डॉ.धर्मराज सुरोसे यांची शांततादूत पदी निवड...
शेवगाव प्रतिनिधी
अक्षय केदार
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग नेपाळ या संघटनेकडुन डॉ.धर्मराज एकनाथ सुरोसे यांची शांततादूत पदी निवड करण्यात आली असुन त्यांना नियुक्तीचे पत्र आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रा.रफाल मर्सिंन वासिक यांनी दिले. प्रा.सुरोसे हे शेवगाव तालुक्यातील रहिवाशी असुन ते श्री हरिहरेश्वर कला व विज्ञान महाविद्यालय कोरडगाव येथे ग्रंथपाल म्हणुन कार्यरत आहेत. मानवाधिकार संघटनेकडुन ज्ञानाचा प्रचार, प्रसार तसेच या त्यांच्याशी संबधीत या आयोगाकडुन मानवी हक्क संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन केला गेला आहे. व्यक्ती आणि समुहाच्या राज्य आणि स्थानिक विकासासाठी मानवाधिकार आवश्यक आहे. निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे हेही अत्यंत महत्वाचे आहे. सामाजीक आणि संस्कृतीक मुल्ये, मानवाधिकार शांतता, लैंगिक समानता, आरोग्य आर्थिक विकास, तरुणांच्या हक्काविषयी जागरूकता वाढवणे, गुलामगिरीतुन मुक्तता अशा मुख्यबाबींवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग कार्य करते. या निवडी बद्दल प्रा.सुरोसे यांचे खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आ.बबनराव पाचपुते, आ.राधाकृष्ण विखे पाटील, मा.आ.प्रा.राम शिंदे, मा.आ.शिवाजीराव कर्डिले, मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष अरुणभाउ मुंढे, राहुल राजळे, भास्करराव गोरे, शिवाजी तात्या राजळे, जे आर पवार, प्राचार्य डॉ.दादा मरकड, प्राचार्य डॉ.राजधर टेमकर आदींनी अभिनंदन केले आहे.
वाचा -
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...
मानवाधिकरांचे हनन म्हणजेच संविधानद्रोह - अलिम वजिर पटेल...
एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA...
No comments:
Post a Comment