालकी यामुळे 20 व्या शतकातील जगातील पहिल्या कामगार वर्गाचा चेहरा बदलला. अशीच प्रक्रिया सोव्हिएत-शैलीतील समाजात घडली, परंतु खूपच कमी वेगाने.

1917 च्या आसपास, वरवर पाहता, अनेक देशांनी कामगार वर्गाच्या हितासाठी पावले उचलली. शैक्षणिक इतिहास आणि समाजशास्त्रामध्ये घटलेले राहणीमान आणि संभाव्य वाढीचा दर वादातीत असताना, या देशांचे विकास निर्देशांक समान GDP असलेल्या इतर देशांपेक्षा जास्त आहेत. तथापि, या देशांवर लेखकांद्वारे आणखी टीका केली गेली, ज्यांनी प्रामुख्याने कामगार वर्गाला प्रभावित करणार्‍या व्यापक मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या उपस्थितीवर आणि कामगार वर्गामध्ये आणि त्यांच्यामध्ये लोकशाही नसल्याची टीका केली. काही इतिहासकारांनी असे नमूद केले आहे की या सोव्हिएत-शैलीतील समाजांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सर्वहारा वर्गाच्या व्यापक नवीन स्वरूपाद्वारे झाला आहे, जो अनेकदा प्रशासकीयरित्या शेतकरी आणि ग्रामीण कामगारांच्या सक्तीने विस्थापनामुळे प्रभावित होतो. तेव्हापासून तीन प्रमुख औद्योगिक देशांमध्ये अर्ध-बाजार-आधारित शासन आहे (चीन, व्हिएतनाम, क्युबा) आणि एका देशाने आपल्यातच गरिबी आणि निर्दयीपणाचे चक्र (उत्तर कोरिया) वाढवायला सुरुवात केली. असे इतर देश एकतर आधीच कोलमडले होते (जसे की सोव्हिएत युनियन) किंवा औद्योगिकीकरण किंवा मोठ्या कामगार वर्गाची लक्षणीय पातळी गाठली होती.

1960 नंतर, तिसर्‍या जगात मोठ्या प्रमाणावर सर्वहारा वर्ग आणि कॉमन्स घेरणे उदयास आले, ज्यामुळे जगण्याच्या किनारी एक नवीन कामगार वर्ग निर्माण झाला. याव्यतिरिक्त, भारतासारख्या देशात हळूहळू सामाजिक बदल होत आहेत, ज्यामुळे शहरी कामगार वर्गाचा आकारही वाढत आहे

           सहहयक कामगार आयुक्त भवन मध्यें आॅनलाइन पध्दतीने नोंदणी केली असतां व लाभाचे विविध अर्ज आॅनलाइन केले असता. वैयक्तिक नोंदणी करणारे बांधकाम कामगार यांना दोन तीन महिने नोंदणी मॅसेज येत नाही पण एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी. एजंट यांनी १५०० रुपये घेऊन बांधकाम कामगार नोंदणी केली असतां दोन दिवसांत नोंदणी मॅसेज येतो याच काय आहे गौडबंगाल. म्हणजे अधिकारी व कर्मचारी. यांना यातला काय हिस्सा जातो कां ? काय या अधिकारी व कर्मचारी यांना आॅफिस वेळ सोडून बाहेर पार्ट्या. जेवण दिली जातात काय ? भेट गिफ्ट दिली जातात काय ? यांतच आज शासनाने महिलांना सर्व क्षेत्रात ५०/ टक्के आरक्षण दिले यामुळे आज बांधकाम कामगार संघटना मध्ये महिलांचा वाढता सहभाग भविष्यातील संकटांची नांदी आहे. कारणं विचारणा करता येत नाही कोणीही अडवू शकत नाही.  

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कोण रस्ता देत का ? रस्ता

 

कोण रस्ता देत का ? रस्ता 

              आज सर्वांपुढे आ वासून उभा असणारा प्रश्न आहे तो म्हणजे रस्ता. वाढती लोकसंख्या. वाढते औद्योगिकीकरण. जागोजागी होणारे अतिक्रमण क्षेत्र यामुळे आज रस्त्यांचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे 

         गत काळात लोकसंख्या कमी होती जमीन मुबलक होती. गाव लहान लहान होती घर होती घरासमोर मुलांना खेळण्यासाठी अंगण होते. सर्वांना व्यवस्थित वापरासाठी जमीन होती. रस्ते मोठे मोठे होते. शेतीवर जाण्यासाठी गाडी वाट. व इतर ठिकाणी पायवाट. गावाच्या बाजूने जाण्यासाठी व लोकांना वापर करण्यासाठी पाणंद रस्ते होते. गावातील पडणारे पावसाचे पाणी वाहून गावात न घुसता बाजूने जाण्यासाठी नैसर्गिक नाले होते. गावातील स्मशानभूमी येथे जाणे येणे करण्यासाठी व्यवस्थित रस्ते होते

       आज प्रस्थिती बदलली लोकसंख्या भरमसाठ वाढली जागोजागी गावांचे रूपांतर शहरांत झाले लोकांचे राहणीमान वाढले. लोकसंख्या वाढली पण जमीन वाढली नाही. लोकानी गाडीवाटा अतिक्रमण केले. पायवाटा बांधात गेल्या. पाणंद रस्ते यांची शेतजमीन झाली. स्मशानभूमी येथे जाणे येणे करण्यासाठी रस्ताच नाही. गावा गावात एकामेकाचे हेवेदावे बाहेर काढण्यासाठी घराकडे जाणारा रस्ता अडविला जातो. सदर व्यक्तिला गावसोडून जाण्यास भाग पाडले जाते. एवढेच काय पण गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर सुध्दा आज चोरिला गेली आहे. लोकांनी एवढं रस्त्यात अतिक्रमण केले की आज शहरात गावात वाहतूक माणसांना. शाळेत जाणारया मुलांना व अपघाताना आज सर्वत्र उत आला आहे. म्हणजे रस्ता किती महत्वाचा आहे हे आपल्या ध्यानात आले असेल 

            राजकारणी लोकांनी आपल्या सत्तेचा आणि पदांचा गैरवापर करून सार्वजनिक वापरासाठी असणारे रस्ते गाव शहरं जिल्हा राज्य देश यांचा विकास या कारणासाठी आज घर पाडली जातात. शेतातून रस्ता जातो. किंवा कोणत्याही कारणासाठी भूसंपादन केले जाते त्यासाठी शासनाने विहित नमुना तयार केला आहे त्यानुसार भूसंपादन करण्याअगोदर संबंधित व्यक्तिला नोटीस देणे बंधनकारक आहे त्यांनंतर ठराविक कालावधीत दिला जातो आणि त्यांनंतर शासनाच्या नियमानुसार पंचनामा करून सदर भूसंपादन केलेल्या जागेची योग्य किंमत दिल्याशिवाय सदर जमीन भूसंपादन करणे शासन निर्णयानुसार गुन्हा आहे. पण आज राजकारणी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री आपल्या पदाच्या जोरावर भूसंपादन करतात की भविष्यात त्या जागेची किंमत वाढेल या कारणासाठी भूसंपादन केले जाते. आणि यांचे बगलबच्चे नामांकित व्यक्तिच्या नावाखाली भूसंपादन करताना आपणांस दिसतात. आज गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी व आपली जमीन कोणताही मोबदला न देता शासनाने व शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बोगस पंचनामे करून जमीन मोबदला न देता आपली तिजोरी भरली व आज सुध्दा काही लोक तहसिलदार जिल्हाधिकारी. भूसंपादन विभाग. भूमिअभिलेख. या विभागात हेलपाटे मारुन आपली चप्पल झिझवले. आपला वेळ आणि पैसा वाया गेला ह्याला कोण जबाबदार 

            अशी बरीच प्रकरणे शासनाच्या ध्यानात आली झालेली बोगस जमीन संपादन यासाठी शासनाने काही कायदे कानून बनविण्यात आले त्यानुसार जिथे घर आहे तिथ रस्ता आहे. जिथं गाव आहे तिथे रस्ता आहे. जिथे शाळा. स्मशानभूमी. समाजमंदिर मंदिर. शेती. यासाठी रस्ता देणे शासनाच्या नियमाधिन आहे. असा कोणताही रस्ता अडविणे शासन निर्णयानुसार सर्वात मोठा गुन्हा आहे. आज राजकारणी लोकांपेक्षा सर्वात मोठा त्रास आणि. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे अशा प्रकरणांत लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 

मोठ्या प्रमाणात झालेल्या

 जमिनीच्या व्यवहारांमुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले. त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदीदाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाही. त्यामुळे तो तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करतो. स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे.

अनेकवेळा असे दिसुन येते की, तहसिलदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये दाखल केलेल्‍या रस्ता मागणीच्या अर्जावर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार निकाल दिला जातो तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वये दाखल अर्जावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदींनुसार निकाल दिला जातो. ही बाब चुकीची आहे. एका कायद्यान्वये दाखल अर्जावर अन्य कायद्यातील तरतुदींनुसार निकाल देणे बेकायदेशीर आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या कोणत्याही जमिनीतील उपलब्‍ध रस्‍त्‍याला किंवा स्वाभाविकपणे वाहत असेल अशा पाण्‍याच्‍या प्रवाहाला कोणीही अवैधरित्‍या अडथळा केला असेल तर असा अवैध अडथळा काढून टाकण्‍याचा अधिकार तहसिलदारांना आहे.

म्‍हणजेच म.ज.म.अ. कलम १४३ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधीच उपलब्‍ध नसतो परंतु मा.को.ॲ. १९०६, कलम ५ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधीच उपलब्‍ध असतो.     

F महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ :

या कलमानुसार तहसिलदारांकडे रस्ता मागणीसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे अर्जाबरोबर सादर करावीत.

P अर्जदाराच्या शेतजमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरुन रस्त्याची मागणी केली आहे त्याचा कच्चा नकाशा.

P अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा (उपलब्ध असल्यास)

P अर्जदाराच्या जमीनीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा उतारा

P लगतच्या शेतकर्‍यांची नावे व पत्ते व त्‍यांच्‍या जमिनीचा तपशील

P अर्जदाराच्‍या जमीनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरु असतील तर त्याची कागदपत्रांसह माहिती.

¿ रस्ता मागणीसाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया :

१. अर्ज दाखल करुन घेतला जातो.

२. अर्जदार व ज्या शेतकर्‍यांच्या भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्‍याची संधी देण्यात येते.

३. अर्जदाराने सादर केलेल्या कच्च्या नकाशावरुन किमान किती फूटाचा रस्ता देणे आवश्यक आहे याची पडताळणी केली जाते.

४. तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांचेमार्फत समक्ष स्थळ पाहणी करण्यात येते. स्थळ पाहणीच्या वेळेस अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय याची खात्री

५. रस्ता मागणीचा निर्णय करतांना तहसिलदारांनी खालील प्रश्‍नांची उत्तरे लक्षात घेणे अपेक्षित आहे:

अ. अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय?

अर्जदाराच्या शेताचे यापूर्वीचे मालक कोणत्या मार्गाचा वापर करीत होते?

क. जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता?

ड. मागणी केलेला रस्ता सरबांधावरुन आहे काय?

इ. अर्जदाराला शेतात येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय?

फ. अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यास लगतच्या शेतकर्‍यांच्‍या होणार्‍या नुकसानाचे प्रमाण किती असेल?

६. उपरोक्त सर्व बाबींची शाहनिशा करुन, नवीन रस्ता देणे आवश्यक आहे याची खात्री पटल्यानंतर, तहसिलदार अर्ज मान्य करतात किंवा मागणी फेटाळतात. अर्ज मान्‍य झाल्‍यास, असा रस्‍ता लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकर्‍यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जाते.

रस्‍ता देतांना दोन्ही बाजूने ४—४ रूंद असा एकूण ८ फुट रुंदीचा पायवाट रस्‍ता देता येतो. उभतांच्‍या सहमतीने अशा रस्‍त्‍याची रुंदी कमी-जास्‍त करता येते. गाडी रस्ता देतांना तो ८ ते १२ फूट रुंदीचा देता येतो.   

वाजवी रुंदीपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्याची मागणी असल्यास अर्जदाराने लगतच्या शेतकर्‍याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षीत आहे.

¿ म.ज.म.अ.१९६६, कलम १४३ अन्‍वये फक्त बांधावरुनच रस्ता देतो येतो, या कलमाचे शीर्षकचं "हद्दीवरुन रस्त्याचा अधिकार" असे आहे, त्यामुळे एखादा गटाच्या मधून रस्ता दिल्यास अशी कार्यवाही कलम १४३ च्‍या तरतुदींशी विसंगत होईल आणि त्‍याविरुध्‍द दिवाणी न्यायालयात अपील झाल्यास तिथे असा निर्णय टिकणार नाही.

¿ कलम १४३ अन्‍वये रस्‍ता देतांना 'गरज' (Necessity) तपासली जाते. या ठिकाणी 'Indian Easement Act 1882' चे कलम १४ पहावे, यात असा रस्ता 'Reasonably convenient' असावा असा शब्दप्रयोग आहे, तर कलम १४३ मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे, याकडे तहसीलदाराने लक्ष द्यावे असे नमूद आहे, या कलमाखाली किती रुंदीच्या रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य करावा याबाबत तरतुद आढळून येत नाहीत, त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी आदेशात 'बांधाच्या एकाबाजूने एक चाकोरी व दुसऱ्या बाजूने एक चाकोरी' असा किंवा तत्‍सम उल्लेख करुन आदेश पारित करावा, या कलमाखाली फक्त "रस्त्याच्या वापराचा हक्क" मान्य केला जातो, "रस्त्याच्या जागेचा नाही" याची नोंद घ्‍यावी.

¿ तहसिलदारांचा आदेश मान्य नसल्यास त्याविरूध्द, आदेश प्राप्त झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे अपील दाखल करता येते. किंवा तहसिलदारांच्या निर्णयाविरूध्द एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महसूल अधिकार्‍याकडे अपील करता येत नाही.

¿ रस्‍त्‍याच्‍या निर्णयाची नोंद, ज्‍या खातेदाराच्‍या जमिनीतून रस्‍ता दिला आहे त्‍या खातेदाराच्‍या सात-बाराच्‍या 'इतर हक्‍क' सदरी नोदविता येते. त्याच बरोबर 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये देखील अशा नोंदी घेतल्या पाहिजेत.

मा. उच्च न्यायालयाचे न्‍यायाधिश श्री. ए. पी. भांगळे यांनी हरिराम मदारी अत्रे वि. उद्‍दल दयाराम लिलहरे या प्रकरणात निकाल देतांना नमूद केले आहे की, "म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम १६५ नुसार असलेल्‍या 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये घेण्यात आलेल्या नोंदी या चौकशी करुन तसेच प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम केल्या जात असल्‍यामुळे अशा नोंदी शाबीत करण्यासाठी आणखी पुरावा मागण्याची आवश्यकता नाही, असा वेगळा किंवा स्वतंत्र पुरावा मागणे हे 'वाजिब ऊल अर्ज' ठेवण्याच्या हेतू/ उद्देशालाच छेद देण्यासारखे आहे. गाव पातळीवर ठेवलेल्या 'वाजिब ऊल अर्ज' मधील नोंदीचा प्रतिवादीने आदर करावा आणि अर्जदार यांना रस्त्याच्या वापरास अडथळा करु नये."

मा. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाचा विचार करता, खाजगी जमिनीतून असलेले वहीवाटीचे रस्ते व इतर सुविधाधिकार यांच्या नोंदी 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे, तसेच तहसीलदार यांनी मा.को.ॲ. कलम ५ अन्‍वये किंवा म.ज.म.अ. कलम १४३ नुसार आदेश पारित करुन, अनुक्रमे अडथळा दूर केल्यास किंवा नवीन रस्ता दिल्यास अशा रस्त्यांच्या नोंदी सुद्धा 'वाजिब ऊल अर्ज' मध्ये घेणे आवश्‍यक आहे.

F मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ : शेतीच्या अस्‍तित्‍वात असणार्‍या रस्त्याला अडथळा करणार्‍याविरूध्द मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५(२) अन्वये (हरकतीपासून सहा महिन्याच्या आत) दावा दाखल करता येतो. मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वयेचे कामकाज दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालविले जाते.

¿ मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ मधील महत्वाच्या तरतुदी :

P हा कायदा फक्त शेत जमिनींनाच लागू आहे, अकृषिक जमिनींना नाही.

P हा कायदा मुंबई वगळता सर्व महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

P कलम ५ (१) (अ): शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या, पिके किंवा झाडे असलेल्या कोणत्याही जमिनीतून किंवा तीस संलग्न असलेल्या जमिनीत/जमिनीतून किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहात किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागावर अवैधरित्या कोणीही अडथळा केला असेल व अशा अडथळ्यामुळे शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या/पिके किंवा झाडे असलेल्या जमिनीस किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहाला किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागाला धोका पोहोचण्याचा संभव असेल तर तहसिलदाराला असा अवैध अडथळा काढून टाकण्‍याचा अधिकार आहे.

P या कलमान्वये कारवाई करतांना रस्ता पूर्वापार वहिवाटीचा व वापरामध्ये असावा तसेच त्या रस्त्यात अडथळा निर्माण केला गेला असावा. नवीन रस्ता देणे या कायद्यात अपेक्षीत नाही.  

P कलम ५ (१) (ब): उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा केलेल्या जमिनीचा, प्रवाहाचा कब्जा वैध मालकास देता येतो. (या कायद्यान्वये शेत रस्त्यावरील अवैध अडथळा काढता येतो. परंतू शेत बांधावरून नवीन रस्ता देता येत नाही.)

P कलम ५ (२): उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा केलेल्या इसमास निषेध आज्ञा काढून तसे न करण्यास फर्मावता येते. (या कायद्यान्वये दिलेल्या निषेध आज्ञेचा अवमान भा.दं.सं.कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र आहे.) 

P कलम ५ (३): उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा निर्माण झाल्यापासून त्याविरूध्द सहा महिन्याच्या आत वादपत्र दाखल झाले पाहिजे. त्यानंतर या कायद्याखाली वादपत्र स्वीकारता येणार नाही.

हा कायदा शेत जमिनींनाच लागू आहे. त्यामुळे जमीन वापराचा मूळ हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे.

related post in the middle

P कलम ७: या कायद्याखाली दावा दाखल करतांना वादपत्रात खालील मजकूर असला पाहिजे:

१. वादीचे नाव, धर्म, जात, व्यवसाय व राहणेचा पत्ता.

२. प्रतिवादीचे नाव, धर्म, जात, व्यवसाय व राहणेचा पत्ता.

३. उभारलेल्या अडथळ्याचे स्वरूप, ठिकाण व जी निषेध आज्ञा/कब्जा आवश्‍यक आहे त्याचे स्वरूप.

४. दाव्याचे कारण उद्भवल्याची तारीख.

५. दाव्याचे कारण उद्भवण्यास कारणीभूत परिस्थिती.

६. दाव्यास उपयुक्त कागदपत्रे, पुरावे, साक्षीदारांची संपूर्ण माहिती. (माहिती अपूर्ण आहे या सबबीखाली तहसिलदारला दावा फेटाळता येणार नाही)

P कलम ८: या कायद्याखाली दावापत्र तहसिलदार यांना समक्षच सादर केले गेले पाहिजे. दावापत्र टेबलावर ठेवले, पोस्टाने पाठवले, लिपीकाला दिले तर ते अयोग्यप्रकारे सादर केले असे मानले जाईल.

P कलम ९: वरीलप्रमाणे वादपत्र तहसिलदार यांना समक्ष सादर केल्‍यानंतर तहसिलदारने वादीची शपथेवर तपासणी करावी.

P कलम १०: वादपत्रावर शेवटी, अर्जदाराने/त्याच्या वकिलाने तहसिलदार यांच्या समक्ष स्वाक्षरी करावी व पुष्टीकरण आणि सत्यापन सादर करावे. पुष्टीकरण आणि सत्यापनाशिवाय दावा स्वीकारला जाणार नाही. (खोटे सत्यापन सादर करणे हा भा.दं.सं.कलम १९३ अन्वये अपराध आहे.) 

P कलम ११: तहसिलदारने वादपत्राची तात्काळ तपासणी करावी. उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास वादपत्रावर तसा शेरा नोंदवून सुनावणीची तारीख लावावी.

P कलम १२: वादपत्राची तपासणी केल्यावर उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता होत नसल्यास, तहसिलदार वादपत्रावर तसा शेरा नोंदवून वादपत्र नाकारू शकतात.

P कलम १३: वादपत्राची तपासणी केल्यावर त्यातील विषय तहसिलदारच्या अधिकारक्षेत्राबाहेरील आहे असे वाटल्यास तहसिलदार वादपत्रावर तसा शेरा नोंदवून वादपत्र परत करू शकतात.

P कलम १४: वादपत्र स्वीकारल्यानंतर तहसिलदारने तात्काळ नोटीस काढून सुनावणीची तारीख, अपरिहार्य कारण नसल्यास, नोटीस दिल्यानंतरच्या दिवसापासून अकरा ते पंधरा दिवसातील लावावी. सुनावणीची जागा उभय पक्षकारांच्या सोयीची असावी.

P कलम १६: नोटीस बजावल्यानंतरही सुनावणीच्या तारखेस वादी अपरिहार्य कारणाशिवाय गैरहजर असल्यास तहसिलदार खर्चासह दावा काढून टाकू शकतात. मग इतर सर्व हजर असो किंवा नसो. नोटीस बजावल्यानंतरही सुनावणीच्या तारखेस प्रतिवादी अपरिहार्य कारणाशिवाय गैरहजर असल्यास तहसिलदार उपलब्ध साक्षी-पुराव्यांवरून एकतर्फी निर्णय घेऊ शकतात.

P कलम १९: सुनावणीच्या तारखेस तहसिलदार यांनी वादीच्या अर्जातील किंवा सादर केलेल्या पुराव्यातील प्रत्येक मुद्द्याची स्वत: खात्री करावी. स्थळ पाहणी आणि पंचनामा करावा. यात प्रतिवादीला असणारा अधिकार, अडथळ्यामुळे वादीला होणारे नुकसान, अडथळ्याचा कालावधी, वादीचा हक्क, कब्‍जा इत्यादीबाबत सविस्तर चौकशी करावी. कलम १९(२) अन्वये तहसिलदार यांना इतर साक्षीदार तपासण्याचा आणि वादग्रस्त मालमत्ता पाहण्याचा अधिकार आहे

P कलम २१: तहसिलदार यांनी या कायद्यान्वये दिलेला निर्णय कसा अंमलात आणावा याबाबतची कार्यपध्दती हे कलम विषद करते. यात वाढणार्‍या पिकांबाबत करण्याची कार्यवाही, निषेधाज्ञा बजविण्याची पध्दत, खर्चाची वसूली, निषेधाज्ञेची अवज्ञा झाल्यास शिक्षा करण्याची पध्दत नमूद आहे.    

P कलम २३(१): तहसिलदारने या कायद्यान्वये दिलेल्या निकालावर अपील करता येत नाही.

P कलम २३(२): तहसिलदारने या कायद्यान्वये दिलेल्या निकालाचे उपविभागीय अधिकारी पुनर्विलोकन करू शकतात.

¨ उपविभागीय अधिकारी यांनी पुनर्विलोकनाध्ये दिलेल्या निकालाविरूध्द उच्च न्यायालयात रिट दाखल करावे लागते.

¨ या कायद्यान्वये काम करतांना या कायद्यात नमूद नोटीस, निषेध आज्ञा इत्यादी अनुसूचींचाच वापर करावा.

    . आज सर्वत्र ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका चतुर्भुज रस्ते या क्षेत्रात रस्त्यांची कामे जोरात चालू आहेत. पण आपणं कधीही रस्त्याचा जाहिरानामा बघत नाही वाचत नाही. त्या रस्त्यासाठी येणारा निधी किती? रस्त्याचे काम करणारे काॅनटरकटर. ठेकेदार यांचें नाव पत्ता. रस्त्याच्या कामांचे स्वरूप. रस्त्याला वापरले जाणारे मटेरियल आणि त्याचा दर्जा. सदर रस्त्या रोलिंग करण्यासाठी व तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान मशिन वापरली आहे का ? तयार रस्त्याचे दायित्व किती वर्ष आहे.याची आपणं कधीही चौकशी केली नाही तसा अधिकार शासनाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. आपणं चौकशी करण्यासाठी. माहीती अधिकार. अर्ज. या माध्यमातून आपली चौकशी आजच करा

       शासनाने रस्ते तयार करणार्या ठेकेदार कंत्राटदार यांनी निकृष्ट रस्ता तयार केला आहे अशी तक्रार संबंधित गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील कोणत्याही व्यक्तिने केली असेल तर आत्ता सदर कंत्राटदार ठेकेदार यांच्यावर कायदेशीर दंडात्मक व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या