गुटखा, मावा तस्करी मध्ये आर्थिक देवाणघेवाण? - डॉ परवेज अशरफी
अहमदनगर - गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा शौकिनांची संख्या कमी होण्या ऐवजी दिवसेन दिवस वाढत आहे. बंदी असतानाही गुटखा, खर्ऱ्याची सर्रास विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी अहमदनगर शहरात कोट्यावधी रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सर्व आरोपींना जामीन मिळाला कारण सदर प्रकरण पोलिस प्रशासनाकडून कायद्याच्या चौकटीत हाताळले गेले नाही किंवा जाणून बुजून हाताळण्यात आले नाही. त्यामुळे कायद्याचे वाचक त्याच्यावर राहिलेले नाही. असा आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केला.
डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनाचे पत्र दिले. डॉ परवेज अशरफी यांनी पत्रात पुढे असे म्हणाले की सदर प्रकरणामध्ये अन्न औषध प्रशासन अधिकारी यांना फिर्यादी करण्यात आले नाही, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा – २००६ चे कलम ४२ नुसार कारवाई करण्यात आली नाही. जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रसासन यांचे ताब्यात देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठे आर्थिक उलाढाल झाली की काय? असा प्रश्न निर्माण होतो. सदर प्रकरणामधील सदरचा गुटखा उत्पादक यास आरोपी करणे आवश्यक होते. परंतु ते करण्यात आले नाही. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक पाकीटावार उत्पादकाचे नाव व पत्ता होता.असे असतांनाही त्याला आरोपी करण्यात आले नाही.
आपण असे गृहीत धरले की पाकीटावर नाव असलेल्या उत्पादकाची चौकशी झाली आणि त्याने सांगितले की सदरचा जप्त गुटखा पानमसाला त्याने उत्पादन केले नसून त्याच्या नावाचा आणि लोगो चा गैरवापर करण्यात आला. तर मग त्याला फिर्यादी करून सदर आरोपींविरुद्ध कॉपी राईट आणि ट्रेड मार्क संदर्भातील गुन्हे दाखल होणे आवश्यक होते. परंतु असे झालेले दिसून येत नाही.
पोलीस प्रशासनाने ज्या व्यक्तीचे घरी गुटखा सापडला त्यालाही आरोपी केले नाही. याचे कारण जनतेला अद्याप समजले नाही की असा कोणता कायदा आहे ज्यांनी ज्याच्या घरी बंदी असलेला मुद्देमाल सापडतो त्याला आरोपी करता येत नाही.
गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा यांची विक्री संपूर्ण जिल्हयामध्ये सर्रासपणे होत आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल रोज होत आहे. अनेक सिंडीकेट यामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी आहे आणि म्हणूनच त्याच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. जशी कारवाई “पांगरमळ” प्रकरणातील आरोपींविरुद्ध झालेली आहे. आजपावेतो गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा यामुळे अनेक लोकांना कॅन्सर होऊन ते मरण पावलेले आहे त्यांची संख्या “पांगरमळ” प्रकरणातील मृत्यू झालेल्यांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. तसेच या बेकायदेशीर कृत्य करून आणि अवैध मार्गाने आरोपींनी आर्थिक लाभ मिळविलेलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे.
एम आय एम गुटखा मावा प्रकरणात सतत पाठपुरावा करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लवकरात लवकर कारवाही चे आदेश देऊन मोक्का अंतर्गत कारवाही केली नाहीत तर आंदोलनाचा मार्ग सुविकारावे लागेल असे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.