Showing posts with label बालिश. Show all posts
Showing posts with label बालिश. Show all posts

बालिश बोलणें बंद करा

 


बालिश बोलणे बंद करा 

                  माणूस हा इतिहासाचे भान असणारा प्राणी आहे असे आपण म्हणतो ते यथार्थ आहे. आपले वर्तमान जिणे हे तो आपल्या गतकालीन ऐतिहासिक वारसांच्या सहहयाने अर्थपूर्ण बनवितो अथवा बनवू इचछूतो या दृष्टीने पाहता इतिहास माणसाला प्रेरणा देतो असे दिसून येते. इतिहास मधील घटना त्याला काही वेगळ शिकवितात त्यांच्या स्मृती चाळतात अशी ऐतिहासिक अनुभवांची शिदोरी घेऊन तो सधकालीन राजकारणात वाटचाल करीत असतो. राजकीय. सामाजिक. आर्थिक. शैक्षणिक. व अन्य मार्गाने विविध बंद आंदोलन. किंबहुना अशा अनुभवाच्या स्मृतींच्या प्रकाशात तो सधकालीन राजकीय घटितांचे आपल्या आपल्या परीने अर्थ लावला जातो. त्याचे मुल्यमापन करीत असतो. या सर्व प्रकियेत त्याची राजकीय मानसिकता एका बाजूला घडतही जाते नि दुसर्या बाजूला वयकतिही होत जाते. आपले राजकीय मानस व अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटना यांचा परस्परांशी संबंध अतूट असतो त्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आपली राजकीय मानसिकता घडविण्यास कारणीभूत ठरतात यांचा आपण खालील भागांमध्ये अभ्यास करणार आहोत 

                    आपण आत्ताच आणि गतकालीन काळात विविध बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन विविध वेगवेगळ्या विषयासाठी झालेली पाहीली आहेत त्यातच प्रामुख्याने. #. दारुसाठी. #. गुटखा तंबाखू युक्त पदार्थ बंदी # प्लास्टिक बंदी # अशा विविध बंदीच्या मार्गाने आपल्या गावात शहरांत. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका व अन्य राजकीय सामाजिक शासकीय. बंदी पुकारली जाते. आपल्या जिव्हाळ्याचा आणि राजकीय सामाजिक विषयांचा सर्वात मोठा विषय म्हणजे # दारूबंदी# होय. आपणांस समाजाची लोकांची वरवरची माया दाखविण्यासाठी महिला पुढारी यांच्या माध्यमातून दाखविण्यासाठी # उलटी बाटली # अशा नावांची आंदोलने केली जातात महिलांना गोळा करून गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील दारु विक्री बंद करा म्हणून उपोषण आंदोलन केले जाते. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार मंडलाधिकारी जिल्हाधिकारी. यांना आंदोलने दिली जातात. आंदोलन केल जात काही काळानंतर आंदोलन शांत होते. आणि थोडय दिवसांत आपणांस कळतं आंदोलन मध्ये पुढारी महिला अमुक अमुक पक्षाकडून निवडणूक लढत आहे

                गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील दारु दुकानाना परवानगी कोण देत ? दारु दुकान कोणाच्या मालकीचे असतें ? सर्वसामान्य गोरगरीब तर दारु दुकान घालत नाही. ? म्हणजे राजकीय नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचेच साखर कारखाने आहेत साखर कारखान्यात. अल्कोहोल तयार केले जाते. दारु उत्पादक प्रकल्प यांचाच असतो. डिसलरी. कारखान्याची असतें. आणि हेच जनतेचा कळवळा आल्यासारखा. दारुबंदी आदेश काढतात आणि दारु दुकानें बंद करतात. तुम्हाला जर खरोखरच दारुबंदी करायची असेलतर दारू उत्पादन करणारे साखर कारखाने यांच्या गेटला कुलप घाला दारू तयारच झाली नाही तर दुकानदार काय विकणार ? पाणी म्हणजे सर्व काही बालिश बोलन चाललं आहे

                सर्वात मोठा आपणांस व आजच्या तरुण पिढीला लागलेला शाप म्हणजे. व्यसन आणि व्यसनाधीनता यामुळे गुंडगिरी. अवैध धंदे. दहशतवाद. अपहरण. खून मारामाऱ्या. अशा विविध प्रकारांचे गुन्हे आज तरुण पिढी करत आहे यासाठी कारणीभूत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तयार कुठे होतात. अपू. चरस. गांजा. गुटखा. खैनी सिगारेट. विडी. नशेची औषधे. नशेची पान विक्री करणारे अलिशान दुकानें. हे सर्व रासरोस पणे. पोलिस प्रशासनासमोर चालत असत. शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी याचा या नशेच्या बाजाराला. वरदहस्त असतो. शाळेच्या परिसरा पासून १०० मीटर अंतरावर तंबाखू व दारु विक्री करणयासा शासन परवानगी देत नाही पण आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून दारु दुकान आहे. पानपट्टी आहे त्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री उघड चालतें. हि सर्व दुकाने गावातील प्रतिष्ठित पक्षाच्या बगलबचयाची असतांत त्यांना विचारणा करण्याचा अधिकार नाही. 

                शासकीय अधिकारी व पुढारी नेते आमदार खासदार मंत्री. आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील गुटखा विक्री बंद. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद असा भाषनात टोल टोला देतात. आपल्याला तरुण पिढीची किती कळवळा आहे याचा नुसता आव आणला जातो. कोरोना काळात लाॅकडाऊन संपल्यावर सरकारने सुरवातीला दारू गुटखा सुरू केला म्हणजे आपली खरोखरच काळजी आहे का ? जर समाज तरुण पिढी. व्यसनापासून मुक्त करायची असल्यास. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ गुटखा. व इतर नशेचे पदार्थ वाहतूक करणारे किंवा विक्री करणारे यांच्यावर कारवाई न करता. हे नशेचे व घातक पदार्थ निर्माण करणारे. कारखाने. छोटे छोटे उद्योग बंद करा त्यांना कुलप घाला. जर नशेचे पदार्थ तयारच झाले नाहीतर दुकानदार विक्री कशाची करणार मातीची ? म्हणजे उत्पादन थांबवा विक्री थांबेल. बालिश बोलण थांबवा जनता एवढी मूर्ख नाही जनतेला सुध्दा कळत हे तयार करणारे आपणांस निवडणुकीत आर्थिक मदत करतात जनतेला दाखविण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ गुटखा व अन्य नशेचे पदार्थ बंदिचा आव आणू नका

      न कुजणारे न नष्ट होणारें आणि आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सर्वात मोठा पुराचा धोका निर्माण करणारे संकट म्हणजे प्लास्टिक पिशव्या वापर होय. कारणं प्लास्टिक कुजत नाही नष्ट होत नाही. आपणांस आज भाजीपाला. मटण चिकण. व अन्य खाद्यपदार्थ आणण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरच करावा लागतो. म्हणजे सर्वत्र फळें फुले आणण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापर केला जातो त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापर जास्त म्हणजे टनामधये होतो त्यामुळे गावात प्लास्टिक कचरयाचे प्रमाण वाढते. आणि घाण पाणी वाहून नेणारे गटरे थुंबतात आणि घाण पाणी रस्त्यावर येते सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरते हे खरोखरच वाईट आहे

             गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राजकीय पक्ष. शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी गावातील स्वच्छतेसाठी प्लास्टिक बंदिचा आदेश देतात. आणि छापे टाकण्यास सुरुवात होते ती म्हणजे. पानपटवाले. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. दुध. मटन मासे चिकन विक्री करणारे. बेकरी पदार्थ विक्री करणारे. अशा विविध गोरगरीब दुकानदार यांना. दंड व शिक्षा असा नाहक त्रास दिला जातो. काहीजण अधिकारी व कर्मचारी नुसता त्रास द्यायच्या मनानें त्रास देत असतात. 

          आत्ता मला एक सांगा. ही प्लास्टिक पिशव्या तयार करण्याचा कारखाना गोरगरीब सर्वसामान्य माणसाचा असेल का ? कोणतरी नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचाच बगलबचचा असणार आहे. आदेश काढणारे यांना थोडतरी कळाव की वाहतूक विक्री बंद करण्यापेक्षा उत्पादन बंद करण्याचा आदेश द्या बघा तुम्हाला जमतंय का ? बालिश बोलण बंद करा

                पळवाट जाड प्लास्टिक पिशव्या कुजतात आणि पातळ प्लास्टिक पिशव्या कुजत नाहीत. म्हणजे फक्त आणि फक्त काढली जाते ती पळवाट म्हणजे जनता मूर्ख आहे का ? थोडातरी कळत आम्हाला ?

               समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या