•अहमदनगर सोमवार दि.०३ मे २०२१•
अहमदनगर येथील सर्जेपुरा चौकात एक (अंदाजित वय ३४ वर्ष) मनोरुग्ण महिला विवस्र अवस्थेत फिरत होती. डोक्यात प्रचंड ऊवा आणि त्यामुळे झालेल्या जखमांनी त्या मातेची अस्वस्थता वाढलेली होती. कोविड १९ चा हाहाकार आणि लॉकडाऊन याचा मात्र तिला काहीच गंध नव्हता.
सर्जेपुरा येथील नागरिक, स्नेहालय संस्थेच्या प्रियंका सोनवणे आणि तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळवले. एकीकडे कोरोनाचे संकट! मात्र विवस्र अवस्थेत फिरणा-या मातेच्या असहाय्य होणा-या वेदना पाहून दिलीप गुंजाळ व संस्थेच्या स्वयंसेवकांनी तोफखाना पोलीसांच्या मदतीने सोमवार दि.०३/०५/२०१९ रोजी मध्यरात्री मानवसेवा प्रकल्पात आधार दिला. आणि या मातेच्या जखमांवर मलमपट्टी करीत मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे.
No comments:
Post a Comment