कहा गया परदेसी?

 

** कहा गया परदेसी?**

          भारतीय संस्कृतीत आपणं येणारे पाहुणे यांना ** अतिथी देवो भव * असा दर्जा देतो मग तो आपणांस त्रास दुःख देणारा असेल तरी आपण त्याचे स्वागतच करतो . यांचेच उदा म्हणजे सुरवातीला आपल्यावर मोघल साम्राज्य यानी जवळपास आपल्यावर २५० वर्ष राज्य केलं आणि त्यांनी आपल्याला व आपल्या जनतेला दुःखच दिलें. त्यानंतर केप आॅफ गुड होप महणारा पहिला खलाशी वास्को द गामा यांने इंडिया गेट मार्गाने भारतात प्रवेश केला आणि आपला भारत आपणास कळला नाही पण परदेशी यांना तो * सोन्याची चिडिया* असणारा भारत एकाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन दुसर्याच्या गुलामगिरी जवळपास १५० वर्ष अडकला आपल्या देशातील मसाले कापूस याची निर्यात परदेशात होण्यास सुरुवात झाली. आणि त्याच मालापासून तयार होणारा पक्का माल भारतात विकला जात असे त्यामुळे आपला सर्व पैसा परदेशात जाण्यास सुरुवात झाली. आणि आपण व आपला देश जनता गरिब होती ती आणखी गरिब झाली. * फोडा आणि राज्य करा* हा फंडा कामी आला कारणं आपल्यातले काहीजण यांना सामिल झाले . आणि आपणांस पुरेपूर लुटण्याचा फार मोठा षडयंत्र तयार करण्यात आले. त्यावेळी आपल्याला राज्य करता यावे यासाठी इंग्रजांनी पाटील. कुलकर्णी. राजेशाही. सरंजामशाही. यांना फक्त गावातील कर वसुली करण्यासाठी पद दिली . आज इंग्रज गेले पण त्या पदाचा आजसुद्धा आपल्यावर राज्य करण्यासाठी वापर केला जात आहे म्हणजे आपणं आजही नेते पुढारी खासदार आमदार मंत्री शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या गुलामगिरी मध्येच आहे हे खोट नाही . शैक्षणिक. वैद्यकीय. सामाजिक. आर्थिक. अश्या लुटिला आजही आपणास सामोरे जावे लागत आहे. 

              असाच एक व्हायरस जो जनावरांच्या मटनापासून. हवेतून परदेशी २२/२३ मार्च २०२० ला आपल्या भारतात दाखल झाला त्याचे नाव होतं ** कोरोना ** आणि मग लोकांचं म्हणणं परदेशातून आपल्या भारतात हा परदेशी इतर देशांनी अनविक युद्ध करण्यासाठी पाठवून दिला आहे. प्रत्येक देशांनी आपली जनता जगविण्यासाठी वाडया. वस्त्या. तालुका. जिल्हा. राज्य. देश. गल्ली.बोळ. सर्वकाही टाळेबंदी केली. लोकांचे फिरणं बोलणं. भेटणं. सर्वकाही बंद केलं. जीवनावश्यक वस्तू वर बंदी. लग्न. बारस. जावळ. मुंजी. वाढदिवस. सभा. मिटींगा. असं विविध कार्यक्रम अनाठायी खर्च करणारे सर्वकाही बंद पडले . लोकांना माणुसकी काय असतें. लोकांना. संकटकाळी काय मदत करावी याचे ज्ञान आपले कर्तव्य याची जाणीव करुन देणारा परदेशी आला होता. लोक टाळेबंदी काळात घरातच अडकून पडली हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही. यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबातील लहान मोठे महतारे यांच्यावर उपासमारीची वेळ आली हा प्रसंग एवढा अवघड होता की काही लोकांनी आत्महत्या सारखे मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली आणि कुटुंब रस्त्यावर आले. यांवर आपण परदेशी पावहणया कडून शिकणं गरजेचे होत की माणूसकी महत्वाची आहे माणूस महत्वाचा आहे. 

          परदेशी आला आणि बाजार बंद. लग्न कार्यालय बंद. शासकीय निमशासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी बोगस कागदपत्रे दाखवून शासनाला लुटलं ते वेगळे. जत्रा यात्रा बंद. वाहतूक बंद. प्रवासी वाहतूक बंद. दवाखाने बंद. रेशन घोटाळा. जीवनावश्यक वस्तूंचे डबल दर. मास्क बंदी. हात वेळी धुण्याचा नियम . गाव बंद. हदधी बंद. म्हणजे कोरोना काळात लोकांच्या गरजेचा परिस्थितीच्या पुरेपूर काही लोकांनी फायदा उठवला आणि जनतेला मनमोकळ करून लुटलं. यावेळी खरोखरच जनतेला लुटलं असेल तर डॉक्टर लोकांनी तपासणी नाही निदान नाही हाडांच्या पेशंट ला ताप थंडी चे औषध औषधांचे दर डबल काही डॉ लोकांनी आपल्या ओपीडीला पैसा मिळविण्यासाठी कारखाना बनविले होते . 

          गावागावात कोरोना उपचारासाठी दवाखाने सज्ज झाले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोरगरिबांना कोरोना उपचार बजेट मध्ये व्हावा यासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे दिड लाख अनुदान देण्याचे जसं शासनाने फायनल केल. तसं कोरोना पेंशट मोठ्याप्रमाणात सापडायला लागलें . तपासणी केली असतां सर्वजणच काय पण पूर्ण कुटुंब सुध्दा यांनी बाधित काढली सकाळी उपचार घेणारा संध्याकाळी मयत असा माणसांचा वध करण्याचा कार्यक्रम लागला. स्मशानभूमी फुल्ल आहे असं भासवून लोकांच्या मनात परदेशी बद्दल दहशत निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले. स्मशानभूमी मध्ये दहनसाठी पैसे. कोरोना प्रेत अमबुलनस मधून आणण्यासाठी मनमानी पैसा उकळणे. नातेवाईक यांना रोगाने मयत व्यक्तींचे तोंडच काय पण कवा मेला कवा जाळला हे सुध्दा कळल नाही. रोगापेक्षा रोगाच्या दहशतीने लोकांचे प्राण घेतले. 

            २०२०/२०२१ मध्ये करोना काळात महागाई कमी होती. पेट्रोल डिझेल गॅस जीवनावश्यक वस्तू यांचें दर वाढले नाहीत. वाढ झाली पण ती सुद्धा प्रमाणात होती. लग्नाचा. वाढदिवस. मुंजी. बारस. सभा. मिठिंगा. पार्ट्या. दारु मटका. अतिषबाजी. लोकाची चैनी यांचा अनाठायी खर्च आत्ता जोरात सुरू आहे. लोक गेलेला काळ विसरले आपले सगेसोयरे परदेशी रोगाने मयत झाले हे सुद्धा विसरले. आणि आत्ता सर्व कार्यक्रमात अन्नाची हेळसांड करायला लागले. हात धुन गर्दि करणं आत्ता आणि कम्पल्सरी सुरू झाले राजकीय लोकानी या परदेशी रोगांचे भांडवल केलं. समाजातील काही दानशूर लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले ते तुमच्यासाठी नाही तर मतदानासाठी. काहीजणांनी जेवन घातली पण फोटो पहिल्यांदा काढलें. 

      म्हणजे आणखी एक वेळ परदेशी यावा असं मला वाटतं कारणं आज सुध्दा लोकांच्या कडे मुबलक पैसा आहे लोक अनाठायी खर्च करायला लागले. लोकांच्या मनातील भिती कमी झाली आहे

              २०२०/२०२१ मध्ये सर्वकाही बंद असल्यामुळे सर्वात मोठा आपणांस गोरगरीब लोकांना फटका बसला आहे तो म्हणजे बॅंक पतसंस्था खासगी सावकार. भिशी. यांची व्याजाने पोट फुगली आत्ता जनता जगेल असं वाटत नाही गोरगरिबांना आपल्या प्रापटया विकून ही सर्व कर्ज फेडावी लागणार आणि आत्ता सुद्धा राजकारणी लोक एक वेळ परदेशी याला बोलावून घेणार हे नक्की

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या