दिशाभूल दिशाभूल



 दिशाभूल दिशाभूल

              बरेच काही मार्मिक विवेचन करणारा शब्द आहे आपण जेवढा विचार करु तेव्हढा कमी आहे दिशाभूल म्हणजे दाखवायचं बोलायचं एक आणि करायचं एक यालाच दिशाभूल किंवा गाजर दाखविणे असं म्हणतात 

            माणसांची आई म्हणजे जात कारणं आपणांस आपल्या जातींचा अभिमान असतो आपल्या भाषेवरून तुम्ही कोणत्या जातींचे धर्मांचे आहात असं आपणं विचारतो पण आपणांस शिक्षणासाठी धर्म जात वर्गवारी नाही संविधान नियमानुसार प्रत्येकाला शैक्षणिक व्यवसाय आर्थिक वैद्यकीय सामाजिक राजकीय स्वातंत्र्य दिले आहे मग शाळेत शिक्षण नाकारण्यासाठी जातीच्या दाखल्याची दिशाभूल कशासाठी तुम्ही कोणत्या जातींचे आहात हे आज सिध्द करण्याची गरज आहे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या मुलांना शाळेत जातींचा दाखला विचारला जातो कां नाही यांचाच अर्थ सत्ताधारी राजकीय लोकानी सर्वसामान्य गोरगरीब यांनी अडाणी राहावे शिक्षण घेता येऊ नये यासाठी आपली दिशाभूल केली आहे असं माझं मत आहे

              राजकारणी नेता निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आपल्या प्रभागातील सभा मिटींगा घेतात आणि पाच वर्षांत मतदार जगला आहे कां मेला हे न बघणारे आम्ही घरकुल योजना स़डास अनुदान पेन्शन योजना घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल अशा न कमी होणार सर्व सेवा सुविधा बाबत आम्ही सर्व काही कमी करु माफ करु अशी दिशाभूल करुन जनतेला फसवत आहेत म्हणजे एखादे काम करून घेण्याचे माध्यम म्हणजे दिशाभूल म्हणजे फसवणूक होय

            बांधकाम कामगार नोंदणी सर्वात विषय आहे अडाणी गरजू व्यसनी असा ठसा बांधकाम कामगार यांवर टप्पा पडला आहे सर्व संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना यांना कोठेही काम करून दाखविणे किंवा आम्हाला बांधकाम कामगार यांचा किती कळवळा आहे यांची दिशाभूल करण्याचा नवा फंडा आहे बांधकाम कामगार बोगस नोंदणी बंद करु सर्व बांधकाम कामगार यांना विमा सामाजिक योजना आर्थिक योगदान सुरक्षा योजना घरकुल योजना शिष्यवृत्ती योजना मिळवून देतो नोंदणी बद्दल पैसा वसूल अशी एक नाही अनेक दिशाभूल करणारी आश्वासन देऊन बांधकाम कामगार यांना मूर्ख बनविणारे संघटना सेवाभावी संस्था युनियन सामाजिक संघटना राजकीय संघटना यांना बांधकाम कामगार यांना लुटण्याचे लाईन्स देणारे शासन सुध्दा यांना सामिल आहे कां ? कारणं संघटना रजिस्ट्रेशन करायचीच आणि राजकीय नेता जवळ धरायचा मग लुटिला जोरच कारणं सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून बोगस कामगार नोंदणी बांधकाम कामगार यांचेकडून योजनेतील आपला हिस्सा काढून घेण्यासाठी बांधकाम कामगार यांच्या सोबत बॅंकेत जाणारे संघटना वाले मी बघितले आहेत एकाही बांधकाम कामगार यांना अट्टल विश्वकर्मा आवास योजनेतून आजपर्यंत घर मंजूर झाले नाही पण त्यासाठी अर्ज भरुन घेण्याच्या नावावर बांधकाम कामगार यांना लुटणारे संघटना वाले मी बघितले आहेत मोर्चा काढण्यासाठी बांधकाम कामगार कमी पण पैसे देऊन लोक बोलविणारे सुध्दा मी बघितले आहेत मोठ मोठे बांधकाम कामगार हितासाठी कार्यक्रम घेणारे त्यात नेते व त्यांची मुल बोलवून नेता सांगतो आणि नेत्यांचे बगलबच्चे सांगतात म्हणून फसणारे बांधकाम व आर्थिक लुटिला बळी पडणारे कामगार मी बघितले आहेत नोंदणी फी २७ रुपये पण आज १०००/२००० रूपये घेवून बोगस कामगार नोंदणी करणारे व यांना साथ देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आपल्या कर्तव्याचा पैसा मिळविण्यासाठी वापर करणारे चोर सुध्दा मी बघितले आहेत म्हणजे यांची चौकशी झालीच पाहिजे आणि या़ची रजिस्ट्रेशन रद्द झाले पाहिजे यांना शासनाची फसवणूक केली म्हणून दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये कोट्यवधी रुपये आज पडून आहेत ते सुद्धा बांधकाम कामगार कल्याणासाठी पण दिशाभूल करणारे सर्व नियोजन असल्यामुळे आज बोगस कामगार याचा लाभ घेत आहेत याला कारणीभूत आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हेच होय आणि शासनाने रजिस्ट्रेशन देवून प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कामगार हिताची दिशाभूल करणारी आश्वासन देणारे संघटना सेवाभावी संस्था युनियन हे देखील जबाबदार आहेत 

    ‌ एजंट हा परिस्थितीचा बळी आहे काम नाही धंदा नाही कामगार सारखा मूर्ख नाही यामुळे आज प्रत्येक ठिकाणी कामगार नोंदणी साठी एजंट तयार आहेत १००० भरा दहा हजार मिळवून देतो २०/००० भरा घर मिळवून देतो विमा देतो एवढंच काय एकादा कामगार अपघातांत मयत झाला तर त्याच्या अंत्यविधी साठी येणारे दहा हजार रुपये सुध्दा हे एजंट लाटत आहेत म्हणजे मडयाचया टाळूवरचे लोणी खाणयातला प्रकार आहे पाच लाख मिळवून देण्यासाठी एक लाख कमिशन सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी सुध्दा यांना सामिल असले पाहिजेत पैसे देणारे यांची नोद लगेच पैसे जेवन दारू पार्ट्या देणारे बसायला सहहयक कामगार आयुक्त यांच्या जवळ आणि खरोखरच कामगार असणारा कामगार भवनच्या दारातच उभा आठ दिवसांनी या आॅनलाइन बंद आहे सरवर डाॅऊन आहे तुम्ही कोणाकडून आला अस जर समजा एखाद्या बांधकाम कामगाराला अधिकारी व कर्मचारी विचारांत असेलतर जाग्यावर त्यांच्या कानाखाली जाळ काढा कारणं त्याला आपली सेवा करण्यासाठी शासन पगार मोजत त्याला शासनाने कामाला ठेवलाय का संघटना एजंट यांनी अशा अधिकारी व कर्मचारी यांना पदांवर राहण्याचा अधिकार नाही अशी दिशाभूल करणारी उत्तरे कोण देत असेलतर आजच तक्रार करा 

            सर्व गोरगरीब जनतेला हक्काचे पोटभर जेवण मिळावे यासाठी आपल्या देशात रेशन दुकान ही संकल्पना शासनाने राबविली आहे त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील प्राधान्य लाभार्थी कुटुंब व केशरी शिधापत्रिका धारक शुभ्र शिधापत्रिका अशी वर्गवारी करण्यात आली आहे त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना महिन्याचे रेशन सोडून गरिब कल्याण योजनेतून दरमहा प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिला जातो पण रेशन दुकानदार यांची मनमानी बघा रेशन कार्ड धारकांना दिशाभूल करणारी माहिती सांगत आहेत ती म्हणजे तुमचं आधार लिंक नाही तुमचं नाव दिसत नाही थम उठत नाही रेशन अन्न धान्य कमी आल आहे तुमच्या नावाचा माल आलेला नाही युनिट पाच असेल तर तीनच लोकांचं धान्य दिल जात गोदामातून कमी आल आहे मोफत तांदूळ पाच किलो वाटायचा आहे पण अशा रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी आहेत तो प्रति माणसी तीनच किलो वाटला जात आहे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी रेशन दुकानदार यांना पाठीशी घालत आहेत म्हणजे रेशन दुकानदार काही कमिशन देता काय ? आॅनलाइन नाव कमी करणे वाढविणे रेशन कार्ड नवीन देणें फाटलेले हरवलेले रेशन कार्ड बदलणे अशा विविध रेशन कार्ड स़बधित प्रकरणासाठी आज हजारो अर्ज धुळखात पडले आहेत त्यासाठी लोकांना दिशाभूल करणारी उत्तरे देऊन हेलपाटे मारण्यास लावले जात आहे

      महागाई भस्मासुर आ वासून उभा आहे सगळीकडे बांधकाम मटेरियल पेट्रोल डिझेल गॅस जीवनावश्यक वस्तू जागा घराच्या किमती भरमसाठ वाढल्या गहू बाजरी ज्वारी विविध डाळी खाद्यतेल यांचें दर असमानाला टेकायला लागले पण एकही नेता पुढारी मंत्री खासदार आमदार सामाजिक संघटना सामाजिक संस्था राजकीय पक्ष राजकीय संघटना यांनी आवाज उठवला नाही कारणं सर्व पेट्रोल डिझेल गॅस व सर्व जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे निर्माण करणारे या पांढ-या बगळयाचे आहेत त्यामुळे जनता मरु दे आपलं भरु दे असा मंत्र जपला जात आहे उलट या सर्व महागाई भस्मासुर लोकांच्या ध्यानात येऊ नये यासाठी हा नेता एक बोलतो दुसरा नेता तिसरं बोलतो जातीयवाद लोकांमध्ये वाढविण्याचे राजकारण सुरू केले आहे आणि आपणं मूर्ख महागाई न बघता दिशाभूल करणारी बोलणं याकडे लक्ष देऊन आहोत आपल्याला कळलाच नाही कोण आपली दिशाभूल करत आहेत 

         सरकार गरिब कल्याण योजनेतून गोरगरीब जनतेला 2020 पासून मोफत प्रति माणशी प्रति महिना पाच किलो तांदूळ वाटत आहे आपणाला आनंद झाला पण या मोफत तांदूळ वाटपाचा फायदा 2005 मध्ये बोगस सर्वे झालेले बोगस दारिद्र्य रेषेखालील कुटुंब घेत आहेत आणि एका बाजूला लोक अर्धपोटी उपाशी राहून जगत आहेत आणि एका बाजूला टनामधये रेशनचा तांदूळ सापडतं आहे म्हणजे बोगस रेशनकार्ड धारकांना या मोफत तांदुळाची गरज नाही म्हणजे आजपर्यंत सोळा वर्षात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे झालाच नाही मग सरकारला सर्वे करायला वेळ नाही का सर्वे न करता या अशा बोगस लोकांना वाटण्यात येणार्या मोफत तांदूळ याचा अंदाजे खर्च आहे 88 लाख कोटी आणि या योजनेचा लाभ घेणारे 80 कोटी जनता आहे म्हणजे एका बाजूने सरकार गरिब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटतंय आणि याचा सर्व खर्च आपली दिशाभूल करुन महागाई वाढवून पेट्रोल डिझेल गॅस व सर्व वस्तूंच्या किमती वाढवून योजनेचा पैसा आपल्याकडून वसुल केला जात आहे म्हणजे आपली दिशाभूल शंभर टक्के होत आहे

            शिक्षण सर्व स्पर्धा परीक्षा वर्ग अॅकेडमी वर्ग यांनी आज सर्व तरुण पिढी खुळी करण्याचे षडयंत्र केलें आहे कारणं या़चा प्रचार प्रसार प्रसिध्दी करण्यासाठी नामांकित व्यक्तिंना बोलावले जाते आणि मुलांना प्रबोधन करणारे प्रबोधनकार आपल्या शिक्षणाची आणि परिस्थितीची गाथा वाचतात आणि एम पी सी यु पी सी अभ्यास करणार्या मुलांची दिशाभूल करतात बोलताना सांगतात आम्हाला शिक्षण व्यवस्थित मिळाले नाही . पेन जेवन मिळाले नाही . गणवेश नव्हता . फी भरण्यासाठी पैसे नव्हते. पण खरं कोण सांगत नाही कारण जे कोणी क्लास वन अधिकारी आय पी एस अधिकारी तयार झाले तयांची कुटुंब श्रीमंतच होती हे कोणी सांगत नाही. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विविध खात्यात नोकरी करत होते हे कोणी का सांगत नाही. म्हणजे आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो हे सांगणारे आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा कोठे भरत होती हे तरी यांना माहिती आहे कां?. म्हणजे शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये स्पर्धा परीक्षा वर्ग विविध शिकवणी वर्गाचा प्रचार करुन गोरगरीब लोकांच्या मुलांना आर्थिक खड्ड्यात घालण्याचा यांना कोणी अधिकार दिला. दिशाभूल करुन लोकांना लुटणारे सर्वात मोठे माध्यम आहे ते म्हणजे शैक्षणिक . आणि आज आपली मुले मुली शिक्षण घ्यावे त्यांचे जीवन आई वडील मजूर आहेत उन्हात मरतात दिवसभर ही वेळ मुलांच्या वर नको यासाठी व्याजाने काढून . बॅंका काढून. उसनवारी करुन. पालक आपला पैसा या दिशाभूल करणार्या शिक्षण संस्थांच्या मढयावर घालत आहेत . 

        माहिती अधिकार सर्व शासकीय निमशासकीय आॅफिस मध्ये चालणारे सार्थक निर्थक कामाची तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार माहितीचा अधिकार कायदा २००५ नुसार आपणांस दिला आहे. पण आज सर्वजण व्यवस्थित माहिती मागतील याची खात्री नाही. काहीजण आपले हेवेदावे काढून अधिकारी व कर्मचारी यांना नाहक त्रास देण्यासाठी माहिती मागणारे काही लोक आहेत. जणमाहीती अधिकारी काय धुतल्या तांदळासारखे नाहीत ज्याला माहिती अधिकार काय आहे. त्यांचा वापर कसा करावा. माहिती अधिकार अर्जाचा निकष कसा काढावा. माहिती उपलब्ध नाही. कागदपत्रे सापडतं नाहीत. त्रेयसत पक्षाची माहिती आहे. निरंक माहिती आहे. सदर माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे देता येत नाही. अशी फसवी आणि पळवाट काढणारी दिशाभूल करणारी उत्तरे देऊन सर्वसामान्य माणसाची फसवणूक केली जाते म्हणजे ज्याला काही कळतं त्यांना जनमाहिती अधिकारी म्हणून हुधदा कोणी दिला. आज कागदपत्रे गहाळ होण्याची बरीच प्रकरणे समोर येत आहेत. 

        मनात उतरण्यासाठी फसवणूक किंवा दिशाभूल करणारे कोणतीही वाच्यता करु नका . कारणं खोटयाला जास्त आयुष्य नसतं. आपणांस जमलं शोभेल सोसलं तेवढंच बोला नाहीतर आपण सुद्धा दिशाभूल करणारे ठरणार आहोत

      बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या