सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

 

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा 

          अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. अशी वर्गवारी करून आपल्यात फुट पाडण्याचे एक मोठ षडयंत्र भांडवल राजकारणी लोकांनी केलं आहे. दिनदयाळ सुतगिरणी ‌  मागासवर्गीय सुतगिरणी. अनुसूचित जाती जमाती सुत गिरणी.  अशी प्रवरगानुसार नाव ठेवून सार्वजनिक प्रायजोन नावाखाली देवस्थान. गायरान. इनामी जमीन. अश विविध विभागांतील जमीनी राजकारणी लोकांनी हडप केल्या . सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या त्या तात्पुरती या चालल्या आणि लवकरच त्यांचे नामोनिशाण संपले. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. इतर मागासवर्गीय. विशेष प्रवर्ग अशा नावाने विविध संस्था रजिस्टर केल्या आणि त्यांच्या नावाखाली लाखों रूपयांचा अपहार केला. पण त्या संस्थेत एक ही वरिल  प्रवर्गातील एकही गोरगरीब सभासद किंवा अध्यक्ष नाही आहे तो फक्त नावासाठी त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही ‌ अशाच काही संस्था आज सांगली जिल्ह्यात आहेत त्या आज शोधण्याची गरज आहे कारण आहेत त्या कागदावरच आत्ता या शोधा आहेत कां नाही

* प्रताबिंब मागासवर्गीय को आप इनड लि पेठ वाळवा स्थळ २०/२/३ एम आय डी सी इस्लामपूर

* परिवर्तन को आॅप इनड लि वाळवा प्रकल्प स्थळ २०/२/३ एम आय डी सी इस्लामपूर

* प्रेरणा मागासवर्गीय को आॅप इनड लि आष्टा ता वाळवा प्रकल्प स्थळ ए २९/२/३ एम आय डी सी इस्लामपूर

* महात्मा फुले मागासवर्गीय को आॅप इनड लि इस्लामपूर ता वाळवा प्रकल्प स्थळ गट नं पारटन वाघवाडी ता वाळवा

* वाल्मिकी महेतर शेडयुलड कास्ट इंनड सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २५६ विठुरायाचीवाडी कवठेमहांकाळ

* नवमहाराष्ट्र मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था कडेपूर ता कडेगांव प्रकल्प स्थळ पलॅट नंबर ०-१६ एम आय डी सी कडेगांव ता कडेगांव

* साईराज मागासवर्गीय औद्योगिक संस्था म शिरशी ता शिराळा प्रकल्प स्थळ क्रमांक सी एम आय डी सी शिराळा

* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅंक वर्ड क्लास गारमेंट मॅनफुचर को आॅप सोसायटी लि दिघंची प्रकल्प स्थळ गट नंबर ११८५

* तासगणेश कोरोगेटेड बाॅकस बॅकवरड को आॅप इंडस्ट्रिज लि तासगाव प्रकल्प स्थळ गट नंबर २८२ पुणदी ता तासगाव

* डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित तांदुळवाडी प्रकल्प स्थळ गट नंबर/ मालेवाडी ता वाळवा

* समृध्दी औद्योगिक सहकारी संस्था मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ६४९/५११ कसबे डीग्रज ता मिरज

* सफुरती मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित इस्लामपूर प्रकल्प स्थळ पलॅट नंबर एम आय डी सी शिराळा

* सागरेश्वर मागासवर्गीय सहकारी संस्था कडेगांव प्रकल्प स्थळ पलॅट ई एम आय डी सी शिवाजीनगर कडेगांव

* विशवसंजय इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि तुपारी ता पलूस प्रकल्प स्थळ गट नंबर तुपारी ता पलूस

* श्री दत्तसाई मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर १२८ कवठेमहांकाळ

* साईप्रसाद मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित जि सांगली प्रकल्प स्थळ फ्लॅट ए -५८ एम आय डी सी शिराळा ता शिराळा

* हर्षवर्धन इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि इस्लामपूर ता वाळवा प्रकल्प स्थळ गट नंबर २५६/२ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ

* श्री साईनाथ मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ पलाॅट नंबर ए ग एम आय डी सी शिराळा ता शिराळा 

* अनुज इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ५९ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ

* राजवर्धन इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि इस्लामपूर प्रकल्प स्थळ गट नंबर सावळी ता मिरज

* युनायटेड को आॅप इंडस्ट्रिज लि सांगली प्रकल्प स्थळ पलॅट नंबर एम आय डी सी कवठेमहांकाळ

* राजलक्ष्मी मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सह संस्था मर्यादित शिराळा प्रकल्प स्थळ लक्ष्मी चौक प्लांट नंबर एन टी औंढी रोड एम आय डी सी शिराळा

* महाराष्ट्र मागासवर्गीय यंत्रमाग सहकारी संस्था मर्यादित मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २०१ तानंग ता मिरज

* गौतम मांगा औद्योगिक सहकारी संस्था जत ता जत प्रकल्प स्थळ गट नंबर २९/१ चोरोची ता कवठेमहांकाळ नालंदा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था जत ता जत प्रकल्प स्थळ गट नंबर २९/१ चोरोची ता कवठेमहांकाळ

* डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कवठेमहांकाळ प्रकल्प स्थळ प्लांट नं ए

* ग्लोबल एग्रो प्रोसेसिंग मागासवर्गीय को आॅप इंडस्ट्रिज लि इस्लामपूर प्रकल्प स्थळ गट नंबर २१२४ पेठ ता वाळवा

* साईसोना मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ता शिराळा प्रकल्प स्थळ गट नंबर २९४ म्हैसाळ ता मिरज

* युवा शक्ती इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लिमिटेड तासगाव प्रकल्प स्थळ प्लांट नंबर सी ६१ एम आय डी सी शिराळा

* शाकंभरी मागासवर्गीय यंत्रमाग सहकारी संस्था ता मिरज जि सांगली

* सफाई कामगार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ५५७ वाडीबाई ता शिराळा

* महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ५६७०/ अ मालगाव ता मिरज

* सरकार इंडस्ट्रीज को आॅप सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर देशिंग ता कवठेमहांकाळ

* श्रीराम इंडस्ट्रीज को आॅप सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ७५ कारंदवाडी ता वाळवा

* श्रीमंत राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय गारमेंट सहकारी संस्था मिरज प्रकल्प स्थळ गट ३५/२ ब मु बेलवाडा पो मांगरुळ ता शिराळा

* पंचशील मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ७०२ सिध्देवाडी ता मिरज

* प्रितम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २५६ /२ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ

* पर्ल फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मांगा सहकारी संस्था मर्यादित कसबेडीग्रज प्रकल्प स्थळ गट नंबर ७३४/१ कसबे डिग्रज

* कामाक्षी औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ता मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर १६११ आरग ता मिरज

* श्री कल्पतरु इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि टाकळी ता मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २९ /१ चोरोची ता कवठेमहांकाळ

* कृषणछाया मागासवर्गीय ओधोगिक मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ प्लांट नंबर ४९/५० एम आय डी सी शिराळा ता शिराळा

    वरिल प्रमाणे सर्व जिल्ह्यांतील मागासवर्गीय संस्थांची माहिती दिली आहे त्यातील आपल्याला आपल्या गावातील या नावाची मागासवर्गीय संस्था आहे कां बंद आहे काय स्थितीत आहे याची आजच माहिती घ्या 

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपणं आपल मतं विकलं काय? भाग ३

 



आपणं आपल मतं विकलं काय?  भाग ३

          संविधानाने आपणांस मतदान या माध्यमातून आपलं मत मांडून आपला प्रतानिधी निवडण्याचा अनमोल अधिकार दिला आहे. पण आज आपलीच मुले आज राजकीय संघटना पक्ष मग ते गणपती मंडळ. नवरात्र उत्सव मंडळ. या ठिकाणी आपलीच मुले अध्यक्ष म्हणून नेमली जातात. हे सर्वात षडयंत्र राजकीय आहे कारणं राजकीय लोकांची मुलं स्टडी रुममध्ये आणि आपली मुले राजकीय नेते यांच्या सांगण्यावरून बंद आंदोलन संप मोर्चे रास्तारोको.अशी विविध आंदोलन करायला लागतात आणि त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस केंस होते ती म्हणजे आपल्या मुलावरच आणि आपल्या मुलांचे जीवन बरबाद होते. 

     निवडणूक दिनांक जाहीर झाल्यावर नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे पांढरी कपडे घालून कार्यकर्ता म्हणून फिरतात मग हेच ते बगलबच्चे आहेत जे नेते आमदार खासदार पुढारी मंत्री यांच्या नावाखाली खाजगी सावकारकी ‌ गुंडगिरी. टोळीयुद्ध. लोकांचे भूखंडावरील अतिक्रमण. हाॅटेल धाबे. बार. यांवर दमदाटी करून दंगा तोडफोड करणे . निवडणूक कालावधी मध्ये आपल्या नेत्यांचा सकारात्मक प्रचार करणे. मतदार यांना दमदाटी करणे. मतदारांना उचलून नेणे. मतदार आणि कार्यकर्ते यांच्या जेवन दारू याची व्यवस्था करणे. अशी अनेक कामे नेत्यांच्या सांगण्यावरून हे सर्वजण करत असतात. म्हणजे निवडणुकीत गुंडगिरी पैशांचा अपव्यय अशा घटना घडतच असतात . यामुळे जनतेच्या विकास कामांचा बोजवारा उडतो.

घरकुल घोटाळा. भूखंड घोटाळा. विकास योजना घोटाळा. पेन्शन घोटाळा. घरपट्टी पाणीपट्टी घोटाळा. भुयारी गटार योजना घोटाळा. रस्ते निधी घोटाळा. गटार घोटाळा. स्मशानभूमी बांधकाम घोटाळा. समाजमंदिर घोटाळा. अ़गणवाडी मुलांच्या खाऊमधये घोटाळा. असे विविध घोटाळे आपण रोज वृतमानपत्रात वाचतो टिव्ही वर बघतो आणि विसरतो मला काय करायचं आहे. आरे आपणं मुर्खपणा चे सर्व पायर्या पार करतो कारणं या नेत्यांना आपणच आपलं बहुमोल मत देऊन निधी खाण्यास सोडले आहे. म्हंजे आपलं मत आपणं विकलं आणि यांनी निवडून आल्यावर गाव शहरं तालुका जिल्हा विकला म्हंजे चारी बाजूंनी लुटच आहे.

              मतदानावेळी घडणारे अनेक अनुचित प्रकार आपणं वारंवार अनुभवले आहेत ‌ . कार्यकर्ता नेत्यांसाठी आणि नेत्याला उमेदवारी मिळवण्यासाठी आत्मदहन. टाॅवर वर चढून आंदोलन. रस्त्यावरून अनवाणी फीरेण अशी प्रतिज्ञा करतात खरोखरच नेता तुमच्यासाठी कधी उपाशी राहीला आहे कां? त्यांनी त्यांचे दौरे जे आपल्याच पैशातून पोलिस फौजफाटा तोही आपल्याच पैशातून नेत्याला बंदोबस्त बाॅडिगारड यांचा सुद्धा खर्च आपल्याच डोक्यावर असतो वेळ पडल्यास हाच नेता गट पक्ष बदलतो त्यावेळी जनतेची बाजु घेतील काय? वेगळा पक्ष काढला त्यावेळी जनतेचे हित बाजूला कोट्यवधी रुपये घेऊन आपण दिलेल्या मताचा बाजार मा़डला आणि करोडो रुपयांची मालमत्ता गोळा केली त्यावेळी जनता दिसली नाही कां? कोणत्याही नेत्याने आपली मालमत्ता गोरगरीब मुलांच्या व्यवसाय नोकरी बेरोजगारी हटाव यासाठी एक ही रुपया खर्च केला आहे का? साधा नगरसेवक जरी झाला तरी तो एका वर्षात लाखोंची गाडी. बिल्डिंग बांधून विकायला चालू करतात एकरात यांचें पलाॅट आहेत कुठन आलं म्हणजे आपल्या मताला किती किंमत आहे आत्तातरी ओळखा. कार्यकर्ता मी याचा आणि त्याचा यातच डोकी फोडून घेतात आणि नेत एका जागेवर मांडीला मांडी लावून दारू पितात जेवणाच्या पार्ट्या करतात आणि कार्यकर्त्यांची टिंगल करतात तरि सुध्दा आपणांस लाज वाटली नाही. 

      मतदार म्हणून नोंदणी झाल्यावर आपणं प्रतिनिधींच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरतो ‌यासाठी मतदान केंद्राची संपूर्ण यंत्रणा निर्वाचित आयोगाच्या देखरेखीखाली केली जाते ‌ . याबाबत निश्चित स्वरूपाचे नियम आहेत.तयाचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न निर्वाचित आयोगाकडून केला जातो.आपलया मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत देण हा प्रत्येक मतदार यांचा हक्क आहे. परंतु बरेच वेळा मतदान केंद्राच्या वाटेवर अनेक अडचणीना मतदार यांना सामोरे जावे लागते. जाणूनबुजून काही समाजकंटक अडथळे उभे करतात त्यामुळे सापेक्ष होणारें मतदान गलिच्छ स्वरुपाचे होते. आपल्या विरोधात असणार्या मतदार यांना धाकदपटशा दाखवून तो मतदार केंद्रीवर येणार नाही यासाठी अटोकाट प्रयत्न केले जातात. विशेषत ग्रामीण भागातील दलित आदिवासी व गोरगरीब जनता.व अन्य दुर्बल घटकांना या सर्व प्रकाराला सामोरे जावे लागते.परंतु अलिकडच्या काळात यापेक्षा भयंकर प्रकार घडू लागलं आहेत ‌यात मत पेट्या पळविणे ‌मतदान केंद्रावर शसत्रबळचा वापर.व सर्व मत पेट्या मध्ये आपल्या इच्छेनुसार गतपत्रिका भरणे मतदान केंद्रावर हिंसाचार घडवून आणणे ‌मतदार यामध्ये भीती निर्माण करणे.इ गोष्टी आज प्रामुख्याने घडतं आहेत. या सर्वांचे कारणं म्हणजे राजकारणात वाढता गु़डाचा सहभाग गुन्हेगारी. उत्तर प्रदेश.बिहार राज्यांमध्ये हे आत्तापर्यंत घडतं होतं आत्ता या गोष्टी हळूहळू आपल्याकडं यायला सुरुवात झाली आहे.ही चिंचेची बाब आहे.या गैरप्रकारांना राजकीय नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पोलिस यंत्रणा ‌सरकारीअधिकारी यांचं सगणमत असतं ‌या अशा हिंसाचार प्रकारामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित गरिबी मतदार भयभीत झाला आहे.तर शहरात राहणारा पांढरपेशा मतदार या संपूर्ण प्रकियेबाबत उदासीन बनला आहे ‌या दोन्ही गोष्टी लोकशाही व्यवस्थेला मारक ठरत आहेत. 

            बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधीक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपणं आपल मत विकलं काय ? भाग २



 * आपणं आपल मत विकलं काय? * भाग २

        पारावर पहिल्या सभा होत होत्या त्यावेळी मतदान नव्हते लोक  आपल्याच समाजातील आपला हक्काचा आणि आपल्यासाठी सुखात दुःखात पुढं येणारा माणूस समाजप्रतिनीधी म्हणून पुढे करत असतं. आणि हा समाजांचा प्रतिनिधी कोणतीही वैयक्तिक फायदा न बघता फक्त आणि फक्त समाजासाठी आपला अनमोल वेळ आपले सर्व जीवन घालवत असत 

          काळ बदलला आणि याच समाज प्रतिनिधी यांना सत्ता आणि पैशांची भुक लागली आणि येथूनच सुरवातीला म्हणजे ग्रामपंचायत मिनी मंत्रालय अस्तित्वात आले आणि यासाठी काम करणारे समाज प्रतिनिधी हे लोकांच्या मतदान प्रक्रिया मधून निवडले जाऊ लागले म्हणजे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडी सुरवातीला लोक आपलयातूनच करतं असतं पण नंतर याच निवडी  चिठ्ठी पध्दतीने होण्यास सुरुवात झाली. आणि सर्वात शेवटी सर्वात निच दर्जाचे राजकारण गजकर्ण ही संकल्पना  लोकांनीं अंमलात आणली आणि गावातील राजकारण सर्वात खालच्या दर्जाचे असते ते खरे आहे ‌ . कारणं मतदान मिळविण्यासाठी जातीयवाद. प्रांतवाद. गुंडगिरी. पैशांचा वापर. धार्मिक वाद. प्रचार माध्यम. मतदारांवर दबाव. उमेदवार यांना उचलून नेणे. डांबून ठेवणे. असे विविध माध्यमातून मतदान केलं जातं. 

        लोकांनी आपला घरचा आणि समाजांचा एखादा तरी हक्काचा माणूस ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. जिल्हा परिषद. पंचायत समिती. आमदार.खासदार . मंत्री. पुढारी. या आणि अन्य जागेवर आपल्या अनमोल मताने समाजांचा हक्काचा माणूस निवडून दिला जातो. आणि एक वेळ अशी येथे की ज्या समाजाच्या नावांवर म्हंजे अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. इतर मागासवर्गीय. अशा विविध प्ररवगाला निवडणूकीत आरक्षण देण्याचा आपल्या संविधानात तरतूद आहे.  पण आज  सर्वत्र जातींचे भांडवल करुन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री झाले आणि त्यांनी समाजासाठी काय केलं याचा कधी आपण विचारच केला नाही. मुस्लिम समाज असो वा कोणताही समाज असो ज्या ज्या नेत्यांनी समाजांचे जातींचे भांडवल केले त्यांनी समाजाला आपल्या बोटावर माकडासारखे नाचविले आहे आणि अजून आपणं नाचत आहोत ही परस्थिती बदलायला हवी त्यासाठी समाजांचा प्रतिनिधी जर समाजांचा वापर फक्त आणि फक्त मता पूरता करत असेलतर त्याला निवडून देताना त्याचे निवडणूक काळात वाटप करण्यात येणारे पैसे. वाटलं जाणारे मटन दारू. यावर अगोदर बहिष्कार टाका. यासाठी समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे

      मतदान निर्दोष व्हावे त्यातून लोकांच्या मतांचा कौल स्पष्टपणे व्हावा ‌मतदार यांनी निर्भयपणे व मुक्त वातावरणात मतदान करावे यासाठी निवडणूक मंडळ काम करत असतें.हे आपणं बघितले आणि अनुभवले आहे ‌ परंतु केवळ कायदेशीर तरतुदी व यंत्रणा असल्या म्हणजे पुरेसे आहे असं नाही. आपण सुद्धा सतर्क राहावे लागणार आहे. अखेर लोकांचा निवडणुकीत मतदानाचा हक्क भयमुक्त बजाविता आला पाहिजे. त्यांच्याकरीता राजकीय दबाव गुंडगिरी नसावी.राजकीय प्रलोभन नसावी. पण आपणांस यांचा अनुभव कायमचं येत असतो.जवळपास चाळीस वर्षे आपणं विविध राजकीय पातळीवरून निवडणूकीसाठी मतदान करत आलो आहे ‌आपलया चाळीस वर्षांचा निवडणूकीचा आणि मतदान याचा अनुभव आपल्या राजकीय सहभागाचे स्वरूप व त्यांच्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यास सहहयाभूत ठरेल म्हणून तयाचा विचार करणे हे आज काळाची गरज आहे .

        मताधिकार यामुळे या देशातील अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तिला राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी अशी संधी ठराविक लोकांना मिळत असे.या नव्या संधिमुळे लोकांना अनेक दृष्टींने त्यांच्या राजकीय जीवनाचा चैनीचे जीवन जगण्याचा फायदा झाला आहे.  दिवसेंदिवस मतदानामधये सहभागी होणा-या चे प्रमाण वाढत चालले आहे.तसेच लोक राजकीय दृष्ट्या जागरूक होऊन जाणीवपूर्वक मतदान करताना कोणीही दिसतं नाही.या आणि यासारख्या अनेक गोष्टी या प्रक्रियेत जमेची बाजू नाही.तयाचा आपण तपशील प्रमाणे विचार करण्याची गरज आहे.

    सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तहसिलदार कार्यालय महसूल विभाग पुरवठा विभाग. नगरपालिका. महानगरपालिका. महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग  आरोग्य विभाग.  अशा विविध ठिकाणी काय काम असतं. की त्यासाठी तुम्हाला सरपंच उपसरपंच सदस्य . नगरसेवक. यांची गरज भासते.  मला एक सांगा कोणीही आपला घरफाळा. पाणीपट्टी. लाईट बिल. माफ करत नाही कोणतंही काम लाच दिल्याशिवाय होतं नाही मग कशासाठी अश चोरा़ची गरज आहे म्हणूनच निवडणूक आली की माझं पाकीट आल नाही. म्हणणारे. पैसा आल्याशिवाय मतदार न करणारे. आज कोणाचें जेवन आहे. कोणाची दारू मिळेल का.  हा विचार करणारे आपणं खरोखरच मुर्ख आहोत आपणास कधीही कशाचीही लाज वाटली नाही आणि असेच राहिलें तर एक वेळ सायकल घेण्याची लायकी नसणारे आज फोरचुनर मधून फीरत आहेत. वडिलोपार्जित विस गुंठे जमीन पण आज दोनशे ते तिनसे एककर जमीन लाखों कोटींची स्थावर मालमत्ता. मोठमोठे अपार्टमेंट बिल्डिंग हे यांना मिळवून देणारे आपलेच अनमोल मतदान आहे. ताकद आपली ओळखा. 

          लोकशाहीत मत भिननतेला वाव असतो.तरिदेखील शेवटी आपली ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती जिल्हा परिषद व अन्य विभाग कसे चालावे कोणी चालवावे कोणाच्या हातात या चाव्या असाव्या ‌यासाठी सहमतीची आवश्यकता असते. अशी सहमतीने विचारविनिमय वाटाघाटी फारसे न ताणता देवघेवीचे मार्गाने.व एकामेकाशी संवाद साधून निर्माण केली जाते ‌यातून राजकीय वातावरणात एक प्रकरचा खुलेपे. मोकळेपणा निर्माण होतो.आपलया भारतासारखा खंडप्राय आणि विविध हितसंबंधी गटांचे अस्तित्व असलेल्या विविधता पूर्ण देशांत तर अशा खुलेपणाचे फार मो‌ठे महत्व आहे ‌हा खुलेपणा कायम टीकवून धरण्यासाठी लोकांमध्ये एक विश्वास जागता राहवा लागतो ‌आणि हे कार्य मतांमुळे शक्य आहे.मताधिकारामुळे सर्व नागरिकांना समान दर्जा मिळतो व ते सर्वजण परस्परांशी समान पातळीवरून संवाद करु शकतात. 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपण आपलं मत विकलं काय? * भाग १

 


* आपण आपलं मत विकलं काय? * भाग १ 

      आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे अस मानलं जातं.हे संविधान अमलात आल्यावर १९५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या आणि लोकांनीही त्यांना मिळालेल्या मताधिकाराचा वापर करून आपल्या संसद व राज्य प्रतिनिधी विधिमंडळ सदस्य यांची निवड केली. या पहिल्या निवडणुकीत जवळपास १६ कोटी ३२ लाख मतदार होते. ही संख्या  गेल्या चाळीस वर्षात आज तिप्पट झाली आहे.१९८९ साली झालेल्या नवव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या ५० कोटी पर्यंत पोहोचली म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के लोकांना मताधिकार वापरण्याची संधी मिळाली 

          आपली लोकशाही प्रतिनिधिक लोकशाही आकारमान व लोकसंख्या या दृष्टीने भारत हे मोठ राष्ट्र आहे. येथे समान हीत संबंध असलेल्या लोकांचे अनेक गठ आहेत आणि त्यांचे परस्पर हितसंबंध अंत्यंत गुंतागुंतीची आहेत.  तेंव्हा आपला कारभार पूर्ण सहमतीचया आधारे किंवा एकमताने चालणे शक्य नसते. म्हणून लोकांना आपल्या इच्छा आकांक्षा आणि हितसंबंध आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत व्यक्त कराव्या लागतात. प्रतिनिधी निवड करण्यासाठी मतदानाचा घटनात्मक तरतूद करण्यात आली आहे. आपल्या संविधानाच्या १५ वया प्रकरणातील अनुछेद ३२६ मध्ये मताधिकाराबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. यानुसार केंद्र पातळीवर लोकसभेच्या आणि राज्य स्तरावर विधानसभेच्या निवडणूका प्रौढ सार्वत्रिक मतांच्या तत्वावर होतील वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या कोणीही भारतीय नागरिकांला कोणताही भेदभाव न करता मताधिकार दिला आहे ‌मूळ तरतुदी मध्ये ही वयोमर्यादा २१ वर्ष होती. परंतु १९८९साली संसदेने केलेल्या ६२ वया घटना दुरुस्ती हि वयोमर्यादा १८ वर्षांपर्यंत खाली आणली आहे.आपलया संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विधिमंडळानी केलेल्या कायद्यानुसार हे प्रौढ सार्वत्रिक मताधिकाराचे तत्व अन्य स्तरावर कार्य करणार्या लोकशाही स्वराज्य संस्था देखील स्विकारले गेले .आज अगदी ग्रामस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निकडणूकसुधदा प्रौढ सार्वत्रिक मताधिकार तत्वावर घेतली जाते. अशा रितीने लोकांना स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रत्यंतर कार्य करणार्या संस्थांचा कारभार आपल्या प्रतिनिधींच्या चालविण्याची संधी मिळते

        स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंत्यंत विविध पूर्ण अशा समाजातून एक राष्ट्र उभे करण्याचे जबरदस्त आव्हान आपल्यासमोर होते . ही नव्या राष्ट्राची उभारणी लोकशाही पध्दतीने करायची होती ‌  पूर्वी पासून राजकीय दृष्ट्या भारताचे स्वरूप संकिरण असे होते. ब्रिटिशांच्या काळात एक तृतीयांश भारत ५६० लहान मोठ्या राज्यात विभागलेला होता ‌  इंग्रजांचे भारतावर अधिपत्य होते परंतु आधुनिक अर्थाने भारत हे एक राष्ट्र नव्हते विविध भागात राहणा-या लोकांचे राजकीय अनुभव आणि जाण जाणिवा मध्ये फरक होता ‌ . धर्मभेद. प्रांतभेद. भाषाभेद. या गोष्टी देखील प्रकर्षाने लक्षांत येण्यासारखा होत्या स्वातंत्र्य चळवळीने या सर्वांना एकत्र आणले व स्वातंत्र्य प्रेमी आणि एकसंघ राष्ट्राची उभारणी या समान ध्येयाने त्यांना परस्परांशी बांधून ठेवले आहे. आपण सर्व एका राष्ट्रच नागरिक आहोत असा विश्वासच मताधिकाराने त्यांना दिला. या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे एक साधन म्हणून मताधिकाराचा विचार महत्वाचा ठरतो. 

दिलेले सरकार चालवण्यासाठी

  त्यांचे प्रतिनिधी निवडण्याच्या राज्यातील नागरिकांच्या अधिकाराला मताधिकार म्हणतात . लोकशाही व्यवस्थेत याला खूप महत्त्व आहे. लोकशाहीचा पाया मताधिकारावर घातला जातो. या व्यवस्थेवर आधारित समाज आणि शासनाच्या स्थापनेसाठी प्रत्येक प्रौढ नागरिकाला कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक आहे.

मतदान संपादन.

मतदानाचा अधिकार असलेल्या देशात जितके जास्त नागरिक आहेत, तितका तो देश अधिक लोकशाही मानला जातो. अशाप्रकारे, आपला देश जगातील लोकशाही देशांमध्ये सर्वात मोठा आहे कारण आपल्याकडे मतदान करणाऱ्या नागरिकांची संख्या जगात सर्वाधिक आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची व्याख्या निवडून आलेल्या सरकारच्या सर्व स्तरांवरील निवडणुकांसाठी आधार आहे. सार्वत्रिक मताधिकार म्हणजे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व नागरिक , त्यांची जात किंवा शिक्षण, धर्म, रंग, वंश आणि आर्थिक परिस्थिती विचारात न घेता मतदान करण्यास स्वतंत्र आहेत .

नवीन राज्यघटना लागू होण्यापूर्वी, भारतात 1935 च्या "भारत सरकार कायदा" नुसार, फक्त 13 टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता. मतदाराच्या पात्रतेसाठी खूप मोठ्या अटी होत्या. केवळ चांगल्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या नागरिकांनाच मताधिकार देण्यात आला. यामध्ये विशेषतः ते लोक होते ज्यांच्या खांद्यावर परकीय राजवट विसावली होती.

इतर पाश्चात्य देशांमध्ये, लोकशाही प्रणाली आता पूर्णपणे विकसित झाली आहे, अचानक सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही. हळूहळू, शतकानुशतके, त्यांनी त्यांच्या सर्व प्रौढ नागरिकांना मताधिकार दिला आहे. काही ठिकाणी तर आता मतदानाच्या बाबतीत रंग आणि जातिभेद पाळला जातो. परंतु भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकार केला .

      बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काॅलरा पटकी


 ** काॅलरा पटकी **

             अतिशय भयानक आणि जीवघेणा जलजन्य आजार आहे . आपली जुनी लोक सांगत असतात की आपल्या भारतात पटकी सारख्या महाभयंकर महामारी आजाराने थैमान घातले होते. गावच्या गाव या आजाराने गाटली होती . एकाला जाळून आल की दुसरं मरायचे असं सर्व गावाच्या गाव संपायची त्यावेळी असा वैद्यकीय  डॉ नर्स असा लवाजमा नव्हता. औषध नाही. गावठी औषधाने यांवर उपचार नाही 

            आज सर्वत्र औद्योगिक एम आय डी सी. विविध कारखाने  यामधून बाहेर पडणारे केमिकल यामुळे होणारें वायुप्रदूषण यामुळे आज दमा . कॅन्सर. उच्च रक्तदाब. ब्रेनटुमर . असे विविध आजार होतात यामुळे आज जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे . एम आय डी सी. साखर कारखाने. व विविध केमिकल कंपन्या यामधून दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाते. आणि याच नदीपात्रातील पाणी वाड्या वस्त्या गाव गल्ली. शहरं. तालुका. याठिकाणी जलकुंभात सोडले जाते.आणि हेच पाणी नळाद्वारे पिण्यास सोडलं जातं आणि आणि नदीत सोडण्यात आलेले दुषित पाणी लोकांच्या पिण्यात आल्यामुळे  विविध जलजन्य आजार होतात . काविळ. अतिसार. हिवताप. काॅलरा. असे अनेक जीवघेणं आजार होतात  वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास  पेशंट दगावण्याची दाट शक्यता असते . आपणच आपलं जीवन धोक्यात घालतो कारणं आपल्या गावांची शहरांची तालुका जिल्हा यांची आज भयानक वाढलेली लोकसंख्या यामुळे लोकांच्या राहण्याचा राहणे . घरातील सांडपाणी. संडासात वापरले जाणारे पाणी. मोकळी गटारे यातून येणारी दुर्गंधी.  कचरयाचे डोंगरासारखे ढीग त्यातून येणारी दुर्गंधी. अशी माध्यम आहेत की त्यापासून सर्व वातावरण आपणच दुषित करत असतो . 

       ‌‌ रोग विरहित आनंद निरोगी जीवन जगायचे असल्यास आजच आपण आपल्या घरापासून सुरुवात करण्याची गरज आहे . आपल घर घरांचा परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे. आणि मग आपली गल्ली स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांचे जनजागृती करणे गरजेचे आहे . आपल्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांना वेळोवेळी आपल्या गल्लीत डास रोधक. रोग प्रसार रोधक. औषध फवारणी करण्यासाठी आग्रह करणे गरजेचे आहे.  आपल्या गल्लीत असणारे मोकळे भूखंड त्यावर वाढवणारी झाड झुडपे. त्यातील पाणी साठणारे डबकी ‌यासाठी सदर जागा मालकांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी नोटीस बजावून जागा स्वच्छ करण्याचा आदेश देणे गरजेचे आहे . 

कॉलऱ्यावर प्रतिबंधक उपाय व उपचार इतके सोपे असूनही, जगभरातील ४७ गरीब देशांमध्ये मिळून आजही वर्षभरात जवळपास ३० लाख लोकांना कॉलरा होतो. तर १ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हे प्रमाण दरवर्षी साधारण ३० हजार इतके आहे.

कॉलरा हा पूर्णपणे टाळता येणारा आजार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था यासाठीची पायाभूत व्यवस्था जगभरातील सर्व देशांमध्ये उभारली पाहिजे. आजही भारतात ५० टक्क्यांपेक्षा कमी घरांमध्ये स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहे. खूप लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विकसित देशांसारखे संपूर्ण कॉलरा नियंत्रण शक्य होत नाही.

आज जगभरातील जवळजवळ ९० टक्के वैद्यकीय संशोधन, हे विकसित देशांच्या प्रथमिकतेनुसार होत आहे. तर संख्येने जास्त असणाऱ्या गरीब देशांच्या गरजांवर फक्त १० टक्के संशोधन होत आहे. यासाठी जागतिक स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. तरच ‘सर्वांसाठी आरोग्य’, हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकू. अन्यथा ‘कोव्हीड-१९’ सारखेच वेगवेगळे आजार गरीब देशातून आले तरी संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण करतील आणि कॉलऱ्यासारखे शतकानुशतके रेंगाळत राहतील

भारतात १९७०-१९९० या काळात पोलिओची साथ आली. देशातील शहरी व ग्रामीण भागात आणि उत्तर प्रदेशात पोलिओग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक होते. विसाव्या शतकात १९७४ मध्ये देवीच्या साथीने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भारतात ८५ टक्के लागण झाली होती. पश्‍चिम बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमधील गावांत याचा प्रभाव मोठा होता. यातील मृतांची संख्या १५ हजार होती. ज्यांना लागण होऊनही बचावले त्यांना अंधत्व व अन्य व्यंग आले.एकविसावे शतक... उत्तर भारतातील प्लेग (२००२) उत्तर भारतात ही साथ आली. हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात याचा प्रभाव जास्त असला तरी ती लवकर आटोक्यात आली.डेंगी (२००३) सप्टेंबर २००३ मध्ये ही साथ आली. सुरुवातीला दिल्लीत तिचा प्रभाव होता. नंतर ती अन्यत्र पसरली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डेंगीचा प्रसार मोठा होता. यातील मृत्यूदर हा तीन टक्के होता. मात्र अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजूनही याचे गांभीर्य मोठे होते

पटकी (महामारी अथवा कॉलरा) हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलऱ्याची लागण होते. कॉलऱ्याचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो.

पटकी (कॉलरा) हा आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. स्वल्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलऱ्याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात कॉलऱ्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. व्यापारी मार्गाने जमिनीवरून जलमार्गाने कॉलरा इ.स. १८१७ च्या सुमारास रशियात व रशियामधून युरोपमार्गे उत्तर अमेरिकेमध्ये पसरला. जगात गेल्या दोनशे वर्षामध्ये सातवेळा कॉलऱ्याची साथ आली आहे. 1१९६१मधील इंडोनेशियातील साथ ही सातवी होती.

कॉलरा टाळण्यासाठी घरगुती उपाय: या घरगुती उपायांचे अनुसरण करा आणि कॉलरा टाळा

कॉलरा झाल्यास आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन मधासोबत बारीक करून दिवसातून तीन वेळा सेवन करा. याचा फायदा होईल.

अर्धा ग्लास पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. त्यात मीठ घाला. कॉलराच्या रुग्णाला दिवसातून अनेक वेळा दिल्यास फायदा होईल.  

प्रथम हळद पाण्यात भिजवा, नंतर उन्हात वाळवा आणि पावडर बनवा. एक कप गरम पाण्यात मध आणि हळद मिसळून प्यायल्यास फायदा होईल. कॉलरा रुग्णाला स्वच्छ आणि स्वच्छ अन्न द्या. पाणी उकळून प्यायल्यानेही या आजारापासून आराम मिळतो.  

घरच्या घरी ORS द्रावण तयार करा. यासाठी चार कप पाण्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळा. हे द्रावण दिवसातून अनेक वेळा प्या.  

द्रवपदार्थाचे सेवन अधिकाधिक करा. कॉलरा रुग्णांसाठीही ताक फायदेशीर आहे.  

दही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कॉलराच्या रुग्णाला केळी दह्यात मिसळून दिल्यास फायदा होईल.  

लवंग पाण्यात उकळून रुग्णाला दिवसातून अनेक वेळा प्या.  

कॉलरा किंवा कॉलराच्या रुग्णांभोवती स्वच्छतेची खूप काळजी घ्या. त्यांना उघड्यावर शौचास जाऊ देऊ नका. घरगुती उपचारांसह तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.

कॉलरा हा आजार व्‍हीब्रीओ कॉलरा या विशिष्‍ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्‍ये पाण्‍यासारखे/भाताच्‍या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्‍यंत वेगात होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्‍वरुपात होते. आजाराचा प्रसार वेगाने होतो.

बोली भाषेतील नाव

पटकी

आजाराचे वर्णन

उलटीसह अथवा उलटीशिवाय अचानक सुरु झालेले जुलाब

आजारावर परिणाम करणारे घटक

व्‍हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतडयाला संसर्ग झाल्‍याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयामधील स्‍ञी पुरुषांमध्‍ये आढळतो. रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिसारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.

रोगप्रसार

रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिस्सारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.

रोगलक्ष्‍णे

पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते ५ दिवस असा आहे. पटकी रुग्‍णात खालील लक्षणे आढळतात

पाण्‍यासारखे/तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाब

उलटया

हदयाचे ठोके वाढणे

तोंडाला कोरड पडणे

तहान लागणे

स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे

अस्‍वस्‍थ वाटणे 

उपचार

जुलाब-वांत्‍या चालू आहेत पण जलशुष्‍कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्‍यादि घरगुती पेयांचा वापर करावा.

जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास – क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी.

तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजिकच्‍या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे.

झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्‍याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते.

जलशुष् कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिज्यविकांची (अॅन्टीकबायोटिक्स्ची) योग्‍य माञा (डोस) देण्‍यात यावी.

प्रतिबंधात्‍मक उपाय

शुध्‍द पाणी पुरवठा

वैयक्तिक स्‍वच्‍छता

हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत –

खाण्‍यापूर्वी व स्‍वयंपाकापूर्वी

बाळाला भरविण्‍यापूर्वी

शैाचानंतर

बाळाची शी धुतल्‍यानंतर

जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर

साबण उपलब्‍ध नसेल तर आपण आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ करु शेकतो.

मानवी विष्‍ठेची योग्‍य विल्‍हेवाट

रुग्‍णांवर त्‍वरित उपचार

बालकाचे गोवर प्रतिबंधात्‍मक लसिकरण अतिसाराच्‍या 

नियंञणासाठी आवश्‍यक आहे.

        आपण आत्ताच कोरोना सारख्या महामारी संकटाने पछाडलो होतो . त्यावेळी आपल्याला काय त्रास झाला आपणं तो अनुभवला आहे. आत्ता पाऊसाळा सुरू झाला सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे जागोजागी डबकी साटली आहेत. गावातील शहरातील सर्व गटारे भरुन वाहत आहेत. आणि हे सर्व घाण पाणी नदीपात्रात मिसळत आहे.आणि तेच पाणी गढुळ होऊन आपणास पिण्यास येत आहे. आजच आपण पिण्यास वापरत असणारे पाणी तुरटी. गरम करून थंड पाण्यास घ्या. डासांपासून स्वताला वाचवा.  वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अशा वर्कर यांना सहकार्य करा आपल आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या 

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१५ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

म्हैशी पेक्षा रेडकू मोठ

 

** म्हैशी पेक्षा रेडकू मोठ **

              आपल्या पूर्वजांची सर्वात मार्मिक आणि आपणांस ज्ञान देणारी म्हनं आहे. म्हैशी पेक्षा रेडकू मोठ म्हणजे एखाद्या स्थावर मालमत्ता. जंगम मालमत्ता. अथवा शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक. शासकीय निमशासकीय. अशा विविध विभागांतील फायद्यापेक्षा त्या मिळवून घेण्यासाठी येणारा खर्च जास्त असतो त्यावेळी ही शब्द रचना तंतोतंत जुळते आज सर्वत्र जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे विविध शाॅप. आलिशान दुकान सजली आहेत. त्याचबरोबर शहरात खेड्यात . मटन. चिकन. मासे . तसेच तत्सम खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकान आहेत. तसेच ज्वारी. बाजरी.गहू. मका. कडधान्ये विक्री करणारी दुकान सुध्दा आज सजली आहेत त्यातील दर महैशी पेक्षा रेडकू मोठ असा प्रकार आहे. 

          शासकीय निमशासकीय कार्यालयात विवीध विकास योजना.  आर्थिक विकास योजना. विविध कल्याणकारी योजना. पेन्शन योजना. महसूल विभाग. पुरवठा विभाग. यामधील एकादा लाभ मिळवायचा असेल तर त्या योजनेतील फायद्यापेक्षा. घालावे लागणारे हेलपाटे. खर्चावा लागणारा पैसा. एजंट दलाल यांच्याकडून होणारी लुट. एकंदरीत वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो त्यावेळी ती योजना नको कोणताही शासकीय लाभ नको अशी मानसिकता तयार होते त्याला म्हैशी पेक्षा रेडकू मोठ असा अनुभव आपणास येतो.

           बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध सामाजिक. विमा योजना. आर्थिक. शैक्षणिक. वैद्यकीय. वैयक्तिक . अशा २९ विविध योजना राबविल्या जातात. पण त्या मिळविण्यासाठी आज बांधकाम कामगार यांना त्या योजनेबरोबर पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे पाच हजार मिळविण्यासाठी २००० खर्च म्हणजे पदरात पडतात ते ३००० आणि वेळ आणि वाया गेलेले काळ वेगळंच. बुडलेला पगार. एजंट दलाल यांनी लुटलं ते वेगळंच. असं आज सरारास चालू आहे यामध्ये समाजातील काही स़घटना वाले यांना कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी कामगार नेते खतपाणी घालत आहेत. म्हणजे फायदा कमी आणि लुट जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही

             रेशनकार्ड आणि रेशन दुकान ही संकल्पना सर्वांना म्हणजे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वच्छ. निवडक. रास्त. आणि स्वस्त. रेशन सरकार मान्य धान्य वाटप किंवा शिधापत्रिका वाटप सापेक्ष कागदपत्रे घेऊन एक ही रुपया शासनाच्या नियमाबाहय घेणं हा शासनाचा अवमान केल्यासारखे आहे. पण आज रेशन कार्ड काढणे. नाव वाढविणे. नाव कमी करणे. फाटलेले हरवलेले रेशनकार्ड बदलून मिळणे. अन्न धान्य सुरू करणे. अशी विविध काम त्या रेशन संबंधी असणार्या फायद्यापेक्षा सर्वसामान्य गोरगरीब यांची आर्थिक लुटच जास्त आहे ‌महणजे खरोखरच आहे महैशी पेक्षा रेडकू मोठ बरोबरच आहे.

            वैद्यकीय सेवा ईश्वर सेवा आज बाजार झाला आहे. योजनेची हाॅसपिटल दवाखाने कमी झाले आणि खाजगी आणि महागडी सर्वसामान्य गोरगरीब यांना कापणारी न परवडणारी अशी खाजगी दवाखाने आज टोलेजंग तयार झाले. माणूस आहे तो आजारी पडणार आहे.मग त्याचा उपचार करण्यासाठी गावात असणारा सरकारी दवाखान्यात डॉ नाही नर्स नाही पुरस औषध नाही. कोठेही रूग्ण हक्काची सनद नाही. डॉ वेळेवर नाही रात्री अपरात्री पेशंट आल्यास मुक्कामी डॉ नाही. जे डॉ सरकारी दवाखान्यात काम करतात त्याचा बाहेर दवाखाने आहेत. मग उपचार व्यवस्थित होणार कां ? सरकारी दवाखान्यात असलेला औषध साठा विकला जात नसेल कशावरून ? मेडिकल आणि डॉ यांचा नवरा बायको संबंध आहे. म्हणजे आजारापेक्षा त्याचा खर्च अशा विविध माध्यमातून डबल होत आहे . म्हणजे म्हैशी पेक्षा रेडकू मोठ असाच काहीसा अजब प्रकार आपल्या ध्यानात येत आहे. तरीही आपणं मुग गिळून गप्प बसलो आहे.

              आज आपल्या प्रत्येकाच्या घरात चारचाकी. दोन चाकी . गाडी आहेच म्हणजे त्या गाडीत कोणताही बिघाड झाला तर गाडी कंपनीतून बाहेर पडायच्या आगोदर त्या गाडीची दुरूस्ती करणारे मिस्त्री बाहेर पडतात आणि चार पहान घेऊन रस्त्याच्या कडेला आपलं दुकान थाटतात अनुभव असतो का नाही माहिती नाही. आणि अशा एखाद्या मिस्त्री कडे आपण आपली चारचाकी. दुचाकी. रिपेअर करण्यासाठी घेऊन गेलो कि गाडीला खरोखरच काम असणार वेगळ पण त्यापेक्षा  जास्त काम काढण्याचे काम काही बहादर करतात . चांगला एखादा गाडीचा पार्ट काढून त्या ठिकाणी डुपलिकेट पार्ट घालणे. जुने पार्ट लावून नवीन पारटच पैसे घेणे. नवीन पार्ट विक्री करणारे दुकानदार आणि मिस्त्री यांची साठगाट असतं प्रत्येक पार्ट माग कमिशन ठरलेले असत. जुने पार्ट लावून नवीन पारटच पैसे घेण. गाडीतील जॅक. स्टेफनी. डिझेल.  पेट्रोल. आॅईल. म्युझिक सिस्टिम. महत्वाचे सामान गायब करणे हा सर्वात महत्वाचा गोरखधंदा हे मिस्त्री लोक करत आहेत. आणि गाडी आली की मशिन काम करणारा जवळ . कमानपाट काम करणारा त्यांच्या जवळ. इलेक्ट्रिक काम करणारा जवळच. बाॅडी . एसी काम करणारे वेल्डिंग करणारे. टायर पंक्चर काढणारे. जुने टायर घेणारे जुनं नावीन्याचा दरांत विक्री करणारे सर्वजण गिधाडा सारखे टपूनच असतांत केव्हा एकाद पड सापडतय. मग काय तो चारचाकी. दुचाकी वाला मोकळाच आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणतेही काम करण्याचे कसलही दरपत्रक नाही. सामानाचे पैसे कमी आणि मजूरी डबल असा प्रकार आज बघायला मिळत आहे. उदा एखादा पार्ट जर सहासे रुपयांचा असेल तर तो फिटींग करण्याचा चार्ज सातसे रूपये घेतला जातो म्हणजे हा तर म्हैशी पेक्षा रेडकू मोठ असा अजब आणि गजब प्रकार आहे 

        आज सरकार शेतीला प्राधान्य देत आहे यासाठी विविध शेतीविषयक उपाययोजना कृत्रिम तंत्रज्ञान. पाण्याचे साठवण. अशा विविध माध्यमातून तरुण जे आज सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे नोकरी विना बेरोजगार आहेत. त्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध उत्तेजनार्थ कार्यक्रम राबवित आहे . पण आज उलटं झाले एका बाजूला शेतकरी सन्मान केला जातो आणि शेतकरी कर्जमाफी यांसारखी फसवी नियोजने केली जातात यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी शासन सरकार एक आर्थिक मदत देत आहे. आणि एका बाजूला बी. बियाणे. खते. विविध किटकनाशके. पिकांसाठी लागणारी सर्व उत्पादने यांचें दर आज डबल झाले आहेत. मग कशाची शेती करतोय शेतकरी . शेतकरी यांनी पिकविलेल्या धान्यातूनच बी बियाणे तयार केले जाते पण पेरणी करतेवेळी तेच धान्य . ज्वारी. बाजरी. गहू. मका. सोयाबीन. हरबरा. वाटाणा. अशी विविध उत्पादने शेतकरी आपल्या शेतात घेत असतो. आणि बाजारात दलाल एजंट मातीमोल दराने हे सर्व खरेदी करतात. आणि पेरणी करतेवेळी हेच धान्य विविध कंपन्यांचे नांवे पाचपट दराने शेतकर्याला विकलं जातं म्हणजे पिकविणारा तेच डबल टिबल दराने खरेदी करून आर्थिक लुट करून घेतो. त्यातच शेतात नांगरणी. कोळपणी. कापणी. पेरणी. तणनाशक. किटकनाशक. शेतीसाठी कामगार. असा खर्च करून पुरता बेजार होतो म्हणजे शेती सुध्दा आज अधिक खर्च आणि मिळकत शुन्य असा प्रकार होऊन बसला आहे. म्हणजे म्हैशी पेक्षा रेडकू मोठंच झाल आहे .

        मासेमारी    हा कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे  पण आज प्रत्येक शहरात . गावात. वाड्या. वस्त्यांवर . मासेमारी व्यवसाय करणारे बरेचं लोक आहेत. नदि ‌ ओढे. तलाव. बंधारे . याठिकाणी हे लोक कोणताही शासकीय किंवा खाजगी त्या गावातील ग्रामपंचायत यांना आर्थिक मोबदला न भरता मासेमारी करत असतात. शासन नदितील वाळू. दगड. किंवा अन्य कोणतेही तत्सम वस्तू काढल्यास कायदेशीर कारवाई करते मग नदीतील. ओढे. तलाव. बंधारे. यामध्ये फुकट मासेमारी करून आर्थिक फायदा मिळविणारे यांच्यावर कारवाई का करत नाही . कारवाई करण गरजेच आहे.कारण हीच फुकटची मासेमारी करणारे त्याच गावात. वाड्या. वस्त्यांवर. शहरांत . विक्री करत असतात पण यामधून एक वाईट बाब समोर आली आहे. की ग्राहकाने मासे खरेदी केल्यावर ते त्याला तोडून साफ करून देण ही मासे विक्री करणार्या ची जबाबदारी आहे पण आज कोणताही मासे विक्री करणारा हेच मासे तोडून साफ करून देण्यासाठी किलो प्रमाणे दर लावत आहेत. म्हणजे मासे हे ५०/६०/७०/१००/२००/ रूपये प्रति किलो दर असेलतर त्याला तोडून व साफ करून घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्येक किलो मागे ३०/४०/ रूपये मोजावे लागत आहेत. म्हणजे म्हैशी पेक्षा रेडकू मोठ झाल का नाही

कोकणातील मासेमारी

कोकणात शेती या व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कोकण किनारपट्टीवरील लोकांचा हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कोकणाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्यामुळे येथे मासेमारी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो

कोकणात विविध प्रकारचे मासे आढळतात. येथील मच्छिमार साधारणपणे उन्हाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये मासेमारी करतात. मान्सूनमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मासेमारी केली जाते. कारण, मान्सूनमध्ये मासेमारी करणे धोकादायक असल्यामुळे बोटी दूरवर पाठवल्या जात नाहीत.त्याचप्रमाणे मन्सून हा माश्यांचा प्रजनन कालावधी असल्याने या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात येते.  समुद्र किनाऱ्यावर वाळत घातलेले मासे

कोकणामध्ये सुरमई, बांगडा,पापलेट, घोळ, बोंबील असे विविध प्रकारचे मासे मिळतात. कोकणातील मासे अनेक ठिकाणी निर्यात केले जातात. त्यामुळे मासेमारी हे आज कोकणातील अनेक लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनले आहे

         मटन आणि चिकन मार्केट आज प्रत्येक गावात शहरात काय प्रत्येक गल्लीत आहे. यामध्ये दुकानांवर कापलं जाणारे कोंबडी बकरी. याचा दर्जा काय असतो. आपण कधी बघतो काय? तया बकरयाचे वय काय. त्याच वजन किती. कोणत्या वयाच बकर कापल पाहिजे. ते आजारी आहे कां. ते बकर कोंबडी तुमच्या समोर कापल आहे कां. मटन चिकन दुकानांवर स्वच्छता आहे कां. दुकानांवर काम करणारा कामगार स्वच्छ कपडे घालतो कां. तो व्यसन करून दुकानांवर उभा आहे कां. त्यांचे वजन माप रितसर केव्हा आणि कुठ चेक अप झाले आहे कां. अशा विविध बाबी आपणं बघत नाही. मटन विक्री दुकानांवर मुंडी. फेर. अस वेगळ विकल जातं पण मुंडी फोडणारा माणूस त्या दुकानांवर नसतो मग त्यासाठी समोर त्याच दुकानदार याचा माणूस मुंडी फोडण्याचे काम करतो पण त्यासाठी ३०/४०/ ग्राहकांकडून जादा घेतो म्हणजे ज्याने मटन विक्री दुकान घातल आहे त्यानेच कोणतंही जादा पैसे न घेतां ग्राहकाला सेवा दिली पाहिजे का नाही. म्हणजे इथ सुध्दा म्हैशी पेक्षा रेडकू मोठंच झाले की हो.

           आपली सर्वांची नितांत गरज म्हणजे शिक्षण आपण एक वेळ उपाशी राहू पण शिक्षण घेणारच पण आज शिक्षणाची गंगा गरिब गरजू लोकांच्या घराला वळसा मारुन श्रीमंत आणि धनिक लोकांच्या घरांत विना चपपलच पाणी भरत आहे. आज जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या यासाठी कारणीभूत आहोत आपणच आज खाजगी शाळा. काॅलेज. विद्यालय. महाविद्यालय. उच्च शिक्षण देणारं विद्यालय.  विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी सर्वत्र पसरलेले अॅकडमी जाळ. आय.टी.आय. शिक्षण संस्था. हया सर्व राजकीय पुढारी नेते आमदार खासदार मंत्री यांच्याच आहेत. यांनी मनमानी फि आकारणी करून आपल्याला लुटलं आहे. यांनी आपला विकपाइंट ओळखला आणि त्यावरच वार केला आहे. म्हणजे मोफत आणि सक्तीचे शिक्षण आज कुठंतरी अडकून पडलं आहे. म्हणजे म्हैशी पेक्षा रेडकू मोठ शिक्षण खर्च आज गोरगरिबांना पेलणारा नाही यामुळे यांची मुल आज चहा गाडी. वडापाव. चायनीज. दाबेली. चिकन सिस्टी फाय.  सर्विसिंगसेंटर होटेल. धाब. बांधकाम मजूर म्हणून काम करतांना आपणास दिसत आहेत. म्हणजे याचं धोरण अस आहे की तुमची मुले शिकली तर उद्या कामासाठी गुलाम कुठुन आणायच म्हणजे आज मोठा मोठाच होत निघाला आहे. आणि लहान अजून लहान होत आहे 

          आपल्या सर्वांसाठी खरेदी विक्री व्यवहाराचे शासन निर्णयानुसार नियमानुसार नियमितीकरण करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी याला महत्वाचे स्थान आहे. बोगस जमीन व्यवहार होऊ नये यासाठी जामीन संगणकीकरण शासनाने अमलात आणले. आणि सर्रास जमीन दस्त होण्यास सुरुवात झाली. लोकांनी जमीन खरेदी विक्री सपाटाच लावला आणि जमीन संपते काय अशी शंका वाटायला लागली आणि शासनाने प्रत्येक जिल्ह्यात तुकडे बंदी.तुकडे जोडबंदी कायदा लावला म्हणजे एका वेळी २० गुंठे क्षेत्र विकता येईल पण त्या क्षेत्रांचे विस भाग करून विक्री करता येणार नाही. विक्री करायचीच असल्यास त्यासाठी संबंधित मंडलाधिकारी. जिल्हाधिकारी. यांची परवानगी लागेल असा शासन नियम आहे. जर जिल्ह्यात तुकडे बंदी. तुकडे जोडबंदी कायदा अंमलात आहे तर मग तहसिलदार कार्यालयांत उपनिबंधक यांच्या सहीने जमीन खरेदी विक्री व्यवहार कसे केले जातात. जिल्ह्यात तुकडे बंदी तुकडे जोडबंदी कायदा अंमलात आहे म्हणजे सदर काळात झालेल्या जागांचे खरेदी विक्री व्यवहारातील जमीनीची सात बारा नोंद होणार कां. भला मोठा प्रश्न आज आ वासून आपल्यापुढे उभा आहे. आणि सदर जमीन खरेदी विक्री करणारे गुंठा अर्धा गुंठा यासाठी कमीतकमी ४० हजार खर्च येत आहे मग तो कसा येतो यांचे व त्याची सात बारा नोंद होणारं का नाही याचा निर्वाळा संबंधित  दुय्यम निबंधक यांनी जनतेपुढे करणं गरजेचं आहे आज म्हैशी पेक्षा रेडकू मोठ असाच प्रकार आपल्याला दिसतं आहे 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या