दुर्घटना ( भाग १)
बुडणे
भाजणे
विषबाधा
उष्माघात
विजेचा धक्का
शेतीतील अपघात
लहान मुलांचे अपघात
साप चावणे
विंचू चावणे
प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे
रस्त्यावरचे अपघात व अस्थिभंग
अपघात व प्रथमोपचार
प्रास्ताविक
अपघात म्हणलं की जबाबदारी. कोणतेही भान न ठेवता . मनमानी वागण्यामुळे . एकल विचारशक्ती कमतरता . अपुरी बुध्दी . या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. आत्महत्या व खुनाच्या प्रयत्नातून निर्माण होणारे आजार व जखमाही अपघात या सदरात घातले पाहिजेत.
आपल्या देशातल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे दहा टक्के मृत्यू अपघातांमुळे होतात. यात बुडित मृत्यू, रस्त्यावर अपघाती मृत्यू. भाजणे, विषबाधा ही महत्त्वाची कारणे आहेत. अपघातात मरणा-यांमध्ये मुख्यतः तरुण आणि लहान मुले यांचा समावेश असतो. बुडित मृत्यूंमध्ये तरुण स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. भाजण्याच्या घटनांतही स्त्रियाच जास्त प्रमाणात बळी जातात. यासाठी पूर्वी हुंडाबळी साठी घडणारया घटना होत होत्या. त्यावेळी तंत्रज्ञान सुधारले नव्हते. लोकांच्यात अज्ञान होते .पण आत्ता काळ सुधारला लोकांचा विचार बदलला आणि महिलांच्या वरील शारीरिक मानसिक अतयाचार याला आळा घालण्यासाठी शासनाने कडक आणि कठोर कायदे तयार केले आज सुध्दा आपण म्हणतो की अत्याचार कमी झाले पण आज महिला घरातच सुरक्षित नाही.
रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणा-यांपेक्षा नुसते जखमी होणा-यांचे प्रमाण पंधरापट आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. उदा. भाजलेल्या व्यक्तीस पुढे त्वचा, स्नायू आखडून व्यंग तयार होणे, अपघातामध्ये हात-पाय, डोळे जाणे, इत्यादी. मृत्यूबरोबर अशा प्रकारच्या दीर्घकालीन दुष्परिणामांची दखल घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
रस्त्यावरच्या आणि कारखान्यांतल्या अपघातांच्या अनेक घटनांमध्ये मानवी चूक (म्हणजे अपघातामध्ये सापडलेल्या व्यक्तीची चूक) आहे असे वरवर दिसते. पण खोलवर विचार केला तर हे खरे नसते. अशी कारणमीमांसा देऊन शासन आणि कारखान्यांचे व्यवस्थापन जबाबदारीतून सुटू पाहते. आज एम आय डी सी मध्ये विविध केमिकल कंपन्या आहेत त्यामध्ये सुध्दा वारंवार अपघात होतात आणि येथे अंगावर केमिकल पडणे. मशिन मध्ये हात पाय सापडणे व अपंगत्व येणे कधी कधी कामगाराचा जीव सुध्दा जातो आणि त्यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर येते वाईट आहे. या विविध अपघाताला कामगारांना जबाबदार धरले जाते. पण त्या कंपनी मध्ये सुरक्षेची साधने कंपनी मालक देत नसेल तर सुरक्षेच्या अभावामुळे अपघात झाला असं ग्राह्य धरून मालकांवर कायदेशीर दंडात्मक व शिक्षेची तरतूद करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे .
वेळोवेळी आपणं वृतमानपत्रात . टिव्ही. मोबाईल. यांवर विद्युत वाहिनी व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथानपणा म्हणजे शेतातून जाणारे विजेचे खांब. मोठ मोठे विजेचे टाॅवर. ष्ट्रासफारमर. यांना शासनाकडून पर महिना भाड देणें शासनाच्या अधिपत्याखाली आहे. पण आज वारंवार शाॅकसरकिट चया घटन घडतं आहेत. उभी पिक जळण. घरातील दुकानात विजेच्या गळतीमुळे लागणारी रौद्र आग यामुळे स्थावर मालमत्ता. वस्तू . काहीवेळा माणसांचे जीव सुध्दा जातात. काहीवेळा अवेळी अवकाळी येणारा पाऊस वारा यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडणे त्यामुळे जनावरांना व माणसांना शाॅक लागून मयत होणार याची संख्या जास्त आहे . तर अश्या सर्व दुर्घटना यांना हे विधुत वितरण कंपनी जबाबदार नाही कां ?
बाकीची माहिती उद्या
संस्थापक अध्यक्ष बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment