गुटखा, मावा तस्करी मध्ये आर्थिक देवाणघेवाण ? - डॉ परवेज अशरफी

 

गुटखा, मावा तस्करी मध्ये आर्थिक देवाणघेवाण? - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर - गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा शौकिनांची संख्या कमी होण्या ऐवजी दिवसेन दिवस वाढत आहे. बंदी असतानाही गुटखा, खर्ऱ्याची सर्रास विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी अहमदनगर शहरात कोट्यावधी रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सर्व आरोपींना जामीन मिळाला कारण सदर प्रकरण पोलिस प्रशासनाकडून कायद्याच्या चौकटीत हाताळले गेले नाही किंवा जाणून बुजून हाताळण्यात आले नाही. त्यामुळे कायद्याचे वाचक त्याच्यावर राहिलेले नाही. असा आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केला. 

  डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनाचे पत्र दिले. डॉ परवेज अशरफी यांनी पत्रात पुढे असे म्हणाले की सदर प्रकरणामध्ये अन्न औषध प्रशासन अधिकारी यांना फिर्यादी करण्यात आले नाही, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा – २००६ चे कलम ४२ नुसार कारवाई करण्यात आली नाही. जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रसासन यांचे ताब्यात देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठे आर्थिक उलाढाल झाली की काय? असा प्रश्न निर्माण होतो. सदर प्रकरणामधील सदरचा गुटखा उत्पादक यास आरोपी करणे आवश्यक होते. परंतु ते करण्यात आले नाही. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक पाकीटावार उत्पादकाचे नाव व पत्ता होता.असे असतांनाही त्याला आरोपी करण्यात आले नाही.  

  आपण असे गृहीत धरले की पाकीटावर नाव असलेल्या उत्पादकाची चौकशी झाली आणि त्याने सांगितले की सदरचा जप्त गुटखा पानमसाला त्याने उत्पादन केले नसून त्याच्या नावाचा आणि लोगो चा गैरवापर करण्यात आला. तर मग त्याला फिर्यादी करून सदर आरोपींविरुद्ध कॉपी राईट आणि ट्रेड मार्क संदर्भातील गुन्हे दाखल होणे आवश्यक होते. परंतु असे झालेले दिसून येत नाही. 

 पोलीस प्रशासनाने ज्या व्यक्तीचे घरी गुटखा सापडला त्यालाही आरोपी केले नाही. याचे कारण जनतेला अद्याप समजले नाही की असा कोणता कायदा आहे ज्यांनी ज्याच्या घरी बंदी असलेला मुद्देमाल सापडतो त्याला आरोपी करता येत नाही. 



  गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा यांची विक्री संपूर्ण जिल्हयामध्ये सर्रासपणे होत आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल रोज होत आहे. अनेक सिंडीकेट यामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी आहे आणि म्हणूनच त्याच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. जशी कारवाई “पांगरमळ” प्रकरणातील आरोपींविरुद्ध झालेली आहे. आजपावेतो गुटखा, तंबाखू, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा यामुळे अनेक लोकांना कॅन्सर होऊन ते मरण पावलेले आहे त्यांची संख्या “पांगरमळ” प्रकरणातील मृत्यू झालेल्यांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. तसेच या बेकायदेशीर कृत्य करून आणि अवैध मार्गाने आरोपींनी आर्थिक लाभ मिळविलेलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे.

 एम आय एम गुटखा मावा प्रकरणात सतत पाठपुरावा करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लवकरात लवकर कारवाही चे आदेश देऊन मोक्का अंतर्गत कारवाही केली नाहीत तर आंदोलनाचा मार्ग सुविकारावे लागेल असे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.



कपरी प्रकल्पग्रस्त आरक्षणाची

 

**कपरी प्रकल्पग्रस्त आरक्षणाची **

           तीन अक्षरांचा हा लहान शब्द पण सर्वात मोठ रहस्य दडलेले आहे या शब्दात कारणं कपरी म्हणजे मोठयातला मोठा  दगड किंवा एकादा किचकट मुद्दा निकालात किंवा त्याला आधार देण्यासाठी वापरली जाणारी एखादा लहानसा आधार म्हणजे कपरी आज सर्व क्षेत्रात प्रत्येकाला विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात आपली कामं करुन घेण्यासाठी कपरी लावावी लागत आहे. बांधकाम आपणं बघतो मोठं मोठें वाडे. किल्ले. दगडी पुल. दगडी बंधारे. आशी विविध बांधकामात वापरला जाणारा तेवढा मोठा दगड महत्वाचा असतो तसेच त्याला उभा करण्यासाठी त्यांच्या बुडाला वापरली जाणारी कपरी तितकीच महत्त्वाची आहे. आज आपल्यावर राज्य करणारे पुढारी. नेते. आमदार. खासदार. यांना आपणच लहानात होऊन पैशासाठी दारू. मटण. थोड्या पैशासाठी लाचार होतो आणि आपलं महत्व विसरून जातो. म्हणजे जसं मोठा दगड आज उभा आहे त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे कपरी यांचाच अर्थ अस होतो की आपलं मत सुध्दा या नेते आमदार खासदार मंत्री यांना उभ करण्यासाठी एक कपरी आहे. जर कपरी काढली तर हे सर्व कोसळल्या शिवाय राहणार नाही. 

            राज्य शासनाच्या ३/५/२०१० चया शासन निर्णयानुसार विविध धरण. कालवे ‌ पुल. अशा अपतिग्रसत मुद्द्यांबाबत किंवा सामाजिक हीताचा मुद्दा धरून काही जमीन हस्तांतरण केली जाते. येथील लोकांना त्या जमीनीचा मोबदला देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. त्यासाठी जमीनी बदलात जमीन देण असा निर्णय आहे. प्रकल्पामुळे बाधित लोकांना शासनाने पाच टक्के नोकरीत आरक्षण नमुद केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकल्पग्रस्त लोकाची माहिती संकलन करून ठेवलीली आहे.शासकीय नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी शासनाने काही अटी शर्ती घालून ठेवल्या आहेत. एखाद्या प्रकल्पग्रस्तांची २० आर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन हस्तांतरित संपादित झाली असल्यास त्याला शासनाने या योजनेनुसार शासकीय नोकरीची हमी आहे. मात्र २० आर पेक्षा कमी जमीन हस्तांतरित किंवा संपादित झाली असेल त्याला या योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही त्याचे निर्देश शासनाने ३/५/२०१० या अधिनियम अंतर्गत नमुद करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जमीन जाऊन सुध्दा अल्पभूधारक प्रकल्पग्रस्त या योजनेपासून वंचित आहेत. 

        शासनाने असा आदेश फाइल केला की एखाद्या प्रकल्पग्रस्तांची बाधित झाल्यावरही त्यांच्याकडे १६ एककर हंगामी बागायती  . ८ एककर बारमाही बागायत आणि अथवा ४ एककर क्षेत्र शिल्लक राहत असेल तर अशा प्रकल्पग्रस्ताना या योजनेचा लाभ देण्यात येवू नये असा कोणताही आदेश या अधिनियमात नमुद करण्यात आला नाही. मात्र दरम्यानच्या काळात या निकषात बसणारं हजारो प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पग्रस्तांची नावे नोकरी विषयक प्रतिक्षा यादीत बर्याच वर्षांपासून अडकून पडलेली आहेत. त्यामुळे या निकषात बसणारे हजारों लाभार्थी व त्यांचे नोकरी विषयक भवितव्य लोंबाळकत पडलं आहे.  ज्याच्या जमीनी बाधित झालया आहेत.तयाना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देवून त्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ हा आदेश एकीकडे आहे.पण वरील प्रमाणे ज्याचे क्षेत्र शिल्लक राहते.तयाना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले द्यावेत कि देवू नयेत यांचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.  प्रकल्पग्रस्तांच्या शिल्लक क्षेत्राबाबत दुसरा आदेश निघण्यापूर्वी ज्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले दिले.आहेत आणि या दाखल्यांच्या आधारे जे प्रकल्पग्रस्त शासकीय आणि निमशासकीय सेवेत सामावून घेतले आहे.अशा प्रकल्पग्रस्त लोका बाबत आत्ता काय निर्णय घ्यायचा यांचेही शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे अशा प्रकल्पग्रस्त लोकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

gn: justify;">        शासनाचा अजून एक अध्यादेश आहे त्यानुसार एखाद्या प्रकल्पग्रस्तांची कितीही जमिन बाधित झाली असली आणि तरिही त्यांच्याकडे उदरनिर्वाह इतकी जमिन शिल्लक असेल तर त्याला प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या कोणत्याही सवलतींचा लाभ देण्यात येवू नये मात्र या अध्यादेशात उदरनिर्वाह इतकीच म्हणजे नेमकी किती जमीन याचा उल्लेख कोठेही करण्यात आला नाही.शासनाने प्रकल्पग्रस्त लोकांसाठी वेळोवेळी काढण्यात आलेले अध्यादेश इतकं विसंगत आहेत की कशाचा कशाला ताळमेळ नाही.एकादया योजनेचा लाभ देताना आपल्या हातून एकादी चूक झाली तर त्याचे गंडांतर आपल्याकडं यायला नको म्हणून अधिकारी व कर्मचारी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतींत कोणताही निर्णय घ्यायला टाळाटाळच करतात.असा आज वर्षानुवर्षे आपणांस अनुभव आहे.या अंधाधुंद कारभारामुळे हजारों प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय निमशासकीय नोकरी आरक्षण हे एखाद्या लावलेल्या कपरी प्रमाणे झाले आहे.

       प्रकल्पग्रस्तांच्या जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत असा शासनाचा आदेश आहे. त्यातच शासनाने एक पळवाट काढली आहे ती म्हणजे ९९ वर्षांचा करार अशा करारावर घेतलेल्या जमिनी काही लोकानी लाटल्या आहेत. काही ठिकाणी प्राधिकारी यांनी आदेश देवून सुध्दा काही समाजकंटक यांनी व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आदेशाला कचरा पेटी दाखवली आहे. 

          बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सहीह फासीदा

 

** सहीह फासीदा **

     मुस्लिम धर्मात सर्वात महत्वाचे स्थान असणारा शब्द आहे आपणांस माहीत आहे किंवा नाही हे मल माहीत नाही. मुस्लिम धर्म . सत्य. प्रामाणिक पणा. दान धर्म. पाच टाईम नमाजपठण. कुराण वाचणं . मुस्लिम धर्माची निती कर्तव्य शिकवण जपणारा धर्म आहे. 

इस्लाम अल-इस्लाम ) हा अब्राहमिक पंथ आहे, जो अपोस्टोलिक परंपरेतून निर्माण झालेला एकेश्वरवादी पंथ आहे . परंपरेनुसार, त्याच्या शेवटच्या प्रेषिताची सुरुवात 7 व्या शतकातील अरबी द्वीपकल्पात आहे . इस्लामिक परंपरेनुसार , अल्लाहचा शेवटचा संदेष्टा मुहम्मद यांनी मानवांना प्रसारित केलेला अवतारी ग्रंथ कुराणच्या शिकवणीवर आधारित आहे आणि त्यात हदीस , सीरत अन-नबी आणि शरियत ग्रंथांचा समावेश आहे. सुन्नी , शिया , इस्लाम मध्येसुफी आणि अहमदिया समुदाय प्रमुख आहेत. इस्लामच्या धार्मिक स्थळांना मशिदी म्हणतात . एकूण अनुयायांच्या संख्येनुसार इस्लाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पंथ आहे. आज जगात अंदाजे 1.9 अब्ज (किंवा 190 दशलक्ष) ते 2.0 अब्ज (200 दशलक्ष) मुस्लिम आहेत यापैकी सुमारे 85% सुन्नी आणि सुमारे 15% शिया आहेत. बहुतेक मुस्लिम दक्षिणपूर्व आशिया आणि दक्षिण आशियाच्या देशांमध्ये राहतात . मध्य पूर्व , आफ्रिका आणि युरोपमध्ये मुस्लिमांचे अनेक समुदाय राहतात . जगात असे जवळपास 56 देश आहेत जिथे मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. जगात असे अनेक देश आहेत. 

                मुस्लिम धर्मात लग्न निकाह. घटस्फोट.तलाक . मेहर. ( लग्नाअगोदर मुलीला देणयाची रक्कम. बक्षिस पत्र. मृत्युपत्र. वसियतनामा. वारसा हक्क. पालनपोषण.आज्ञान पालकत्व. वफत आदि सर्व बाबी मुस्लिम कायद्यानुसार पार पाडल्या जातात त्याला ** सहीह ** असं म्हणलं जातं मुस्लिम वयकतिकडून न्यायालयात दाखल दावयातही मुस्लिम कायद्याअंतर्गत प्रकरणं चालविले जात. 

      मुस्लिम धर्मात आजा आजी या नात्याला अनयन महत्व आहे. कारणं घरातील मूळ याच आजी आजी पासून निर्माण होते. त्यामुळे आजा आजी यांच्या व्याख्या वैशिष्ट्य पूर्ण आहेत. आपण नेहमी वडलांच्या वडलांना आजा म्हणतो आणि आईच्या वडिलांनाही आजाच म्हणतो. परंतु प्राचीन अरब समाजात जाज्वल्य वंशाभिमान असल्यामुळे ते दोन आजोबा मध्ये फरक करतात." आजा" ला अरबी भाषेत " जधद " असं म्हणलं जातं.अरब लोक वडलांच्या वडलांना " जधद सहीहू " म्हणतात." सहीहू म्हणजे ज्याला आपण मराठीत" सही सही " किंवा अगदी तंतोतंत म्हणतो आईच्या वडलांना " जधद फासीदा " असे म्हणतात" फासिदा म्हणजे अगदी तंतोतंत नसणारे किंवा ज्यात काहीतरी कमतरता आहे असे. 

          मुस्लिम विधीवर धर्मातील ग्रंथ लिहिणारे यांनी " सहीह" म्हणजे खरं आणि फासिदा म्हणजे खोट असं शब्द वापरले आहेत. मुस्लिम कायद्याच्या बाबतीत अजून एका गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे " पणजा " खापरपंजा " किंवा निपंणजा" हे शब्द अनुक्रमे ( कितीही वरचा म्हणजे वरच्या पिढीतीला ) आणि नातू ( कितीही खालच्या म्हणजे खालच्या पिढीतला) असेच म्हणतात आजी आणि नातू यांच्या बाबतीत तशीच शब्द योजना करतात.

** सहीह आजा - म्हणजे तो आजा आणि मृत्यू नात्यांमध्ये एकही महिला दुवा असत नाही असा पूर्वज

** सहीह आजी - म्हणजे ती आजी आणि मृत यांच्या नात्यांमध्ये फासीदा आजा बसत नाही अशी पूर्वज महिला

** फासीदा आजा - म्हणजे तो आजा आणि मृत यांच्या एखादा तरी महिला दुवा असतो असा पूर्वज 

** फासीदा आजी - म्हणजे ती आजी आणि मृत यांच्या नात्यांमध्ये एखादा तरी फासीद आजा बनतो अशी पूर्वज महिला

** पुत्र - हा प्रथम क्रमांकाचा अवशिष्ट ग्राही आहे. मुस्लिम विधीखाली हिससेदार यांची अश्या युकतिने रचना केली आहे.की पुत्र हा केव्हाही अवरजित केला जाणार नाही.परंतू पुत्र असल्यास काही वारसदार पुर्णपणे अपवरजित होतात.काहिचे हिस्से घटतात आणि काही हिससेदार अवशिष्ट ग्राही होतात.पुत्र असल्यास कन्या अवशिष्ट ग्राही होते.तिला पुत्राच्या अर्धा हिस्सा मिळतो 

       मुस्लिम धर्म कोणाचाही हक्क मारण्याचा डावलणयाचया विरोधात आहे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे


पोरगं काय करतंय ?

 

** पोरगं काय करतंय? **


                  आज आपल्या सर्वांच्या व पालकांच्या मोठा त्रास देणारा शब्द आहे. रोज आपल्या कोणाला कोणाला या मागणीला हिणवनीला सामोरं जाव लागत. जसं आपण मुलगा मुलगी जन्माला घालून जणू मोठा अपराध केला आहे ‌ साताजनमाचया गाठी देवानं बांधल्या आहेत असं आपले पूर्वज म्हणत होतें. ज्याने पाळणा बघितला आहे त्याच्या नशिबात बाशिंग आहेच. पण हे सर्व तथ्य आज कुणीतरी खोट ठरतं आहे . या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे आपले सरकार. शासन व्यवस्था. आणि सर्वात मोठा शाप तो म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य अशी बरिच कारणं आहेत . 
                मुलगा जन्माला आला आणि सर्व घरदार सगेसोयरे आनंदी झाले. घराला वारस मिळाला. पाच वर्षांचा झाला आणि आई वडील यांनी शाळेत त्याचा दाखला केला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि. मुलगा पुढील शिक्षणासाठी काॅलेज विद्यालय . महाविद्यालय. उच्च शिक्षणासाठी विविध शिक्षण संस्था मध्ये मग त्या अनुदानित असो अथवा विना अनुदानित. अथवा खाजगी शिक्षण संस्था. यामध्ये लाखों रुपये देऊन शिक्षण घेण्यास गेले हे सर्व शिक्षण फुकट झालं नाही त्यासाठी आई वडील शेतात राबले. मोलमजुरी केली. सगेसोयरे यांच्याकडून उसन पैसे घेतले. काही पालकांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी व्याजाने घेतलें. काही जणांनी आपली शेती घर विकून या खाजगी शिक्षण संस्था वाले यांच्या मढयावर पैसे घातले आणि एकावेळ मुलांचे शिक्षण पूर्ण झाले . काहीजणांनी एम पी सी. यु पी सी. याकडे आपला मोर्चा वळविला आणि येथे सुध्दा शिक्षण संस्था यांच्यापेक्षा लुटणारे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण देणारी दुकान तयारच होती. आज प्रत्येक गावात अॅकडमी. तयार झाली त्यांची शिक्षण फी लाखांच्या घरात आणि पालकांना हेच अॅकडमी वाले मोकळी आश्वासन देत आहेत तुमचं पोरग चांगलं आहे पोलिस भरती. सैनिक भरती. तहसिलदार. प्रांताधिकारी. कलेक्टर. क्लास वन अधिकारी होणारच आई वडील यांचं काळीज हळवं आहे. जे आपल्या नशिबाला आल आहे ते आपल्या मुलाच्या आयुष्यात नको . आणि हा विचार करणं वावगं नाही. वडील चोर असेल आपलं पोरगं चोर व्हावं असं कोणालाही वाटणारं नाही. कामगाराचा मुलगा कामगार व्हावा असं कोणत्याही आई वडील यांना वाटणारं नाही . डॉ वकील इंजिनिअर बनून त्याने नोकरी करावी फॅन खाली बसून चाळीस पन्नास हजार पगार घ्यावा आपल्या महतार पणात आपली सेवा करावी त्यांचे लग्न व्हावे मुलंबाळं व्हावी सवताच घर असावं . ही सर्व स्वप्न बघत बघत मुलांचं वय होतं २६/२७ आणि यामध्ये लग्न करायचं राहून जातं कारणं मुलांना आपल्या आई वडील यांच्या कष्टाची जाणीव आहे नोकरी भरती झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं म्हणणारी मुल मी बघितली आहेत . म्हणून रोजच्या रोज सकाळी रस्त्यावर व्यायाम करणारी मुले. अॅकडमी. अभ्यासिका. यामध्ये आपला अनमोल वेळ आणि घरच्या लोकांच्या स्वप्नासाठी कष्ट करणारी मुलं मी बघितली आहेत.यामधये मुलांचे लग्नाचे वय गेलं
          आपलं सरकार निकामी आहे कारणं आज बरिच वर्ष झाली कसलीही भरती नाही . आणि त्यामध्ये सर्वात मोठा शाप म्हणजे आमदार खासदार स्वातंत्र्य सैनिक .व विविध राखीव कोटा . भटक्या विमुक्त जाती. मागासवर्गीय . अनुसूचित जाती. व इतर अशा फसव्या आणि तुमच्या आमच्या मुलांना नोकरी मिळू नये म्हणून आडवा आड फाटा यामुळे आज मुलांची कोंडी निर्माण झाली आहे. वरील विविध अटि शर्ती या़ची पूर्तता सर्वसामान्य पालक करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांना शासकीय निमशासकीय नोकरीत पाहण्याचे त्याचे स्वप्न अधूर राहत आहे . सरकारने कास्ट मधये भारतीची वयोमर्यादा ३० चे पुढं वाढवली आहे आणि ओपन मध्ये २६/२७ केली आहे. म्हणजे मुलांचे शिक्षण आणि विविध अभ्यास करण्यात त्यांचे वय निघून जातय आणि जर त्यातूनच भरतीचे वय निघून गेले की मुलांच्या वर आभाळ कोसळतय कारणं अभ्यास आणि नुस्ता अभ्यास करणारी मुलं यांना कष्टाची सवय नाही मिळेल ते काम करण्याची तयारी नाही. शिक्षण जास्त झालय म्हणून पडेल ते काम करण्याची लाज वाटते. आणि आपल्याला रोजच बातम्या येत आहेत . विद्यार्थी आत्महत्या सारखे प्रकार कायमचं घडत आहेत. यांत त्या आई वडील यांचा काय दोष आहे त्यांनी सवता उपाशी राहून शिकवलं आणि नोकरी नाही वय वाढलं म्हणून कोण मुलगी देत नाही या मानसिक त्रासाला कंटाळून जे पोरगं आत्महत्या करत म्हणजे त्या आई वडील यांचेवर आभाळच कोसळत काय वाईट आहे सर्व प्रकार
              मुलांच्या लग्नासाठी आई वडील सगेसोयरे यांची मुलगी शोधाशोध सुरू होतें. पण आजच्या मुलींची मागणी असते मुलगा सरकारी नोकरीत पाहिजे. आई वडील यांना एकटा पाहिजे. शेती नको. बहिण भाऊ नको. वेगळ राजा राणी सारखं राह्यलं पाहिजे. बंगाला गाडी नोकर चाकर घरांत घरकाम करायला बाई पोरं सांभाळायला बाई पाहिजे. पैसा बॅंक बॅलन्स पाहिजे. महागडी कपडे महागडं मोबाईल.हाॅटल माॅल मध्ये फिरणं . अशा एक नाही अनेक मागण्या आज मुलीच्या वाढल्या आहेत. त्याला कारणीभूत आहेत ते मुलींचे आई वडील आणि एक खुळी समजूत मुलीच्या पालकांच्या मनात आहे की मुलींची संख्या कमी आहे पण चुकीचे आहे आपणं आपला गोतावळा कधी सोडला नाही मुलांच्या पालकांनी जरा बाहेर पडा मुलींची संख्या जास्त आहे असं आपल्या ध्यानात येईल . मुलगीच या पालकांना मी सांगू इच्छितो की आज तुम्ही मुलगा निर्व्यसनी आहे सरकारी नोकरीत आहे शेती आहे बंगला आहे .पैसा आहे आणि त्या मुलाची वेळ खराब आली आणि मुलगा दारुडा. जुगारी. सगळी व्यसनी करणारा मिळाला तर आपल्या मुलीच्या भविष्याचे काय मग आपणं म्हणतो ते तीझ नशिब. त्यात आमचा काय दोष. म्हणजे चांगले केलं देवानं केल आणि वाईट झाल तर माणसानं केल ही आपली मानसिकता असतें. 
            "" पोरगं काय करतंय "" ही विचारणा जेव्हा तुम्ही करता त्यावेळी समाजात अशी काही मुलं आहेत की शिकून नोकरीची वाट न पाहता आपल्या कुटुंबाची आणि आपल्या उदरनिर्वाह. कुटुंबातील बिकट परिस्थिती. बॅंका पतसंस्था यांच कर्ज यासाठी मिळेल ते काम मिळेल ती मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा आई वडील बहीण भाऊ यांचा संभाळ करणारी मुलं सुध्दा आज आपल्या समाजात एक आदर्श घेण्यासारखे काम करणारे आहेत गरज आहे आपणं त्यांच्या अंगातील गुणवत्ता पारखणयाची पण ती आपली मानसिकता नाही. उंडगी उणाड मुल यांची लग्न झाली काही मुलींनी पळून जाऊन लग्न केली पण खरोखरच आदर्श आणि कष्टाळू मुलाची लग्न झालीच नाहीत त्यांना मुलींचे पालक विचारतात पोरगं काय करतंय काय भयानक प्रकार आहे बघा . मुलीला काय पाहिजे आई वडील यांच्यासारखे सासू सासरे. लाड पुरविणारा नवरा. दोन वेळ कष्टाची मिळवलेली पोटभर भाकरी. डोक्यावर सवताच हक्काचं साधं का होईना पण छप्पर. अंगाला अंगभर कपडे. समाजात आणि घरांत मानसन्मान . पैसा संपत्ती काही बरोबर जाणार नाही एवढं असलतरी बास . जगायला आणि आनंदी राहायला यापेक्षा काय वेगळ पाहिजे. पाहिजे ती आपली मनाची शांतता आणि माणूस पारखणयाची शक्ति ती देवाने प्रत्येकात दिलेली आहे .
            वधू-वर सूचक या सर्व प्रकारांचा पुरेपूर फायदा उचलणारे एक मोठ षडयंत्र आहे ज्या मुलांची . मुलींची लग्न जमतं नाहीत ते या वधू-वर सूचक केंद्राच्या जाळ्यात सापडतात आणि हजारों रूपये भरून फसतात . वधू-वर सूचक वाले मुलाला मुलगी दाखविण्यासाठी पर मुलगी असा चार्ज लावत आहेत. जेवण ‌ येण जाण . राहणे. हा सर्व खर्च मुलांचे पालक यांच्या डोक्यावर असतो . पैसा घालून पुरते बेजार होतात मुला मुलींचे पालक आणि हा सर्व प्रकार बघून मुलांना भलताच मानसिक त्रास होतो आणि मुल मुली लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकतात .
              वधू-वर सूचक केंद्र सर्वजण काही फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याच्या हेतूने काम करतं नाहीत काही ठिकाणी असं सुद्धा माझ्या पाहण्यात आल आहे काही वधू-वर सूचक केंद्रातील मंडळी फक्त जनसेवा म्हणून मुला मुलीची लग्न मोफत जमवतात व वेळ पडल्यास मोफत सामुहिक विवाह सुध्दा करून देतात पण असे लोक आणि वधू-वर सूचक केंद्र वाले कमी आहेत असे सर्वजण वागले तर कोणताही मुलींचा पालक पोरगं काय करतंय म्हणून विचारणार नाही आणि सर्वजण आपल्या आपल्या जोडीदाराच्या सोबत एक आनंदी जीवन जगातील 
                     विचार करा जीवन बदलेल. 
   बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

रक्तवाहिन्या मृत्यू सापळा

 

** रक्तवाहिन्या मृत्यू सापळा **

           आपल्या गावाचा तालुक्याचा राज्य देश याचा विकास कशापासून होत असेल तर तो आपल्या शरिरात हजारों अशा रक्तवाहिन्या असतात तसेच आपल्या आजूबाजूला असणारे रस्ते हे सुद्धा रक्तवाहिन्या प्रमाणे काम करतात. 

        पुर्वी गावातून तालुका शहरं याकडे ये जा करण्यासाठी लोक पाऊलवाट याचा उपयोग करत होते . त्यानंतर थोडा काळ आणि वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन लोकांनी बैलगाडी साठी रस्ता तयार झाला आणि थोड्या प्रमाणात लोकांचे ये जा शेतमाल आणणे यासाठी लोकांना सुखकर झाले . अजून बदल होत गेला लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि कच्चे असणारे रस्ते शासनाकडून पक्के डांबरी करण्यात आले. आणि दोन चाकी गाड्यांचे प्रमाण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे वाढले. रस्ते रहदारी वाढली आणि हळूहळू हळूहळू चारचाकी गाड्या सुध्दा वाढल्या लोकांचा शहराकडे लोंढा वाढला. त्यामुळे वाहतूक वाढली . औद्योगिक क्षेत्रात विकास झाला. गावांचे रुपांतर शहरांत झाले. त्याचबरोबर सर्वांत मोठा अभिशाप असणारा लोकसंख्या भस्मासुर झपाट्याने वाढला लोकांच्या कडे पैसा वाढला गाडया वाढल्या आणि विकासासाठी गरजेचे असणारी रक्तवाहिनी आत्ता लोकांच्या मृत्यूचे कारणं होण्यास सुरुवात झाली. रांत्र दिवस सुरू असणारी शहरें रात्रभर सुरू असणारी वाहतूक यामुळे लोकांचे जीवन अपघातात बदलले. रस्ते सिमेंट क्रांक्रेटचे झाले . पाऊलवाट. गाडीरस्ता. दोन पदरी रस्ता. चारपदरी रस्ता. सहापदरी रस्ता. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ तयार झाले. यामुळे  गाड्यांना वार्याची गती आली रस्त्यावर वाहनांची गर्दि झाली. अपघात रोखण्यासाठी शासन विविध कडक नियम करत आहे. कोणत्या वयात गाडी चालविणे गरजेचे आहे. तुमच्या वाहनांचे सपिड किती असायला हव. कोणत्या अपघातासाठी कोणती शिक्षा असायला हवी. गाडीचा विमा. वाहतूक नियम. आपण कधी पाळतो कां. अशा बेजबाबदार लोकांच्या मुळ आज फुटपाथवरून चालणारे. शाळकरी मुले. सकाळी फिरायला जाणारे यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

      आपला जिल्हा सांगली जिल्हा आम्ही २०२१ मध्ये आम्ही केलेला रस्ते अपघातांचा सर्वे त्यानुसार सांगली जिल्ह्यातील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या ची संख्या प्रतिवर्षी वाढतच चालली आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत.आपला बेजबाबदार पणा कारणीभूत आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी स्वार आणि सकाळी फिरायला जाणारे मोकळ्या हवेत फिरणारे फुटपाथवरून चालणारे यांचा नंबर लागतो. म्हणजे रस्त्यावरून चालणे मुलांचे शाळेला काॅलेज विद्यालय महाविद्यालय जाणे तितकेच धोक्याचे झाले आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वे अहवालानुसार फुटपाथवरून चालण्याच्या अपघातांचे प्रमाण यांच्या ४५ घटना नोंदविल्या होत्या. वाहनांच्या पध्दतीनुसार अपघातांत ६० घटना. दुचाकीस्वार यांच्या मृत्यूच्या तर १६ टक्के पादचारी यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात २०२० मध्ये ५८८ विविध अपघात झाले. त्यात २७९ जण जागीच मयत झाले. २०१८/२०१९ मध्येही सांगली जिल्ह्यात फुटपाथ वरून चालणारे व पादचारी लोक यांच्या मृत्युच्या घटना बर्याच घडल्या लोकांनी रस्त्यावरून चालताना फुटपाथवरून चालतांना काळजी घेण गरजेचे आहे. 

      शहरांमध्ये कोणत्याही रस्त्यावर फुटपाथ शिल्लक नाही त्यामुळे धोका पत्करून नागरिक. विद्यार्थी.यांन रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या शहरांत भयानक वाढली आहे. 

     शहरातील सकाळी मोकळी हवा घेण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी बगिचे . मैदानावर फिरणं शरिराला लाभदायक असते. पण आज शहरातील मैदानावर आरक्षण पडली आणि मैदान संपली त्यामुळे सकाळी फिरणारे लोक यांना आज फुल्ल वाहतूक असणार्या रस्त्यावर फिरावे लागत आहे म्हणजे यामुळे सुध्दा बर्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शहरातील काही रस्त्यांच्या बाजूला फुटपाथ आहेत पण त्यावर दुकानदार यांनी अतिक्रमण केले यामुळे रस्ते लहान झाले. त्यातच फळें फुले भाजीपाला विक्री करणारे विविध वस्तू विकणारे यांनी फुटपाथवर कब्जा केल्यामुळे आज लोकांना चालण्यास सुध्दा अवघड झाले आहे. 

      २०२० चया अहवालानुसार सांगली व आसपासच्या ठिकाणी झालेले अपघात. यामध्ये . मृत्यू  जानेवारी मध्ये ३०. फेब्रुवारी मध्ये ४३. मार्च मध्ये १८. एप्रिल मध्ये १०. मे २५. जून १७. जुलै ११. आॅगसट १७. सप्टेंबर १३. आकटोंबर २३. नोव्हेंबर २१. डिसेंबर ३२ अशा प्रमाणात जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले व त्यात फुटपाथवरुन चालणारे यांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. 

          वाहतूक नियम पाळा. वाहन हळू चालवा. वाहन चालविताना दारु तंबाखू नशेच्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नका. अपघातग्रस्त लोकांना मदत करा. हे सर्व कागदावरच नको

      बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९

आमचं वजन कमी पडलं काय

 

* * आमचं वजन कमी पडलं काय ** 

                    सर्वांना हक्काचे आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. लहान वयातच मुलांना शाळेची ओढ शिक्षणाची आवड लागावी यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ०/६ वयोगटातील मुलांच्या साठी अंगणवाडी ही संकल्पना शासनाने अमलात आणली. अंगणवाडी मुळे लहान मुलांची आई वडील मजूर गरिबी असल्यामुळे मुलांना चांगले सकस अन्न देण्यास असमर्थ असल्यामुळे कुपोषण सारखी समस्या आपणास भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने अंगणवाडी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना सकस खाऊ दुध वाटप मुलांचीही अंत्यंत व्यवस्थित संगोपन करण्याचे काम अंगणवाडी माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असतात. आजची मुलं आपल्या देशांचे उद्याचे भविष्य आहे. डॉ वकील इंजिनिअर क्लास वन अधिकारी. वैधानिक. शास्त्रज्ञ. हे यात नसतील कशावरून आपणांस याचा विचार करणं गरजेचं आहे. 

          सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे गाव त्या इस्लामपूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सलग पाच वर्षे पत्रव्यवहार करत असलेलें बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे हे याच परिसरात रहिवासी आहेत. या परिसरात कर्तव्य शिल नगरसेवक आहेत. या उपनगराला राजेबागेसवारनगर असं नाव आहे. यामध्ये जवळपास १००० पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास आहेत.या संख्येच्या तुलनेत यामध्ये जवळपास मजूरी करणारे. एम आय डी सी कामगार. मिळेल ते काम करणारे कामगार. या परिसरात रहिवासी आहेत. मग आई वडील दिवसभर पोटाच्या माग गेल्यावर त्याची ०/६ वयोगटातील मुल दिवसभर उन्हात फिरणार. या परिसरापासून अंतरावर असणारी अंगणवाडी जाण्यासाठी हम रस्ता ओलांडून जावे लागत आहे त्यामुळे मुलांना येणे जाणे करणे व पालकांना सुध्दा ते त्रासाचं होणार आहे याचे कारण आहे ते म्हणजे या परिसरात अंगणवाडी नाही . सर्व शिक्षा अभियान व ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचविणे धोरणानुसार सर्वांना शिक्षण मिळावे या उद्देशाने या परिसरात अंगणवाडी ची गरज निर्माण झाली आहे. सवता परिसरात फिरून या परिसरातील लोकांची समक्ष भेट घेऊन व आपणांस अंगणवाडी कशासाठी पाहिजे हे समाजावून सांगून जवळपास १३४ कुटुंबाच्या सह्या घेतल्या आणि पहिलें निवेदन १५/७/२०१७ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर चे मुख्य अधिकारी यांना दिले. दुसरे अंगणवाडी मागणी निवेदन १५/७/२०१७ रोजी मा इस्लामपूर नगरपरिषद नगर अध्यक्ष सो यांना दिले. तिसरे अंगणवाडी मागणी निवेदन १३/७/२०१७ रोजी मा समिती सदस्य कला क्रिडा शिक्षण सांस्कृतिक समिती सदस्य इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर. १३/७/२०१७ रोजी अंगणवाडी मागणी निवेदन मा सभापती सो कला क्रीडा शिक्षण सांस्कृतिक समिती इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर. २०/७/२०१७ रोजी अंगणवाडी मागणी निवेदन मा उपनगराध्यक्ष इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर

. १८/७/२०१७ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांचेकडून जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी नागरि विभाग सांगली यांना सुध्दा पत्रव्यवहार करण्यात आला होता. वेळोवेळी स्मरण पत्र इस्लामपूर नगरपरिषद यांना अहमद मुंडे यांनी दाखल केली होती . 

      सांगली जिल्हा पालकमंत्री यांनी प्रत्येक प्रभागात अंगणवाडी असा एक अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला मला बर वाटल पाच वर्षांपासून अडकून पडलेला अंगणवाडी प्रस्ताव व राजेबागेसवार प्रभाव क्रमांक १ मधील लोकांच्या मागणीला आत्ता न्याय मिळणारं असं वाटलं म्हणून ४/५/२०२२ रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांना सवता भेटून अहमद मुंडे यांनी निवेदन दिले. आमच्या निवेदनाचा विचार व दखल घेऊन मंत्री महोदय यांनी दिनांक ७/५/२०२२ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांच्या नांवे खालील मजकूर असलेलं पत्र जारी केलं त्यामध्ये इस्लामपूर प्रभाग १ मधील राजेबागेसवार नगरमध्ये नवीन अंगणवाडी मंजूर करण्याबाबत बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचा दिनांक ४/५/२०२२ रोजीचा अर्ज विचारात घेऊन व सोबत जोडलेल्या निवेदन यावरुन रोजंदारी कामगारांच्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने इस्लामपूर राजेबागेसवार नगरमध्ये नवीन अंगणवाडी सुरू व्हावी अशी विनंती सदर परीसरातील नागरिकांची आहे.तरि याबाबत आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही तात्काळ व्हावी असं पत्र मंत्री महोदय यांनी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांना केली होती . 

      इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांच्या कडे हे पत्र १०/५/२०२२ रोजी आवक जावक खात्यातून देण्यात आले आहे. ज्यांना पाच वर्षांत जे झालं नाही आमची पाच वर्षांचा पत्रव्यवहार केराच्या टोपलीत टाकला असावा कारण नगरपरिषद इस्लामपूर नगरपरिषद कडून आजपर्यंत साधी चौकशी सुध्दा करण्यात आली नाही म्हणून आम्ही पालकमंत्री व मंत्री महोदय यांचा आसरा घेतला पण आज सुध्दा तशीच परिस्थिती आहे. कोणालाही पत्रव्यवहाराचे गांभीर्य नाही साधी चौकशी नाही अशी पत्र येतात किती आणि आम्ही केरात टाकतो किती हा तर सर्वसामान्य लोकाचा जाणूनबुजून केलेला अपमान आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इस्लामपूर सारख्या शहरात जागेचे दर असमानाला ठेकले आहेत. त्यातच जर एकादी व्यक्ती समाजसेवा म्हणून अंगणवाडी सारख्या उपक्रमास जागा देण्यास तयार झाल्यास त्या व्यक्तिच्या पायात हस्तांतर नावांचा भला मोठा साप सोडला जातो. म्हणजे जागा देणारा सुध्दा पाय माग घेतो हे कीतपत योग्य आहे मलातरी कळतं नाही तुम्हाला कळतंय का बघा 

     बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

** वाचाल तर वाचाल**भाग २

 

** वाचाल तर वाचाल**

भाग २ 

              मागील भागात आपण वाचाल तर वाचाल याबाबत थोडी माहिती घेतली . आपणं रोजच्या जीवनात विविध कारणांसाठी विविध ठिकाणी प्रवास करत असतो. आपणांस जर शिक्षण नसेल आणि आपणं एखाद्या गावाला निघालो तर आपणास एस टी चा बोर्ड वाचायला यायला हवा नाहीतर आपणं निघालो एकीकडे आणि जाणार एकीकडे हे खरंच आहे. म्हणजे वाचण्याचे आणि शिक्षणाचे महत्व आपणांस कळेल. विविध ठिकाणी विविध कारणांसाठी आपणांस सही अगंठा करावाच लागतो. आणि मग आपणं जर विना वाचता जर सही अगंठा केला तर आपल मोठ नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. घरपट्टी पाणीपट्टी.लाईटबील चेक वरील रक्कम. पोलिस स्टेशनस मधील दाखल एफ आय आर. गल्ली बोळातील रस्ते. गावाची नाव. हे सर्व आपणांस वाचता आल पाहिजे. 

      माणूस आहे म्हणजे आजार आहे आजारी पडणार आहे. दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद आहे कां. दवाखान्यात स्वच्छता आहे कां. दवाखान्यात कोणकोणत्या योजना राबविल्या जातात. उपचार पध्दती निवडण्याचा हक्क आपणांस आहे कां. डॉ पेशंट वर काय उपचार करतात. औषधांचे दर. उपचार दरपत्रक.   मेडीकल वाले औषधांचे दर अवाच्या सव्वा लावता आहेत कां. या सर्व गोष्टी दवाखान्यात रुग्णांच्या सनदेनुसार लावल्या आहेत कां असतील तरी तुम्हाला वाचायला आल तरच कळणार आहे की आपलं हीत कशात आहे.

          रेशन दुकान मध्ये आपणं जातो रेशन घेण्यासाठी मग आपल्या गावात अंत्योदय बी पी एल शुभ्र शिधापत्रिका धारक संख्या किती . महिन्याला रेशन अन्न धान्य येते किती वाटप केलं जाते कां. युनिट नुसार वाटप होत कां . रेशन दुकानात तक्रार बुक आहे कां. रेशन दुकान आपल्या गावात किती. हे सर्व आपणांस वाचल्याशिवाय कळणार नाही त्यासाठी आपणांस पुरवठा विभागाची नागरि सनद वाचणे गरजेचे आहे. म्हणूनच मी म्हणतो वाचाल तरच वाचाल

         वृतमानपत्र. कथा. कांदबरी. आत्मचरित्र. कहाणी. किस्से. नैसर्गिक माहिती सांगणारी पुस्तके. वैद्यकीय माहिती सांगणारी पुस्तके. खगोलशास्त्र पुस्तक. शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी उपयोगी सर्व पुस्तकं. आपणांस बरेच ज्ञान देणारी असतांत आपणास दैनंदिन या पुस्तकाचे वाचणं केल्यास आपल्या ज्ञानात अनमोल अशी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाचा पहिला गुरू आहे ते म्हणजे पुस्तक. रामायण. महाभारत. बायबल. कुराण. भगवतगीता. असे अन्य धर्मग्रंथ आपणांस दैनंदिन जीवनात कस वागाव पाप काय पुण्य काय यांची जाणीव अनुभव परिणाम सांगणारी अनमोल पुस्तक आहे त्यांचे वाचणं करणं गरजेचं आहे. पुस्तक बंद ठेऊ नका असं जुनी लोक सांगतात कारणं पुस्तकाचे रोज एकतरी पान उघडले वाचले पाहिजे नाहीतर थांबलेल्या पाण्याप्रमाणे पुस्तकातील ज्ञान खराब होणार यामुळे पुस्तक वाचाल तरच तुम्ही वाचाल हे खरंच आहे. 

          नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आपल्या प्रभागात उमेदवार कोण. त्यांचे काम काय. त्यांचे नाव काय. तो कोणत्या पक्षाचा आहे. तयाचे निवडणूक चिन्ह काय आणि कोणत. हे तरी कमीतकमी आपणांस वाचता आल पाहिजे. त्याचा निवडणूक जाहिरनामा काय आहे. गावातील विकासातील त्याचे प्रयत्न किती आणि कोणत हे सर्व आपणांस वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणूनचं म्हणतो की वाचाल तरच वाचाल 

        माहिती अधिकार विविध आर्थिक विकास महामंडळ यांचीही पुस्तक आपल्या वाचणात असणं गरजेचं आहे . त्याशिवाय आपणांस शासकीय निमशासकीय योजनांची माहिती उपलब्ध होणार नाही. शासकीय अधिकारी कर्मचारी यांची कामचोरी आपणांस कळणार नाही . यासाठी वाचणं अंत्यंत गरजेचे आहे. 

         आपल्या गावात ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद. तहसिलदार कार्यालय. महसूल विभाग.पुरवठा विभाग. पेन्शन योजना.  स्टॅम्प घोटाळा. दस्त नोंदणी घोटाळा. विविध कामांसाठी मागितली जाणारी लाच . अशा सर्व विभागांत विकास जनसेवा नावाखाली चालणारा भ्रष्टाचार आपणांस कळण्यासाठी आपणं सदर आॅफिस मध्ये जाण गरजेचे आहे. या सर्व प्रकार बंद करण्यासाठी वाचणं करणं गरजेचं आहे . म्हणूनच म्हणतो की वाचाल तर आपला वेळ आणि पैसा वाचवू शकाल

        महिला घरेलु अत्याचार. सामाजिक मानसिक अत्याचार. छेडछाड कायदा. सर्व महिला संरक्षण देण्यासाठी असणारे विविध कायदे याची माहिती आपणास असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल वाचणं असणं गरजेचं आहे 

         बालकामगार बंदी म्हणणे सोप आहे पण आज  वडापाव. चायनीज. दाबेली. खाणावळ. हाॅटेल. फळे फुले भाजीपाला विक्री. बांधकाम क्षेत्रात. विट भट्टी. स्टोन क्रशर. गाडी धुणे. बुट पाॅलिश . अशा विविध ठिकाणी आजही बालकामगार या़चा सर्रास वापर केला जातो.बालकामगार यांची बालमजुरी बंद व्हावी आणि मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध कडक कायदे केले आहेत पण आपणांस ते कळणार नाहीत कारणं आपलं वाचणं नाही. म्हणूनच मी म्हणतो की वाचाल तरच वाचाल 

          गाव गल्ली तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जशी स्मशानभूमी आहे. समाजमंदिर आहे. विविध शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. मंदिर आहे. मस्जिद आहे. बॅंक पतसंस्था आहे. विविध गटातील नेते आमदार खासदार मंत्री आहेत. सर्व विकास योजना आहेत. भ्रष्टाचार आहे. असे विविध मुद्दे आज विनीकारण जागा अडवून उभे आहेत. पण आज सर्वात मोठी हाणी आहे ती म्हणजे  ** वाचणालय नाही ** आहे ती वाचणालय आज भकास पडली आहेत. आजची तरुण पिढी पान मावा सिगारेट गुटखा खाऊन चौकात राजकारण मुलींचे विषय काढून आज आपल्या जीवनातील क्षण वाया घालवत आहेत पण गावातील वाचनालयात एकही तरूण येत नाही. आजची तरुण पिढी मोबाईल मुळ बाद झाली आहे. यांना सावरण्यासाठी आज ग्रंथालयांची नितांत गरज आहे. शासनाने एक आदेश काढण्याची गरज आहे गाव गल्ली तिथं वाचणालय असणं अनिवार्य आहे नसेल तर त्या गावात निवडणूक बंदी करण्यात यावी 

         आज ग्रंथालयांना गळती लागली आहे. आणि गावात राज्यात देशात चप्पल बुट आज शोरूममध्ये आहेत. काय शोकांतिका आहे. वाईट आहे म्हणजे ज्यांना डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं ते आज रस्त्यावर आहेत. ज्यांना पायात चालायचे त्यांना आज शोरूममध्ये जागा मिळाली जरा विचार करा. नाहीतर  चांगले विचार चांगले व्यक्ती जीवंत राहणार नाहीत

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

धर्माचे मनमानी ठेकेदार

 

** धर्माचे मनमानी ठेकेदार **

                        भारतात अठरा पगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि होतें . जमात म्हणजे विशिष्ट जातीचे समुह असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे. समुहाने राहणे ही त्यांची गरजच आहे. लोकांना एकामेकांच्या सुखात दुःखात निस्वार्थी पणाने भाग घेता यावा म्हणून आज विशिष्ट जमातीच्या समुहाला  जमात असं म्हणलं जातं. सणसुद. विविध देवी देवतांची यात्रा. धार्मिक सामाजिक कार्यक्रम. लग्न. विविध दहन दफन विधी करण्यासाठी जमातींची गरज लागते. यामुळे आज विविध धर्मांच्या  धर्म गुरू. मुल्ला मौलवी. यांनी आज जमातींचे भांडवल केले आहे. आपला समाजावर एक प्रकारची वेगळी छाप आणि दबाव विविध धर्माबाबत समजुती लोकांच्या मनात भरवून लोकांना आपले गुलाम केले आहे .

        महाभारत.रामायण . बायबल. कुराण. भगवतगीता. असे विविध ग्रंथ आज लोकांना चांगले वाईट विचार आचार त्यापासून होणारें फायदे तोटे. पाप पुण्य या मार्गाने समजवून सांगत आहेत. कोणताही धर्मग्रंथ समाजात तेढ पैदा करा असं शिकवत नाही. सर्वांना आपल्या आपल्या धर्मानुसार आचरण करून जगण्याचा अधिकार आहे. सर्व धर्मग्रंथ मध्ये धर्माची शिकवण एकच आहे. व्याज घेणे. वाळीत टाकणे. भूचोरी करणे. अत्याचार करणे. गुलाम बनविणे. महिला अपमान. बालहत्या. गोहत्या. एखाद्या बद्दल वाईट विचार करणे. एखाद्याला कमी लेखण. रक्त सांडून कधीही शांती मिळत नाही. घरदार संसार मुल बाळं सोडून धर्म प्रचार प्रसार करणारे यांना कधीही धर्माचा अर्थ कळत नाही. अशी एक नाही अनेक तत्वे विविध धर्म ग्रंथ आपणांस शिकवतात फक्त त्या त्या धर्माच्या चाकोरी प्रमाणे पण आज याचांचे भांडवल काही समाजांचे ठेकेदार विविध धर्मगुरू मुल्ला मौलवी करत आहेत आणि समाजातील लोकांत अनावश्यक विचार फैलावत आहेत त्यामुळे समाजाचीही शांती आज भंग पावत आहे. यामुळे समाजातील लोकांना धर्मग्रंथातील मुळ तंत्र शिकवन खरी तेवढीच लोकांपर्यंत पोहोचत नाही. 

                  मुस्लिम समाज मागासलेला आहे आणि पुढेही राहणार त्याला दुसरें कोणी कारणीभूत नाही तर आपल्या समाजातील झुबा. लांब दाढी. हातात  तसबी. अत्तर फाया. खाण्यास तुपातल. पण आशी वेशभूषा करणारे धर्मप्रसारक म्हणता येणार नाहीत. कारणं ज्यांनी मुस्लिम धर्माचा प्रसार केला त्यांना विविध अडचणी . मानहानी. उपासमार. कुटुंब त्याग. करावा लागला मग अशी वेशभूषा धारण करुन सोंग आणणारे  हेच मुल्ला आणि मौलवी हेच आहेत. कारणं आज मुसलमान एकच आहे पण त्यांच्या पोटजाती मोजता येणार नाही एवढ्या आहेत . त्यामुळे मुस्लिम समाजात सियया आणि सुन्नी अशा दोन जमाती तयार झाल्या कुराण एक कुराणाची शिकवण एक. मग आपल्या आपल्या सामाजिक दबासाठी मुस्लिम समाज दोन गटात विभागाणारे आपलेच मुल्ला आणि मौलवी आहेत हे आपणांस नाकारता येणार नाही. आज प्रत्येक गल्लीत एक मस्जिद आहे. आपला धर्म कोणता धर्माची शिकवण महती काय आहे धर्माची असथा   हे आपल्याला आपल्या मुलांना कळलं पाहिजे हे बरोबर आहे. पण आज गल्ली गल्लीत असणार्या मस्जिद मध्ये आज महिन्याला त्या परिसरातील लोकांकडून  एक विशिष्ट रक्कम देणगीच्या रुपात वसुल केली जाते कारणं काय असतं  त्या मस्जिदच लाईट बील. पाणीपट्टी. हाफिजी पगार. येणार्या जमाती यांच्या जेवणाचा खर्च . अशी फसवी कारणं सांगून आज सर्वत्र आर्थिक उकळणी सुरू त्या मस्जिद मध्ये त्याच परिसरातील एक व्यक्ती त्या मस्जिद मध्ये साप बनून बसलेला असतो आणि त्याच्या ईशारयावर सर्व मस्जिद आणि त्या परिसरातील लोकांचे दैनंदिन कामकाज अवलंबून असते. त्याच परिसरात एखादे गरिब कुटुंब. विधवा महिला . अशी सुध्दा कुटुंब असतांत त्याची समाजाची आर्थिक उकळणी देण्याची परस्थिती नसते. मग त्या परिसरातील काही मुस्लिम मुल्ला मौलवी त्या कुटुंबातील लोकांना वेठीस धरतात त्यांना तुमच्या घरातील लग्नात जमातीचे लोक येणार नाहीत. तुमच्यात मयत झाल्यास जमात येणार नाही. तुम्ही जर कोणत्याही मस्जिद मध्ये मुस्लिम आहे म्हणून पैसे भरत नसला तर तुम्हाला कब्रस्तानात गाडायला परवानगी नाही. हिंदू आपले दुश्मन आहेत. त्यांच्याबरोबर बोलू नका. त्यांच्या कोणत्याही कार्यात सहभागी होऊ नका. हे सर्व शिकविणारे कोण आहेत हेच जे आम्ही मुसलमान आहोत. असं महणारे मुल्ला आणि मौलवी हेच आहेत. कुराण मध्ये मुसलमान याचा अर्थ असा आहे ज्याचे इमान पाक आहे विचार पाक आहेत असा व्यक्ति म्हणजे मुसलमान होय .  म्हणजे हे स्वताला अल्लाह समजतात काय?  कुराणाची शिकवण ही नाही. राजकारणी लोकांच्या खुटयाला सवता बांधलेले आणि मुस्लिम समाजांचे एक गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी  राजकारणी लोकांनी पाळलेले समाजातील पांढरे गुंड हेच मुल्ला आणि मौलवी आहेत . जमात मुस्लिम समाजातील लोकांना इस्लाम समजावा यासाठी ठराविक दिवस अल्लाह चया रस्त्यावर चला हे आम्हाला मान्य आहे . पण आपणांस जमातीत चला म्हणून सांगणारे यांची मुल उच्च शिक्षण घेतात त्यांना मसझिदचा वास तरी असतो का?  नाही म्हणजे आपली मुल बाद करायचा विढाच यांनी उचलला आहे असं माझ मत आहे. जमातींत घरचा कर्ता माणूस गेला तर त्या घरातील महिला मुल घरभाडे लाईट बील. किराणा. पाणीपट्टी. कोणाच्या घरात काय अडचणी आहेत. कोणाच्या मुलांना नोकरी नाही . कोणाच्या मुलींचे लग्न जमतं नाही. आसपासचे लोक टार्गेट करुन आपल्या धर्मातील लोकांना त्रास देत आहेत कां. आपल्या समाजात बॅका पतसंस्था यांच्या कर्जात कोण आहे कां.  कोणी वैद्यकीय अडचणीत आहे कां .  कोण शैक्षणिक अडचणीत आहे कां . कोणाचे रेशन. पेन्शन. असं काही प्रश्न आहेत कां  असे विविध जीवनावश्यक  प्रश्न यांची आपणं समाजातील नागरिक म्हणून चौकशी करत नाही  . मग  जमातींत चला महणाणारे मुल्ला मौलवी करणारं कां? मुस्लिम धर्म सांगतो कोणीही कधीही उपाशी राहू नये. मग जमातींत जाण्यापेक्षा घरी आपला काम धंदा करत अल्लाह अल्लाह केल तर अल्लाह आपल्याला भेटणार नाही कां? कशासाठी जमात मस्जिद पाहिजे. कुराण नमाजपठण गरजेचे आहे पण सर्व संभाळून असं धर्मग्रंथात सांगितलं आहे 

          मुल्ला मौलवी यांनी जमातींत चला म्हणून लोकांना एकत्र आणतात मग तेच मुल्ला मौलवी धर्माची शिकवण देताना मुस्लिम समाजातील मुलांना समाजाच्या विविध योजनांची माहिती आर्थिक विकास महामंडळ माहिती का सांगत नाहीत. आपल्यासाठी शासन काय करत हे सुध्दा सांगितलं जात नाही. आपल्याला नेताचा आपला मायबाप आहे असं शिकविणारे दुसरें तिसरे कोण नाहीत हेच मुल्ला आणि मौलवी आहेत. लग्नाचे कार्यालय मंजूर केले जात पण आपल्या मुलांसाठी नोकरी मिळेल असा कोणताही उपक्रम राबविला जात नाही म्हणजे नोकरी नाही कोण मुलगीच देणारं नाही मग त्या लग्नाच्या कार्यालयाचा उपयोग काय. मुलांसाठी विविध स्पर्धा परिक्षा वर्ग मोफत साठी कोण प्रयत्न करत नाही. मुस्लिम समाजाला व्यवहारात आरक्षण नाही आर्थिक विकास महामंडळाला निधी नाही. त्यामुळे आज मुस्लिम समाजातील मुल. भंगार दुकान. चिकन मटण दुकाने. गाड्यांचे व्यवहार. गॅरेज. गवंडी मजूरी. आणि नेत्यांच्या बगलबच्चे यांच्या दुकानात काम करत आहेत. आज सर्वात गंभीर बाब आहे ती म्हणजे मी पाहिले आहे की बाजारपेठेत. विविध दुकानांत काखेत मुल घेऊन आणि बुरखा पांघरून भिक मागणारया महिला आज दिसतं आहेत पण आपणांस काहीच वाटत नाही. यासाठी कारणीभूत आहेत आपल्याला फक्त आणि फक्त अल्लाह अल्लाह करायला सांगणारे मुल्ला आणि मौलवी हेच जबाबदार आहेत. कारणं यांनी कधीही समाज साक्षर केला नाही होऊ दिला नाही.  मुस्लिम मतांमध्ये एवढी मोठी ताकद आहे की सरकार उलथापालथ करण्याऐवढी पण आमची ताकद आम्हाला कळलीच नाही. ज्यांना कळली ते चोर नेते आमदार खासदार मंत्री झाले आणि आपणं जिथ होतों तिथंच राहीलो याला कोण जबाबदार आहे विचार करा.

    माझं लिखाण एक धर्म टार्गेट करुन नाही.  प्रत्येक धर्मात चालिरीती परंपरा. शिकवन तत्व विचार आचार. त्या त्या धर्मातील गुरु यांनी आपले व आपल्या कुटुंबांचे पोट भरावे यासाठी पिढ्यांन पिढ्या लोकांना देवाचं आणि धर्माची भिती घालून चालवत आले आहेत म्हणजे हे केलंच पाहिजे नाहीतर देवांचा कोप होईल. समाजात राहायचं असेल तर समाजाच्या मनमानी नियमांचे पालन केले पाहिजे. समाज देईल ती शिक्षा आपण काहीच गुन्हा केला नसेल तरी सोसणे गरजेचे आहे.

  बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

** वाचाल तर वाचाल** भाग १



** वाचाल तर वाचाल ** 

भाग १

              आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असा असणारा सर्वात महत्वाचा शब्द आहे आपणांस शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी वाचणं गरजेचे आहे. शिक्षणाच महत्व. धर्माचे ज्ञान. वैद्यकीय माहिती. आर्थिक अनुभव. समाजातील माहिती. शासकीय निमशासकीय योजना माहिती. दैनंदिन जीवनात वागण्यासाठी. महिलांना आदर सन्मान. बालमजुरी बंदी. बांधकाम कामगार योजना. अशा विविध कामांची योजनांची चालीरीती यांची माहिती देण्यासाठी आपणांस अभ्यास वाचणं करणं गरजेचं आहे

            धार्मिक ज्ञान धर्माची शिकवण आचरण आपणांस कळण्यासाठी आपल्या रुषि मुनी यांनी महाभारत.रामायण . बायबल. कुराण. असे विविध धर्माची शिकवण सांगणारं ग्रंथ लिहून ठेवले आहेत. पण आपणांस यांचं ज्ञान तेंव्हाच येणार जेव्हा आपण ते ग्रंथ वाचणार त्याशिवाय आपला धर्म काय सांगतो.काय शिकवणं देतो. कस वागल पाहिजे. आपले चरित्र कसं असावं. हे कळण्यासाठी आपणांस वाचणं करण्याची गरज आहे. आपणांस ज्ञान देणारे अनमोल ठेवा बंद पेटीत ठेऊ नका तयाला आपल्या डोक्याच्या पेटीत ठेऊन समाजासाठी स्वताच्या कुटुंबासाठी चांगल्या प्रकारे कसा वापरता येईल हे पाहणे गरजेचे आहे म्हणूनच आपणांस वाचणं करणं गरजेचं आहे

     लहाणपणापासूनच आपणांस एकसारखं उभा एक आडवे दोन म्हणयासाठी रटा लावला जातो तेव्हाच आपणं वाचण्यास शिकतो. त्यानंतर शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च शिक्षण विद्यालय. शिक्षकांच्या बद्दल आदर सन्मान भावना आपणांस वाचल्याशिवाय कळतं नाही. शाळेतील गणवेश.शाळेची माहीती. विविध अभ्यासक्रम विविध विषयांवर आधारित लिखाण. आपणास पुस्तकात आढळत पण वाचलं तर पाहिजे आपणं. आणि आपली ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यामधील योजना . निवडणूक प्रक्रिया. मतदानासाठी वापरले जाणारे नियम. मतदानासाठी दहशतवाद. गुंडगिरी. टोळीयुद्ध. धमकी. अस सर्व आपणांस वाचल्याशिवाय कळणार नाही. गावातील शहरातील झोपडपट्टीत राहणारे लोक. अन्नासाठी उपाशी राहणारे लोक. भिक मागणारी मुल. महिलांवरील सामाजिक.घरेलू अत्याचार . खुन मारामाऱ्या. अपहरण . कोणता धंदा वैध कोणता अवैध . हे सर्व कळण्यासाठी 

आपणास वाचणं करण्याची गरज आहे 

     बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कहा गया परदेसी?

 

** कहा गया परदेसी?**

          भारतीय संस्कृतीत आपणं येणारे पाहुणे यांना ** अतिथी देवो भव * असा दर्जा देतो मग तो आपणांस त्रास दुःख देणारा असेल तरी आपण त्याचे स्वागतच करतो . यांचेच उदा म्हणजे सुरवातीला आपल्यावर मोघल साम्राज्य यानी जवळपास आपल्यावर २५० वर्ष राज्य केलं आणि त्यांनी आपल्याला व आपल्या जनतेला दुःखच दिलें. त्यानंतर केप आॅफ गुड होप महणारा पहिला खलाशी वास्को द गामा यांने इंडिया गेट मार्गाने भारतात प्रवेश केला आणि आपला भारत आपणास कळला नाही पण परदेशी यांना तो * सोन्याची चिडिया* असणारा भारत एकाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन दुसर्याच्या गुलामगिरी जवळपास १५० वर्ष अडकला आपल्या देशातील मसाले कापूस याची निर्यात परदेशात होण्यास सुरुवात झाली. आणि त्याच मालापासून तयार होणारा पक्का माल भारतात विकला जात असे त्यामुळे आपला सर्व पैसा परदेशात जाण्यास सुरुवात झाली. आणि आपण व आपला देश जनता गरिब होती ती आणखी गरिब झाली. * फोडा आणि राज्य करा* हा फंडा कामी आला कारणं आपल्यातले काहीजण यांना सामिल झाले . आणि आपणांस पुरेपूर लुटण्याचा फार मोठा षडयंत्र तयार करण्यात आले. त्यावेळी आपल्याला राज्य करता यावे यासाठी इंग्रजांनी पाटील. कुलकर्णी. राजेशाही. सरंजामशाही. यांना फक्त गावातील कर वसुली करण्यासाठी पद दिली . आज इंग्रज गेले पण त्या पदाचा आजसुद्धा आपल्यावर राज्य करण्यासाठी वापर केला जात आहे म्हणजे आपणं आजही नेते पुढारी खासदार आमदार मंत्री शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या गुलामगिरी मध्येच आहे हे खोट नाही . शैक्षणिक. वैद्यकीय. सामाजिक. आर्थिक. अश्या लुटिला आजही आपणास सामोरे जावे लागत आहे. 

              असाच एक व्हायरस जो जनावरांच्या मटनापासून. हवेतून परदेशी २२/२३ मार्च २०२० ला आपल्या भारतात दाखल झाला त्याचे नाव होतं ** कोरोना ** आणि मग लोकांचं म्हणणं परदेशातून आपल्या भारतात हा परदेशी इतर देशांनी अनविक युद्ध करण्यासाठी पाठवून दिला आहे. प्रत्येक देशांनी आपली जनता जगविण्यासाठी वाडया. वस्त्या. तालुका. जिल्हा. राज्य. देश. गल्ली.बोळ. सर्वकाही टाळेबंदी केली. लोकांचे फिरणं बोलणं. भेटणं. सर्वकाही बंद केलं. जीवनावश्यक वस्तू वर बंदी. लग्न. बारस. जावळ. मुंजी. वाढदिवस. सभा. मिटींगा. असं विविध कार्यक्रम अनाठायी खर्च करणारे सर्वकाही बंद पडले . लोकांना माणुसकी काय असतें. लोकांना. संकटकाळी काय मदत करावी याचे ज्ञान आपले कर्तव्य याची जाणीव करुन देणारा परदेशी आला होता. लोक टाळेबंदी काळात घरातच अडकून पडली हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही. यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबातील लहान मोठे महतारे यांच्यावर उपासमारीची वेळ आली हा प्रसंग एवढा अवघड होता की काही लोकांनी आत्महत्या सारखे मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली आणि कुटुंब रस्त्यावर आले. यांवर आपण परदेशी पावहणया कडून शिकणं गरजेचे होत की माणूसकी महत्वाची आहे माणूस महत्वाचा आहे. 

          परदेशी आला आणि बाजार बंद. लग्न कार्यालय बंद. शासकीय निमशासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी बोगस कागदपत्रे दाखवून शासनाला लुटलं ते वेगळे. जत्रा यात्रा बंद. वाहतूक बंद. प्रवासी वाहतूक बंद. दवाखाने बंद. रेशन घोटाळा. जीवनावश्यक वस्तूंचे डबल दर. मास्क बंदी. हात वेळी धुण्याचा नियम . गाव बंद. हदधी बंद. म्हणजे कोरोना काळात लोकांच्या गरजेचा परिस्थितीच्या पुरेपूर काही लोकांनी फायदा उठवला आणि जनतेला मनमोकळ करून लुटलं. यावेळी खरोखरच जनतेला लुटलं असेल तर डॉक्टर लोकांनी तपासणी नाही निदान नाही हाडांच्या पेशंट ला ताप थंडी चे औषध औषधांचे दर डबल काही डॉ लोकांनी आपल्या ओपीडीला पैसा मिळविण्यासाठी कारखाना बनविले होते . 

          गावागावात कोरोना उपचारासाठी दवाखाने सज्ज झाले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोरगरिबांना कोरोना उपचार बजेट मध्ये व्हावा यासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे दिड लाख अनुदान देण्याचे जसं शासनाने फायनल केल. तसं कोरोना पेंशट मोठ्याप्रमाणात सापडायला लागलें . तपासणी केली असतां सर्वजणच काय पण पूर्ण कुटुंब सुध्दा यांनी बाधित काढली सकाळी उपचार घेणारा संध्याकाळी मयत असा माणसांचा वध करण्याचा कार्यक्रम लागला. स्मशानभूमी फुल्ल आहे असं भासवून लोकांच्या मनात परदेशी बद्दल दहशत निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले. स्मशानभूमी मध्ये दहनसाठी पैसे. कोरोना प्रेत अमबुलनस मधून आणण्यासाठी मनमानी पैसा उकळणे. नातेवाईक यांना रोगाने मयत व्यक्तींचे तोंडच काय पण कवा मेला कवा जाळला हे सुध्दा कळल नाही. रोगापेक्षा रोगाच्या दहशतीने लोकांचे प्राण घेतले. 

            २०२०/२०२१ मध्ये करोना काळात महागाई कमी होती. पेट्रोल डिझेल गॅस जीवनावश्यक वस्तू यांचें दर वाढले नाहीत. वाढ झाली पण ती सुद्धा प्रमाणात होती. लग्नाचा. वाढदिवस. मुंजी. बारस. सभा. मिठिंगा. पार्ट्या. दारु मटका. अतिषबाजी. लोकाची चैनी यांचा अनाठायी खर्च आत्ता जोरात सुरू आहे. लोक गेलेला काळ विसरले आपले सगेसोयरे परदेशी रोगाने मयत झाले हे सुद्धा विसरले. आणि आत्ता सर्व कार्यक्रमात अन्नाची हेळसांड करायला लागले. हात धुन गर्दि करणं आत्ता आणि कम्पल्सरी सुरू झाले राजकीय लोकानी या परदेशी रोगांचे भांडवल केलं. समाजातील काही दानशूर लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले ते तुमच्यासाठी नाही तर मतदानासाठी. काहीजणांनी जेवन घातली पण फोटो पहिल्यांदा काढलें. 

      म्हणजे आणखी एक वेळ परदेशी यावा असं मला वाटतं कारणं आज सुध्दा लोकांच्या कडे मुबलक पैसा आहे लोक अनाठायी खर्च करायला लागले. लोकांच्या मनातील भिती कमी झाली आहे

              २०२०/२०२१ मध्ये सर्वकाही बंद असल्यामुळे सर्वात मोठा आपणांस गोरगरीब लोकांना फटका बसला आहे तो म्हणजे बॅंक पतसंस्था खासगी सावकार. भिशी. यांची व्याजाने पोट फुगली आत्ता जनता जगेल असं वाटत नाही गोरगरिबांना आपल्या प्रापटया विकून ही सर्व कर्ज फेडावी लागणार आणि आत्ता सुद्धा राजकारणी लोक एक वेळ परदेशी याला बोलावून घेणार हे नक्की

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या