चाळीस वर्षांचा आढावा

 

चाळीस वर्षांचा आढावा

                    देशात गेली चाळीस वर्षे लोकशाहीचा प्रयोग चालू केला आहे. देशात १९५२ पासून दहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या स्वातंत्र्यानंतर पहिली सतरा वर्षे देशांची धुरा पंडित नेहरू यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या काळात देशाच्या आधुनिक विकासाचा पाया घातला गेला.  पहिल्या तीन पंचवार्षिक योजना त्यांच्याच काळात तयार झाल्या व त्या राबविल्या गेल्या. देशात अनेक योजना बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिक करण ह्याबाबत देशाने प्रगतीची पावले टाकण्यास सुरुवात केली. किंबहुना देशाला आधुनिकीकरणाकडे नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशांचे एकमुख नेतृत्व त्याच्याकडेच राहिले.  स्वातंत्र्य लढयास मुशीत तावून सुलाखून निघालेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अफाट लोकप्रियता लाभली.  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर नेहरूंनी कांॅग्रेसमधमे. कोणी प्रतिस्पर्धी राहीला नाही.  काॅग्रेस व देशाच्या राजकारणावर त्यांची शेवटपर्यंत मजबूत पकड राहीली.  त्यांच्या उत्तुंग नेतृत्वापुढे एकही असामान्य नेता उभा राहिला नाही. १९४८ मध्येच जयप्रकाश नारायण. डॉ राममनोहर लोहिया.  आदि समाजवादी नेते काॅग्रेसमधून बाहेर पडले.  समाजवाद्यांनी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडित नेहरू यांच्या नेतृत्वास आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पूर्ण अयशस्वी ठरला. पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्ष पराभूत झाला. पुढं जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय पक्षात प्रवेश केला आणि समाजवादी पक्षातच फूट झाल्याने त्यांची शक्ति क्षीण झाली मुंबई कलकत्ता अशा कामगार प्रदान शहरांत कम्युनिस्ट पक्ष कार्यरत होता.  कामगार व मध्यमवर्गीय यांच्या पलिकडे त्यांची मजल जाऊ शकली नाही. संघटित वरगापुरते त्यांचं नेतृत्व मर्यादित राहिले. १९९३ घ्या भारत चीन युद्धानंतर मध्यमवर्गीय यामधील कम्युनिस्ट लोकप्रियता कमी होत गेली. ह्यामुळे पंडित नेहरू संपूर्ण कारकिर्दीत देशांवर काॅग्रेस पक्षांची घट्ट पकड राहीली

          पंडित नेहरूंचे १९६४ साली निधन झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री ह्यांची अल्पजीवी राजवट वगळता देशाच्या राजकारणावर श्रीमती इंदिरा गांधी ह्यांचा ठसा सर्वसामान्यांपणे राहीला. बॅंका खाजगीकरण.  संस्थानिकांचे तनखे रद्द.  गरिबी हटाव.  अशा घोषणा व उपक्रमांनी श्रीमती इंदिरा गांधींचे नेतृत्व वर्धमान होत गेले.  १९७१ चे युध्दात त्यांनी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश मुक्त केला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर पोलादी स्त्री म्हणून इंदिरा गांधी यांचा प्रभाव पाडला.  काॅग्रेसमधील सिंडिकेट गटाला १९६९ सालीच त्यांनी वेगळे काढून पक्षातील सर्व विरोधकांना नामोहरम केले होते. इंदिरा गांधी काळापासून देशाच्या राजकारणात नव्या प्रथा पडल्या नवे राजकीय आचार विचार. रूढी परंपरा सुरू झाल्या व्यक्तिसतोम. एकमुखी नेतृत्व. जनतेला भुलविणारया घोषणा अशा प्रथाचा पाया १९७१ मध्ये घातला गेला. सत्तेचे केंद्रीकरण करून पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी पकड ठेवली होती.  संघराज्य असलेल्या भारत देशात. दिल्लीवरून. मुख्यमंत्री लादण्याची प्रथा त्यांच्याच काळापासून सुरू झाली.  लोकशाही साठी आवश्यक असणार्या सामुदायिक नेतृत्वा ऐवजी.  पंतप्रधानांची इच्छा.  श्रेष्ठ ठरली.  १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाजवादी नेते राजनारायण ह्यांनी दाखल केलेल्या निवडणूक खटल्यात इंदिरा गांधींची १९७१ मध्ये रायबरेली मधून झालेली लोकसभेवरील निवड रद्द ठरवली. ह्याच काळात भारतीय राजकारणात बोकाळलेला प्रश्न म्हणजे भ्रष्टाचार विरूद्ध साधयासाठी.  साधनशुचितेला तिलांजली देण्याच्या प्रवृत्ती विरूद्ध भारतीय जनमानसात प्रचंड असंतोष खदखदत होता.  भ्रष्ट नेतृतवाविरूधद जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलन आकार घेत होते.  गुजरातमध्ये भ्रष्ट सरकार विद्यार्थी यांनी उलथून पाडले होते व बिहारमध्ये आंदोलन वेग घेत होते. इंदिरा गांधी यांनी न्यायालयाचा आदेश धुडकावून संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली.  राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मुलभूत हक्काचा संकोच करून वृपत्रे बंधने घालून आपले स्थान कायम ठेवण्याचा मार्ग यांनी अनुसरला.  जयप्रकाश नारायण.  मोरारजी देसाई.  चरणसिंग.  आदि विरोधी नेत्यांना त्यांनी तुरूंगात डांबले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद केला.  १९७७ मध्ये त्यांनी अचानक निवडणूका जाहीर करून विरोधी पक्षाना आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न केला परंतु हा त्यांचा प्रयत्न फसला.  १९७७ साली प्रथमच देशात काॅग्रेस सरकार पराभूत झाले.  खुद इंदिरा गांधींचा पराभव झाल्याने काॅग्रेस पक्षाला सत्ता सोडावी लागली.  विरोधी पक्षापैकी. संघटना काॅग्रेस. भालोद.  ( भारतीय लोकशाही दल ) जनसंघ व समाजवादी ह्या पक्षानी जयप्रकाश नारायण व आचार्य कृपलानी यांच्या प्रेरणेतून जनता पक्षाची स्थापना केली. व हा पक्ष सत्तेवर आला.  आपापसातील भांडणे. लाथाळ्या पुढारी महातवकांक्षा. मूळ घटकांचा परसपरावरील अविश्वास ह्यामुळे मोरारजी देसाई ह्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अवघ्या ३० महिन्यातच कोसळले सहा महिने.चरणसिंह काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य करीत राहिलें. १९८० मध्ये देशात मध्यावधी निवडणूका झाल्या. ह्या निवडणूकीत इंदिरा गांधी यांना घवघवीत यश मिळवून. इंदिरा काँग्रेस पक्ष हा पक्ष सत्तेवर आला. कारणं १९६९ साली फुटून शिल्लक राहिलेली काॅग्रेंस  १९७८ साली पुन्हा फुटली होती. त्यातून श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९८० नंतर इंदिरा गांधी यांची राजवट पंजाब व आसाम सारखें राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे प्रश्न निर्माण झाले. पंजाबात जरलसिंग. भिंद्रनवाले ह्यांच्या रूपाने दहशतवादाचा भीषण भस्मासुर उभा राहिला. आपल्या राजकीय सोयीसाठी वापरणाऱ्यांना तो फार महाग पडला त्याने निष्पाप नागरिकांच्या हत्याकांडाचा मार्ग अवलंबून हजारों लोकाची हत्या केली.  पंजाब. हरियाणा.  दिल्ली आणि उत्तरप्रदेश. व आसपासच्या भागात दहशतवादाचे थैमान घातले.  हया परिस्थितीतच आॅपरेशन ब्ल्यू सटारमधमे भिंद्रनवाले मारले गेले.  नंतर इंदिरा गांधीजी शरिर रक्षकाकडून हत्या झाल्याने राजीव गांधी ह्यांच्या नेतृत्वाचा उदय झाला.  तो १९८४ चया अखेरीस राजीव गांधींची कारकीर्द ही बोफोर्स तोफा. स्वीस बॅक खाती हया प्रकरणांनी खूप गाजली. १९८४ मध्ये देशातील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तीन चतुर्थांश पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या.  पण एवढे अभूतपूर्व यश मिळूनही त्यांच्या काळात काँग्रेस पक्ष झपाट्याने अप्रियतेकडे झुकला. विश्वनाथ प्रताप सिंग.  ह्यांनी संरक्षणमंत्री पदांचा राजीनामा देऊन बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचाराचा प्रश्न उभा करून १९८९ मध्ये राष्ट्रीय आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पराभूत केले.  डावे पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मंडल आयोगाच्या.  चया व मंदिर मशीद चया विवादावरून हे सरकार पक्षांतर्गत फूट आणि भारतीय जनता पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने पराभूत झाले जून १९९१ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला हया सरकारचे नेतृत्व पी व्हि नरसिंह राव ह्यांच्याकडे गेले. ह्या सरकारला लोकसभेत सवताचे स्पष्ट बहुमत नाही.  अल्पमतातील हे सरकार काही प्रादेशिक पक्ष व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे

      देशाच्या संपूर्ण वाटचालीत पंडित नेहरू ते इंदिरा गांधी ते राजीव गांधी. व पी व्हि नरसिंह राव. असे नेतृत्व संक्रमित होत आले आहे. हया वाटचालीत देशात अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. त्यापैकी काही प्रश्नांनी लोकशाही व्यवस्था पोखरून काढली आहे.

         २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आशा एका व्यापक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भारताने लोकशाही राज्याचा प्रयोग सुरू केलेला आहे त्याला आत्ता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत आज आपण परकयाचया गुलामगिरीत नाही आज आपण आपल्याच आपण निवडून दिलेले नेत पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याच गुलामगिरीत आहोत

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

1 comment:

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या