** धर्माचे मनमानी ठेकेदार **
भारतात अठरा पगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि होतें . जमात म्हणजे विशिष्ट जातीचे समुह असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे. समुहाने राहणे ही त्यांची गरजच आहे. लोकांना एकामेकांच्या सुखात दुःखात निस्वार्थी पणाने भाग घेता यावा म्हणून आज विशिष्ट जमातीच्या समुहाला जमात असं म्हणलं जातं. सणसुद. विविध देवी देवतांची यात्रा. धार्मिक सामाजिक कार्यक्रम. लग्न. विविध दहन दफन विधी करण्यासाठी जमातींची गरज लागते. यामुळे आज विविध धर्मांच्या धर्म गुरू. मुल्ला मौलवी. यांनी आज जमातींचे भांडवल केले आहे. आपला समाजावर एक प्रकारची वेगळी छाप आणि दबाव विविध धर्माबाबत समजुती लोकांच्या मनात भरवून लोकांना आपले गुलाम केले आहे .
महाभारत.रामायण . बायबल. कुराण. भगवतगीता. असे विविध ग्रंथ आज लोकांना चांगले वाईट विचार आचार त्यापासून होणारें फायदे तोटे. पाप पुण्य या मार्गाने समजवून सांगत आहेत. कोणताही धर्मग्रंथ समाजात तेढ पैदा करा असं शिकवत नाही. सर्वांना आपल्या आपल्या धर्मानुसार आचरण करून जगण्याचा अधिकार आहे. सर्व धर्मग्रंथ मध्ये धर्माची शिकवण एकच आहे. व्याज घेणे. वाळीत टाकणे. भूचोरी करणे. अत्याचार करणे. गुलाम बनविणे. महिला अपमान. बालहत्या. गोहत्या. एखाद्या बद्दल वाईट विचार करणे. एखाद्याला कमी लेखण. रक्त सांडून कधीही शांती मिळत नाही. घरदार संसार मुल बाळं सोडून धर्म प्रचार प्रसार करणारे यांना कधीही धर्माचा अर्थ कळत नाही. अशी एक नाही अनेक तत्वे विविध धर्म ग्रंथ आपणांस शिकवतात फक्त त्या त्या धर्माच्या चाकोरी प्रमाणे पण आज याचांचे भांडवल काही समाजांचे ठेकेदार विविध धर्मगुरू मुल्ला मौलवी करत आहेत आणि समाजातील लोकांत अनावश्यक विचार फैलावत आहेत त्यामुळे समाजाचीही शांती आज भंग पावत आहे. यामुळे समाजातील लोकांना धर्मग्रंथातील मुळ तंत्र शिकवन खरी तेवढीच लोकांपर्यंत पोहोचत नाही.
मुस्लिम समाज मागासलेला आहे आणि पुढेही राहणार त्याला दुसरें कोणी कारणीभूत नाही तर आपल्या समाजातील झुबा. लांब दाढी. हातात तसबी. अत्तर फाया. खाण्यास तुपातल. पण आशी वेशभूषा करणारे धर्मप्रसारक म्हणता येणार नाहीत. कारणं ज्यांनी मुस्लिम धर्माचा प्रसार केला त्यांना विविध अडचणी . मानहानी. उपासमार. कुटुंब त्याग. करावा लागला मग अशी वेशभूषा धारण करुन सोंग आणणारे हेच मुल्ला आणि मौलवी हेच आहेत. कारणं आज मुसलमान एकच आहे पण त्यांच्या पोटजाती मोजता येणार नाही एवढ्या आहेत . त्यामुळे मुस्लिम समाजात सियया आणि सुन्नी अशा दोन जमाती तयार झाल्या कुराण एक कुराणाची शिकवण एक. मग आपल्या आपल्या सामाजिक दबासाठी मुस्लिम समाज दोन गटात विभागाणारे आपलेच मुल्ला आणि मौलवी आहेत हे आपणांस नाकारता येणार नाही. आज प्रत्येक गल्लीत एक मस्जिद आहे. आपला धर्म कोणता धर्माची शिकवण महती काय आहे धर्माची असथा हे आपल्याला आपल्या मुलांना कळलं पाहिजे हे बरोबर आहे. पण आज गल्ली गल्लीत असणार्या मस्जिद मध्ये आज महिन्याला त्या परिसरातील लोकांकडून एक विशिष्ट रक्कम देणगीच्या रुपात वसुल केली जाते कारणं काय असतं त्या मस्जिदच लाईट बील. पाणीपट्टी. हाफिजी पगार. येणार्या जमाती यांच्या जेवणाचा खर्च . अशी फसवी कारणं सांगून आज सर्वत्र आर्थिक उकळणी सुरू त्या मस्जिद मध्ये त्याच परिसरातील एक व्यक्ती त्या मस्जिद मध्ये साप बनून बसलेला असतो आणि त्याच्या ईशारयावर सर्व मस्जिद आणि त्या परिसरातील लोकांचे दैनंदिन कामकाज अवलंबून असते. त्याच परिसरात एखादे गरिब कुटुंब. विधवा महिला . अशी सुध्दा कुटुंब असतांत त्याची समाजाची आर्थिक उकळणी देण्याची परस्थिती नसते. मग त्या परिसरातील काही मुस्लिम मुल्ला मौलवी त्या कुटुंबातील लोकांना वेठीस धरतात त्यांना तुमच्या घरातील लग्नात जमातीचे लोक येणार नाहीत. तुमच्यात मयत झाल्यास जमात येणार नाही. तुम्ही जर कोणत्याही मस्जिद मध्ये मुस्लिम आहे म्हणून पैसे भरत नसला तर तुम्हाला कब्रस्तानात गाडायला परवानगी नाही. हिंदू आपले दुश्मन आहेत. त्यांच्याबरोबर बोलू नका. त्यांच्या कोणत्याही कार्यात सहभागी होऊ नका. हे सर्व शिकविणारे कोण आहेत हेच जे आम्ही मुसलमान आहोत. असं महणारे मुल्ला आणि मौलवी हेच आहेत. कुराण मध्ये मुसलमान याचा अर्थ असा आहे ज्याचे इमान पाक आहे विचार पाक आहेत असा व्यक्ति म्हणजे मुसलमान होय . म्हणजे हे स्वताला अल्लाह समजतात काय? कुराणाची शिकवण ही नाही. राजकारणी लोकांच्या खुटयाला सवता बांधलेले आणि मुस्लिम समाजांचे एक गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी राजकारणी लोकांनी पाळलेले समाजातील पांढरे गुंड हेच मुल्ला आणि मौलवी आहेत . जमात मुस्लिम समाजातील लोकांना इस्लाम समजावा यासाठी ठराविक दिवस अल्लाह चया रस्त्यावर चला हे आम्हाला मान्य आहे . पण आपणांस जमातीत चला म्हणून सांगणारे यांची मुल उच्च शिक्षण घेतात त्यांना मसझिदचा वास तरी असतो का? नाही म्हणजे आपली मुल बाद करायचा विढाच यांनी उचलला आहे असं माझ मत आहे. जमातींत घरचा कर्ता माणूस गेला तर त्या घरातील महिला मुल घरभाडे लाईट बील. किराणा. पाणीपट्टी. कोणाच्या घरात काय अडचणी आहेत. कोणाच्या मुलांना नोकरी नाही . कोणाच्या मुलींचे लग्न जमतं नाही. आसपासचे लोक टार्गेट करुन आपल्या धर्मातील लोकांना त्रास देत आहेत कां. आपल्या समाजात बॅका पतसंस्था यांच्या कर्जात कोण आहे कां. कोणी वैद्यकीय अडचणीत आहे कां . कोण शैक्षणिक अडचणीत आहे कां . कोणाचे रेशन. पेन्शन. असं काही प्रश्न आहेत कां असे विविध जीवनावश्यक प्रश्न यांची आपणं समाजातील नागरिक म्हणून चौकशी करत नाही . मग जमातींत चला महणाणारे मुल्ला मौलवी करणारं कां? मुस्लिम धर्म सांगतो कोणीही कधीही उपाशी राहू नये. मग जमातींत जाण्यापेक्षा घरी आपला काम धंदा करत अल्लाह अल्लाह केल तर अल्लाह आपल्याला भेटणार नाही कां? कशासाठी जमात मस्जिद पाहिजे. कुराण नमाजपठण गरजेचे आहे पण सर्व संभाळून असं धर्मग्रंथात सांगितलं आहे
मुल्ला मौलवी यांनी जमातींत चला म्हणून लोकांना एकत्र आणतात मग तेच मुल्ला मौलवी धर्माची शिकवण देताना मुस्लिम समाजातील मुलांना समाजाच्या विविध योजनांची माहिती आर्थिक विकास महामंडळ माहिती का सांगत नाहीत. आपल्यासाठी शासन काय करत हे सुध्दा सांगितलं जात नाही. आपल्याला नेताचा आपला मायबाप आहे असं शिकविणारे दुसरें तिसरे कोण नाहीत हेच मुल्ला आणि मौलवी आहेत. लग्नाचे कार्यालय मंजूर केले जात पण आपल्या मुलांसाठी नोकरी मिळेल असा कोणताही उपक्रम राबविला जात नाही म्हणजे नोकरी नाही कोण मुलगीच देणारं नाही मग त्या लग्नाच्या कार्यालयाचा उपयोग काय. मुलांसाठी विविध स्पर्धा परिक्षा वर्ग मोफत साठी कोण प्रयत्न करत नाही. मुस्लिम समाजाला व्यवहारात आरक्षण नाही आर्थिक विकास महामंडळाला निधी नाही. त्यामुळे आज मुस्लिम समाजातील मुल. भंगार दुकान. चिकन मटण दुकाने. गाड्यांचे व्यवहार. गॅरेज. गवंडी मजूरी. आणि नेत्यांच्या बगलबच्चे यांच्या दुकानात काम करत आहेत. आज सर्वात गंभीर बाब आहे ती म्हणजे मी पाहिले आहे की बाजारपेठेत. विविध दुकानांत काखेत मुल घेऊन आणि बुरखा पांघरून भिक मागणारया महिला आज दिसतं आहेत पण आपणांस काहीच वाटत नाही. यासाठी कारणीभूत आहेत आपल्याला फक्त आणि फक्त अल्लाह अल्लाह करायला सांगणारे मुल्ला आणि मौलवी हेच जबाबदार आहेत. कारणं यांनी कधीही समाज साक्षर केला नाही होऊ दिला नाही. मुस्लिम मतांमध्ये एवढी मोठी ताकद आहे की सरकार उलथापालथ करण्याऐवढी पण आमची ताकद आम्हाला कळलीच नाही. ज्यांना कळली ते चोर नेते आमदार खासदार मंत्री झाले आणि आपणं जिथ होतों तिथंच राहीलो याला कोण जबाबदार आहे विचार करा.
माझं लिखाण एक धर्म टार्गेट करुन नाही. प्रत्येक धर्मात चालिरीती परंपरा. शिकवन तत्व विचार आचार. त्या त्या धर्मातील गुरु यांनी आपले व आपल्या कुटुंबांचे पोट भरावे यासाठी पिढ्यांन पिढ्या लोकांना देवाचं आणि धर्माची भिती घालून चालवत आले आहेत म्हणजे हे केलंच पाहिजे नाहीतर देवांचा कोप होईल. समाजात राहायचं असेल तर समाजाच्या मनमानी नियमांचे पालन केले पाहिजे. समाज देईल ती शिक्षा आपण काहीच गुन्हा केला नसेल तरी सोसणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment