साखर झोप

 

##   साखर झोप  ##         

          १ मे १९२१ रोजी मुंबई कामगार कार्यालयाची स्थापना झाली प्रत्यक्षात ही स्थापना त्या वेळेचे मुंबई प्रांत गव्हर्नर लॉर्ड लाईड यांनी गोरगरीब असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या कामगार कार्यालयाची स्थापना केली अशा प्रकारे स्थापन झालेले संपूर्ण भारतातील पहिले कार्यालय होते. आणि त्यापासून आजपर्यंत जवळपास ७७ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत. कामगार कार्यालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून या कार्यालयाकडून. "( प्रादेशिक विभाग )

(१) कोकण विभाग / मुंबई

(२) पुणे विभाग / पुणे

(३) नागपूर व अमरावती / नागपूर

(४) नाशिक विभाग / नाशिक

(५) औरंगाबाद विभाग / औरंगाबाद

 १९२६ साली या कार्यालयाचे नाव बदलण्यात आले  १९३९ साली कार्यालय विभाजन करण्यात आले.  १९५३ पूर्वी मुंबई कामगार कल्याण कार्यालय स्थापन होईपर्यंत कामगार कल्याण याचे काम  संचालक कामगार कल्याण यांचेमार्फत पाहिले जात होते.  १९५३ नंतर वेगळे कामगार कल्याण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. १९७९ मध्ये कामगार कल्याण कार्यालयाची फेररचना करण्यात आली.  

कोरोना मुळे सर्व सामान्य जनतेला बांधकाम कामगार व अन्य व्यक्ती अडचणीत सापडला आहे शासनाने या परस्थिती वर मात करण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी बांधकाम कामगारांच्या हाताला काम नाही उपासमारीची वेळ आली आहे म्हणून कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये  म्हणून जीवीत नोंदणी असणार्या कामगाराचया खात्यात सानुग्रह अनुदान २००० देत आहे शासन कामगार जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहे यात उलटं कामगाराचे शुभचिंतक म्हणणारे त्या सानुग्रह अनुदानातून   प्रत्येकी २००० तून २००/३००/काढून घेत आहेत आमच्या मुळे हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत असे सांगितले जाते कोणीही कामगाराने अशा एजंट लोकांना १/रुपयां सुध्दा देवू नका  तशी मागणी कोण करीत असेल तर पोलिस स्टेशनला जावून भेटा 

कामगारानो जागे व्हा 

एजंट गिरी बंद करा पुढे या तक्रार करा 

     बांधकाम कामगारांना हे अंदाजे दरपत्रक माहिती आहे का

१ ‌. ५००० मिळवून देण्यासाठी १५००

२   २०/००० मिळवून देण्यासाठी ५००० 

३ ‌‌. १ ००००० मिळवून देण्यासाठी  २५०००

४   २००० मिळवून देण्यासाठी ५००

५ ‌  २००००० मिळवून देण्यासाठी ५०/०००

६.  ५ लाख मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये 

७.  /६०००० मिळवून देण्यासाठी १५/०००

८   १० हजार मिळवून देण्यासाठी  ३ हजार 

९.  /२४००० हजार मिळवून देण्यासाठी   ७ ‌‌हजार 

१०/   सुरक्षा संच मिळवून देण्यासाठी ५००/रुपये 

११.  /६००० व्यसन मुक्ती साठी मिळवून देण्यासाठी ३०००

१२.   / ११वी १२ वी साठी १०००० मिळवून देण्यासाठी ३००० 

13. नोंदणी फी:- १०००

 हे कोणी ठरवले आहे हे लाभ मिळवून घेण्यासाठी पैसे देणारा खरा कामगार नाही 

कामगारानो जागे व्हा कोणीही  एजंट संघटना सेवाभावी संस्था युनियन लाभ मिळवून दिला म्हणून पैस मागू शकत नाही 

तसे निदर्शनास आल्यास पोलिस स्टेशनला संपर्क साधावा 

   मजूरांचे राज्य यावे 

का कामगार व मजूरांचा नायक नको

कामगार व मजूर  ग्रांमपंचायत सदस्य का नको

कामगार व मजूर नगरपालिका नगरसेवक का नको 

कामगार व मजूर पंचायत समिती सदस्य का  नको

कामगार व मजूर जिल्हा परिषद सदस्य का नको

कामगार व मजूर सहकारी संस्था सदस्य का नको

कामगार व मजूर खासदार का नको

कामगार व मजूर आमदार का नको

कामगार व मजूरांना शहाने करायचं नाही कामगारांन फक्त काम करायचं आणि निवडणुकीत जय जय म्हणायचे कोणाचं निवडणूकिच जेवून दारु कोठे आहे पैसे पाच वर्षांसाठी किती दिलं  

   बांधकाम कामगाराची  खेडी व शहरी भागात सहजतेने तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून  खालील प्रमाणे अधिका-यांना शासनाने घोषित केले आहे

विभागाचे नाव

ग्राम विकास विभाग

१  गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व

नगरविकास विभाग 

२ ‌ आफिसर महानगरपालिका सर्व

नगरविकास विभाग 

३  मुख्य अधिकारी नगरपरिषद सर्व

सार्वजनिक बांधकाम विभाग

४  उप अभियंता  सर्व

जलसंधारण विभाग

५  उप अभियंता सर्व

पाणीपुरवठा विभाग 

६  उप अभियंता सर्व 

कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग 

७  साहयक कल्याण आयुक्त सर्व 

८ कामगार विकास अधिकारी सर्व

९  कामगार कल्याण अधिकारी सर्व 

कामगार विभाग  

कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य

अप्पर कामगार आयुक्त

कामगार उपायुक्त

सहाय्यक कामगार अधिकारी

कामगार अन्वेषक 

दुकाने निरिक्षक 

वरील सर्व अधिकारी वर्गाला कामगार नोंदणी करण्यासाठी शासनाने नोंदणी अधिकारी म्हणून नेमले आहे पण आजवर कोणतेही कामगारांच्या नोंदणी या अधिकाऱ्यांनी केलेल्या नाहीत कारण माहित नाही  

शासनाचा निर्णय दिनांक ०२/जानेवारी २०१८ ला कामगार हितासाठी जारी करणेत आला आहे अधिकारी वर्गाने थोड गांभीर्याने घेतले तर कामगार नोंदणी जलद व सापेक्ष होण्यास  मदत होईल विचार करा 

   दि 1 मे 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे मंडळ असंघटित कामगार म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या कामांवर मजूरीसाठी जाणारे जे अडाणी गरजू व्यसनी असतात मिळणार या पगाराच्या पैसयातुन कसाबसा उदरनिर्वाह चालवत आहेत हे सर्व शासनाने लक्षात घेऊन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्यात कामगार हितासाठी विविध 19. कल्याणकारी योजना राबविण्यात येतात नोंदणी साठी वय वर्षे  18 ते 60. निश्चित करण्यात आले आहे यामध्ये कामगार लग्नापासून ते त्यांच्या बायकोसाठी आरोग्य योजना मुलांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजना व स्वता कामगारांसाठी विमा आरोग्य अशा विविध योजना राबविण्यात येतात 

  परवा शासनाने वेळोवेळी कामगार कामावर असताना विविध प्रकारचे अपघात होताना शासनाच्या निदर्शनास आले  या सर्व परस्थिती चां  आडावा घेऊन कामगारांना अपघात पासुन वाचविण्यासाठी  कोट्यवधी रुपये खर्च करून  सुरक्षा संच देण्याचे ठरविले त्यांचे वाटप सुध्दा मंडळाच्या अटि शर्ती नुसार करण्यात आले आपल्या सांगली जिल्ह्यात असे कितीतरी सुरक्षा संच आले असतिल त्याचा आकडा मला सांगता येणार नाही 

    मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून योजना आणली संच वाटप झाले की मंडळांची जबाबदारी संपली काय आज सुरक्षा संच वाटप तर झाले पण कोठेही सुरक्षा संच कामावर कामगार वापरत नाही मंडळाकडे आमची मागणी आहे अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षा संच ज्या भागात झाले आहेत तेथे महिन्यातून एक वेळ सर्वे करण्यात यावा जो कामगार सुरक्षा संच वापरत नाही त्या कडून तो मागे घेण्यात यावा अन्यथा मंडळाची फसवणूक केली या कारणांमुळे त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

   जिल्ह्यात पुरुष कामगारापेक्षा महिलांना सुरक्षा संचांचे काय उपयोग नसताना कोणत्या कारणाने वाटप झाले व कल्याणकारी मंडळांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सुरक्षा संचामध्ये. हेल्मेट हंडणगोलज सतरंजी सुरक्षा बेल्ट बॅटरी बुट मोठी पत्र्याच्या पेटी जेवनाचा डबा असे बरेच साहित्य आहे .

    कामगार चळवळी

स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्या करिता कामगारांनी वेळोवेळी केलेलेसंघटितप्रयत्‍न. अर्थात अशीच ळवळहोण्या करिता एका बाजूला उत्पादन-साधनाच्या मालकी पासून वंचित झालेले व मोलाने काम करण्या शिवाय कोणतेही अन्य उप‌जीविकेचे साधन नसलेले कामगार, तर दुसर्‍याबाजूलाउत्पादन-साधनांची मालकी असलेले आणि कामगारांची पिळवणूक करून आपला नफा जास्तीत जास्तवाढ विण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले भांडवलदार, असे परस्परविरोधी हितसंबंधांचे दोनवर्गसमाजात अस्तित्वात आले पाहिजेत. सरंजामशाही व कुटिरोद्योग ह्यांचा र्‍हास व भांडवल शाहीचा उदय, ह्यानंतरच खर्‍या अर्थाने कामगार वर्ग निर्माण झाला व भांडवलदारा पासून संरक्षण करण्या करिता त्यास चळवळ करावी लागली. त्यापूर्वी-देखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कामगार चळवळ नव्हती, असे नव्हे; पणत्या चळवळी मागे समाजातील इतर घटकां पासून आपले हित संबंध पूर्णतः वेगळे आहेत, ही जाणी वतित कीशी ठळक पणे नव्हती.

आर्थिक इतिहासात राजकीय (कामगारांना मतदानाचा हक्क, कायदेमंडळ प्रतिनिधित्व) तसेच आर्थिक कारणांकरिताही (वेतनवाढ, सामाजिकसुरक्षा, कल्याणयोजना उपलब्ध करणे, वेतनघट रोखणे, औद्योगिक व्यवस्थापनात सहभागिता वगैरे) कामगार चळवळी झालेल्या आढळतात. प्रगत देशांतूनही कामगार संघटनांना वैधिक मान्यता आणि भांडवलदार व शासन ह्यांच्यापासून संरक्षण, ह्यांसाठीही कामगार चळवळी घडून आल्या. सर्व प्रकारच्या कामगार चळवळींचे अंतिम हेतू कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारणे, रोजगारप्राप्ती, संघटनेतील कामगारांच्या रोजगारीबाबतच्या अग्रहक्कास मान्यता आणि कामगार हिताच्या दृष्टिकोनातून कामाच्या परिस्थितीचे नियंत्रण करणे, हेच असतात.

        भांडवलशाहीशी लढा देऊन वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कामगारांनी वेळोवेळी स्वीकारलेले तत्त्वज्ञान आणि मार्ग ह्यांत विविधता आढळते. यूटोपियावाद, आदर्शवाद, राज्यकेंद्रित समाजवाद, साम्यवाद, अराजकतावाद, फेबियन समाजवाद, श्रेणी समाजवाद, श्रमिकसंघवाद, ख्रिश्चन समाजवाद, कामगार संघटनावाद, सहकारवाद वगैरे विविध तत्त्वज्ञानांचा कामगार चळवळींवर वेगवेगळ्या काळांत प्रभाव पडलेला दिसतो. इंग्‍लंडमध्ये चार्टिस्ट व यंत्रांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेल्या लुडाईट ह्यांची विचारसरणी कामगार चळवळीस काही काळ प्रेरक झाली होती. काही तत्त्वज्ञांस विद्यमान समाजरचनेत घटनात्मक मार्गाने परिवर्तन घडवून आणणे मान्य होते. इंग्‍लंडमधील फेबियन समाजवादी व श्रेणी समाजवादी विचारवंत ह्या वर्गात मोडतात. राज्यसंस्था ही कायम स्वरूपाची संस्था असून सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता तिचा साधन म्हणून उपयोग करता येईल, असा ‌त्यांचा विश्वास होता.

          जर्मनीतील तत्त्ववेत्ता फेर्दीनांट लासाल (१८२५-१८६४), हाही त्यांपैकीच एक होय. कामगाराचे वेतन निर्वाहाच्या पातळीवर जखडून ठेवल्यामुळे कामगारांची पिळवणूक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अनिवार्य आहे व तीमध्ये कामगारांच्या हिताचे संरक्षण होऊ शकणार नाही; म्हणून भांडवलशाही नाहीशी करून सहकार संस्थांवर ‌अधिष्ठित अर्थव्यवस्था स्थापन केली पाहिजे आणि त्याकरिता शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशी लासालची विचारप्रणाली होती. सरकारकडून कर्ज घेऊन सहकारी संघटना स्थापून वस्तूंचे उत्पादन करावे व ह्या सहकारी संस्थांचा कारभार नीट चालावा, त्यांचे भांडवल सुरक्षित रहावे ह्याकरिता शासनाने कायदे करावेत, अशी त्याची योजना होती. ह्याउलट असे परिवर्तन क्रांतिकारक मार्गानेच होऊ शकेल, असे मानणारे काही तत्त्वज्ञ होते; पक्षीय राजकारण व संसदीय मार्ग ह्यांवर त्यांचा विश्वास नव्हता. मार्क्सवाद, श्रमिकसंघवाद, फ्रान्समधील ‘कॉन्फेडरेशन जनरेली दर ट्रव्हेल’ व इंग्‍लंडमधील ‘नवीन कामगार संघटना’ (न्यू युनियनिझम) आदी ह्या वर्गात मोडतात. ह्यांपैकी मार्क्सच्या विचारांचा जगातील कामगार चळवळींवर फारच प्रभाव पडला. कामगार चळवळींचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असून ह्या चळवळीद्वारा क्रांती घडवून सर्व जगात साम्यवाद प्रस्थापित करता येणे शक्य आहे, असे मार्क्सचे म्हणणे होते. इतर तत्त्वज्ञांचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादी होता; कामगार चळवळीचा विस्तार राष्ट्राच्या भौगोलिक मर्यादेपुरताच त्यांना अभिप्रेत होता.सर्वसाधारणपणे कामगार चळवळींमागे धर्माचा प्रभाव फारसा आढळत नाही.      जर्मनीतील ख्रिश्चन कामगार संघटना ह्या कॅथलिक लोकांना समाजवादापासून बचावण्याकरिता स्थापन झाल्या होत्या, त्याचप्रमाणे इंग्‍लंडमधील ख्रिश्चन समाजवादी तत्त्वज्ञानही धार्मिक प्रवृत्तीला आवाहन होते. अर्थात अशा विचारांचा पगडा फार काळ टिकला नाही. कामगार चळवळींच्या इतिहासाच्या सिंहावलोकनातून दोन ठळक प्रवृत्ती दिसतात : मंदीच्या काळात सर्वसामान्यपणे कामगार क्रांतिकारक विचारसरणीचे अनुयायी होतात; कारण बेकारी उद्‌भवते व तीमुळे कारखानदारांचे सौदा करण्याचे सामर्थ्य वाढून कामगारवर्ग व त्यांची चळवळ निष्प्रभ होते. अशा वेळी कामगारांचा प्रचलित अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडून ती उलथून पाडण्याचे आवाहन त्यांच्या बाबतीत प्रभावी होते. याउलट भरभराटीच्या काळात जवळजवळ पूर्ण रोजगारी असल्यामुळे कामगारांची स्पर्धाशक्ती वाढलेली असते. अशा वेळी ते मवाळ तत्त्वज्ञानाचे अनुयायी होतात. कारण रोजगारीची निश्चितता आणि कामगारांचे लक्ष ताबडतोब मिळणार्‍या फायद्याकडे असल्यामुळे बौद्धिक व तात्त्विक नेतृत्त्वाची ते कदर करीत नाहीत. कामगार संघटनेच्या सदस्यांत होणारी वाढही आर्थिक चक्रानुसार होते. पूर्ण रोजगारीच्या काळात सदस्यांची संख्या वाढते, तर मंदीच्या काळात ती घटते.

           पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव रशिया व त्याच्या वर्चस्वाखाली देशांत सध्या आढळून येतो. इतर अनेक देशांतही समाजवादी तत्त्वज्ञान स्वीकारलेल्या कामगार संघटना आहेत; तथापि त्या तितक्याशा प्रभावी नाहीत. याउलट प्रचलित अर्थ-चौकटीतच कायद्याच्या साहाय्याने व कामगारांची सौदाशक्ती वाढवून कामगारांच्या हितसंरक्षक चळवळी आढळतात. अशा विचारसरणीचा प्रभाव अमेरिका, जर्मनी व फ्रान्समधील कामगार चळवळींवर आहे. लोकशाहीच्या व घटनात्मक मार्गाने अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणता येणे शक्य आहे, अशा विचारप्रवाहाच्या कामगार चळवळी इंग्‍लंड, भारत वगैरे देशांत आढळतात. विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर भांडवलशाहीच्या स्वरूपातही फरक होत चालला आहे. एका बाजूला भांडवलदार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मक्तेदारी निर्माण करून प्रचंड औद्योगिक संस्था निर्माण करीत आहेत, तर दुसर्‍या बाजूला त्यांना तोंड देण्याकरिता कामगारांच्याही बलाढ्य संघटना निर्माण होत आहेत. त्याचबरोबर स्वसंरक्षणाकरिता भांडवलशाहीने कामगार संघटनेचे अस्तित्व तिचा सांघिक सौदा म्हणजेच सामुदायिक वाटाघाटी करण्याचा हक्क, कल्याणकारी राज्य व नियंत्रित भांडवलशाही ह्या कल्पनांनाही मान्यता दिली आहे.          शासनाने कामगार कल्याणाकरिता काही कायद्यांवाटे कारखानदारांवर काही नियंत्रणे घातली आहेत. इतकेच नव्हे, तर काळाची पावले ओळखून भांडवलशाहीदेखील कामगारास कारखान्यांच्या नफ्यात आणि व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यास थोडीथोडी प्रवृत्त झालेली दिसत आहे.

       भारतात पहिल्या महायुद्धानंतर खर्‍या अर्थाने कामगार चळवळीची वाढ होऊ लागली व ह्या काळातच तिला राष्ट्रव्यापी स्वरूप आले. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि रशियन राज्यक्रांती; परिणामी १९२० साली ‘अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस’ (आयटक) प्रस्थापित झाली. १९२६ साली कामगार संघटनेला कायदेशीर स्वरूप आले. १९२९ साली आयटकमध्ये फूट पडून ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन’ची स्थापना झाली. ह्या संघटनेने शांततेच्या सनदशीर मार्गाने कामगारांची गार्‍हाणी दूर करण्याचे ध्येय पुढे ठेविले होते, तर याउलट आयटक साम्यवादी होती. ह्यानंतर आयटकमध्ये आणखी फूट पाडून जहालवाद्यांनी १९३१ साली वेगळी कामगार संघटना प्रस्थापित केली. १९४० साली ह्या सर्व संघटनांचा समझोता झाला, परंतु युद्धविषयक धोरणाबाबत झालेल्या मतभेदांमुळे रॉयनी वेगळ्या कामगार संघटनेची स्थापना केली.

दुसर्‍या महायुद्धोत्तर काळात राष्ट्रीय सभेतील पुढार्‍यांच्या पुरस्काराने व साम्यवादाचे वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने ‘इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस’ची (इंटक) स्थापना झाली. महात्मा गांधींच्या तत्त्वानुसार कामगारांची गार्‍हाणी निवारण्याचे ध्येय इंटकने आपल्यापुढे ‌ठेविले. यानंतर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी ‘हिंद मजदूर सभा’ नामक कामगार संघटना स्थापन केली. त्याचबरोबर जनसंघपुरस्कारित ‘भारतीय मजदूर संघ’ ह्या नावाची नवी कामगार संघटना अस्तित्वात आली. ‘युनायटेड ट्रेड युनियन कॉंग्रेस’ ही राजकारणापासून अलिप्त असलेली आणखी एक कामगार संघटना आहे.

प्रत्येक धंद्यात एकच कामगार संघटना असावी, कामगार चळवळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त ठेवावी आणि कार्यकर्ते व पुढारी संघटनेतूनच निर्माण व्हावेत, अशा धोरणाचा सध्या पुरस्कार केला जात आहे. विशेषतः नियोजनात्मक अर्थव्यवस्थेत अशा दृष्टिकोनाची अनिवार्य जरूरी आहे. भारतातील कामगार चळवळ ही वेतन, महागाई भत्ता, बोनस इ. कारणांमुळे झाली. ह्या चळवळीचा एक विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील कापडगिरण्यांतील कामगारांनी संप केला असता, कामगार व कारखानदार ह्यांतील मतभेद सामोपचाराच्या मार्गांनी कसे सोडविता येतील, याबद्दल गांधीजींनी घालून दिलेला आदर्श. आज भारतात कामगार व मालक ह्यांच्यातील तेढ सोडविण्याकरिता औद्योगिक समित्या, वेतनमंडळे, संयुक्त शासन मंडळे व सक्तीचे लवाद, ह्या यंत्रणेचा उपयोग केला जात आहे. त्याबरोबरच कामगार व कारखानदार ह्यांच्यातील तंटे सामोपचाराने, शांततेच्या मार्गाने आणि सामुदायिक वाटाघाटींच्या साहाय्याने सुटावेत, असे शासनाचे धोरण आहे व अशाच तर्‍हेची विचारसरणी ‘‌गिरी दृष्टिकोन’ म्हणून प्रसिद्ध आहे.

          कामगार आयुक्त कार्यालय यांचेकडून असंघटित कामगारांच्या. साठी विविध कामे केली जातात. कामगार / मालक औधोगिक विवाद / मध्यस्थी /समेट घडवून आणणे / औधोगिक क्षेत्रात शांतता / सौदा पूर्ण व शांततेत राखणे. / कामगार न्याय / हक्क/ कामगार कायदे / केंद्रीय कायदे. १९ / राज्य कामगार कायदे ६/ ‌कामगार हे बहुतांशी अशिक्षित. अडाणी गरजू व्यसनी असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक. ठेकेदार इंजिनिअर यांचेकडून पिळवणूक होणयाची जास्त शक्यता असते करिता त्यांना त्यांचे रोजगाराच्या सेवा शर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक सुरक्षितता. आर्थिक स्वावलंबन. प्रधान करण्याच्या हेतूने विविध कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत त्यांची परिणामकारक अंमलबजावणी मालक. / ठेकेदार / इंजिनिअर यांचेकडून केली जात आहे किंवा कसे याची खात्री करून घेण्याकरिता असे कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत अशा कारयसथाळचे निरीक्षण करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सरकारी अधिकारी नेमण्यात येतात त्यांना " निरिक्षक " असे म्हणतात 

            ८/३/२००० अन्वये नागरिक सनद तयार करण्यात आली त्यानुसार  कामगार आयुक्त भवन मध्ये चालणार्या कामांचा  व्यवहाराचा. पारदर्शकता येण्यासाठी लोकाभिमुख करणे बंधनकारक आहे.  लोकांच्या प्रती दायित्व वाढविणे.  भ्रष्टाचाराला आळा घालणे. कामगार कायदे सोपे व त्याबद्दल असणारे गैरसमज दूर करणे.  यासाठी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आधिपत्याखाली उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे २५ विविध कामगार कायदे अधिनियमाचे प्रशासन व अंमलबजावणी केली जाते नागरिक सनद तयार करण्यासाठी अधिनियमाअंतरगत प्राधान्याने ज्या सेवा सुविधा पुरविल्या जातात तो निकष धरुन  १४ अधिनियमाकरिता नागरिक सनद तयार करण्यात आली आहे 

        कामगार समान वेतन किमान वेतन प्रमाणे वेतन.  कामांचे तास.  आठवडा सुट्टी.  बालमजुरी विरोधी. २६ जानेवारी/ १ मे / १५ आॅगसट / २ आक्टेबर   महिलांना. सकाळी ६ पूर्वी व रात्री ८-३० नंतर काम करणेस प्रतिबंध. २४० दिवस काम केल्यावर २१ दिवसांची भरपगारी रजा. 

          बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना (१९) चालू करण्यात आल्या आहेत त्यात प्रामुख्याने कुटुंबातील महिला  आरोग्य योजना  मुले मुली शिक्षण घेण्यास विविध अर्थसाह्य. बांधकाम कामगार लग्नापासून ते त्यांच्या आरोग्य योजना. विविध अर्थसाह्य योजना विमा मृत्यू पाश्चात्य वारसास अर्थसाह्य. अशा विविध योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८/६०/ निश्चित करण्यात आले आहे त्यासाठी तो व्यक्ति बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे. त्याने बांधकाम कामगार म्हणून काम केल्याच्या ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केलेला दाखला असणे गरजेचे आहे 

            बांधकाम कामगार यांना विविध योजना मिळवून देण्यासाठी गावात तालुका जिल्हा स्थावर विविध कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट दलाल तयार होण्यास सुरुवात झाली आणि मग चालू झाले भोळ्याभाबड्या कामगाराला लुटण्याचे षडयंत्र यात सहायक कामगार आयुक्त भवन मधील काही अधिकारी व कर्मचारी अशा कामगार नेते कामगार शुभचिंतक याना मदत करतात  आणि आम्ही खातो तुम्ही खा असा फंडा वापरला जातो. कामगार नोंदणी पासून ते मिळणार या योजनेतील लाभातून मोठा वाटा काढून घेतला जातो काही दलाल एजंट तर कामगारा बरोबर बॅंकेत सुध्दा जातात  कामगारांना दमदाटी करणे. आणि जणू सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकार व कर्मचारी सुध्दा या वैयक्तिक नोंदणी साठी जाणारया कामगारांचे कोणतेही काम करतं नाहीत उलट या कामगारांना विचारलें जाते तुम्ही कोणाकडून आलाय. ? मयताचे सुध्दा लाभाचे पैसे हे असे लोक खात आहेत. यांना वरदहस्त नेते मंडळींचा आहे. हा माझा आहे तो त्यांचा आहे अशी वर्गवारी केली जाते.

        वाढता महिलांचा कामगार संघटना सहभाग विचार करायला लावणारा आहे कारणं येथे मोठ्या प्रमाणावर बोगस कामगार नोंदणी केली जाते ज्यांचा बांधकाम व्यावसायाशी कोणताही संबंध नाही अशा बोगस कामगार नोंदणी केली जाते जसे दुकानदार. रिक्षा चालक. घरात घरकाम करणाऱ्या महिलां.  नोकरी वर असणारे लोक. अशा विविध लोकांना कल्याणकारी मंडळ योजनांचा लाभ  बेमाफी फि घेवून दिला जात आहे त्यामुळे मंडळाचे लाखों रुपये अशा बोगस कागदपत्रांच्या जोरावरच नोंदणी केलेल्या कामगार यांचेवर खर्च केला जात आहे याला सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकार व कर्मचारी हे सुद्धा सामिल आहेत 

          आजचं बांधकाम कामगार यांनी साखर झोपेतून जाग व्हा नाहीतर मंडळांचा सर्व कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस कामगार लुटणार आहेत वरिल सर्व गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमली आहे कां? यासाठी कोणते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कां? 

   बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

नातं नातं

 

नातं नातं  

माणूस समाजप्रिय समुदाय मध्ये राहणारा प्राणी आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या नात्यात अडकलेला असतो. आपणं आपल्या नात्यामुळे एकामेकात अडकून आहोत . पती पत्नी. मुलगा मुलगी. आई वडील. आजी आजोबा. सासू सून. मित्र सोयरे. अश्या विविध रक्ताच्या व मैत्रीच्या नात्याने संबंध दृढ होतात. 

          आपल्या नात्यात चांगलें वाईट क्षण येतात. त्याला आपणच आणि आपले तोंड जबाबदार असतें. आपल्या तोंडावर बोलण्यावर नियंत्रण असण गरजेच आहे. कारणं प्रत्येक कुटुंबात. मैत्रीत आपल्या काही वागण्यामुळे त्यात अंतर येते. त्यासाठी आपणं कस वागल पाहिजे याचे ज्ञान आपणास गरजेचे आहे. आग पाणी होणे गरजेचे आहे असा निसर्ग नियम सांगतो . 

पती पत्नी यांनी आपले जीवन सुखकर होण्यासाठी कस वागल पाहिजे कस वागावे 

** जोडीदाराचा मनापासून स्विकार करा

**;एकामेकाशी स्पर्धा करण एकामेकाची कुचेष्टा करू नका

** एकामेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा 

** जोडीदाराने बदलायलाच हवं असा आग्रह धरू नका

** जोडीदाराला क्वालिटी टाईम द्या 

** जोडीदाराचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस कधीही विसरू नका

** एकामेकाला पुरेशी स्पेस द्या

** एकामेकाना गृहित धरु नका 

** सतत चुका न दाखवता क्षमा करण्याचा मोठेपणा जपा

** परस्परांच्या नात्यावर आक्रमण करु नका या ठराविक गोष्टीचा अवलंब केल्याशिवाय संसार जीवन सुखी आणि समाधानी होणार नाही

 ## मुलगा आणि मुलगी व यांनी कश्याप्रकारे आपल्या मुलांना समजावले पाहिजे कस वागवलं पाहिजे 

** मुलगा मुलगी लहान असेल तेव्हा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वागणूकीत शिक्षा करणं गरजेचं आहे

** लाड प्रेम माया यांचा वेळेनुसार अवलंब केला पाहिजे

** आपणं जिथ काम करतो तिथे मुलांना घेऊन जाणे गरजेचे आहे कारणं त्याशिवाय आपणं पैसा कसा मिळवावा आणि कसा खर्च करावा पैसा मिळविण्यासाठी काय कष्ट करावे लागतात याची जाणीव मुलांना होणार आहे

** तरुण वयात मुलगा मुलगी यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना मित्र म्हणून समजून घेणे समाजात लोकांमध्ये चांगले वाईट काय याची समज विश्वात घेऊन देणें गरजेचे आहे

** मुलगा मुलगी बाबतीत ठराविक गोष्टीत असूदे त्याला काय होतंय हा पवित्रा बदलणं गरजेचं आहे

** वडीलांनी दारु सिगारेट गुटखा .अफू चरस गांजा अशी व्यसने मुल मुली देखत करु नये

** शिव्या देणं भांडण . घरातील व्यक्तिला म्हणजे आई वडील पत्नी यांच्या माराहान शिवीगाळ करू नये यामुळेच मुलांवर तसेच संस्कार घडतील आणि मुलं मुली हातची निघून जातील

** घरातील वातावरण मुलांना मुलींना एकल बनवते आणि त्यामुळे मुल मुली बाहेरचे वेगवेगळ्या नादाला अमिषाला बळी पडतात आणि आपलं जीवन खराब करून घेतात

** परस्थिती बघून मुलांना मुलींना वागण्याचा सल्ला द्या

आपल्या मुलांना मुलींना या गोष्टी शिकविण्यासाठी शिकवणी लावण्याची गरज नाही कारणं आपल्याला संस्कार शिकविणारी आपली पहिली गुरु असतें ते म्हणजे आई सर्वात श्रेष्ठ असतें . शंभर मुल असूनसुद्धा मुलांची वागणूक चांगली नसेल तर एकच मुलगा चांगला

## ‌ कामगार आणि ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार यांनी कस वागल पाहिजे

** कामगारांचा कामांवर अपमान करु नये

** कामगार व्यसनी असेल तर त्याला व्यसनमुक्ती साठी सल्ला द्या

** कामगारांना रास्त पगार द्या

** कामगारांची उचल हजेरी पत्रक इत्यादी लेखी स्वरूपात ठेवा

** कामगारांना सर्व शासकीय निमशासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे विनामूल्य द्या

** कामगारांना विहित वेळेपेक्षा कमी पगाराने कोणी काम करुन घेत असलतर त्याची स़ंबधित पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा

** उचल लेखी नसेल तर कामगारांना कोणताही ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार पैश्याची मागणी करु शकत नाही असं केल्यास त्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात यावा

** कामगारांचे कामांचे पैसे अथवा मजूरी कोणी बुडवणयाचा प्रयत्न करत असेल कामगारांना दम देणें शिवीगाळ करणे अश्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी

** कामगारांना कामांत मजूरी नाही भागीदारी द्या

अश्या प्रकारे कामगारांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यासाठी कोणी अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करा 

## रेशन दुकानदार आणि रेशन ग्राहक

** रेशन दुकानदार यांनी आपल्या दुकानाचे नाव. रजिस्टर नंबर. धान्याची आवक जावक. विविध रेशनकार्ड वर्गवारी नुसार कार्ड संख्या रेशन दुकान फलकांवर लावणे गरजेचे आहे

** रेशन दुकान वेळेवर उघडणे

** रेशन युनिट प्रमाणे वाटप करणे 

** रेशन दुकानात तक्रार पुस्तक उपलब्ध करून देणे

** महिन्याच्या महिन्याला धान्य वितरण करणे . एखाद्या महिन्याला रेशन ग्राहकाने काही कारणास्तव रेशन घेतल नाही तर ते रेशन बुडत नाही पुढील महिन्यात देण रेशन दुकानदार यांना बंधनकारक आहे

** रेशन दुकान विविध सेवा संस्था बचत गट यांनाच मिळाले आहे कां

** रेशन दक्षता समिती वर्षाला बदलली जाते कां? त्यात सर्वसामान्य लोकांमधील महिला पुरुष सभासद् घेतलें आहेत कां ? 

** रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी व कर्मचारी आणि गोदाम निरिक्षक. वाहतूक करणारे यांचें काय लागेबांधे आहेत कां ? 

** अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम आपल्या गावात राबविण्यात आली कां ? 

** रेशनकार्ड सदन आणि दुर्बल आर्थिक सर्वे २००५ पासून आजपर्यंत झाला कां ? 

अश्या विविध माध्यमातून रेशन दुकानदार आणि रेशन ग्राहक यांचें नाते व्यवस्थित आहे कां                  

 ## डॉ आणि मेडिकल व पेशंट

** माणूस आहे म्हणजे आजार आहे त्यासाठी आपल्या गावात असणारे डॉ काय दर्जाचे आहे म्हणजे त्यांची डिग्री कोणती

** दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली आहे कां? 

** दवाखान्यात आजारानुसार उपचार दर निश्चित आहेत कां? 

** दवाखाने स्वच्छ साफ सफाई आहे कां.

** दवाखान्यात असणारा स्टाफ पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणूक देतात कां?

** मेडिकल आणि डॉ यांचे सगणमत आणि कमिशन बेसवर औषध घेण व विक्री केली जाते कां? 

** विविध टेस्ट करण्यासाठी ओळखीच्या दवाखान्याची चिठ्ठी दिली जाते काय

** एम आय आर. एक्सरे. अश्या महागड्या टेस्ट करण्यासाठी मनमानी दराने पेशंटला लुटलं जात कां? 

** बोगस डॉक्टर यांचा आज सुळसुळाट भरपूर झाला आहे तसा कोण आपल्या जवळ आहे कां असेल तर त्याची तक्रार आजचं जवळच्या पोलिस स्टेशनला करा

## जनमाहिती अधिकारी आणि जनता

** सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व विकस भकास या कामांची तपासणी पडताळणी माहिती घेण्यासाठी शासनाने माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर केला पण आज यामध्ये सर्व जनमाहिती अधिकारी पळवाट काढून लोकांना नाहक त्रास देत आहेत

** वैयक्तिक माहिती. त्रेयसत पक्ष. कागदपत्रे सापडतं नाही. अभिलेख गहाळ झाला आहे. माहिती विस्तारित स्वरुपाची आहे. माहिती ३० दिवसांत न देणें. माहिती अधिकार अर्जावर स्टॅम्प नाही. माहिती अधिकार अर्जावर सहि नाही. माहिती अधिकार अर्ज अधिक माहीती मागण्यात आली आहे. जनमाहिती अधिकारी सुनावणीला हजर नाही. अश्या विविध मार्गाने पळवाटा काढून जनमाहीती अधिकारी जनतेला नाहक त्रास देत आहेत यामुळे आज जनता आणि जनमाहीती अधिकारी यांच्या नात्यात कडवटपणा आला आहे

## पोलिस आणि सर्वसामान्य लोक

** लोकांना आपल्यावर होणारा आणि झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी संविधान मध्ये भरघोस अधिकार दिला आहे पण आज प्रशासन नेत्यांच्या खुंटयाला बांधले आहे 

** पोलिसांनी तक्रार नोद करण्याअगोदर दोन्ही गटांना समजावून सांगून पुढील होणारी हाणी थांबविण्यासाठी प्रयत्न करावा

** तक्रार नोंद केल्यावर त्या तक्रारींचा तपास करावा

** शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोष व्यक्तिला शिक्षा झाली नाही पाहिजे

** गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीस माराहान करण्याचा पोलिसांना अधिकार नाही

** आरोपीला बारा तासांच्या आत कोर्टा पुढे ऊभे करणे गरजेचे आहे

** अटक करताना आरोपील त्याचा गुन्हा काय अटक कोण करतंय कशासाठी करतय. अटक करताना जवळ कोण आहे. आरोपीला आपले मत मांडण्याची संधी दिली कां. आरोपीला आपल्या बचावासाठी वकील नेमण्यास वेळ दिला कां. महिला आरोपीला अटक करण्यासाठी महिला पोलिस आहे कां. संध्याकाळी महिला आरोपीस अटक करण कायदा बाह्य आहे. 

** गाडी पकडली असता पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी कायद्यात तरतूद आहे. ड्युटी वर नसेल तर पोलिस गाडी अडवू शकत नाही कोणाला अटक करू शकत नाही पैश्याची मागणी करु शकत नाही. पोलिसांनी अवैध धंदे.गुंडगिरी दहशतवाद. बाल विवाह . मटका. दारु . असे विविध अवैध धंदे रोखण्यासाठी सदैव तत्पर असावे. 

पोलिस आणि जनतेचे नातं नाजुक असतं लोक पोलिसांना आपलं वैरी मानतात तर या पोलिसांना आपले मित्र माणूनच आपल नातं आजचं घट्ट करा

   बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कामगार आरक्षण

 


कामगार आरक्षण

                  बांधकाम कामगार म्हणजे व्यसनी गरजू अडाणी आणि मिळेल ते काम मिळेल ती मजूरी  इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्याकडून शोषण होणारा उपेक्षित घटक म्हणजे बांधकाम कामगार होय . कोणतीही सामाजिक शारीरिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय व इतर सेवा सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी होणारें आर्थिक शोषण संघटना सेवाभावी संस्था युनियन. सामाजिक. राजकीय . संघटना व त्यातील नेत्यांचे बगलबच्चे यांचेकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार यांच नेत्यांच्या वरदहसताखाली खुलेआम शोषण करत आहेत . यासाठी कामगार नेते राजकीय संघटना यांनी आपलेच कार्यकर्ते समाजात बांधकाम कामगार यांना भुलथापां मारुन लुटायला एक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये एक साखळी तयार केली आहे. प्रशासन सुध्दा नेत्यांच्या खुटयाला बांधले गेले आहे राजकीय नेत्यांच्या मर्जीनुसार काम करतं आहेत. आम्ही खातो. तुम्ही खा असा फंडा आज सर्वच जिल्ह्यांत खुलेआम सुरू आहे . कारणं आत्ताची परस्थिती अशी आहे की  ज्याला काही काम नाही तो नेता त्याचे बगलबच्चे बांधकाम कामगार संघटना काढून बांधकाम कामगार या़चा कळवळा आला आहे असा आव आणला जात आहे . कारणं सर्वात महत्वाचे म्हणजे भुलथापा सांगून काही थोडी थोडी अमिष दाखवून लुटणयासारखा घटक म्हणजे बांधकाम कामगार होय . पण आजपर्यंतचा इतिहास बघा जगातील सर्वात मोठी औद्योगिक क्रांती आणि सर्वात मोठ्या प्रमाणात सरकारला शासनाला मोठा आर्थिक साठा मिळवून देणारा हा आमचा बांधकाम कामगार होय. बांधकाम कामगार मनांत आलं तर एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचतील पण जर यांच्या विश्वासाला तडा किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला तर हेंच बांधकाम कामगार एखाद्याला पायात घेऊन तुडवून मारतील कारणं आम्ही रस्त्यावरचे कामगार आहोत. आम्हाला काय कोण मोठा आहे कोण कामगार नेता आहे मतापुरता वापर करणारे यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा एक दिवस तुमच्यावर सुध्दा हा प्रसंग येणार आहे. 

            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय. भटक्या विमुक्त जाती . यांचा आरक्षणाच्या मुद्द्याचे आज सर्व शासन सरकार यांनी भांडवल केले आहे . संविधान मध्ये नोंद आहे कोणाला किती आरक्षण आहे पण आजपर्यंत हा तिढा मिटला नाही. कारणं हा आरक्षण तिढा. जातीयवाद. ही भारताची आई आहे. ज्या दिवशी जातीयवाद आरक्षण यांचा तिढा सुटेल त्यादिवशी राजकारण संपेल कारणं आरक्षण असुनसुद्धा काही फायदा नाही. आपल्याकडे आपणं कोणत्या जातींचे आहोत याचं प्रमाणपत्र नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपणं पाटील नाही कारणं मागासवर्गीय जाती जमाती सरकारला व शासनाला फक्त त्यांच्यावर राज्य हुकूमशाही करण्यासाठी यांना सक्षम करायचं नाही यांनी गुलामगिरी . हुजुराशी करुन जगायचं एवढाच छाप आपल्यावर पडला आहे. त्यामुळे आज अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. इतर मागासवर्गीय. आर्थिक दुर्बल यांच्या मुलांना नोकरी नाही. त्यामुळे आज बेरोजगारी पणाला कंटाळून तरुण पिढी आत्महत्या. व्यसनी. गुंडगिरी. यामध्ये पुढे आहे. आणि हेच राजकारणी लोकांना पाहिजे आहे. राजकारणी लोकांची मुल शिकायला प्रदेशात आणि आपली सर्वसामान्य लोकांची मुल राजकारणी लोकांच्या इशारा वर बंद आंदोलन मोर्चा जाळपोळ करायला म्हणजे पोलिस केंस आपल्या मुलांवर आणि पोलिस केस झाली की नोकरी नाही त्यामुळे लग्न नाही आणि एकंदरीत ही मुलं आज गुन्हेगार झाल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला माहीत आहे आजपर्यंत जेवढे मोठें सामाजिक आपल्या आरक्षणासाठी मोर्चे निघाले त्याला चेहरा होता तो म्हणजे जनतेचा पण ज्यावेळी या मोर्चाला नेत्यांचा चेहरा मिळाला आणि जनतेचे सर्व कष्ट वाया गेले कारणं नेता तुमचं चांगले करणारं नाही उलट तुमच्यात फुट पाडण्याचे काम करणारे हेच राजकिय नेते आहेत. आत्तातरी यांना ओळखा. 

    आरक्षणामध्ये प्रामुख्याने पोलिस कोटा.  सैनिक कोटा. विविध जाती जमातींना नोकरिसाठी आरक्षण. वडिलोपार्जित होणारी नोकरी भरती. वडिलोपार्जित राजकारण. अश्या एक नाही अनेक ठिकाणी प्रत्येकाला आरक्षण दिले आहे पण यामध्ये सर्वात दुर्बल. कष्टाळू. अन्याय सहन करून जगणारा घटक म्हणजे बांधकाम कामगार यांना कुठेच आरक्षण नाही म्हणजे इंजिनिअर डॉक्टर वकील क्लास वन अधिकारी. तहसिलदार. प्रांत. जिल्हाधिकारी. पंचायत समिती. जिल्हा परिषद. ग्रामपंचायत सदस्य. शैक्षणिक आरक्षण. वैद्यकीय आरक्षण. आर्थिक आरक्षण. सामाजिक सुरक्षा. संरक्षण. अश्या विविध विभागांत बांधकाम कामगारांना किती आरक्षण आहे कां? नाही कारणं बांधकाम कामगार हा काम करून करून मरण्यासाठी जन्माला आला आहे अशी मानसिकता आज राजकारणी लोकांची झाली आहे . म्हणजे बांधकाम कामगार यांच्या मुलांना नोकरी नाही. त्यांनी खडी वाळू बांधकाम मजूर म्हणूनचं डोक्यावर पाटी घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबांचे कसंबसं अर्धपोटी उपाशी राहून जगताना दिसत आहेत. यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारणं सरकार शासन सर्वांसाठी निर्णय घेतय मग बांधकाम कामगार यांच्या मुलांसाठी नोकरीत आरक्षणचा मुद्दा पास करु शकत नाही का ? का करायचा नाही. बांधकाम कामगार ताकद मोठी आहे आपल्या गावातील . तालुक्यातील. जिल्ह्यातील. सर्व निवडणुका यांवर बहिष्कार टाका. पैसा जेवन दारू यासाठी आपले इमान विकू नका. आज जर  महाराष्टातील सर्व संघटीत असंघटित कामगार यांनी एकत्र येऊन शासन.सरकार . राजकीय नेते. पुढारी. आमदार. खासदार. मंत्री . यांच्या निवडणूकीत मतदानावर जाहीर बहिष्कार टाक  . आणि अशी वेळ निर्माण करा की शासनाला. सरकारला. तुम्हाला लेखी बांधकाम कामगार आरक्षण द्यावेच लागेल. जिथ जिथ सरकारी शासनाचे बांधकाम चालू असेल तेथील कामांवर बहिष्कार टाका. तुम्ही काम करु नका.दुसरयाला करुन देऊ नका. आपली ताकद ओळखा. मग बघू हेच बांधकाम यावर इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार नेते यांचें बगलबच्चे करतात का ? कारणं आपण दिवसभर उन्हात तळतो त्यावेळी हे चोर मोठं मोठ्या गाड्या स्थावर संपत्ती गोळा करतात. म्हणजे यांचा समज असा आहे कां बांधकाम कामगार व त्याची मुल जर नोकरी व्यवसाय करायला लागली तर उद्या बांधकाम कामगार आणायचे कुठून . म्हणून कामगार आरक्षण चा मुद्दा कोणताही कामगार नेता घेत नाही   कामगार मेळावे. कामगार सन्मान कार्यक्रम घेऊन बांधकाम कामगार यांची दिशाभूल करणारे यांच्या मनशा आत्तातरी ओळखा आत्ता नाही तर कधीच नाही. 

              नेता खासदार आमदार व अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे यांना निवृत्ती पेन्शन आहे . बांधकाम कामगार यांना कोणतीही पेन्शन नाही . आहे पण त्यासाठी ठराविक रक्कम भरण्याची तरतूद आहे. मग पुढारी नेते आमदार खासदार मंत्री  राजकारण म्हणजे नोकरी नसेल तर यांना पेन्शन कशासाठी ? हे काय शासनाला पैसे भरत नाहीत उलट लुटतात मग शासन यांना पेन्शन देण्याचे कारण काय ? नेते यांचेसाठी शासनाने घर पेन्शन देण्याचा निर्णय शाषन घेत असेल तर बांधकाम कामगार यांच्या कामगार आरक्षणाचा मुद्दा शासन मंजूर करु शकत नाही कां ? 

         बांधकाम कामगार यांच्या मुलांसाठी कला कौशल्य विभागाकडून विविध कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. पण त्यातील काही कोर्स जसं ब्युटी पार्लर. व अन्य कोर्सेस बांधकाम कामगार यांच्या मुलांसाठी योग्य नाहीत. बांधकाम कामगार यांच्या मुलांचे खरोखरच कल्याण करायचे असेल तर स्पर्धा परीक्षा वर्ग मोफत. व्यवसायिक शिक्षण मोफत . नोकरीत आरक्षण . बांधकाम कामगार मुलांसाठी  शासनाकडून मोफत आणि सापेक्ष स्वच्छ नितीमत्ता राजकारण विरहित शिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फक्त आणि फक्त बांधकाम कामगार मुलांच्या साठी शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये कोणत्याही नेत्यांचे नावं न देता सुरू करण्यात यावे. 

        राजकीय सामाजिक . विविध वर्गाकडून नोंदणी करण्यात आलेल्या संघटना यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. नवीन संघटना रजिस्ट्रेशन करुन नविन चोरांना खुले मैदान करण्यास मज्जाव करण्यात यावा. कारणं जर बांधकाम कामगार एकत्र येवून एकादी मजूर सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यास शासनाने आज बंदि घातली आहे . ज्या मजूर सोसायट्या सुरू आहेत तेथे  सर्व राजकीय साप कुंडली मांडून बसले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगार यांना मिळणारे वर्षभर काम आज मुकले आहे. मजूर सोसायट्या अधिनियम नुसार मजूरांनी एकत्र येऊन एकादी मजूर सोसायटी रजिस्ट्रेशन केली तर त्या मजूर सोसायटी मुळे हाताला मुबलक काम आणि शासन निर्णयानुसार ३० लाखांपर्यंत असणारे काम हे मजूर सोसायट्या यांना विनाअनामत रक्कम भरता देण्याचा निर्णय आहे. म्हणूनच मजूर सोसायट्या रजिस्ट्रेशन शासनाने नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला असावा कारणं बांधकाम कामगार काम करुनच मेला पाहिजे. 

        कामगार मुलांसाठी नोकरीत आरक्षण हा मुद्दा पारित झालाच पाहिजे असं वाटतं असेलतर आजच खालीलप्रमाणे गोष्टींचा आजच अवलंब करा . 

** मतदान यांवर आजचं बहिष्कार टाका

** कामगार मेळावे यांवर बहिष्कार टाका

** कामगार सन्मान कार्यक्रम यांवर बहिष्कार टाका

** मजूर सोसायट्या रजिस्ट्रेशन साठी मागणी करा

**  कामगार संघटना नोंदणी बंद करण्यासाठी आंदोलन करा

**  कामगार आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी खाजगी लोकांना त्रास देऊ नका शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना रस्त्यावर सुध्दा फिरू देवू नका

** राजकीय पक्षाचे कोणतेही पद घेऊ नका

** बोगस कामगार नोंदणी साठी उठाव करा

**  जिल्हावार कामगार समिती नेण्यासाठी खरोखरच बांधकाम कामगार असणारेच यांना त्या समितीमध्ये घेण्याचा आग्रह धरा

           बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मलिक अंबर

 


"मलिक अंबर" एक हबशी गुलाम था.एक हबशी गुलाम से लेकर निजा़मशाही के रक्षक तक का उसका सफर किसी फिल्म के किरदार से कम नही रहा.ई स 1600 मे चांद बी बी की अचानक हत्या के बाद अहमदनगर की निजा़मशाही का अस्तित्व ही खतरे मे आ गया,उसी वक्त मलिक अंबरने ई स1601 से 1626 तक अपने शौर्य,युध्द कौशल्य,युध्द निती,बुध्दीमत्ता और चातुर्य के बल पर सतत 26 वर्षो तक निजा़मशाही की मुगल और आदिलशाह जैसे बलवान शासको से रक्षा की.
       मलिक अंबर का जन्म ई स 1546-1549 के बीच हरार(इथोपिया-अफ्रिका) के एक गरीब *हबशी(Abyssinian* ) घर मे हुआ.'मिर कासिम' नामक व्यापारी ने बगदाद के एक बाजा़र मे मलिक अंबर को गुलाम की हैसियत से खरीदा और उसे निजा़मशाही सरदार ' *चंगेज़ खान'* को बेचा(चंगेज़ खानी महल-अहमदनगर का जुना कोर्ट).चंगेज़ खान मलिक अंबर की ईमानदारी और बुध्दीमत्ता से बहोत प्रभावित हुआ.चंगेज़ खान की मृत्यु के बाद मलिक अंबर गुलामी से आजा़द हो गया और वो आदिलशाही सैन्य मे शामिल हो गया.वहा उसके वर्ण का द्वेष करने वाले वहोत लोग थे इसलिए वो वापस अहमदनगर आया और निजा़मशाही सैन्य मे एक मामुली सिपाही की तौर पर शामिल हो गया.अपने शौर्य के बल पर जल्द ही वो 150 घोडस्वारो का प्रमुख बन गया.ई स 1600 मे चांद बीबी की अचानक हत्या के बाद अहमदनगर मुगलो के हाथ मे आ गया लेकिन निजा़शाही के दुसरे ईलाको पर अभी भी निजा़मशाही का कब्जा़ था.दौलताबाद,नाशिक की तरफ से मियाँ राजु और दक्षिण की ओर तेलंगाणा से मलिक अंबर ने निजामशाही फौज की कमान संभाली.दोनो ने मुगलो के सामने surrender करने से इंकार कर दिया.मलिक अंबरने निजा़मशाही वंशज एक बच्चे( *मुर्तुजा़ निजा़मशाह2* ) को राजा घोषित कर प्रथम परंडा फिर जुन्नर और अंत मे दौलताबाद को निजा़मशाही की राजधानी बनायी.
       मलिक अंबरने ' *गनिमी* *कावा'(Guerrilla warfare)* का युध्द मे पहेली बार उत्कृष्ट उपयोग करके मुगलो को बार बार पराजित किया.मुगल राजकुमार दानियल,परवेज़,खुर्रम,शाहजहाँ इनहोने निजा़मशाही पर कब्जा़ करने की हर मुमकिन कोशिश की लेकिन मलिक अंबरने उन्हे हमेशा नाकाम किया.मलिक अंबर के साथ शाहजी,शरफोजी,मालोजी,परसोजी,त्र्यंबकजी,माधवजी,दत्ताजी जैसे शूर मराठा योध्दा थे.
        ई स 1612 मे मलिक अंबरने दौलताबाद के करीब एक सुंदर और well planned शहर की स्थापना *'खडकी'(आज का *_औरंगाबाद_* ) ये नाम से की.आज भी औरंगाबाद मे उसके architecture को देखा जा सकता है.
       मलिक अंबर मस्लिम था लेकिन वो दुसरे धर्मो का भी बहोत आदर करता था.अपने शासन काल मे मलिक अंबर ने खेती,architecture और अन्य व्यवसाय को बढावा दिया.खेती के बागायती और जिरायती ये विभाग पहेली बार मलिक अंबरने किये.
 *_भातोडी का युध्द-_* 
भातोडी का युध्द मलिक अंबर के असाधारण युध्दकौशल्य और शौर्य का प्रतिक माना जाता है.october 1624 को ये युध्द अहमदनगर शहर से 20 कि मि पूर्व भातोडी नामक स्थल पर हुआ था.एक तरफ मुगल,आदिलशाही,कुतुबशाही संयुक्त विशाल सेना थी तो दुसरी ओर छोटी निजा़मशाही फौज.इस युध्द मे मलिक अंबर ने असाधारण जीत हासिल की.इसी युध्द मे शिवाजी महाराज के पिता *शाहजी भोसले* ने विशेष शौर्य दिखाया.इस जीत के बाद मलिक अंबर ने निजा़मशाही का चारो ओर विस्तार किया.
 *मृत्यु-*
भातोडी युध्द की पराजय के बाद मुगल और आदिलशाह मलिक अंबर से डर गए.इसी वक्त उसने निजा़मशाही राज्य का सब से अधिक विस्तार किया.अपने career के उच्छ शिखर पर रहेते हुए 80 साल की आयु मे वार्धक्य से मलिक अंबर का निधन *अंबरापुर* (अहमदनगर पूर्व 46km,ता.शेवगाँव) नामक स्थान पर 14 मे 1626 को हुआ.कबर खुलदाबाद मे है.
 *लेखक* 
 *डॉ.खालिद अंबेकर* 
 *एम डी (आयुर्वेद)* 
 *अहमदनगर* 
 *मो.9881786198*

ज्याचे हाती काठी म्हैस त्याची



ज्याचे हाती काठी म्हैस त्याची

        पूर्वजांची बरेच मार्मिक विचार सांगणारी महण आहे. म्हणजे समाजातील राजकीय सामाजिक . गुंडगिरी. सत्तेची भूक. मतदानातील गैरप्रकार आणि शासकीय निमशासकीय योजनांचा अपहार . आपल्या पदाच्या पक्षाच्या जोरावर गोरगरीब जनतेला. सर्वसामान्य जनता . यांना लुटणारे लुटारु आज प्रत्येक गावात आ वासून उभे आहेत. सर्वकाही आपल्या सत्तेच्या जोरावर बोगस कागदपत्रे आपले सगेसोयरे. बगलबच्चे यांची घर खिश भरण्यासाठी वापरणारे म्हणजे ज्याच्या हाती काठी म्हैस त्याचीच अशी परिस्थिती आज तयार झाली आहे 

     आज प्रत्येक गावात गोरगरीब लोक. वयोवृद्ध लोक. विधवा साठी विविध योजना. घरकुल योजना. संडास गोठे बांधणे. रस्ते गटर. स्मशानभूमी. समाजमंदिर. विविध आर्थिक विकास महामंडळ. विद्यार्थी साठी योजना. मुलींच्या साठी जिल्हा परिषद . पंचायत समिती. ग्रामपंचायत. नगरपालिका . महानगरपालिका. बांधकाम कामगार मंडळ. सार्वजनिक बांधकाम विभाग. समाजकल्याण विभाग. अल्पसंख्याक विभाग. आरक्षण मुद्दा. विविध घोटाळे . शेळी पालन घोटाळा. कुक्कुटपालन घोटाळा . महसूल लुट. रेशन घोटाळा भूखंड घोटाळा . अंगणवाडी अशा वर्कर मदतनीस पगार घोटाळा . विविध कल्याणकारी योजना वाटप घोटाळा . पाणीपुरवठा घोटाळा आरोग्य विभाग घोटाळा . स्वच्छता विभाग टेंडर घोटाळाः विविध कर आकारणी घोटाळा . निधी घोटाळा . विविध नावाने स्थापन विविध संस्था. सेवा सोसायटी. सुतगरणी यामधील लाखों रूपये घोटाळा भूखंड घोटाळा . अश्या विविध ठिकाणी राजकारणी लोकांनी आपल्या हातात काठी घेतली आहे . यांनी शासनाला महैसीचा दर्जा दिला आहे कारणं कोणतंही काम यांच्या विचाराशीवाय होतं नाही . राजकारणी आदेश देतात आणि त्यानुसार प्रशासन प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी गुलामी करत आहेत. 

            प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात . गावात. राजकारणी लोकांनी . सामाजिक प्रयोजन व लोकांना.तरूणाचया हाताला काम देतो असं आश्वासन देऊन गायरान. देवस्थान जमीन. ढापलया आणि त्यावर सुतगीरणी. सेवा सोसायटी. मजूर सोसायट्या. विविध कारखाने. आज बंद पडले आहेत. त्यांचे भुतं बंगल्यात रुपांतर झाले आहे . कोट्यवधी रुपयांची शासनाची बोगस कागदपत्रांच्या जोरावर लाटणारे हेच राजकारणी आहेत. संपत्ती १५० कोटी आणि कर्ज ४०० देणारे कोण होतें . म्हणजे ज्याच्या हातात काठी आहे म्हैस तयाचीच म्हणलं तर वावगे ठरणार नाही 

           महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगारांसाठी विविध . आर्थिक. शैक्षणिक. वैद्यकीय. अश्या विविध योजना राबविण्यात येतात त्यांचा लाभ घेण्यासाठी खरोखरच बांधकाम कामगार आहेत त्यांचे वय १८/५९ आहे ज्यांना इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी मान्यता नोंदणी दाखला दिला आहे असाच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला सभासद होऊ शकतो . पण आज ज्यांना कधीच बांधकाम कामगार जीवंत आहे कां ? मेला आहे? तो कसा जगतो ? पोटभर जेवन आहे कां? त्याला कामांवर असताना सुरक्षा आहे कां? बांधकाम कशाला म्हणतात? बांधकाम म्हणजे काय ? विट कशापासून तयार होते ? वाळू कूठून येते ? बांधकाम कामगार यांच्यासाठी कोणतं मंडळ आहे असतं? बोगस कामगार म्हणजे काय ? बांधकाम कामगार यांना जीवनावश्यक काय आहे ? दवाखान्यात. पंचायत समिती. जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. कामगार भवन. यामध्ये बांधकाम कामगार यांना सन्मानाची वागणूक अधिकारी व कर्मचारी देतात का ? बिगर लाच घेता यांचें कोणतेही काम होत कां ? राजकारणी आश्रय घेतलेल्या संघटना बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली कामगारांना लुटत आहेत याची कधी चौकशी केली का ? बांधकाम कामगार कामांवर असताना अपघात प्रमाण आज वाढले आहे. मयताचे लाभ .अंपगतव लाभ. असं लाभ त्यातील राजकीय संघटना मध्ये काम करणारे चोर यांनी किती पैसा उकळला आणि सायकल घेण्याची ऐपत नसणारे यांनी गाड्या . सोन्याची कड . स्थावर प्रापटी. जमीन जागा. घर . व्याजाचा व्यवसाय. गुंड पाळणे. कामगारांना धमकी देणे. या प्रकारांची कधीही राजकीय स़घटना वाले यांनी चौकशी केली कां? कामगार मेला तरी त्यांच्या मयताचे सुध्दा पैसे घेणारे राजकीय स़घटना वाले यांना कामगार मंत्री. राजकीय नेते .. पाठीशी घालत आहेत का? यांचा काय वाटा यामध्ये आहे कां ? बांधकाम कामगार यांना विविध कल्याणकारी योजना मिळवून देतो म्हणून आर्थिक लुटणारे राजकीय संघटनांचे पदाधिकारी व राजकीय नेते यांना या मिळकतीमधील किती रक्कम दिली जाते काय ? अश्या विविध माध्यमातून बांधकाम कामगार यांच्याशी काहीच संबंध नाही बांधकामाशी कोणताही संबंध नाही साधा भोळा. व्यसनी. गरजू. अडाणी . अश्या बांधकाम कामगारांना लुटण्यासाठी आज प्रत्येक नेत्याला बांधकाम कामगार यांचा पुळका आला आहे म्हणजे सत्ता यांची. संघटना यांची. लुटारु यांचेच. शासकीय निमशासकीय कामगार भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचेच याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपल्या सांगली जिल्ह्यात जवळपास दोन महिने झाले . बांधकाम कामगार यांच्यासाठी मंडळाकडून वाटप करण्यात येणारे सुरक्षा संच वाटप साहित्य संपले आहे असं कारणं सांगून बंद आहे . कामगार आपला रोजगार बुडवून हेलपाटे मारत आहेत. पण या बांधकाम कामगार यांना अजून सुद्धा सुरक्षा संच मिळाला नाही .पण एका राजकीय संघटनेने राजकीय वरदहसताखाली जिल्ह्यात दोन सुरक्षा संच वाटपाचे कार्यक्रम घेतलें मग यांच्यासाठी सुरक्षा संच आले कोठून कुणाला माहीत आहे का ? यासाठी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना सामिल आहेत कां? म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे ज्याचे हातात काठी म्हैस त्याचीच हे खरं आहे. 

          बोगस बांधकाम कामगार नोंदणी आज सर्वात मोठा शाप आहे. आज राजकीय संघटना यांनी १०००/२०००/ घेऊन बांधकाम कामगार नोंदणी दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार नेमले आहेत यांनी तर कामगारांना लुटायला सुर धरला आहे . राजकीय नेत्यांचा वरदहस्त असले मुळे आज बोगस कामगार नोदणीला उत आला आहे. 

      कामगार सन्मान करण्याचे नवेच खुळ आज राजकीय संघटना नेते यांनी काढले आहे . कामगार खुळाच आहे. तो कायम अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतो . त्याला बोलावले की तो येणार मग कोणीतरी नेता किंवा त्याचा बगलबच्चे आणायचे आणि आम्ही कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर केली. मुलींच्या लग्नासाठी ५१ हजारांची योजना आम्हीच मंजूर करुन आणली. खरोखरच कामगार यांचीच नोंदणी आम्ही मोफत करतो आणि एका बाजूला यांनी नेमलेले पदाधिकारी १०००/१२०० रूपये घेवून कामगार नोंदणी करत आहेत . शासन बांधकाम कामगार यांचेसाठी विविध योजना राबवित आहे पण श्रेय घेऊन आपला उल्लू सरळ करणारे आपल्या समाजात आहेतच . यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे आपल्या गावातील तालुक्यातील राज्यातील देशातील नेते व त्यांचे बगलबच्चे आहेत . 

      केंद्राकडून ई श्रम कार्ड ही योजना राबविण्यात आली. या योजनेचे ध्येय होतें की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाल बांधकाम कामगारांसाठी निधी वर्ग केला जातो. आणि राज्य सरकार तो निधी किती सापेक्ष खरोखरच बांधकाम कामगार व अन्य लोकांना देत आहे ‌ राज्यात किती कामगार आहेत याचा सर्वे ई श्रम कार्ड मुळे केंद्राला कळणार आहे. म्हणून आज आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये हे कार्ड काढण्याची जबाबदारी कोणतेही शासकीय निमशासकीय कार्यालये जबाबदारी म्हणून पार पाडत नाहीत. म्हणजे एवढ्या कारणावरून बांधकाम कामगार यांच्या ध्यानात यायलाच हवं काय आहे संघटनांचे षडयंत्र 

        बांधकाम कामगार यांनी कोणत्याही नेत्यांकडून सन्मान आपल्या योजनेचा लाभ घेताना फोटो काढू नका. आपला कमीपणा आपणच करुन घेऊ नका . आपल्याला कष्ट करायच माहिती आहे. नोंदणी साठी कोणत्याही संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय सामाजिक स़घटना एजंट यांचेकडे जाऊ नका . सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये आपल्या मागणीला टाळाटाळ होत असेलतर जाब विचारा 

        बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दुर्घटना ( भाग १)

 

दुर्घटना  ( भाग १)

बुडणे

भाजणे

विषबाधा

उष्माघात

विजेचा धक्का

शेतीतील अपघात

लहान मुलांचे अपघात

साप चावणे

विंचू चावणे

प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे

रस्त्यावरचे अपघात व अस्थिभंग

अपघात व प्रथमोपचार

प्रास्ताविक

      अपघात म्हणलं की जबाबदारी. कोणतेही भान न ठेवता . मनमानी वागण्यामुळे . एकल विचारशक्ती कमतरता . अपुरी बुध्दी .  या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. आत्महत्या व खुनाच्या प्रयत्नातून निर्माण होणारे आजार व जखमाही अपघात या सदरात घातले पाहिजेत.

आपल्या देशातल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे दहा टक्के मृत्यू अपघातांमुळे होतात. यात बुडित मृत्यू, रस्त्यावर अपघाती मृत्यू. भाजणे, विषबाधा ही महत्त्वाची कारणे आहेत. अपघातात मरणा-यांमध्ये मुख्यतः तरुण आणि लहान मुले यांचा समावेश असतो. बुडित मृत्यूंमध्ये तरुण स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. भाजण्याच्या घटनांतही स्त्रियाच जास्त प्रमाणात बळी जातात. यासाठी पूर्वी हुंडाबळी साठी घडणारया घटना होत होत्या. त्यावेळी तंत्रज्ञान सुधारले नव्हते. लोकांच्यात अज्ञान होते .पण आत्ता काळ सुधारला लोकांचा विचार बदलला आणि महिलांच्या वरील शारीरिक मानसिक अतयाचार याला आळा घालण्यासाठी शासनाने कडक आणि कठोर कायदे तयार केले आज  सुध्दा आपण म्हणतो की अत्याचार कमी झाले पण आज महिला घरातच सुरक्षित नाही. 

रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणा-यांपेक्षा नुसते जखमी होणा-यांचे प्रमाण पंधरापट आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. उदा. भाजलेल्या व्यक्तीस पुढे त्वचा, स्नायू आखडून व्यंग तयार होणे, अपघातामध्ये हात-पाय, डोळे जाणे, इत्यादी. मृत्यूबरोबर अशा प्रकारच्या दीर्घकालीन दुष्परिणामांची दखल घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

रस्त्यावरच्या आणि कारखान्यांतल्या अपघातांच्या अनेक घटनांमध्ये मानवी चूक (म्हणजे अपघातामध्ये सापडलेल्या व्यक्तीची चूक) आहे असे वरवर दिसते. पण खोलवर विचार केला तर हे खरे नसते. अशी कारणमीमांसा देऊन शासन आणि कारखान्यांचे व्यवस्थापन जबाबदारीतून सुटू पाहते.  आज एम आय डी सी मध्ये विविध केमिकल कंपन्या आहेत त्यामध्ये सुध्दा वारंवार अपघात होतात आणि येथे अंगावर केमिकल पडणे. मशिन मध्ये हात पाय सापडणे व अपंगत्व येणे कधी कधी कामगाराचा जीव सुध्दा जातो आणि त्यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर येते वाईट आहे. या विविध अपघाताला कामगारांना जबाबदार धरले जाते. पण त्या कंपनी मध्ये सुरक्षेची साधने कंपनी मालक देत नसेल तर सुरक्षेच्या अभावामुळे अपघात झाला असं ग्राह्य धरून मालकांवर कायदेशीर दंडात्मक व शिक्षेची तरतूद करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे . 

          वेळोवेळी आपणं वृतमानपत्रात . टिव्ही. मोबाईल. यांवर विद्युत वाहिनी व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथानपणा म्हणजे शेतातून जाणारे विजेचे खांब. मोठ मोठे विजेचे टाॅवर. ष्ट्रासफारमर. यांना शासनाकडून पर महिना भाड देणें शासनाच्या अधिपत्याखाली आहे. पण आज वारंवार शाॅकसरकिट चया घटन घडतं आहेत. उभी पिक जळण. घरातील दुकानात विजेच्या गळतीमुळे लागणारी रौद्र आग यामुळे स्थावर मालमत्ता. वस्तू . काहीवेळा माणसांचे जीव सुध्दा जातात. काहीवेळा अवेळी अवकाळी येणारा पाऊस वारा यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडणे त्यामुळे जनावरांना व माणसांना शाॅक लागून मयत होणार याची संख्या जास्त आहे . तर अश्या सर्व दुर्घटना यांना हे विधुत वितरण कंपनी जबाबदार नाही कां ? 

     बाकीची माहिती उद्या

संस्थापक अध्यक्ष बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अंधश्रध्दा मनांचा खेळ

 

अंधश्रध्दा मनांचा खेळ

            आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही. जे आपणास पटत नाही लोक म्हणतात म्हणून आपणं ते मानतो आणि त्यानुसार वागतो . फक्त आणि फक्त लोक आपल पूर्वज सांगतात म्हणून आपणं आपल्या मनावर बसवून घेतो त्याला अंधश्रद्धा असं म्हणलं जातं .

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च नजर लागणे. मांजर आडवं जाण . शिंक येणे. कावळा ओरडणे. टिटवी ओरडणे . कुत्री रडणे. लिंबू मिरची टाकणे. अंगात येणे. ज्योतिष विशारद. वास्तुशास्त्र. केरसुणी आडवी उभी ठेवणें . भुतं लागण . रात्री कचरा बाहेर टाकणे. रात्री नख काढणे . अश्या विविध अंधश्रद्धा फिरविणारया गोष्टी वर आपणं भुलतो आणि आपलं मतं नसतांना सुध्दा यांवर आपणं विश्वास ठेवतो . या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

व्हॅटिकनमध्ये 'एक्सॉरसिजम' नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो. इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.

                  समाजात विविध जाती धर्माचे लोक. विविध विचार आचार असणारे लोक. विविध मानसिकता असणारे लोक. त्यातच पापी जगला लोकांना भुलथापा मारून लुटणारे लोक सुद्धा याचं समाजात असतांत. लोकांना चांगले विचार शिक्षण महत्व समजावून सांगून लोकांचे जीवन आनंदी चैतन्य मय करणारे लोक सुद्धा याचं समाजात असतांत . आपल्या मनाला समजूत घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो .

        माणसाला भुतं लागत का? आपणं विचार केला तर जुनी लोक सांगतात भुतं दिसतं नाही . तयाला सवताची छाया नसते. आत्महत्या. करणारे दुर्धर आजाराने मरण पावलेले लोक भुतं सैतान होतातच त्याचा आत्मा भटकत असतो. एवढी माहिती आपणांस कशी उपलब्ध झाली तुम्ही सवता बघितली आहे कां ? कुणीतरी सांगतं आणि आपणं आपणांस थंडी ताप कणकणी .आली झोप लागत नाही. अपुरी झोप यामुळे आपणं रात्रीच उठून बसतो. ही सर्व शारीरिक व्याधी असतें पण आपणं याला वेगळं वळण देतो आणि ज्योतिष बघणारे. भुतं भानामती अश्या ढोंगी लोकांकडे जातो आणि गंडा दोरा. लिंबू. शाकाहारी मांसाहारी उतारा हा ढोंगी सांगतो आणि आपणं डॉ कडे न जाता अश्या ढोंगी लोकांच्या नादाला लागतो आणि अंधश्रद्धेच्या माग धावतो आणि माझ्या नशिबाला आलं म्हणून नशिबाला दोष देत राहतो 

           अंगात येणं कितपत खरं आहे मला कळतं नाही. आणि ते सुद्धा महिला मध्ये अंगात येण्याचे प्रमाण जास्त आहे. देवी आली देवी आली हळद कुंकू यांचा सडा टाकला जातो.अंगात आलेल्या देवीच्या तोंडातून येणार प्रत्येक शब्द म्हणजे गावांवर संकटं येईल गावात मृत्युचे तांडव होईल यासाठी गावच्या देवीला कोंबडं बकर नरबळी द्यावा लागेल असं तोंडातून आल की आपणं पैशांचा खर्चाचा विचार न करता फक्त आणि फक्त अंधश्रद्धा म्हणून लोक अशा फसव्या आशेच्या माग धावत असतात आणि आपले विचार आचार घाणवट केल्यासारखे वागतात. जमीनीत गुप्त धन आहे अशी बतावणी करणारे ज्योतिष शास्त्र वाले हे तर सर्वात मोठी अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात कारणं जमीनीतील गुप्त धन मिळविण्यासाठी नरबळी द्यावा लागेल. घुबड. महांमडुळ. कासव. अशी विविध प्राणी यांचें जीव देण्याचा सल्ला दिला जातो. आत्ता मला सांगा प्राण्याचं आणि माणसांचा बळी दिल्यानं धन मिळतं असतं तर समाजातील सर्वजण श्रीमंत झाले असतें. आपल्या मनांत धनाची लालसा निर्माण करून अंधश्रद्धा घट्ट करण्याचे काम हेंच समाजातील लोक करत असतात . 

        मांजर आडवं जाणं. कावळा ओरडणे. टिटवी ओरडणे. कुत्र रडणं . शिंक येणे . मांजर आपल्या किंवा गाडीच्या समोरून मांजर आडवं गेलतर आपणांस वाटतं की आज आपलं काम होणार नाही . ही अंधश्रद्धा माणसाच्या मनात घर करून बसलेली असते पण मांजर हे भक्ष शोधण्यासाठी ईकड तिकडे करत असतं त्यात तुमचं काम होणे अथवा न होणे याचा काय संबंध 

घरावर कावळ्याचे ओरडणं यांच्या माग आपली मानसिकता म्हणा अथवा अंधश्रद्धा म्हणा पाऊणा येतो.कुणाचा शुभ संदेश येतो.कुणाला वाईट वार्ता ऐकायला मिळते. हे खर नसणार आहे. कारणं जर चांगले वाईट कावळ्याला कळलं असतं तर त्या कावळयान गावांची घाण खाल्ली असती कां? आपल्या पेक्षा कावळा हुशार आहे आणि आपण मूर्ख आहोत अंधश्रद्धेला चिटकवून बसलेलो आहोत. टिटवी ओरडणे. कुत्र रडणं हे आपणं अशुभ माणतो कारणं यामुळे कोणाच्यातरी मृत्यू होतो किंवा मृत्युचा संदेश येतो अशी आपली मानसिकता आहे किंवा अंधश्रद्धा आहे असं म्हणा . कारणं टिटवी तीची अंडी सापडतं नाहीत म्हणून रात्री ओरडत असते. कुत्र्याच्या जेव्हा पोटात दुखायला लागतं तेव्हा कुत्रीच काय पण माणसं सुध्दा रडतात मग त्यात काय अशुभ असतं. 

        अशा विविध माध्यमातून आपल्या मनात अंधश्रद्धा घरं करून बसली आहे त्यामुळे आपणं तेच बघतो जे आपणांस दाखविले जाते . आज अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन स़बोधन करण्यासाठी विविध सामाजिक स़घटना समाजसेवक . समाजात सतर्कता आणण्यासाठी रा़त्र दिवस प्रयत्न करतं आहेत समाजातील काही समाजकंटक यांनी अश्या लोकांना गोळ्या घातल्या. घरांत घुसून माराहान केली. काही जणांना गायब केले. तरिसुधदा समाजसेवक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांचा समाज सुधारणा करण्याचा विश्वास दृढ केला आहे

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या