Showing posts with label BOLLYWOOD. Show all posts
Showing posts with label BOLLYWOOD. Show all posts

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान - KADAR KHAN

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान यांचा स्मृति दिवस ; संगमनेरच्या वर्ग मित्राने जागवल्या आठवणी



      

काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब व हालाखीची परिस्थिती त्यातच लहानपणीच तीन भाऊही वारले. कादर खान यांचेही असं काही होवू नये म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचे बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली.

गोरापान उंच धिप्पाड ऑंख मिचोली करीत पलख झपकवण्याची सवय असलेले कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि अभिनय करणारे नट होते. 1961 ते 62 या दोन वर्षांमध्ये एम. एच. साबुसिद्दिकी पॉलिटेक्निक कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असताना नूर मोहम्मद यांचे कादर खान सोबत संबंध आले होते. कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुले झाले होते, पण ते लहानपणीच वारले.काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब परिस्थिती या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून कादर खान यांचेही असं काही होवू नाही म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. 


कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचा बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली. कादर खानला लहानपणा पासून एक्टिंगची आवड होती. कॉलेज जीवनात ते स्टोरी लिहीत, ड्रामा बसवत असत. एवढेच नाही तर अभिनय करताना त्यांच्या सोबत काम करण्याचा नूर मोहम्मद यांना योग आला. नूर मोहम्मद कादर खान विषयी पुढे सांगतात की, गरीब परिस्थितीत कादर खान यांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेत दाखला घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.एच साबुसिद्दिकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. 





संगमनेर येथील सय्यद नूर मोहम्मद यांनी कादर खान यांच्या विषयी अनेक पहलु उजागर करून अनेक जुण्या आठवणी वर्ग मित्र नूर मोहम्मद उस्मान सय्यद यांनी सांगितल्या.१९६२ मध्ये कादर खान यांनी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पूर्वीपासूनच कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे नेत्तुत्व करणे, नाटकां मध्ये भाग घेणे ड्रामा स्क्रिप्ट, डायलोग बोलणे आदिची त्यांना आवड होती. ते मुळातच खणखणीत पहाडी आवाजाचे धनी होते. सिव्हिल इंजिनिअरिंग पास होऊन एम. एच. साबुसिद्दिकी कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी नोकरी केली. दरम्यान कॉलेज मध्ये एक नाटक "ताश के पत्ते" मध्ये काम करत असतांना आयुष्यात एक वेगळा टर्न मिळाला आणि कादर खान यांचे नाव खूप प्रगतीपथावर गेले. 

एक बहुआयामी, हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ख्याती सर्वज्ञात आहे. कॅरेक्टर म्हणून त्यांनी डायलॉग वर प्रभूत्त्व मिळवत एक्टिंगच एक आयुष्य बनवले. स्टोरी, डायलॉग, स्क्रिप्ट रायटिंग मध्ये त्यांचा हातखंडा होता. खान यांनी शमा हा पहिला पिक्चर बनवला होता. कादर खान चे गुरु प्राचार्य दसनवी हे कोकणी होते. अभिनेता कादर खान यांचे अफगान,(पश्तू) गुजराती, मराठी ,इंग्रजी उर्दू ,हिंदी या भाषेवर प्रभूत्त्व होतं. आपल्या कारकिर्दीत इंटेलिजंट म्हणून एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. खलनायक, डायलॉग, ऍक्टर, कॉमेडियन म्हणून त्यांनी

1970 ते 2000 च्या दरम्यान या तीन दशकामध्ये बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. हास्य अभिनेता आगा यांना कादर खान यांची भूमिका खूप पसंत पडली होती. आगा यांनी दिलीप कुमार यांना सांगितले. संस्थेचे प्राचार्य शहाबुद्दीन दसनवी सर यांनीही दिलीप कुमार यांना कादर खान यांच्या बद्दल शिफारस केली,व दिलीप कुमार यांनी "सगिना"व "बैराग"साठी चित्रपटात भूमिकेसाठी निवड केली. या आधी त्यांनी राजेश खन्ना यांचा दाग मध्ये छोटी भूमिका केली होती. दरम्यान कॉलेज मध्ये काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. कॉलेज आणि विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रिय झाले होते. कॉलेज मध्ये परत बोलावण्याची विद्यार्थ्यांची मागणी कॉलेज व्यवस्थापना ने साफ धुडकावून लावली.तोवर कादर खान चित्रपटात काम करून फार पुढे निघून गेले होते. कॉलेजच्या गॅदरींग मध्ये जर कादर खान यांना प्रमुख अतिथी म्हणून न बोलावल्यास पुढचा कुठलाही कार्यक्रम न होवू देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांने घेतल्याने कादर खान यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची नामुष्की कॉलेजवर आली. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा प्रसंग माझ्यासाठी मोठा होता असे कादर खान यांनी म्हटले होते.

कादर खान यांनी अभिनय, संवाद लेखक, दिग्दर्शन अशा अनेक कलागुणांनी चित्रपट सृष्टीतील आपला ठसा कायम ठेवला व सुमारे ३०० चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केल्या. त्यात विशेष करून हास्य चित्रपट खूप लोकप्रिय ठरले. १९८३ पासुन तर जितेंद्र, जयाप्रदा, श्रीदेवी, शक्ती कपूर व कादर खान यांचा ग्रूप फारच प्रसिध्दी झोतात आल्याने लोकप्रियही झाला होता.१९७० ते २०१७ असा बॉलिवूड मध्ये त्यांचा मोठा प्रवास होता. त्यांचा पहिला चित्रपट दाग, तर २०१७ मधील शेवटचा "दिमाग का दही" आहे. सरतेशेवटी ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी आपले उर्वरीत सर्व जीवन अधात्माला अर्पण केले. कादर खान यांना दोन मुले व तीन मुली होत्या. आज कॅनडा येथे त्यांचे मुले वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मग्न आहेत. कादर खान खूप आध्यात्मिक झाले होते, त्यांची इच्छा होती की, कुराण पठण विस्ताराने समजून घ्यावा त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. संगमनेर चे मित्र सय्यद नुरमोहम्मद यांना ते नेहमी निमंत्रणही देत होते. ३१ डिसेंबर २०१८ ला टोरांटो (कॅनेडा) येथे त्यांचे निधन झाले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

"ऊठाये वर्क कुछ गुल ने, कुछ लाले ने,कुछ नर्गिस ने,

 चमन मे हर तरफ बिखरी है दास्तान मेरी"

संकलन

शेख ईदरीस मोहम्मद शफी 

अध्यक्ष 

जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटर संगमनेर

वाचा -

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ...

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB ....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या