वृध्दाश्रम - Oldage Home


  

           शब्द किती किळसवाणा आहे बरेच काही सांगून जातो. अनाथाश्रम. संन्यास आश्रम. गृहस्थाश्रम. असे विविध नावाने समाजात असे आश्रम आहेत. 

              आपणं जन्माला येतो. आणि आपला जीवनक्रम सुरू होतो. लहान वयात खेळण्यासाठी आपण वारंवार हट करतो. आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपले आई-वडील आपल्या एक इच्छा पूर्ण करतात. वय वाढते त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी शाळा कॉलेज मध्ये आपण जातो. त्यावेळी आपल्या राहणीमानात बदल झालेला असतो. मग आपला शिक्षण. पुस्तक. शाळेची फी. आपल्या बुटापासून कपडे. आपणास खर्चाला पैसे. सायकल. मोटार सायकल. यासाठी लागणारा सर्व खर्च स्वता अडाणी अशिक्षित असाणारे आपले आई-वडील करतं असतात. एक वेळ उपाशी राहून पण मुलगा शिकला पाहिजे असे ध्येय मनात घेवून आपले कार्य पूर्ण क्षमतेने पार पाडतात. आपण आजारी पडलो तरी दवाखान्यात न जाता अंगावर दुखणं काढतात. आपल्या जीवनात जे काही मिळवले ते आपल्या मुलांसाठी आहे असा ठाम विचार विश्र्वास असतो मग तो पैसा नोकरी मधला असो किंवा पोट व आपणं आणि आपले कुटुंब व मुल बाळ जगविण्यासाठी मिळेल ते मिळेल तसे काम करून मिळविलेला पैसा असो किंवा वडिलोपार्जित संपत्ती शेती घर वारस हक्काने मुलाला मिळावे म्हणून करण्यात आलेली तरतूद असो पण मुलगा खोकला तरी त्याचे आई-वडील उशाला बसून रात्रभर जागतात आपल्या खुळ्या प्रेमामुळेच. 

              शिक्षण झालं की आई-वडील यांच्यासमोर लग्नाचा प्रश्न निर्माण होतो आणि मुलगी पहाण्यास सुरवात होते. अखेर लग्न ठरत. आणि घरात मंगलकार्य याचे सूर येण्यास सुरुवात होते. मग त्या लग्नात येणारे सगेसोयरे त्यांचा पाहुणचार खाण पिणं याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. कारणं हा आपल्या मुलाच्या व आपल्या किमतीचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी येणारा खर्च आई वडील यांनी आपल्या महतार पणासाठी साठवलेली आपली जीवनभराची पुंजी वापरली जाते आणि आई वडील यांचेकडे काहीच उरत नाही सगळं कसं व्यवस्थित रित्या पार पडते. घरात नवीन सून येते लक्ष्मीच्या पावलांनी म्हणून ओवळणे आणि बाकी सर्व धार्मिक विधी होतात. घरात नवीन सून आली म्हणून आनंदात असतात हे महतारी म्हातारं आत्ता माझी जबाबदारी संपली अस म्हणतात. 

           खरा यांचा त्रास आत्ता चालू होतो. घरातील नियोजन बदलतं जात. सकाळी लवकर उठण्यापासून ते जेवना पर्यंत ते कामांचे नियोजन असे सर्व काही बदलतं जाते. सकाळी लवकर चहा नाही. नाष्टा बारा वाजता. जेवणं चार वाजता. संध्याकाळी झोपण्यास वेळ नाही सकाळी उठण्यासाठी वेळ नाही. आणि मग या आई वडील यांचे हाल होण्यास सुरुवात होते. मुलाला आपली अडचण सांगितली की मुलगा म्हणतो माझी बायको शहरात राहीली आहे त्यामुळे तीला लवकर उठणे जमत नाही तिला जेवणं येतं नाही तिच्याबद्दल मला काही सांगू नका. तुम्हाला लवकर उठून तुमचं काम करायला काय हरकत आहे. थोडक्या थोडक्या कारणावरून भांडणं होण्यास सुरुवात होते. सून म्हणते सासू सासरे मला जाच करतात मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. भांडणात मुलगा आई वडील यांची बाजू न घेता त्यांना म्हणतो आई बाबा तुम्हाला कळतं नाही. जीवन धन्य झाले आई बाबांचे. 

            वडिलोपार्जित संपत्ती शेती जमीन घर हे सर्व तुमच्या नावांवर करून घ्या यासाठी सून तगादा लावते. मग काय म्हातारी आणि म्हातारा यांची मोठी चहादारी चालू होते जेवणं रहान झोपने यांवर कधीच ज्यांनी विचार केला नव्हता ते आत्ता संपत्ती साठी काय काय करतात बघा. आणि खुळ आई वडील मायेने आंधळं होऊन अखेर शेवटी आपली सर्व संपत्ती मुलांच्या नावांवर करून मोकळे होतात की माझा मुलगा मला मरेपर्यंत सांभाळ करेल. पण मुलांच्या रुपात असणारा चोर आपला स्वार्थ साधण्यात यशस्वी होतो. 

      मागच तेच पुढे पुन्हा भांडणं घालून पाडून बोलने चालू होते. भांडणं टोकाला जाते आणि एक वेळ अशी येते की त्यादिवशी मुलगा सून आपल्या घरातील ज्येष्ठांना तुमच तुम्ही राहन खाण कोठेही बघा आणि यांना घरातून बाहेर काढले जाते जागोजागी निंदानालस्ती सहन करून सगेसोयरे यांचे ठोमने याला कंटाळून अखेर आत्महत्या करण्याच्या मुद्यावर येतात. त्यातूनच जर समजदार असतील तर आपल्या सम वयस्क व्यक्तींसाठी एखाद्या वृध्दाश्रम याचा असरा घ्यावा लागतो आपण काय केल कुणासाठी केल माहिती नाही आपलं सर्व चोरांच्या हातात दिल आणि आणि आपणं लोकांच्या उपकारावर जगण्याची वेळ आली याचा पश्चात्ताप होतो

        शासन वृध्दापकाळात विविध योजना. विधवांना विविध योजना. जेष्ठ नागरिक यांना विविध योजना राबविण्यात येतात. शासनाने एक आदेश काढण्याची गरज आहे की जो मुलगा आपल्या आई वडील यांचे पालनपोषण करण्याची क्षमता नाही अशा मुलांना त्यांच्या आई वडील यांच्या संपत्ती शेती घर जमीन यातून अशा बेकार मुलांचे नाव कमी करण्यात यावे असा जर शासन निर्णय जारी करण्यात आला तर कोणताही मुलगा आपल्या आई वडिलांना वृधदश्रमात सोडणार नाही जगातील सर्वात जास्त वृध्दाश्रम यांची संख्या झपाट्याने कमी होईल 

       आज वृधदश्रम या नावाखाली शासन सुध्दा विविध माध्यमातून मदत करत आहे त्यामुळे वृध्दाश्रम याचा बाजार होताना दिसत आहे. शासनाच्या लाभ वेगळा आणि त्यांच्या मुलाकडून मिळणारा आर्थिक लाभ वेगळा असा सर्व धंदा झाला आहे त्यावर सुध्दा शासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या