हिंगोलीतील निराधार मातेला मानवसेवा प्रकल्पाचा आधार- Manavseva project


 

औढा नागनाथ या गावातच दिवस अन् रात्र रस्त्यावर आयुष्य जगणारी एक २७ वर्षाची तरुणी फिरायची आणि तेथेच कचराकुंडीतील उष्टे अन्न शोधून खात असायची. रस्त्यावर निराधारपणे फिरणाऱ्या या मनोरुग्ण मातेच्या असहाय्यतेचा गैरफायदा काही वासनांध पुरुषांकडून घेतला जात होता. हिंगोलीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली राठोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अतिशय तळमळीने या मातेला सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांचेकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र या निराधार मातेला स्थानिक पातळीवर मदत मिळाली नाही. वैशाली राठोड यांनी अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या "मानवसेवा" प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ यांच्याशी या निराधार मातेच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. एकीकडे कोविड १९ चे संकट आणि त्यामुळे सुरु असलेला लॉकडाऊन या परिस्थितीला तोंड देत संस्थेचे दिलीप गुंजाळ आणि स्वयंसेवकांनी या निराधार मातेला दि.०४/०५/२०२१ रोजी *"मानवसेवा"* प्रकल्पात आधार दिला. या मातेवर संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहेत.

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा*

••••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

📱९०११७७२२३३

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

संघटनांच्या बुरख्याआड. "दुकानदारी तेजीत "...

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching..

.

नागरिकांची सनद .- Citizen's charter....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या