मुस्लिम समाजाने चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडू नये - हाजी इर्शाद
अहमदनगर - महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने कोणत्याही प्रकारच्या चिथावणीला बळी न पडता रमजान ईद शांततेत पार पाडून देशासमोर नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन मुस्लिम जमात, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.
काही राजकीय पक्ष व संघटना गेल्या काही दिवसांपासून स्वताच्या राजकीय अस्तित्वासाठी व फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यातील असलेले एकात्मतेचे व जातीपातींच्या सलोख्याचे वातावरण जाणीव पूर्वक खराब करू पहात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संत तुकोबांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात असा जातीयवादी व मानवतेला काळीमा लावणारा प्रकार ही अतिशय निंदनीय बाब आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना प्रार्थना करण्यासाठी जागोजागी मस्जिदी बांधून दिल्या आज त्याच महाराष्ट्रात छत्रपतींचे नाव घेऊन जातीय तणाव निर्माण केला जात आहे. मुस्लिम समाजाने छत्रपतींच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या काळापासून ते मराठा मूक माेर्चा व कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थित सुध्दा हिंदू समाजातील मयत झालेल्या व्यक्तींवर हिंदू धर्माच्या विधि नुसार अंतसंस्कार करे पर्यंतचे मुस्लिम समाजाचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरनार नाही. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र आपदा आली त्या त्या वेळी मुस्लिम समाज आपल्या योगदानासह धाऊन आला, हा इतिहास आम्ही विसरता कामा नये. म्हणूनच मुस्लिम समाजा प्रमाणे इतर समाजातील तरुणांनीही जातीयवादी शक्तींच्या चिथावणीस बळी पडू नये असे जाहिर आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच सरकार व प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन जर कोणी समाजकंटकांनी काही अनुचीत प्रकार केलाच तर त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवावी अशी अपेक्षा हाजी इर्शादभाई यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रदेश सचिव डॉ. परवेज अशरफी, मुफ़्ती अलताफ़, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र नादिर खान आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment