विमा कंपन्या एक मायाजाल?
२०२० ला कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले पोटासाठी आणि जीवन जगण्यासाठी मिळविणारा माणूस आपला जीव वाचवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या टाळेबंदी मुळं घरातच अडकून पडला होता टाळेबंदी मुळं हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती ही आपत्कालीन वेळ आणि उपासमारी काहीजणांना सहन झाली नाही. काही जणांची सरकारी खाजगी नोकरी गेली काहीजण खाजगी कंपन्या मध्ये काम करून आपल्या कुटुंबाची मदत करणारी शिक्षित तरूण एक प्रयत्न करत होते. एस टी व अन्य ठिकाणी नोकरी करणारे यांना टाळेबंदी काळात महामंडळाने घरचा रस्ता दाखविला. अशा नोकरी करणार्या लोकांना दुसरं काही काम येत नाही. कोणाकडे कामाला जाव तर बाहेर टाळेबंदी मुळं सर्व बंद अशी बिकट परिस्थिती आणि कुटुंबांची उपासमारी बॅंका पतसंस्था खाजगी देण घेण असा सर्व विचार करून काही जणांची बुध्दि भ्रष्ट झाली आणि त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली हे गेले मरून पण कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे कुटुंबावर भल मोठ संकटं कोसळल किती वाईट आहे आणि होती ती वेळ
कोरोना काळात समाज पूर्ण बदलला आहे अस माझतर मत आहे एक प्रकारे हा मानसिक रोग होता कोरोनापासून मुक्त झालेले काहीजण मनोरुग्ण झाले रोगापेक्षा काहीजण घाबरून गेले त्यामध्ये ५५/ टक्के लोकांचा समावेश आहे. तर मानसिक रुग्ण झालेले २७/ टक्के लोक होते त्यामुळे कोरोना असो वा नसो काही लोकांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी आॅकिसजन कमतरता. रुग्णालयात बेड नाही. कोरोनावर लस नाही. कोरोना बराच होत नाही. औषधं नाही. कोरोना झाला की मरण अटळ आहे. आणि अस काही आपल्या बाबतीत घडल तर माझं व माझ्या कुटुंबाच काय होईल. असा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार उमटत असतो. आपले सगेसोयरे. मित्र. प्रियजण यांना गमविणयाचे दुःख या सर्व परिस्थितीमुळे लोकांना मानसिक आणि मनोरुग्ण असे भयानक रोग जडले. यामध्ये सर्वात मोठी अफवा व कोरोना दहशत पसरविण्याचे काम केल ते म्हणजे प्रसार माध्यमे. यामुळे लोकांना संध्याकाळी झोप लागत नाही. ते घाबरत आहेत. त्यांच्या हदयाचे ठोक वाढत होते. श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे ठीक नाहीत म्हणजे मला कोरोना झाला आत्ता मी जगत नाही. अशी भिती भविष्यकाळात आपल्या पिढीपूढे मोठू आव्हान होणार आहे
कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाचा उपचार करणं सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला. शक्य नव्हतं. त्यावेळी शासनाने कोरोना उपचारासाठी येणारा खर्च त्यामध्ये. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्याची सोय गोरगरीब जनतेसाठी केली त्यामुळे गोरगरीब जनतेला १ लाख ५० हजार रुपयांची मदत होण्यास सुरुवात झाली कारणं खाजगी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी २ ते अडीच लाख रुपये खर्च येत होता. मग शासनाने जिल्ह्यातील ठराविक दवाखाने यांनाच कोरोना सेंटर म्हणून घोषित केले. त्यामध्ये धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात अनेक दवाखाने विविध आजारांवर विविध योजनेअंतर्गत मोफत उपचार करतात पण त्यावेळी हे सुद्धा दवाखाने कोरोना उपचार करत नव्हते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार होण्यास सुरुवात झाली आणि लोकांचे मरणाचे प्रमाण वाढले. माणूस सकाळी गेला आणि दुपारी मेला. जागा नाही. दवाखान्यात आॅकिसजन नाही. कर्मचारी नाहीत. अशी कोणतीही सबब एकाणयास मिळत नव्हती. कोरोना काळात आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये किती लोक मयत झाली त्याला काही अंदाज नाही प्रत्येक गावात स्मशानभूमी मध्ये प्रेत जाळायला जागा नाही एकामेकावर दोन तीन अशी प्रेत जाळण्यात आली काही पूर्ण जळली काही अर्धवट जळली त्या प्रेताचे लचके कुत्र्यांनी तोडले किती भयानक वेळ असेल आणि कोरोनाने मयत झालेल्या लोकांना आपल्या गावात कोणीच जाळणयास परवानगी देत नव्हते. त्यामुळे शहरांत प्रेताची रांग लागत होती पण त्यामुळे त्या शहरांत राहणारे लोक कायम भिंतींच्या छायेत जगत होती. जाळण्यासाठी १९००/ ते २६०० दर निश्चित करण्यात आला होता. अखेर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना सारख्या महाभयंकर महामारी आजारासाठी देण्यात येणारा उपचारासाठी खर्च बंद करण्यात आला आणि सर्वत्र प्रेताचे प्रमाण कमी आले. स्मशानभूमी ओस पडली. ज्या दवाखान्यात जागा नव्हती ते दवाखाने ओस पडले. म्हणजे षडयंत्र तुमहिच समजून घ्या
माणसाला मरण म्हणलं की अंगावर काटा येतो. पण ते अटळ आहे. त्याला कोणी गरिब श्रीमंत संत महात्मा नाकारू शकत नाही. गतकाळात माझ्या पाश्चात्य माझ्या मुलांना बायकोला कुटुबाला आर्थिक मदत मिळण्याचे कोणतेही साधन नव्हते आणि तेवढी आपली सुधारणा नव्हती. आपली अर्थव्यवस्था सुधारली आणि ठराविक रक्कम भरुन आपल्या पाश्चात्य कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी विमा ही संकल्पना अमलात आली. शासनाच्या काही विमा कंपन्या कार्यरत झाल्या तर काही विमा कंपन्या यांनी धर्मादाय आयुक्त यांचेकडून मोफत देण्यात येणारा वैद्यकीय उपचार यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना यांचा सुध्दा चालविण्याचा हक्क आपल्या शासनाने अशा विमा कंपन्या यांना दिला आहे
कोरोनाचया पहिल्या लाटेत जनता गोरगरीब लोक पूर्णपणे खचून गेले होते त्यांनंतर जनजीवन सुरळीत झाले पण लोकांच्या मनातील भिती कमी झाली नाही लोकांना आपण व आपले प्रियजन सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येकाला विमा करावा असा फंडा विमा कंपन्या यांनी घातला आणि वेळ बघून मर्मावर घाव घातला त्यामुळे सर्वजण पहिले असणारे कमी दरातील विमा हप्ते विमा कंपन्यांनी जादा पैसे उखळून विमा पॉलिसी करायला सुरुवात केली त्यामुळे बघता बघता विमा कंपन्या यांनी लाखो करोडो रुपयांचा व्यवसाय कमी वेळात केला यामध्ये काही विमा कंपन्या नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या सुध्दा असतील का ? असा प्रश्न पडतो दवाखान्याची. शैक्षणिक वैद्यकीय व इतर मदत होण्यासाठी विमा उतरला जातो. विमा कंपन्या यांचें एजंट पूर्ण माहिती विमा धारकांना देत नाहीत. तुम्ही पाच वर्ष पैसे भरा आणि एकदम एवढे पैसे मिळवा आणि जेव्हा पाच वर्षे पुर्ण होतात तेव्हा त्या विमाधारकाना अस सांगितल जात की तुमची पाॅलिशी पंधरा वर्षांची आहे विमाधारकाने सह्या करतांना विमा फाॅरम वाचलेला नसतो. कारण सर्व फाॅरम इंग्रजी भाषेत असतो म्हणजे विमा कंपन्या सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला कस फसवतात बघा आपल्या सोबत सुध्दा अस झाल असेल विमाधारक. सवताचे पैसे भरुन वाट बघत बसतो आणि एका बाजूला विमा एजंट कमी वेळात चार चाकी गाडी घेऊन फिरतो म्हणजे याने काय केल असेल.
कोरोनाचे पडसाद आरोग्य क्षेत्रात उमटणयास सुरवात झाली कोरोनाचय दुसर्या लाटेत वैद्यकीय विम्याची मागणी वाढली आणि अशा विमा कंपन्या यांच्या विमा हप्त्याची रक्कम सुमारे ४५/ टक्के वाढली आणि वैद्यकीय विमा घेण्याचं प्रमाण कमाल वाढले. सर्वसाधारणपणे अंदाज एप्रिल मध्ये विमा कंपन्या नवीन व्यवसाय प्रीमियम मध्ये ४५/ टक्के वाढ झाली. इरडा चया आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांत विमा कंपन्या नवीन व्यवसाय प्रीमियम ९ हजार ७३८ कोटी ७९ लाख रुपये होता त्या अगोदर काही महिन्यांत सर्व २४ विमा कंपन्या यांचा प्रीमियम सहा हजार ७२७ कोटी २४ लाख रूपये होता. यावर्षी एप्रिल मध्ये आयुर्विमा महामंडळाच्या ( एल आय सी ) नवीन व्यवसाय प्रीमियम मध्ये ३५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे या कालावधीत कंपनीची पहिल्या वर्षाचा प्रीमियम चार हजार ८५ कोटी ७६ लाख रुपये होता एक वर्षात याच कालावधीत एल आय सी नवीन व्यवसाय प्रीमियम तीन हजार ५८१.६५ कोटी रुपये होता इतर खासगी विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसाय प्रीमियम मध्ये ५५/ टक्के वाढ झाली या कंपन्यांचे नवीन बिझनेस प्रीमियम चार हजार ८८ कोटी चार लाख रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत खासगी कंपन्यांचे एकत्रित प्रीमियम तीन हजार १४६ कोटी ९ लाख रुपये होते एल आय सी एप्रिल मध्ये ४९.७८ बाजार हिस्सा नोंदविला होता. अन्य २३ खासगी कंपन्यांचा बाजारातला हिस्सा ५०.१३ टक्के आहे. पाॅलिसी किंवा सकिमची विक्री एप्रिल मध्ये १४० टक्के वाढली आहे. एप्रिल मध्ये सर्व २४ विमा कंपन्या ९ लाख ९६ हजार ९३३ विमा कवच विक्री केली आहे. यापैकी सहा लाख ९२ हजार १८५ विमाकवच एका एल आय सी कंपन्यांनीने विकल्या आहेत. एप्रिल मध्ये एल आय सी विणाकवच विक्री २७५ टक्के वाढ नोंदवली. अन्य २३ विमा कंपन्यांनी एप्रिल मध्ये तीन लाख चार हजार ७४८ विमा कवच विक्री केली. या कंपन्यांची ३२ टक्के वाढ झाली आहे
वरचा आकडा मोठ्या विमा कंपन्या यांचा आहे आत्ता सामान्य विमा कंपन्यांचा तोटा भयानक वाढला आहे. इरडा चया वार्षिक अहवालानुसार सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या तोट्यात वित्तीय वर्ष २०२०/२०२१ मध्ये ६.२७ टक्के वाढ झाली आहे या कालावधीत सर्वसाधारण विमा कंपन्यांचे एकूण नुकसान २३ हजार ७२० कोटी रूपयांवर पोहचले आहे २०२०/२०२१ या वित्तीय वर्षांमध्ये आरोग्य विमा कंपन्यांचा तोटा १४.६ टक्के वाढून ६५१ कोटी रुपये झाला आहे. २०१९/२०२० मध्ये आरोग्य विमा कंपन्यांचा ५६८ कोटी रुपयांच नुकसान झाले आहे. ५ मे २०२१ पर्यंत विमा कंपन्यांकडे ११.३९ लाख दावे दाखल करण्यात आले. या दाव्याची रक १५ हजार ९८८ कोटी रुपये आहे त्यापैकी कंपन्यांनी ९ हजार १४४ दावयामधून ९ लाख ५१ हजार कोटी रुपये अदा केले आहेत. तर एक लाख ८७ हजार दाव्याचे सहा हजार ८४८ कोटी देणे बाकी आहे. सामान्य विमा कंपन्यांनी ४७ हजार दावे नाकारले आहेत विमा कंपन्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० दिवसांत विमा कवच असणार्या व्यक्तिला पैसे द्यावे लागतात
वाढती असुरक्षितता. बिघडलेली मानसिकता. मनोरोगय. व्यसनाधीनता. आपल्याला मेडिकलेम कडे खेचत असल तरी त्याचा आरोग्य विमा केला जातो व होत आहे ही वाईटातली वाईट बाब आपण आत्ता आणि या वेळेपासून विचार करायला हवा हा विचार करूनच विमा कंपन्या मायाजाल आपण थांबवू शकतो
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९