** वाचाल तर वाचाल**
भाग २
मागील भागात आपण वाचाल तर वाचाल याबाबत थोडी माहिती घेतली . आपणं रोजच्या जीवनात विविध कारणांसाठी विविध ठिकाणी प्रवास करत असतो. आपणांस जर शिक्षण नसेल आणि आपणं एखाद्या गावाला निघालो तर आपणास एस टी चा बोर्ड वाचायला यायला हवा नाहीतर आपणं निघालो एकीकडे आणि जाणार एकीकडे हे खरंच आहे. म्हणजे वाचण्याचे आणि शिक्षणाचे महत्व आपणांस कळेल. विविध ठिकाणी विविध कारणांसाठी आपणांस सही अगंठा करावाच लागतो. आणि मग आपणं जर विना वाचता जर सही अगंठा केला तर आपल मोठ नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. घरपट्टी पाणीपट्टी.लाईटबील चेक वरील रक्कम. पोलिस स्टेशनस मधील दाखल एफ आय आर. गल्ली बोळातील रस्ते. गावाची नाव. हे सर्व आपणांस वाचता आल पाहिजे.
माणूस आहे म्हणजे आजार आहे आजारी पडणार आहे. दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद आहे कां. दवाखान्यात स्वच्छता आहे कां. दवाखान्यात कोणकोणत्या योजना राबविल्या जातात. उपचार पध्दती निवडण्याचा हक्क आपणांस आहे कां. डॉ पेशंट वर काय उपचार करतात. औषधांचे दर. उपचार दरपत्रक. मेडीकल वाले औषधांचे दर अवाच्या सव्वा लावता आहेत कां. या सर्व गोष्टी दवाखान्यात रुग्णांच्या सनदेनुसार लावल्या आहेत कां असतील तरी तुम्हाला वाचायला आल तरच कळणार आहे की आपलं हीत कशात आहे.
रेशन दुकान मध्ये आपणं जातो रेशन घेण्यासाठी मग आपल्या गावात अंत्योदय बी पी एल शुभ्र शिधापत्रिका धारक संख्या किती . महिन्याला रेशन अन्न धान्य येते किती वाटप केलं जाते कां. युनिट नुसार वाटप होत कां . रेशन दुकानात तक्रार बुक आहे कां. रेशन दुकान आपल्या गावात किती. हे सर्व आपणांस वाचल्याशिवाय कळणार नाही त्यासाठी आपणांस पुरवठा विभागाची नागरि सनद वाचणे गरजेचे आहे. म्हणूनच मी म्हणतो वाचाल तरच वाचाल
वृतमानपत्र. कथा. कांदबरी. आत्मचरित्र. कहाणी. किस्से. नैसर्गिक माहिती सांगणारी पुस्तके. वैद्यकीय माहिती सांगणारी पुस्तके. खगोलशास्त्र पुस्तक. शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी उपयोगी सर्व पुस्तकं. आपणांस बरेच ज्ञान देणारी असतांत आपणास दैनंदिन या पुस्तकाचे वाचणं केल्यास आपल्या ज्ञानात अनमोल अशी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाचा पहिला गुरू आहे ते म्हणजे पुस्तक. रामायण. महाभारत. बायबल. कुराण. भगवतगीता. असे अन्य धर्मग्रंथ आपणांस दैनंदिन जीवनात कस वागाव पाप काय पुण्य काय यांची जाणीव अनुभव परिणाम सांगणारी अनमोल पुस्तक आहे त्यांचे वाचणं करणं गरजेचं आहे. पुस्तक बंद ठेऊ नका असं जुनी लोक सांगतात कारणं पुस्तकाचे रोज एकतरी पान उघडले वाचले पाहिजे नाहीतर थांबलेल्या पाण्याप्रमाणे पुस्तकातील ज्ञान खराब होणार यामुळे पुस्तक वाचाल तरच तुम्ही वाचाल हे खरंच आहे.
नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आपल्या प्रभागात उमेदवार कोण. त्यांचे काम काय. त्यांचे नाव काय. तो कोणत्या पक्षाचा आहे. तयाचे निवडणूक चिन्ह काय आणि कोणत. हे तरी कमीतकमी आपणांस वाचता आल पाहिजे. त्याचा निवडणूक जाहिरनामा काय आहे. गावातील विकासातील त्याचे प्रयत्न किती आणि कोणत हे सर्व आपणांस वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणूनचं म्हणतो की वाचाल तरच वाचाल
माहिती अधिकार विविध आर्थिक विकास महामंडळ यांचीही पुस्तक आपल्या वाचणात असणं गरजेचं आहे . त्याशिवाय आपणांस शासकीय निमशासकीय योजनांची माहिती उपलब्ध होणार नाही. शासकीय अधिकारी कर्मचारी यांची कामचोरी आपणांस कळणार नाही . यासाठी वाचणं अंत्यंत गरजेचे आहे.
आपल्या गावात ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद. तहसिलदार कार्यालय. महसूल विभाग.पुरवठा विभाग. पेन्शन योजना. स्टॅम्प घोटाळा. दस्त नोंदणी घोटाळा. विविध कामांसाठी मागितली जाणारी लाच . अशा सर्व विभागांत विकास जनसेवा नावाखाली चालणारा भ्रष्टाचार आपणांस कळण्यासाठी आपणं सदर आॅफिस मध्ये जाण गरजेचे आहे. या सर्व प्रकार बंद करण्यासाठी वाचणं करणं गरजेचं आहे . म्हणूनच म्हणतो की वाचाल तर आपला वेळ आणि पैसा वाचवू शकाल
महिला घरेलु अत्याचार. सामाजिक मानसिक अत्याचार. छेडछाड कायदा. सर्व महिला संरक्षण देण्यासाठी असणारे विविध कायदे याची माहिती आपणास असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल वाचणं असणं गरजेचं आहे
बालकामगार बंदी म्हणणे सोप आहे पण आज वडापाव. चायनीज. दाबेली. खाणावळ. हाॅटेल. फळे फुले भाजीपाला विक्री. बांधकाम क्षेत्रात. विट भट्टी. स्टोन क्रशर. गाडी धुणे. बुट पाॅलिश . अशा विविध ठिकाणी आजही बालकामगार या़चा सर्रास वापर केला जातो.बालकामगार यांची बालमजुरी बंद व्हावी आणि मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध कडक कायदे केले आहेत पण आपणांस ते कळणार नाहीत कारणं आपलं वाचणं नाही. म्हणूनच मी म्हणतो की वाचाल तरच वाचाल
गाव गल्ली तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जशी स्मशानभूमी आहे. समाजमंदिर आहे. विविध शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. मंदिर आहे. मस्जिद आहे. बॅंक पतसंस्था आहे. विविध गटातील नेते आमदार खासदार मंत्री आहेत. सर्व विकास योजना आहेत. भ्रष्टाचार आहे. असे विविध मुद्दे आज विनीकारण जागा अडवून उभे आहेत. पण आज सर्वात मोठी हाणी आहे ती म्हणजे ** वाचणालय नाही ** आहे ती वाचणालय आज भकास पडली आहेत. आजची तरुण पिढी पान मावा सिगारेट गुटखा खाऊन चौकात राजकारण मुलींचे विषय काढून आज आपल्या जीवनातील क्षण वाया घालवत आहेत पण गावातील वाचनालयात एकही तरूण येत नाही. आजची तरुण पिढी मोबाईल मुळ बाद झाली आहे. यांना सावरण्यासाठी आज ग्रंथालयांची नितांत गरज आहे. शासनाने एक आदेश काढण्याची गरज आहे गाव गल्ली तिथं वाचणालय असणं अनिवार्य आहे नसेल तर त्या गावात निवडणूक बंदी करण्यात यावी
आज ग्रंथालयांना गळती लागली आहे. आणि गावात राज्यात देशात चप्पल बुट आज शोरूममध्ये आहेत. काय शोकांतिका आहे. वाईट आहे म्हणजे ज्यांना डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं ते आज रस्त्यावर आहेत. ज्यांना पायात चालायचे त्यांना आज शोरूममध्ये जागा मिळाली जरा विचार करा. नाहीतर चांगले विचार चांगले व्यक्ती जीवंत राहणार नाहीत
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment