न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा

 

न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा

         पूर्वजांनी सर्वात महत्वाची शिकवण आपणांस दिली आहे. या शब्दकोशात सांगितले प्रमाणे आपणं लहान लहान गोष्टी कडे जास्त लक्ष देण्यामुळे मोठा संपत्तीचा. जीवाचा. शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक दहशतवाद नक्षलवाद जातीयवाद. समाजवाद साम्यवाद अशा विविध माध्यमातून सर्वात मोठा धोका आपण ओढावून घेतो 

            एक ज्वलंत उदाहरण देतो पूर्वी लोकसंख्या कमी होती जमीन मुबलक होती स्वच्छ निर्मळ पाणी स्वच्छ विचारसरणी असणारे लोक असा सर्व प्रकार होता. आज सर्वत्र उलट झाल आणि भयानक लोकसंख्या वाढली आणि जमीन कमी झाली. लोकांना रहाण्यासाठी जागा कमी पडायला लागली. जुन्या काळात साधी झोपडी सारखी घर होती नंतर माती कुंभारी कौलाची घर त्यांनंतर पत्रा आणि आत्ता प्रत्येक समाजासाठी विविध नावाच्या घरकुल योजनांमुळे पक्की आणि स्लॅब अशी कायम आणि पक्की घर तयार झाली. 

            बेरोजगारी जास्त होती त्यामुळे लोकांच्या हातात पैसा कमी होता. आत्ताच्या काळात रोजगार वाढला आणि लोकांना पुरेशे नाही पण थोडा जगण्या पुरता व थोड का होईना पैसा शिल्लक पडायला लागला. आणि सर्वत्र कमी जागेत मोठ मोठी अपार्टमेंट फ्लॅट खरेदी विक्री करण्यासाठी बांधण्यात आले आहे. लोक सुद्धा मजल्यावर मजले बांधकाम लागलें कमी जागेत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या   लोक अतिक्रमण करायला लागली. एवढं अतिक्रमण झाले की लोकानी गटारावर सुध्दाच काय स्मशानभूमी समाजभूमी मंदिर यावर सुध्दा लोकांनी अतिक्रमण केले सर्वात महत्वाचे म्हणजे आपले घरांचे बांधकाम करत असताना जागा पाठिमागे सोडतात आणि समोर पूर्णपणे लाईट विद्युत वाहिनी पर्यंत बांधकाम केल जात आहे त्यामुळे आज बांधकाम कामगार यांच्या जीवीताचा धोका वाढला आहे 

            सुरक्षेचा आभाव ही एक आजची जटील समस्या आहे. घरांचे बांधकाम चालू केले की त्यासाठी २२ प्रकारचा कामगार लागतो त्या प्रामुख्याने बांधकाम कामगार म्हणजे गंवडी. सेंटरींग. असे पायाडावर काम करणारे कामगार असतात. या सर्व बांधकाम कामगार यांना कोणतीही सुरक्षा नाही. लाईट तारा बिल्डिंग जवळून गेलेल्या असतांत. त्याला कोणतेही कोटींग केले जात नाही. आणि बांधकाम तारा जवळचं असतं. म्हणजे बांधकाम मालक बांधकाम कामाच्या पाठिमागे बरिच मोकळी जागा ठेवतात आणि लाईट तारा जवळचं बांधकाम करुन आपली जागा वाचविण्यासाठी बांधकाम कामगार यांचा जीव धोक्यात घालत आहेत. म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा असा प्रकार आहे जिल्ह्यात वरचेवर बांधकाम कामगार कामांवर असताना शाॅक लागून मयत झाल्याच्या घटना आपण वाचतो दूरदर्शन वर बघतो आणि अरे अरे वाईट झाल एवढंच म्हणतो मग आत्ता या बांधकाम कामगार यांच्या मृत्यूस आणि अपघातात अपंग होतात याला जबाबदार कोण.  तर यासाठी बांधकाम मालकांना व बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार हेच आहेत अपघात झाला असेल तर या सर्व बांधकाम व्यावसायिक मालक ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा 

                महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक विमा अशा विविध १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात आत्ता बांधकाम कामगार यांचेसाठी कामगार कामावर असताना संरक्षण मिळावे बांधकाम कामगार अपघातांत मृत्यू व अपंगत्व ह्यापासून संरक्षण व्हावे यासाठी सुरक्षा संच वाटप करण्यात येतात. बूट. हेल्मेट सुरक्षा बेल्ट. बॅटरी. सतरंजी. पाण्याची बाटली.पत्रयाची पेटी सुरक्षा जॅकेट. अशा विविध वस्तू बांधकाम कामगार यांच्या सुरक्षेच्या हेतूने मंडळाकडून देण्यात येतात.  पण आज ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांच्या पैसे घेऊन बांधकाम कामगार यांच्या नोंदणीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यामुळे बोगस कामगार नोंदणीला उत आला आहे खरोखरच कामगार असणारे या सुरक्षा संच पासून कोसो दूर आहेत. आज जवळपास जिल्ह्यात ६० हजार सुरक्षा संच वाटप करण्यात आले आहेत अस सहहयक कामगार आयुक्त भवन यांचे म्हणणे आहे पण आज कोणत्याही कामांवर सुरक्षा संच वापरला जात नाही मग एवढे सुरक्षा संच गेले कुठे. याचे वाटप करण्यापेक्षा ज्यांना हे सुरक्षा संच वाटप झाले आहेत ते वापर करतात का नाही याचा सर्वे होणे गरजेचे आहे. वापर होत नसेल तर अशया बांधकाम कामगार यांनी व ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यानी मंडळाला चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे तया अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

स्वताचे अपयश झाकण्यासाठी एम आय एमला करतात बदनाम - डॉ परवेज अशरफी


 स्वताचे अपयश झाकण्यासाठी एम आय एमला करतात बदनाम - 

डॉ परवेज अशरफी  

अहमदनगर -

नुकतेच भारतात ५ राज्याचे निवडणूक झाल्या त्यात पूर्ण देशाचे उत्तर प्रदेश आणी त्यानंतर पंजाब राज्याकडे लक्ष होते. उत्तर प्रदेशात सरकार बदलण्यासाठी व मागील ५ वर्षात झालेल्या अत्याचार व सरकार सामान्य जनते विरोधात असल्याचा दावा करण्यात आले. उत्तर प्रदेशात भारतातील जवळ जवळ सर्व पक्षाने आपली किस्मत आजमवली. त्यात हैदराबाद येथील ए आय एम आय एम पक्षानेही आपले उमीदवार निवडणुकीत उतरवले. ५ वर्ष पेक्षा जास्त एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व त्यांचे सहकारी उत्तर प्रदेशात पक्ष बळकट करण्यासाठी कष्ट करत होते. हैदराबाद, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, असे अनेक राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते उत्तर प्रदेशात प्रत्यक विधानसभा शेत्रात कष्ट करत होते. एम आय एम पक्ष अध्यक्ष बरीस्तेर असदुद्दिन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात आपले पक्षातर्फे उमिदवार दिले. बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसीने उत्तर प्रदेश निवडणुकी पूर्वी हे स्पष्ट केले होते की त्यांची पक्ष भाजप आणी कॉंग्रेस सोडून कोणत्याही पक्षासोबत गठबंधन करण्यास तयार आहे. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, आझाद पार्टी, अशे अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवत होते. काही एम आय एम सोबत गठबंधन करण्यास तयार नव्हते, काहींनी गठबंधन करून तोडले तर काही आज ही एम आय एम सोबत गठबंधन मध्ये आहे. निवडणुकीच्या पूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना एक पत्रकाराने एम आय एमला सोबात घेणार की नाही असे प्रश्न विचारले तर अखिलेश यादव ने नकार दिला कारण एम आय एम पक्षावर खूप आरोप होत आहे असे दिले. बसपा अध्यक्ष मायावती हे देखील एम आय एम सोबत जाण्यास तयार नव्हते. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांक समाजाचे सर्व पक्षांना मते हवी होती परंतु एम आय एमला सोबत घेण्यास तयार नव्हते.


एम आय एम पक्ष अध्यक्ष यांनी आपल्या परीने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला व प्रदेश अध्यक्ष शौकत अली यांनी १०० जाग्यावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय अद्याक्षाकडे दिले.


निवडणुकाचे निकाल आले आणी नेहमी सारखे दुसऱ्यांचे अपयशाचे खापर एम आय एम पक्षावर व पक्ष अध्यक्ष बॅरिस्टर ओवेसी यांचावर फोडण्यात आले. प्रत्यक व्यक्ती विश्लेसन करायला लागले की जर एम आय एम पक्षाने निवडणूक लढवली नसती तर समाजवादी पार्टी सत्ते मध्ये असती. एम आय एम भाजपा ची बी टीम आहे. एम आय एम ने भाजपला आतून मदत केली. एम आय एम मुळे १६५ जागा भाजपा जिंकला. असे अनेक विश्लेषण वहाटस अप्प विद्यालयातील विध्यार्थी द्यायला लागले. परंतु त्यातील कोणीही सदर बातमी मध्ये किती सत्य आहे याची शहानिशा केली नाही. यात सुशिक्षित वर्ग ही मागे नव्हता. म्हणजे एम आय एम यांनी किती नुकसान केले हे दाखवण्यात कोणीही मागे नव्हते.

परंतु काही प्रश्न जे निर्माण झाले आहे त्याचे उत्तर मिळणे खूप गरजेचे.

१) एम आय एम भाजपा व कॉंग्रेस सोडून कोणत्याही पक्ष सोबत जाण्यास तयार होती तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणी बहुजन समाज पार्टी यांनी एम आय एमला सोबत का घेतले नाही?

२) उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजाने ७५ % पेक्षा जास्त मते समाजवादी पार्टी म्हणजे अखिलेश यादव यांना दिले तर समाजवादी पार्टी यांना कोणाचे मते मिळाली नाही किंवा कमी मिळाले याचा विश्लेषण कोण करणार?

३) समाजवादी पार्टी, कॉंग्रेस व बसपा यांना मुस्लिम समाजाचे मते पाहिजे पण मुस्लिम नेते का चालत नाही?

४) उत्तर प्रदेशात आम आदमी पार्टी, शिवसेना, एन सी पी असे अनेक पक्षाने आपले उमीदवार रिंगणात उतरविले होते परंतु खापर फक्त एम आय एम पक्षावर का फोडण्यात आले?

५) जेव्हा एम आय एम ने फक्त ९७ जागी उमीदवार दिले तर भाजप १६५ जागी एम आय एम मुळे कशा जिंकला?

६) अशे चुकीचे मेसेज कोन व्हैराल करतो याचा कश्या प्रकारे फायदा मिळतो?

७) समाजवादी पक्षाचा उमीदवार ज्या विधानसभा शेत्रात पराभव झाला त्या विधानसभा शेत्रात एम आय एम सोबत कॉंग्रेस, बसपा, आप यांना किती मते मिळाली याचा विश्लेषण कोण करणार?

८) एम आय एम पंजाब, मणिपूर, गोवा या राज्या मध्ये निवडणूक लढवले नाही तर त्या राज्यात भाजप व आप यांना बहुमत कोणामुळे मिळाला?

या सर्वाचे उत्तर मिळणे व सामान्य जनतेला याची जाणीव होणे गरजेचे आहे की उत्तर प्रदेशात व अन्य ३ राज्यात भाजपला जनतेने बहुमत दिले तर पंजाब मध्ये कॉंग्रेस व भाजपला जनतेने नाकारून आम आदमी पार्टीला बहुमत दिले.

उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतांनी भाजपचा अशोक राणा विजय झाले. धामपूर येथून समाजवादी पक्षाचे नईम उल हसन यांचा २०३ मतांनी पराभव केला.म्हणजे २०० पेक्षा कमी मतांनी कोणीच निवडून आले नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघात एम आय एम निवडणूक लढविले नाही.

 11 उमेदवारांना 500 किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळाला आहे. यामध्ये भाजपच्या 7 आणि समाजवादी पक्षाच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. अगदी याच प्रकारे 500 ते 1000 मतांच्या फरकाने विजय मिळालेल्या उमेदवारांची संख्या आहे 4. यामध्ये 2 उमेदवार समाजवादी पार्टीचे, 1 उमेदवार भाजपचा आणि 1 उमेदवार आहे निर्बल इंडियन शोषित हमारा आम दलाचा.

आता 1000 ते 2000 मतांच्या फरकाने विजय संपादन करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला असता ही संख्या आहे 14. यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे 9, समाजवादी पार्टीचे 4 आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश असल्याचे बघायला मिळतेय.

उत्तर प्रदेशात सर्व पक्ष निवडणुका लढले परंतु खापर एम आय एमवर का फोडण्यात आले? त्याचा कारण जो मला वाटते म्हणजे भारतातील राजकीय पक्षाला अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे मते पाहिजे परंतु त्यांचा नेता त्यांना चालत नाही. या पक्षाला कार्यकर्ता पाहिजे जो त्यांचा सांगण्यावर चालेल परंतु त्यांना अशा नेतृत्व नको जो समाजाचे प्रश्न विधानसभा, संसद मध्ये उचलेल.

एम आय एम पक्षाला व बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवेसी यांना मानणारा वर्ग दिवसेन दिवस वाढत आहे. मुस्लिम समाजच नव्हे तर सर्व समाजाचे लोक एम आय एम सोबत जुडत आहे. याची धास्ती केंद्रात व राज्यात सत्ता भोगलेले पक्षाने घेतली आहे ज्यांनी मुस्लिम समाजाला आपली व्होट बँक समजले होते त्यांनी कधीच मुस्लिम समाजाचे नेते तयार केले नाही त्या उलट अल्पसंख्यांक सामाजाला आपला नेता निवडण्या पूर्वी या पक्षाने त्यांची बोली बोलणारा व्यक्ती समाजावर लाधले.

एम आय एम पक्ष व बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी सर्व भारतात पक्ष वाढी साठी प्रयत्न करत आहे. ओवेसी साहेब प्रत्यक भाषण मध्ये सांगतात की आम्ही शोषित वंचित दुर्भाल घटक यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणी प्रयत्न करत राहणार. कोणी काहीही आरोप करो आम्हाला भारतीय राज्य घटनेने निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे आणी आम्ही लढणार. शोषित वंचित समाजासाठी नेहमी लढा देणार.


ज्या कॉंग्रेस ने ३९८ लढून फक्त २ जागा आणी बसपा ४०३ मधून फक्त १ उमिदवाऱ निवडून आणले व आप ने जवळ जवळ ३ लाख मते घेतले त्यांना कोणीही बोलायला तयार नाही याचा एकाच कारण मंजे मुस्लिम आणी एम आय एम ला बदनाम करून आपले अपयश जणते समोर येऊ न देणे.

या लेख लिहिण्याचा उद्देश एकाच की एम आय एम आणी बरीस्स्तेर ओवेसी हे मुस्लिम, अल्पसंख्यांक समाज, शोषित, वंचित समाज यांना सत्तेत त्यांची भागेदारी मिळावी या हेतूनी संघर्ष करत आहे. 

 ज्या प्रकारे बॅरिस्टर असदुद्दीन साहेब संसदेत असो किंवा प्रचारात प्रत्येक विषयावर बोलतात त्यामुळे या स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना त्यांची भीती वाटायला लागली आहे. ज्या मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाला इतक्या दिवस भाजपची भीती दाखुन आम्ही त्यांचे मते घेतली त्यांना त्यांचा अधिकारी देण्यासाठी एम आय एम पक्ष प्रयत्न करत आहे.

आज एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील साहेबांनी महाविकास आघाडी सरकारला  आम्ही येतो तुमच्या बरोबर वरिष्ठांना सांगा आमचा निरोप आणि द्या उत्तर म्हणत टीकाकारांची तोंडे बंद केली.

एआयएमआयएम युपीए सरकार बरोबर होती त्यावेळी कोणालाही एलर्जी नव्हती.

कोणी कितीही आरोप केलेतरी एआयएमआयएम आपला संघर्ष चालू ठेवणार. आज जिंकलो नाही तर काय झाले पुढची तयारीला लागणार…. आमचा संघर्ष चालू राहणार

डॉ परवेज अशरफी, ( जिल्हाध्यक्ष एआयएमआयएम अहमदनगर)

 

निदान निदान

 

निदान निदान

    प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला सवलतीच्या दरात अथवा मोफत वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात. लोकांची बोगस डॉक्टर यांचेकडून कारण नसताना आर्थिक मानसिक लुट होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र. उप जिल्हा रुग्णालय अशी वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणारी केंद्रे शासनाने उभी केली आहेत. या आरोग्य केंद्रात सर्व आजारांवर नामांकित डॉ यांची नियुक्ती केली गेली आहे. या केंद्रात सर्व उपचार मोफत व औषध सुध्दा मोफत देणे शासनाच्या अधिपत्याखाली आहे. एक्सरे. विविध साथीचे आजार. बिपि. रक्त लघवी. साखर. हृदयविकार मधुमेह रक्तदाब. हाडांचे आजार. फिजिओथेरपी. डिलिव्हरी. सिझर डिलिव्हरी. अपेंडसी. अशया विविध आजारांवर उपचार करण्यासाठी त्या त्या विभागातील नामांकित डॉ नेमण्यात आले आहेत. पण या सर्वांना आठवड्याचा एक दिवस ठरवून दिला आहे. त्याच दिवशी तो डॉ भेटेल. मग मला सांगा जर महिन्यातील चार वार जर तो उप जिल्हा रुग्णालय मध्ये काम करत असेल तर त्याला महिन्यांचा पगार द्यायचा कां शासनाला कसं परवडत. सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांची लुट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उप जिल्हा रुग्णालय हेच सर्वात मोठे डॉक्टर लोकांचे केंद्र आहे. म्हणजे कोणत्याही आजाराने पिडीत व्यक्ती हा सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास जातो. आणि ज्या सरकारी दवाखान्यातील डॉ कडे जातो त्याची बाहेर ओपीडी असतेच मग पेशंटचया मनात अस काही भरवरल जात की. हा सरकारी दवाखाना आहे येथे ही सेवा सुविधा नाही. आपण आमच्या ओपीडी मध्ये या आम्ही आपणांस लवकरात लवकर बरं करु. म्हणून अश्या डॉ यांना पेशंट शोधायला बाहेर जाण्याची काहीच गरज पडत नाही. आणि मग एक ठराविक रक्कम उपचारासाठी ठरवली जाते आणि उपचार सुरू होतो. मात्र पेशंटला काहीच फरक पडत नाही. मग डॉ सांगतात अजून एक उपचार पध्दती घ्यावी लागेल. आणि मग खुटयाला बांधला या प्रमाणेच हे सर्व पेशंट दर महिन्याचे पेशंट होतात आणि मनमानी आर्थिक लुट सुरू होते

                  प्राथमिक आरोग्य केंद्र व उप जिल्हा रुग्णालय यामध्ये आपले डाॅ म्हणून कर्तव्य बजावणारे जे कोणी डॉ असतील त्यांची जर बाहेर ओपीडी असेलतर यांना सरकारी दवाखान्यात नोकरी देऊ नये अथवा नोकरी वरून कमी करण्यात यावे कारणं हेच आज शासनाच्या आरोग्य प्रत्येकाच्या घरोघरी याला खरोखरच अडचण झाले आहेत 

             सर्वात महत्वाचा आणि आपणांस बरेच काही सांगून जाणारा शब्द आहे तो निदान वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचा आणि रुग्णाला जीवनदान देण्यासाठी निदान असणे आणि होणे गरजेचे आहे. 

       रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. हे फक्त लिहिलं जात मोठया बोर्डावर. पण खरोखरच अमलात आणलं जात का. आज रुग्ण सेवा हीच पैसा मिळविण्याचे साधन करण्यात आले आहे. सर्वत्र बोगस डिग्री घेऊन डॉ व्यवसाय करणारे यांना उत आले आहे. ज्याला ताप थंडी. हिवताप मलेरिया काविळ डेंग्यू यांचं ज्ञान नाही असे डॉ आज हाडांचे व विविध विकारांवर उपचार करणारे असा फलक लावत आहेत. ज्यांना आजाराबद्दल कोणताही ज्ञान नाही असे डॉ यांना डिग्री व लाईन्स कोण देत आणि त्यासाठी किती लाच डॉ देतात आणि खुलेआम लोकांना आर्थिक व मानसिक लुट करतात 

              दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद नाही. रुग्णाला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही. मेडिकल निवडण्याचा अधिकार नाही. औषधांच्या दराबाबत चौकशी करण्याचा अधिकार नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येतो याचे दरपत्रक नाही. पेशंट व नातेवाईक यांना व्यवस्थित वागणूक नाही. दवाखाना स्वच्छ आहे का. अशा विविध रुग्ण हक्कासाठी शासनाने रुग्ण हक्काची सनद तयार केली आहे पण ती आज केराच्या टोपलीत दिसत आहे म्हणजे आपण सर्वजण मूर्ख आहोत कारणं आपण चौकशी करत नाही. औषध पाकिटावर मिळतात आणि मेडिकल वाले डॉ यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्हाला खाऊ द्या असा फंडा वापरला जातो. डॉ ज्या मेडिकल मधील पावती देतो आणि रुग्ण ज्या दवाखान्यात उपचार घेतला त्या डॉ चे औषध त्याच मेडिकल मध्ये मिळते मग काय मनमानी दराने विक्री केली जाते. म्हणजे डॉ आणि मेडिकल वाले गोरगरीब लोक सर्वसामान्य जनता यांच्या भावनेचा बाजार करत आहेत. याला कारणीभूत आहे ते म्हणजे डॉ यांचे निदान ज्ञान जोपर्यंत डॉ यांचा आर्थिक कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या रुग्णाच्या आजारांचे निदान सापडतं नाही आणि निदान सापडलं तर यासाठी बाहेरच्या यांच्याच पटातलया डॉ मेडिकल लॅबोरेटरी विविध तपासण्या यासाठी चिठ्ठी दिली जाते आणि मग तेथून खरोखरच रुग्णांची मोठ्याप्रमाणात लुट होते

            दवाखान्यात दाखल झाल्याबरोबर डॉ नर्स आपणांस त्यांच्याच संपर्कातील लॅबमध्ये विविध टेस्ट करण्याची चिठ्ठी देतात रक्त लघवी. साखर. बिपी. मधुमेह. फिजिओथेरपी. अशा विविध टेस्ट करण्यासाठी मोठीचया मोठी लिस्ट दिली जाते. आणि मग खरोखरच त्या डॉ ला रुग्णांच्या आजारांचे निदान झाले असा आव आणून उपचार केले जातात. महिने सहा महिने वर्ष. असा उपचार सुरू होतो. आठवडा पंधरवडा. हजारों रुपयांचे औषध घेणे बंधनकारक करण्यात येते. आणि एखाद्या रुग्णाला नाही तर बरेच असे काही रुग्ण आहेत की त्यांना त्या डॉ चे औषधापासून कोणताही फरक नाही अस ध्यानात आले आणि त्यांनी उपचारासाठी दवाखाना बदलला तर सर्वात वाईट प्रकार आमच्या ध्यानात आला आहे की त्याचं रुग्णाने केलेल्या विविध टेस्ट. विविध तपासण्या. सिटीस्कॅन. एक्सरे. असे कोणतेही रिपोर्ट या नविन डाॅकटरला पसंत नसतात मग आम्हाला या सर्व टेस्ट पुन्हा कराव्या लागतील त्याशिवाय आम्हाला उपचार करता येणार नाहीत असं खडखडीत रुग्णाला व नातेवाईक यांना बजाविले जाते. मला एक कळत नाही मानवी शरीरातील होणारें बदल किती दिवसांत होतील. किती दिवसांत रक्त लघवी साखर बिपी मधुमेह रक्तदाब हृदयविकार याची स्थिती बदलते कां. डॉ फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी रुग्णाला या सर्व टेस्ट परत करण्याचा सल्ला देतात का. आपण कधी डॉ यांना विचारलें नाही. डॉ म्हणतोय म्हणून आणि आपला पेशंट बरा व्हावा यासाठी आपण पाण्यासारखा पैसा खर्च करत असतो. म्हणजे डॉ यांना सापेक्ष निदान न मिळाल्याने आपला वेळ आणि पैसा वाया जातो वेळप्रसंगी आपला रुग्ण सुध्दा या मूर्ख डॉ यांच्या बेधुंद पणामुळे दगावतो मग सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला तर बिघडले कुठे. टेस्ट तपासण्या त्याच मग डबल कशासाठी 

प्रबुद्ध समाजाचे अध्यक्ष डॉ.

  श्रीप्रकाश बर्नवाल म्हणतात की, कोणत्याही समस्येच्या बाह्य लक्षणांपासून सुरुवात करून, त्याचे मूळ कारण जाणून घेणे यालाच निदान म्हणतात . निदानाची पद्धत 'एलिमिनेशन'वर आधारित आहे. निदान हा शब्द सर्व क्षेत्रांमध्ये वापरल जातो 

निदानाची एक महत्त्वाची पद्धत: रेडियोग्राफी

निदानाला खूप महत्त्व आहे. जोपर्यंत रोगाचे योग्य निदान होत नाही तोपर्यंत योग्य दिशेने उपचार अशक्य आहे. त्यामुळे जुन्या ग्रंथांमध्ये रोगनिदान प्रकरण खूप विस्तृत आणि उपचार प्रकरण मर्यादित होते. याचे कारण असे की जर निदान अचूक असेल तर उपचार अचूक असणे आवश्यक आहे.

अनेक रोग स्वतःच बरे होतात आणि निसर्गाच्या प्रतिबंधात्मक शक्तीला कोणाच्याही मदतीची गरज नसते हे खरे आहे, पण असे अनेक रोग आहेत ज्यात निसर्ग असमर्थ ठरतो आणि मग औषधाची मदत घ्यावी लागते. योग्य आणि अचूक थेरपीसाठी निदान योग्य असणे आवश्यक आहे. योग्य निदान म्हणजे त्रासदायक लक्षणांचे मूळ कारण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पॅथॉलॉजीचे नेमके स्वरूप समजून घेणे.

थेरपी मध्ये निदान सुधारणे

अनादी काळापासून मनुष्य शारीरिक आणि मानसिक आजारांनी त्रस्त आहे. औषध हा वेदनांपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ज्यांना या विषयाचा विशेष अनुभव व अभ्यास झाला आहे, त्यांचा वेगळा वर्ग झाला आहे. प्रारंभी, रोगाचे कारण दैवी क्रोध, भूत किंवा दुष्ट दृष्टी मानले जात असे आणि जादू, चेटूक, जंतरमंतर इ. नंतर आयुर्वेदाचा उदय झाला आणि त्रिदोष तत्त्वाच्या आधारे निदान सुरू झाले . हे तत्त्व पश्चिमेकडे जाऊन 'चतुर्दोष सिद्धांत' बनले. जेव्हा आधुनिक विज्ञान उदयास येऊ लागले तेव्हा अनेक नवीन सिद्धांत उदयास येऊ लागले: यक्ष-दूषित वातावरण, अशुद्धता, विष, विषाणू इ. पण हे सर्व अर्धसत्य हे सर्व कथन करणारे डॉ यांना निदान झालेच नाही

         आजच सर्वांनी आपला पेशंट आणि त्याला असणारा आजार याबाबत बरोबर निदान झाले असेल तरच उपचार सुरू करा. फक्त आणि फक्त डाॅ म्हणतोय म्हणून आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. आणि आपल्या पेशंटचया जीवाशी खेळू नका आज बोगस डॉक्टर यांना सर्वत्र उत आला आहे दवाखाना आहे म्हणून जाऊ नका डॉ यांची डिग्री कोणती आहे तो उपचार करण्याची जबाबदारी घेत असेल तरच अश्या डॉ यांना भेट व उपचार घया. नसेल तर आपल्याला उपचारासाठी आलेला खर्च मिळवून घेण्यासाठी डॉ यांच्यावर पोलिस स्टेशनला तक्रार करा नाहीतर आपली लुट असे चोर करणारच

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८८०८२५८५९

अनागोंदी कारभाराची होळी

 ‌

अनागोंदी कारभाराची होळी 

होलिका दहन हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे , ज्यामध्ये होळीच्या एक दिवस आधी म्हणजेच होलिका दहनाच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मकरित्या केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण म्हणून होलिका दहन साजरा केला जातो. 

हिरण्यकशिपूचा ज्येष्ठ पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. वडिलांनी लाख सांगूनही प्रल्हाद विष्णूची पूजा करत राहिला. राक्षसाचा पुत्र असूनही, नारद मुनींच्या शिक्षणामुळे प्रल्हाद नारायणाचा महान भक्त बनला . असुराधिपती हिरण्यकश्यपनेही आपल्या मुलाला मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु भगवान नारायण स्वतः त्याचे रक्षण करत राहिले आणि त्याचा केसही उपटला नाही. असुर राजाची बहीण होलिका हिला भगवान शंकराकडून अशी चादर मिळाली होती की ती धारण केल्यावर अग्नी तिला जाळू शकत नाही. होलिकाने ती चादर पांघरली आणि प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन चितेवर बसली. , ]नशिबाने ती चादर प्रल्हादच्या अंगावर उडून प्रल्हादचा जीव वाचला आणि होलिका दगावली. अशा प्रकारे, इतर अनेक हिंदू सणांप्रमाणे, होलिका दहन देखील वाईटावर चांगले प्रतीक आहे. 

                 पुराण कथांमध्ये आपणास एवढेच सांगितले जाते की होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय असा होतो 

           आज आपणांस वाईट विचार. वाईट आचार. वाईट निती. वाईट चालीरिती. वाईट सवयी.  वातावरण दुषित करणारे घटक. खोटे बोलू नका.  कोणालाही फसवू नका. दहशतवाद नक्षलवाद. जातीयवाद. अपहरण. अशा एक नाही अनेक गोष्टींची आज आपणांस होळी करण्याची गरज आहे 

      आज शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व अनागोंदी कारभार याची सुध्दा आज आपण भारताचे पहिले नागरिक म्हणून आजच होळीच्या मुहूर्तावर निश्चिय करा आपण सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची. शपथ घ्या. 

          बांधकाम कामगार यांनी आपणांस बांधकाम कामगार नोद घालतो. लाभ मिळवून देतो. या योजनेसाठी एवढा खर्च.  जी योजना सुरू नाही त्यासाठी बांधकाम कामगार यांची फसवणूक करणारे एजंट. संघटना सेवाभावी संस्था युनियन यांच्याकडून फसवणूक होणार नाही करुन घेणार नाही. कामापेक्षा पैसे मागणारे यांची जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा आणि या सर्व अनागोंदी फसवणूक कारभाराला आजपासून होळी करण्याचा निर्णय बांधकाम कामगार यांनी घेणे गरजेचे आहे

               सर्वात महत्वाचे आणि आपणांस जगण्यास कारणीभूत असणारा मुद्दा म्हणजे रेशन अन्न धान्य मुद्दा सर्वांना स्वच्छ व निवडक रास्त आणि स्वस्त दरात  मापक अन्न धान्य मिळण्यासाठी रेशन ही संकल्पना अमलात आणली. रेशन दुकानदार चोर रेशन आलं नाही.  रेशन संपलं आहे. तुमचं नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. रेशनकार्ड वर नमूद व्यक्ति पेक्षा कमी अन्न धान्य वितरण. अश्या एक नाही अनेक गोष्टींची आज होळी करण्याची गरज आहे. या रेशन दुकानदार पेक्षा मोठे चोर आहेत ते म्हणजे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी कारणं रेशन हक्क सनदेनुसार कोणता अर्ज दाखल केल्यावर किती दिवसांत त्याचा निर्णय घेतला पाहिजे हे लिहून ठेवले आहे तरी पण आज पुरवठा विभागात हजारों नविन रेशनकार्ड काढणे. फाटके खराब झालेले रेशनकार्ड बदलणे. नाव वाढविणे. नाव कमी करणे. अन्न सुरक्षा योजनेत सहभागी. रेशनकार्ड ट्रान्स्फर करणे. अशा विविध अर्जावरील आजपर्यंत पुरवठा विभागात धुळ सुध्दा उठली नाही कारणं कोणतेही प्रकरण विना पैशाचे निकालात निघत नाही आणि काढलं जात नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला हेलपाटे मारुन आपला वेळ आणि पैसा वाया घालवावा लागत आहे. म्हणजे आजच होळीच्या दिवशी शपथ घ्या आणि अशा सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे

          गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा. बेरोजगारी कमी व्हावी यासाठी विविध धर्मातील तरूण मुलांसाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ. महिला बचत गट. जिल्हा परिषदेकडून चालविणाऱ्या जाणारया विविध विकास योजना. अशा एक ना अनेक योजना आहेत पण त्या फक्त आणि फक्त कागदावरच खरोखरच गरज असणारे यांना याचा कोणताही फायदा होत नाही. याला कारणीभूत आहेत ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय कृत असणार्या बॅंका आहेत या बॅंका आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी गरजूंना न देता यांच्याकडूनच कर्ज वाटप केले जाते आणि एखादे प्रकरण बॅंकेत असेलतर त्या कर्जदार याला हेलपाटे मारून बेजार करतात. आणि जर कर्ज मंजूर झालतर बॅंक अधिकारी व कर्मचारी यांना टक्केवारी द्यावी लागते. म्हणजे पैसा शासनाचा. वरकमाई करतात ते बॅंक अधिकारी व कर्मचारी आणि व्याज भरतो तो गोरगरीब. यालाच म्हणतात प्रसंगावधान. म्हणजे आजच शपथ घेऊन या सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे आणि करावीच लागणार आहे. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या बगलबच्चे यांची कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर होतात आणि ती परतफेड सुध्दा केली जात नाही त्यावेळी हेच अधिकारी आणि कर्मचारी वसुली साठी जाण्याचे धाडस सुध्दा होत नाही अस का. होळी झालीच पाहिजे

          सर्वसामान्य माणसाला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणार्या कामकाजाची माहिती तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणांस माहीती अधिकार कायद्याने दिला आहे. पण आज उलट झाल आहे. आपणांस एखादी माहिती हवी असल्यास आपण सदर विषय धरून माहिती अधिकार दाखल करतो म्हणजे पहिला अर्ज दाखल करतो त्यानुसार संबंधित विभागाला ३० दिवसांचा कालावधी मिळतो त्या वेळेत सदर माहिती कार्यकर्त्याला देणें बंधनकारक आहे पण आज उलट झाल आहे. जनमाहीती अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार कायद्याचे कसलही गांभीर्य राहील नाही. ३० दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी कसलाही माहिती अधिकार दाखल करणारे यांना दिली जात नाही. माहिती उपलब्ध आहे किंवा नाही हे सुध्दा कळविले जात नाही म्हणजे यांना माहीती अधिकार कायद्याबद्दल कोणतेही गांभीर्य नाही आपला पगार मिळाला कि बस  म्हणजे अशा अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे 

          आज आपण रोज वृतमानपत्रात दुरदरशन वर पाहतो वाचतो बघतो असा कोणताच दिवस जातं की त्यादिवशी महिला अत्याचार विषयी बातमी नाही. म्हणजे सामुहिक बलात्कार. अपहरण. अल्पवयीन मुलीवर अत्याचार. छेडछाड. दुरदरशन वर. पेपर मध्ये. अत्याचार करणारे हिरो असल्या सारखे वृतमानपत्रात दुरदरशन वर दाखविले जातात. आणि अत्याचार पिढीत महिलांचे उद उद करतात या विचारांची अशा वागण्याची होळी करण्याची गरज आहे   अत्याचार पिढीत महिलांनी तक्रार करायला गेल्यावर त्यांची तक्रार दाखल करुन घेणारे पोलिस कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे

               भ्रष्टाचार हा सर्वात मोठा शाप आहे कारणं आज कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात आपले काम लवकरात लवकर करुन घेण्यासाठी आपणांस आर्थिक लाच टेबल खालून द्यावी लागते. नोकरी साठी लाच.  घरकुल साठी लाच. बांधकाम कामगार नोंदणी साठी लाच. वयोवृद्ध नागरिक यांना पेन्शन मिळविण्यासाठी लाच. बॅंक कर्ज घेण्यासाठी बॅंक अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी लागणारी लाच.  घरफाळा पाणीपट्टी कमी करण्यासाठी लाच.  आठवडा बाजारात माल विक्री करण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी लागणारी लाच.  गाडी अडवणे. कागदपत्रे नाहीत म्हणून लाइन्स नाही म्हणून अशा वाहनाशी निगडित असणारे नियम यासाठी पोलिसांना द्यावी लागणारी लाच.  कोर्टात केस जिंकण्यासाठी वकिलांना दिली जाणारी लाच.  शाळेत शिक्षण घेण्यासाठी दिली जाणारी लाच.  पास होण्यासाठी शिक्षकांना दिली जाणारी लाच. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महिला व बालकल्याण समिती अपंग विकास महामंडळ. अशा एक ना अनेक ठिकाणी आज भ्रष्टाचाराचा विळखा गोरगरीब लोकांचा गळा आवळत आहे. यातील भ्रष्टाचाराची होळी करण्याची गरज आहे त्यासाठी आपणांस कंबर कसावी लागणार आहे. 

        आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार आपण आपल्या अनमोल मताचा वापर करून निवडून दिलेले मुठभर करतात त्यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारणं आपणांस निवडणूक काळात. मताची किंमत काडीमात्र दिली जाते आणि आपण गुलाम होतो.   जेवन दारू यासाठी आपण आपला ईमान विकतो. जातीयवाद. दहशतवाद नक्षलवाद. टोळीयुद्ध गुंडगिरी. याचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो आणि हे करणारे हे सर्व पांढरं कावळ आहेत. आपण गुलामच आहोत आणि या सर्व विचारांची आजच होळी नाही केली तर येणारी पिढी सुध्दा गुलामच होणार. आपल्यातील कोणीही पोलिस नाही. तहसिलदार नाही. नायब तहसीलदार नाही. प्रांत नाही. जिल्हा परिषद. पंचायत समिती. व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात गोरगरीब चालतं नाही कारण गोरगरीब जनतेकडे ज्ञान आहे पण वशिला पैसा नाही आजच अशा घातक विचारांची होळी करण्याची गरज आहे मतदानावर बहिष्कार टाका. निवडणूक लढविणाराकडे पैसा किती आहे त्यापेक्षा त्याकडे जनकल्याण करण्याची कला आहे का गुण आहे का 

होळी दिवशी कचरा गोळा करुन त्यांचे दहन करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. होळी येताना वातावरणात बदल होत असतो त्यावेळी वातावरणाचा समतोल राखण्यासाठी होळी मुळे सर्व वातावरण उष्ण केले जाते त्यामुळे वातावरणातील बदलांचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.  हा निसर्ग नियम आहे. मनातील विष रुपी कचरा जाळण्याची आज आपणांस गरज आहे 

 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मजूर सोसायट्या एक सोंग

 


मजूर सोसायट्या एक सोंग

            मजूर दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे आपले व आपल्या कुटुंबांचे आणि आपणांस दिवसांचा रोजगार दैनंदिन जीवन जगण्यापुरता मिळावी असे आणि एवढ्यावर समाधान मानणारा तो एक मजूर मिळेल ते काम करून कंत्राटदार ठेकेदार देईल तेवढी मजूरी. आपल्या व कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करून घेणा-या बद्दल एक शब्द न बोलणारा तो मजूर. आपले हक्क व अधिकार याची जाणीव नसणारा.  समाजात हिण वागणूक मिळणारा तो एक घटक म्हणजे मजूर कामगार सुविधा योजना. कामगार कायदे फायदे. गरिबीमुळे मुलांचे शिक्षण नाही. व्यसन अडाणी गरजू. असा समजला जाणारा घटक म्हणजे मजूर. 

      शासनाने यासर्व विषयांचा अभ्यास करून मजूरांना आपले हक्काचे वर्षभर काम मिळावे यासाठी मजूर सोसायट्या ही संकल्पना अमलात आणली. यानुसार मजूर एकत्र येऊन आपली स्वताची मजूर सोसायटी उभी करू शकतात. आणि ग्रामपंचायत.  पंचायत समिती.  जिल्हा परिषद.  या माध्यमातून. गावात होणारी विकस कामे. विना अनुदानित भरता घेण्याची तरतूद केली कारण मजूर हा गरिब असल्यामुळे अनामत रक्कम भरु शकत नाही. परवाच्या जिल्हा परिषद निर्णयानुसार ३०/ लाखांपर्यंत असणारे काम कोणतीही अनामत रक्कम न भरता मजूर सोसायट्या यांना देण्याचा निर्णय घेतला. यानुसार कामाचे बिल वेळेवर काढणे.  कोणतीही जादा रक्कम बिल मंजूर करण्यासाठी मागणे.  हे कायद्यानुसार गुन्हा आहे

            मजूर सोसायट्या एक सोंग आहे कारण अमुक अमुक मजूर सहकारी सोसायटी. दिनदयाळ सुतगीरणी. अंत्योदय योजना. यामध्ये. फक्त मजूर हे नाव वापरले आहे. पण खरोखरच मजूर असणारा एकाही मजूर या सोसायटीत सभासद म्हणून नाही. मजूरांचे नावांवर बोगस कागदपत्रे सादर करून स्थानिक पुढारी. नेते. गावातील नामांकित व्यक्ती. यांचे बगलबच्चे मागे पुढे फिरणारे असतानाच गर्भ श्रीमंत अशा मजूरांचे सोंग घेऊन वशिल्याने व आर्थिक अमिष देवून कागदपत्रे रंगवून विविध गावांत. तालुक्यात. जिल्ह्यात. मजूर सोसायट्या काढल्या आहेत अशा मजूर सोसायट्या यांचें नावे टेंडर ठेकेदार घेवून ते कामे करतात. या टेंडरची कामाची गुणवत्ता कामकाज जगजाहीर आहे. अशा या सोंगाड्या मजूरांची काम करण्याची पद्धत फक्त पैसा मिळविणे एवढाच उद्देश आहे त्यामुळे गावा गावात होणारी विकास कामे. अगदी निकृष्ट दर्जाची होणार आहेत आणि केली जातात. यामुळे शासनाचा विकासाचा असणारा उदेश कोठेतरी अपुरा पडत आहे.  अशा या सर्व चोरांच्या मुळे आम्हा खरोखरच मजूर असणार्या लोकांची कष्टाची भाकरी हिसकावून घेतली जाते आहे म्हणून जिथे मजूर सोसायट्या आहेत त्यात सर्व मजूर सभासद पाहिजेत

          आपल्या जिल्ह्यात असणार्या सर्व मजूर सोसायट्या यांचेत असणारे पदाधिकारी वगैरे यांची नावे गाव चावडी वाचन करण्यात यावी त्यामुळे खरोखरच यात कामगार / मजूर आहेत का हे सर्व सामान्य माणसाला कळेल   आणि संबंधित चौकशी करावी. मजूरांचे सोंग घेतलेल्या बलाढ्य गर्भ श्रीमंत पुढारयाचे बगलबच्चे त्या त्या मजूर सोसायट्या मधून कायदेशीर कारवाई करून काढून टाकण्यात यावे.  आणि त्याजागी गावातील खरया खुरया मजूरांना पदाधिकारी नेमून सोसायट्या चालू कराव्यात तसेच आम्ही मजूर शासनाकडे मजूर सोसायट्या स्थापन करण्याबद्दल जो प्रस्ताव दाखल करू त्याचा सहानुभूती पूर्वक अधिकारी व कर्मचारी यांनी विचार करावा तसेच प्रस्थापित मजूर सोसायट्या मध्ये आम्हा मजूरांचा शासनाने पुढाकार घेऊन सहभाग वाढवावा 

         घरबांधणी करिता जरूरी असणारी वाळू दगड माती या बाबी संबंधितांना सुलभतेने मिळाव्यात अशा स्वरूपाची प्रशासकीय कार्य प्रणाली अमलात आणावी

         कामगार/ मजूर यांना त्रासदायक ठरणारे कामगार कायदे व त्यामधील तरतूदी नष्ट करणे जरुरीचे आहे यासाठी प्राथमिक तयारी म्हणून कामगार कायदेतील कामगारांना अनाठायी त्रासदायक बाबी कोणत्या ? याचे संबोधनासाठी शासनाने " अभ्यास गट " नेमून त्याची शिफारस घेवून सर्व ती चर्चा करून निर्णय घ्यावा

        कामगार / मजूर यांना नियमानुसार वेतन मिळत नाही याकरिता संबंधित कामगार / मजूर अधिकारी व कर्मचारी यांनी यथायोग्य कारवाई करावी किमान वेतन प्राप्ती साठी कामगारांचे / मजूरांचे अभ्यास शिबीर घ्यावे आणि कामगार / मजूर हितासाठी असणारे कल्याणकारी योजना व कायदे कलम हक्क व अधिकार यांची माहिती द्यावी

          म गांधी स्वयंरोजगार योजना.  पंतप्रधान आवास योजना.  इंदिरा आवास योजना. रमाई आवास योजना.  ठक्कर बाप्पा आदिवासी विकास.  इ शासकीय कामांचे कंत्राट आम्हा खरे खुरे कामगार मजूरांना अगर मजूर गट किंवा मजूर सोसायट्या यांना मिळावीत. तशी संबंधीतांना सूचना देण्यात यावी

          आम्ही स्वच्छतेचे पाईक आहोत त्यामुळे प्रशासनाने. प्रसंगी आमची मदत म्हणून. ग्रामपंचायत.  नगरपरिषद. महानगरपालिका. यामधील स्वच्छता अभियान ठेके मजूर सोसायट्या यांना देण्यात यावे. 

           " वाळू माफिया" आणि" अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे " यातून वाढलेली वाळू बेकायदेशीर उपसा नष्ट करण्यासाठी. मा जिल्हाधिकारी सो जिवाच्या आकांताने प्रयत्न करित आहेत त्यांना सर्वांनी साथ देण्याची प्रामाणिक शपथ घ्यावी यामुळे दगड वाळू माती अशा गौणखणिज उपलब्धता वाढून बांधकाम शेत्रावर अवलंबून असणारे कोट्यवधी कामगार यांना पुरेसा रोजगार मिळेल

            मजूर सोसायट्या बदल मोठे मोठे नेते पुढारी वेळोवेळी भाषन करत असतात पण आत्ता खरी गरज आहे ती म्हणजे खरोखरच असणारे कामगार व मजूर यांचे खरोखरच कल्याण करायचे असेल तर विविध सहकारी सोसायट्या मध्ये खोटे सभासद व अधिकारी व कर्मचारी असणारे काढून टाकून प्रामाणिकपणे काम करणारे कामगार व मजूर यांची नोंदणी करावी. कामगार व मजूर यांच्या कडून होणारी विविध विकास कामे जास्त पैसा मिळविण्यासाठी नाही तर फक्त दोन वेळचे जेवण मिळाले आपले कुटुंब व आपण जगण्यापेक्षा जास्त इच्छा कामगार व मजूर यांची असणार नाही 

     आप आपल्या गावात तालुका जिल्हा येथे असणार्या मजूर सोसायट्या चालू आहेत का ? किती आहेत ? बंद किती आहेत ? त्यात खरेखुरे मजूर सभासद आहेत का ? याची चौकशी करा. आणि गोरगरिबांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गरिबी एक सामाजिक समस्या

 


गरिबी एक सामाजिक समस्या

मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध होणारी साधने ज्यांना अपुरी पडतात, अशा माणसांची स्थिती म्हणजे दारिद्र्य असे स्थूलमानाने म्हणता येईल. या संदर्भात मूलभूत गरजा कोणत्या, हे निश्चित करावे लागते. मूलभूत गरजांची व्याख्या मर्यादित किंवा व्यापक अशा दोनही दृष्टींनी करता येते. केवळ जिवंत राहण्यासाठी ज्या आवश्यक त्याच मूलभूत गरजा, अशी मर्यादित व्याख्या केल्यास उपासमारीच्या जवळपास टेकलेले लोक दरिद्री समजावे लागतील. मूलभूत गरजांचा व्यापक दृष्ट्या विचार केल्यास ज्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी जगण्यासाठी पुरेशा परंतु सर्वसाधारण जनतेच्या राहणीमानाशी तुलना करता कमी दर्जाच्या असतात, त्या सर्वांना दरिद्री समजावे लागेल. अर्थात दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. निरनिराळ्या राष्ट्रांच्या दरिद्री लोकांची राहणी अन्य राष्ट्रातील दरिद्री लोकांच्या राहणीच्या मानाने कितीतरी उच्च पातळीवरील असू शकेल. उदा., अमेरिकेसारख्या विकसित औद्योगिक राष्ट्रामध्ये दरिद्री या सदरात मोडणाऱ्या लोकांजवळ मोटार, प्रशीतक, धुलाईयंत्र, दूरचित्रवाणी इ. असू शकतील. अनारोग्य, शिक्षणाचा व कौशल्यांचा अभाव, समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, विध्वंसक वा बेशिस्त वागणूक, दूरदृष्टीचा अभाव इ. गोष्टीही दारिद्र्याशी निगडित असलेल्या आढळतात, परंतु दारिद्र्याच्या व्याख्येत त्यां समावेश सहसा करीत नाहीत. मात्र दारिद्र्याचे परिणाम व्यक्तिमात्रास तसेच समाजास नुकसानकारक ठरतात, यांबद्दल एकमत आहे.

अनेक प्रकार आढळतात: (१) अल्पकालीन दारिद्र्य : औद्योगिक राष्ट्रांमधील जीवनमान व्यापारचक्रानुसार बदलत असते. मदीच्या काळात तेथील बेकारी वाढते, वस्तूंचे भाव घसरतात, उत्पादन व उत्पन्न यांच्यामध्ये घट होते. या घटनांचा परिणाम समाजातील निकृष्ट उत्पन्नाच्या गटातील लोकांना विशेष जाणवतो. त्यांना आर्थिक मदत देऊन किंवा तात्कालिक सार्वजनिक कामे हाती घेऊन हे संकट कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येतात. मंदीचा काळ संपला म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा भरभराटीच्या मार्गास लागते आणि दारिद्र्य कमी होते. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये असे मर्यादितकालीन दारिद्र्य अपरिहार्यच समजले जात असे; परंतु व्यापारचक्राची कारणमीमांसा जसजशी स्पष्ट होत गेली, तसतसे आर्थिक मदत किंवा सार्वजनिक कामे अशा कार्यक्रमांऐवजी मंदीविरोधी राजकोषीय धोरण अनुसरणे, शेअरबाजार व वायदेबाजार यांचे नियंत्रण करणे, आंतरराष्ट्रीय सुस्थितीत ठेवून दारिद्र्याच्या दुष्परिणामांना आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. (२) दीर्घकालीन सामूहिक दारिद्र्य : दारिद्र्य सामूहिक स्वरूपाचे आणि दीर्घकाळ टिकणारेही असू शकते. बऱ्याच अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये सापेक्षतया ते जवळजवळ सार्वत्रिकच असते. आशियातील बराचसा प्रदेश, मध्यपूर्व आफ्रिका आणि मध्य व द. अमेरिका यांमधील बऱ्याचशा भागांतील बहुसंख्य लोकांचे राहणीमान अत्यंत निकृष्ट आहे. उपासमार, अपपोषण, अल्पायुष्य, बालमृत्युंचे आणि प्रसूतिकाळी स्त्रियांच्या मृत्युसंख्येचे मोठे प्रमाण व अनारोग्य ही दरिद्री लोकसंख्येची सामान्य लक्षणे आढळतात. असे दारिद्र्य सामान्यतः आर्थिक विकासाचा अभाव दर्शविते. या राष्ट्रांजवळील साधमसामग्रीच अपुरी असते. तिचे समप्रमाणात सर्व लोकांमध्ये वाटप केले, तरी त्यांना पुरेशा जीवनसुविधा मिळणे अशक्य होईल. यावर दोन उपाय संभवतात. एकतर कृषिविकास व औद्योगिकरण यांच्या द्वारे एकुण राष्ट्रीय उत्पादन वाढविणे व दुसरा म्हणजे लोकसंख्यावाढीचे नियंत्रण करणे. केवळ एकूण राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्याने राहणीमान सुधारतेच असे नाही; कारण अन्नोत्पादन वाढले म्हणजे लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होऊन वाढत्या उत्पादनाचा राहणीमानावर विशेष अनुकूल परिणाम होत नाही. औद्योगिक उत्पादनात होणारी वाढ देखील धनिकांनाच विशेष फलदायी ठरून गरीब गरीबच राहण्याची शक्यता असते. शिवाय राष्ट्रीय उत्पादन वाढविण्यासाठी गरीब राष्ट्रांना परकीय भांडवलाची गरज भासते आणि हे कर्ज व त्यावरील व्याज यांची फेड करण्यासाठी राष्ट्रीय उत्पादनवाढीचा बराचसा भाग वापरावा लागल्यामुळे प्रत्यक्ष राहणीमानात फारशी सुधारणा संभवत नाही. विकसित राष्ट्रांमध्ये काही विशिष्ट समूहांना दीर्घकालीन दारिद्र्य अनुभवावे लागते. महानगरांतील आणि शहरांतील झोपडपट्ट्या, अविकसित प्रांत किंवा विभाग आणि जेथील कृषी व उद्योग अकार्यक्षम आहेत, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दीर्घकालीन दारिद्र्य भोगावे लागते. त्यावर उपाय म्हणजे कृषिसुधारणा करणे, नवीन उद्योगांना त्या भागांत आकर्षून घेणे व तेथील लोकांना प्रशिक्षण, कामधंदा व इतर सोयी पुरविणे हे होत. (३) दीर्घकालीन व्यक्तिगत दारिद्र्य : सार्वत्रिक भरभराटीच्या वातावरणातसुद्धा काही व्यक्ती दीर्घकाळपर्यंत दरिद्रीच राहतात. याचे कारण त्या आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यास असमर्थ असतात. त्यांचे शारीरिक व मानसिक दौर्बल्य, अपुरे शिक्षण व प्रशिक्षण आणि समाजाशी जुळवून घेण्याची त्यांची असमर्थता यांमुळे त्यांचे उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या खाली असते. त्यांच्या शिक्षणाची सोय करून व त्यांना सुरक्षित कामधंदा पुरवून मदत करता येते. काहींच्या बाबतीत तर आळस, नशाबाजी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांसारख्या दोषांमुळे ते चिरकाल दरिद्री राहतात, अशा लोकांना थोडीफार आर्थिक मदत दिली जाते किंवा त्यांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागते.

दारिद्र्यपीडित लोकांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी दोन प्रकारची असते: त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती वाटते, त्याचप्रमाणे तिरस्कारही वाटतो. सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांना साहाय्य करावयाचे झाल्यास ते कमीत कमी करावे; अन्यथा ते आळशी बनून आत्मोद्धाराचे प्रयत्नच करणार नाहीत अशी धास्ती वाटते. दारिद्र्याविरुद्ध योजण्यात आलेल्या उपायांचा इतिहास पाहिल्यास असे आढळते की, अठराव्या शतकात निरंकुशतेच्या तत्वाचा प्रभाव पडल्यामुळे बाजारपेठीय अर्थव्यवस्थाच दारिद्र्य नाहीसे करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाई. अडम स्मिथला जरी अकिंचनांविषयी सहानुभूती वाटत असे, तरी त्यांना आर्थिक साहाय्य केल्यास त्यांच्यामध्ये कितपत सुधारणा होईल, याविषयी तो साशंक होता. अकिंचनांसाठी द्रव्यसाहाय्याची योजना अंमलात आणल्यास श्रमिकांना उपलब्ध असणारा वेतननिधी कमी होऊन त्यांना आर्थिक अडचण सोसावी लागेल व अशा रीतीने दारिद्र्यात भरच पडेल, असे स्मिथने गृहीत धरले. मॅल्थसचे म्हणणे होते की, अन्नोत्पादनात होणारी वाढ, तिच्यापेक्षा अधिक वेगाने होणाऱ्या लोकसंख्यावाढीमुळे, तसेच युद्ध, दुष्काळ व रोगराई यांच्या अभावामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास असमर्थ ठरेल. या विचारसरणीतूनच आर्थिक विकास साधण्यासाठी बऱ्याच लोकांचे दारिद्र्य ही एक आवश्यक बाबच आहे, असे मानण्यात येऊ लागले. विकासासाठी बचतीचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्यामुळे संपत्तीचे व उत्पन्नाचे विषम वाटप हेच विकासास अनुकूल समजले जाऊ लागले. या विचारसरणीला धार्मिक तत्ववेत्त्यांच्या काही प्रमेयांची पुष्टी मिळाली. ईश्वरी अनुग्रहानेच एखाद्याची सांपत्तिक प्रगती शक्य होते व जर समाजात काही व्यक्ती अकिंचन असल्या तर ती ईश्वरी इच्छाच असली पाहिजे; तेव्हा त्यांना मदत करून ईश्वरी इच्छेविरुद्ध जाणे इष्ट नव्हे, असेही विचार प्रसृत करण्यात आले. त्यातच अदूरदर्शित्वामुळे किंवा नशाबाजीमुळे जर काहींना दारिद्र्य आले असेल, तर त्यांनी ती शिक्षा भोगलीच पाहिजे, असाही मतप्रचार झाला. अर्थशास्त्रज्ञांच्या आणि धर्मवेत्त्यांच्या या विचारसरणीमुळे अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दारिद्र्याचा परिहार करण्याचे प्रयत्न अत्यंत कमी प्रमाणात झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डार्विनच्या सिद्धांताचा प्रभाव पडून अनियंत्रित स्पर्धा हीच समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे व म्हणून अकिंचनांना आर्थिक मदत करणे सामाजिक उत्कर्षास बाधक होईल, असा समज दृढ होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ही विचारसरणी मागे पडली आणि अकिंचनांमध्ये व त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करता येणे शक्य आहे, या मताचा पुरस्कार होऊ लागला. निरंकुशतेच्या तत्त्वावरही टीका होऊ लागली. निरंकुश स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेले स्वतःच्या गुणांमुळे व कर्तबगारीने उच्चपदी गेले, की स्पर्धेचा व सत्तेचा स्वहितासाठी उपयोग करून त्यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यातूनच अकिंचनांना स्पर्धेत भाग घेता यावा व संपन्नांना मिळणारा अनुचित फायदा कमी व्हावा म्हणून अकिंचनांना साहाय्य करणे आवश्यक आहे, असा विचार पुढे आला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास चालू असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांवरील वाढत्या खर्चासंबंधी जी सर्वेक्षणे करण्यात आली त्यांत असे आढळले, की अकिंचनांसाठी असलेल्या निवाससंस्थांमधून मुख्य भरणा शारीरिक व मानसिक व्याधी असलेले वृद्ध आणि अर्भके असलेल्या माता यांचाच होता. भिक्षागृहांमधील परिस्थिती तर अत्यंत गर्हणीय होती ; कारण तेथे गर्दी व अस्वच्छता तर असेच, परंतु वेड्यांसाठी खास उपचारांचीही सोय नव्हती. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत दरिद्री, आजारी, बालके यांच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या संस्था काढण्यात आल्या. गरीबांना आर्थिक साहाय्य देणाऱ्या संस्था खाजगी स्वरूपाच्या होत्या. खाजगी देणग्या गोळा करूनच अकिंचनांच्या मूलभूत गरजा त्या जेमतेम भागवू शकत. ‘टॉयन्बी हॉल’ सारख्या पुनर्वसनगृहांमधून अकिंचनांसाठी शिक्षणाचे व सामाजिक सहजीवनाचे काही कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते चालवीत असत. १८९० ते १९१० या कालखंडात पुनर्वसनगृह–कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक सर्वेक्षक आदींचा प्रभाव सामाजिक धोरणांवर पडू लागला व दारिद्र्य ही केवळ व्यक्तिगत आपत्ती नसून ती एक सामाजिक समस्या आहे, याची जाणीव तीव्रतेने होऊ लागली. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात पाश्चिमात्य राष्ट्रांत झपाट्याने आर्थिक विकास होऊनसुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी, कामगार व बेकार यांच्यामध्ये असंतोष व अशांतता असे. अशा परिस्थितीत त्यांच्या हिंसक प्रवृत्तीही बळावत चालल्याने त्यांवर इलाज म्हणून शासनातर्फे दारिद्र्याच्या परिहाराचे कार्यक्रम हाती घेण्यात येऊ लागले.

सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांनी अकिंचनांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊ केली नाही. सक्तीचे शिक्षण, गृहनिवसन, सार्वजनिक आरोग्यसुधारणा, स्त्रिया व मुले यांच्या कामाच्या तासांवर व वेतनांवर नियंत्रण इ. उपायांनी दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर बेकारी–विमा, कामगारांना नुकसानभरपाई, आरोग्यविमा यांसारखे कार्यक्रम सुरू करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कामगारांतर्फे प्रत्यक्ष आर्थिक मदतीच्या मागण्यांना जोर आला व त्यांतूनच जर्मनी व ग्रेट ब्रिटनमध्ये सक्तीचा अंशदानात्मक विमा व अमेरिकेत बेकारी–विमा व वार्धक्यसाहाय्य हे कार्यक्रम सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा साहाय्य योजना पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सार्वत्रिक झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर तेथील दारिद्र्याची समस्या पडद्याआड गेली. युद्धोत्तर प्रगतीमुळे ती जवळजवळ नाहीशी झाली, अशी भावना समाजशास्त्रज्ञ व इतर तज्ञ यांच्यामध्ये निर्माण झाली. १९६० नंतर मात्र अमेरिकेत व इतरत्र दारिद्र्याचा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला व तो सोडविण्याचे प्रयत्न शासनातर्फे पुन्हा करण्यात आले. अशा प्रयत्नांचे मुख्यत्वे दोन उद्देश असतात: (१) सामाजिक सुरक्षा पुरविणे: म्हणजे ज्यांना वृद्धत्व, आजार, अपंगत्व, बेकारी, वैधव्य किंवा इतर प्रसंगामुळे पुरेशी कमाई करणे अशक्य होते. त्यांना त्यांच्या गरजांनुसार पुरेसे किमान उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था करणे व (२) शिक्षण, आरोग्यसेवा, कल्याणसेवा आणि गृहनिवसन यांसारख्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे. ग्रेट ब्रिटनसारखे विकसित राष्ट्र १९७० मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी २३·७ टक्के खर्च सामाजिक सेवांवर करीत असूनसुद्धा वरील दोन्ही उद्देश तेथे पूर्णतः साध्य झाले नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. सामाजिक सेवा शासनातर्फे उपलब्ध होऊ लागल्या, म्हणजे त्या अधिकाधिक प्रमाणावर व अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या मिळाव्यात अशा अपेक्षा व मागण्या निर्माण होतात; म्हणूनच यूरोपमधील अनेक राष्ट्रे नानाविध कल्याणकारी योजनांवर भरपूर खर्च करीत आहेत व त्यासाठी त्यांना करपातळी उंच ठेवावी लागत आहे. यापैकी बराचसा खर्च योजनांच्या प्रशासनासाठी नेमाव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करावा लागतो. अशा योजनांचा परिणाम म्हणजे नागरिक शासनावर अधिकाधिक प्रमाणावर अवलंबून राहतात व कल्याणसेवांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना बराच त्रास सोसावा लागतो आणि वेळही खर्च करावा लागतो. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सरासरी वास्तव्य उत्पन्न उपासमारीच्या पातळीच्या बरेच वर असल्यामुळे कल्याणसेवा किती प्रमाणात, कशा प्रकारच्या व कोणत्या पद्धतीने द्यावयाच्या, हेच निर्णय शासनाला घ्यावयाचे असतात व त्यांचे स्वरूप बऱ्याच अंशी आर्थिक नसून राजकीय असते.

विकसित राष्ट्रांनासुद्धा दारिद्र्याची समस्या अद्याप काही प्रमाणात भेडसावीत आहे. दारिद्र्यामुळे अकिंचनांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन निकृष्ट तर होतेच, शिवाय त्यांचे व्यक्तिमत्वही खुजे राहते. त्यांच्या जीवनात आणि कौटुंबिक सौख्यात अस्थैर्य येते. भावनात्मक अनारोग्य व गुन्हेगारी आणि चारित्र्यहीनता यांसारख्या आडवळणी वागणुकीचा उगमही दारिद्र्यातच होतो. अशा दरिद्री कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरही दारिद्र्याचा पगडा बसतो. अपपोषण, अपुरे वैद्यकीय साहाय्य, गलिच्छ घरे व डळमळीत भविष्यकाळाविषयीची धास्ती यामुळे अकिंचनांची वैयक्तिक व सामाजिक वागणूक अवनतीस जास्त असल्यास नवल नाही. अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये तर दारिद्र्य ही एक प्रमुख आर्थिक समस्या बनते. विकसित राष्ट्रांचे अनुकरण करून आर्थिक विकास साधण्याचे त्यांचे प्रयत्नही दारिद्र्याता परिहार करण्यास अपुरे पडतात.

भारताच्या बाबतीत सर्वांत मोठी आर्थिक समस्या दारिद्र्याचीच आहे, याविषयी एकमत आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक नियोजनाद्वारे लोकशाही तत्त्वानुसार गरिबी हटविण्याचे प्रयत्न विविध आघाड्यांवर चालू आहेत. भारतातील दारिद्र्यपीडित लोकांच्या संख्येविषयी अनेक तज्ञांनी वेळोवेळी अंदाज केले आहेत. ओझा यांच्या अंदाजाप्रमाणे १९६०–६१ मध्ये ग्रामीण लोकसंख्येच्या ५१·८ टक्के व शहरी लोकसंख्येच्या ७·६ टक्के मिळून एकूण लोकसंख्येच्या ४४ टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत होते. बर्धन यांच्या अंदाजानुसार दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ग्रामीण भागात १९६०–६१ मध्ये एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या ३८ टक्के होते व ते १९६७–६८ मध्ये ५३ टक्क्यांपर्यंत वाढले. दांडेकर व रथ यांच्या अंदाजाप्रमाणे १९६०–६१ मध्ये ग्रामीण लोकसंख्येपैकी ४० टक्के व शहरी लोकसंख्येपैकी ५० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते व १९६७–६८ पर्यंत या टक्केवारीत काहीही फरक पडला नव्हता. मिनहास यांच्या मते दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण ग्रामीण भागात कमी होत आहे. १९६०–६१ मध्ये ते ४६ टक्के होते, तर १९६७–६८ मध्ये ते ३७·१ टक्क्यांपर्यंत कमी झाले. नियोजन आयोगाच्या अंदाजाप्रमाणे पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीसदारिद्र्य

आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध होणारी साधने ज्यांना अपुरी पडतात, अशा माणसांची स्थिती म्हणजे दारिद्र्य असे स्थूलमानाने म्हणता येईल. या संदर्भात मूलभूत गरजा कोणत्या, हे निश्चित करावे लागते. मूलभूत गरजांची व्याख्या मर्यादित किंवा व्यापक अशा दोनही दृष्टींनी करता येते. केवळ जिवंत राहण्यासाठी ज्या आवश्यक त्याच मूलभूत गरजा, अशी मर्यादित व्याख्या केल्यास उपासमारीच्या जवळपास टेकलेले लोक दरिद्री समजावे लागतील. मूलभूत गरजांचा व्यापक दृष्ट्या विचार केल्यास ज्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी जगण्यासाठी पुरेशा परंतु सर्वसाधारण जनतेच्या राहणीमानाशी तुलना करता कमी दर्जाच्या असतात, त्या सर्वांना दरिद्री समजावे लागेल. अर्थात दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. निरनिराळ्या राष्ट्रांच्या दरिद्री लोकांची राहणी अन्य राष्ट्रातील दरिद्री लोकांच्या राहणीच्या मानाने कितीतरी उच्च पातळीवरील असू शकेल. उदा., अमेरिकेसारख्या विकसित औद्योगिक राष्ट्रामध्ये दरिद्री या सदरात मोडणाऱ्या लोकांजवळ मोटार, प्रशीतक, धुलाईयंत्र, दूरचित्रवाणी इ. असू शकतील. अनारोग्य, शिक्षणाचा व कौशल्यांचा अभाव, समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, विध्वंसक वा बेशिस्त वागणूक, दूरदृष्टीचा अभाव इ. गोष्टीही दारिद्र्याशी निगडित असलेल्या आढळतात, परंतु दारिद्र्याच्या व्याख्येत त्यां समावेश सहसा करीत नाहीत. मात्र दारिद्र्याचे परिणाम व्यक्तिमात्रास तसेच समाजास नुकसानकारक ठरतात, यांबद्दल एकमत आहे.

दारिद्र्याचे अनेक प्रकार आढळतात: (१) अल्पकालीन दारिद्र्य : औद्योगिक राष्ट्रांमधील जीवनमान व्यापारचक्रानुसार बदलत असते. मदीच्या काळात तेथील बेकारी वाढते, वस्तूंचे भाव घसरतात, उत्पादन व उत्पन्न यांच्यामध्ये घट होते. या घटनांचा परिणाम समाजातील निकृष्ट उत्पन्नाच्या गटातील लोकांना विशेष जाणवतो. त्यांना आर्थिक मदत देऊन किंवा तात्कालिक सार्वजनिक कामे हाती घेऊन हे संकट कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येतात. मंदीचा काळ संपला म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा भरभराटीच्या मार्गास लागते आणि दारिद्र्य कमी होते. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये असे मर्यादितकालीन दारिद्र्य अपरिहार्यच समजले जात असे; परंतु व्यापारचक्राची कारणमीमांसा जसजशी स्पष्ट होत गेली, तसतसे आर्थिक मदत किंवा सार्वजनिक कामे अशा कार्यक्रमांऐवजी मंदीविरोधी राजकोषीय धोरण अनुसरणे, शेअरबाजार व वायदेबाजार यांचे नियंत्रण करणे, आंतरराष्ट्रीय सुस्थितीत ठेवून दारिद्र्याच्या दुष्परिणामांना आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. (२) दीर्घकालीन सामूहिक दारिद्र्य : दारिद्र्य सामूहिक स्वरूपाचे आणि दीर्घकाळ टिकणारेही असू शकते. बऱ्याच अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये सापेक्षतया ते जवळजवळ सार्वत्रिकच असते. आशियातील बराचसा प्रदेश, मध्यपूर्व आफ्रिका आणि मध्य व द. अमेरिका यांमधील बऱ्याचशा भागांतील बहुसंख्य लोकांचे राहणीमान अत्यंत निकृष्ट आहे. उपासमार, अपपोषण, अल्पायुष्य, बालमृत्युंचे आणि प्रसूतिकाळी स्त्रियांच्या मृत्युसंख्येचे मोठे प्रमाण व अनारोग्य ही दरिद्री लोकसंख्येची सामान्य लक्षणे आढळतात. असे दारिद्र्य सामान्यतः आर्थिक विकासाचा अभाव दर्शविते. या राष्ट्रांजवळील साधमसामग्रीच अपुरी असते. तिचे समप्रमाणात सर्व लोकांमध्ये वाटप केले, तरी त्यांना पुरेशा जीवनसुविधा मिळणे अशक्य होईल. यावर दोन उपाय संभवतात. एकतर कृषिविकास व औद्योगिकरण यांच्या द्वारे एकुण राष्ट्रीय उत्पादन वाढविणे व दुसरा म्हणजे लोकसंख्यावाढीचे नियंत्रण करणे. केवळ एकूण राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्याने राहणीमान सुधारतेच असे नाही; कारण अन्नोत्पादन वाढले म्हणजे लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होऊन वाढत्या उत्पादनाचा राहणीमानावर विशेष अनुकूल परिणाम होत नाही. औद्योगिक उत्पादनात होणारी वाढ देखील धनिकांनाच विशेष फलदायी ठरून गरीब गरीबच राहण्याची शक्यता असते. शिवाय राष्ट्रीय उत्पादन वाढविण्यासाठी गरीब राष्ट्रांना परकीय भांडवलाची गरज भासते आणि हे कर्ज व त्यावरील व्याज यांची फेड करण्यासाठी राष्ट्रीय उत्पादनवाढीचा बराचसा भाग वापरावा लागल्यामुळे प्रत्यक्ष राहणीमानात फारशी सुधारणा संभवत नाही. विकसित राष्ट्रांमध्ये काही विशिष्ट समूहांना दीर्घकालीन दारिद्र्य अनुभवावे लागते. महानगरांतील आणि शहरांतील झोपडपट्ट्या, अविकसित प्रांत किंवा विभाग आणि जेथील कृषी व उद्योग अकार्यक्षम आहेत, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दीर्घकालीन दारिद्र्य भोगावे लागते. त्यावर उपाय म्हणजे कृषिसुधारणा करणे, नवीन उद्योगांना त्या भागांत आकर्षून घेणे व तेथील लोकांना प्रशिक्षण, कामधंदा व इतर सोयी पुरविणे हे होत. (३) दीर्घकालीन व्यक्तिगत दारिद्र्य : सार्वत्रिक भरभराटीच्या वातावरणातसुद्धा काही व्यक्ती दीर्घकाळपर्यंत दरिद्रीच राहतात. याचे कारण त्या आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यास असमर्थ असतात. त्यांचे शारीरिक व मानसिक दौर्बल्य, अपुरे शिक्षण व प्रशिक्षण आणि समाजाशी जुळवून घेण्याची त्यांची असमर्थता यांमुळे त्यांचे उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या खाली असते. त्यांच्या शिक्षणाची सोय करून व त्यांना सुरक्षित कामधंदा पुरवून मदत करता येते. काहींच्या बाबतीत तर आळस, नशाबाजी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांसारख्या दोषांमुळे ते चिरकाल दरिद्री राहतात, अशा लोकांना थोडीफार आर्थिक मदत दिली जाते किंवा त्यांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागते.

दारिद्र्यपीडित लोकांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी दोन प्रकारची असते: त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती वाटते, त्याचप्रमाणे तिरस्कारही वाटतो. सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांना साहाय्य करावयाचे झाल्यास ते कमीत कमी करावे; अन्यथा ते आळशी बनून आत्मोद्धाराचे प्रयत्नच करणार नाहीत अशी धास्ती वाटते. दारिद्र्याविरुद्ध योजण्यात आलेल्या उपायांचा इतिहास पाहिल्यास असे आढळते की, अठराव्या शतकात निरंकुशतेच्या तत्वाचा प्रभाव पडल्यामुळे बाजारपेठीय अर्थव्यवस्थाच दारिद्र्य नाहीसे करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाई. अडम स्मिथला जरी अकिंचनांविषयी सहानुभूती वाटत असे, तरी त्यांना आर्थिक साहाय्य केल्यास त्यांच्यामध्ये कितपत सुधारणा होईल, याविषयी तो साशंक होता. अकिंचनांसाठी द्रव्यसाहाय्याची योजना अंमलात आणल्यास श्रमिकांना उपलब्ध असणारा वेतननिधी कमी होऊन त्यांना आर्थिक अडचण सोसावी लागेल व अशा रीतीने दारिद्र्यात भरच पडेल, असे स्मिथने गृहीत धरले. मॅल्थसचे म्हणणे होते की, अन्नोत्पादनात होणारी वाढ, तिच्यापेक्षा अधिक वेगाने होणाऱ्या लोकसंख्यावाढीमुळे, तसेच युद्ध, दुष्काळ व रोगराई यांच्या अभावामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास असमर्थ ठरेल. या विचारसरणीतूनच आर्थिक विकास साधण्यासाठी बऱ्याच लोकांचे दारिद्र्य ही एक आवश्यक बाबच आहे, असे मानण्यात येऊ लागले. विकासासाठी बचतीचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्यामुळे संपत्तीचे व उत्पन्नाचे विषम वाटप हेच विकासास अनुकूल समजले जाऊ लागले. या विचारसरणीला धार्मिक तत्ववेत्त्यांच्या काही प्रमेयांची पुष्टी मिळाली. ईश्वरी अनुग्रहानेच एखाद्याची सांपत्तिक प्रगती शक्य होते व जर समाजात काही व्यक्ती अकिंचन असल्या तर ती ईश्वरी इच्छाच असली पाहिजे; तेव्हा त्यांना मदत करून ईश्वरी इच्छेविरुद्ध जाणे इष्ट नव्हे, असेही विचार प्रसृत करण्यात आले. त्यातच अदूरदर्शित्वामुळे किंवा नशाबाजीमुळे जर काहींना दारिद्र्य आले असेल, तर त्यांनी ती शिक्षा भोगलीच पाहिजे, असाही मतप्रचार झाला. अर्थशास्त्रज्ञांच्या आणि धर्मवेत्त्यांच्या या विचारसरणीमुळे अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दारिद्र्याचा परिहार करण्याचे प्रयत्न अत्यंत कमी प्रमाणात झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डार्विनच्या सिद्धांताचा प्रभाव पडून अनियंत्रित स्पर्धा हीच समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे व म्हणून अकिंचनांना आर्थिक मदत करणे सामाजिक उत्कर्षास बाधक होईल, असा समज दृढ होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ही विचारसरणी मागे पडली आणि अकिंचनांमध्ये व त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करता येणे शक्य आहे, या मताचा पुरस्कार होऊ लागला. निरंकुशतेच्या तत्त्वावरही टीका होऊ लागली. निरंकुश स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेले स्वतःच्या गुणांमुळे व कर्तबगारीने उच्चपदी गेले, की स्पर्धेचा व सत्तेचा स्वहितासाठी उपयोग करून त्यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यातूनच अकिंचनांना स्पर्धेत भाग घेता यावा व संपन्नांना मिळणारा अनुचित फायदा कमी व्हावा म्हणून अकिंचनांना साहाय्य करणे आवश्यक आहे, असा विचार पुढे आला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास चालू असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांवरील वाढत्या खर्चासंबंधी जी सर्वेक्षणे करण्यात आली त्यांत असे आढळले, की अकिंचनांसाठी असलेल्या निवाससंस्थांमधून मुख्य भरणा शारीरिक व मानसिक व्याधी असलेले वृद्ध आणि अर्भके असलेल्या माता यांचाच होता. भिक्षागृहांमधील परिस्थिती तर अत्यंत गर्हणीय होती ; कारण तेथे गर्दी व अस्वच्छता तर असेच, परंतु वेड्यांसाठी खास उपचारांचीही सोय नव्हती. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत दरिद्री, आजारी, बालके यांच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या संस्था काढण्यात आल्या. गरीबांना आर्थिक साहाय्य देणाऱ्या संस्था खाजगी स्वरूपाच्या होत्या. खाजगी देणग्या गोळा करूनच अकिंचनांच्या मूलभूत गरजा त्या जेमतेम भागवू शकत. ‘टॉयन्बी हॉल’ सारख्या पुनर्वसनगृहांमधून अकिंचनांसाठी शिक्षणाचे व सामाजिक सहजीवनाचे काही कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते चालवीत असत. १८९० ते १९१० या कालखंडात पुनर्वसनगृह–कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक सर्वेक्षक आदींचा प्रभाव सामाजिक धोरणांवर पडू लागला व दारिद्र्य ही केवळ व्यक्तिगत आपत्ती नसून ती एक सामाजिक समस्या आहे, याची जाणीव तीव्रतेने होऊ लागली. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात पाश्चिमात्य राष्ट्रांत झपाट्याने आर्थिक विकास होऊनसुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी, कामगार व बेकार यांच्यामध्ये असंतोष व अशांतता असे. अशा परिस्थितीत त्यांच्या हिंसक प्रवृत्तीही बळावत चालल्याने त्यांवर इलाज म्हणून शासनातर्फे दारिद्र्याच्या परिहाराचे कार्यक्रम हाती घेण्यात येऊ लागले.

सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांनी अकिंचनांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊ केली नाही. सक्तीचे शिक्षण, गृहनिवसन, सार्वजनिक आरोग्यसुधारणा, स्त्रिया व मुले यांच्या कामाच्या तासांवर व वेतनांवर नियंत्रण इ. उपायांनी दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर बेकारी–विमा, कामगारांना नुकसानभरपाई, आरोग्यविमा यांसारखे कार्यक्रम सुरू करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कामगारांतर्फे प्रत्यक्ष आर्थिक मदतीच्या मागण्यांना जोर आला व त्यांतूनच जर्मनी व ग्रेट ब्रिटनमध्ये सक्तीचा अंशदानात्मक विमा व अमेरिकेत बेकारी–विमा व वार्धक्यसाहाय्य हे कार्यक्रम सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा साहाय्य योजना पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सार्वत्रिक झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर तेथील दारिद्र्याची समस्या पडद्याआड गेली. युद्धोत्तर प्रगतीमुळे ती जवळजवळ नाहीशी झाली, अशी भावना समाजशास्त्रज्ञ व इतर तज्ञ यांच्यामध्ये निर्माण झाली. १९६० नंतर मात्र अमेरिकेत व इतरत्र दारिद्र्याचा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला व तो सोडविण्याचे प्रयत्न शासनातर्फे पुन्हा करण्यात आले. अशा प्रयत्नांचे मुख्यत्वे दोन उद्देश असतात: (१) सामाजिक सुरक्षा पुरविणे: म्हणजे ज्यांना वृद्धत्व, आजार, अपंगत्व, बेकारी, वैधव्य किंवा इतर प्रसंगामुळे पुरेशी कमाई करणे अशक्य होते. त्यांना त्यांच्या गरजांनुसार पुरेसे किमान उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था करणे व (२) शिक्षण, आरोग्यसेवा, कल्याणसेवा आणि गृहनिवसन यांसारख्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे. ग्रेट ब्रिटनसारखे विकसित राष्ट्र १९७० मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी २३·७ टक्के खर्च सामाजिक सेवांवर करीत असूनसुद्धा वरील दोन्ही उद्देश तेथे पूर्णतः साध्य झाले नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. सामाजिक सेवा शासनातर्फे उपलब्ध होऊ लागल्या, म्हणजे त्या अधिकाधिक प्रमाणावर व अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या मिळाव्यात अशा अपेक्षा व मागण्या निर्माण होतात; म्हणूनच यूरोपमधील अनेक राष्ट्रे नानाविध कल्याणकारी योजनांवर भरपूर खर्च करीत आहेत व त्यासाठी त्यांना करपातळी उंच ठेवावी लागत आहे. यापैकी बराचसा खर्च योजनांच्या प्रशासनासाठी नेमाव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करावा लागतो. अशा योजनांचा परिणाम म्हणजे नागरिक शासनावर अधिकाधिक प्रमाणावर अवलंबून राहतात व कल्याणसेवांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना बराच त्रास सोसावा लागतो आणि वेळही खर्च करावा लागतो. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सरासरी वास्तव्य उत्पन्न उपासमारीच्या पातळीच्या बरेच वर असल्यामुळे कल्याणसेवा किती प्रमाणात, कशा प्रकारच्या व कोणत्या पद्धतीने द्यावयाच्या, हेच निर्णय शासनाला घ्यावयाचे असतात व त्यांचे स्वरूप बऱ्याच अंशी आर्थिक नसून राजकीय असते.

विकसित राष्ट्रांनासुद्धा दारिद्र्याची समस्या अद्याप काही प्रमाणात भेडसावीत आहे. दारिद्र्यामुळे अकिंचनांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन निकृष्ट तर होतेच, शिवाय त्यांचे व्यक्तिमत्वही खुजे राहते. त्यांच्या जीवनात आणि कौटुंबिक सौख्यात अस्थैर्य येते. भावनात्मक अनारोग्य व गुन्हेगारी आणि चारित्र्यहीनता यांसारख्या आडवळणी वागणुकीचा उगमही दारिद्र्यातच होतो. अशा दरिद्री कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरही दारिद्र्याचा पगडा बसतो. अपपोषण, अपुरे वैद्यकीय साहाय्य, गलिच्छ घरे व डळमळीत भविष्यकाळाविषयीची धास्ती यामुळे अकिंचनांची वैयक्तिक व सामाजिक वागणूक अवनतीस जास्त असल्यास नवल नाही. अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये तर दारिद्र्य ही एक प्रमुख आर्थिक समस्या बनते. विकसित राष्ट्रांचे अनुकरण करून आर्थिक विकास साधण्याचे त्यांचे प्रयत्नही दारिद्र्याता परिहार करण्यास अपुरे पडतात.

भारताच्या बाबतीत सर्वांत मोठी आर्थिक समस्या दारिद्र्याचीच आहे, याविषयी एकमत आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक नियोजनाद्वारे लोकशाही तत्त्वानुसार गरिबी हटविण्याचे प्रयत्न विविध आघाड्यांवर चालू आहेत. भारतातील दारिद्र्यपीडित लोकांच्या संख्येविषयी अनेक तज्ञांनी वेळोवेळी अंदाज केले आहेत. ओझा यांच्या अंदाजाप्रमाणे १९६०–६१ मध्ये ग्रामीण लोकसंख्येच्या ५१·८ टक्के व शहरी लोकसंख्येच्या ७·६ टक्के मिळून एकूण लोकसंख्येच्या ४४ टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत होते. बर्धन यांच्या अंदाजानुसार दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ग्रामीण भागात १९६०–६१ मध्ये एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या ३८ टक्के होते व ते १९६७–६८ मध्ये ५३ टक्क्यांपर्यंत वाढले. दांडेकर व रथ यांच्या अंदाजाप्रमाणे १९६०–६१ मध्ये ग्रामीण लोकसंख्येपैकी ४० टक्के व शहरी लोकसंख्येपैकी ५० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते व १९६७–६८ पर्यंत या टक्केवारीत काहीही फरक पडला नव्हता. मिनहास यांच्या मते दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण ग्रामीण भागात कमी होत आहे. १९६०–६१ मध्ये ते ४६ टक्के होते, तर १९६७–६८ मध्ये ते ३७·१ टक्क्यांपर्यंत कमी झाले. नियोजन आयोगाच्या अंदाजाप्रमाणे पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीस एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत व त्यांचा दरडोई उपभोगखर्च दरमहा ४० रु. पेक्षाही कमी आहे. भारतीय योजनाकारांच्या मते दारिद्र्याची दोन प्रमुख कारणे आहेत: (१) भारतीय अर्थव्यवस्था अर्धविकसित आहे. आजही एकूण उत्पादक लोकसंख्येपैकी ६६ टक्के लोक कृषिव्यवसायात असून हे प्रमाण गेली २५ वर्षे कायमच आहे. तरीसुद्धा कृषी व तत्सम उद्योगांचे उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या १९६०–६१ मधील ४९ टक्क्यांवरून १९७०–७१ मध्ये ४०·३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. कृषिव्यावसायिकांची उत्पादकताही इतर श्रमिकांच्या उत्पादकतेच्या मानाने बरीच कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत असावी तेवढी विविधता आली नसल्यामुळे वाढत्या श्रमिकबलास कृषिक्षेत्राबाहेरील व्यवसायांत रोजगार मिळू शकत नाही. शिवाय तिची संरचना बरीचशी संकुचित व विपर्यस्त आहे. बहुतेक सर्वच उद्योग व विशेषतः उपभोग्यवस्तूंची निर्मिती करणारे उद्योग साधारणतः ग्रामीण व शहरी भागांतील अल्पसंख्य धनिकांच्या गरजा पुरविण्यावरच भर देतात. ग्रामीण व शहरी भागांतील अतिसधन २० टक्के कुटुंबे एकूण उपभोग्यवस्तूंच्या उत्पादनापैकी सु. ४० टक्के वस्तूंचा उपभोग घेतात, असे १९६७–६८ मध्ये आढळले. या लोकांच्या हातातच बहुतेक उत्पादनसामग्री, संपत्ती आणि सत्ता असल्यामुळे ते अर्थातच स्वहिताकडेच विशेष लक्ष पुरवितात आणि म्हणून दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या राहणीमानात फारशी सुधारणा आढळत नाही. (२) उत्पादक साधनांच्या वाटपात विषमता असल्याने उत्पन्नाचे वाटपही विषमच होत असते व ही विषमता दारिद्र्यास कारणीभूत होते. शेतजमिनीच्या मालकीमध्ये ही विषमता दारिद्र्यास कारणीभूत होते. शेतजमिनीच्या मालकीमध्ये ही विषमता अगदी उघडपणे आढळते.य १९६०–६१ मध्ये प्रत्येकी १० एकरांहून अधिक जमीन ताब्यात असलेल्या कुटुंबापैकी १२ टक्के कुटुंबाच्या मालकीखाली एकूण जमिनीपैकी ६१ टक्के जमीन होती. शिवाय कृषिउत्पादन पद्धतीही अर्धसरंजामी स्वरूपाची असल्याने श्रीमंत शेतकरी व बागायतदार यांना आपल्या कुळांचे शोषण करणे शक्य होते. जमीनमालकच आपल्या कुळांचे सावकार बनून त्यांची पिळवणूक करू शकतात. अशा परिस्थितीत कुळे व भूहीन शेतमजूर सतत दारिद्र्यातच राहिल्यास नवल नाही.

भारतातील दारिद्र्याचा प्रश्न अत्यंत अवघड व गुंतागुंतीचा आहे. भारताची लोकसंख्या प्रतिवर्षी सु. अडीच टक्क्यांनी वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाचा वेग प्रतिवर्षी जर तीन टक्केच राहिला, तर एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी अर्ध्या टक्क्याइतकेच उत्पादन दारिद्र्याचा परिहार करण्यासाठी शिल्लक राहू शकतो आणि अर्थातच दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या जीवनमानात फारसा फरक पडू शकत नाही. हा प्रश्न सोडविण्याचे अनेक मार्ग सुचविण्यात आले आहेत : (१) कृषिव्यवसायातील भूहीन शेतमजुरांना मालकीची जमीन मिळाल्यास व उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत, साधने व मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना आपल्या उत्पन्नात भर टाकता येऊन दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध होईल. (२) लहान शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जरूर त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे उत्पन्न वाढून ते स्वयंपूर्ण होऊ शकतील. (३) भाववाढीमुळे गरीब लोकांना दारिद्र्य अधिक कष्टप्रद होते, म्हणून श्रीमंत लोकांची क्रयशक्ती कमी करून तिचे सुयोग्य वाटप केल्यास गरीबांची क्रयशक्ती वाढू शकेल. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग श्रीमंताच्या गरजा भागविणाऱ्या उत्पादनासाठी न करता गरीबांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या निर्मितीसाठी केल्यास दारिद्र्याचा काहीसा परिहार होणे शक्य आहे. (४) केवळ राष्ट्रीय उत्पादन व संपत्ती यांची वाढ झाल्याने दारिद्र्य नाहीसे करता येईल असे नाही. उत्पादनवाढ कोणत्या वस्तूंची व सेवांची होते आणि तिचे व संपत्तीचे वाटप दारिद्र्य कमी करण्याच्या दृष्टीने कितपत सुयोग्य आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणूनच उत्पादनाइतकेच वाटपाकडे लक्ष पुरविले जाणे आवश्यक आहे. (५) दारिद्र्याचा परिहार करण्यासाठी अर्धबेकारांना आणि बेकारांना किफायतशीर रोजगार मिळवून देणे हाच खात्रीलायक मार्ग आहे. केवळ राजकोषीय धोरणात काही औपचारिक फेरबदल करून उत्पन्नाच्या वाटपामधील विषमता काही प्रमाणात कमी केल्याने दारिद्र्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणूनच आर्थिक विकासासाठी नियोजित विनियोग करताना श्रमप्रधान प्रकल्पांना अग्रक्रम देणे आवश्यक आहे. (६) आदिवासी आणि मागासवर्गातील लोकांना राष्ट्रीय उत्पादनप्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणावर सामील करून घेण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. (७) कुटुंबनियोजनाचा प्रचार व प्रसार वाढवून वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्याने दारिद्र्याच्या परिहारास मदत होईल. (८)पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये पुरस्कारिलेल्या वीस कलमी आर्थिक कार्यक्रमामध्ये दारिद्र्याचा परिहार करण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम आहेत. त्यांची धडाडीने अंमलबजावणी केल्यानेही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना पुष्कळच दिलासा मिळू शकेल. पाचव्या पंचवार्षिक योजनेत या कार्यक्रमासाठी एकूण १०,३६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत व त्यांचा दरडोई उपभोगखर्च दरमहा ४० रु. पेक्षाही कमी आहे. भारतीय योजनाकारांच्या मते दारिद्र्याची दोन प्रमुख कारणे आहेत: (१) भारतीय अर्थव्यवस्था अर्धविकसित आहे. आजही एकूण उत्पादक लोकसंख्येपैकी ६६ टक्के लोक कृषिव्यवसायात असून हे प्रमाण गेली २५ वर्षे कायमच आहे. तरीसुद्धा कृषी व तत्सम उद्योगांचे उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या १९६०–६१ मधील ४९ टक्क्यांवरून १९७०–७१ मध्ये ४०·३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. कृषिव्यावसायिकांची उत्पादकताही इतर श्रमिकांच्या उत्पादकतेच्या मानाने बरीच कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत असावी तेवढी विविधता आली नसल्यामुळे वाढत्या श्रमिकबलास कृषिक्षेत्राबाहेरील व्यवसायांत रोजगार मिळू शकत नाही. शिवाय तिची संरचना बरीचशी संकुचित व विपर्यस्त आहे. बहुतेक सर्वच उद्योग व विशेषतः उपभोग्यवस्तूंची निर्मिती करणारे उद्योग साधारणतः ग्रामीण व शहरी भागांतील अल्पसंख्य धनिकांच्या गरजा पुरविण्यावरच भर देतात. ग्रामीण व शहरी भागांतील अतिसधन २० टक्के कुटुंबे एकूण उपभोग्यवस्तूंच्या उत्पादनापैकी सु. ४० टक्के वस्तूंचा उपभोग घेतात, असे १९६७–६८ मध्ये आढळले. या लोकांच्या हातातच बहुतेक उत्पादनसामग्री, संपत्ती आणि सत्ता असल्यामुळे ते अर्थातच स्वहिताकडेच विशेष लक्ष पुरवितात आणि म्हणून दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या राहणीमानात फारशी सुधारणा आढळत नाही. (२) उत्पादक साधनांच्या वाटपात विषमता असल्याने उत्पन्नाचे वाटपही विषमच होत असते व ही विषमता दारिद्र्यास कारणीभूत होते. शेतजमिनीच्या मालकीमध्ये ही विषमता दारिद्र्यास कारणीभूत होते. शेतजमिनीच्या मालकीमध्ये ही विषमता अगदी उघडपणे आढळते.य १९६०–६१ मध्ये प्रत्येकी १० एकरांहून अधिक जमीन ताब्यात असलेल्या कुटुंबापैकी १२ टक्के कुटुंबाच्या मालकीखाली एकूण जमिनीपैकी ६१ टक्के जमीन होती. शिवाय कृषिउत्पादन पद्धतीही अर्धसरंजामी स्वरूपाची असल्याने श्रीमंत शेतकरी व बागायतदार यांना आपल्या कुळांचे शोषण करणे शक्य होते. जमीनमालकच आपल्या कुळांचे सावकार बनून त्यांची पिळवणूक करू शकतात. अशा परिस्थितीत कुळे व भूहीन शेतमजूर सतत दारिद्र्यातच राहिल्यास नवल नाही.

भारतातील दारिद्र्याचा प्रश्न अत्यंत अवघड व गुंतागुंतीचा आहे. भारताची लोकसंख्या प्रतिवर्षी सु. अडीच टक्क्यांनी वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाचा वेग प्रतिवर्षी जर तीन टक्केच राहिला, तर एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी अर्ध्या टक्क्याइतकेच उत्पादन दारिद्र्याचा परिहार करण्यासाठी शिल्लक राहू शकतो आणि अर्थातच दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या जीवनमानात फारसा फरक पडू शकत नाही. हा प्रश्न सोडविण्याचे अनेक मार्ग सुचविण्यात आले आहेत : (१) कृषिव्यवसायातील भूहीन शेतमजुरांना मालकीची जमीन मिळाल्यास व उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत, साधने व मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना आपल्या उत्पन्नात भर टाकता येऊन दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध होईल. (२) लहान शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जरूर त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे उत्पन्न वाढून ते स्वयंपूर्ण होऊ शकतील. (३) भाववाढीमुळे गरीब लोकांना दारिद्र्य अधिक कष्टप्रद होते, म्हणून श्रीमंत लोकांची क्रयशक्ती कमी करून तिचे सुयोग्य वाटप केल्यास गरीबांची क्रयशक्ती वाढू शकेल. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग श्रीमंताच्या गरजा भागविणाऱ्या उत्पादनासाठी न करता गरीबांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या निर्मितीसाठी केल्यास दारिद्र्याचा काहीसा परिहार होणे शक्य आहे. (४) केवळ राष्ट्रीय उत्पादन व संपत्ती यांची वाढ झाल्याने दारिद्र्य नाहीसे करता येईल असे नाही. उत्पादनवाढ कोणत्या वस्तूंची व सेवांची होते आणि तिचे व संपत्तीचे वाटप दारिद्र्य कमी करण्याच्या दृष्टीने कितपत सुयोग्य आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणूनच उत्पादनाइतकेच वाटपाकडे लक्ष पुरविले जाणे आवश्यक आहे. (५) दारिद्र्याचा परिहार करण्यासाठी अर्धबेकारांना आणि बेकारांना किफायतशीर रोजगार मिळवून देणे हाच खात्रीलायक मार्ग आहे. केवळ राजकोषीय धोरणात काही औपचारिक फेरबदल करून उत्पन्नाच्या वाटपामधील विषमता काही प्रमाणात कमी केल्याने दारिद्र्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणूनच आर्थिक विकासासाठी नियोजित विनियोग करताना श्रमप्रधान प्रकल्पांना अग्रक्रम देणे आवश्यक आहे. (६) आदिवासी आणि मागासवर्गातील लोकांना राष्ट्रीय उत्पादनप्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणावर सामील करून घेण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. (७) कुटुंबनियोजनाचा प्रचार व प्रसार वाढवून वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्याने दारिद्र्याच्या परिहारास मदत होईल. (८)पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये पुरस्कारिलेल्या वीस कलमी आर्थिक कार्यक्रमामध्ये दारिद्र्याचा परिहार करण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम आहेत. त्यांची धडाडीने अंमलबजावणी केल्यानेही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना पुष्कळच दिलासा मिळू शकेल. पाचव्या पंचवार्षिक योजनेत या कार्यक्रमासाठी एकूण १०,३६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या