दिवसाची सुरुवात
दिवसाची सुरुवात
भारताची संस्कृती श्रेष्ठ त्याबरोबर आपला देश सुध्दा श्रेष्ठ आहे. कारण आपला भारत देश सोनेरी चिडीया समजला जातो. अनेक सत्ताधारी यांनी जवळपास ४०० वर्ष आपल्यावर राज्य केले. विविध शैक्षणिक. आर्थिक. मानसिक. सामाजिक. वैद्यकीय. या माध्यमाचा आपल्यावर अन्यायच केला आणि झाला आहे. प्रत्येक धर्माचे लोक गाव वाड्या वस्त्या तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये व्यवसायिक गरज असो अथवा कोणतीही माणसांची धर्माची गरज आपल्या देशाने व आपल्या संविधानाने सर्वांना समान हक्क व अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माचा व्यक्तिला कोणत्याही भागात वास्तव्य करण्यास व्यापार व्यवसाय व आपल्या धर्माचे आचरण करण्यास संविधाना नुसार अधिकार आहे. त्याला त्याच्या धर्मानुसार राहणे. आचरण करणे. मुर्ती पूजा. मंदिर बांधणे. भजन. कीर्तन. ओव्या. आजान. अशा विविध धार्मिक आचरण करण्यास कोणीही बंधन घालू शकत नाही.
गतकाळात गाव छोटीशी होती. लोकसंख्या कमी होती प्रत्येक गावात प्रत्येक धर्मानुसार मंदिर होतें. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होतें. त्यांच्यात आज आहे असा कोणताही जातीयतेढ नव्हता लोक रात्रभर गावातील मंदिरात भजन कीर्तन प्रत्येक धर्मानुसार देवाचे आचरण करत होतें. लोक त्या निमित्ताने एकत्र येत होते. सर्व गाव या मधुर सुराने भाराऊन जात होतें. दिवसभराचा कामाचा शिण लोकांचा कमी करण्यास मदत होत होती. गौरी गणपती मध्ये रात्रभर झिम्मा फुगडी खेळणारया आपल्याच आई बहीणी होत्या मनात कोणताही द्वेष नाही. कोणी कोणत्याही धर्माचा जातींचा असो याचा कसलाही भेद मनात न घेता सर्व महिला एकत्र खेळत असत . हिंदू मुस्लिम सर्व सणवार एकत्र येऊन साजरे करत असतं. एवढंच काय पण सुखाप्रमाणे दुःख सुध्दा वाटून घेत असतं. मनांत भेद नाही. सर्वजण भाऊबंद असल्यासारखं राहत होते.
काळ बदलला मातीची मंदिर सिमेंट क्रांक्रेटची झाली. मूर्ती दगडांची होती त्याचे रुपांतर तांबे पितळ सोनं चांदी संगमरवरी अशा विविध रुपांत देवाची मूर्ती तयार झाली. प्रत्येक धर्मानुसार देवांचे रुप ठरले फोटो पूजा. मूर्ती पूजा भटजी ब्राम्हण यांना त्या त्या धर्मानुसार महत्व प्राप्त झाले. लोकांची नोकरी व्यवसाय याची धावपळ वाढली. लोकांच्या जवळ जेवनास वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्या संस्कृती प्रमाणे लोक एकवेळ जेवण सोडतील पण देवाला नमस्कार करायचे सोडणार नाहीत. याचा फायदा मंदिर ट्रस्ट पुजारी. नेते मंत्री खासदार आमदार यांना झाला कारणं प्रत्येक मंदिरात एक तरी नेता ट्रस्टी आहे बघा अभ्यास करुन.
देवाचं सुध्दा राजकारण आणि जातीयवाद कसा करावा त्यापासून आपला फायदा कसा साधावा हे यांचे पासून शिकण्याची गरज आहे. कारणं प्रत्येकाला धर्माचा जातींचा देवाचा अभिमान असतोच आणि आहेच.
काळ बदलला आणि रात्रभर मंदिरात चालणारे भजन कीर्तन पहाट भुपाळी हे सर्व हळूहळू बंद झाले. कारणं म्हणणारी वयोवृद्ध पिढी संपली आणि आपणं दिवसांची सुरुवात करण्यासाठी एकू येणारे प्रत्येक धर्माचे सूर मावळले
दिवसाची सुरुवात करणारे मंगल सुर यांची जागा आज प्रत्येक मंदिरात स्पिकर यांनी घेतली आहे. आणि दिवसांची मंगलमय सुरुवात करणारे मंगल सुर
"" उठी उठी बा मोरेश्वरा "" पहाट झाली उठा उठा सकळीक"" सतनाम सतनाम वाहे गुरु"" धनगरी ओव्या"" अल्लाहला हु अकबर अजाण"" अशा विविध धर्माचे लोक आपल्या आपल्या मंदिरांवर स्पिकर लावून जगाल समतेचा धर्माचे महत्व.जगणयाचे महत्व. देवांचे महत्व. पूजाअर्चा महत्व. पाप काय पुण्य काय. प्रेम माया ममता. जनकल्याण . प्राणीमात्रांवर दया करा. मांसाहार टाळा. जगाला मानसन्मान वागणुक द्या . जगापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात पण हा सर्व प्रकार जगाला मार्ग दाखवणारा आहे पण समाजातील काही लोकांना हा आवाज सुध्दा आज सहन होत नाही. त्यांनी समाजात जातीत जातीयवाद निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट जातीला टार्गेट केलें जात आहे मग तो एक गायक असो ज्याची गाणी मुस्लिम हिंदू सर्व जातींचे लोक ऐकतात त्याला सुद्धा आजान चा आवाज कर्णकर्कश वाटतो नवल आहे ना . एकादा सामाजिक राजकीय नेता खासदार आमदार मंत्री म्हणतो की लवकरच अमुक जातीच्या लोकांच्या धार्मिक स्थळावरील भोंगे काढा याला काय अर्थ आहे कां ? देव सर्वांना आहे मग यांचा देव कोण आहे.
भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." हि होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ यांची श्रीखंडेरायावर अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते,
दिवसांची सुरुवात करणारी भुपाळी बंद करा मंदिरावरील भोंगे काढा हे महणयापेक्षा आज पोलिस गाडी वरील सायरान. अमबुलनस वरिल भोंगा. अग्निशमन गाडी वरील भोंगा . मंत्री खासदार आमदार यांच्या गाडीवरील भोंगे. कचरा गाडी यावरील भोंगा. बॅंका पतसंस्था यामध्ये असणारे भोंगे. विविध कारखाने सुतगिरणी एम आय डी सी मधील मशिन धडधड भोंगे. गाड्यांचे हॉर्न. डाॅलबि सटेरिओ . आपल्या घरांत टिव्ही होम थिएटर यांचा आवाज. मानवी वाहतूक करणार्या वाहनातील विविध कर्णकर्कश आवाज. यांवर कोणीही आवाज आजपर्यंत उठवला नाही म्हणजे वरिल आवाजाचा काय फायदा आहे कां?
अपघात होण्यास कारणीभूत असतो तो म्हणजे आवाज आपल्या पश्चिम महाराष्ट्र मधील असणारे सर्व साखर कारखाने यामध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक यांच्यात बसविण्यात आलेली साउंड सिस्टीम एवढी भयानक असतें की पाठीमागून येणारे वाहन दिसत नाही. त्याचा हाॅरण ट्रॅक्टर वाले यांना एकू सुध्दा येत नाही माग कोण मेल तरी कळत नाही. कारखाने सुरू असताना त्या त्या भागात अपघातांचे प्रमाण भयानक असतें. यांवर आवाज उठवून कोणत्याही ट्रकटर ट्रक मध्ये साउंड सिस्टीम बसविण्यास कोणी बंदी आणली आहे कां? हे सर्व कारखाने मंत्री खासदार आमदार यांचेच आहेत त्यांचे काम होताना हे मग काय झालं नाही . जनता जगली काय आणि मेली काय आमचं चालूच आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
Nice
ReplyDelete