तम + आशा = तमाशा

 


तम + आशा 

  आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा वाक्य प्रचार आहे . तम म्हणजे अंधार आणि त्यामधील आशा असा एकत्र करून त्या शब्दापासून मार्मिक असा शब्द तयार झाला तो म्हणजे "" तमाशा " पूर्वी प्रत्येक खेडेगावात आपल्या श्रद्धेनुसार प्रत्येक देवांचे मंदिर होतें . साध सुध मंदिर असायचं. वर्षातून एक या देवाची यात्रा ग्रामस्थ आयोजित करत होते. गाव वाड्या वस्त्या लहान लहान असायची. गावात एकच मंदिर आणि गावाच्या मधोमध एक वडाच पिंपळाच भल मोठ झाड असायचं त्याला बांधिव कट्टा असायचा त्याला पार असं म्हणलं जातं होतं. गावांची यात्रा ग्रामस्थांच्या संगनमताने ठरविली जात होती. गावांच्या यात्रेत येणारी खाऊ विक्रेते. खेळणी विक्री करणारे. कपडे विक्री करणारे. गुलाल खोबर व हळद कुंकू यांची विक्री करणारे .मटन चिकन यांच काय नियोजन असे विविध लहान लहान विक्रेते येणारं त्यांना जागा कोठे द्यायची . कुस्तीसाठी जागा कोठे . यात्रेसाठी वर्गणी . असा सर्व बेत सर्वांच्या मताने करतो. 

आत्ता सर्वात महत्वाचा विषय असतो तो गावाच्या आनबान शान याचा त्यासाठी उत्कृष्ट कला सादर करणारे . लोकांचे उत्कृष्ट मनोरंजन करणारे कलाकार. दिसायला सुंदर भिंगरी सारखी नाचणारी नृतकी .असा सर्व लवाजमा असणारा आणि गावा म्हणलं की दोन पार्ट्या याच मत असतं आपला तमाशा चांगला झाला पाहिजे. त्यांचं मत असतं त्याच्यापेक्षा आपला तमाशा चांगला झाला पाहिजे. आणि मग तमाशाचा फड ठरविला जातो . पूर्वी चार चाकी गाडी नव्हती त्यामुळे बैलगाडी मधून हे तमाशा कलावंत प्रवास करत असतं. जागोजागी मुक्काम ठोकत एकवेळ ज्या गावात तमाशा सादर करायचा आहे. ते गाव येत त्यावेळी कुठली थेअटर मग हा सर्व लवाजमा गावाच्या चावडीवर तमाशा सादर करायला येतात. तमाशातील वघा प्रमाणे कृष्ण गोपी . नाचा . राजा. प्रधान .गणपा . मावशी. ढोलकी वादक. तुणतुणे वादक. सुरपेटी. तबला. टाळ. गाण गाणारा गायक. असा सर्व आपापल्या पात्रानूसार वेशभूषा करतात . आणि आत्ता सर्वात महत्वाची लोकांना ओढ असते ती तमाशातील सुंदर सुबक बांधणी असणारी नृतकी तिच नटन वेगळंच असतं काटा पदाराची साडी. कंबरपट्टा . डोक्यात गजरा . आणि गळ्यात बोरमाळ. आणि पायात कमीत कमी दहा दहा किलोचे घुंगरु नव्हे तर चाळ आणि अशी सर्व नटापटा झाला की सर्व तमाशा कलावंत आपली कला सादर करायला तयार होतात . 

        गावातील सरपंच. नामांकित व्यक्ती यांच्या हस्ते तमाशा सुरू करण्यासाठी नारळ वाढवला जातो. आणि तमाशाला गण गौळणीने सुरवात होते. आणि लावणीचा ठेका धरून ढोलकीवाला वाजवायला सुरुवात करतो आणि फेटे. टोप्या. मुरमुरे. शिट्या . आणि आरोळ्यांनी सर्व गाव गुंजून जातो. आणि तमाशातील नृतकी जी कोणती लावणी गाणं नाचून विशिष्ट हावभाव करून दाखवत असतें. त्यामागे काहींनी काही जन प्रबोधन. समाजाच्या हितासाठी कडव आणि कडव तयार केलेलें असत . नृतकी नाचून बघून आपली कला सादर करताना आपली सुधभूत विसरलेली असतें. आणि तमाशा बघणारे कवकवीत डोळ. गिळांकृत करणार्या नजरा .कलेपेक्षा त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन निच वृत्तीचा असतो. पहिलं तमाशे भाकरीसाठी सुध्दा केलेलें मी ऐकलं आहे.कारण त्यावेळी पैसा प्रिय नव्हता तर समाजात प्रबोधन . करणारे चांगलं वाईट शिकविणारे माध्यम हे फक्त आणि फक्त तमाशाच होता . तमाशा संपतो आणि सर्व गाव आपापल्या घरला जात तमाशातील कलाकार आपला वेश बदलून प्रत्येकाला वाटून दिलेले कामे करायला लागतात. कोण जेवन करत. कोण जेवणाची भांडी धुत. कोण जेवन करणारे यांना मदत करते. काहीजण सामान आवरा आवरी करतात. म्हणजे आपणांस एक आपलं चार माणसाच कुटुंब संभाळणे होत नाही आणि हे तमाशातील कलाकार पन्नास माणसं बैल यांचा कसा संभाळ करत असतील तमाशा सुपारी जेमतेम असायची. कसा काय संभाळ करत असतील विचार करण्यासारखं आहे. 

        तमाशातील नाचणारी नार म्हणत असतें . "" पोटासाठी नाचते मी परवा कुणाची "" बाई कुंपण घालून घ्या की आंब आल तयारीला "" संभाळ फड तुरयाला आला तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा "" ग बाई मला इशकाची इंगळी ढसली "" तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका जाऊ सोडून रंग महाल . शालु बुटेदार . घुंगरू घुंगरू . डोळ्यांच्या पापण्या मधून नोट उचलणं . ओठाने नोट घेणं . असं म्हणत नाचत असतें. पोटासाठी नाचणारे आपली कला सादर करणारे या़चयाशी सन्मानाने वागा. कोणालाही त्यास अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू नका . आंब्याचा सिझन सुरू झाला की खेडेगावात आंबा चोरीला जाण हे घडतच असत त्यामुळे त्यांची राखणं करणयाचा सल्ला या गाण्यातून दिला जातो. ऊसाला कोल्हे यांच्यामुळे बरेचं नुकसान होतें त्यामुळे त्यांची राखणं करा . गावावर चोराच संकट गावांत शिक्षणाचं महत्त्व. पण या सर्वांचा नेमका उलटा अर्थ लावतो आणि कलेचा आणि कलाकारांचा अपमान करतो . म्हणजे कला आणि कलाकार आज अडचणीत सापडले आहेत 

  सुरुवातीचा तमाशा हा नाटकाचा एक प्रकार आहे . याची सुरुवात महाराष्ट्रात १६व्या शतकात झाली. ही लोककला इथल्या इतर कलांपेक्षा थोडी वेगळी आहे. 'तमाशा' या शब्दाचा अर्थ 'मनोरंजन' असा होतो. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की त्याची उत्पत्ती संस्कृत नाटक प्रकार - प्रहसन आणि भान पासून झाली आहे. महाभारत आणि रामायण यांसारख्या पौराणिक कथा या लोककलांमधून कथन केल्या जातात. यामध्ये ढोलकी , ढोलकी, तुणतुणी, मंजिरा , डफ , हलगी , कडा , हार्मोनियम आणि घुंगरू यांचा वापर केला जातो.

कार्यक्रमाचे आयोजन प्रामुख्याने महाराष्ट्रातील 'कोल्हाटी' समाजाकडून केले जाते. ही कला सादर करण्यासाठी कोणत्याही स्टेजची गरज नाही. हे कोणत्याही मोकळ्या जागेत केले जाऊ शकते.

कृष्ण कथा तमाशा सुरू होताच प्रथम गणपतीची पूजा केली जाते. यानंतर, गलवाना किंवा गोलनियर गायले जाते. मराठी साहित्यात, कृष्ण लीलेची ही रूपे आहेत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या विविध घटनांचे चित्रण केले आहे.

तमाशा नाट्याचे भाग तमाशाचे चार भाग किंवा चार संख्येत प्रतिनिधित्व करतात, ते अनुक्रमे गण, गवळण, बटौनी आणि शेवटी मुख्य नाट्य वघा आहेत

        आज सर्वत्र मनोरंजन सुधारणा झाली आणि करमणूक करण्यासाठी रेडिओ. टिव्ही. असं ब-याच सामान आलं आणि कलाकार यांना उपाशीपोटी झोपण्याची सवय लावणयास सुरुवात झाली . अजून आमूलाग्र बदल झाला तो म्हणजे तमाशाचे उघड्यावर होणारे खेळ कणातीचया आत गेले. जलसा थिएटर मध्ये तमाशे होण्यास सुरुवात झाली पण जी कलेची किंमत पैशाने घेतली आणि शरिर व्यवहार सुरू झाला ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज डाॅलबी. होमथिएटर . यामुळे यात्रा जत्रा रंगणयास सुरुवात झाली . त्यामुळे कलेची पूजा करणारे कलाकार यांचें तमाशाचे फड बंद पडायला लागले. कलाकार तमाशाचे काम सोडून शहराकडे कामाच्या शोधात जाऊ लागले . 

      शासनाला या विविध कलाकारांची किव आली आणि शासनाने कलाकार मंडळांची स्थापना केली . यामध्ये ५० वर्षांपासून पुढे कलाकारांना कोणापुढे हात पसरावे लागू नये यासाठी पेन्शन तसेच विविध योजना सुरू केल्या आणि खरोखरच कलाकारांना न्याय मिळाला असं वाटलं पण त्यातसुद्धा मोठा साप शासनाने सोडला तो म्हणजे तुम्ही कोणते कार्यक्रम केलें त्यातील लोकांच्या हितांचे किती. त्यांचे फोटो कलाकार मानधन मिळविण्यासाठी द्यावे लागत आहेत. म्हणजे मला एक सांगा पन्नास वर्षांपाठिमागे फोटोंची सोय होती कां? त्यावेळी कागदपत्रांची किंमत लोकांना होती कां ? पैसा नाही समाजसेवेसाठी आपली कला वाटणारे आज रस्त्यावर एक एक रूपयाला महाग झाले आहेत.मुल बाळ सांभाळत नाहीत. घरांत किंमत नाही. बायको व्यवस्थित बोलतं नाही. म्हणून व्यसनाधीन गेलेलं गटारात रस्त्यावर पडलेले फाटके कपडे. अशी दैना उसळली आहे . 

          आजही कलाकार असतील तर त्यांचे मन दुखविणे हा आमचा उद्देश नाही. पण आपल्या गावात पोटासाठी येणारे कलाकार यांचा अपमान अवमान करु नका. शासनाने ठराविक अटि शर्ती वर्ग करुन कलाकारांच्या हक्काचे मानधन मिळवून द्यावे 

          बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शेंबडातील माशी

 

शेंबडातील माशी
       शेंबडातील माशी

  समाजातील व शासकीय निमशासकीय शासन निर्णय जात. धर्म. शिक्षण.  ग्रामपंचायत. नगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. कामगार. रेशन. रुग्ण . आर्थिक विकास महामंडळ. माहिती अधिकार. महिलांसाठी संरक्षण विविध कायदे अंमलबजावणी पध्दत. स्पर्धा परीक्षा माहितीपर .  अशा एक ना अनेक ३०० मॅसेज चा  खजिना एकत्र एकाच पुस्तकात घेतला आहे . माझं लिखाण आवडीने वाचणारे यांचेसाठी अनमोल भेट "" आज सर्व सामान्य गोरगरीब लोक शिक्षित मुलं मुली व सर्वात दुर्बल घटकांची अशीच परिस्थिती झाली आहे त्यामुळे "" शेंबडातील माशी "" या नावाने पुस्तक प्रकाशन करत आहोत मर्यादित पुस्तक असणारं आहेत . माणूस माती आड गेला तरी त्याचं विचार चिरंतन राहतात आजचं आपल्यासाठी पुस्तक बुकिंग करा  . मी सुद्धा आर्थिक दृष्ट्या सबल नाही एवढा खर्च मी करु शकत नाही तरी आपल्या मदतीची गरज आहे

     '" नमस्कार "" 

      धड निघता येत नाही धड मरता येत नाही म्हणून   पूर्वजांनी काहीतरी विचार करून ही जुनी म्हण तयार केली असावी एकादी गोष्ट करण्यासाठी वारंवार प्रयत्न व कष्ट करून सुद्धा आपणांस किंवा एखाद्यास न्याय आणि यश मिळत नसेल तो त्यातच पुरता गुरफटून जातो. बाहेर येण्याचा कोणताही मार्ग अनेक अनाठायी संकटापासून त्याला मिळतं नाही . त्यावेळी शेंबडात माशी अडकलयागत का करतोय असं म्हणलं जातं . एखाद्या जीवनावश्यक. आर्थिक. मानसिक. सामाजिक . शैक्षणिक. वैद्यकीय. वैयक्तिक. धार्मिक.शासकीय . नियम शासकीय .  असे एक नाही अनेक विषया मध्ये वारंवार येणार्या अडचणींवर तोडगा निघत नसेल त्यावेळी हा सर्व प्रकार शेंबडात माशी अडकल्या सारखा रोज तेच तेचं असा प्रकार माणसाला जगू अथवा मरु देत नाही त्याला ही म्हण बरोबर आणि योग्य आहे 

कौटिल्याने राजा आणि राज्याच्या विस्तारासाठी युद्धांचे वर्णन केले आहे. चाणक्याचा असा विश्वास होता की जर राजाला युद्धासाठी योग्य बनवायचे असेल तर त्याला शिकार वगैरे करून स्वतःला प्रशिक्षित ठेवावे लागेल, तर नितीसारमध्ये राजाला शिकार करणे देखील अनावश्यक म्हटले आहे, ही जगण्याची आणि सहजीवनाची बाब आहे. धोरणात मुत्सद्देगिरी, सल्लामसलत आणि यासारख्या अहिंसक पद्धतींचा अवलंब करण्यास प्राधान्य दिले जाते.

कौटिल्य साम , दाम , दंड आणि भेद या नीतीचे वर्णन विजयासाठी सर्वोत्तम म्हणून करतो, तो माया, उपेक्षा आणि इंद्रजाल यावर विश्वास ठेवतो, तर नितीसार सल्लामसलत, देवाची शक्ती आणि उत्साहाची शक्ती याबद्दल बोलतो. यामध्ये राजासाठी राज्यविस्ताराची इच्छा नसते, तर अर्थशास्त्र राज्याच्या विस्तारासाठी आणि राष्ट्राच्या एकात्मतेसाठी सर्व प्रकारच्या धोरणांचे समर्थन करते.

नितिसरामध्ये युद्धांच्या विरोधात अनेक युक्तिवाद आहेत आणि हे वारंवार सांगितले गेले आहे की एक समजूतदार राज्यकर्त्याने नेहमी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

                  आज आपलीं सर्वसामान्य गोरगरीब जनता . लहान मुल. महिला. मुली. कामगार वर्ग. शासकीय निमशासकीय कामगार अधिकारी व कर्मचारी वर्ग.  सर्वात दुर्बल असा असणारा सर्व याची आज शेंबडात माशी अडकल्या सारखी अवस्था झाली आहे .

       व्यसन. निरक्षरता. बेरोजगारी.  राजकीय दबाव. सामाजिक दबाव. गुंड. दहशतवाद. टोळीयुद्ध. जातीयवाद. शैक्षणिक वर्गवारी. व्यवसायिक वर्गवारी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून लुट दबाव.  घरकुल घोटाळा. बोगस कामगार नोंदणी. महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना घोटाळा. गोठे बांधणे गोबरगॅस बांधणे शेळी पालन घोटाळा . संडास योजना घोटाळा. रस्ते गटर स्मशानभूमी. समाजभूमी .दफन भुमी घोटाळे यासाठी आलेल्या निधिचा घोटाळा .  महसूल घोटाळा लुट. रेशन वाटप घोटाळा. विविध अर्ज निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज आंदोलन उपोषण रस्ता रोको आंदोलन विविध आंदोलने यांवर राजकीय प्रशासकीय दबाव . दारु मटका. जुगार अड्डे. मावा गुटखा.गांजा अफू चरस इत्यादी नशेची उत्पादनं व  यांवर असणारा राजकीय वर्चस्व  नशेचे पदार्थ निर्मिती करणारे कारखानदार यांनी राजकीय प्रशासन पाठिशी घालत आहे त्याचा आपणांस होणारा त्रास. निवडणूकीत गुंडांचा पैशांचा. बळाचा वापर जातींमधील तेढ. वनविभाग घोटाळा. पाणी घोटाळा. विविध भुमी घोटाळे. ऐपतीप्रमाणे शिक्षण. वडोलोपारजित पध्दतीने आपल्या उरावर बसणारे राजकीय नेते म्हणजे बापाच्या जागेवर मुलगा खासदार आमदार मंत्री . आपल्या उरावर बसायला तयार . डॉ वकील. इंजिनिअर.ठेकेदार . कंत्राटदार हे नेत्यांचे बगलबच्चे आणि आपणं यांच्या हाताखाली. सफाई कामगार घोटाळा.कचरा घोटाळा. नोकरी नाही.भरती नाही.  महिला बचत गट राजकीय अड्डा. विविध सामाजिक अर्थसहाय्य विकास महामंडळ घोटाळे. माहिती अधिकाराचा शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मांडलेला खेळ   मोठा मोठाच झाला बारका बारकाच राहीला. पेट्रोल. डिझेल. गॅस एस टी तिकीट व खाजगीकरण. घरपट्टी पाणीपट्टी व विविध मनमानी कर वसुली. वशिला भ्रष्टाचार याचा आलेला उत.  एजंट दलाल यांचा लोकांना लुटण्याचा सपाटा.  कुटुंब सुरक्षित नाही मुल मुली सुरक्षीत नाहीत. महिला अत्याचारांच्या घटना.छेडछाड प्रकरणे.  हुंडाबळी. बलात्कार. खून . अपहरण. जाळपोळ खून मारामाऱ्या. गर्दिचया ठिकाणी होणारी छेडछाड.  शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये मुलांचे मुलींचे होणारे लैंगिक शोषणाच्या घटना .  घरातील भांडणे.गावागावाती महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही सुद्धा राजकीय आदेशावर माझ तुझं यावर न्यायनिवाडा करत आहेत.  विज बिल घोटाळा मनमानी विज चार्ज . बॅंका पतसंस्था फायनान्स कंपन्या विविध देवस्थान ट्रस्ट कडून व्याजाने देण्यात आलेला पैसा .  वाढते गहु बाजरी बाजरी मका कडधान्ये खाद्यतेल यांचें दर आज असमानाला पोहचले आहेत.  २००५ चया आर्थिक निहाय जनगणना आज सोळा वर्ष झाली नाही त्यांची काय अडचण सरकारला आहे .  मोफत तांदूळ आणि रेशनचा अन्न धान्य गरजूंना मिळतं ज्यांना मिळतं ते जनावरांना घालतात नाहीतर मार्केट मध्ये विकतात याला कोण जबाबदार आहे . वैचारिक मतभेद. मंदिर मस्जिद ट्रस्ट घोटाळा. अशा विविध ठिकाणांहून गोरगरीब माणुस सर्वसामान्य लोक यांची पुरती परस्थिती अगदी बिकट व शेंबडात माशी अडकल्या प्रमाणे झाली आहे. निघता येईना उलट अडकतच चालली आहेत .

            आत्ता आपण व आपल कुटुंब या़ची काहीतरी अशीच परिस्थिती झाली आहे. म्हणजे आपल्या घरात आपणच जर कर्ते पुरुष असो तर आपल्यावर सर्व कुटुंबाची पालनपोषण. भरणपोषण.  शैक्षणिक. वैद्यकीय वैयक्तिक सगेसोयरे. मयत. शुभ कार्य. मित्र मंडळी. आपले काम. बॅंका पतसंस्था फायनान्स कंपनी अशा विविध आर्थिक संस्थांचे आर्थिक देण घेण  . म्हणजे सर्वच आपणांस बघावं लागतं आणि ती आपली परम जबाबदारी म्हणून आपणं चांगल्या प्रकारे पार पाडत असतो.  आपणं आपल मन काही ठिकाणी मारतो आणि मनात नसताना सुद्धा कुटुंबाच्या मनानुसार वागतो . आपल्या मनात समाजसेवा करण्याची इच्छा आहे पण आपणाकडे असणारी हलाखीची परिस्थिती व लोकांचे न मिळणारे सहकार्य.  घरच्यांचे सहकार्य मिळत नाही. म्हणजे आपलं कुटुंब आपल्याला शेंबडागत वाटायला लागतं कारणं आपणं यातून आणि यांच्या प्रेमातून कधीचं बाहेर पडू शकतं नाही म्हणजे शेंबडात माशी अडकल्या सारखे  हाल आपल होत आहे "" जीना यहा मरणा यहाँ इसके सिवा जाना कहा "" असाच काहीतरी प्रकार होतों. सरकार भरती काढत नाही. मुलांना नोकरी नाही. मिळाली नोकरी कायम टिकेल याची खात्री नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. नोकरीची वाट बघत वय निघून गेलेल्या मुलांच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आ वासून पालकापुढे उभा आहे. या सर्व प्रकारामुळे मुलं व्यसनी . आरोपी. गुंड झाली. म्हणजे तरुण पिढी आज संपण्याच्या मार्गावर आहे असा याचा अर्थ होतो का ? या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे ?. यामुळे पालकांची शेंबडात अडकलेल्या माशी सारखी अवस्था झाली आहे .

            आज आपल्या खाजगी आणि सरकारी वैद्यकीय व्यवस्थेमुळे आपली अवस्था शेंबडात माशी अडकल्या प्रमाणे झाली आहे.  कारणं आज शहरात खेड्यात टोलेजंग मोठ मोठें विविध उपचार करण्यासाठी दवाखाने कमी पण दुकान जास्त थाटली आहेत .  कोणत्याही दवाखान्यात रूग्ण हक्काची सनद नाही.  रुग्णाला आपले हक्क अधिकार माहित नाहीत.  उपचार पध्दती निवडण्याचा आपणांस अधिकार आहे.  कोणता उपचार सुरू आहे त्याचा खर्च किती हे विचारणा करण्याचा आपणास अधिकार आहे.  दवाखान्यात विविध धर्मादाय कडून राबविल्या जाणाऱ्या आरोग्यदायी योजना सुरू आहेत कां त्यानुसार उपचार केला जातो कां.  आगोदर फी मग पेशंट उपचार पध्दती दवाखान्यात आहे कां . रुग्णाच्या आरोग्यात फरक पडत नसेल तर दवाखाना बदलयाणयाचा आपणास अधिकार आहे.  पेशंट मयत झाल्यास बिलासाठी प्रेत अडवून ठेवणें कायदेशीर गुन्हा आहे.  विविध टेस्ट रिपोर्ट आठ दिवसांच्या फरकाचे असल्यास आपणं दवाखाना बदलल्यास त्याच टेस्ट पुन्हा करणे गरजेचे नाही हे फक्त डाॅ आपले कमिशन वाढविण्यासाठी करत असतील तर त्यास नकार देण्याचा आपणास अधिकार आहे.  डॉ सांगेल त्याच मेडिकल मधून औषध घेणे बंधनकारक नाही.  हे फक्त डाॅ आपल कमिशन वाढविण्यासाठी करत असतात.  दवाखान्यात मेडिकल हे कायदेशीर चुकीचे आहे.  सरकारी दवाखान्यात केलेल्या विविध टेस्ट चे रिपोर्ट आपणांस देणें बंधनकारक आहे.  सरकारी दवाखान्यात दात. कान . नाक. घसा. हाडांचे आजार. साथीचे आजार.  कुत्र्याची सापांची लस . सफाई कामगार. सरकारी दवाखान्याचा सर्व स्टाफ वेळेवर आहे का ?   महिलांना आरोग्य सेवेसाठी उपयुक्त सोय आहे कां. महिला डॉक्टर नेमणूक करण्यात आली आहे कां . सफाई कामगार. अॅमबुलनस. ही सर्व सेवा विना मोबदला आहे कां?  आपल या सर्व गोष्टी कडे दुर्लक्ष असल्यामुळे डॉ वर्षाला एक मजला चढवत आहे आणि आपणं शेंबडात माशी अडकल्या सारखे आपली सर्व संपत्ती उपचारासाठी खर्ची करत आहोत . म्हणजे गोरगरिबांना कोणी वाली आहे कां?

      आपल्या आजपर्यंत जेवढ्या क्रांत्या झाल्या  अर्थक्रांती.  औद्योगिक क्रांती. याचा सर्वात महत्वाचा पाया आहे तो म्हणजे बांधकाम व विविध संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार होय. बांधकाम कामगार किंवा एम आय डी सी कामगार.  विद्युत जोडणी कामगार. धरणे कालवे बंधारे निर्मिती कामगार . नळ पाणी जोडणी कामगार.  झोत भट्टी कामगार. सेंटरिंग. गवंडी. पे़टर . फॅब्रिकेटर. सलायडिंग. खुदाई कामगार. स्टोन क्रशर कामगार. विट भट्टी कामगार. असे असंघटित क्षेत्रातील कामगार व विविध केमिकल कंपन्या .  व अन्य छोटे मोठें उद्योग त्याठिकाणी काम करणारे कामगार म्हणजे सर्वच ठिकाणे कि जी शहरी व ग्रामीण भागातील असतील अशा सर्व कामगारांचा समावेश कामगार म्हणून केला जातो शासनाने बांधकाम कामगार कल्याणासाठी २६ कायदे तयार केले आहेत. त्यातच सुरक्षा. आर्थिक. शैक्षणिक. सामाजिक. मानसिक अश्या विविध क्षेत्रांतून बांधकाम कामगार व अन्य कामगार यांना हक्काचे व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले त्यात १९ पेक्षा जास्त योजना आजही राबविल्या जात आहेत. पण आज ज्याचा बांधकाम कामाशी कोणताही संबंध नाही अश्या बोगस कामगारांची नोंदणी फक्त आणि फक्त इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्या १०००/२००० घेऊन बोगस कामगार नोंदणी दाखले देण्यामुळे झाल्या आहेत. अश्या इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार या़ची चौकशी करून त्याचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे व दंडात्मक व शिक्षेची तरतूद करण्यात यावी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या मालमत्तेची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी. पगार पेक्षा जास्त संपत्ती आढळल्यास जप्त करण्यात यावी. आणि त्याचे त्वरित पदावरून निलंबन करण्यात यावे

            बांधकाम कामगार म्हणलं की मळलेली कपडे असणारा हातात जेवणाचा डबा खांद्यावर टॅवेल . पाण्यात तुटलेले चप्पल. नखात सुध्दा सिमेंट असणारा हातपाय सिमेंट मुळे पांढरे असणारा. व्यसनाधीनता. अडाणी. गरजू. मिळेल ते काम मिळेल ती मजूरी यांवर करणारा असा एक केविलवाणा चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. याच कामगारांना दारु पाजून आठ दहा तास कवडीमोल मजूरी देऊन काम करून घेणारे ठेकेदार इंजिनिअर क़त्राटदार मी बघितले आहेत. या कामगारांना जीवांचे कोणतेही संरक्षण नाही.  अपघात झाला मयत कामगार झाला तर तयाची जबाबदारी कोणी घेत नाही. म्हणजे फक्त पैसा मिळवून देण्यासाठी कामगार चालतो.पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी येते तेव्हा सर्वजण हात वर करतात. म्हणजे अंगावर दहा रूपये असतील तर ठेकेदार इ़जिनिअर क़त्राटदार  वीस मांडतो आणि कामगार मरेपर्यंत काम केल तरी काही जणांचे पैसे भागले नाहीत  अस मी बरेच ठिकाणी बघितले यु पी बिहार . राजस्थान. बेळगांव. कर्नाटक . अशा विविध ठिकाणांहून भुलथापां सांगून कामगार आणले जातात . काम झाल्यावर त्यांना दम.माराहान . करून जाणे चे व कामांचे पैसे न देता रात्री अपरात्री हाकलून दिले जाते . आहे. म्हणजे यांचं आर्थिक मानसिक शारीरिक शोषण करणारे पांढरे बोके त्यांचेवर कारवाई झालीच पाहिजे . 

      बांधकाम कामांवर. विट भट्टी. स्टोन क्रशर. क्रांकेट गॅंग. गंवडयाचया हाताखाली. नगरपालिका ग्रामपंचायत सफाई कामासाठी. रस्ते कामांवर. आज आपणांस पुरुषांबरोबर महिला काम करताना दिसतात. पण त्यांना वागणूक काय मिळते. त्या त्या क्षेत्रातील ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांची या महिलांच्या कडे बघण्याची वृत्ती अतिशय किळसवाणी असतें. यातील काही कुटुंब परगावाहून आपले व आपल्या कुटुंबांचे टिच भर पोट भरण्यासाठी आलेली असतात पण तेथे त्यांना शारीरिक मानसिक अत्याचाराला बळी पडावे लागते. सांगायची चोरी मग काय गप्प सर्व सहन करावा लागत या माउलीला वाईट आहे. एखाद्या कामगारांची पत्नी सुंदर असेलतर ठेकेदार कंत्राटदार त्या कामगारांला दारु पाजून किंवा जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या बायकोचा वापर करणारे निच नराधम मी बघितले आहेत. कोणती महिला चांगली आहे.दिसायला सु़दर आहे. अशी पाहणी करणारे गिधाडं कायम नजर लावूनच बसलेली असतात . एवढंच काय कमी वयाच्या अल्पवयीन मुलीवर सुध्दा अतिप्रसंग केल्याच्या घटना आपणं वाचल्या आहेत. शासनाने विविध महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे छेडछाड विरोधी कायदा. अत्याचार विरोधी कायदा . वाईट नजरेने पाहणे.  लज्जा उत्पन्न होईल असा हावभाव करणे. असे एक ना अनेक महिलांसाठी कायदे तयार केले ते फक्त कागदावरच राहिले. बलात्कार किंवा छेडछाड प्रकरणाची महिला तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली असता तक्रार सुध्दा घेतली जात उलटं तिलाच उलटं बोललं जातं आणि गुन्हेगारीला पाठिसी घालण्याचे काम पोलिस स्टेशनला केल जात . म्हणजे शेंबडातली माशी प्रमाणे आज महिलांची अवस्था झाली आहे. 

          सर्वच चूक पुरुष मंडळींची नाही. कारणं महिलांना ५0/ टक्के आरक्षण शासनाने दिले आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला व्यवसायात नोकरीत उतरल्या महिलांचे कपडे परिधान करणे. केशभूषा. राहणीमान.  मोबाईल इंटरनेट व्हाट्सअप टि्वटर यांचा वापर  याचा विपरीत परिणाम आज समाजावर झालेला आपण विसरणे उपयोगाचे नाही . संविधान मध्ये सर्वांना राहणे पासून वेषभूषा फिरणे.बोलण याच स्वातंत्र्य दिल आहे पण त्याचा कोठेतरी गैर वापर हाच अत्याचाराचे कारण ठरत आहे . अत्याचार. वारंवार अत्याचार असा एक शब्द प्रयोग आपल्या वाचनात येतो . म्हणजे शासनाची चूक म्हणा किंवा आपली चूक पण मान्य करावीच लागणार आहे. शासनाने बलात्कार पिडीत महिलेला एक विशिष्ट अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली त्यामुळे बर्याच प्रमाणात अत्याचार प्रमाणात वाढ झाली अस एक अंदाजे मत लावता येईल बरोबर असेल का हे तूम्ही ओळखा .

राष्ट्रीय महिला आयोग (इंग्लिश: national commission for Women - NSW) ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली भारतीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला कल्याण कक्ष, महिला सुरक्षा कक्ष आहेत.

आयोगाची रचना संपादन करा

महिलांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम १९९० (भारत सरकारचा १९९० च्या अधिनियमा सं. 20) अंतर्गत जानेवारी १९९२ मध्ये संवैधानिक निकाय म्हणून केले गेले होते .

आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे 

आयोगाची कार्ये संपादन करा

आयोगाच्या कार्याची पुढील महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

महिलांसाठी संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेणे.

कायदेमंडळाला उपायांबद्दल शिफारस करणे.

गाऱ्हाणी दूर करण्याचा मार्ग सुकर करणे.

महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देण

आयोगाने वर्कशॉप / कंसल्टेशन, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, विशेषज्ञ कमेटीची स्थापना, लैंगिक जागरुकता, कार्यशाळा / सेमिनार आयोजित करणे आणि स्त्री भ्रूण हत्या, महिला हिंसा, इत्यादी जन आंदोलन चालवणे, यासाठी या सामाजिक दुष्कर्मांविरुद्ध समाज जागरूकता केली . आयोगाने लक्षद्वीप वगळता सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांचे दौरे केले आणि 'जेंडर प्रोफाइल' तयार केल्याबद्दल महिला व त्यांचे सशक्तीकरण मूल्यांकन केले.आयोगाच्या स्थापनेसाठी आणि इतर कायदे अंतर्गत महिलांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यात आली आहे.

स्थापना - भारतीय संसदेने 1990 मध्ये रा.म.आ. कायदा, 1990 संमत केला.

1992 मध्ये वैधानिक दर्जा देऊन स्थापन केला.

रा.म. आयोग 'राष्ट्र महिला' नावाची वृत्तपत्रिका दर महिन्याला हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रसिद्ध करते.  

आयोगाची रचना -

एक अध्यक्ष व पाच सदस्य.

अध्यक्षाची नेमणूक केंद्र सरकार करते.

पाच सदस्यापैकी एक सदस्य अनुसूचित जाती व एक सदस्य अनुसूचित जमातीपैकी असणे आवश्यक आहे.

आयोगाचा  उद्देश

बलात्कारपीडित महिलांना मदत व पुनर्वसनासाठी करण्यात आलेल्या कायद्यात आयोगाची महत्त्वाची भूमिका.

एन.आर.आय. भारतीयांकडून पत्नींवर होणारे जुलूम फसवणूक तसेच परित्यक्ता महिलांना कायदेशीर मदत देण्यात मोठे योगदान.

भारतीय महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणेसाठी आणि त्यांचे मुद्दे व समस्यांविरुद्ध आवाज उठवणे.

आयोगाचे अभियान प्रामुख्याने हंडा, राजकीय, धार्मिक आणि नोकरीच्या ठिकाणच्या महिलांचे प्रतिनिधित्व तसेच श्रमासाठी महिलांचे होणारे शोषण यांचा समावेश आहे. याबरोबरच पोलिसांकडून होणारे महिलांवर अत्याचार आणि वाईट वर्तणूक याचाही समावेश आहे.

आयोगाची कार्ये :-

महिलांसाठी घटनेतील तसेच इतर कायद्यातील उपलब्ध सुरक्षा उपयांची तपासणी व परीक्षण करणे. तसेच वरील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला शिफारशी करणे.

उपरोक्त तरतुदीत सुधारणेसाठी शिफारशी करणे, तसेच अशा कायद्यात त्रुटी, कमतरता असल्यास ती दूर करण्यास सुचवणे.  

तक्रारींकडे लक्ष देण्याबरोबरच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित रहावे लागते आहे, अशी बाब संबंधित सक्षम अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणे.  भेदभाव व महिलांकरिता अत्याचारांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावरील उपाययोजनेवर येणाऱ्या अडथळ्यांवर शिफारशी करणे.

महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी योजनानिर्मित्ती प्रक्रियेत सहभागी होणे आणि सल्ला देणे तसेच योजनांतील प्रगतीचे मूल्यांकन करणे, याबरोबरच, तुरूंग, रिमांडगृह, (सुधारगृह) अशा ज्या ठिकाणी महिलांना ठेवले जाते, अशा ठिकाणांचे वेळोवेळी निरीक्षण करणे व आवश्यकता असल्यास उपचारात्मक कार्यवाहीची मागणी करणे.

आयोगास घटनात्मक तसेच इतर कायद्यांतर्गत महिला सुरक्षा संबंधित उपायांशी असलेल्या घटनांची चौकशी/अन्वेषण करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या 

राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रकाशन "राष्ट्र महिला" (मासिक)

संविधान संपादन करा

केंद्र सरकार शक्ती प्रदान करणे आणि या अधिनियमान्वये निर्दिष्ट कार्ये संपादित करण्यासाठी राष्ट्रीय आयोग म्हणून एक संस्था बनवेल.

आयोगामद्धे ;

(ए) महिलांच्या हितासाठी  समर्पित एक अध्यक्ष, जे केंद्र सरकार द्वारा मनोनीत केले जाईल

(ब ) पाच सदस्य, ज्यांना केंद्र सरकार ने मनोनीत केले पाहिजे, जे योग्य, एकीकृत आणि अस्थायी आणि कायदे किंवा विधान, व्यापार संघ, महिलांचे उद्योजकता व्यवस्थापन, महिला स्वयंसेवी संस्था (महिला कार्यकर्ते समावेश), प्रशासन, आर्थिक विकास, आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्यानाचा अनुभव असावा . .

क ० केंद्र सरकार द्वारा मनोनीत एक मेम्बर-सेक्रेटरी, जोः -

व्यवस्थापन, संस्थात्मक संरचना किंवा साशाशास्त्रीय क्रियाकलाप,ii. एक अधिकारी जो युनियन  सिविल सर्व्हिस किंवा अखिल भारतीय सेवा सभासद असेल किंवा जो योग्य अनुभव असेल त्या अंतर्गत युनियन अंतर्गत सिविल पोस्ट असेल.

    कोणत्याही जात धर्म व्यक्ती यांचं मन दुखवणे आमचा उद्देश नाही . आम्ही राजकीय नेते पक्ष मंत्री आमदार खासदार पुढारी यांचा प्रचार करत नाही. 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

लेखी



 लेखी

      सर्वांच्या परिचयाचा आहे हा शब्द कारणं लेखी हा विषय आपण जन्मापासून ते रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे 

          जन्म प्रमाणपत्र. शालेय दाखला . शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये प्रवेश केल्यावर मिळणारे लेखी प्रमाणपत्र हे लेखीच असतं. शाळा कॉलेज मधील पुस्तके पावत्या खरेदी विक्री व्यवहार. जमीन स्थावर संपत्ती जल माल संपत्ती.यांचे व्यवहार लेखीच असतांत . मतदान पध्दती या अगोदर लेखीच होती. आजही लेखी पध्दतीने पदाधिकारी निवड केली जाते. म्हणजे सर्वच व्यवहार लेखी असल्याशिवाय त्याला कोणतीही किंमत नाही 

                 पूर्वी शब्दच महत्वाचा मानला जात होता. आर्थिक व्यवहार कमी होते . वस्तूंची देवानं घेवाण जास्त होती. लोकांचा एकामेकावर विश्वास होता . पैसा महत्वाचा नव्हता माणूसकी महत्वाची होती. 

          आज लोकांच्या कडे पैसा जास्त आहे. पैशाला काम नाही म्हणून समाजातील काही लोकांनी अवैध सावकारी सुरू केली. लोकाची घर.जागा. गाड्या. शेती. बायका मुले. घाणवट घेण्यास सुरुवात केली. आणि माणूसकी संपली आणि चोरांचा सुळसुळाट सुरू झाला. कोणताही लेखी व्यवहार नाही. तरीसुद्धा लोकांना माराहान करणे. उचलून नेणे. बांधून घालणे. हे प्रकार सुरुच होतें आणि आहेत. शासनाने खाजगी सावकार विरोधात कठोर कडक कायदे तयार केले आहेत तरीसुद्धा सावकार मोकाट फिरत आहेत. 

            बांधकाम क्षेत्रात आज खाजगी सावकार यांना उत आला आहे. कामगार गोरगरीब. व्यसनी.अडाणी . गरजू. असतो. शिक्षण नाही . त्यामुळे मिळेल ते काम मिळेल ती मजूरी यांवर बांधकाम कामगार जीवन अवलंबून आहे. कंत्राटदार ठेकेदार इंजिनिअर बांधकाम कामगार यांच्या अंगावर थोडं थोडं वैयक्तिक कारणासाठी म्हणून पैसे देतात आणि वर्षानुवर्षे बांधकाम कामगार यांनी मिळेल त्या मजूरीत काम करावं लागतं . पैसा परत केला तरी त्यांच्या अंगावर जसेच्या तसे पैसे काढलें जातात . हे पांढरे सावकार आहेत असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही . हे सर्व होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारणं आपण देण घेण लेखी ठेवत नाही. मौखिक व्यवहार यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पोलिस स्टेशनला तक्रार घेतली जात नाही. 

        आपणास कोणी आपणं देण असेल त्यापेक्षा जास्त पैसे मागत असेल तर सरळ विरोध करा आणि पोलिस स्टेशनला तक्रार करा . कारणं घेण लेखी नाही देण लेखी नाही म्हणजे आपणांस कोणीही त्रास धमकी देत असेल तर त्याच्या नावाने पोलिस स्टेशनला तक्रार करा. पोलिस बांधव आपणांस मदत करतील . आजही बांधकाम कामगार यांना लुटणारे पांढरे चोर जागोजागी टपून बसलेले आहेत. कामगारांनी कोणतेही काम करताना व करवून घेतांना ठरवून करा लेखी करा . नाहीतर हे पांढरे चोर आपणांस जास्त पैसे मागून लुटणार आहेत असं कोणीही करत असेलतर त्याला लेखी आहे का हे विचारा जर लेखी नसेल तर एकही रूपया देऊ नका

      बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष 

अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय आहे आयुर्वेद

 

काय आहे आयुर्वेद
       काय आहे आयुर्वेद

              आपल्याला सर्वात मोठं वरदान लाभले आहे ते म्हणजे पृथ्वी कारण पृथ्वीवर पाणी.फळे. फुले. भाजीपाला. वेली. झाडें झुडपे. हे सर्व काहींना काही औषधी गुण घेऊन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि आहेत. पृथ्वी वरील प्रत्येक वस्तू मध्ये औषधी गुणधर्म आहेत पण आपणांस हे सर्व कळण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जावं लागणार आहे. त्याशिवाय कोणती वनस्पती त्याचे औषधी गुणधर्म काय याचं आपणास ज्ञान होणार नाही . पृथ्वीवरील माती सुध्दा औषधी आहे. प्रत्येक वनस्पती ची साल फुले फळे यामध्ये औषधी अनमोल ठेवा दडला आहे . त्याचा अभ्यास करून लोककल्याणासाठी त्याचा वापर कसा करता येईल हाच आपला प्रयत्न असण गरजेच आहे.

          पूर्वी आज असणारे मोठें मोठें दवाखाने. हाॅसपिटल. लॅब विविध टेस्ट करणार्या मशिन नव्हत्या. एक्सरे. एम आय आर. अशा अत्याधुनिक डिजिटल मशिन उपलब्ध नव्हत्या मग त्यावेळी लोक शारीरिक मानसिक. अशा विविध शारीरिक व्याधीने आजारी पडत नव्हते काय ? वरील कोणतीही सेवा सुविधा नसून सुध्दा लोक शंभर वर्षे जगत होती. दात पडत नव्हते. केस लवकर पांढरे होत नव्हते. कॅन्सर. मधुमेह. साखर. बी पी. हार्ट अॅटक. डेंग्यू. मलेरिया. काविळ. हिवताप. अशा विविध शारीरिक व्याधीने लोक आजारी पडत नव्हती का? आणि माणूस आहे म्हणजे आजार आहेच. मग आपल्या समोर एक प्रश्न उभा राहतो की त्यावेळी लोकांच्या आजारांवर काय उपचार पद्धती वापरली जात होती. का उपचारा विना लोक मरत होती का ? विचार करावा लागेल . त्याकाळात सुध्दा अपघात होणे. भांडणं मारामाऱ्या. असे प्रकार घडतंच होतें. मग अशा अपघातात पायांचे.मानेचे . हातांचे .व अन्य कोणतेही हाड मोडलयास कुठली एक्सरे मशिन होती की त्यामुळे उपचार करणार्या व्यक्तिला कुठलं हाड कुठ मोडल आहे हे कसे कळत असेल . त्यासाठी कोणते प्लास्टर बंॅडेंज वापरल जात होतं. यातलं काही त्यावेळी उपलब्ध नव्हते मग त्यावेळी लोकांचे हाडाबाबत असणारे ज्ञान शंभर टक्के बरोबर होत. लोक व्यायाम सकस.आहार .दुध. तुप. दही. बाजरी. ज्वारी. गहू. भाजीपाला बिगर केमिकलचा. आणि मजबूत शारीरिक यष्टी मर्दानी खेळ. दांडपट्टा. तलवार बाजी .घोड स्वारी . शेतीची कामे . पैलवान. कुस्ती. यामुळे या लोकांना शरिरातील एकान एका हाडांचा अभ्यास होता . आत्ता एम आय आर. एक्सरे. विविध टेस्ट रिपोर्ट चुकीचं निघत आहेत. त्यामुळे रोगांचे निदान होत नाही त्यामुळे योग्य उपचार होत नाही. इंग्रजी औषधाने लोक विविध आजाराने आज पछाडलेली आहेत . लोकाचा वेळ आणि पैसा वाया जात आहे तो फक्त आणि फक्त निदान न होण्यामुळे कित्येक डॉ यांची विविध आॅपरेशन फेल झालेली आपण बघतो .काही वेळा रुग्ण मयत होतों. मयताला आॅकसिजन लावून पैसा उकळणारे महाभाग आज सुध्दा आपल्या आजूबाजूला आहेत .

            आयुर्वेद म्हणजे झाडपाला कास्ट औषधी यांचे ज्ञान असणारी जाणकार व्यक्ती यांचें रोगांचे निदान कधीचं चुकीचं ठरतं नाही . पूर्वी हातांचे. पायांचे. माणेचे . मणक्याचे. व अन्य कोणतेही हाड मोडले अथवा निसटले तर त्याला विशिष्ट झाडपाला बांधून वर काठ्या बांधून ते हाड बरोबर परफेक्ट बसविले जात होतें . रुग्णांना औषधी झाडपाला व वेली . विविध फळे. यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असे . लोक आपल्या जखमेवर माती सुध्दा लावत होते. काहीजण आजही मातीने दात घासतात. पण विचार करावा लागेल की त्यावेळची माती स्वच्छ होती आज मातीत विविध खतादवारे विविध घातक केमिकल . मिसळल गेल आहे त्यामुळे सर्व निसर्गाचा खजिना अडचणीत आला आहे . 

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद आहे . विविध धार्मिक विद्वानांनी त्याची रचना 5000 ते लाखो वर्षांपूर्वी मानली आहे. या संहितेतही आयुर्वेदाची अत्यंत महत्त्वाची तत्त्वे सर्वत्र विखुरलेली आहेत. चरक , सुश्रुत , कश्यप इत्यादी मान्य लेखक आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात . यावरून आयुर्वेदाची प्राचीनता सिद्ध होते.

धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे. तो विष्णूचा अवतार मानला जातो .

परंपरेनुसार, आयुर्वेदाचे आदि आचार्य अश्विनी कुमार असल्याचे मानले जाते , ज्यांनी बकरीचे डोके दक्ष प्रजापतीच्या धडाशी जोडले होते. हे ज्ञान इंद्राला अश्विनीकुमारांकडून मिळाले. इंद्राने धन्वंतरीला शिकवले . काशीचा राजा दिवोदास हा धन्वंतरीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. त्याच्याकडे जाऊन सुश्रुतने आयुर्वेदाचा अभ्यास केला. अत्रि आणि भारद्वाज हे देखील या शास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. अश्विनीकुमार , धन्वंतरी , दिवोदास (काशिराज), नकुल , सहदेव , अर्की, च्यवन, हे आयुर्वेदाचे आचार्य आहेत .जनक , बुध, जावळ, जाजली , पायल, कर्ता , अगस्त्य , अत्री आणि त्यांचे सहा शिष्य ( अग्निवेश , भेडा, जातुकर्ण , पराशर , सिरपाणी , हरित ) , सुश्रुत आणि चरक.

आयुर्वेदाचा उगम सुधारणे

चरक शाळेनुसार (अत्रेय संप्रदाय)

चरक शाळेनुसार, आयुर्वेदाचे ज्ञान प्रथम ब्रह्माकडून प्रजापती, प्रजापती अश्विनीकुमारांकडून, इंद्राकडून आणि भारद्वाज इंद्राकडून मिळाले . च्यवन ऋषींचा कार्यकाळ देखील अश्विनीकुमारांच्या समकालीन मानला जातो. आयुर्वेदाच्या विकासात च्यवन ऋषींचे फार मोठे योगदान आहे. त्यानंतर भारद्वाज यांनी आयुर्वेदाच्या प्रभावाखाली दीर्घ, आनंदी आणि निरोगी जीवन प्राप्त केल्यानंतर इतर ऋषींमध्ये त्याचा प्रसार केला. त्यानंतर पुनर्वसु अत्रेयांनी अग्निवेश , भेळ, जातू, पराशर, हरित आणि क्षर्पणी या सहा शिष्यांना आयुर्वेदाचा उपदेश केला . या सहा शिष्यांपैकी सर्वात बुद्धिमान म्हणजे अग्निवेशत्यांनी प्रथम संहिता तयार केली - अग्निवेश तंत्र, जे नंतर चरकाने नाकारले आणि चरकसंहिता असे नाव दिले , जो आयुर्वेदाचा आधारस्तंभ आहे.

सुश्रुत (धन्वंतरी पंथ) नुसार

सुश्रुताच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुश्रुत इतर महर्षींसह काशीराज दिवोदासाच्या रूपात अवतार घेतलेल्या भगवान धन्वंतरीकडे गेले तेव्हा सुश्रुत आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि त्यांना लागू केले. त्या वेळी भगवान धन्वंतरींनी त्यांना उपदेश करताना सांगितले की, ब्रह्मदेवाने स्वतः प्रथम अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद एक हजार अध्यायांमध्ये प्रकाशित केला - सृष्टीच्या निर्मितीपूर्वी लाखो श्लोक आणि पुन्हा मानवाला अदूरदर्शी समजून त्याचे विभाजन केले. आठ भागांमध्ये. अशाप्रकारे धन्वंतरीने आयुर्वेदाच्या प्रकाशनालाही ब्रह्मदेवाने प्रतिपादन केलेले मानले आहे. पुन्हा भगवान धन्वंतरी म्हणाले की ब्रह्मदेवाकडून प्रजापती दक्ष, अश्विनीकुमार द्वय त्यांच्याकडून आणि इंद्राने आयुर्वेदाचा अभ्यास केला

      आज आयुर्वेदाचा बाजार काही बोगस डॉक्टर यांनी मांडला आहे . यांनी लोकांची अडचण ध्यानात घेऊन आणि पैसा मिळविण्याचे साधनं म्हणून आज आयुर्वेदाचा वापर करणारे बोगस डॉक्टर यांनी उत आला आहे . केरळीयन प़चक्रम . माॅलिश विविध तेलाने . विविध इंग्रजी औषध मिसळून तयार केलेली वेदना शामक औषधे वापरण्यास सुरुवात केली आहे. कारणं आज लोक विविध शारीरिक आजाराने ग्रासलेले आहेत. कोणाला साखर आहे.कोणाला बी पी आहे. कोणाला सांधे कंबर मणक्यांच्या आजार आहे. तर कोणाला वजन कमी करण्याचे वेड आहे. कोणाला. संतती प्राप्त करण्याचे कोड आहे. अशा एक नाही अनेक व्याधीने लोक ग्रासलेले आहेत . याचाच फायदा बोगस डॉक्टर आणि आयुर्वेद नाव पुढ करून पैसा मिळविणारे चोर आज गल्ली बोळात आपली अलिशान दुकान थाटून बसले आहेत.

        आज आयुर्वेदाचा सुध्दा काही कंपन्या एजंट बोगस डॉक्टर यांनी उघड उघड बाजार मांडला आहे. औषध असतं इंग्रजी पण आयुर्वेदिक भासवून लोकांना फसवले जात आहे. सर्वच बोगस आहेत असं म्हणता येणार नाही. आजही आयुर्वेदाचा समाजसेवा करण्यासाठी विना मोबदला उपचार करणारे देव दूत आजही समाजात आहेत. त्यातले काहीजण हातांचा गुण म्हणता येईल असा उपचार करत आहेत. तर बोगस आयुर्वेदिक डॉक्टर प्रत्येक रुग्णांकडून मनमानी दराने फी वसूल करत आहेत. समजा एका पेशंटसाठी ५०० रूपये धरले तर रोज रोज शंभर पेशंटला फसवणारा रोज किती पैसे मिळवत असेल याचा अंदाज आहे कां? आज एकाबाजूला औषधांचे अमाप दर लावून लुटत आहेत. डॉ आपले खिसे जीवंत काय मयत रुग्णांकडून सुध्दा बेमाफी रुग्ण फी वसूल करत आहेत. मेडिकल मालक डॉ यांना पेशंट माग औषधांच्या दरानुसार कमिशन देत आहेत दर रोज कमिशन दवाखान्यात पोहच केलें जात आहेत. त्यामुळे डॉ आपल्याच मेडिकल मधून औषध खरेदी करण्याचें पेशंट वर लादत आहेत त्यामुळे पेशंटची दोन्ही कडून लुट होत आहे. 

        दिनचर्या बदला सकाळी लवकर उठा व्यायाम करा. फिरणे पोहणे. सायकल चालवणे. पळणे. थोड पण आरोग्यासाठी चांगले असल येवढेच खा. फळें पालेभाज्या कडधान्ये अंडी. दुध पाणी भरपूर प्या यांचे सेवन करा आरोग्य चांगलें ठेवा आणि डॉ मग तो आयुर्वेदिक असो वा इंग्रजी औषध देणारा आपणांस लुटणार दोघंही त्यामुळे "" तुझं आहे तुझ पासी पण तु जागा चुकलाशी "" असा प्रकार होणारं आणि आपले सर्व धन हे दोन्ही चोर लुटणार हे खरंच आहे ‌.

             बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वर्मी घाव

 


वर्मी घाव
       वर्मी घाव 

                वाळीत टाकण्याचा अनुभव लहान पणापासून आपणास येतो. आपण शाळेत काॅलेज विद्यालय महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालये यामध्ये आपल्याला आपल्या काही जाणूनबुजून केलेल्या किंवा हेतूपुरस्सर केलेल्या किंवा चुकून आपल्या हातून समाजालाही कमी पणा येईल असं कोणतेही काम झाले तर त्याला समाजातील लोकांना त्यांच्या अधिकार व हक्कापासून वंचित ठेवणे याला वाळीत टाकणं असं म्हणलं जातं

                   समाजातील काही समाजांचे ठेकेदार समाजकंटक आपला व समाजांचा दबाव समाजातील गोरगरीब लोकांवर रहावा यासाठी समाज व्यवस्थेत विविध नियम अटी घालून लोकांना बांधले जाते. एखाद्या कुटुंबांचे . अन्न. पाणी. बंद करणे. लाईट बंद करणे. मयतासाठी किंवा शुभ कामासाठी या कुटुबाला कोणीही बोलवत नाही. त्यांना आमंत्रण दिले जात नाही. या कुटुंबातील मुलांचे मुलींचे लग्न जमतं नाही कोणी देत नाही कोणी करून घेत नाही एवढा अत्याचार या आणि अशा कुटुंबावर केला जातो. जातपंचायत ही एक संकल्पना बरेचं वर्षांपासून अमलात आहे. समाजातील भांडणे. हेवेदावे. जमीन जागा यासाठी भांडणे. किंवा अन्य विषयाचा न्याय निवाडा करण्यासाठी लोक पोलिस स्टेशनला जात नव्हते त्यावेळी न्याय निवाडा करणारे एक वचनी एक न्यायनिवाडा करणारे कोणताही भेदभाव करणारे नव्हते. दारु मटन काही आर्थिक फायदा यासाठी भुलणारे नव्हते .

        आज सर्वत्र उलट झाल आहे जातपंचायत नावावर आज समाजातील लोकांना आर्थिक मानसिक सामाजिक पध्दतीने लुटत आहेत. जातपंचायत न्याय निवाडा करणारेही पंच यांचं येणे जाणे दारु मटन पैसा वेळ पडल्यास बायकांची मागणी करणारे सुध्दा मी पंच पाहीले आहेत . कुणाला काय शिक्षा द्यायची कुणाकडून काय काम करून घ्यायचे काही पंच न्यायनिवाडा होईपर्यंत या कुटुंबातील लोकांच्या बरोबर सुखात दुःखात मुल मुलीच्या लग्नात कोणीही जाऊ नये. आपण किंवा त्या त्या समाजातील लोक काय मूर्ख आहेत कां चांगले वाईट बघून सुध्दा आंधळयचे सोंग घेतात . काही पंचानी पैसे घेऊन काही न्यायनिवाडे समाजातील विशिष्ट कुटुबा बाबतीत केले आणि लाखोंची मालमत्ता गोळा केली. महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे. जमीन जागा स्थावर संपत्ती काबिज करणं. उकळत्या तेलात हात घालणे. हा तर समाजातील लोकांवर मोठा अन्याय आहे. अशा समाजातील पंचांना पायतानाने मारायला हव आहे कां? 

, रूढी वा त्या त्या समाजातील प्रसृत धर्म यांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला जातिबहिष्कृत करणे, असा आहे. आतापर्यंत वाळीत टाकण्याची शिक्षा हिंदू समाजात त्या त्या जमातीत विशिष्ट अपराधाकरिता अपराधी व्यक्तीला देत असत. निरनिराळ्या जमातींत आपापले निर्बंध किंवा विधिनिषेध सदस्य व्यक्तींकडून पाळले जावेत, याबद्दल त्या दक्ष असत. उदा., दक्षिणेतील ब्राह्मण जमातीत मांसाहार निषिद्ध मानीत. हा निषेध वाळीत टाकण्याइतका कडक असे. ब्राह्मण विधवाविवाह निषिद्ध मानीत. त्याबद्दल शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात व भारतात नव्या युगाला अनुसरून सुधारक व सनातनी असे गट पडले होते. त्यासंबंधी चर्चा आणि वादविवाद सामुदायिक स्वरूपात झालेले आहेत. धर्मशास्त्र विषयातील संदर्भात सविस्तर चर्चेकरिता जनभाषेत प्रसिद्ध झालेली अनेक पुस्तके आहेत. वाळीत टाकणे म्हणजे जमातीच्या सदस्यत्वाचा अधिकार काढून घेणे आणि जमातीतील प्रतिष्ठा नष्ट करणे, ही गोष्ट अगदी अलीकडे आधुनिक शिक्षणाचा प्रसार झालेल्या हिंदू जमातींमध्ये परिणामशून्य झाली आहे. वाळीत टाकण्याची शिक्षा आधुनिक शिक्षण ज्यांच्यात कमीजास्त प्रमाणात पसरले आहे, त्यांच्यामध्ये महत्त्वाची राहिली नाही. जुन्या जमान्यात जे निर्बंध जमातीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे मानले जात, त्यांचा महिमा आता संपला आहे.

वाळीत टाकण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी महत्त्वाचा निर्बंध मोडला. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि पुढे त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई अशी चार अपत्ये संन्यासातून परतल्यानंतर झाली. ही गोष्ट ब्राह्मणत्वाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही, म्हणून त्यांना उपनयनाचा अधिकार दिला गेला नाही. आणि लोकांना अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरी शिकविणारे ज्ञानेश्वर यांना आपणांस मुकावे लागले ही आपली शोकांतिका आहे. त्यावेळी झालेली समाजातील समाजकंटक यांची चूक आजही आपण भोगतो आहे. ती शूद्रसमानच होत, असे धर्मशास्त्र सांगते मरेपर्यंत त्यांच्या आई-वडिलांनाच वाळीत टाकले होते. ही शिक्षा त्यांना भोगावी लागली. या शिक्षेला "" ‘मरणान्त शिक्षा’ ""असेच म्हणतात. विठ्ठलपंत व रखुमाई यांनी काशीस जाऊन गंगेत देहत्याग केला, अशीही नोंद आहे. अशाच प्रकारची अलीकडच्या काळातील काही उदाहरणे या संदर्भात देता येतील. उदा., पंचहौद मिशन चहा पार्टीतील (१८९०) लोकमान्य टिळक आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग व त्याविषयीची तत्कालीन समाजाची प्रतिक्रिया किंवा बराच काळ गाजलेले बोहरा समाजातील वाळीत टाकण्याचे प्रकरण इत्यादी.

सामाजिक संकेत विस्तृत स्वरूपात आणि जीवनाच्या सर्व अंगोपांगांना अनुलक्षून प्रसृत झालेले असतात. त्यांच्या पालनामुळे सामाजिक स्थैर्य निर्माण होते, अशी समाजाची दृढ श्रद्धा आहे. याउलट या संकेतांचे पालन केले नाही, तर सामाजिक स्थैर्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण होते. साहजिकच समाज अशा प्रकारचे वर्तन घडू नये, म्हणून विशेष दक्षता घेतो. सामाजिकीकरणाच्या या प्रक्रियेमुळे सर्वांना सामाजिक संकेतांचे पालन करणे आपाततः शक्य होते परंतु व्यक्ति-वैशिष्ट्ये व निरनिराळ्या प्रासंगिक गरजा यांमुळे अनेकदा सामाजिक संकेतांचे उल्लंघन होते. उदा., एखादी व्यक्ती परदेशगमन करून परत आल्यानंतर तिच्या आहार-वर्तन-वेष-विचारांत आमूलाग्र बदल होतात आणि खाणे-पिणे-पोशाख, सामाजिक संबंध, विवाहपद्धती इत्यादींत नवीन कल्पना प्रविष्ट होऊन त्या आचरणात आणण्याचा प्रयत्नही केला जातो. परिणामतः मूळ सामाजिक संकेतांना धक्का बसतो. यासाठी समाज काही उपाययोजना करतो आणि सर्वसाधारणतः परंपरागत संकेत पाळले जावेत, अशी व्यवस्था त्या समाजाकडून केली जाते. अशा संकेतांचे पुनःपुन्हा उल्लंघन झाले, तर सर्वांत कडक शिक्षा म्हणजे, अशा लोकांना समाज वाळीत टाकतो. साधारणतः व्यक्ती ही समाजावर अवलंबून असते, त्यामुळे वाळीत टाकणे ही सर्वांत कडक शिक्षा मानली जाते. या शिक्षेमुळे व्यक्तीचा समाजाशी असलेला संबंध पूर्णतः तोडण्यात येतो आणि त्या व्यक्तीच्या कोणत्याच गरजा भागविल्या जात नाहीत. साहजिकच या शिक्षेमुळे अशा व्यक्तीवर किंवा गटावर समाजाचे दडपण आणले जाते. वाळीत टाकणे हे समाज नियंत्रणाचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.

पाश्चिमात्य देशांत कोणत्याही चर्चचा वा धर्मसंस्थेचा सदस्य असलेल्या व्यक्तीस धर्माची निंदा वा कुचेष्टा केल्यास विश्वासू सख्यसंबंधांतून (कम्यून्यन) तात्पुरते वा दीर्घकाळ वगळण्यात येते आणि ती व्यक्ती धार्मिक हक्क, विशेष अधिकार व प्रासादिक फायदे यांना वंचित होते. प्राचीन काळी ग्रीक व रोमन संस्कृतीत तसेच पेगन अनुयायांत, ज्यू व ख्रिस्ती धर्मांत आणि विशेषतः आदिम समाजांत ही पद्धत रूढ होती. प्रदेशपरत्वे आणि त्या त्या धर्मातील संकेतांप्रमाणे या पद्धतीत फरक आढळतो. ऑर्थडॉक्स, अँग्लिकन, रोमन कॅथलिक या पंथांच्या चर्चची व्यवस्था कमीअधिक प्रमाणात या पद्धतीच्या बाबतीत सारखीच आहे. रोमन कॅथलिक पंथीयांत एखाद्याने पोपच्या अधिकारावर हल्ला केल्यास किंवा ईश्वराची निंदा वा कुचेष्टा करण्याचे धाडस केल्यास, ती व्यक्ती वाळीत टाकली जाते. ख्रिस्ती धर्माप्रमाणे वाळीत टाकलेला माणूस चर्चमधील मूलभूत हक्कांस पारखा होतो परंतु त्याचे बाप्तिस्मा-संस्कार नष्ट होत नाहीत. रोमन कॅथलिक चर्चची या संदर्भातील विद्यमान नियमावली, कोड ऑफ कॅनन लॉ (१९१८) या ग्रंथातील २२५७-२२६७ या कॅनन्समध्ये (शास्त्रनियम) उद्‌घृत केलेली आहे. सक्षम धर्माधिकाऱ्याच्या आदेशाने शिक्षा भोगणाऱ्या माणसाने क्षमेची याचना केल्यानंतर काही वेळा ही शिक्षा रद्दही करण्यात आली आहे. पूर्वी वाळीत टाकलेली व्यक्ती मरण पावली असता, तिचे दफन पवित्र भूमीत करण्यास परवानगी नव्हती परंतु या कडक धोरणात बरेच फेरफार झाले असून या शिक्षेचे सर्व अधिकार चर्चच्या प्रार्थना समाजाकडे (काँग्रिगेशन) सुपूर्द केलेले आहेत. कॅनन लॉच्या सुधारित नियमावलीवर दुसरे पोप जॉन पॉल यांनी जानेवारी १९८३ मध्ये संमतिदर्शक स्वाक्षरी केली. या नियमावलीत वाळीत टाकण्याच्या शिक्षेस पात्र होणारी कारणे ३७ वरून ७ पर्यंत मर्यादित केलेली आहेत. त्यामुळे अलीकडे अशा प्रकारची प्रकरणे अत्यल्प प्रमाणात घडतात.

आदिवासींमध्येही वाळीत टाकण्याची कडक शिक्षा प्राचीन काळापासून प्रचारात असल्याचे अनेक दाखले मिळतात. आदिम लोकांचे जीवन प्रचलित रीतिरिवाजांना अनुरूप असे असते. रीतिरिवाजांच्या विरुद्ध वर्तन करण्यास कोणतीही व्यक्ती सहसा धजत नाही कारण रीतिरिवाज हे धर्माशी संबंधित असतात आणि त्यांचे उल्लंघन कोणत्याही एखाद्या व्यक्तीने केल्यास दैवी प्रकोप सर्व समाजावर होतो, अशी त्या लोकांची धारणा असते. जमात पंचायतीचा निर्णय मान्य करून त्याप्रमाणे शिक्षा भोगणे, हे प्रत्येक व्यक्तीचे आवश्यक कर्तव्य मानले जाते व पंचायतीचा निर्णय अंमलात न आणणाऱ्या इसमांना वाळीत टाकण्याची किंवा त्यांच्याशी कसलाही सामाजिक संबंध न ठेवण्याची कडक शिक्षा दिली जाते.

            समाजातील लोक शिक्षित झाली लोकांना शिक्षणाचे महत्व कळले. त्यामुळे शासनाने आपल्या हितासाठी कोणते कायदे तयार केले आहेत हे कळले. न्याय निवाडा करण्यासाठी न्यायालयात . तहसिलदार. सत्रनयायालय. लोक न्यायालय. अशी विविध कार्यालये स्थापन करण्यात आली. त्यामुळे सापेक्ष निःपक्ष पणाने सबळ पुरावे बघून न्याय देणारी व्यवस्था अमलात आहे याची लोकांना खात्री झाली आणि लोक या न्याय व्यवस्थेकडे आकर्षित झाले. शासनाने जातपंचायत वर बंदी घातली कुठेही जातपंचायत भरत असेल तर सदर पंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सदर गाव तालुका जिल्हा या स्तरावरील पोलिस प्रशासनाला देण्यात आले आणि जातपंचायत नावावर लुटणारे समाजातील चोर यांना चाफ बसला आणि जनतेने गोरगरीब समाजातील लोकांनी मोकळा श्वास घेतला. 

          आजसुद्धा काही समाजात जातपंचायत सुरू आहे. ती सुद्धा शासन नियमांच्या बाहेर आहे. आजही अशी जातपंचायत असेलतर जवळच्या पोलिस स्टेशनला आजच तक्रार करा आणि न्याय निवाडा नावाखाली लुटणारे चोर शासनाच्या चरकयात सांपडले पाहिजेत 

        बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दिवा . दिवा .

 

दिवा . दिवा .

            प्राचीन काळापासून मनुष्य प्राणी कुठल्या ना कुठल्या बंधनात . प्रेमात बांधला गेला आहे. आशेवरच जीवन कायमचं आहे. त्यांचे सर्वांचे नाते कोणत्या ना कोणत्या खानदानाशी रक्ताचे नाते जुळलेले असते. आजही आम्ही हे चांगल्या रीतीने जाणतो की. आपल्या कुटुंबात विविध कुळात. विविध खानदानात छोट्या छोट्या गोष्टींसाठी भा़डणे झाली आणि पूर्ण खानदानाचा नायनाट झाला दिवा लावण्यासाठी सुध्दा कोण बाकी राहिलं नाही. आजही दिवसेंदिवस मानसाचे जीवन धकाधकीचे आहे. अशा आकांक्षा वाढल्या आणि माणसाच्या मनात काम.मोह .माया. स्वार्थ. मत्सर. द्वेष. यांनी खोलवर जागा केली आहे. हे आजचे नाही बरेचं वर्षांपासून हे आपणं बघत आलो आहोत. महाभारत युद्ध. रामायण. हे आपल्याला शंभर वाईट लोक खानदान मध्ये असण्यापेक्षा पाच चांगली लोक भारत वर्ष घडवितात हे खरे आहे. आपल्या कुटुंबात झालेली छोटी चूक मोठ्यात मोठं संकट निर्माण करु शकते आणि सर्व कुटुंब खानदान बेचिराख होण्यास वेळ लागत नाही. याच गोष्टी यांचा विचार करून काही मत मांडत आहे . हे सर्व विचार आपल्या कुटुंबाला खानदानाल लाभदायक होतील अस मला वाटत. 

       कोणत काम चांगलं आहे कोणत वाईट आहे याचा आपणांस व आपल्या कुटुंबास काय फायदा तोटा होईल हा विचार आपल्या कुटुंबाला लाभ किंवा. संकटात घालू शकतो. मी लोकांचे चांगलें वाईट ओळखून तीच गोष्ट सा़गेन की समजावून घेऊन लोक आपले कुटुंब खानदान सहीत गुणवान होऊन जाईल आणि वाईट यांची त्यांना ओळख होऊन जाईल

         ज्या घरात भा़डखोर पत्नी नितीचार न स़भाळणारी . तोडफोड करणारा नोकर हा आपले नुकसानच करणार. तिथे नेहमी वाद भांडणे व दुःखच असतें. आपला आणि आपल्या कुटुबाचा. खानदानाचा खरा सदस्य तोच असतो.जो वाईट वेळ आल्यावर आपले धैर्य न सोडता आपल्या लोकांना तन.मन. धन. आणि पूर्णपणे निस्वार्थी पणाने मदत करतो. 

                ज्याचा मुलगा मुलगी आज्ञाधारक असेल.असे कुटुंब स्वर्गापेक्षा सुंदर असतें. त्याला एक चांगलें आणि सुखी कुटुंब म्हणता येईल. अशा कुटुंबात नेहमी सुख शांती खरं प्रेम बघायला मिळते. आपल्या काही चूका आपला वेगळेपणा यामुळे आपणं कायम दुःखी कष्टी असतो. असे लोक आपले कुटुंब सोडून दुसर्याच्या कुटुंबात वास्तव्य करत असतील तर ते सर्वांना जास्त दुःख देणारे असतांत . बुध्दी असणार्या लोकांना आपल्या मुलांना कुटुंबाला अपत्यांना योग्य शिक्षण द्यावे. चांगल्या शिक्षणाने त्यांना जीवन जगण्यासाठी चांगलें मार्गदर्शन मिळेल त्यांचे जीवन सुखकर होईल. कारणं अपत्याच्या कार्यामुळे कुटुंबांचे खानदानाचे नाव प्रतिष्ठा वाढते. चांगली गुणवान अपत्ये बुद्धिमान अपत्ये खानदानाची कुटुंबाची प्रतिष्ठा माण वाढवत असतात.जे माता पिता आपल्या अपत्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात ते मुलांचं सर्वात मोठें शत्रू आहेत. अशी जी अपत्ये अशिक्षित असतात ती तरूण झाल्यावर त्याच्या ध्यानात येते की आपणं जगापेक्षा किती मागं आहोत याची जाणीव होते. त्यांच्या मनात हिन भावना निर्माण होते. या मुलांची अवस्था संस्थांच्या सानिध्यात राहणा-या कावळ्या प्रमाणे किंवा बगळया प्रमाणे होईल म्हणून प्रत्येक माता पिताने आपले परम कर्तव्य म्हणून आपल्या मुलांना जास्ती जास्त शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे मुल मुली तरुण झाल्यावर विशिष्ट ज्ञानाने योग्य होतील. मुलांचे मुलींचे फाजिल लाड केले तर त्यांच्यात अनेक दोष निर्माण होतात. म्हणून मुलगा मुलगी शिष्य याचं लाड न करता त्यांना कठोरपणे वागावावे. पण आज काळ बदलला आहे मुलगा मुलगी शिष्य पालकांना बोलू देत नाहीत. यांच्यावर ओरडणे मारणे ही कुटुंबाची खानदानाची सभ्यता आहे कां? 

          वडिल आणि गुरू यांच्यावर मोठी जबाबदारी असतें मुलांचे लहान मोठें दोष याकडे दुर्लक्ष न करता वेळीच शासन करायलाच हवे. कारणं आत्ताची कठोरता ही भविष्यात मुलांना मुलींना शिष्याला मधाची गोडी देणार असतें. मुल मुली शिष्य याचं पाणयासारख असतं ज्या भांड्यात घालता त्याप्रमाणे त्याला आकार येतो. हे तर आई वडील गुरू यांच्या वागणूकीवर अवलंबून आहे की ते काय शिक्षण देतात.

   ‌ मोठ्या मोठ्या वनात एकच असं झाड असतं त्याच्या वासाने सर्व वन सुगंधित होतें त्याप्रमाणे प्रामाणिक आणि बुद्धीमान एकच मुलगा शंभर मूर्ख मुलांपेक्षा चांगला असतो. जंगलात एका ठिकाणी जर आग लागली तर पूर्ण जंगल बेचिराख होतं. त्याचप्रमाणे कुटुंबात खानदानात एक मुलगा मुलगी नितीभरषट वेडा असेल तर ते कुटुंब व पूर्ण खानदान बदनाम होते. यासाठी प्रामाणिक आणि बुध्दिमान मुलगा एकच असलातरी वंशासाठी कुटुंबासाठी खानदानासठी चांगला आहे.वाईट मुलगा मुलगी पेक्षा वंश नसलेला बरा कमीत कमी अशा मुलांमुळे सहन करावे लागणारे दुःख तरी होणार नाही

           एकच मुलगा मुलगी विद्वान असेल व तो चांगलें कर्म करीत असेल तर तो मुलगा मुलगी पूर्ण खानदान कुटुंब नाव किर्तीमान करतो. असा सद्गुणी मुलगा असा असतो जो चंद्र एकच पण त्यामुळे पूर्ण जग प्रकाशित होते. माता पित्याना त्रास व दुःख देणारी मुले जास्त असतील तरी त्याचा काय उपयोग ? पण एकच असा मुलगा मुलगी असेल जो आई वडील यांची सेवा करील महतार पनी त्यांची काठी होईल तर तो सर्वात चांगला मुलाला पाच वर्षांपर्यंत प्रेम करावे. दहा वर्षांपर्यंत त्याला दाटावे.सोळा वर्षांचा झाला कि त्याला आपला मित्र समजावा म्हणजे आपण आणि एक अकरा व्हाल तोंच मुलगा आपल्या खांद्याला खांदा लावून चालेल

            सुखशांती व लक्ष्मी त्याच घरात असतें. ज्या घरांत मूर्खाची पूजा होत नाही. ज्या घरात पती पत्नी यांच्यात भांडणे होत नाहीत. ज्या घरांत विद्वानांचा आदर होतो. गुणवान मुल कमी असली तरी चालतील. जास्त मूर्ख मुलं काय कामांची जसं आकाशात तारे अनेक असतांत पण उजेड तर चंद्र आणि सुर्य असतोच. मूर्ख मुलगा सेवा करील त्यापेक्षा मरण बरे. कारणं त्यांच्या मृत्यूचे फक्त दुःख काही दिवस राहिल नंतर ते संपेल पण तो जर जीवंत राहिला तर जन्माच दुःख. जी गाय दुध देत नाही ती काय कामांची? एकाच आईच्या उदरातून जन्मला येणारी सर्व मुलं एकसारखी नसतात त्याप्रमाणे बोरीच्या झाडावर बोरा सोबत काटे सुध्दा लागतात. पण दोघांचे मूळ एकच असते

             जन्मदाता. यज्ञोपवित. संस्कार करणारा.शिक्षक . संरक्षक. अशी पाच व्यक्ति माणसांचे सर्वात मोठे मित्र असतात. कर्ज घेणारा बाप. चरित्रहीन आई. सुंदर पतीची स्त्री. मूर्ख संतती. हे माणसांचे सर्वात मोठें शत्रू आहेत.

        मोठ्या घरात जन्माला आला म्हणून कोणी मोठा होत नाही. महान तोंच होतों. ज्याच्याजवळ गुण आहेत. विद्या आहे त्याला कधी लहान हीन समजू नका. ज्यांनी लहान कुटुंब खानदानात जन्म घेतला पण ते बुध्दिमान.शिक्षित आहेत ज्यांच्या जवळ विवेक आहे. असे लोक फक्त आपल्या गुणानेच महान होतात. मुलांनी मुलींनी शिष्य यांनी आठ गोष्टींपासून कोसो दूर राहावे. काम . क्रोध . लोभ. स्वादिष्ट पदार्थ. शृंगार. खेळ. जास्त झोप. अतिसेवा. या सर्व वस्तूंपासून दूर राहिलयानेच विद्यार्थी आपले जीवन सुखी करू शकतो . 

        सुखी आणि शांतीपूर्ण घर तेच आहे. ज्या घरांची संतती बुध्दिमान व सुशिक्षित आहे. स्त्री शांति प्रिय आहे पूर्ण रुपाने गृहिणी आहे ‌. आपल्या घरचे काम सेवा थोरा़ची लहानाची सर्व कामे सवता करते. ज्या घरांत अतिथिचा सत्कार केला जातो. ज्या तहानलेल्या लोकांना पाणी. भुकेलेल्या लोकांना पोटभर अन्न मिळते. ज्या घरांत बुध्दिमान ज्ञानाचे संगीत आहे. 

        अनुकरण करून कोणी ज्ञानी होत नाही. त्यासाठी रकतताच ज्ञान असावे लागते 

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दिवसाची सुरुवात

 

दिवसाची सुरुवात
      दिवसाची सुरुवात

    भारताची संस्कृती श्रेष्ठ त्याबरोबर आपला देश सुध्दा श्रेष्ठ आहे. कारण आपला भारत देश सोनेरी चिडीया समजला जातो. अनेक सत्ताधारी यांनी जवळपास ४०० वर्ष आपल्यावर राज्य केले. विविध शैक्षणिक. आर्थिक. मानसिक. सामाजिक. वैद्यकीय. या माध्यमाचा आपल्यावर अन्यायच केला आणि झाला आहे. प्रत्येक धर्माचे लोक गाव वाड्या वस्त्या तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये व्यवसायिक गरज असो अथवा कोणतीही माणसांची धर्माची गरज आपल्या देशाने व आपल्या संविधानाने सर्वांना समान हक्क व अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माचा व्यक्तिला कोणत्याही भागात वास्तव्य करण्यास व्यापार व्यवसाय व आपल्या धर्माचे आचरण करण्यास संविधाना नुसार अधिकार आहे. त्याला त्याच्या धर्मानुसार राहणे. आचरण करणे. मुर्ती पूजा. मंदिर बांधणे. भजन. कीर्तन. ओव्या. आजान. अशा विविध धार्मिक आचरण करण्यास कोणीही बंधन घालू शकत नाही. 

           गतकाळात गाव छोटीशी होती. लोकसंख्या कमी होती प्रत्येक गावात प्रत्येक धर्मानुसार मंदिर होतें. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होतें. त्यांच्यात आज आहे असा कोणताही जातीयतेढ नव्हता लोक रात्रभर गावातील मंदिरात भजन कीर्तन प्रत्येक धर्मानुसार देवाचे आचरण करत होतें. लोक त्या निमित्ताने एकत्र येत होते. सर्व गाव या मधुर सुराने भाराऊन जात होतें. दिवसभराचा कामाचा शिण लोकांचा कमी करण्यास मदत होत होती. गौरी गणपती मध्ये रात्रभर झिम्मा फुगडी खेळणारया आपल्याच आई बहीणी होत्या मनात कोणताही द्वेष नाही. कोणी कोणत्याही धर्माचा जातींचा असो याचा कसलाही भेद मनात न घेता सर्व महिला एकत्र खेळत असत . हिंदू मुस्लिम सर्व सणवार एकत्र येऊन साजरे करत असतं. एवढंच काय पण सुखाप्रमाणे दुःख सुध्दा वाटून घेत असतं. मनांत भेद नाही. सर्वजण भाऊबंद असल्यासारखं राहत होते.

      काळ बदलला मातीची मंदिर सिमेंट क्रांक्रेटची झाली. मूर्ती दगडांची होती त्याचे रुपांतर तांबे पितळ सोनं चांदी संगमरवरी अशा विविध रुपांत देवाची मूर्ती तयार झाली. प्रत्येक धर्मानुसार देवांचे रुप ठरले फोटो पूजा. मूर्ती पूजा भटजी ब्राम्हण यांना त्या त्या धर्मानुसार महत्व प्राप्त झाले. लोकांची नोकरी व्यवसाय याची धावपळ वाढली. लोकांच्या जवळ जेवनास वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्या संस्कृती प्रमाणे लोक एकवेळ जेवण सोडतील पण देवाला नमस्कार करायचे सोडणार नाहीत. याचा फायदा मंदिर ट्रस्ट पुजारी. नेते मंत्री खासदार आमदार यांना झाला कारणं प्रत्येक मंदिरात एक तरी नेता ट्रस्टी आहे बघा अभ्यास करुन. 

        देवाचं सुध्दा राजकारण आणि जातीयवाद कसा करावा त्यापासून आपला फायदा कसा साधावा हे यांचे पासून शिकण्याची गरज आहे. कारणं प्रत्येकाला धर्माचा जातींचा देवाचा अभिमान असतोच आणि आहेच. 

          काळ बदलला आणि रात्रभर मंदिरात चालणारे भजन कीर्तन पहाट भुपाळी हे सर्व हळूहळू बंद झाले. कारणं म्हणणारी वयोवृद्ध पिढी संपली आणि आपणं दिवसांची सुरुवात करण्यासाठी एकू येणारे प्रत्येक धर्माचे सूर मावळले 

         दिवसाची सुरुवात करणारे मंगल सुर यांची जागा आज प्रत्येक मंदिरात स्पिकर यांनी घेतली आहे. आणि दिवसांची मंगलमय सुरुवात करणारे मंगल सुर

    "" उठी उठी बा मोरेश्वरा "" पहाट झाली उठा उठा सकळीक"" सतनाम सतनाम वाहे गुरु"" धनगरी ओव्या"" अल्लाहला हु अकबर अजाण"" अशा विविध धर्माचे लोक आपल्या आपल्या मंदिरांवर स्पिकर लावून जगाल समतेचा धर्माचे महत्व.जगणयाचे महत्व. देवांचे महत्व. पूजाअर्चा महत्व. पाप काय पुण्य काय. प्रेम माया ममता. जनकल्याण . प्राणीमात्रांवर दया करा. मांसाहार टाळा. जगाला मानसन्मान वागणुक द्या . जगापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात पण हा सर्व प्रकार जगाला मार्ग दाखवणारा आहे पण समाजातील काही लोकांना हा आवाज सुध्दा आज सहन होत नाही. त्यांनी समाजात जातीत जातीयवाद निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट जातीला टार्गेट केलें जात आहे मग तो एक गायक असो ज्याची गाणी मुस्लिम हिंदू सर्व जातींचे लोक ऐकतात त्याला सुद्धा आजान चा आवाज कर्णकर्कश वाटतो नवल आहे ना . एकादा सामाजिक राजकीय नेता खासदार आमदार मंत्री म्हणतो की लवकरच अमुक जातीच्या लोकांच्या धार्मिक स्थळावरील भोंगे काढा याला काय अर्थ आहे कां ? देव सर्वांना आहे मग यांचा देव कोण आहे. 

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." हि होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ यांची श्रीखंडेरायावर अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते, 

          दिवसांची सुरुवात करणारी भुपाळी बंद करा मंदिरावरील भोंगे काढा हे महणयापेक्षा आज पोलिस गाडी वरील सायरान. अमबुलनस वरिल भोंगा. अग्निशमन गाडी वरील भोंगा . मंत्री खासदार आमदार यांच्या गाडीवरील भोंगे. कचरा गाडी यावरील भोंगा. बॅंका पतसंस्था यामध्ये असणारे भोंगे. विविध कारखाने सुतगिरणी एम आय डी सी मधील मशिन धडधड भोंगे. गाड्यांचे हॉर्न. डाॅलबि सटेरिओ . आपल्या घरांत टिव्ही होम थिएटर यांचा आवाज. मानवी वाहतूक करणार्या वाहनातील विविध कर्णकर्कश आवाज. यांवर कोणीही आवाज आजपर्यंत उठवला नाही म्हणजे वरिल आवाजाचा काय फायदा आहे कां? 

         ‌ ‌ अपघात होण्यास कारणीभूत असतो तो म्हणजे आवाज आपल्या पश्चिम महाराष्ट्र मधील असणारे सर्व साखर कारखाने यामध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक यांच्यात बसविण्यात आलेली साउंड सिस्टीम एवढी भयानक असतें की पाठीमागून येणारे वाहन दिसत नाही. त्याचा हाॅरण ट्रॅक्टर वाले यांना एकू सुध्दा येत नाही माग कोण मेल तरी कळत नाही. कारखाने सुरू असताना त्या त्या भागात अपघातांचे प्रमाण भयानक असतें. यांवर आवाज उठवून कोणत्याही ट्रकटर ट्रक मध्ये साउंड सिस्टीम बसविण्यास कोणी बंदी आणली आहे कां? हे सर्व कारखाने मंत्री खासदार आमदार यांचेच आहेत त्यांचे काम होताना हे मग काय झालं नाही . जनता जगली काय आणि मेली काय आमचं चालूच आहे. 

     ‌बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या