Showing posts with label need. Show all posts
Showing posts with label need. Show all posts

गरजू गरजू

 

गरजू गरजू

              जलाची काय गरज. धनिकाला धनाची काय गरज. कोकिळेला सुरांची काय गरज. वरील ओळी आपणास बरेच काही ज्ञानाची गोष्ट सांगून जातात. याचा अर्थ असा होतो की ज्याच्याजवळ जे आहे त्याला ते देण्याची काही गरज नाही. ज्याला गरज आहे त्यासाठी आपणांस आपण समाजाचं काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन दानं करण्याची गरज आहे. 

       .      समाजात. मंदिराच्या आवारात. बसस्टॉप वर.  रेल्वे लाईन जवळ. रस्त्यावर. दारोदारी. विविध शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या आवारात. चौकात अशा विविध ठिकाणी एक मानसिक आणि शारीरिक दुर्बल असा एक घटक फिरतो की त्याच्याकडे कोणाचें लक्ष सुध्दा नसते. असा घटक म्हणजे आपण ज्याला भिकारी म्हणतो. भिकारी म्हणलं की अंगावर मळकी फाटकी कपडे. हातात मळलेली पिशवी. त्यात जुनें कपडे भंगार सामान. तर यातील काहीजण अपंग सुध्दा असतात. काहीजण गाड्यांवर भिक मागत फिरतात. काहीजण कुबड्या घेऊन भिक मागतात. तर काहीजणांना जमीनीवर झोपूनच भिक मागताना मी बघितले आहे. असा वंचित घटक आपणांस दिसतात आणि आपण आरे आरे म्हणया ऐवजी कांहीच करत नाही

            समाजात काही दानवीर मंडळी आहेत. ते फक्त समाजातील. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये. यामध्ये विविध शालेयपयोगी साहित्य वाटप करतात. काहीजण पूरग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात. काहीजण गोरगरीब जनतेला विधवा महिलांना. अपंग लोकाना  निराधार लोकांना. वेळोवेळी विविध वस्तू वाटप करताना आपणांस फोटोत दिसतात. अशी मदत करण्यामागे फक्त राजकीय फायदा पाहूनच मदत केली जाते. 

‌         समाजात विविध ठिकाणी भिकारी नावांचा घटक आहे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर. शीव स्वराज्य कामगार संघटना. राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी. व हिरकणी न्युज. यांच्यावतीने समाजातील अशा वंचित घटकांची दखल घेत  २६ जानेवारी या ७३ वया प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजातील हा वंचित असणारा घटक ज्या दिवशी आपली राज्यघटना तयार झाली. लोकांना आपले शासन चालविण्याचा अधिकार  डॉ बाबासाहेब आंबेडकर. सरदार वल्लभभाई पटेल. महात्मा गांधी. मौलाना आझाद. यांच्या आटोकाट प्रयत्नून घटना तयार करण्यात आली. आपण म्हणतो की आपल्याला १५ आॅगसट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले पण आपली लोकशाही पद्धती सुरळीत व देशाचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी आपली घटना तयार करण्यात आली. आणि व्यक्तिला मूलभूत हक्क व अधिकार यांची जाणिव करून दिली त्यामुळे आज सुध्दा आपली लोकशाही व्यवस्था जीवंत आहे ती फक्त घटनेमुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार आहे तो लोकशाही व्यवस्थेमुळे 

            मिरजेत रेल्वे लाईन चया आसपास व रेल्वे स्टेशन वर आपल्या मानसिक व शारीरिक विकारामुळे व घरच्या लोकांना ओझ वाटणारे बरेच भिकारी त्यात अपंग. अस्थिव्यंग. मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असे लोक भिक मागून आपली उपजीविका चालवित आहेत. घरची परिस्थिती काही लोकाची चांगली असेल फक्त मुलगा आणि सुन यांच्या त्रासाला कंटाळून घराबाहेर पडलेले बरेच लोक आहेत. तर काहीजण आजाराला कंटाळून घराबाहेर पडलेले आहेत. तर काहीजण न सांगता घरासोडून आलेले आहेत आमच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पूर्णपणे माहीत काढून अशा लोकांची यादी तयार केली आणि आज २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिवसांचे औचित्य साधून गोरगरीब लोकांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रमाणे आमचें सर्व सहकारी व आमचे विविध संस्थांचे पदाधिकारी व वार्ताहर उपस्थित होते. बरेच भिकारी वंचित घटक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

      जननी देवाहूनही महान. वडील विशाल वृक्षापरी. अस कोठेतरी लिहिलेले मी वाचलं. आपल्या मुलांना जगविण्यासाठी व जीवनातील सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आपण उपाशी राहून आपल्या मुलांना पोटभर खायला देणारे आई वडील असतांत  मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी मोलमजुरी  करणारे बांधकाम क्षेत्रात जीवांवर उदार होऊन काम करणारे ते आई बाबाच असतांत.  वडील जे काम करत असेल तेच काम आपल्या मुलांने करावे अस कोणत्याच आई वडील यांना वाटतं नाही. बाबा चोर असेल तर त्याला सुद्धा वाटत नाही आपल्या मुलाने चोर व्हावे.  ही प्रत्येक आई वडील यांची इच्छा असते मग आपल्या आई बाबांना ओझ समजून लग्न झाल्यावर आई वडील यांना घराबाहेर काढून अनाथ करणार्या मुलांना कशी लाज वाटत नाही. आपल्यासाठी तळहाताचा पाळणा करणारे आपल्यासाठी उपाशी उघड्यावर झोपणारे यांची दया कशी येत नाही म्हणजे म्हातारा बैल आणि म्हातारे आई वडील यांची एकच प्रस्थिती आहे कारणं बैल आपल्या वयांत काम करून शेतकरी यांचा लाडका असतो पण तोच म्हातारा झाल्यावर कापायला जातो म्हणजे त्याने शेतकरी यासाठी केलेलें कष्ट एका मिनिटांत वर्थ होतें तसंच आई वडील यांच असतं कां. विचार करावा लागेल. 

            शासनाने वयोवृद्ध लोकांसाठी विविध पेन्शन योजना राबविण्यात आल्या आहेत त्यानुसार ज्याचे वय ६० झाले आहे त्यांच्यासाठी व महिलांसाठी विधवा. निराधार  यासाठी. संजय गांधी निराधार योजना.  श्रावण बाळ निराधार योजना.  इंदिरा गांधी स्वाधार योजना. अशा विविध योजना राबविल्या जातात पण यामध्ये गेल्या काळात भरमसाठ वयोवृद्ध लोकांची महिलांची नोंदणी होण्यास सुरुवात झाली. मग शासनाने यातून एक पर्याय काढला तो जया वयोवृद्ध व्यक्तिला महिलेला मुलगा संभाळू शकत नाही असं प्रमाणात जोडणं बंधनकारक केल आणि जो मुलगा असे प्रमाणपत्र देईल त्यांचे नाव सात बारा उतारावरून कमी होईल मग काय अचानकपणे वयोवृद्ध महिला व्यक्ती यांची पेन्शन साठी होणारी नोंदणी झपाट्याने कमी झाली. 

       आज वृधदश्रमांना उत आला आहे जागोजागी आपल्या आई वडिलांना पैसे देऊन वृधदश्रमात पाठविलें जाते असे वृध्दाश्रम शासनाकडून खरोखरच निराधार असणार्या लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून जारी करण्यात आले आहे  पण आज वृध्दाश्रम एक पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे कारणं शासनाचा येणारा निधी वेगळा आणि समाजातील दानशूर व्यक्ती अन्न धान्य पैसा अशी मदत करतात म्हणजे चारी बाजूंनी वृद्धाश्रमात हजारों रूपये व हजारो टन धान्य गोळा होत आहे आणि अश्या विविध संस्था गरिब गायीच रूप धारण करून जनतेला व शासनाला लुटत आहेत आजपर्यंत शासनाचा कोणताही अधिकारी व कर्मचारी अश्या वृद्धाश्रमात गेला आहे का तेथे रहाणारे त्यांची आजची परिस्थिती काय आहे याचा आढावा कधी कुणी घेतला आहे का 

    सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे की. आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आज चालू असणारे वृद्धाश्रम हे केवळ आजच्या तरुण पिढीला एकत्र कुटुंब पद्धती पटवून सांगणायाची गरज आहे अशा म्हातारे आई वडील यांची इच्छा असते आपल्या नातवंडांना खेळवाव आपल्या मुलाचा संसार सुखाने चालताना पहावययाचा आनंद वेगळाच असतो पण आम्हाला आई वडील जड वाटतात आणि त्यामुळे वृध्दाश्रम आणि रेल्वे स्टेशन बस स्टाफ. चौकात. दारोदारी भिक मागणारे भिकारी यांची संख्या वाढण्यास आपणच जबाबदार आहोत. 

     ‌.      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या