Showing posts with label दिवा. Show all posts
Showing posts with label दिवा. Show all posts

वादळातला दिवा

 


माझे मूलभूत हक्क व अधिकार कर्तव्य 

             माणूस जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो. हा माणवाचा जन्म सिध्द हक्क आहे. जात धर्म लिंग रंग वंश अशा सर्व भेदाचया पलिकडे जाऊन समता पूर्ण वातावरण आनंदाचे जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हा सुद्धा मानवी हक्क अधिकार होय. तो जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्मल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा व मिळण्याचा अधिकार मिळालेला असतो. शिक्षणाचा अधिकार. रोजगाराचा अधिकार. विकासाचा अधिकार. व्यावसायिक अधिकार. मतदानाचा अधिकार. मुक्तपणे संचार अधिकार. मालमत्ता व साधने बाळगण्याचा अधिकार. आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार. शोषण मुक्त राहण्याचा अधिकार. असे एक नाही अनेक अधिकार मिळत राहतात. नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा आपले मत मांडण्याचा अधिकार. लिहिण्याचा अधिकार. व विविध माध्यमातून अभिव्यक्त होण्याचा संघटित होण्याचा. अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने आवाज उठविण्याचा अधिकार मिळालेला असतो

         हे सर्व अधिकार आपणास सभ्य नागरी समाजात आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पूरेपूर लाभ मिळत नाही. अनेकांना समानतेचा अधिकार असून ही जात. धर्म. अशा विविध भेदाना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार. मोफत व हक्काचे शिक्षण व्यवस्था असून सुद्धा काही बालकांना शाळा किंवा विद्या मिळत नाही. कोवळ्या व हसण्या बांगड्यांचा वयात बालमजुरी करावी लागते. आणि वेठबिगारी करावी लागते. आणि महिला अमानुष लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. सामान्य माणसाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य व रोजगार अशा विविध सुखसोयी पासून वंचित राहावे लागत आहे. शेतीतून होणा-या संपत्ती शोषण होतं राहावे अशी पध्दतशीर व्यवस्था असल्याने ग्रामीण भारतातील व शेतमजूर लोक शहराकडे स्थलांतरित होऊन. झोपडपट्टीतील नरक यातना भोगत आहेत. खराब व घाणरडे जीवन जगत आहेत. आदिवासी. भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मूळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जागोजागी जातिय व धार्मिक हिंसाचार अतिरेकी हल्ले यात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे.  

             मग प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार असताना आमच्या समाजात इतका प्रचंड अन्याय अत्याचार का ? कशासाठी ? आपल्या मनाला अस्वस्थ करणारी ही विसंगती आहे का ? या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत परंतु मुळ गाभ्यातला प्रशन असा आहे की आम्ही अधिकारांची भरपूर भाषा करतो परंतु आम्ही कर्तव्य विसरतो भारतीय राज्यघटनेने जी कर्तव्य आम्हास सांगितली आहेत ती कर्तव्य आम्ही पाळतो का ? असा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे जो समाज आपली कर्तव्ये विसरतो त्या समाजास आपले हक्क व अधिकार ही सहजासहजी मिळणार नाहीत 

         गाफिल आणि गाड झोपी जाणारा गलथानपणा हालगरजीपणा. करणार्या व्यक्तिचया घरात चोरी होते. जो सतत जागरूक जागृत सावध. चाणाक्ष हुशार व्यवहारीक असतो त्याच्यात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत. आमचा समाज जागृत नाही. धर्म. जाती. संप्रदाय प्रांत अशा विषमतेच्या विषाने जो बेशुद्ध झालेला आहे. संविधानातील मूल्यांचा नेहमीच तेथे अनादर झालेला आहे. जागरूक नसल्याने समाजांचे. मानसिक. आर्थिक. राजकीय. शोषण होत आहे. गरिबांचे अज्ञान व हतबलता. व मध्यमवर्गीय यांची आत्मकेंद्रिवृतती यामुळे मानवीय अधिकाराचे संरक्षण करणारे सकारात्मक दबाव गट आत्ता पाहायला मिळत नाहीत. जसे अंधार्या रात्री सुसाट वेगाने वारा वाहत असताना हाताच्या ओंजळीने दिव्यांचे रक्षण करावे लागते. आज वादळात सापडलेल्या दिव्या सारखी देशाची व आपली अवस्था झाली आहे. दिवा विझू नये म्हणून दिप रक्षण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ अशा ओंजळी पुढे आल्या पाहिजेत. नाहि तर अधिकार व हक्काचा दिवा विझून जाईल. आमचे कर्तव्य आम्ही विसरलो तर अधिकाराला ही पोरके होत राहू. तेव्हा आम्ही आमच्या अधिकाराबरोबर कर्तृत्व कर्तव्य तितकीच महत्त्वाची माणून प्रत्येकाने आपले हक्क व अधिकार वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत 

        भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य

(१) संविधानाचे पालन करणे. आणि त्याचे आदर्श व संस्था. राष्ट्रध्वज व राष्ट्र गीत याचा आदर करणे 

(२) ज्यांच्यामुळे आपल्या राष्ट्रीय लढयास स्फूर्ती मिळाली या उदात्त आदर्शाची जोपासना करुन त्यांचे अनुकरण करणे

(३) देशांची सार्वभौमत्व. एकता. एकात्मता. उन्नत ठेवणे. व त्यांचे संरक्षण करणे. 

(४) देशाचे संरक्षण करणे. व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजाविणे 

(५) धार्मिक. भाषिक प्रादेशिक. किंवा वर्गीय भेदाचया पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनते मध्ये सामंजस्य व बंधूभाव. वाढीला लावणे. महिला प्रतिष्ठा. उंचविणयासाठी असाणारया उणिवा व प्रथा नष्ट करणे. 

(६) वने. सरोवर. नद्या. जीवसृष्टी. यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे. आणि प्राणीमात्राबधदल दया बुध्दी बाळगणे. 

(७) विज्ञाननिष्ठ. दृष्टिकोन. मानवतावाद. आणि शोधक बुध्दी. सुधारणावादी. यांचा विकास करणे व होणे गरजेचे आहे

(८) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्र पूर्वक त्याग करणे 

(९) राष्ट्र सतत उपक्रम व सिध्दी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठा चे यश संपादन करण्यासाठी झटने 

(१०) वरील प्रमाणे सर्व नागरिकांची कर्तव्ये असतील आणि असतात जो जन्मदाता असेल अथवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षांपर्यंत शिक्षणाच्या व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे 

     आज आपण म्हणतो की आम्ही लोकशाही राज्यात आहोत पण आपणास आपले मत मांडण्याचा अधिकार नाही आपल्या हकक व अधिकार यासाठी रस्त्यावर उतरून न्याय मागता येत नाही. म्हणजे आपण आज सुरक्षित नाही इंग्रज काळात आपण परकियांच्या गुलामगिरीत होतों आणि आज आपणं आपल्याकडून आपल्या मताने निवडून गेलेल्यांच्या गुलामगिरीत आहोत आज आपणास कळणे गरजेचे आहे नाहि तर आपणास पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम आपल्यापासून देश सोडविण्यासाठी करावा लागेल सर्वसामान्य आहे तो सर्वसामान्य राहणार आणि मोठा आहे तो मोठाच होणार 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

घृणा

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE ...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage...


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या