Showing posts with label ग्रामपंचायत. Show all posts
Showing posts with label ग्रामपंचायत. Show all posts

चावडी वाचन

 

चावडी वाचन

              लहान लहान वाड्या वस्त्या गतकाळात होत्या. लोक अडाणी अशिक्षित होतें प्रत्येक गावात शिकलेला एक व्यक्ति असायचा तोंच पेपर. वतृमानपत्र. वाचून कोठे काय झाले काय होणार आहे. पाउस किती आणि कोठे पडणार. देशात कोणत्या मालाचे काय दर झाले. याची माहिती एक व्यक्ती चावडीवर गोळा झाल्यालया. लोकांना वाचून दाखविले जाते. आपल्या गावात नविन जुन काय घडल गावाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे. आपल्या गावातील जत्रा यात्रा कशी आणि कोणत्या प्रकारे पार पाडावी. याचा लेखाजोखा चावडी वाचन करून कळविला जात असे 

           आज या चावडीचे रुपांतर ग्रामपंचायत चार भिंतींच्या आत झाले. निवडणूकीचया नावाखाली गावातील लोकांच्या मनाला राजकीय सत्तेचा सुरुंग लावला आणि लोकांचे विभाजन मतांचे मनाचे विभाजन झाले. गावांत राजकारणा सारखे गजकर्ण आले आणि सर्व जनमत वेगळ झाल ज्याची सत्ता त्याचेच गावात चालेल असं समिकरण समोर आले. कोणाचा कोणी विचार घेत नाही विरोधी यांना ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार नाही. ग्रामसभेत. आपल्या बाजूने बोलणारे लोक बोलाविले जातात. आज ग्रामसभा चार भिंतींच्या आत न घेता उघड्यावर म्हणजे चावडी वाचन करून जनतेला सहभागी होण्यासाठी पत्र व्यवहार करून मगच ती खरोखरच ग्रामसभा चावडी वाचन होईल 

  गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेला हजर राहणे बोलावणे यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार ग्रामसेवक. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचें कर्तव्य आहे. प्रत्येकाचे मत नोंदवा. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला बोलण्याचा अधिकार आहे

                  चावडी वाचन करताना. कृषी. पशुसंवर्धन. वने. शिक्षण. वैद्यकीय सेवा. सार्वजनिक सेवा. इमारती दळणवळण. पाटबंधारे. उद्योग व्यवस्थापन. सहकार. सवयमसरक्षण ग्रामसरक्षण. अशा विविध विषयांचे चावडी वाचन म्हणजे ग्रामसभा होय.  

       बेकाराची संख्या? गावाची लोकसंख्या किती? वयोवृद्ध व्यक्ती महिला किती ? विधवा निवृत्तीवेतन पेन्शन धारक व्यक्ती किती ? ‌ गावात पाण्याचा स्त्रोत कोणता. ? ‌गावात शालेय शिक्षण सुविधा काय आहे ? अशावरकर. अंगणवाडी सेविका किती ?गावात शालेय शिक्षण पोषण व्यवस्था केली आहे का. ? गावात किती मुल शालेय शिक्षण घेत आहेत ? गावात वैद्यकीय सेवा सुविधा. उपलब्ध डॉ नर्स किती औषधं साठा किती ? विविध लसीकरण सोय आहे का ? गावात दारु दुकान किती ? गावात हाॅटेल. पानपट्टी. किराणा दुकान. व इतर उधोगाची दुकान किती ? गावातील सामाजिक धार्मिक मंदिर संख्या किती ? स्मशानभूमी आहे का कोणत्या परिस्थितीत आहे ? गावात ग्रंथालय वाचनालय आहे का ? गावात कोरडवाहू. बागायती जिरायती क्षेत्र किती आहे ? गावात कोण कोणती मौसमी पिके घेतली जातात ? गावात हुतात्मा स्मारक. पुतळे. स्वागत कमानी संख्या किती ? गावात दुधाळ जनावरे किती ? गावात मोकाट जनावरे किती ? गावात गायरान मुलाणकी. देवसकी. यांच्या अंतर्गत जमीन क्षेत्र किती ? गावात अपंग व्यक्तींना देण्यात येणारे अनुदान किती कोणत्या निकषांवर ? अस्पृश्यता निवारण केंद्र मानसिकता ? भ्रष्टाचार निर्मूलन समिती नेमली आहे का ?जुगारास अवैध धंदे याला बंधनं घातले आहे का ? निर्थक वाद भांडणे यांना आळा कसा घातला जातो ? सार्वजनिक रस्ते. नाले. तलाव विहिरी. ठिकाणची जागा स्वच्छ आहे का ? कचरयाचे ढिग. माजलेले रान. काटेरी निवडुंग. आरोग्यास धोकादायक डबकी. खंदक. खड्डे. खाच खळगे. याची कशा पद्धतीने नियोजन केले जाते ? खेळांचे मैदान. सार्वजनिक उप वने. धर्मशाळा. गावात दिवा बतती उपयोजना कशी केली जाते ? गावात पतसंस्था आणि बहुउद्देशीय संस्था. बॅंक अशा आर्थिक विकास योजना आहेत कां ? गावात पहारा देखरेख करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे ? आग विझवने. आत्महत्या. खून मारामाऱ्या. अशा जीवीतास धोका व गावाच्या प्रतीषटेला धोका उत्पन्न करणार्या घटना कशा हाताळल्या जातात. ? सफाई कर्मचारी आहेत का ? गावात रेशन दुकान किती ? अंत्योदय अन्न योजना. ब गट. व केशरी शिधापत्रिका धारकांची. संख्या किती ? गावात डाक विभाग आॅफिस आहे का ? गावात पोलिस स्टेशन आहे का ? सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी यांचें शासन निर्णयानुसार वेतन किती ? दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत १५ वया वित्त आयोगा नुसार येणारा निधी आणि त्याचा वापर याचा लेखी तपशील ठेवला आहे का ? गावाच्या विकासासाठी शासनाकडून देण्यात आलेला निधी किती त्याचा वापर केला असेल तर त्याचा लेखाजोखा ठेवला आहे का ? गावातील ग्रामसेवक तलाठी आपल्या मुख्यालयात रहाण्यास आहेत का ? गावात नविन जुनें खरेदी विक्री व्यवहार किती झाले त्याचे सातबारा फेरफार रजिस्टर नोंदणी वही ठेवली आहे का ? गावात पानपट्टी घरफाळा व इतर अन्य ग्रामपंचायत कर किती गोळा होतो त्याचा विनियोग कसा आणि कोठे केला जातो ? अशा विविध विषयांची विचारणा करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे. नागरिक यांना सुध्दा आहे कारणं सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी. हे आपल्यासाठी शासनाने आपले सेवक म्हणून नेमले आहेत आपणांस लागणारे विविध योजनांसाठी विविध दाखले लागतात जर कोणताही अधिकारी व कर्मचारी आपणांस नाहक त्रास देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर आजच मा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा. 

              आज जनतेच्या तोडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम ग्रामसभेच्या माध्यमातून केला जात आहे आजच आपल्या गावातील ग्रामसभा चार भिंतींच्या आत न घेता चावडी वाचन सर्वांसमोर करण्याची मागणी करा त्याशिवाय सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी ग्रामसेवक यांचें पितळ उघडे पडणार नाही. फक्त चहा आणि कॉफी लाडू खाण्यासाठी ग्रामसभेला जाऊ नका. आपलच पैसे आपल्या विकासाच्या योजना. शासन आपलच. मग आजच खुलं बोला कोणतेही राजकीय भय न ठेवता 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बाजार बंद. बाजार बंद

 

बाजार बंद. बाजार बंद

              आपल्या गावात असणारी ग्रामपंचायत मिनी मंत्रालय माणले जाते. सर्व ग्रामीण भागातील सेवा सुविधा विकास योजना राबविण्यात ग्रामपंचायत यांचा मोठा वाटा असतो. तसेच शहरी भागातील लोकांना मंत्रालय असतं ते म्हणजे तहसिलदार. प्रांताधिकारी आॅफिस. शहरातील व ग्रामीण भागातील सर्व शासकीय कामे येथेच केली जातात. 

                तहसिलदार कार्यालय व स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय संस्था. शासकीय सेवा सुविधा. विशेष कार्यकारी अधिकारी. यामध्ये. शपथपत्र. सवयंमघोषणापत्र. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र. प्रतिज्ञापत्र. विविध प्रमाणपत्रे. उत्पन्न प्रमाणपत्र. वास्तव प्रमाणपत्र. भाडेपटटा करार. विद्यार्थी साठी लागणारे विविध शालेय सकाॅलशिप साठी लागणारे दाखले. यासाठी आत्ता स्टँप वर अॅपेडेवहिट करण्याची सक्ती केली जाते. 

       आपणांस कोणत्या ना कोणत्या कारणाने तहसिलदार कार्यालय. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जाव लागत. आपण गेल्या बरोबर स्टँप विक्री करणारे यांचेजवळ जातो आणि स्टँप आहे का विचारणा केली असता. नाही शिल्लक नाही अस उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पण तोच स्टँप तहसिलदार कार्यालयाच्या आवारात असणारे दुकानात. नेटकफे मध्ये. १२० रूपये ते १५० रूपये एवढ्या रक्कमेला विक्री केला जातो. मग तो स्टँप आला कोठून ? मग साधा सोपा हिशेब आहे. आपले ३६ जिल्हे मग प्रत्येक जिल्ह्यात असणारे तालुके आणि त्यात असणारे तहसिलदार कार्यालय यामध्ये प्रत्येक स्टँप मागें २३ रूपये मिळकत धरली तर लाखों रुपये वरचेवर मिळकत केली जाते. ५ रूपये किंमतीचे पावती तिकिट ८ रूपयाला विकले जाते. १० पावती तिकिट १६ रूपयाला विकले जाते. आपण कधीच चौकशी करत नाही. सोमवार पासून शनिवार पर्यंत पुरतील एवढे स्टँप आपल्याकडे ठेवणे स्टँप विक्री करणारे यांना बंधनकारक असताना सुध्दा नाहक त्रास जनतेला दिला जातो

            माझ्या असे पाहण्यात आले की. समजा ग्रामीण भागातील एकादा विद्यार्थी शिकण्यासाठी शहरांत आहे शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांचेकडून कशाचे तरा दाखला आणण्यासाठी सांगितलं आणि घरच्या लोकांनी स्टँप आणि एस टी येणे जाणे एवढेच माफक पैसे दिले. स्टँप १०० एस टी २० एवढच पैसे दिले मग हा मुलगा तहसिलदार कार्यालय मध्ये आला आणि स्टँप विक्री करणारे यांचेकडे स्टँप मागणी केली. आणि स्टँप विक्री करणारे यांनी १२० रूपये मागणी केली मग मला एक सांगा त्या मुलान चालत जायच का घरला ? 

             ९/६/२०१५ ‌व १२ मे २०१५ रोजी शासन निर्णय १६१४/३४५ प्र क्र ७१/१८ अ नुसार. तहसिलदार कार्यालय व अन्य विभागांत. स्टँप अॅपेडेवहिट करण्यासाठी नाहक दबाव आणला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक. शिकवणारे विद्यार्थी. पेन्शन धारक. विधवा महिला. श्रावणबाळ योजना. संजय गांधी निराधार योजना. अशा विविध योजना मिळविण्यासाठी स्टँप वर अॅपेडेवहिट करण्याची मागणी केली जाते. म्हणून शासनाने. २०१५ साली शासन निर्णय काढला आणि त्यानुसार शासकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सक्त आदेश दिले आहेत कोणताही दाखला मागण्यासाठी स्टँप गरजेचा नाही साध्या कागदांवर १० रुपये किंमतीचे पावती तिकीट लावलेला कागद ग्राह्य धरण्यासाठी आदेश दिला आहे. 

         ‌. एक स्टँप अॅपेडेवहिट घालण्यासाठी टाईपिंग. स्टँप. हे सर्व मिळून ३५०/४०० एवढा खर्च येतो तो खर्च करणे सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला शेतकरी. मजूर. अल्पभूधारक शेतकरी. विद्यार्थी यांना शक्य नाही. त्यासाठी आजच आपल्या जवळच्या तहसिलदार कार्यालयाला भेट द्या आणि जर कोणताही अधिकारी व कर्मचारी स्टँप वर अॅपेडेवहिट घाला नाहीतर हा दाखला चालणारं नाही हा कागद चालत नाही. असे म्हणत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे आजच करा. 

               स्टँप वर अॅपेडेवहिट करण्याचे जर बंद झाले तर महा ई सेवा केंद्र यांची मिळकत बंद होणार आहे कारणं प्रत्येक ठिकाणी असणारी महा ई सेवा केंद्र ही नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या बगलबच्चे यांचीच आहेत त्यामुळे शासकीय निमशासकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी शासन निर्णय शासन आदेश २०१५ जारी करण्यात आला आहे तरि सुध्दा कोणतेही गांभीर्य न घेता शासन निर्णयाचा अवमान केला आहे अशा अधिकारी व कर्मचारी यांचेवर आपणच कारवाई करण्याची मागणी करण्याची आजच गरज आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

बांधकाम कामगार आॅनलाइन नोंदणी करून आज २१ दिवस झाले अजून कोणताही मॅसेज सहायक कामगार आयुक्त भवन सांगली यांचेकडून आला नाही सांगली आॅफिस मध्ये बांधकाम कामगार नोंदणी अर्ज आॅनलाइन चेक करणारे अधिकारी व कर्मचारी झोपले आहेत काय. ?

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या