Showing posts with label आरोपी. Show all posts
Showing posts with label आरोपी. Show all posts

गुन्हेगारी व फुटीरतावाद Ahmed Munde

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 गुन्हेगारी व फुटीरतावाद 



भारतीय लोकशाही पुढे सर्वात ज्वलंत उदाहरण आहे फुटीरवादी शक्ति अनेक रुपे घेऊन देशाच्या एकात्मतेला सुरूंग लावत आहेत हि फुटीरता धर्माच्या. जातीच्या. वंशाच्या भाषेच्या वर्गाच्या नावाखाली चालू आहे स्वातंत्र्य नंतर गेल्या पंचेचाळीस वर्षात राष्ट्रचे बळकट बनणयाएवजी नाजुक बनले आहे १९४७ मद्रास प्रांतांत द्रविडसथानाची मागणी झाली १९८० नंतर पंजाब दहशतवाद जोरावर खलिस्तान मागणी पुढं आली जमातवादी संघटनांना काश्मिरी सुट्टे हवे आहे १०५० पासुन नागाचा प्रश्न. १९७० पासून मिझोचा प्रश्न अधूनमधून उग्र रूप दाखवितो १९८० नंतरच्या फुटीराना काही राष्ट्रांनी शसत्र पुरवठा केला आणि भारताचे एकय धोक्यात आले

           देशातील फुटीरतेचा विचार करताना त्यांच्या विश्लेषणात आर्थिक विकास. विकासातील असमतोल. दारिद्रय उपासमार. बेकायदा बेकारी. हिच कारणे प्रामुख्याने दिसून येतात स्वतंत्र नंतर ज्या भागात विकास झाला नाही तेथें दारिद्र्य उपासमार बेरोजगारी उद्भवली आणि अशा ठिकाणी फुटीरतेची बीजे अधिकच अंकुरली पंजाब खलिस्तान साठी. मागणी आहे ती आत्ता पंजाबात पाणी पुरवठा प्रश्न चंदिगड राजधानी प्रश्न बेरोजगारी हे प्रश्न होतेच. त्याकडे कोणाचें लक्ष सुध्दा नव्हते त्याचा परिणाम पुढे फुटीरतेचया मागणीत झाले राज्यात अधिक डोंगराळ प्रदेश आर्थिक व औद्योगिक विकास अगदी कमी झाला स्वातंत्र्यानंतर विकासाची फळे ही ठराविक भागाला मिळाली तर दुसरिकडे अन्नासाठी लोकांना आपली गावे घरेदारे सोडून मुंबई कलकत्ता. ह्यांसारख्या महानगरात गर्दि करावी लागली आणि झोपडपट्टीत वाढ राहणें व अस्वच्छ गटारात आंघोळ करणे त्यांच्या नशीबाला आले अविकसित भागात व औधौगिक विकास शैक्षणिक सुविधा. आरोग्य सुविधा अद्याप पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत ह्या भागातील दारिदयाचा फायदा धर्मांध व जमातवादी शक्ति किंवा नक्षलवादी डावे अतिरेकी घेत आहेत ह्या शक्ति धर्माच्या नावाखाली गरिब जनतेला



         आझादी. बरोबर भाकरी. याची हमी देत असत हि जनता विशेषतः बेकार युवक त्यास मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत फुटीरतेचया लढ्यात बेकार युवक दहशतवादी बनवलेले आहेत त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन धर्मांध शक्ति राजकीय वर्चस्व प्रस्थापित करीत आहेत या आंदोलनात दारूगोळा म्हणून अशा गरिब गरजू युवकांचा उपयोग करून घेतला जातो म्हणून म्हणजे फुटीरतेमागे कारणापेक्षा आर्थिक कारणे प्रभावी आहेत स्वातंत्र्यानंतर मुंबई कलकत्ता मद्रास कानपूर अशा शहरांचे औधोगिक शहरांत रूपांतर झाले असून त्यात मुंबई देशांची राजधानी बनली आहे

         रोजगारासाठी औधोगिक शहरांत खेड्यातून लोकांचा दिवसेनदिवस लोंढा गर्दि वाढत आहे दररोज हजारो कुटुंबे परप्रांतातून मुंबईला रोजगार मिळवण्यासाठी कायमस्वरूपी येतात त्यांचा परिणाम बकाल झोपडपट्टी वाढली एकीकडे गगनाला भिडलेलया इमारती जाळे तर दुसरीकडे प्राथमिक सुविधा पाणी पुरवठा स्वच्छता. अभाव असलेली झोपडपट्टी वस्ती असे विदारक चित्र निर्माण शहरात अफाट गर्दि झाल्याने नागरिक सुविधांची हेळसांड प्रदूषण रोगराई गुन्हेगारी ह्यामुळे तेथे नव्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत मुंबई कलकत्ता हि दोन महानगरे तर अतिरेकी औधोगिकरणाची बळी ठरत आहेत मुंबईत गुन्हेगारी विशवाने फुटीर शक्ति बरोबर हातमिळवणी केल्याच्या घटना ताज्या आहेत देशाबाहेरील फुटीर शक्तिचे आत्ता औधोगिक क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे आणि देशांचा आर्थिक कणा मोडण्याचा बरोबर कार्यक्रम केला आहे अस्थिरता निर्माण झाली आहे




      फुटीरतेमागे राजकीय महत्वाकांक्षेबरोबर आर्थिक विकासाच्या प्रश्न आहे ही फुटीरता नष्ट करायची असेल तर आर्थिक विकासाबाबत निवडक भागांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ह्याचे भान राजकीय नेते पक्ष यांनी ठेवले पाहिजे फुटीरतेचया प्रश्नावर आपसात व एकामेकावर दोष देण्यात हे सर्वजण दंग आहेत त्यामुळे हा फुटीरतेचा प्रश्न न सुटता अधिक जटिल बनत चालला आहे राजकीय भूमिका व कार्यप्रणाली विचारात घेता ते हया समस्येकडे पुरेशा गांभीर्याने बघणे गरजेचे आहे पण ही अपेक्षा फोल ठरली आहे जोपर्यंत सत्तेच्या हव्यासापोटी धनवान मनगटशाही लोकांना जवळ करण्याचे राजकीय पक्ष थांबवित नाहीत तोपर्यंत देशाला गुन्हेगारी व फुटीरतावाद धोका कायम राहील

         ग्रेट ब्रिटन सारख्या लोकशाही राष्ट्राला आयरिश रिपब्लिकन आर्मी ह्या फुटीरवादी चळवळीचे आव्हान ३० वर्षात मोडून काढता आले नाही मग आपल्या देशाचे काय होणार हे वास्तव आहे

         आज आपला सर्वनाश होण्याचे कारण म्हणजे समाजातील. घरातील. देशातील. राजकारणातील. फुटीरता हे आहे राष्ट्रपुरुष. समाजसेवक. महात्मा. क्रांतिकारी. सैनिक. याचा सुध्दा घात हा आपल्यातील फुटीर लोकांच्या मुळे झाला आहे 

               समाजसेवा. बंद. उठाव. उपोषण. रस्ता रोको. आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज. प्रचार व प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

आज शुक्रवार रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त. शिराळा तालुका महिला अध्यक्ष हसीना रमजान मुल्ला यांनी आरळा येथे रक्त दान शिबिर आयोजित केले होते 

          कामगार व महिला प्रश्नाकडे स्वता लक्ष देणारया महिला अध्यक्ष हसिना मुल्ला यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर्व कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली शिव प्रेमी तरुणांनी उस्फुर्त पणे या रक्तदान शिबीरात भाग घेतला.

  वसंत दादा पाटील रक्त पेढी मिरज यांनी व त्यांच्या सहकारी पल्लवी मॅडम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे मनापासून आभार मानतो सलाम आपल्या कार्याला.

वाचा-

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

आगडोंब Ahmed Munde

लोकशाही आणि घराणेशाही

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या