कुठ होता ?
नशिबाने दिलेल्या पदांचा गैर वापर करू नका कोणालाही कमी लेखू नका. कोणाचाही अपमान करु नका. निंदा नालस्ती करु नका. तुम्ही शक्तिशाली असाल. पैसा सत्ता असेल. पण वेळ सर्वांपेक्षा शक्तिशाली आहे. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कधीच कोणाला लायकीपेक्षा महान बनवत नाही आणि काही देत नाही. अहंकार विसरा परमेश्वराने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडविले आहे आणि शेवटी मातीतच घालणार आहे हे सत्य आहे
आपणाला वेळोवेळी प्रत्येक सुखात दुःखात पाडणारा व आपल्या मनांत काहूर माजवणारा शब्द आहे तो म्हणजे कुठ होता. सर्वांना प्रत्येकाच्या गरजेच्या वेळी आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचा सहवास हवा असतो. समजा लहान वयात आईचं प्रेम मोठयापणात वडलांचे प्रेम. तरुणपणात. बहिण. भाऊ. सगेसोयरे यांचे प्रेम. लग्नानंतर पत्नी व मुलांचं प्रेम. हे सर्व निसर्ग निर्मित आहे. हे आपणास माहीत आहे. मोठयापणी पुस्तक पाहिजे. पैसा मिळविण्यासाठी नोकरी कामधंदा पाहिजे. सवाताच घर पाहीजे. आपल्यावर प्रेम करणारी माणस पाहिजेत हा निसर्ग नियम आहे
रोगराई. पूर. अवेळी अवकाळी पाऊस. ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. नोकरी. बेरोजगारी विविध घोटाळे. शासकीय निमशासकीय कार्यालय अशा विविध अडचणी आपणांस नविन नाहीत. आपण वेळोवेळी यांचा सामना केला आहे. पूर्वी काळात मलेरिया प्लेग पटकी. अशी महामारी रोग येत होते गाव छोटी छोटी होती. रोगाने गावच्या गावं संपत असत पण लोक एकामेकाला मदत करायचे सोडत नव्हते. त्यावेळी लाॅकडाऊन टाळेबंदी होती का ? नव्हती अस कोणत संकट आल की लोक गाव सोडून जात होती तोच खरा लाॅकडाऊन होता. मदत नव्हती पण विचारपूस करणारी माणस होती
२३ मार्च रोजी गाव वाडी वस्ती तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते. लोक रोगांपासून वाचावी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाने कडक टाळेबंदी जारी करण्यात आली होती. जगण्यासाठी कमविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडला. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. काहीजणांना हा सर्व प्रकार झेपला नाही त्यांनी या उपासमारीला कंटाळून आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा. शासनाने लोकांची उपासमारीची वेळ संपवण्यासाठी सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत अन्न धान्य वितरण करण्यास सुरुवात झाली. पण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रेशन दुकानदार यांना हाताला धरून शासनाचा मोफत तांदूळ राईस मिल मध्ये विकला जिल्ह्यात जनता उपाशी मरत असताना जागोजागी रेशनचा मोफत तांदूळ सापडत होता. याला कोण जबाबदार आहे. विना रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ मिळवून देण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणताही अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आला नाही त्यावेळी आम्ही सवता फीरुन. २५०० लोकाची यादी करून पुरवठा विभागाला दिली होती. त्यात सुध्दा चणा कोणाला मिळाला कोणाला नाही बांधकाम कामगार यांना शासनाने १५०० रू सानुग्रह अनुदान जाहीर केले. ते सुद्धा नविन आणि जीवीत नोदणी असणार्या बांधकाम कामगार यांना मिळाले. हातगाडी वाले फळे फुले भाजीपाला विक्री करणारे यांना सुध्दा शासनाने अनुदान दिले आणि उपासमारीची वेळ थोडी काहोईना कमी झाली टाळेबंदी काळात. डॉ यांनी लोकांना अगदी हिन वागणूक दिली. तपासणी नाही. हाड दुखत असल्यास तापाचे आणि खोकल्याचे औषध दिले. फी डबल घेतलीं. यावेळी अशा डॉ वर कारवाई करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय म्हणजे शासनाने सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक जगविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या.
आपण आपल्या अनमोल मताने निवडणून दिलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक हे यावेळी कोठेही रस्त्यावर सुध्दा दिसले नाहीत. आपल्या प्रभागातील लोक उपाशी आहेत का त्यांच्या घरात खायला काय आहे नाही याची विचारपूस सुध्दा केली नाही निवडणूक आली की सर्वजण एकत्र दिसायला सुरु झाले काही समाजसेवक यांनी अन्न धान्य वाटले ते सुद्धा दोन किलो. धड दळून आणता येईना. असुन फायदा आणि नसून खोळांबा. असा प्रकार झाला म्हणजे आपली नुसती चेष्टा केली या लोकांनी. आपण विसरला काय. ? . या आणि अशा सर्व समाजहितचिंतक लोकाचा एक समज आहे की. ५००/ १००० रूपये मताला वाटले की जनता सर्व विसरणार आहे. हा गैरसमज मोडून काढण्याची आज गरज आहे. आज आपण लक्षात ठेवा जेव्हा आपण उपाशी होतो तेव्हा एकही आपणाकडे आला नाही. आणि आज मतदान आल की रात्री बारा वाजता दरवाजा वाजवून उद्या मतदान आहे हे सांगणारे कुठ होता तेव्हा लक्षात ठेवण्याची गरज आहे नेत्यांसाठी आंदोलन मोर्चा करताना आम्ही चालतो. सभा मिटिंगमध्ये जनसमुदाय दाखविण्यासाठी आम्ही चालतो. पोलिस स्टेशनला गुन्हे आमच्या मुलांच्या नावांवर हे सुद्धा आम्ही केल
समाजाचं देण लागतो ही भावना मनात घेऊन उपाशी लोकांना शिजविलेले व कोरड अन्न वाटप करण्यात संबंधित पोलिस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी व कर्मचारी यांनी स्वता फिरून गरजूंना अन्न वाटप केले. जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले तेही कमीत कमी एक कुटुंब पंधरा दिवस भागेल असे वाटप करणारे आमचें पोलिस बांधव होते. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस रस्त्यावर पहारा देणारे पोलिस बांधवच होते ते विसरू नका.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment