स्वताचे अपयश झाकण्यासाठी एम आय एमला करतात बदनाम - डॉ परवेज अशरफी


 स्वताचे अपयश झाकण्यासाठी एम आय एमला करतात बदनाम - 

डॉ परवेज अशरफी  

अहमदनगर -

नुकतेच भारतात ५ राज्याचे निवडणूक झाल्या त्यात पूर्ण देशाचे उत्तर प्रदेश आणी त्यानंतर पंजाब राज्याकडे लक्ष होते. उत्तर प्रदेशात सरकार बदलण्यासाठी व मागील ५ वर्षात झालेल्या अत्याचार व सरकार सामान्य जनते विरोधात असल्याचा दावा करण्यात आले. उत्तर प्रदेशात भारतातील जवळ जवळ सर्व पक्षाने आपली किस्मत आजमवली. त्यात हैदराबाद येथील ए आय एम आय एम पक्षानेही आपले उमीदवार निवडणुकीत उतरवले. ५ वर्ष पेक्षा जास्त एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व त्यांचे सहकारी उत्तर प्रदेशात पक्ष बळकट करण्यासाठी कष्ट करत होते. हैदराबाद, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, असे अनेक राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते उत्तर प्रदेशात प्रत्यक विधानसभा शेत्रात कष्ट करत होते. एम आय एम पक्ष अध्यक्ष बरीस्तेर असदुद्दिन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात आपले पक्षातर्फे उमिदवार दिले. बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसीने उत्तर प्रदेश निवडणुकी पूर्वी हे स्पष्ट केले होते की त्यांची पक्ष भाजप आणी कॉंग्रेस सोडून कोणत्याही पक्षासोबत गठबंधन करण्यास तयार आहे. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, आझाद पार्टी, अशे अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवत होते. काही एम आय एम सोबत गठबंधन करण्यास तयार नव्हते, काहींनी गठबंधन करून तोडले तर काही आज ही एम आय एम सोबत गठबंधन मध्ये आहे. निवडणुकीच्या पूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना एक पत्रकाराने एम आय एमला सोबात घेणार की नाही असे प्रश्न विचारले तर अखिलेश यादव ने नकार दिला कारण एम आय एम पक्षावर खूप आरोप होत आहे असे दिले. बसपा अध्यक्ष मायावती हे देखील एम आय एम सोबत जाण्यास तयार नव्हते. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांक समाजाचे सर्व पक्षांना मते हवी होती परंतु एम आय एमला सोबत घेण्यास तयार नव्हते.


एम आय एम पक्ष अध्यक्ष यांनी आपल्या परीने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला व प्रदेश अध्यक्ष शौकत अली यांनी १०० जाग्यावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय अद्याक्षाकडे दिले.


निवडणुकाचे निकाल आले आणी नेहमी सारखे दुसऱ्यांचे अपयशाचे खापर एम आय एम पक्षावर व पक्ष अध्यक्ष बॅरिस्टर ओवेसी यांचावर फोडण्यात आले. प्रत्यक व्यक्ती विश्लेसन करायला लागले की जर एम आय एम पक्षाने निवडणूक लढवली नसती तर समाजवादी पार्टी सत्ते मध्ये असती. एम आय एम भाजपा ची बी टीम आहे. एम आय एम ने भाजपला आतून मदत केली. एम आय एम मुळे १६५ जागा भाजपा जिंकला. असे अनेक विश्लेषण वहाटस अप्प विद्यालयातील विध्यार्थी द्यायला लागले. परंतु त्यातील कोणीही सदर बातमी मध्ये किती सत्य आहे याची शहानिशा केली नाही. यात सुशिक्षित वर्ग ही मागे नव्हता. म्हणजे एम आय एम यांनी किती नुकसान केले हे दाखवण्यात कोणीही मागे नव्हते.

परंतु काही प्रश्न जे निर्माण झाले आहे त्याचे उत्तर मिळणे खूप गरजेचे.

१) एम आय एम भाजपा व कॉंग्रेस सोडून कोणत्याही पक्ष सोबत जाण्यास तयार होती तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणी बहुजन समाज पार्टी यांनी एम आय एमला सोबत का घेतले नाही?

२) उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजाने ७५ % पेक्षा जास्त मते समाजवादी पार्टी म्हणजे अखिलेश यादव यांना दिले तर समाजवादी पार्टी यांना कोणाचे मते मिळाली नाही किंवा कमी मिळाले याचा विश्लेषण कोण करणार?

३) समाजवादी पार्टी, कॉंग्रेस व बसपा यांना मुस्लिम समाजाचे मते पाहिजे पण मुस्लिम नेते का चालत नाही?

४) उत्तर प्रदेशात आम आदमी पार्टी, शिवसेना, एन सी पी असे अनेक पक्षाने आपले उमीदवार रिंगणात उतरविले होते परंतु खापर फक्त एम आय एम पक्षावर का फोडण्यात आले?

५) जेव्हा एम आय एम ने फक्त ९७ जागी उमीदवार दिले तर भाजप १६५ जागी एम आय एम मुळे कशा जिंकला?

६) अशे चुकीचे मेसेज कोन व्हैराल करतो याचा कश्या प्रकारे फायदा मिळतो?

७) समाजवादी पक्षाचा उमीदवार ज्या विधानसभा शेत्रात पराभव झाला त्या विधानसभा शेत्रात एम आय एम सोबत कॉंग्रेस, बसपा, आप यांना किती मते मिळाली याचा विश्लेषण कोण करणार?

८) एम आय एम पंजाब, मणिपूर, गोवा या राज्या मध्ये निवडणूक लढवले नाही तर त्या राज्यात भाजप व आप यांना बहुमत कोणामुळे मिळाला?

या सर्वाचे उत्तर मिळणे व सामान्य जनतेला याची जाणीव होणे गरजेचे आहे की उत्तर प्रदेशात व अन्य ३ राज्यात भाजपला जनतेने बहुमत दिले तर पंजाब मध्ये कॉंग्रेस व भाजपला जनतेने नाकारून आम आदमी पार्टीला बहुमत दिले.

उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतांनी भाजपचा अशोक राणा विजय झाले. धामपूर येथून समाजवादी पक्षाचे नईम उल हसन यांचा २०३ मतांनी पराभव केला.म्हणजे २०० पेक्षा कमी मतांनी कोणीच निवडून आले नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघात एम आय एम निवडणूक लढविले नाही.

 11 उमेदवारांना 500 किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळाला आहे. यामध्ये भाजपच्या 7 आणि समाजवादी पक्षाच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. अगदी याच प्रकारे 500 ते 1000 मतांच्या फरकाने विजय मिळालेल्या उमेदवारांची संख्या आहे 4. यामध्ये 2 उमेदवार समाजवादी पार्टीचे, 1 उमेदवार भाजपचा आणि 1 उमेदवार आहे निर्बल इंडियन शोषित हमारा आम दलाचा.

आता 1000 ते 2000 मतांच्या फरकाने विजय संपादन करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला असता ही संख्या आहे 14. यामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे 9, समाजवादी पार्टीचे 4 आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश असल्याचे बघायला मिळतेय.

उत्तर प्रदेशात सर्व पक्ष निवडणुका लढले परंतु खापर एम आय एमवर का फोडण्यात आले? त्याचा कारण जो मला वाटते म्हणजे भारतातील राजकीय पक्षाला अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे मते पाहिजे परंतु त्यांचा नेता त्यांना चालत नाही. या पक्षाला कार्यकर्ता पाहिजे जो त्यांचा सांगण्यावर चालेल परंतु त्यांना अशा नेतृत्व नको जो समाजाचे प्रश्न विधानसभा, संसद मध्ये उचलेल.

एम आय एम पक्षाला व बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवेसी यांना मानणारा वर्ग दिवसेन दिवस वाढत आहे. मुस्लिम समाजच नव्हे तर सर्व समाजाचे लोक एम आय एम सोबत जुडत आहे. याची धास्ती केंद्रात व राज्यात सत्ता भोगलेले पक्षाने घेतली आहे ज्यांनी मुस्लिम समाजाला आपली व्होट बँक समजले होते त्यांनी कधीच मुस्लिम समाजाचे नेते तयार केले नाही त्या उलट अल्पसंख्यांक सामाजाला आपला नेता निवडण्या पूर्वी या पक्षाने त्यांची बोली बोलणारा व्यक्ती समाजावर लाधले.

एम आय एम पक्ष व बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी सर्व भारतात पक्ष वाढी साठी प्रयत्न करत आहे. ओवेसी साहेब प्रत्यक भाषण मध्ये सांगतात की आम्ही शोषित वंचित दुर्भाल घटक यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणी प्रयत्न करत राहणार. कोणी काहीही आरोप करो आम्हाला भारतीय राज्य घटनेने निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे आणी आम्ही लढणार. शोषित वंचित समाजासाठी नेहमी लढा देणार.


ज्या कॉंग्रेस ने ३९८ लढून फक्त २ जागा आणी बसपा ४०३ मधून फक्त १ उमिदवाऱ निवडून आणले व आप ने जवळ जवळ ३ लाख मते घेतले त्यांना कोणीही बोलायला तयार नाही याचा एकाच कारण मंजे मुस्लिम आणी एम आय एम ला बदनाम करून आपले अपयश जणते समोर येऊ न देणे.

या लेख लिहिण्याचा उद्देश एकाच की एम आय एम आणी बरीस्स्तेर ओवेसी हे मुस्लिम, अल्पसंख्यांक समाज, शोषित, वंचित समाज यांना सत्तेत त्यांची भागेदारी मिळावी या हेतूनी संघर्ष करत आहे. 

 ज्या प्रकारे बॅरिस्टर असदुद्दीन साहेब संसदेत असो किंवा प्रचारात प्रत्येक विषयावर बोलतात त्यामुळे या स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना त्यांची भीती वाटायला लागली आहे. ज्या मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाला इतक्या दिवस भाजपची भीती दाखुन आम्ही त्यांचे मते घेतली त्यांना त्यांचा अधिकारी देण्यासाठी एम आय एम पक्ष प्रयत्न करत आहे.

आज एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील साहेबांनी महाविकास आघाडी सरकारला  आम्ही येतो तुमच्या बरोबर वरिष्ठांना सांगा आमचा निरोप आणि द्या उत्तर म्हणत टीकाकारांची तोंडे बंद केली.

एआयएमआयएम युपीए सरकार बरोबर होती त्यावेळी कोणालाही एलर्जी नव्हती.

कोणी कितीही आरोप केलेतरी एआयएमआयएम आपला संघर्ष चालू ठेवणार. आज जिंकलो नाही तर काय झाले पुढची तयारीला लागणार…. आमचा संघर्ष चालू राहणार

डॉ परवेज अशरफी, ( जिल्हाध्यक्ष एआयएमआयएम अहमदनगर)

 

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या